Breaking

आ. किशोरआप्पा कोरोना पॉझीटिव्ह झाल्या नंतर त्यांचे आवाहन &🔹ध्येय न्युजचे आ. किशोरआप्पा, मा. आ. दिलीपभाऊ, संजयनाना,अमोलभाऊ यांच्यासाठी खास
हम बोलेगा तो
बोलते की
बोलता है

0

किशोर आप्पा कोरोना पॉझीटिव्ह झाल्या नंतर त्यांच्या कडून पाठवण्यात आलेल्या पोस्ट मध्ये म्हटले आहे कीमाझी कोवीड-१९ चाचणी ( टेस्ट ) करण्यात आली त्यात काल रात्री माझा अहवाल‌ ( रिपोर्ट ) पाॅझिटिव्ह आला आहे.तरी व्यवस्थित उपचार माझ्यावर सुरू आहेत.
माझी तब्येत ठिक आहे.काळजी करू नये.
मागील आठ दिवसात माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी योग्य ती काळजी घ्यावी व काही लक्षण आढळल्यास आपली देखील कोवीड-१९ चाचणी करून घ्यावी हि नम्र विनंती …!!🙏
अशा स्वरूपाची विनंती पोस्ट जनतेला पाठवण्यात आली आहे
🙏वडीलधारी मंडळीचे आशिर्वाद & जनतेच्या आशिर्वादाने आप्पासाहेबांचे आरोग्य निरोगीच राहणार आहे बालपणा पासुनच या लढावु योध्याने सर्व संकटावर व समस्येवर विजय प्राप्त करीत वाटचाल केली आहे व करीत आहे त्यामुळे कोरोनावर परमेश्वराच्या आशिर्वाद विजय प्राप्त करतीलच यात शंका नाही
& ध्येय न्युजच्या वतीने विग्धहर्त्याच्या चरणी प्रार्थना करण्यात येते हे गणराया तु पृथ्वीतलावर येतांना आमच्या मतदार संघाच्या प्रथम नागरीकावर कोरोना नावाच्या आजाराचे संकट आणले तसे त्यांच्या वरील कोरोनाच्या संकटासह संपुर्ण पाचोरा-भडगाव मतदार संघासह संपुर्ण मानवसृष्टी वरील कारोना नावाच्या आजाराचे संकट जातांना घेऊन जा🙏

तरी सुद्धा पाचोरा येथील आ. किशोरआप्पा, मा. आ.दिलीप भाऊ, संजयनाना वाघ, अमोल भाऊ शिंदे या मान्यवरांना त्यांच्या अनेक हितचिंतकानी वेळो-वेळी कोरोना पासुन बचाव करा, योग्य ती काळजी घ्या अशी विनंती करतांना दिसून येत होते
पण हे चौघं ही ऐकतील तेव्हा ना!
सध्या कोणती महामारीचे संकट सुरु आहे पण काही स्वार्थी लोक त्यांच्याकडे घरी जातच होते मतलबासाठी ऊस गोड असेल तर मुळासगट खाण्याची वृत्ती ठेवणारे काही लोक मात्र आपण या मान्यवरांच्या घरी कींवा त्यांच्या संपर्कात जायचे की नाही याचा विचार न करता आपले काम साध्य करण्याची वृत्ती ठेवतात त्यामुळे हे चौघंही मान्यवर कोरोना लॉक डाऊन झाल्या पासुन परीणामांची चिंता न करता 24×7 सक्रीय होते अखेर आज हा कोरोना घरा पर्यंत पोहचलाच विषय असा आहे एवढे संकट का?& कोणासाठी ओढवुन घ्यायचं कारण पाच वर्ष
जन्म, बारसं, साखरपुडा,रिंगसिरेमणी, मृत्यु, दहावं, उत्तरकार्याला उपस्थीती देणे गरजेचेच आहे मतदार संघातील एखादया विकास कामासाठी बैठक, भेटी साठी जाऊ नका पण लग्न सराईत उपस्थीती देणे महत्वाचे मानतात याशिवाय उत्सव, जयंती, अन्नदान, समाजासाठी भांडे, क्रिकेट, व्यायाम साहीत्य यांच्या पाच- सहा आकडे सार्वजनिक पावत्या आहेचत
निवडणुक लागल्यावर उमेदवार किंवा त्यांच्या कुटूंबातील सदस्यांना काय वैद्यकीय अडचणी ,समस्या आहेत याचा विचार न करता ज्याची तोंड पाहण्याची लायकी नाही त्यांच्या पाया पडण्यासाठी उमेदवाराला किंवा त्यांच्या कुटूंबातील सदस्याना पोहचवावेच लागते ( वरतुन म्हणतात आम्ही कुठं म्हटले की आमच्या घरी या & हात जोडा ) तुम्ही पाच वर्षे काय?केले, काय? पेरले हे जाऊ द्या मतदानाच्या आदल्या दिवसा पर्यत जे काही पेरलेले असेल दिले असेल ते सर्व विसरून मतदानाच्या दिवशी आमचं वैयक्तीक काय? ही अपेक्षा ठेवणारे मोठ्या प्रमाणावर डोम कावळे आज मोठया प्रमाणावर असल्याने लोकशाहीची पैशाच्या बाजारात खरेदी- विक्री होतांना दिसत आहे
आज कोरोनाच्या काळात आपले & परके कोण हे सुध्दा शिकायला मिळत असले तरी
आमदार किशोरआप्पा, माजी आमदार दिलीप भाऊ, संजयनाना वाघ,अमोलभाऊ शिंदे या सर्वाची स्वतःच्या परीवारा सोबतच या मतदार संघाला सुद्धा तुमची गरज आहे हे विसरून चालणार नाही
पाचोरा-भडगाव मतदार संघात वेळोवेळी पक्षाचे तत्व ,आपसातील राजकीय वाद विसरून अनेक करार, तडजोडी होतात तसे एकदा सर्वानुमते जन्म, बारसं, साखरपुडा,रिंगसिरेमणी, मृत्यु, दहावं, उत्तरकार्याला
लग्न सराईत उपस्थीती देण्यात वेळ & पैसा घालवणे याशिवाय उत्सव, जयंती, अन्नदान, समाजासाठी भांडे, क्रिकेट, व्यायाम साहीत्य यांच्या पाच- सहा आकडे सार्वजनिक पावत्यांना यांना कैची मारणे गरजे आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here