Home Blog Page 133

पाचोऱ्यात ‘नानाजू चहा’ शाखेचे भव्य उद्घाटन मोठ्या उत्साहात संपन्न

0

Loading

पाचोरा:  ( ध्येय न्युज प्रतिनीधी -अविनाश माळी, कुऱ्हाड Mo.9766719218 ) : श्रीरामपूर शहरातील प्रसिद्ध ‘नानाजू चहा’ हा चहाचा ब्रँड आता पाचोऱ्यात दाखल झाला असून, त्याच्या

शाखेचे भव्य उद्घाटन शनिवारी, 18 जानेवारी 2025 रोजी सायंकाळी 5 वाजता उत्साहात पार पडले. छत्रपती शिवाजी महाराज चौकातील राजीव गांधी टॉऊन हॉल भाजी मार्केट समोरील दुकान क्रमांक 12 येथे हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
            कार्यक्रमाच्या प्रारंभी नानाजू चहा परिवाराच्या वतीने प्रमुख पाहुण्यांचे हार्दिक स्वागत करण्यात आले. उद्घाटन सोहळ्याला शहरातील विविध क्षेत्रातील मान्यवर व प्रतिष्ठित व्यक्तींची उपस्थिती लाभली. नानाजू चहाचे मुरतुझा ताय्यब अली बोहरी व त्यांचा परिवार

उपस्थितांना मार्गदर्शन करताना म्हणाले की, “आमची चहा ब्रँड 1986 पासून दर्जेदार चव, शुद्धता व ग्राहकसेवेच्या वचनबद्धतेने लोकप्रिय आहे. आम्हाला विश्वास आहे की, पाचोऱ्यातील नागरिकही या चवीचा मनमुराद आनंद घेतील.”
           कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण म्हणजे उपस्थित प्रत्येकाला चहाचा आस्वाद मोफत देण्यात आला. पाचोऱ्यातील नागरिकांनी या अनोख्या उपक्रमाला मोठा प्रतिसाद दिला. या मोफत चहा उपक्रमामुळे नागरिकांच्या चेहऱ्यावर आनंद दिसत होता. ग्राहकांनी या नव्या शाखेला शुभेच्छा देत त्यांचे कौतुक केले.
               उद्घाटनानंतर, ग्राहकांनी ‘नानाजू चहा’च्या वैशिष्ट्यपूर्ण स्वादांची प्रशंसा केली. या ब्रँडची खासियत म्हणजे दर्जेदार चहा, शुद्ध घटक व प्रेमाने दिलेली सेवा. कार्यक्रमात शहरातील तरुण, महिला व वृद्ध नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर सहभाग घेतला.
     नानाजू चहा परिवाराने पाचोऱ्यातील ग्राहकांसाठी विशेष ऑफर जाहीर केल्या आहेत. येथे चहाच्या विविध प्रकारां सोबतच स्नॅक्सचीही सुविधा उपलब्ध करून दिली आहे. त्यामुळे ही शाखा

केवळ चहा पिण्याचे ठिकाण नसून, मित्रमंडळी व कुटुंबीयांसोबत वेळ घालवण्यासाठी खास स्थान ठरणार आहे.
         नानाजू चहा परिवाराने या शाखेद्वारे पाचोऱ्यातील ग्राहकांशी जिव्हाळ्याचे नाते जोडण्याचे आश्वासन दिले. “दर्जेदार सेवा व स्वादाचा वारसा टिकवून नवनवीन उपक्रम राबवून ग्राहकांचे प्रेम जिंकणे, हे आमचे ध्येय आहे,” असे संस्थापक मुरतुझा बोहरी यांनी सांगितले.                                    या उद्घाटन सोहळ्याच्या यशस्वीतेसाठी नानाजू चहा परिवाराच्या सदस्यांनी अथक परिश्रम घेतले. नागरिकांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे हा सोहळा संस्मरणीय ठरला.

पाचोरा नगरपालिकेच्या व्याख्यानमालेचा ऐतिहासिक वारसा कायम; नागपूरचे श्री. जावेद कुरेशी यांचे संविधानविषयक प्रभावी मार्गदर्शन

0

Loading

पाचोरा  ( अविनाश माळी, कुऱ्हाड  Mo.9766719218 ) :नगरपालिकेतर्फे गेल्या साठ वर्षांपासून सातत्याने आयोजित करण्यात येणारी वार्षिक व्याख्यानमाला यावर्षीही मोठ्या उत्साहात आणि नागरिकांच्या भरघोस प्रतिसादात पार पडत आहे. थंडीच्या कडाक्यातही प्रचंड उत्साहाने नागरिकांनी या व्याख्यानमालेत सहभाग घेतला. यंदा नागपूर येथून आलेले मान्यवर व्याख्याते श्री. जावेद कुरेशी यांनी आपल्या प्रभावी

व्याख्यानांद्वारे उपस्थित नागरिकांना भारतीय संविधानाचे महत्त्व पटवून दिले. त्यांनी संविधान हा आपल्या देशाचा आत्मा असल्याचे सांगत प्रत्येक नागरिकाने संविधानाचा आदर करावा, त्याचे पालन करावे आणि आपल्या हक्कांबरोबरच कर्तव्यांचाही आदर ठेवावा, असे आवाहन केले.                                                 श्री. कुरेशी यांनी त्यांच्या व्याख्यानादरम्यान अनेक रोचक कथा आणि उदाहरणे देत संविधानाचे महत्त्व उलगडून दाखवले. त्यांनी सांगितले की, “भारतीय संविधान हे जगातील सर्वात मोठ्या लोकशाही व्यवस्थेचे आधारस्तंभ असून, ते केवळ कायद्यांचे पुस्तक नाही, तर नागरिकांच्या हक्कांचे आणि कर्तव्यांचे मार्गदर्शन करणारे पवित्र ग्रंथ आहे. संविधानाची अंमलबजावणी ही केवळ सरकारची जबाबदारी नसून, प्रत्येक नागरिकाची आहे. यातूनच आपण एक सशक्त, सुरक्षित आणि प्रगत समाजाची निर्मिती करू शकतो.”                                      यावेळी पाचोरा प्रांताधिकारी श्री. भूषण अहिरे साहेब यांनी व्याख्यानमालेच्या ऐतिहासिक वारशाचे कौतुक केले. त्यांनी सांगितले की, “गेल्या साठ वर्षांपासून पाचोरा

नगरपालिकेने सुरू केलेल्या या परंपरेमुळे अनेक नागरिकांना विचारप्रवृत्त होण्याची संधी मिळाली आहे. ही व्याख्यानमाला केवळ कार्यक्रम नसून, ती एक चळवळ आहे जी लोकांपर्यंत बुद्धिमत्तेचे, ज्ञानाचे आणि समृद्ध विचारांचे बीजारोपण करते. नागरिकांनी याचा अधिकाधिक लाभ घ्यावा.”                 पाचोरा शहराचे पोलीस निरीक्षक श्री. अशोक पवार यांनीही आपल्या भाषणादरम्यान

