Breaking

पाचोरा नगरपालीका निवडणुक व्युहरचना सुरु

0
  1. पाचोरा- नगरपालीका निवडणुक सद्यास्थितीचा विचार केला तर साधारणतः नोव्हेबर अखेर डिसेंबर मध्ये होऊ शकतात अर्थात आरक्षण अनुसरून मे.न्यायालय, निवडणुक आयोग, कोरोना तिसरी लाट आदी बाबींचा विचार करून तारीख - महीना- वर्ष पुढे मागे देखील होऊ शकते

परंतु आज शिवसेना- भाजप चे लसीकरण शिबीर राष्ट्रवादी नेते मा. आ. दिलीपभाऊ वाघ यांचा वाढता जनसंपर्क अशा राजकीय पक्षाचा विचार केला तर सर्वांचे लक्ष  न.पा. निवडणुकीच्याच युद्ध पातळीवर हालचाली आहेत
तसे पाहीले तर यावेळी मागील प्रमाणे प्रभाग रद् होऊन वार्ड नुसार म्हणजेच सन.2011 प्रमाणे वन बाय वन 28 वार्डाची रचना होऊन तशा निवडणुका होणार आहेत फक्त फरक एवढाच असेल 2011 प्रमाणे वार्डरचना न राहता विद्यमान सत्ताधार्‍यांच्या सोई प्रमाणे कॉलनी, गल्ली बदल राहणार आहे.
त्यामुळे यावेळी शिवसेना (आमदार किशोरआप्पा) राष्ट्रवादी ( माजी आमदार दिलीपभाऊ वाघ) भाजप ( अमोलभाऊ शिंदे) यांची नेहमी प्रमाणे प्रतिष्ठा पणाला लागणार आहे. गेल्या 5 वर्षात कोट्यावधीचा झालेला विकास ( अर्थात कोणाचा – कसा व कोणत्या मार्गाने झाला हे सर्वश्रृत आहे ) आधी आता आलेली & येणारी कोट्यावधीची विकास कामे यावर डोळा ठेऊन प्रत्येक राजकीय पक्ष व त्यांचे नेते यांना सत्ता स्थापनेसाठी आपले तन, मन, धन लाऊन प्रतिष्ठा पणाला लावावी लागणार आहे. कोण किती पैसा वार्ड निहाय खर्च करेल हे आजच्या स्थितीत सांगणे कठीण आहे मागील पाच वर्षातील सर्वस्तराचा विकास पाहीला तर आता तरी असे वाटत नाही 95% मतदार नाते,संबध, उपकार यांचा विचार करून हात जोडून – पाय पडून मतदान करतील त्यामुळे किमान डिपॉझीट वाचवण्यासाठी प्रत्येक उमेदवाराला 50 लाख खिशात ठेऊन निवडणुकीच्या रिंगणात उतरावे लागेल हे सुर्य प्रकाशा एवढे स्पष्ट आहे & ऐनवेळी जिंकण्यासाठी कोणत्या वार्डात किती रक्कम लागेल हे त्यावेळचे फुटलेले भाव व तात्कालीन स्थितीच सांगेल.
अर्थात आजही वार्ड आरक्षण निघणे बाकी आहे शिवाय नगराध्यक्ष पदाचे पण आरक्षण बाकी आहे.
सर्वात महत्वाचे म्हणजे निवडणुक आयोगाने नगराध्यक्ष पदाचे आरक्षण ग्राम पंचायत निवडणुक प्रमाणे ग्रा.पं.सदस्य निवडी नंतर संरपंच पदाचे आरक्षण जसे निघाले तसे नगरसेवक निवडणुकी नंतर नगराध्यक्ष पदाचे आरक्षण काढण्याचा निर्णय घेतला तर सर्वांचीच फार मोठी पंचाईत होणार आहे असो.
येणारी न.पा. निवडणुकीत दलीत & मुस्लीम मतांची एकजुट ही महत्वपुर्ण व निर्णायक ठरणार आहे अर्थात ही एकजुट झाली तर ? कारण शेवटी राजकारण आहे तसेच येणारी न.