भडगाव-यशवंत नगर, कराब, टोणगाव, वडधे येथिल नागरिकांच्या हक्काच्या जागेला सिटीसर्वे लागू होण्यासाठी अनेक दिवसांपासू पाठपुरावा सुरू होता, त्याची दखल घेत मंत्रालय कक्ष अधिकारी उदय सार्दळ यांनी जळगाव जिल्हाधिकारी यांना लवकरच योग्य कार्यवाही करणेसाठीची विनंती केली असल्याने आता नागरिकांच्या हक्काचे व स्वः मालकीचे घरकुल व बँक कर्ज कामे लवकरच मार्गी लागू शकणार असल्याची माहिती सामाजिक नरेंद्र रमेश पाटील, यांनी पत्रकाद्वारे दिली.
भडगाव शहरातील यशवंत नगर, कराब, टोणगाव, वडधे येथिल नागरिक १९६९ पासून वास्तव्य करत असून त्यांना हक्काच्या जागा असूनही सिटी सर्वेला नोंद नसल्याने आजतागायत त्यांना शासनाच्या घरकुल, प्रधानमंत्री आवास योजना व इतर योजनांचा ठोस लाभ घेता येत नव्हता. शिवाय व्यवसाय व घर बांधकाम साठी बँक कर्जही मिळत नव्हते . अनेक शासकीय योजनांना मुकावे लागत होते. अनेक नागरिकांनी जीवनमान उंचावत नसल्याने आर्थिक व सामाजिक संकटात सापडून जीवन संपविले आहे . भोगवटाधारकाचा मृत्यु झाल्यानंतर त्याच्या कायदेशीर वारसांना त्याचा मालकी हक्कही मिळत नाही.
नागरिकांना सर्व योजनांचा तात्काळ लाभ मिळून, हक्काची जागा सिटीसर्वे लागावी या करिता २०१६ पासून शासनाच्या विविध विभाग कार्यालय अधिक्षक गावठाण जमाबंदी आयुक्त,पुणे, उपसंचालक भूमिअभिलेख, नाशिक, जिल्हा अधिक्षक भूमि अभिलेख, जळगाव, उपअधीक्षक भूमिअभिलेख, भडगाव, नगरविकास विभाग, मंत्रालय मुंबई, नगरविकास विभाग -२, मंत्रालय मुंबई, जमाबंदी आयुक्त आणि संचालक भूमिअभिलेख, पुणे, जिल्हाधिकारी, जळगाव, मुख्याधिकारी, न.पा. भडगाव यांच्याकडे नरेंद्र पाटील सातत्याने लेखी पाठपुरावा करत आहे. दरम्यान मागील वर्षी जनआंदोलन उभारून नागरिकांच्या सह्यांचे पत्र ही जिल्हाधिकारी यांना दिले आहे .
काम मोठे असल्याने सर्वच कार्यालय एकमेकांना बोट दाखवण्यात वेळ घेत असल्याने त्यांच्या कडे नरेंद्र पाटील यांनी माहिती अधिकारात सह जळगाव जिल्हाधिकारी, आयुक्त नासिक , आयुक्त पुणे, सचिव मंत्रालय मुंबई , मुख्यमंत्री कार्यालय व थेट पंतप्रधान कार्याकाय यांच्या कडे थेट तक्रार दाखल केली आहे. त्याची दखल मुख्यमंत्री कार्यालय व संबंधित विभागाने घेऊन मंत्रालय कक्ष अधिकारी मा. उदयजी सार्दळ यांचे दि. १३ जानेवारी व २८ जानेवारी च्या पत्रा नुसार मा जिल्हाधिकारी जळगाव यांना लवकरात लवकर कार्यवाही ची विनंती केली असून येथील नागरिकांच्या समस्या प्रशासकीय स्तरातून लवकरच सुटणार असल्याचे चित्र निर्माण झाले आहे .
नागरिकांच्या हक्कासाठी अनेक वर्षा पासून नरेंद्र पाटील शासन दरबारी भांडत आहे. त्याची आता कुठे दखल घेण्यात येत आहे. याबाबत आगामी काळत नागरिकांना हक्काच्या जागेवर सिटीसर्वे साठी व पुढे २०२२ पर्यंत चालणाऱ्या पंतप्रधान आवास योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील असल्याचे नरेंद्र पाटील यांनी ध्येय न्यूज शी बोलताना सांगितले .
ध्येय न्यूज चॅनेलच्या बातम्या मिळवण्यासाठी येथे क्लिक करून आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
Dhyeya News Channel WhatsApp Group: 1
Dhyeya News Channel WhatsApp Group: 2
Dhyeya News Channel WhatsApp Group: 3