व्याख्यानमालेच्या महत्त्वावर प्रकाश टाकला. त्यांनी म्हटले की, “आजच्या गतिमान आणि माहितीप्रचुर युगात व्याख्यानमालेसारख्या उपक्रमांची गरज अधिक आहे. अशा माध्यमांतून नागरिकांना देश-विदेशातील विविध विषयांची माहिती मिळते, जी त्यांच्या वैचारिक विकासाला चालना देते.”                                  कार्यक्रमाचे अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना पाचोरा नगरपालिकेचे मुख्याधिकारी श्री. मंगेश देवरे यांनी सांगितले की, “ही व्याख्यानमाला केवळ ज्ञानप्रदर्शनासाठी नव्हे, तर लोकांमध्ये नवनवीन विचारांची मेळ घालण्यासाठी उपयुक्त ठरली आहे. या उपक्रमाचा भाग बनलेल्यांचे  नगरपालिकेच्यावतीने मी आभार मानतो. यापुढेही ही परंपरा अधिक भव्य स्वरूपात राबवली जाईल.”                                             या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन नगरपालिकेचे वरिष्ठ लिपिक श्री. ललित सोनार आणि लायब्ररी प्रमुख श्री. श्याम ढवळे यांनी अत्यंत कौशल्याने केले. त्यांनी आलेल्या मान्यवरांची योग्य पद्धतीने ओळख करून दिली आणि कार्यक्रमाला गतिमान ठेवले.   या व्याख्यानमालेसाठी पाचोरा शहरातील अनेक प्रतिष्ठित व्यापारी, सामाजिक कार्यकर्ते, शैक्षणिक क्षेत्रातील तज्ज्ञ, विद्यार्थी, तसेच सामान्य नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवली. यामुळे हा उपक्रम केवळ व्याख्यानापुरता मर्यादित न राहता, तो एक समाजउपयोगी चळवळ बनल्याचे दिसून आले.                             कार्यक्रमादरम्यान अनेक विषयांवर चर्चा झाली. संविधानाचा भारतीय समाजावर

झालेला प्रभाव, नागरिकांच्या हक्कांची अंमलबजावणी, तसेच सामाजिक सलोखा टिकवण्यासाठी आवश्यक असलेले घटक या सर्वांवर प्रकाश टाकण्यात आला. व्याख्यानानंतर नागरिकांनीही आपले विचार मांडण्याची संधी घेतली.                                 पाचोरा नगरपालिकेच्या या व्याख्यानमालेने स्थानिक पातळीवर नागरिकांच्या विचारसरणीत सकारात्मक बदल घडवून आणण्याचे मोठे काम केले आहे. यामुळे नागरिकांमध्ये जागरूकता वाढत असून, सामाजिक बंध वाढीस लागतो आहे. यापुढील काळातही या उपक्रमाला अधिक प्रोत्साहन देण्याची गरज असल्याचे मान्यवरांनी सांगितले.                                                व्याख्यानमालेच्या माध्यमातून पाचोरा नगरपालिकेने केवळ सांस्कृतिक परंपरा जपली नाही, तर नागरिकांना विचारशील बनवण्याचे कार्य केले आहे. नागपूरचे व्याख्याते श्री. जावेद कुरेशी यांचे मार्गदर्शन, प्रांताधिकारी भूषण अहिरे, पोलीस निरीक्षक अशोक पवार आणि मुख्याधिकारी मंगेश देवरे यांचे विचार या उपक्रमाला एक वेगळा आयाम देणारे ठरले. यामुळे नागरिकांचा सहभाग आणि उत्साह पाहता, या व्याख्यानमालेने समाजात सकारात्मक बदल घडवण्याची मोठी जबाबदारी पार पाडल्याचे स्पष्ट होते.

पाचोरा येथे राजनंदिनी अगरबत्ती पूजासाहित्य भांडार उद्घाटन सोहळा थाटामाटात संपन्न

0

Loading

कुऱ्हाड ( अविनाश माळी Mo.9766719218 ) : पाचोरा शहरातील बस स्टँड रोड, जे.डी. शिलाई मशीनच्या बाजूला नव्याने उभारलेल्या “राजनंदिनी अगरबत्ती पूजासाहित्य भांडार” या दुकानाचा उद्घाटन सोहळा मंगळवार, दिनांक २१ जानेवारी २०२५ रोजी दिमाखात पार पडला. या प्रसंगी सत्यनारायण महापूजेचा भव्य कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या उद्घाटन सोहळ्याने पाचोरा शहरात

एक वेगळाच उत्साह निर्माण केला.
       उद्घाटन सोहळ्याची सुरुवात सकाळी ९ वाजता सत्यनारायण महापूजेसह करण्यात आली. श्री कुलस्वामिनी आणि श्री गणेशाच्या कृपेने हा कार्यक्रम अतिशय भक्तिमय वातावरणात पार पडला. पूजेसाठी श्री. राजेंद्र गुलाब शिंपी, कु. राजेंद्र शिंपी, प्रशांत शिंपी आणि संपूर्ण शिंपी परिवाराने आपले योगदान दिले. हळदी-कुंकवाचे कार्य, मंत्रोच्चार आणि धार्मिक विधींमुळे संपूर्ण परिसर पवित्रतेने भारावून गेला होता.
     सत्यनारायण महापूजेनंतर प्रसाद

वितरणाची व्यवस्था करण्यात आली होती. महापूजेला उपस्थित असलेल्या नागरिकांनी उदंड उत्साहाने सहभाग घेतला. या सोहळ्यासाठी जवळपासच्या गावांतील तसेच शहरातील अनेक प्रतिष्ठित व्यक्ती उपस्थित होत्या. स्थानिक व्यापारी, समाजसेवक, राजकीय व्यक्तिमत्त्वे आणि नागरिकांनी आपल्या उपस्थितीने कार्यक्रमाची शोभा वाढवली.        “राजनंदिनी अगरबत्ती पूजासाहित्य भांडार” हे दुकान शहरातील पूजासाहित्य, अगरबत्त्या, तेल, दिवे, धार्मिक वस्त्र, मूर्ती, आरास साहित्य आणि इतर पूजेसंबंधित वस्तूंच्या गरजा पूर्ण करण्यासाठी उघडण्यात आले आहे.
    या व्यवसायाचा मुख्य उद्देश म्हणजे