पा. निवडणुक पक्षीय चिन्हावर की आघाडी मार्फत होणार हे सुद्धा स्पष्ट नाही. राज्य पातळीवर सत्ताधारी आघाडीचा विचार केला तर पाचोरा येथे शिवसेना- राष्ट्रवादी- आय कॉंग्रेस आघाडी धर्म पाळून जागा वाटप युती करून निवडणुक लढतील असे आज तरी वाटत नाही कारण राष्ट्रवादीकडे आजच्या स्थितीला वाघ परिवारातीलच चार उमेदवार रिंगणात असतील त्यापैकी एक नगराध्यक्ष पदासाठी असेल शिवसेनेचा विचार केला तर आज जरी मुकूंदआण्णा बिल्दीकर यांचे नांव नगराध्यक्ष पदासाठी अग्रेसर असले तरी त्यांना नंतरचे अडीच वर्ष आता कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव प्रथम प्राधान्य अडीच वर्षासाठी सुमीत किशोर पाटील यांचे नांव ऐनवेळी पुढे आल्या शिवाय राहणार नाही. कारण नंतरचे कोणी पाहीले आणि सुमीत किशोर पाटील यास हीच वेळ & संधी असणार आहे. राजकीय प्लॉटफॉर्मसह राजकीय भविष्य उज्वल करण्याची म्हणुन पुत्रप्रेमा पोटी ही संधी आ.किशोरआप्पा सोडतील असे आज तरी वाटत नाही
भाजपच्या बाबतीत विचार केला तर शिंदे परिवारातील सुद्धा घरातील चार उमेदवार नगरसेवकासाठी रिंगणात असतील त्यामुळे अर्थातच वाघ परिवारा प्रमाणे शिंदे परिवारातील चार उमेदावारा पैकी एक नगराध्यक्ष पदासाठी रिंगणात असेल
परंतु ध्येय न्युजने मागील महीन्यात ब्रेकींग न्युज प्रसारीत केली होती पाचोरा शहरातील दोन धनाढ्य व्यवसाईक यांची पाचोरा येथील युवा नेत्यासोबत एका आमदारासह जळगाव येथे बैठक & न.पा. निवडणुकीच्या रणधुमाळीवर चर्चा त्या बातमी नुसार विचार केला तर
आगामी विधानसभेचा विचार करून अमोलभाऊ शिंदे यांना नगराध्यक्ष पदासाठी घरातील उमेदवार थांबवुन डॉ. भुषणदादा मगर & माजी नगरसेवक प्रदीपबापु शांताराम पाटील अडीच-अडीच वर्ष वाटुन नगराध्यक्ष पदाची संधी द्यावी लागेल
परंतु या तिघंही पक्षांना स्वतः चा नगराध्यक्ष करणे तेव्हाच शक्य आहे जेव्हा एका पक्षाचे एकतर्फी बहुमत असेल नाहीतर
इतर ठिकाणची उदा. सोडा फक्त पाचोरा न पा मागील 2006 निवडणुकीचा इतिहास पाहीला तर शिवसेना (आघाडी) ❎ राष्ट्रवादी ( दिलीपभाऊ वाघ) एकमेकांच्या विरोधामुळे राष्ट्रीय कॉग्रेसचे अवघे 3 नगरसेवक असतांना देखील नगरराध्यक्ष पदी विनापैशाने विराजमान होण्याची संधी बापु सोनार यांना प्राप्त झाली होती. त्यामुळे आता या निवडणुकीत शिवसेना किंवा भाजप यांना एकतर्फी नगरसेवकांचे बहुमत आणावेच लागणार आहे अन्यथा शिवसेनेच्या पाठींब्याने दिलीपभाऊ वाघ किंवा राष्ट्रवादीच्या नगरसेवकाला नगराध्यक्ष होण्यापासुन कोणीच थांबवु शकत नाही असे आज तरी स्पष्ट चित्र दिसत आहे
परंतु शेवटी ऐनवेळी काय? होईल सांगता येत नाही राजकारण आहे गेल्या जळगाव लोकसभा निवडणुकीत न.पा.वार्ड निवडणुकीच्या लागणार्‍या पैशापेक्षाही कमी पैसे खर्च करून खा. उन्मेशदादा पाटील ऐतिहासीक विक्रमी मतांनी विजयी झाल्याचा इतिहास आपल्या समोर आपल्याच मतदार संघाचा आहे शिवाय नको वाद-विवाद खर्च पाणी म्हणुन ज्याप्रमाणे मागील काही वार्डात घरचे उमेदवार सोईने विजयी होण्याची सेटींग केली गेली. किंवा विकासात राजकारण & घोडे बाजार नको तशी सेटींग करून थेट 40% 30% 30% & नगराध्यक्ष पदाची संधी आळी- पाळी प्रमाणे देण्याच्या निर्णय झाला तर निवडणुकीची सर्व हवाच फुस्स होऊन फक्त 3-4 लाखाच्या खर्चात उमेदवार नगरसेवकपदी विजयी होऊ शकतील

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here