नव्या जबाबदारीचा टप्पा – मा. गणेश मिसाळ साहेब यांची ‘अपर जिल्हाधिकारी’ पदावर उल्लेखनीय पदोन्नती

0

मुंबई – प्रशासनाच्या विविध पातळ्यांवर सातत्यपूर्ण कामगिरी बजावत, जनतेशी संवाद ठेवत आणि शासनाच्या योजना वास्तवात उतरवण्यासाठी झटणाऱ्या अधिकाऱ्यांमध्ये मा. गणेश मिसाळसाहेब हे नाव अत्यंत सन्मानाने घेतले जाते. त्यांच्या कार्यक्षमता, सचोटी, प्रामाणिकता आणि सामाजिक बांधिलकीची राज्य शासनाने दखल घेत, दिनांक २२ एप्रिल २०२५ रोजी त्यांना ‘अपर जिल्हाधिकारी’ या मानाच्या पदावर पदोन्नती दिली. या पदोन्नतीनंतर त्यांची नियुक्ती ‘अपर जिल्हाधिकारी (अतिक्रमण निष्कासन), पश्चिम उपनगरे, वांद्रे, मुंबई उपनगर’ या अत्यंत महत्त्वाच्या पदावर करण्यात आली असून, १० जून २०२५ रोजी मा. गणेश मिसाळ साहेब यांनी अधिकृतपणे या पदाचा कार्यभार स्वीकारला.
प्रशासनातले त्यांचे हे स्थान म्हणजे केवळ एक

पदनियुक्ती नाही, तर त्यांच्या १६ ते १७ वर्षांच्या अथक सेवेला दिले गेलेले राज्यशासनाचे गौरवचिन्ह आहे. त्यांनी उपजिल्हाधिकारी संवर्गात धुळे, जळगाव, नाशिक आणि नंदुरबार या जिल्ह्यांमध्ये प्रभावी आणि लोकाभिमुख सेवा दिली आहे. त्यांनी महसूल संकलन, निवडणूक प्रशासन, आपत्ती व्यवस्थापन, सार्वजनिक वितरण व्यवस्था, शासकीय योजना अंमलबजावणी, अतिक्रमण निष्कासन, सामाजिक सुरक्षा योजना आदी क्षेत्रांमध्ये स्वतःचे कसब आणि सजग भूमिका सिध्द केली आहे.
खास करून जळगाव आणि नंदुरबार जिल्ह्यातील त्यांची सेवा विशेषत्वाने उल्लेखनीय आहे.
यामध्ये सर्व प्रथम पाचोरा येथील प्रांताधिकारी म्हणून कार्यरत असताना सध्या अपर जिल्हाधिकारी पदावर कार्यरत असलेल्या गणेश मिसाळसाहेबांनी आपल्या प्रशासकीय कार्यकौशल्याने राज्य शासनाच्या विविध योजनांना दिशादर्शक व प्रेरणादायी बनवले आहे. त्यांच्या कार्यकाळातील एक महत्त्वपूर्ण