नागरिकांना त्यांच्या धार्मिक व सांस्कृतिक गरजांसाठी उच्च गुणवत्तेचे साहित्य एकाच ठिकाणी उपलब्ध करून देणे हा आहे. ग्राहकांना योग्य दरात, उत्तम सेवा आणि दर्जेदार वस्तू उपलब्ध करून देण्याचा निर्धार या कुटुंबाने व्यक्त केला आहे.
     दुकानाच्या उद्घाटनाच्या वेळीच ग्राहकांसाठी आकर्षक सवलती जाहीर करण्यात आल्या. येत्या काळात ऑनलाइन ऑर्डरिंग आणि घरपोच सेवा सुरू करण्याचा मानसही शिंपी परिवाराने व्यक्त केला. ग्राहकांशी नातेसंबंध प्रस्थापित करून त्यांच्या गरजांची पूर्तता करण्यासाठी “राजनंदिनी” भांडार नेहमी

तत्पर राहील, अशी ग्वाही दिली गेली.
       कार्यक्रमादरम्यान उपस्थितांमध्ये विशेष ऊर्जा होती. राजेंद्र शिंपी आणि त्यांच्या कुटुंबीयांनी प्रत्येक पाहुण्यांचे स्वागत केले आणि त्यांचे आभार मानले. उपस्थित पाहुण्यांनी आपल्या शुभेच्छा व्यक्त करताना या नव्या व्यवसायासाठी यशस्वी भविष्यासाठी आशीर्वाद दिले.
      यावेळी विशेष पाहुण्यांच्या हस्ते दुकानाचे फित कापून उद्घाटन करण्यात आले. उद्घाटनानंतर उपस्थितांना दुकानाची खास ओळख करून देण्यात आली. “राजनंदिनी अगरबत्ती पूजासाहित्य भांडार” हे केवळ व्यापारासाठी नव्हे तर भक्तिभावाने लोकांच्या धार्मिक गरजा पूर्ण करण्यासाठी उघडण्यात आले आहे, असे मत आयोजकांनी व्यक्त केले.
     कार्यक्रमादरम्यान शिंपी परिवाराने समाजासाठी योगदान देण्याचा निर्धार व्यक्त केला. त्यांनी नागरिकांसाठी गुणवत्तापूर्ण सेवा देण्याचे वचन दिले. स्थानिक व्यापाराला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने हा नवीन व्यवसाय सुरू करण्यात आल्याचे सांगण्यात आले.
        राजनंदिनी अगरबत्ती पूजासाहित्य भांडार हे भविष्यात केवळ पूजासाहित्य विक्रीसाठीचे केंद्र राहणार नाही, तर ते धार्मिक व सांस्कृतिक कार्यांसाठी मार्गदर्शक ठरेल. याठिकाणी भविष्यामध्ये विशेष धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन, नवीन उत्पादने सादर करणे आणि ग्राहकांच्या अभिप्रायांनुसार सेवा सुधारण्याचा मानस व्यक्त करण्यात आला आहे.      संध्याकाळी कार्यक्रमाची सांगता उत्साहात झाली. उपस्थित पाहुण्यांनी शिंपी परिवाराला व्यवसाय वृद्धीच्या शुभेच्छा दिल्या. “राजनंदिनी अगरबत्ती पूजासाहित्य भांडार” हे पाचोरा शहरातील धार्मिक व सांस्कृतिक गरजा पूर्ण करणारे एक महत्त्वाचे केंद्र होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.
      शिंपी परिवाराने कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी सहकार्य करणाऱ्या सर्वांचे मनःपूर्वक आभार मानले. त्यांनी ग्राहकांसाठी नियमित सवलती, विशेष सणांची तयारी आणि नवीन उत्पादन सादरीकरणाचे आश्वासन दिले.
        शिंपी परिवाराने केवळ व्यवसाय न करता उद्योजकतेतून स्थानिक व्यापाराला प्रोत्साहन देण्याचा आदर्श निर्माण केला आहे. याठिकाणी ग्राहकांचे समाधान हेच प्राधान्य असल्याचे त्यांचे वचन असल्याने, पाचोरा आणि आसपासच्या भागातील नागरिकांचा विश्वास जिंकण्यात त्यांना यश मिळेल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

किरण प्रभाजी मा सा साहेब यांची 95 वी जयंती: मोतीबिंदू ऑपरेशन शिबिराचे आयोजन

0

Loading

पाचोरा – किरण प्रभाजी मा सा साहेब यांच्या 95 व्या जयंतीनिमित्त, जय किरण प्रभाजी नागरी सहकारी पतसंस्था ने दि. 20 जानेवारी 2025 रोजी एक भव्य नेत्र तपासणी व मोतीबिंदू ऑपरेशन शिबिर आयोजित केले. संस्थेच्या सेवाभावी उपक्रमांचा एक भाग म्हणून हे शिबिर राबविण्यात आले, ज्यामध्ये 166 रुग्णांची नेत्रतपासणी करण्यात आली. यामधील 68 रुग्ण मोतीबिंदूच्या ऑपरेशनसाठी पात्र ठरले. ही शस्त्रक्रिया सुप्रसिद्ध नेत्रतज्ज्ञ डॉ. विकास बोरोले यांच्या मार्गदर्शनाखाली जळगाव येथील नेत्रम हॉस्पिटलमध्ये होणार आहे.                                                 .    .संस्थेची सेवाभावी परंपरा                     जय किरण प्रभाजी नागरी सहकारी पतसंस्थेची स्थापना समाजसेवा आणि आर्थिक सहकार्याच्या उद्दिष्टाने झाली आहे. मागील काही वर्षांत संस्था विविध सामाजिक उपक्रमांमध्ये सक्रिय असून, त्यांनी आतापर्यंत 500 ते 600 मोतीबिंदू ऑपरेशन मोफत करून दिली आहेत. या प्रक्रियेसाठी लागणारे रुग्णांचे जळगाव येथील नेत्रम हॉस्पिटलपर्यंत जाणे आणि परत येणे याचा खर्चही संस्था स्वतः उचलते. संस्थेचे चेअरमन अ‍ॅड. अतुल सुभाषचंद्र संघवी, व्हॉइस चेअरमन प्रमोद बंठीया, संचालक डॉ. मनोज पाटील, ईश्वर पाटील, शिवाजी आव्हाड, अमित संघवी, सपनेश बाहेती यांचा शिबिरामध्ये महत्त्वपूर्ण सहभाग होता. तसेच संस्थेचे जेष्ठ सभासद रतनचंदजी संघवी, किशोर संघवी, प्रशांत कुलकर्णी, अशोक पाटील, दामू पाटील आणि कर्मचारी वर्ग उपस्थित होते.

