वृक्षदिंडीतून सामाजिक संदेश; “स्वामी विरंगुळा केंद्र”चा आगळा उपक्रम

मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : आषाढी एकादशी निमित्ताने स्वामी विरंगुळा ज्येष्ठ नागरिक केंद्र तर्फे एक आगळीवेगळी आणि प्रेरणादायी वृक्षदिंडी काढण्यात आली. ही वृक्षदिंडी श्री स्वामी समर्थ मठ, सेंट्रल रेल्वे, परळ येथून निघून परळ नाक्यावरील विठ्ठल मंदिरात दर्शन घेऊन समाधानपूर्वक संपन्न झाली. विठ्ठलनामाच्या गजरात, टाळ-मृदंगाच्या तालावर चालणाऱ्या या वृक्षदिंडीत वाऱ्याच्या झुळुकीसह हिरवाईचा गंध वातावरणात दरवळत होता.

या दिंडीत ६० ते ८७ वर्षे वयोगटातील सुमारे १६० ते १७५ ज्येष्ठ नागरिकांनी उत्साहाने सहभाग घेतला, हे विशेष उल्लेखनीय. आयुष्याच्या संध्याकाळीही पर्यावरण संवर्धनासाठी आणि भक्तिरसासाठी दाखवलेली त्यांची निष्ठा खरंच प्रेरणादायी ठरली.

दिंडीच्या समारोपानंतर २०० जणांना साबुदाणा खिचडीचे प्रसादरूपाने भोजन देण्यात आले, ज्यामुळे या आध्यात्मिक सोहळ्याला सामाजिकतेचीही सशक्त जोड मिळाली.

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनामध्ये स्वामी विरंगुळा ज्येष्ठ नागरिक केंद्राच्या पुढील पदाधिकाऱ्यांचे आणि सदस्यांचे मोलाचे योगदान लाभले: वैशाली शिंदे – उपाध्यक्ष, मोहन कटारे – कार्याध्यक्ष, गोविंद राणे – सचिव, उल्हास हरमळकर – खजिनदार, प्रतिभा सपकाळ – उपसचिव, प्रतिभा सावंत – विश्वस्त, विमल माळोदे – विश्वस्त

तसेच या वृक्षदिंडीमध्ये शिवाजी गावकर, गीता नाडकर्णी, कांतीलाल परमार, रश्मी नाईक, दिलीप मेस्त्री, जगदीश काळे, सुमंगल गुरव, नम्रता पडवळ, स्वाती मयेकर, विष्णू मणियार, सुनिता पारकर, ज्योती काळे, शैलजा काळे, कलबुर्गी ताई, श्री तेलकर, प्रदीप ढगे, आनंद धायफुले, नंदकिशोर आरोंदेकर, दशरथ खमितकर, उदय फणसेकर, भूपेंद्र राठोड, मारुती पेडणेकर आणि लक्ष्मण गोटल या सदस्यांचाही सक्रिय सहभाग होता.

पर्यावरण रक्षणाचा सशक्त संदेश देणारी ही वृक्षदिंडी स्वामी विरंगुळा केंद्राच्या सामाजिक व अध्यात्मिक बांधिलकीचे उत्कृष्ट उदाहरण ठरली आणि उत्स्फूर्त सहभागासह यशस्वीरीत्या पार पडली.

Loading

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here