निर्णय म्हणजे नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्राबाबत घेतलेली दूरदृष्टीपूर्ण भूमिका. शासन निर्णयाचा सखोल अभ्यास करून त्यांनी नोंद घेतली की दरवर्षी नव्याने नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्र काढण्याच्या प्रक्रियेमुळे विद्यार्थी आणि पालकांना वेळ, पैसा आणि त्रास सहन करावा लागतो.
त्यामुळे त्यांनी यावर शासकीय परिपत्रकाचा चिकित्सकपणे सखोल अभ्यास करून व शब्दांचा योग्य तो अर्थ लावून तब्बल तीन वर्षांसाठी वैध असलेले नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्र सुरू करण्याचा निर्णय घेतला आणि तो अमलात आणला. प्रारंभी जिल्हास्तरीय प्रयोग म्हणून राबवलेला हा उपक्रम इतका यशस्वी ठरला की त्याच्या परिणामांचा अभ्यास करून सदरची बाब शासन दरबारी वरीष्ठ स्तरावर सादर केल्या नंतर राज्य शासनाने क्षणाचाही विलंब न करता संपूर्ण महाराष्ट्रातच तीन वर्ष वैध असलेले नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्र देण्याचे अधिकृत आदेश निर्गमित केले. या निर्णयामुळे राज्यातील लाखो विद्यार्थ्यांना आणि त्यांच्या पालकांना मोठा दिलासा मिळाला. शिक्षण, नोकरी, शिष्यवृत्ती अशा विविध शासकीय योजनांमध्ये सहभागी होण्यासाठी नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्राचा अडथळा दूर झाल्याने त्यांना स्थिर आणि विश्वासार्ह कागदपत्र उपलब्ध झाले. या ऐतिहासिक बदलामुळे विद्यार्थी वर्गामध्ये त्यांच्या कार्याची विशेष चर्चा आणि प्रशंसा होत असून, ते विद्यार्थ्यांमध्ये एका समर्पित आणि जनहितैषी अधिकाऱ्याच्या रूपात ओळखले जात आहेत. शासन निर्णयांचा केवळ अंमलबजावणी करणारा अधिकारी न राहता, निर्णयाच्या मूलभूत अर्थाचा अभ्यास करून समाजहितासाठी तो योग्य प्रकारे अंमलात आणणारा विचारवंत अधिकारी म्हणून त्यांनी स्वतःची वेगळी छाप निर्माण केली आहे.याचबरोबर त्यांनी पाचोरा तालुक्यात कार्यरत असताना “जलयुक्त शिवार अभियान” अंतर्गत जलसंधारणाचे अत्यंत महत्त्वाचे काम केले. त्यावेळी पावसाच्या अपुरी पातळीमुळे शेतकरी संकटात होते. पाणी अडवणे, साठवणे व भूजल पुनर्भरणाच्या दृष्टीने त्यांनी काटेकोर नियोजन करून प्रत्यक्ष कामावर भर दिला.त्यांच्या प्रयत्नांमुळे या अभियानात उल्लेखनीय यश मिळाले आणि शिवारातील बऱ्याच ठिकाणी पाणी उपलब्ध झाले. त्यांचे काम इतके प्रभावी ठरले की तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः एक तास या शिवारात थेट उपस्थित राहून विविध प्रकल्पांची पाहणी केली. एका वरिष्ठ अधिकाऱ्याच्या नेतृत्वाखालील काम इतके प्रेरणादायी असू शकते, हे त्यांनी प्रत्यक्ष दाखवून दिले.या दोन्ही कामांमुळे — नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्रासंदर्भातील शासन निर्णयाचा प्रभावी अंमल आणि जलयुक्त शिवार अभियानातील यशस्वी अंमलबजावणी — त्यांचं नाव राज्यभर विशेष उल्लेखनीय ठरले आहे. त्यांच्या कार्यपद्धतीमुळे ते प्रशासनात केवळ एक अधिकारी म्हणून नव्हे, तर समाजहितासाठी झटणारा मार्गदर्शक अधिकारी म्हणून ओळखले जातात.
आज अनेक विद्यार्थी, शेतकरी आणि सामान्य नागरिक त्यांच्या या दूरदृष्टीच्या निर्णयाचे लाभार्थी आहेत. अशा कर्तव्यदक्ष अधिकाऱ्यांमुळेच प्रशासनाविषयी लोकांचा विश्वास अधिक दृढ होतो.
तसेच आदिवासीबहुल, दुर्गम, सीमित साधनसंपत्तीचा आणि मूलभूत सुविधांचा अभाव असलेला नंदुरबार हा जिल्हा अनेक अडचणींचा सामना करत असतो. अशा ठिकाणी त्यांनी जिल्हा पुरवठा अधिकारी म्हणून दोन वर्षे स्वखुशीने सेवा दिली. सार्वजनिक वितरण व्यवस्थेच्या माध्यमातून अन्नधान्य गरजूंपर्यंत पोहोचवणे, त्यामध्ये पारदर्शकता ठेवणे, स्थानिक प्रतिनिधींशी संवाद ठेवून उपाययोजना करणं, आणि सर्वसामान्य माणसाची सोय व्हावी म्हणून अतिरिक्त मेहनत घेणं हे त्यांच्या कामाचं वैशिष्ट्य राहिलं. मा. गणेश मिसाळसाहेब यांनी काम करत असताना केवळ कार्यालयीन व्यवहारापुरतीच भूमिका न बजावता, प्रत्येक कार्यात मानवी चेहरा ठेवण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या कामात केवळ कायदाशास्त्र नव्हते, तर संवेदनशीलता, माणुसकी आणि आस्थाही होती. नंदुरबारमधील अनेक गावांमध्ये त्यांनी प्रत्यक्ष भेटी दिल्या, स्थानिक लोकांच्या