शिबिरातील ठळक बाबी                       नेत्र तपासणी:-
शिबिरात एकूण 166 रुग्णांची नेत्र तपासणी करण्यात आली. त्यामधून मोतीबिंदूच्या ऑपरेशनसाठी पात्र 68 रुग्णांची निवड करण्यात आली.                              मोफत उपचार सुविधा:
संस्थेने मोफत ऑपरेशनची व्यवस्था केली असून, रुग्णांच्या वाहतुकीसाठी खास वाहन सुविधा देखील उपलब्ध करून दिली आहे.      तज्ज्ञ डॉक्टरांची सेवा:
नेत्रतज्ज्ञ डॉ. विकास बोरोले यांच्या नेतृत्वाखाली या रुग्णांचे ऑपरेशन करण्यात येणार आहे. त्यांचे नेत्रम हॉस्पिटल, जळगाव हे जिल्ह्यातील एक अग्रगण्य नेत्रचिकित्सालय असून, अत्याधुनिक तंत्रज्ञान व अनुभवी टीमद्वारे मोतीबिंदू ऑपरेशन करण्यात येतात.              संस्थेची सामाजिक बांधिलकी             जय किरण प्रभाजी नागरी सहकारी पतसंस्था केवळ आर्थिक व्यवहारापुरती मर्यादित नसून, ती सामाजिक क्षेत्रातही ठसा उमटवत आहे. आरोग्यसेवा, शैक्षणिक प्रोत्साहन, आणि पर्यावरण जपणूक यांसारख्या विविध उपक्रमांमध्ये संस्थेने महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. विशेषतः ग्रामीण भागातील दुर्बल व गरजू वर्गासाठी मोफत नेत्र तपासणी व उपचार हे संस्थेचे महत्त्वाचे उद्दिष्ट ठरले आहे.        नेत्रतपासणी शिबिराची पूर्वस्थिती         या शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी संस्थेने तीन महिन्यांपासून नियोजन केले होते. गावागावांत जाऊन प्रचार, रुग्णांची पूर्वनोंदणी, आणि त्यांची संपूर्ण वैद्यकीय माहिती संकलित करण्याचे काम करण्यात आले.                                       शिबिरातील रुग्णांचा अनुभव          शिबिरात उपस्थित असलेल्या रुग्णांनी संस्थेच्या उपक्रमाचे कौतुक केले. एका रुग्णाने सांगितले, “मोतीबिंदूमुळे माझ्या दैनंदिन आयुष्यात अडचणी येत होत्या, परंतु संस्थेच्या माध्यमातून मोफत उपचार मिळत आहेत. माझ्यासारख्या गरजूंसाठी ही मोठी मदत आहे.                          “संस्थेच्या पदाधिकाऱ्यांचे मत                                                 अ‍ॅड. अतुल सुभाषचंद्र संघवी :- यांनी या शिबिराबाबत आपले विचार मांडताना सांगितले की, “आमच्या संस्थेचा मुख्य उद्देश सामाजिक बांधिलकी जोपासणे हा आहे. नेत्रचिकित्सा क्षेत्रातील गरजू लोकांना सहाय्य करून त्यांचे जीवन सुकर करणे हे आमचे ध्येय आहे.”                                 प्रमोद बंठीया :- यांनी संस्थेच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांचे वर्णन करताना सांगितले की, “आम्ही भविष्यातही असेच उपक्रम राबवून समाजसेवा करत राहू.”             भविष्यातील योजना                         संस्था लवकरच एक व्यापक आरोग्य शिबिर आयोजित करण्याच्या तयारीत आहे. त्यामध्ये हृदयविकार, मधुमेह, आणि कर्करोग तपासणी अशा विविध विभागांचा समावेश असेल.                      समाजातील योगदान:-                               या शिबिरातून संस्थेने आरोग्यसेवेच्या क्षेत्रात आपली सामाजिक बांधिलकी अधोरेखित केली आहे. शहरी तसेच ग्रामीण भागातील लोकांना लाभदायक अशा योजना राबवून संस्था आपला ठसा उमटवत आहे. जय किरण प्रभाजी नागरी सहकारी पतसंस्थेच्या 95 व्या जयंतीनिमित्त आयोजित नेत्र तपासणी व मोतीबिंदू शिबिर हा समाजहिताचा एक उत्कृष्ट उपक्रम ठरला आहे. संस्थेच्या सेवाभावी दृष्टिकोनामुळे शेकडो गरजूंना आरोग्याचे नवे दृष्टीकोन लाभले आहेत.

पाचोरा शहरात गृहसजावटीसाठी नवा मापदंड ‘राधे प्लाय अँड हार्डवेअर’ व ‘राधे लाईट हाऊस’चे उद्घाटन: गृहसजावटीच्या क्षेत्रात क्रांती

0

Loading

पाचोरा शहरातील ग्राहकांसाठी एक सुखद बातमी म्हणजे, आता गृहसजावटीसाठी मुंबई किंवा पुण्याला जाण्याची गरज नाही. ‘राधे प्लाय अँड हार्डवेअर’ व ‘राधे लाईट हाऊस’ या दोन अत्याधुनिक व बहुपयोगी दुकानांचे उद्घाटन नुकतेच करण्यात आले आहे. गृहसजावट, फर्निचर डिझाइन आणि लाइटिंग यासाठी उत्कृष्ट गुणवत्ता व किफायतशीर दर देणाऱ्या या

व्यवसायांनी ग्राहकांच्या अपेक्षांवर खऱ्या अर्थाने मोहर उमटवली आहे.              राधे प्लाय अँड हार्डवेअर: – फर्निचर डिझाइनसाठी एक विश्वासार्ह ठिकाण
घरासाठी फर्निचर बनवायचे आहे का? किंवा दुकानात फर्निचर बसवायचे आहे? यासाठी पाचोऱ्यातील ‘राधे प्लाय अँड हार्डवेअर’ हे एकमेव ठिकाण आहे. या दुकानात ग्राहकांना सर्व प्रकारच्या फर्निचर मटेरियलसह एकाच छताखाली भरपूर पर्याय उपलब्ध आहेत.         विशेष उत्पादने आणि सेवा‘ :-                राधे प्लाय अँड हार्डवेअर’ मध्ये प्लायवुड, फ्लश डोअर्स, बी.टी.सी., मोल्डिंग पुठ्ठा, लॅमिनेट चार्कोल, लोअर, किन्डलिंग, वॉल पेपर फेविकोल, अॅल्युमिनियम सेक्शन, आणि विनर या सर्व प्रकारच्या हाय-ग्रेड हार्डवेअर मटेरियलचा समावेश आहे. ग्राहकांना फर्निचर डिझाइन करताना याठिकाणी प्रत्येक लहानसहान गोष्ट सहजपणे उपलब्ध होईल.     होलसेल दरात गुणवत्ता:-
या प्लाय आणि हार्डवेअर दुकानाची सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे, येथे प्रथमच होलसेल दरात ग्राहकांना मटेरियल मिळते. यामुळे फर्निचर बनवण्यासाठी लागणारे साहित्य आता अधिक स्वस्त व दर्जेदार मिळू शकते.     राधे लाईट हाऊस:-                          प्रकाश योजनेचे केंद्र
प्रकाशयोजना ही कोणत्याही गृहसजावटीचा अत्यंत महत्त्वाचा भाग आहे. यासाठी ‘राधे लाईट हाऊस’ पाचोरा शहरात प्रथमच सुसज्ज लाइटिंग

