पाचोरा- कोणताही राजकीय किंवा व्यवसायीक जिवनातील यशस्वी व्यक्ती असो
ते कधीही आपल्या यशस्वी राजकीय व व्यवसायीक जिवनात बुद्धीबळाच्या खेळा प्रमाणे चाली चालतात म्हणुन दिर्घकाळ आपल्या राजकीय व व्यवसायीक जिवनात यशस्वी होतात बुद्धीबळाच्या खेळात राजा एकच असतो & वजीर सुद्धा एकच असतो म्हणुन आपल्या राजकीय व व्यवसायीक जिवनात वजीरा प्रमाणे एकच असावा आणि तो सुद्धा घरातीलच नाहीतर ज्याप्रमाणे एकाच झाडाला पाणी देत राहीले तर ते दिर्घकाळ टिकत नाही मध्येच केव्हाही साथ सोडून देते
म्हणुन एक वजीर राजा सोबत घरातीलच असला तरी राजाला एक मोठा अधार तर शत्रुला मोठा धोका असतो
बुध्दी बळाच्या खेळा प्रमाणे वजीर एक नंतर मात्र प्यादे अनेक तर सेनापती प्रत्येकी दोन असतात व त्यांना योग्य वेळीच योग्य भुमिका पार पाडण्यासाठी हलवुन चाल खेळली जाते शिवाय प्रत्येक सेनापतिला माहीत असते राज्या माझ्या एकट्याच्या भरवश्यावर नाही माझ्या सारखा राजा जवळ दूसरा सेनापतीचा पण पर्याय आहे शिवाय प्रत्येक मार्गावर स्वतंत्र चालीसाठी स्वतंत सेनापती देखील आहेत म्हणुन त्याच्यात अहंमपणा येत नाही व तो राजाला धोका देऊच शकत नाही
म्हणुन यशस्वी उद्योगपती व राजकारणी यांनी आपले स्वीय सहाय्यक/मुनीम निवडतांना प्रत्येक विभागासाठी स्वतंत्र निवडले तर त्यांची यशाची वाट कोणीच थांबवु शकत नाही किंवा त्यांना अडचणीत आणु शकत नाही अन्यथा प्रत्येक व्यवसायीक किंवा राजकारणी आपल्या एकच स्वीय सहाय्यक / मुनीम यांच्यावर अवलंबुन राहिले तर त्यांच्या व्यवसायाच्या & राजकीय यशाच्या शिखराला केव्हा सुरुंग लागेल याचा सुगावा देखील लागणार नाही.
( या पोस्टचा पाचोरा राजकीय-व्यवसाईक क्षेत्राशी काहीही एक संबध नाही असेल तर तो योगा योग समजुन भविष्यात स्वतः च्या हितासाठी त्याचा बोध घ्यावा )
ध्येय न्यूज चॅनेलच्या बातम्या मिळवण्यासाठी येथे क्लिक करून आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
Dhyeya News Channel WhatsApp Group: 1
Dhyeya News Channel WhatsApp Group: 2
Dhyeya News Channel WhatsApp Group: 3