पाचोरा-आज दिनांक 06 ऑगस्ट रोजी शासकीय निर्देशानुसार स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवास प्रारंभ झालेला असून जि प शाळा सारोळा बु मधील विद्यार्थ्यांनी ‘हर घर तिरंगा’ चा नारा देत प्रत्येक भारतीयाने स्वतःच्या घरावर ‘स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव’ प्रसंगी तिरंगा फडकविण्याचे आवाहन रॅलीतून करण्यात आले. रॅली ची सुरुवात श्री विनोद धनगर सर यांनी विद्यार्थ्यांना विविध सूचना देऊन
जि प शाळा सारोळा बु येथून केली. याप्रसंगी मुख्याध्यापिका मंजुषा वाजपेयी, वैशाली चव्हाण, फुलसिंग राठोड व राजाराम राठोड तसेच अंगणवाडी सेविका व मदतनीस इत्यादी उपस्थित होते. सदर रॅली यशस्वी करण्यासाठी शाळा व्यवस्थापन समिती व ग्राम पंचायत सदस्य यांनी सहकार्य केले. सदर रॅली जि प शाळा सारोळा बु येथुन प्रारंभ होऊन ग्राम पंचायत जुने गाव भागातुन मार्गक्रम करीत जि प शाळा सारोळा बु येथे समारोप करण्यात आला.
ध्येय न्यूज चॅनेलच्या बातम्या मिळवण्यासाठी येथे क्लिक करून आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.