उत्पादनांसह उपलब्ध झाले आहे. घर, ऑफिस, दुकान किंवा कोणत्याही प्रोजेक्टसाठी अत्याधुनिक व आकर्षक लाइटिंगचे सर्व पर्याय येथे आहेत.      विशेष प्रकाश उत्पादने ‘राधे लाईट हाऊस’मध्ये ग्राहकांना उपलब्ध होणाऱ्या      प्रमुख प्रकाश उत्पादने:-                  क्रिस्टल झुंबर ,कॅण्डल झुंबर,वॉल हॅंगिंग,प्रोफाइल लाइट,ग्रीन ग्रास,फ्लोरिंग कार्पेट,आर्टिफिशियल फ्लॉवर्स, गृहसजावटीसाठी इतर विविध आकर्षक वस्तू गृहसजावट क्षेत्रातील बदलाचा प्रारंभ गृहसजावट व प्रकाशयोजना यासाठी आतापर्यंत ग्राहकांना मोठ्या शहरांमध्ये जावे लागायचे. मात्र, ‘राधे प्लाय अँड हार्डवेअर’ आणि ‘राधे लाईट हाऊस’च्या माध्यमातून आता पाचोरा शहरातच सर्व गरजांची पूर्तता होणार आहे.                                   ग्राहकांसाठी विशेष फायदे :-             विविध पर्याय: ग्राहकांना एकाच ठिकाणी प्लायवुडपासून ते प्रोफाइल लाइटपर्यंत सर्व काही मिळणार आहे.किफायतशीर दर: दोन्ही दुकानांमध्ये होलसेल दरात साहित्य मिळत असल्याने खर्चाची बचत होईल.  डिझाईनिंग सेवा: आधुनिक ट्रेंड्सनुसार फर्निचर डिझाइन व प्रकाशयोजना करण्यासाठी ग्राहकांना उत्तम सल्लाही दिला जातो.                                         उद्घाटनाचा विशेष सोहळा                     ‘राधे प्लाय अँड हार्डवेअर’ व ‘राधे लाईट हाऊस’च्या उद्घाटनप्रसंगी शहरातील मान्यवर व ग्राहक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या प्रसंगी ग्राहकांना विविध उत्पादनांवर खास सवलतीही दिल्यात                                             स्थळाची सोय: – दुकान शहराच्या मध्यभागी असल्याने सर्व ग्राहकांसाठी सहज पोहोचण्याजोगे आहे.               पत्ता आणि संपर्क :-
     पत्ता: गट क्रमांक 49, प्लॉट क्रमांक 22, इंडिया नगर, गजानन पेट्रोलियमसमोर, भडगाव रोड, पाचोरा.
संपर्क क्रमांक: 9970073717            ग्राहकांचा प्रतिसाद :-                 उद्घाटनाच्या अवघ्या काही दिवसांतच या दुकानांना ग्राहकांचा प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. पाचोरा शहरातील घरबांधणी आणि गृहसजावटीच्या कामात ‘राधे प्लाय अँड हार्डवेअर’ व ‘राधे लाईट हाऊस’ने एक महत्त्वपूर्ण स्थान मिळवले आहे                                        नवीन तंत्रज्ञानासह गृहसजावट क्षेत्रात प्रगती                                      ग्राहकांच्या अपेक्षा पूर्ण करताना या व्यवसायांनी नवीन तंत्रज्ञान आणि ट्रेंड्सचा समावेश केला आहे. यामुळे पाचोरा व आसपासच्या परिसरातील ग्राहकांना दर्जेदार सेवा मिळण्यास सुरुवात झाली आहे.
‘राधे प्लाय अँड हार्डवेअर’ व ‘राधे लाईट हाऊस’च्या स्थापनेने पाचोरा शहर गृहसजावट क्षेत्रात एक नव्या युगाचा प्रारंभ करत आहे. ग्राहकांना त्यांच्या घराचे स्वप्न साकार करण्यासाठी या व्यवसायांनी दर्जेदार पर्याय उपलब्ध करून दिले आहेत.

न्याय व योजनांच्या लाभापासून कोणीही वंचित राहू नये – न्यायमूर्ती वाघवसे

1

Loading

पाचोरा – येथे दिनांक 19 रोजी महाराष्ट्रातील सर्वाधिक प्रभावी व उपयुक्त कार्यक्रमांपैकी एक, विधी सेवा महाशिबिर व शासकीय योजना महामेळावा संपन्न झाला. या कार्यक्रमात समाजातील वंचित घटकांना न्याय मिळावा आणि त्यांना शासकीय योजनांचा लाभ मिळावा, यासाठी विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. औरंगाबाद खंडपीठाचे न्यायमूर्ती अभय वाघवसे यांनी कार्यक्रमात प्रमुख मार्गदर्शक म्हणून महत्त्वपूर्ण विचार मांडले. त्यांच्या मार्गदर्शनाने उपस्थितांना योजनांच्या महत्त्वाचा व न्यायप्राप्तीच्या प्रक्रियेचा व्यापक दृष्टिकोन मिळाला.                               #सर्वांपर्यंत न्याय पोहोचला पाहिजे”
न्यायमूर्ती अभय वाघवसे यांनी आपल्या भाषणात विधी सेवा समिती आणि

शासकीय योजनांबाबत महत्वपूर्ण विचार व्यक्त केले. ते म्हणाले, “न्याय व योजनांचा खरा लाभ समाजातील शेवटच्या माणसापर्यंत पोहोचला पाहिजे. योजनांचा अंमल केवळ कागदांपुरता न राहता त्याचा लाभ खऱ्या लाभार्थ्यांना मिळवून देणे ही आपली जबाबदारी आहे.” तसेच, त्यांनी ग्रामीण भागात गावनिहाय शिबिरे आयोजित करून योजना व न्यायाची माहिती प्रत्येकापर्यंत पोहोचवण्याचे आवाहन केले.                # विधी सेवा महाशिबिराचे उद्घाटन व मान्यवरांची उपस्थिती
महाशिबिराच्या उद्घाटनासाठी जिल्हा व सत्र न्यायाधीश एम. क्यू. एस. एम. शेख अध्यक्षस्थानी होते. उद्घाटन सोहळा दीप प्रज्वलनाने करण्यात आला. या वेळी जिल्हाधिकारी डॉ. आयुष प्रसाद, पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, जिल्हा विधी सेवा समितीचे सचिव सलीम सय्यद, न्यायमूर्ती जी. बी. औंधकर, एस. व्ही. निमसे, जी. एस. बोरा, ॲड. रमाकांत पाटील, ॲड. सुरेंद्र काबरा, ॲड. प्रवीण पाटील, ॲड. कविता रायसाकडा, प्रांताधिकारी डॉ. भूषण अहिरे, पोलीस उपअधीक्षक धनंजय येरुळे, पोलीस निरीक्षक अशोक पवार, तहसीलदार विजय बनसोडे, आणि निर्मल इंटरनॅशनल स्कूलच्या अध्यक्षा वैशाली सूर्यवंशी आदी मान्यवर उपस्थित होते.

