![]()
पाचोरा : जळगाव जिल्ह्यातील पाचोरा तालुक्यातील पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्टेशन हद्दीत घडलेल्या अल्पवयीन बालिकेवरील अमानुष अत्याचार प्रकरणाने संपूर्ण परिसर हादरून गेला आहे. या घटनेने केवळ गावकुसापुरतेच नव्हे, तर संपूर्ण पंचक्रोशीसह जिल्हाभर संतापाची लाट उसळली आहे. या प्रकरणी पत्नी व दोन मुले असलेला आरोपी हबीब हुसेन शेख व त्याला सहकार्य करणारी त्यांची आई फातिमा अभिषेक जलील सह जे पण तपासात आरोपी निष्पन्न होतील अशा सर्व आरोपींना कठोर शिक्षा व्हावी, मुलींच्या सुरक्षिततेबाबत जागृती व्हावी तसेच “लव्ह जिहाद” विरोधात ठोस संदेश द्यावा यासाठी पाचोरा शहरात शुक्रवार दि. २९ ऑगस्ट २०२५ रोजी भव्य मूक मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. हा मोर्चा सकाळी १०.३० वाजता कृष्णपुरी येथील हनुमान मंदिरापासून प्रारंभ होणार असून आाठवडे बाजार, गांधी चौक, जामनेर रोड या प्रमुख मार्गावरून छत्रपती शिवाजी महाराज चौकात समारोप होईल. पिंपळगाव हरेश्वर पो स्टे हद्दीतील अल्पवयीन बालिके वरील झालेल्या बलात्कार प्रकरणाने गावागावात संताप उसळला आहे. नागरिकांचे म्हणणे आहे की अशा घटनांनी समाजातील सुरक्षिततेचा प्रश्न अधिक गंभीर बनला आहे. “आज जर आपण आवाज उठवला नाही तर उद्या पुन्हा कुणाच्या तरी मुलीवर, बहिणीवर हात टाकला जाईल. म्हणूनच अशा नराधमांना कठोरात कठोर शिक्षा झालीच पाहिजे”, असा एकमुखी आवाज या मोर्चातून उमटणार आहे. या मोर्चामध्ये महिलांची उपस्थिती लक्षणीय राहणार आहे. महिलांनी रणरागिणीच्या रूपात आरोपींना कठोर शिक्षा द्यावी, मुलींच्या सुरक्षेसाठी कडक कायदे व्हावेत, अशी मागणी जोरकसपणे मांडण्याची तयारी दर्शवली आहे. विशेष म्हणजे हा मोर्चा सर्व जाती – धर्मीय, सर्वपक्षीय स्वरूपाचा असल्याने समाजातील प्रत्येक घटक या आंदोलनात सहभागी होणार आहे. आयोजकांनी स्पष्ट केले आहे की, “हा मोर्चा फक्त मूक मोर्चा नाही तर हिंदू समाजाच्या स्वाभिमानाची आणि अस्तित्वाची लढाई आहे. लव्ह जिहादसारख्या घृणास्पद घटनांना आळा घालण्यासाठी समाजाने आता एकजूट दाखवणे आवश्यक आहे. समाजातील शांततेचा आणि मुलींच्या सुरक्षिततेचा प्रश्न हा केवळ एका घटनेपुरता मर्यादित नाही, तर हा हिंदु धर्माच्या प्रतिष्ठेचा व मानवतेच्या सुरक्षेचा प्रश्न आहे.” मोर्च्यादरम्यान कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी प्रशासनाने कडेकोट बंदोबस्त ठेवण्याची तयारी सुरू केली आहे. पाचोरा शहरातील प्रमुख मार्गांवर पोलीस तैनात करण्यात येणार असून, कोणताही अनुचित प्रकार घडू नये याची काळजी घेतली जाणार आहे. पोलिस अधिकाऱ्यांच्या मते, “नागरिकांनी शांततेत आणि शिस्तीत मोर्चा काढावा. दोषींना शिक्षा होणारच, मात्र कायद्यावर विश्वास ठेवणे गरजेचे आहे.” या प्रकरणी नागरिकांचा एकच सूर आहे – “या गुन्ह्यातील सर्व आरोपींना कठोरात कठोर शिक्षा झालीच पाहिजे! शिक्षा फक्त तुरुंगवासापुरती न राहता फाशीपर्यंत पोहोचली पाहिजे, तेव्हाच मुलींच्या सुरक्षेला खरा न्याय मिळेल.” या घटनेच्या पार्श्वभूमीवर समाजातील नेते, कार्यकर्ते आणि नागरिकांनी एकच मागणी पुढे केली आहे की मुलींच्या सुरक्षेसाठी पालक, शाळा, सामाजिक संस्था यांनी एकत्रितपणे जागृती केली पाहिजे. लव्ह जिहाद, छेडछाड, अत्याचार यांना आळा घालण्यासाठी कठोर कायद्याची आवश्यकता आहे, अशी भावना व्यक्त होत आहे. पाचोरा येथे होणारा हा मोर्चा केवळ आरोपी विरोधातील संताप नाही, तर समाजाच्या एकजुटीचा संदेश देणारा आहे. हिंदू समाजासह सर्वधर्मीय नागरिकांनी या मोर्चात सहभाग घेण्याचे आवाहन केले असून, हा मोर्चा शांततेत पार पाडून प्रशासनाला ठोस संदेश दिला जाणार आहे. एकूणच, पिंपळगाव हरेश्वर पो स्टे हद्दीत घडलेल्या या अमानुष घटनेने लोकांच्या भावना चिघळल्या आहेत. मुलींच्या सुरक्षिततेसाठी, समाजाच्या एकतेसाठी आणि न्यायासाठी हा मोर्चा ऐतिहासिक ठरणार आहे यात शंका नाही.
ध्येय न्यूज चॅनेलच्या बातम्या मिळवण्यासाठी येथे क्लिक करून आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.




