![]()
पाचोरा – सध्या राज्यभर निवडणुकीचं वातावरण तापलंय. अशावेळी अनेक शहरांत पोलिसांनी रेकॉर्डवरील गुन्हेगारांवर धडक कारवाई सुरू केल्याच्या बातम्या झळकत आहेत. पण पाचोऱ्यात मात्र अशी कोणतीही कारवाई दिसली नाही. कारण एकच—इथे कारवाई करायला गुन्हेगारच नाहीत!

पाचोरा शहराची परिस्थिती कायमच शांत आहे. इथले साधे नागरिक, व्यापारी, पत्रकार—सगळेच स्वतःला सुरक्षित मानतात. पत्रकार तर एवढे सुरक्षीत आहेत त्यांना चौकात मारहाण करणे तर दुरच साधे तिरक्या नजरेने सुद्धा त्यांच्याकडे पाहण्याची कोणाची हिंम्मत होत नाही घरात घुसून मारामाऱ्या, दुकानदारांना धमक्या, हफ्ते उकळणे, गुंडांच्या टोळ्या फिरवणे, अवैध धंदे चालवणे, पोलीसांना भर बाजार पेठेत किंवा पोलीस स्टेशन मध्ये येऊन शिव्या देणे अशा गोष्टी सत्ताधारी असो की विरोधी राजकीय नेते असो राजकीय व शासकीय आर्शिवादाने पाचोरा शहरात असे प्रकार जवळजवळ ऐकूच येत नाहीत. त्यामुळे पाचोरा शहरात कोणावर पोलिसांनी कुठली कारवाई करावी, हा यक्ष प्रश्न आहे.त्यामुळे पोलिसांकडून जवळ-जवळ प्रेस नोट देणे किंवा गुन्हा दाखल च्या बातम्या प्रसार माध्यमांना, जिल्हा माहिती कार्यालयापर्यंत अथवा प्रशासनापर्यंत दिल्याच जात नाही
राज्यातल्या इतर शहरांमध्ये पोलिसांना दिवसरात्र गुन्हेगारांना पकडण्यासाठी पळावं लागतंय, पण पाचोरात मात्र अशा कोणत्याच बातम्या नाहीत. हे पाहून सहज म्हणता येईल
“अहो, पोलिस कारवाई कशी करणार? पाचोरा शहरात गुन्हेगारच नाहीत!”
कारण राजकीय मान्यवर व जळगाव पोलीस अधिक्षक यांच्यामुळे नांद्रा येथील अवैध धंद्याचा व उत्राण येथील वाळूच्या ठेक्या वरील रात्र दिवस बेटाईम चालणारे वाळूचे ओव्हर डंफर यांचा त्रास सोडला तर पाचोरा शहर व तालुक्यात अवैध धंदे नाहीत, गुंडगिरी नाही, धमक्या नाहीत, हप्ते नाहीत… त्यामुळे पोलिस आणि गुंड , अवैध धंदेवाले यांच्यातील ‘व्यवहार’ही नाहीत. म्हणूनच पोलीस – महसुल रॅकॉर्ड व कारवाई नुसार पाचोरा हे महाराष्ट्रात नाही, तर देशभरात असं एकमेव शहर म्हणता येईल जिथे रेकॉर्डवरील गुन्हेगार जवळपास नाहीतच.
जिल्ह्यात एक- दोन नव्हे तर तीन-तीन मंत्री असताना पाचोराचं हे सत्य राज्यच नव्हे तर केंद्र सरकारपर्यंत पोहोचावं, अशी दबक्या आवाजात चर्चा आहे. पण काही नागरिक उपरोधाने म्हणतात—
“हे सांगायला इथल्या पदाधिकाऱ्यांची लायकीच नाही!”
आजूबाजूच्या शहरांत निवडणुकीआधी गैंगवार, धाकधपका, पोलिसांचं अँक्शन असे प्रकार दिसतात; पण पाचोरात मात्र रात्री-दिवस शांतता. इथल्या लोकांमध्ये एकजूट आहे, भांडणं कमी आहेत, गुन्हेगारीला खतपाणी घालणारी जमीनच नाही. त्यामुळे गुन्हेगार पाचोरात यायला तयारच होत नाहीत.
म्हणून “सरकारनं पाचोरा शहराला देशातील ‘गुन्हेमुक्त आदर्श शहर’ घोषित करावं. आणि जिल्हा पोलीस अधीक्षक,अप्पर पोलीस अधीक्षक,डी वाय एस पी यांना राष्ट्रपती पुरस्काराने सन्मानित करावे कारण इथली शांतता म्हणजे बाकीच्या शहरांसाठी धडा आहे.” शेवटी लोकांची चिमटा काढणारी टिप्पणीच सगळं सांगून जाते— राजकीय व पोलीस प्रशासनामुळे
“इथे गुन्हेगार नाहीत, गुंड नाहीत, अवैध धंदे नाहीत… मग पाचोरा शहराला गुन्हेमुक्त घोषणेचा मिळायलाच हवा
ध्येय न्यूज चॅनेलच्या बातम्या मिळवण्यासाठी येथे क्लिक करून आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.





