![]()
समाजात आपल्या कर्तव्यनिष्ठ सेवेमुळे आणि शांत स्वभावामुळे ओळख निर्माण करणारे, तसेच एक आदर्श पोलीस अधिकारी, जबाबदार कुटुंबप्रमुख आणि सर्वांच्या मनात आपले विशेष स्थान निर्माण करणारे श्री. मुक्त्यारसिंह गुलाबसिंह सुर्यवंशी (निवृत्त पोलीस अधीक्षक, वय ८१ वर्षे, रा. मुखपाठ, ता. सिल्लोड, जि. छत्रपती संभाजीनगर) यांचे आज दिनांक २८ जून २०२५ रोजी दुपारी १२.०० वाजता छत्रपती संभाजीनगर येथे दीर्घ आजार व वयोमानानुसार दुःखद निधन झाले आहे. त्यांच्या निधनामुळे सुर्यवंशी कुटुंबावर आणि समाजावर मोठा आघात झाला आहे. त्यांच्या निधनाने एक कर्तृत्ववान, नीतिमान आणि समाजासाठी समर्पित आयुष्य जगलेले व्यक्तिमत्त्व काळाच्या पडद्याआड गेले आहे. स्व. मुक्त्यारसिंह सुर्यवंशी यांनी पोलीस दलामध्ये अनेक वर्षे सेवा देत असताना कठोर पण न्यायी भूमिका स्वीकारली होती. त्यांनी आपल्या कर्तव्यकठोरतेने शिस्तप्रियतेची अमिट छाप आपल्या सहकाऱ्यांमध्ये आणि जनमानसात सोडली होती. त्यांच्या कार्यशैलीमुळे पोलीस दलातच नव्हे तर सामाजिक आणि प्रशासकीय वर्तुळातही त्यांचा सन्मानाने उल्लेख केला जात असे. त्यांचे जीवन हे मूल्यनिष्ठ, साधेपणाने भरलेले आणि कुटुंब, समाज, कर्तव्य यांच्यात संतुलन राखणारे होते. त्यांच्या मार्गदर्शनामुळे पुढील पिढ्यांमध्ये सजगता, सामाजिक बांधिलकी आणि आदर्श जीवनशैलीची प्रेरणा मिळाली. त्यांनी केवळ अधिकारी म्हणूनच नव्हे तर माणूस म्हणूनही आपुलकीचा आणि प्रेमळतेचा वारसा ठेवला. त्यांच्या पश्चात कुटुंबीयांमध्ये पत्नी, दोन सुपुत्र प्रितम मुक्त्यारसिंह सुर्यवंशी आणि नरेंद्र मुक्त्यारसिंह सुर्यवंशी, बंधू सुरेश गुलाबसिंह सुर्यवंशी, मोतीसिंग जालमसिंह सुर्यवंशी, रमेश जालमसिंह सुर्यवंशी, तसेच पुतणे अशोक नवलसिंह सुर्यवंशी, विक्रमसिंग उत्तमसिंह सूर्यवंशी, भास्कर नवलसिंह सूर्यवंशी, पृथ्वीराज विठ्ठलसिंह सुर्यवंशी आणि दिग्विजयसिंह कुलदीपसिंह सूर्यवंशी यांच्यासह संपूर्ण कुटुंब, आप्तेष्ट आणि सहकाऱ्यांचा मोठा परिवार आहे. विशेषतः निर्मल इंटरनॅशनल स्कूल व निर्मल सिडसच्या संचालिका तसेच उबाठा येथील शिवसेनेच्या सक्रीय महिला नेत्या वैशालीताई सुर्यवंशी यांच्या सासऱ्यांचे हे निधन असल्यामुळे त्यांना लाभलेली एक प्रेरणादायी सावली हरपली आहे. स्व. मुक्त्यारसिंह सुर्यवंशी यांनी आपल्या सेवा काळात मिळवलेला अनुभव, माणूस म्हणून जपलेली सुसंवादशक्ती आणि विचारांची परिपक्वता समाजासाठी एक शाश्वत प्रेरणा आहे. त्यांच्या आठवणी, त्यांचे विचार आणि दिलेला आदर्श हाच त्यांच्या स्मृतींचा खरा वारसा असून, तो पुढील पिढ्यांना सदैव दिशा दाखवत राहील. त्यांच्या अंत्यविधीचा कार्यक्रम दिनांक २९ जून २०२५ रोजी सकाळी ११.०० वाजता त्यांच्या मूळगावी मुखपाठ, ता. सिल्लोड, जि. छत्रपती संभाजीनगर येथे पार पडणार आहे. या अंत्यविधीसाठी सर्व नातेवाईक, हितचिंतक, सहकारी, सामाजिक क्षेत्रातील मान्यवर आणि गावकरी यांनी उपस्थित राहावे, अशी कळकळीची विनंती दुःखी कुटुंबीयांच्या वतीने करण्यात येत आहे. परमेश्वर त्यांच्या पुण्यात्म्यास शांती देवो आणि कुटुंबियांना हे दुःख पचवण्याचे सामर्थ्य देवो हीच प्रार्थना. भावपूर्ण श्रद्धांजली.
ध्येय न्यूज चॅनेलच्या बातम्या मिळवण्यासाठी येथे क्लिक करून आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.





