Breaking

पाचोरा-भडगाव येथे भाजपाचे महाएल्गार रास्तारोको आंदोलन

0

पाचोरा- भारतीय जनता पा ही ही जन जन जन जनर्टी व रिपाई (आठवले गट) रासप,रयत क्रांती संघटना, शिवसंग्राम पक्ष ह्या महायुतीच्या माध्यमातून झोपलेल्या आघाडी सरकारला जागे करण्यासाठी आज राज्यव्यापी महाएल्गार आंदोलन राज्यभर करण्यात येत आहे.त्याच पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टी व मित्र पक्ष्यांच्या माध्यमातून पाचोरा येथे खासदार उन्मेश दादा पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत व भाजपा तालुका अध्यक्ष अमोल शिंदे यांच्या नेतृत्वाखाली ठिक-ठिकाणी दूध संकलन केंद्रांच्या बाहेर बसून तसेच शहरातील जारगाव चौफुली येथे रास्तारोको आंदोलन करण्यात करण्यात आले. दूध उत्पादक व शेतकऱ्याबाबत ह्या महाविकास आघाडी सरकारची उदासीनता अत्यंत संतापजनक आहे.दूध उत्पादक ,शेतकरी राजा जेव्हा पहाटे उठून दूध काढतो, प्रसंगी जनावराच्या लाथा खातो आणि दूध विक्रीसाठी आणतो. ही वस्तुस्थिती शहरात राहणाऱ्या मुख्यमंत्री राज्यकर्त्याना माहिती नाही हे दुर्दैव असून तात्काळ सरकारने दूध उत्पादकांना प्रति लिटर रू.१० अनुदान व दूध पावडरला प्रति किलो ५० रू. अनुदान दिले पाहिजे अशी मागणी खासदार उन्मेश दादा पाटील यांनी यावेळी केली. तसेच कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी लॉकडाऊन सुरू असतांना अश्या भयावह अडचणीच्या परिस्थितीत जगाचा पोशिंदा…शेतकरी व दूध उत्पादक बांधव ह्या झोपलेल्या महाविकास आघाडी सरकार कडून दुर्लक्षित झाला आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वच सीमा बंद असल्याने शेतकऱ्यांच्या आणि दूध उत्पादकांच्या डोळ्यातील अश्रूंचा पूर ह्या आघाडी सरकारच्या दरबारी पोहोचलाच नाही. याची खंत वाटते त्यामुळे पाचोरा तालुक्यातील दूध उत्पादकांसह शेतकऱ्यांच्या विविध मागण्या महाएल्गार आंदोलनाच्या माध्यमातुन या निवेदनासोबत दूध पिशवी देऊन आम्ही मा.प्रांताधिकारी व तहसिलदार यांच्या कडे मांडीत आहोत असे भाजपा तालुका अध्यक्ष युवा नेते अमोल शिंदे यांनी सांगितले.

निवेदनातील प्रमुख मागण्या

१) गाईच्या दुधाला सरसकट प्रति लिटर रू.१०/- व दूध पावडरला प्रति किलो रू.५०/-अनुदान मिळावे.२) दूध खरेदीचा दर प्रति लिटर रु.३०/- करण्यात यावा.३) शेतकऱ्यांच्या मागील वर्षाचा घरांत पडून असलेला कापूस,मका,आणि ज्वारी लवकरात-लवकर हमी भावाने पूर्णपणे खरेदी करून दिलासा द्यावा.४) शेतकऱ्यांना युरिया सह तत्सम रासायनिक खतांचा मुबलक पुरवठा करण्यात यावा.५) शेतकऱ्यांचे ताळेबंदी मधील तीन महिन्यांचे वीजबिल सरसकट माफ करावे.तरी वरिल सर्व मागण्या तातडीने मंजूर करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा.अशी आग्रही मागणी आम्ही करीत आहोत असे अमोल शिंदे यांनी सांगितले.

याप्रसंगी भाजपा जिल्हा सरचिटणीस सदाशिव पाटील,कृ. उ.बा.समिती सभापती सतिष शिंदे,पं.स.सभापती वसंत गायकवाड,शहराध्यक्ष रमेश वाणी,जि.प.सदस्य मधुकर काटे,पं.स.सदस्य बन्सीलाल पाटील,सरचिटणीस गोविंद शेलार,संजय पाटील,नगरसेवक विष्णु अहिरे, व्यापारी आघाडी अध्यक्ष कांतीलाल जैन सरचिटणीस राजेश संचेती,सुनिल पाटील सर, युवा मोर्चा तालुका अध्यक्ष मुकेश पाटील,शहराध्यक्ष समाधान मुळे,राहुल गायकवाड,भैया ठाकूर,आदी उपस्थित होते.