पदोन्नती निमित्त नंदुरबार जिल्हाधिकारी कार्यालयाकडून सत्कार व निरोप समारंभ

अडचणी समजून घेतल्या आणि त्या सोडवण्यासाठी यंत्रणेला दिशा दिली. पदोन्नतीनंतर त्यांच्या सेवेत काही काळासाठी आणखी एक जबाबदारी देण्यात आली. महाराष्ट्र राज्य लघुउद्योग विकास महामंडळ (MSSIDC), मुंबई येथे त्यांची सह व्यवस्थापकीय संचालक तथा अपर जिल्हाधिकारी म्हणून तीन आठवड्यांसाठी नियुक्ती करण्यात आली. येथे त्यांनी लघुउद्योगांना चालना देण्यासाठी धोरणात्मक निर्णय घेतले. त्यांनी लघुउद्योजकांना शासकीय योजना सुलभपणे समजावून दिल्या, प्रक्रियेत सुधारणा केल्या आणि डिजिटल प्लॅटफॉर्मचा अधिकाधिक वापर करून पारदर्शकतेला चालना दिली. अल्पावधीतच त्यांनी या महामंडळात सकारात्मक परिणाम घडवून आणले.
सध्या त्यांनी जी जबाबदारी स्वीकारली आहे ती ‘अपर जिल्हाधिकारी (अतिक्रमण निष्कासन), पश्चिम उपनगरे, वांद्रे, मुंबई उपनगर’ ही आहे. ही भूमिका अतिशय

अपर जिल्हाधिकारी (अतिक्रमण निष्कासन) वांद्रे, मुंबई उपनगर येथे रूजू झाल्या नंतर त्याचे स्वागत करतांना अधिकारी व कर्मचारी परिवार

