वादळ–पावसाच्या संकटात पाचोरा तालुका हादरला – बांबरूड राणीचे गावात मृत्यू, घरांचे व शेतीचे मोठे नुकसान, लोकप्रतिनिधींची प्रत्यक्ष भेट व पंचनाम्याचे आदेश

0

पाचोरा- तालुक्यात वादळाने संपूर्ण पाचोरा तालुका, तसेच भडगाव तालुक्याचे काही भाग आणि जळगाव जिल्ह्याच्या ग्रामीण परिसरांमध्ये अक्षरशः थैमान घातले. हा पावसाळा सुरू होण्याआधीचा काळ असूनही आलेल्या वादळासह मुसळधार अवकाळी पावसाने नागरिक, शेतकरी आणि व्यापारी यांच्यावर दुहेरी संकट आणले. अनेक गावांमध्ये विजेच्या तारा तुटल्या, झाडे उन्मळून पडली, घरांची छपरे उडून गेली, शेतमाल जमीनदोस्त झाला. बांबरूड राणीचे गावात तर एका व्यक्तीचा दुर्दैवी मृत्यू झाला. संपूर्ण जिल्ह्यात हळहळ व्यक्त केली जात आहे. नागरिकांच्या

जीवितासह मालमत्तेचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून, या पार्श्वभूमीवर खासदार स्मिताताई वाघ, आमदार किशोर आप्पा पाटील, तसेच माजी आमदार दिलीपभाऊ वाघ यांनी आज 13 जून रोजी बांबरुड सह इतर परिसरातील संकटग्रस्त भागांना भेट देऊन प्रत्यक्ष पाहणी केली. त्यांनी बांबरूड गावातील मृत व्यक्तीच्या कुटुंबीयांचे सांत्वन करत त्यांना शासनाच्या आपत्ती मदतीतून आर्थिक मदत मिळवून देण्याचे आश्वासन दिले.10 जून रोजी सायंकाळी अचानक आलेल्या प्रचंड वादळामुळे पाचोरा तालुक्यातील अनेक गावांमध्ये भीषण नुकसान झाले. बांबरूड, चांदड, भवरपुर, पिंपळगाव, पळसखेडा, पिंपळगाव (ह.), तसेच इतर अनेक भागांमध्ये वादळामुळे झाडे, वीजेच्या तारांचे खांब कोसळले, काही घरांचे पत्रे उडून गेले, तर काही शेतांमध्ये उभ्या असलेल्या पिकांचे आणि साठवलेल्या शेतमालाचे अतोनात नुकसान झाले.
या आपत्तीत सर्वाधिक हाल शेतकऱ्यांचे झाले. नुकताच रब्बी हंगाम संपल्यावर शेतात गोळा केलेला काढणीयोग्य माल साठवून ठेवण्यात आला होता. मात्र वादळामुळे गोदामांचे छतच उडाल्याने किंवा पाणी शिरल्याने तो माल नष्ट झाला. शेतकऱ्यांवर पुन्हा एकदा कर्ज आणि संकट यांचे सावट निर्माण झाले आहे.
बांबरूड राणीचे गावात वादळात एका पुरुषाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. वादळात उन्मळून पडलेल्या झाडामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेने संपूर्ण गावात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. प्रशासनाकडून पंचनामा आणि तातडीची मदत दिली जाणार असल्याचे संकेत तहसीलदारांनी दिले आहेत.मृत व्यक्तीच्या कुटुंबियांना खासदार स्मिताताई वाघ, आमदार किशोरआप्पा पाटील, माजी आमदार दिलीपभाऊ वाघ मधुभाऊ काटे, गोविंद शेलार, नंदूबापू सोमवंशी, शिवदास पाटील, ललित वाघ, शशिकांत वाघ,यांनी आज भेट दिली. या भेटीत त्यांनी कुटुंबीयांच्या दुःखात सहभागी होत “या दुःखद प्रसंगात आम्ही आपल्या पाठीशी आहोत,” असे स्पष्टपणे सांगितले.
याभेटी दरम्यान तहसीलदार विजय बनसोडे, मंडळ अधिकारी वैशाली पाटील, तलाठी पल्लवी वाघ, तलाठी दीपक दवंगे, तलाठी रूपाली रायगडे, तालुका कृषी अधिकारी सुधाकर कराड, मंडळ कृषी अधिकारी यु. आर. जाधव, सहाय्यक कृषी अधिकारी अभिजीत पाटील, सहाय्यक कृषी अधिकारी सुनील साळवे, सहाय्यक कृषी अधिकारी प्रतीक्षा पवार, कोतवाल, पोलीस पाटील आणि ग्रामस्थ नागरिक उपस्थित होते.प्रशासनाच्या वतीने बांबरूड गावात वादळामुळे झालेल्या नुकसानीचे तातडीने पंचनामे सुरू करण्यात आले असून, तालुक्यातील इतर 30 पेक्षा अधिक गावांतही पंचनाम्याचे आदेश देण्यात आले आहेत .खासदार स्मिताताई वाघ यांनी बांबरूडमध्ये संवाद साधताना सांगितले, “या आपत्तीत केवळ बांबरूड नव्हे, तर संपूर्ण पाचोरा तालुक्याचा मोठा भाग बाधित झाला आहे. शासनाच्या विविध यंत्रणांकडे निधी मंजुरीसाठी पाठपुरावा करण्यात येईल.”
आमदार किशोर आप्पा पाटील म्हणाले, “या संपूर्ण जिल्ह्यात झालेल्या नुकसानीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री आणि जिल्हाधिकाऱ्यांशी बोलून विशेष निधी मिळवण्याचा प्रयत्न केला जाईल.”
शेतकऱ्यांनी पदाधिकाऱ्यांसमोर आपली व्यथा मांडताना सांगितले की, “सर्व प्रकारच्या विम्याची रक्कम भरल्यानंतरही वादळामुळे झालेल्या नुकसानीवर विमा संरक्षण मिळतेच असे नाही. त्यामुळे शासनाची आपत्ती मदत हीच आमच्यासाठी आशेचा किरण आहे.”
फक्त बांबरूड नव्हे, तर भडगाव इतर तालुक्यांतही वादळाचा तडाखा बसला आहे. जळगाव जिल्ह्याच्या 7-8 तालुक्यांतील 100 हून अधिक गावांमध्ये घरांचे, वीज यंत्रणेचे आणि शेतपिकांचे मोठे नुकसान झाल्याचे प्रारंभिक अहवालात नमूद करण्यात आले आहे. या नैसर्गिक संकटात बांबरूड राणीचे हे केवळ एक प्रतिनिधी गाव ठरले. पण संकट संपूर्ण जिल्ह्याच्या माथ्यावर होते. या पार्श्वभूमीवर लोकप्रतिनिधी, प्रशासन, माध्यमे, स्वयंसेवी संस्था आणि सामान्य नागरिक यांनी दाखवलेली एकात्मता, संवेदनशीलता आणि तत्परता ही प्रेरणादायी आहे.
वादळ-आपत्तीचे हे सावट निघून जाईल, पण त्यामागे असलेले राज्यकर्त्यांचे पाठबळ आणि समाजाचे एकजूट हेच या जिल्ह्याचे खरे भांडवल आहे. शासनाने आता तात्काळ सर्व गावांतील पंचनामे करून ज्या-ज्यांचे नुकसान झाले आहे, त्यांना लवकरात लवकर न्याय मिळवून द्यावा, हीच जनतेची एकमुखी मागणी आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here