![]()
पाचोरा – तालुक्यातील बिल्दी ते लोहारा या रस्त्यावरून प्रवास करणाऱ्या वाहनचालक आणि पादचाऱ्यांना सध्या मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. रस्त्याच्या दोन्ही बाजूंना वाढलेली झाडे व झुडपे यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होतो आहे. झुडपांनी रस्ता व्यापल्यामुळे वाहनचालकांना विशेषतः सर्व स्तरावरील विशेष आशिर्वादामुळे अवैध गौण खनीज चालकांना सुरक्षीत वाहन चालवता यावे त्यांच्या हातुन निष्पांप नागरिकांचा अपघात होऊ नये याची विशेष काळजी घेणे आवश्यक आहे झाडे झुडपांमुळे समोरून येणाऱ्या वाहनांचे अंदाज बांधणे कठीण झाले आहे. विशेषतः वळण रस्त्यांवर ही समस्या अधिक तीव्र आहे. रस्त्याच्या कडेला उभे राहण्यासाठी किंवा वाहन साईडला घेण्यासाठीही जागा उरलेली नाही. या अडचणीमुळे पादचाऱ्यांसाठी सुरक्षित जागाही उपलब्ध नाही. त्यामुळे अपघात होण्याचा धोका मोठ्या प्रमाणावर वाढला आहे.
वाढलेल्या झुडपांमुळे पादचाऱ्यांना रस्त्यावरून चालावे लागते, ज्यामुळे अपघाताची शक्यता वाढते. लहान मुले, वयोवृद्ध व्यक्ती आणि महिला शालेय विद्यार्थी – विद्यार्थीनींना याचा जास्त त्रास होत आहे. वाहनचालकांना वळणांवरून समोर येणाऱ्या वाहनांचा अंदाज बांधताना अडथळे येतात. अशा परिस्थितीत, जर समोरून वाहन आले, तर अपघाताची शक्यता वाढते. वाहन ओव्हरटेक करतानाही मोठ्या अडचणी येतात.
रस्त्याच्या कडेला उभी राहण्याची जागा अपुरी असल्यामुळे वाहनचालकांना नाईलाजाने रस्त्यावरच वाहन उभे करावे लागते. परिणामी, रस्त्यावर वाहतुकीची कोंडी निर्माण होते. या सगळ्याचा परिणाम म्हणजे वाहनचालकांची सुरक्षा धोक्यात येते आणि पादचाऱ्यांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागतो.
रस्त्याच्या बाजूला वाढलेल्या झुडपांची छाटणी करण्यासाठी प्रशासनाने त्वरित तातडीने कार्यवाही करणे गरजेचे आहे. रस्त्यावरील दृश्यता स्पष्ट होण्यासाठी ही पहिली पायरी ठरेल. तसेच
रस्त्याचा विस्तार केल्यास झुडपांच्या अडथळ्यांशिवाय वाहतुकीचा प्रवाह सुरळीत करता येईल.
सदर रस्ता दुर्गम भागातून जात असल्याने या समस्येकडे अनेक वेळा प्रशासनाचे दुर्लक्ष होते. तरीही स्थानिक नागरिक , सर्व पक्ष , संघटना एकत्र येऊन सार्वजनिक बांधकाम विभागाकडे तक्रार नोंदवणे गरजेचे आहे. यासाठी अर्ज आणि निवेदनाद्वारे प्रशासनाला जागृत करण्याचा प्रयत्न करावा.
रस्त्याच्या कडेला असलेली झुडपे अपघातांना निमंत्रण देत असल्यामुळे या समस्येकडे दुर्लक्ष करणे भविष्यात महागात पडू शकते. प्रशासनाने यावर त्वरित कार्यवाही करणे आणि दीर्घकालीन उपाययोजना आखणे गरजेचे आहे. सुरक्षित रस्त्यामुळे अपघातांवर नियंत्रण मिळवता येईल आणि नागरिकांचा प्रवासही सुखकर होईल.
ध्येय न्यूज चॅनेलच्या बातम्या मिळवण्यासाठी येथे क्लिक करून आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.