# विद्यार्थ्यांचा सहभाग व सांस्कृतिक उपक्रम
शिबिराची सुरुवात गोविंद मोकाशी व त्यांच्या सहकाऱ्यांनी सादर केलेल्या स्वागतगीताने झाली. गो से हायस्कूलच्या विद्यार्थिनींनी ‘बेटी बचाव, बेटी पढाव’ या विषयावर पथनाट्य सादर केले. नऊवारी साड्या परिधान केलेल्या विद्यार्थिनींनी लेझीम पथकाद्वारे पारंपरिक स्वागत केले. तुतारी वादन आणि मावळ्यांच्या वेशभूषेतल्या विद्यार्थ्यांनी मान्यवरांचे औक्षण केले, ज्यामुळे शिबिराला सांस्कृतिक छटा प्राप्त झाली.

# योजनांचा लाभ प्रत्यक्ष लाभार्थ्यांपर्यंत
महाशिबिरात विविध योजनांच्या लाभार्थ्यांना प्रत्यक्ष लाभ प्रदान करण्यात आले. पशुधन भरपाईच्या धनादेशांचे वाटप, मोफत गणवेश, शिष्यवृत्तीच्या रकमा, तसेच घरकुलाच्या चाव्यांचे वितरण करण्यात आले. शिबिरात लाभ मिळालेल्या प्रमुख लाभार्थ्यांमध्ये सुखीया फकीर (पिंप्री), शंकर पाटील (म्हसास), दीपकसिंग चेन्नावत, नागेश्वर तांबे, राजेंद्र सावंत, आणि शोभाबाई महाले यांचा समावेश होता.

# विविध शासकीय विभागांचे स्टॉल्स व जनजागरण
महाशिबिरात पोलीस, महसूल, पंचायत समिती, आरटीओ, कृषी, महिला व बालविकास, आणि आरोग्य विभागांसह अनेक विभागांनी स्टॉल्स उभारले होते. या स्टॉल्सद्वारे योजनांची माहिती, पात्रता निकष, आवश्यक कागदपत्रे याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. यामुळे लाभार्थ्यांना एकाच ठिकाणी विविध योजनांची सविस्तर माहिती मिळाली.

# मार्गदर्शन सत्रे व चर्चासत्रे
पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी रस्ते अपघात, सायबर गुन्हे, आणि नवीन कायदे यावर सविस्तर चर्चा केली. जिल्हाधिकारी डॉ. आयुष प्रसाद यांनी महसूल विभागाच्या कामांचा आढावा घेत विविध प्रलंबित कामांची माहिती दिली. तसेच ॲड. अमोल सावंत आणि न्यायाधीश एम. क्यू. एस. एम. शेख यांनी देखील उपयुक्त मार्गदर्शन केले.

# शिबिराच्या आयोजनाबद्दल मान्यवरांचा सन्मान
महाशिबिराच्या उत्कृष्ट आयोजनासाठी न्यायमूर्ती जी. बी. औंधकर, ॲड. प्रवीण पाटील, ॲड. कविता रायसाकडा, आणि वैशाली सूर्यवंशी यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी फेटा, समई, श्रीफळ, व वृक्षाचे रोपटे भेट देऊन मान्यवरांचा सन्मान करण्यात आला.

# नागरिकांचे समाधान व प्रश्न निराकरण
शिबिराच्या शेवटी न्यायाधीश, शासकीय अधिकारी, आणि वकीलांनी लाभार्थ्यांसोबत संवाद साधला. त्यांच्या समस्यांचे निराकरण करताना त्यांनी योग्य मार्गदर्शन केले. उपस्थित नागरिकांनी या उपक्रमाचे मनापासून कौतुक केले.

# उपक्रमाची सांगता व पुढील दृष्टीकोन
राष्ट्रगीताने या महाशिबिराची सांगता झाली. हा उपक्रम केवळ शासकीय योजनांच्या प्रसारासाठी नव्हे, तर समाजातील वंचितांना न्याय व आधार देण्यासाठी अत्यंत प्रभावी ठरला. ग्रामीण भागातील जनतेपर्यंत अशा योजनांचा अधिकाधिक लाभ पोहोचावा, यासाठी भविष्यातही अशी शिबिरे आयोजित करण्याचा निर्धार मान्यवरांनी व्यक्त केला.       
      पाचोरा येथील विधी सेवा महाशिबिर व शासकीय योजना महामेळावा समाजातील शेवटच्या व्यक्तीपर्यंत न्याय व योजना पोहोचवण्याच्या दृष्टिकोनातून अत्यंत यशस्वी ठरला. या उपक्रमामुळे पाचोरा व भडगाव तालुक्यातील लाभार्थ्यांना न्याय व विविध योजनांचा लाभ मिळण्याची संधी उपलब्ध झाली. समाजातील अशा उपक्रमांचे सातत्य टिकवणे हीच या कार्यक्रमाची खरी यशोगाथा ठरेल.

श्रीमती एम एम पी शाह महिला महाविद्यालयाचा वार्षिक सोहळा संपन्न

0

Loading

मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : माटुंगा येथील सेवा मंडळ सोसायटी संचालित श्रीमती मणिबेन एम पी शाह कला आणि वाणिज्य स्वायत्त महिला महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजनेचा वार्षिक पुरस्कार सोहळा थाटात संपन्न झाला. ह्या सोहळ्यास उद्धघाटक मुख्य अतिथी भारती पाठक, राष्ट्रीय सेवा योजनेचे क्षेत्रीय प्रमुख डॉ. विनोद झालटे, डॉ. भरत पाठक, अतुल संघवी, महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. अर्चना पत्की, उपप्राचार्य डॉ. अवनीश भट्ट, कनिष्ठ महाविद्यालयाच्या उपप्राचार्य प्रा. संगीता सिंह आदी मान्यवरांच्या हस्ते दीपप्रजल्वन करण्यात आले. सेवा मंडळ सोसायटीचे सेक्रटरी डॉ. भरत पाठक, प्राचार्य डॉ. अर्चना पत्की यांनी सर्व मान्यवरांचे संस्थेच्यावतीने शाल श्रीफळ देऊन स्वागत केले. तसेच शिक्षण, साहित्य आणि समाज या क्षेत्रासाठी सदैव तत्पर असणारे चंद्रवीर बंशीधर यादव आणि मनोज वाडिया यांना स्मृतिचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले. त्याचबरोबर ‘सेव द गर्ल चाइल्ड प्रोजेक्ट’ अंतर्गत ३५० विद्यार्थिंनीना कपडे वाटप केल्याबद्दल रीता अतुल संघवी यांचाही सम्मान करण्यात आला.
पूर्ण वर्षभर राष्ट्रीय सेवा योजनेत सक्रिय असणाऱ्य़ा ३४ स्वसंसेवक विद्यार्थिंनीना प्रमाणपत्र आणि सन्मानचिन्ह प्रदान करण्यात आली. राष्ट्रीय सेवा योजना अधिकारी डॉ. रेखा शेलार यांनी वार्षिक अहवाल  सादर केला. ह्या सोहळ्याचे प्रमुख अतिथी भारती पाठक आणि डॉ. विनोद झालटे यांनी विद्यार्थिंनींचे कौतुक करून त्यांना मार्गदर्शन केले. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रमणी नायडू आणि कोमल रामपूरे यांनी केले.