भडगाव येथे भारतीय जनता पार्टी विविध मागण्यासंदर्भात सरकार विरोधात आंदोलन करण्यात आले

भडगाव ( ब्युरो चिफ सागर महाजन यास कडून ) भडगाव येथे आज भारतीय जनता पार्टी यांच्या वतीने विविध मागण्यांसाठी दुपारी 1 वाजता पारोळा चौफुली आंदोलन करण्यात आले दुपारी सर्व पदधिकारी एकत्र येऊन या ठिकाणी आंदोलन सुरुवात करण्यात आली सुरूवातीला महाविकास आघाडी विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली या ठिकाणी पदधिकारी यांनी पारोळा चौफुली वर बसुन हे आंदोलन करण्यात आले. आंदोलन खासदार उन्मेष पाटील यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले. या आंदोलनात प्रमुख मागण्या आहेत की दुध उत्पादकांना सरसकट 10 रू प्रति लिटर अनुदान तसेच दुधपावडरला प्रति किलो 50 रू अनुदान मिळायला हवे, भडगाव तालुक्यातील शेतकरी बांधवाच्या घरात पडुन असलेला कापुस ,मका,ज्वारी त्वरित खरेदी करण्यात यावी ,भडगाव तालुका शेतकरी संघात नोंदनी केलेल्या शेतकरी बांधवाचा माल लवकर खरेदी करून व व्यापाऱ्यांनी शेतकरी बांधवांनी शेतकरीच्या नावे आपला माल भडगाव शेतकरी संघात विकला आहे या सर्व काळाबाजाराची चौकशी करून कारवाई करण्यात यावी व शेतकरी बांधवांना न्याय मिळावा ,सर्व सामान्य जनतेला मागील तीन महिन्यांचे वाढीस व अन्यायकारक पध्दतीने वीजबिल देण्यात आले हे विजबिल शासनाने त्वरित माफ करावे ,मागील दोन महिन्यात युरियाचा मोठ्या प्रमाणावर काळाबाजार सुरू आहे व सर्व सामान्य शेतकरी बांधवांना युरिया मिळत नाही व युरिया साठी शेतकरी बांधवाचे हाल होत आहे ,या सारख्या अनेक मागणी साठी आंदोलन करण्यात आले
महाविकास आघाडी सरकारने कोरोनाच्या संकट काळात राज्यभरातील जनतेकडे दुर्लक्ष केले आहे. त्यातच राज्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांना मोठ्या अडचणीचा सामना करावा लागला आहे. राज्यात भाजपाचे सरकार असताना दुधाला सरसकट प्रती लिटर ५ रुपये अनुदान व दूध भुकटी निर्यातीस सुद्धा अनुदान दिले जात होते. आता तर दुधाचे दर मोठ्या प्रमाणात कमी झाले आहेत. मात्र राज्यातील नाकर्ते सरकारने दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी कोणतीही उपाय योजना राबवली नसून त्यांना वाऱ्यावर सोडले आहे.
गायीच्या दुधाला सरसकट प्रती लिटर १० रुपये अनुदान मिळाले पाहिजे, दूध भुकटी निर्यातीला प्रती किलो ५० रुपये अनुदान मिळाले पाहिजे आणि दूध खरेदीचा दर प्रती लिटर ३० रुपये व्हायला पाहिजे, या महत्त्वाच्या मागण्या आम्ही राज्य सरकारसमोर ठेवल्या आहेत. आम्ही हे आंदोलन झोपलेल्या राज्यकर्त्यांना जागृत करण्यासाठी केले आहे. त्यामुळे सरकारने दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या या प्रश्नांना गांभीर्याने घेऊन यावर त्वरित तोडगा काढावा.असा अनेक मागणी चे निवेदन भडगाव तहसीलदार माधुरी आंधळे यांना जळगाव लोकसभेचे खासदार उन्मेष पाटील ,भाजपचे भडगाव तालुका अध्यक्ष अमोल नाना पाटील ,पाचोरा तालुका अध्यक्ष अमोल शिंदे ,भडगाव चे माजी तालुका अध्यक्ष सोमनाथ पाटील,तालुका सरचिटणीस अनिल पाटील यांच्या हस्ते देण्यात यावेळी श्रावण लिंडायत, रणजित भोसले,बन्सीलाल परदेशी, प्रदीप कोळी,नितीन महाजन,प्रमोद पाटील,शैलेश अरूण पाटील, सुरेश मराठे,नितीन महाजन,नकुल पाटील ,रतिलाल पाटील, दादाभाऊ पाटील ,दगडु महाजन .किरण शिंपी , अनिल महाजन, दत्तात्रय पाटील, ज्ञानेश्वर भोसले,सचिन पाटील, प्रशांत कुंभारे,शेखर बच्छाव ,शुभम सुराणा,पुरूशोत्तम पाटील,यांच्या सह भाजपचे पदधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here