भटक्या कुत्र्यांची प्रचंड दहशत !

मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : नोकरीनिमित्ताने पुणे-मुंबई तसेच पुणेलगतच्या जिल्ह्यांमध्येच नव्हेतर संपूर्ण महाराष्ट्रात भटक्या कुत्र्यांची प्रचंड दहशत आहे. पहारे नोकरीच्या ठिकाणी कार्यालयीन वेळेत पोहचण्यासाठी कर्मचाऱ्यांना & शिक्षणासाठी विद्यार्थी-विद्यार्थीनीना भल्या पहाटे घर सोडावे लागते, तसेच घरी येण्यास रात्री उशीरही होतो. अशावेळी दिवस असो वा रात्र या भटक्या कुत्र्यांचा

त्रास सतत सहन करावा लागत आहे. रस्त्यावरुन चालणाऱ्यांचा चावा घेणे, पाठलाग करणे, गुरगुरणे बालकांचे लचके तोडणे आदी तक्रारी लोकांकडून येत असतात.वस्त्यांबाहेर असलेल्या कचराकुंडांच्या जागा & मांस विक्रीचा परिसर या भटक्या कुत्र्यांचे साम्राज्य असते.  भटक्या कुत्र्यांचा सुळसुळाट झाला आहे. बऱ्याच ठिकाणी लहान मुलांवर कुत्र्यांनी हल्ला केल्याच्या घटनांमुळे पालकांमध्ये भीतीचे वातावरण असून, ते आपल्या

मुलांना एकटे कुठे सोडण्यास धजावत नाहीत. पहाटे घर सोडणाऱ्या आणि रात्री उशीरा कामावरुन येणाऱ्या कर्मचाऱ्यांना व विद्यार्थ्यांना या भटक्या कुत्र्यांचा सर्वाधिक त्रास सहन करावा लागत असल्यामुळे भटक्या कुत्र्यांमुळे त्रस्त नागरीकांना होणाऱ्या त्रासापासून मुक्ती मिळावी, अशी व्यथा अनेकांनी आमच्या पर्यंत पोहोचवली. जळगाव जिल्ह्यातील पाचोरा शहरात व हैदराबाद येथील एका लहान मुलाचे भटक्या कुत्र्यांनी लचके तोडल्याची घटना अलिकडेच घडली आहे. भटक्या कुत्र्यांचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. तथापि प्रशासन यासंदर्भात अनभिज्ञ असून नागरिक भीतीच्या छायेत वावरत आहेत. भटक्या कुत्र्यांवर कारवाई व्हावी, अशी आग्रही मागणी या विभागांतील नागरिक मोठ्या प्रमाणावर करित आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here