पाचोरा – पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने आपल्या यशस्वी अकरा वर्षांच्या कारकीर्दीची पूर्णता साजरी करण्यासाठी देशभरात “संकल्प से सिद्धी” या शीर्षकाखाली विविध उपक्रमांचे आयोजन करण्याचे निश्चित केले आहे. या अभियानाअंतर्गत भारतभर एकात्मतेचा, विकासाचा आणि सुशासनाचा संदेश देण्याच्या उद्देशाने विविध कार्यक्रम, कार्यशाळा आणि संवाद सत्रांचे आयोजन करण्यात येत आहे. या अभियानाचा भाग म्हणून महाराष्ट्रातही विभागीय पातळीवर विशेष कार्यशाळांचे आयोजन करण्यात येत आहे. या कार्यशाळांचा मुख्य उद्देश म्हणजे, भाजपच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांना केंद्र सरकारच्या विविध योजना, उपलब्धी आणि पुढील दृष्टीकोन समजावून सांगणे, तसेच येणाऱ्या काळात पक्ष संघटनात्मक दृष्टिकोनातून अधिक प्रभावीपणे कसे कार्य करू शकेल, याबाबत दिशा आणि मार्गदर्शन देणे.
याच पार्श्वभूमीवर नाशिक विभागीय कार्यशाळा दिनांक ५ जून २०२५ रोजी नाशिक शहरात मोठ्या उत्साहात पार पडली. ही कार्यशाळा “संकल्प से सिद्धी” अभियानाचा एक महत्त्वपूर्ण टप्पा ठरली असून यात नाशिक विभागातील सर्वच जिल्ह्यांतील भाजप पदाधिकाऱ्यांनी, नवनिर्वाचित मंडळ अध्यक्षांनी, तसेच आजी-माजी आमदारांनी हजेरी लावली. या कार्यशाळेच्या निमित्ताने संपूर्ण नाशिक विभागातून विविध भागातून नेते आणि कार्यकर्ते एकत्र आले होते. पाचोरा विधानसभेचे माजी आमदार दिलीपभाऊ वाघ यांनी आपल्या मतदारसंघाचे प्रभावी नेतृत्व करत कार्यशाळेत सक्रीय सहभाग नोंदवला. त्यांच्या मार्गदर्शनाखाली पाचोरा विधानसभेतील पाच मंडळांपैकी गोविंद चंद्रकांत शेलार,अनिल पाटील,प्रमोद पाटील या तीन मंडळ अध्यक्षांनी कार्यशाळेत सहभाग घेतला. हे सर्व मंडळ अध्यक्ष या प्रशिक्षण कार्यशाळेत सहभागी होऊन त्यांनी केंद्र व राज्य शासनाच्या योजनांची माहिती घेतली, तसेच कार्यप्रणाली अधिक गतिमान व जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी उपाययोजना यावर सखोल चर्चा केली. ही कार्यशाळा केवळ माहितीची देवाणघेवाण नसून, ती एकप्रकारे पक्षाच्या भविष्यातील दिशा ठरविण्यासाठीचा आधारस्तंभ होती. या कार्यशाळेला भाजपचे केंद्रीय महामंत्री अरुण सिंह, महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष ना चंद्रशेखर बावनकुळे
कार्यकारी अध्यक्ष रवींद्र चव्हाण,विधान परिषदेचे सभापती रामजी शिंदे,
ना गिरीशभाऊ महाजन, ना राधाकृष्ण विखे पाटील, ना जयकुमार रावल, ना संजय सावकारे हे राज्यातील मंत्रीसह
प्रदेश सरचिटणीस विजुभाऊ चौधरी व विक्रांत पाटील महाराष्ट्र भाजप कार्यालय प्रभारी रवीजी अनासपुरे
यांनी कार्यशाळेत विशेष उपस्थित राहून आपल्या अनुभवांचे, धोरणांचे व संघटनात्मक विचारांचे मार्गदर्शन केले. यात प्रामुख्याने
