Breaking

महाराष्ट्रात इयत्ता पहिली ते आठवी पर्यंतच्या परीक्षा रद्द

0

मुंबई :राज्याच्या शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी शिक्षण विभागाची बैठक घेत शालेय परीक्षाबाबत महत्वाचे निर्णय घेतले आहेत
यामध्ये दहावीचे उर्वरित पेपर वेळापत्रकानुसार होणार असून नववी, अकरावीचे उर्वरित पेपर 15 एप्रिलनंतर होणार असल्याचे शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी सांगितले. तर इयत्ता पहिली ते आठवीपर्यंतच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.
शालेय परीक्षाबाबत निर्णय जाहीर झालेला नव्हता. त्यासंदर्भात आज शिक्षण विभाग आणि शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी बैठक घेत अखेर निर्णय घेतला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here