Home Dhyeya News Special श्री इच्छापूर्ती हनुमान मंदिराची प्राणप्रतिष्ठा व मिरवणूक भक्तिभावात संपन्न

श्री इच्छापूर्ती हनुमान मंदिराची प्राणप्रतिष्ठा व मिरवणूक भक्तिभावात संपन्न

0
187

Loading

पाचोरा, दि. २१ ऑगस्ट २०२५ रोजी गिरणा पंपिंग रोड परिसरातील बळीराम पाटील नगर येथे नव्याने उभारण्यात आलेल्या श्री इच्छापूर्ती हनुमान मंदिराची प्राणप्रतिष्ठा, मिरवणूक आणि भंडारा कार्यक्रम उत्साहात व भक्तिभावाने पार पडला. अनेक वर्षांपासून भाविकांची इच्छा असलेले हे मंदिर आता प्रत्यक्षात साकार झाल्याने नागरिकांत समाधान व आनंदाचे वातावरण निर्माण झाले. सोहळ्याची सुरुवात १९ ऑगस्ट रोजी सकाळी १० ते दुपारी २ वाजेपर्यंत भव्य मिरवणुकीने झाली. सकाळी कीर्तनाने भक्तिमय वातावरण निर्माण झाले. ढोल-ताशांचा गजर, वारकरी संप्रदायातील बाळगोपाळ, पालखी सजावट आणि जयघोषामुळे संपूर्ण परिसर भक्तिरसात रंगला. महिलावर्गाने ओव्या म्हणत स्वागत केले, घराघरांत रांगोळ्या काढल्या. २० ऑगस्ट रोजी प्राणप्रतिष्ठा विधी मोठ्या भक्तिभावाने संपन्न झाला. संध्याकाळी ६ ते रात्री १० वाजेपर्यंत महाप्रसाद व कीर्तनाचे आयोजन करण्यात आले. हजारो भाविकांनी दर्शनाचा लाभ घेतला व महाप्रसादाचा आनंद घेतला. कीर्तनकारांनी श्री हनुमानजींच्या चरित्रातून भक्तांना प्रेरणा दिली. या कार्यात श्री इच्छापूर्ती हनुमान मंदिर निर्माण समितीचे अध्यक्ष भास्कर नाना पाटील, उपाध्यक्ष संजय राजगुरे, सचिव हिरालाल परदेशी, सदस्य निलेश मराठे, हेमंत चौधरी, नितीन सुरेश पाटील, सल्लागार आण्णासो प्रकाश चौधरी, संजय मुळे, पंकज चौधरी, उमेश वाघ, राजू सावंत, संदीप राणा, नाना शिंदे यांनी मोलाचे योगदान दिले. मंदिराचे बांधकाम उत्कृष्ट रीतीने पूर्ण करणारे कॉन्ट्रॅक्टर इंजिनीयर प्रमोद पाटील यांचे विशेष आभार मानले गेले. तसेच आमदार निधीतून परिसराचे सुशोभीकरण व सभामंडपाची उभारणी शक्य झाली. सोहळ्यात जगदीश सोनवणे, राजूभाऊ धनराळे, सुमित चौधरी, आबा (बजरंग) चौधरी, सोपान पाटील, मनोरे साहेब, चंद्रकांत पाटील, जितेंद्र साळवे, आनंदा ढवळे, गोकुळ पाटील, शुभम परदेशी, नानू चित्ते, अमोल वाघ, मुन्ना शिंदे, भरत भेरु, महावीर महाराज, रोहिदास आदिवाल, गणेश शिंदे, मयूर चौधरी यांच्यासह अनेक कार्यकर्ते आणि वारकरी संप्रदायातील बंधू-भगिनी सहभागी झाले. समितीने भविष्यात मंदिर परिसरातून केवळ धार्मिकच नव्हे तर सामाजिक व सांस्कृतिक उपक्रम राबवण्याचा संकल्प व्यक्त केला. श्री हनुमानजींच्या कृपेने पाचोऱ्यातील हा परिसर अध्यात्मिक व सामाजिक केंद्र म्हणून विकसित होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!