कार्यशाळेच्या पहिल्या सत्रात केंद्र सरकारने मागील अकरा वर्षांत केलेल्या ऐतिहासिक निर्णयांचा आढावा घेण्यात आला. यात स्वच्छ भारत अभियान, घरकुल योजना, उज्ज्वला योजना, आयुष्मान भारत, पीएम किसान सन्मान निधी, जल जीवन मिशन, अशा अनेक योजनांचा ग्रामीण व शहरी भागात कसा प्रभाव पडला याबाबत आकडेवारीसहित सादरीकरण झाले. तर
दुसऱ्या सत्रात संघटनात्मक पातळीवर मंडळ, जिल्हा व विधानसभा स्तरावर काम करताना येणाऱ्या अडचणी, स्थानिक प्रश्न, कार्यकर्त्यांचा सशक्तीकरण, समाजातील विविध घटकांशी संवाद, आणि डिजिटल पद्धतीने प्रचार यावर भर देण्यात आला. कार्यशाळेत उपस्थित नेत्यांनी स्पष्टपणे सांगितले की, “पुढील काळात फक्त निवडणूक डोळ्यासमोर न ठेवता देशाच्या सर्वांगीण विकासासाठी व जनतेशी निगडीत कामे करताना भाजप कार्यकर्त्यांनी सशक्त, प्रामाणिक आणि संवेदनशील राहावे.” यावर मार्गदर्शन करण्यात आले
पाचोरा विधानसभा क्षेत्रात भाजपचा विचार आणि केंद्र शासनाच्या योजनांचा लाभ घराघरात पोहचवण्यासाठी अनेक वर्षांपासून सातत्याने कार्य होत आले आहे. माजी आमदार दिलीपभाऊ वाघ यांच्या नेतृत्वाखाली हे कार्य अधिक गतीने वाढणार आहे. कार्यशाळेत तीन मंडळ अध्यक्षांची उपस्थिती हे याचेच द्योतक आहे. गोविंद शेलार, अनिल पाटील आणि प्रमोद पाटील यांच्यासारख्या तरुण, अभ्यासू व कार्यशील मंडळ अध्यक्षांच्या उपस्थितीमुळे पाचोरा मतदारसंघाच्या संघटनात्मक ताकदीची प्रचिती या कार्यशाळेत आली. कार्यशाळेच्या समारोपात “संकल्प से सिद्धी” या अभियानाचा अर्थ अधिक खोलात समजावण्यात आला. म्हणजे केवळ घोषणा नव्हे, तर संकल्प करून त्याच्या पूर्णतेसाठी तळमळीने, संयमाने आणि चिकाटीने कार्य करणे हीच यशाकडे नेणारी वाट आहे.
भाजपचे सर्वच पदाधिकारी, खासकरून नाशिक विभागातील पदाधिकारी हे संकल्पबद्ध असल्याचे या कार्यशाळेत अधोरेखित झाले. नजीकच्या काळात लोकसभा, विधानसभा व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका दृष्टिपथात आहेत. त्या पार्श्वभूमीवर ही कार्यशाळा अतिशय योग्य वेळी झाली, असे सांगितले जात आहे. नाशिक येथे पार पडलेली ही विभागीय कार्यशाळा “संकल्प से सिद्धी” या अभियानाच्या माध्यमातून केवळ योजनांची माहिती देणारी नव्हे, तर पक्षाच्या भावी वाटचालीचा मार्ग स्पष्ट करणारी ठरली आहे.
पाचोरा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करणारे माजी आमदार दिलीपभाऊ वाघ आणि त्यांच्यासोबत उपस्थित राहिलेले मंडळ अध्यक्ष हे पक्षाचा आत्मविश्वास आणि संघटनात्मक क्षमता दर्शवणारे ठरले.या कार्यशाळेच्या माध्यमातून नव्या उत्साहाने, नव्या जोमाने आणि दृढ संकल्पाने भाजप कार्यकर्ते आपापल्या विभागात कार्यरत होतील असेही माजी आमदार दिलीपभाऊ वाघ यांनी सांगितले
ध्येय न्यूज चॅनेलच्या बातम्या मिळवण्यासाठी येथे क्लिक करून आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.