६३ वी महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धामुंबई केंद्रातून इम्युनिटी-द व्हाईस ऑफ टॉलरन्स प्रथम

0

Loading

मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : ६३ व्या महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेत मुंबई केंद्रातून मोरया प्रतिष्ठान, मुंबई या संस्थेच्या इम्युनिटी-द व्हाईस ऑफ टॉलरन्स या नाटकाला प्रथम पारितोषिक तसेच बृहन्मुंबई पोलीस कल्याण निधी, मुंबई या संस्थेच्या इन्शाअल्ला या नाटकास द्वितीय पारितोषिक जाहीर झाल्याची घोषणा सांस्कृतिक कार्य संचालक बिभीषण चवरे यांनी आज (१६ जानेवारी) एका प्रसिध्दीपत्रकाद्वारे केली आहे. या दोन्ही नाटकांची अंतिम फेरीसाठीही निवड करण्यात आली आहे. सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे आयोजित या स्पर्धेच्या प्राथमिक फेरीचे मुंबई केंद्रावरील अन्य निकाल पुढीलप्रमाणे-     
प्रवेश कला क्रीडा मंच या संस्थेच्या तुझ्या रुपात मी…या नाटकासाठी तृतीय पारितोषिक प्राप्त झाले आहे. दिग्दर्शन: प्रथम पारितोषिक महेंद्र दिवेकर (नाटक- इम्युनिटी-द व्हाईस ऑफ टॉलरन्स), द्वितीय पारितोषिक सुशील इनामदार (नाटक- इन्शाअल्ला), प्रकाश योजना प्रथम पारितोषिक प्रसन्न निकम                (नाटक- इन्शाअल्ला), द्वितीय पारितोषिक – श्याम चव्हाण (नाटक- इम्युनिटी-द व्हाईस ऑफ टॉलरन्स), नेपथ्य : प्रथम पारितोषिक रजनिश कोंडविलकर (नाटक-इम्युनिटी-द व्हाईस ऑफ टॉलरन्स), द्वितीय पारितोषिक रजनिश कोंडविलकर (नाटक- कायाप्पाचा पाडा), रंगभूषा : प्रथम पारितोषिक राजेश चव्हाण (नाटक- मी तर बुआ अर्धा शहाणा), द्वितीय पारितोषिक अनिल कासकर (नाटक- इम्युनिटी-द व्हाईस ऑफ टॉलरन्स) उत्कृष्ट अभिनय रौप्यपदक सुशील इनामदार (नाटक -इन्शाअल्ला) व समृध्दी कोटगी (नाटक- इम्युनिटी-द व्हाईस ऑफ टॉलरन्स), अभिनयासाठी गुणवत्ता प्रमाणपत्रे अक्षता सुर्वे (नाटक- इन्शाअल्ला), शांती बावकर (नाटक- तुझ्या रुपात मी…), अपूर्वा बावकर (नाटक- घर त्या तिघांचं), अमिषा घाग (नाटक- तुझ्या रुपात मी…), अंकिता आग्रे (नाटक- संघर्ष जगण्याचा – लक्षवेध एकलव्याच्या ध्येयपूर्तीचा), सुशील पवार (नाटक- तुझ्या रुपात मी…),  हेमंत घाटगे (नाटक- इम्युनिटी द व्हाईस ऑफ टॉलरन्स), आत्माराम धर्णे (नाटक- धुमशान), प्रणय भुवड (नाटक-मोक्ष), श्वेत बगाडे (नाटक-द हंग्री क्रो).

२३ डिसेंबर, २०२४ ते १४ जानेवारी, २०२५ या कालावधीत साहित्य संघ मंदिर, गिरगाव, मुंबई येथे अतिशय जल्लोषात झालेल्या या स्पर्धेत एकूण १९ नाट्यप्रयोग सादर करण्यात आले. स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून रमाकांत भालेराव, विवेक खेर आणि प्रतिभा तेटु यांनी काम पाहिले.
सांस्कृतिक कार्य विभागाचे अपर मुख्य सचिव विकास खारगे यांनी विजेत्यांचे अभिनंदन केले आहे.
सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार यांनी प्रथम, द्वितीय व तृतीय आलेल्या नाटकांच्या संघाचे तसेच इतर पारितोषिक प्राप्त कलाकारांचे अभिनंदन केले असून भविष्यातही या संघांनी व कलाकारांनी सर्वोत्तम कामगिरी करावी, अशी अपेक्षा व्यक्त केलेली आहे. मुंबई केंद्राचे समन्वयक म्हणून राकेश तळगावकर आणि प्रियांका फणसोपकर यांनी काम पाहिले.

२१ वी महाराष्ट्र राज्य बालनाट्य स्पर्धेचे निकाल जाहीर वाशी, नवी मुंबई केंद्रातून ‘न्युटनचा लायन’ प्रथम

0

Loading

मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : २१ व्या महाराष्ट्र राज्य बालनाट्य स्पर्धेत वाशी, नवी मुंबई केंद्रातून गुरुकुल द डे स्कूल या संस्थेच्या न्यूटनचा लायन या नाटकाला प्रथम पारितोषिक तसेच झुपर्झा, कल्याण या संस्थेच्या ठोंब्या ठोंबीची गोष्ट या नाटकास द्वितीय पारितोषिक जाहीर झाल्याची घोषणा सांस्कृतिक कार्य संचालक बिभीषण चवरे यांनी आज एका प्रसिध्दीपत्रकाद्वारे केली आहे. या दोन्ही नाटकांची अंतिम फेरीसाठीही निवड करण्यात आली आहे. सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे आयोजित या स्पर्धेच्या प्राथमिक फेरीचे वाशी, नवी मुंबई केंद्रावरील अन्य निकाल पुढीलप्रमाणे-