संवेदनशील आणि गुंतागुंतीची मानली जाते. मुंबईसारख्या महानगरात अतिक्रमण ही एक सततची समस्या असून, यामध्ये कोर्टाचे आदेश, राजकीय हस्तक्षेप, नागरिकांच्या भावना, सामाजिक प्रश्न आणि कायदेशीर पेच या सगळ्यांचा समतोल राखणे ही मोठी प्रशासकीय कसोटी असते. अशा भूमिकेसाठी अनुभव, संयम, समन्वयक्षमता आणि स्पष्ट धोरण आवश्यक असते – आणि मा. गणेश मिसाळसाहेब या सर्व निकषांवर ते अत्यंत योग्य अधिकारी ठरतात.
त्यांचा अनुभव धुळे, जळगाव, नाशिक आणि नंदुरबारसारख्या विविध भौगोलिक व सामाजिक पार्श्वभूमीच्या जिल्ह्यांमध्ये काम करण्याचा आहे. त्यांनी लोकसंख्येचे वेगळेपण, सामाजिक गरजांचा भान, आणि स्थानिक लोकसंवाद याचा नेहमीच अभ्यास केला आहे. त्यांच्या कार्यशैलीचा एक ठळक विशेष म्हणजे कोणत्याही पदावर असताना त्यांनी ‘माणसांत जाऊन माणसांसोबत काम’ केलं. कार्यालयाच्या बाहेर जाऊन प्रत्यक्ष जनतेत मिसळण्याची आणि त्यांच्या अडचणी ऐकण्याची तयारी ही त्यांच्या नेतृत्वशैलीची ओळख आहे.त्यांनी आपली प्रशासकीय सेवा ही केवळ कर्तव्यपूर्ती म्हणून न बजावता, ती एक सामाजिक जबाबदारी मानून ती पार पाडली आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात लोक ज्या अपेक्षेने येतात, त्या अपेक्षा पुर्ण करण्यासाठी त्यांनी आवश्यक बदल, सुधारणा आणि निर्णय घेतले. अनेक लोकांचे अर्ज, तक्रारी, विनंत्या त्यांना वैयक्तिक पातळीवर पोहोचल्यावर ते गांभीर्याने त्यावर कार्यवाही करत. त्यामुळे त्यांच्याबाबत लोकांमध्ये आदरयुक्त आत्मीयता निर्माण झाली आहे.त्यांचा स्पष्ट विश्वास आहे की प्रशासकीय पद ही केवळ सत्ता नाही, तर ही सेवा आहे. जनतेचे विश्वासार्ह प्रतिनिधी म्हणूनच त्यांनी स्वतःला नेहमी सिद्ध केले आहे. अधिकारी असूनही, त्यांनी लोकांसमोर ‘आपला माणूस’ म्हणूनच वावरले आहे. आदिवासी भागात, त्यांनी स्थानिक बोलीभाषेत संवाद साधून अनेक समस्यांचे निरसन सहज आणि संवेदनशीलतेने केलं. प्रशासनाच्या दारात येणारा प्रत्येक सामान्य माणूस त्यांच्यासाठी केंद्रबिंदू ठरतो – हे त्यांच्या प्रत्येक कृतीतून जाणवतं
मुंबईसारख्या महाकाय शहरात, अतिक्रमणसंबंधीच्या कामात अंमलबजावणी, न्यायालयीन आदेशांची अचूक पूर्तता, कायदेशीर प्रक्रिया, स्थानिक स्वराज्य संस्थांचा समन्वय, आणि संवेदनशील वस्तींचे स्थानांतरण यासारख्या आव्हानांना सामोरे जावे लागते. या पार्श्वभूमीवर, त्यांच्या सारख्या अनुभवी आणि लोकाभिमुख अधिकाऱ्याची नियुक्ती म्हणजे शासनाचा अत्यंत चपखल निर्णय म्हणावा लागेल. मा. गणेश मिसाळ साहेब यांना प्रशासकीय कारभाराबरोबरच शासकीय जमीन, महसूल संकलन, ग्रामीण विकास योजनांची रचना, अंमलबजावणी, रोजगार हमी योजनेची कार्यवाही, पंचनामे, आणि संकट निवारणाचे काम यामध्ये विशेष पारंगतता प्राप्त झाली आहे. त्यांनी आपल्या सेवेत दरवेळी नवीन गोष्टी शिकण्याची आणि ती अंमलात आणण्याची वृत्ती ठेवली आहे.पदोन्नतीच्या या अत्यंत महत्त्वाच्या टप्प्यावर मा. गणेश मिसाळ साहेब यांनी ‘ध्येय न्यूज’ व ‘झुंज’ वृत्तपत्राशी बोलताना आपल्या कुटुंबीय, वरिष्ठ अधिकारी, सहकारी कर्मचारी, मित्रपरिवार आणि नागरिकांचे आभार मानले. त्यांनी नम्रपणे सांगितले की, “मी आज ज्या टप्प्यावर आहे, तिथे पोहोचण्यासाठी अनेकांचा वाटा आहे. वरिष्ठांचे मार्गदर्शन, सहकाऱ्यांचे सहकार्य आणि जनतेचा विश्वास यामुळेच मी आज या पदावर काम करण्यास सक्षम आहे.”त्यांनी पुढे नमूद केले की, “मुंबई उपनगरात अतिक्रमण हा विषय अत्यंत गुंतागुंतीचा असून, यात नियमानुसार, पण मानवतेचा विचार करून काम करण्याची आवश्यकता आहे. जनतेचा विश्वास जपणे, कायद्याचे पालन करणे आणि व्यवस्थेचा आदर राखणे हे माझे मुख्य उद्दिष्ट राहील.” त्यांच्या कार्यशैलीमुळे त्यांच्याबद्दल अनेक राजकीय, सामाजिक आणि प्रशासकीय वर्तुळात सन्मान आणि विश्वास आहे. त्यांच्या पारदर्शक धोरणांनी आणि माणुसकीच्या स्पर्शाने त्यांनी अनेकांना न्याय मिळवून दिला आहे. म्हणूनच, आज जेव्हा त्यांना महाराष्ट्र शासनाकडून अपर जिल्हाधिकारी या पदावर पदोन्नती मिळते, तेव्हा ती केवळ अधिकाऱ्याची पदोन्नती नसून, एक सेवाभावी विचारांची व मानवी संवेदनांची पदोन्नतीही आहे.
मा. गणेश मिसाळसाहेब यांच्या या पुढील कार्यकाळासाठी ‘ध्येय न्यूज’ आणि ‘झुंज’ परिवारातर्फे त्यांना मन:पूर्वक शुभेच्छा आणि सशक्त प्रशासनाच्या या प्रवासाला सलाम.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here