दिग्दर्शनः प्रथम पारितोषिक वृशांक कवठेकर (नाटक-न्युटनचा लायन), द्वितीय पारितोषिक रश्मी घुले (नाटक- ठोंब्या ठोंबीची गोष्ट), प्रकाश योजनाः प्रथम पारितोषिक विनोद राठोड (नाटक- न्युटनचा लायन), द्वितीय पारितोषिक शंतनु साळवी (नाटक-वाचवाल का ?), नेपथ्यः प्रथम पारितोषिक वैष्णवी देव (नाटक- न्युटनचा लायन), द्वितीय पारितोषिक संदेश पडवळ (नाटक- रोज हवे नवे नवे), रंगभूषाः प्रथम पारितोषिक श्रृती गणपुले (नाटक- न्युटनचा लायन), द्वितीय पारितोषिक दिपक कुंभार (नाटक- ठोंब्या ठोंबीची गोष्ट) उत्कृष्ट अभिनय रौप्यपदकः दिया गीते (नाटक- न्युटनचा लायन) व मानस तोंडवळकर (नाटक-संग बांधे डोर), अभिनयासाठी गुणवत्ता प्रमाणपत्रे तनिष्का अपणकर (नाटक- शॉटकट), समिक्षा सोनावणे (नाटक- शपथ), हर्षिका वर्तेकर (नाटक- आदिबांच्या बेटावर), रिदीमा सातवे (नाटक-फुलराणी), प्रणती थोरात (नाटक-सरणार कधीत तम), अर्जुन आमडेकर (नाटक- केअर इज), स्वरांग दाबके (नाटक- न्युटनचा लायन), लाभ घुले (नाटक- ठोंब्या ठोंब्याची गोष्ट) धनुष पाटील (नाटक- राखेतून उडाला मोर) अंगद सिनलकर (नाटक-एका माळेचे मणी)

दि. ६ जानेवारी ते ९ जानेवारी, २०२५ या कालावधीत साहित्य मंदिर सभागृह, वाशी, नवी मुंबई येथे अतिशय जल्लोषात झालेल्या या स्पर्धेत एकूण २३ नाट्यप्रयोग सादर करण्यात आले. स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून चंद्रकांत सैंदाने, जुई बर्वे आणि  विजय शिंगणे यांनी काम पाहिले.

सांस्कृतिक कार्य विभागाचे अपर मुख्य सचिव विकास खारगे यांनी विजेत्यांचे अभिनंदन केले आहे.

सांस्कृतिक कार्य मंत्री अॅड. आशिष शेलार यांनी प्रथम, द्वितीय व तृतीय आलेल्या बालनाटकांच्या संघाचे तसेच इतर पारितोषिक प्राप्त कलाकारांचे अभिनंदन केले असून भविष्यातही या संघांनी व कलाकारांनी सर्वोत्तम कामगिरी करावी, अशी अपेक्षा व्यक्त केलेली आहे.

स्पर्धा सुरळीतपणे पार पाडण्यासाठी मुख्य समन्वयक राकेश तळगावकर, मुकुंद जोशी, प्रियंका फणसोपकर, सचिन पाटील यांनी अथक परिश्रम घेतले.

‘मी’ चा प्रवास हा मराठी आत्मकथनातून अधिक जवळून कळतो – प्रा. प्रदीप पाटील

0

Loading

मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : सेवा मंडळ एज्युकेशन सोसायटी संचालित श्रीमती माणिबेन एम पी शाह कला आणि वाणिज्य स्वायत्त महाविद्यालयातील मराठी विभागातील ‘मराठी भाषा संवर्धन पंधरवडा २०२५’ आणि ‘वाचन संकल्प महाराष्ट्राचा’ अशा उपक्रमातून महाविद्यालयात विविध व्याख्याने व स्पर्धांचे आयोजन मराठी विभाग आणि जी ओ शाह ग्रंथालयाने आयोजित केले आहे. जास्तीतजास्त विद्यार्थिंनी यात सहभागी व्हावे असे आव्हान महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. अर्चना पत्की यांनी केले व मराठी विभागास शुभेच्छा दिल्या.
मराठी भाषा संवर्धन पंधरवड्यानिमित्ताने मराठी  विभागाने आयोजित केलेल्या ‘आत्मकथनातील ‘मी’चा प्रवास’ या विषयावर श्री एम. पी. शाह कला आणि वाणिज्य कनिष्ठ महाविद्यालय, मराठी विभागातील प्रा. प्रदीप पाटील यांनी विद्यार्थिंनीना मार्गदर्शन केले. त्याप्रसंगी ते म्हणाले की, ‘कुठलीही महान व्यक्ती वाचनामुळेच महान बनू शकते हे त्यांच्या आत्मचरित्राचा अभ्यास केल्यानंतरच समजते. ज्याला वाचनाची आवड आहे त्याला कुठेही कोणत्याही वेळी कंटाळा येण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. कितीही लांबचा प्रवास असो. हातातील पुस्तक त्या प्रवासाचा कंटाळा आणून देत नाही. महात्मा गांधी, लोकमान्य टिळक, जयप्रकाश नारायण अशा थोर व्यक्तींना आपल्या जीवनातील बराच काळ तुरुंगात काढावा लागला. तेथे वाचन या छंदाने त्यांना उत्तम साथ दिली. आपले संस्कार आणि जडणघडण कशी आहे हे वाचनातूनच आपल्याला कळते. आयुष्यातील वेगवेगळ्या दिशांना स्पर्श करण्याचे सामर्थ्य वाचनातून प्राप्त होते. चरित्र व आत्मचरित्र यातील फरक व आत्मचरित्र व आत्मकथन यातील फरक त्यांनी विद्यार्थिंनींना समजावून सांगितला. ‘मी’ चा प्रवास हा मराठी आत्मकथनातून अधिक जवळून कळतो. तसेच आत्मकथनात ‘मी’ बरोबर त्याच्या समाजाचे चित्रण कसे केले जाते याचेही त्यांनी अनेक आत्मकथनांची उदाहरणे देऊन स्पष्ट केले. यावेळी आवर्जून ए. पी. जे अब्दुल कलाम यांचे ‘अग्निपंख’, लक्ष्मीबाई टिळक यांचे ‘स्मृतीचित्रे’, दया पवार यांचे ‘बलुतं’, सुनीता देशपांडे यांचे ‘आहे मनोहर तरी’ अशा अनेक आत्मचरित्रांचा त्यांनी आढावा घेतला.
सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मराठी विभाग प्रमुख डॉ. रश्मी शेटये तुपे यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रा. सुप्रिया शिंदे यांनी केले. ह्या व्याख्यानास महाविद्यालयातील मान्यवर प्राध्यापक व विद्यार्थिंनी मोठया संख्येने उपस्थित होत्या.

ताज्या बातम्या

error: Content is protected !!