शेतकऱ्यांच्या अनुदानातील घोटाळा : पत्रकार संदीप महाजन आमरण उपोषणाला सज्ज, आता शेतकऱ्यांकडून लेखी घेण्याचा प्रयत्न

0

Loading

पाचोरा: तालुक्यातील शेतकऱ्यांच्या अतिवृष्टी अनुदानात झालेल्या गंभीर घोटाळ्यामुळे शेतकऱ्यांचा हक्काचा पैसा हडप झाल्याचा प्रकार प्रकाशझोतात आल्यानंतर आता परिस्थिती नव्या वळणावर पोहोचली आहे. पत्रकार संदीप दामोदर महाजन यांनी या प्रकरणात आवाज उठवला आणि दिनांक 1 सप्टेंबर 2025 पासून प्रांताधिकारी कार्यालयासमोर अन्न-पाणी त्याग आमरण उपोषण सुरू करण्याचा निर्णय घेतला. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर, संबंधितांनी आता शेतकऱ्यांकडे जाऊन “आम्हाला अनुदानाची रक्कम मिळाली आहे” असे लेखी घेण्याची मोहीम सुरू केल्याची माहिती समोर आली आहे. सन 2023-24 मध्ये झालेल्या अतिवृष्टीत तालुक्यातील तब्बल 52,689 शेतकऱ्यांची शेती बाधित झाली होती. त्यासाठी शासनाकडून 70 कोटी 16 लाख 53 हजार 240 रुपयांचे अनुदान मंजूर झाले. मात्र या अनुदानाचे वितरण करताना 39 शेतकऱ्यांच्या सुमारे 14 लाख 50 हजार रुपयांची रक्कम परस्पर इतरांच्या खात्यात वळवण्यात आली. प्रशासनाने चौकशी करून संबंधित कर्मचाऱ्यांना नोटिसा बजावल्या. आतापर्यंत 4 लाख 63 हजार रुपयांची वसुली करण्यात आल्याचे देखील समजते उर्वरित रक्कम चार दिवसांत वसूल होईल, अशी माहिती प्राप्त झाली आहे मात्र, केवळ नोटिसा बजावणे किंवा वसुलीवर समाधान न मानता हे थेट गुन्हेगारी कृत्य असल्याने SIT अथवा आर्थिक गुन्हा शाखेकडून चौकशी व्हावी, अशी मागणी पत्रकार संदीप महाजन यांनी केली आहे.व आजही ती कायम आहे दोषींवर फौजदारी गुन्हे दाखल करून कठोर कारवाई न झाल्यास, ते 1 सप्टेंबरपासून अन्न-पाणी त्याग आमरण उपोषण करणार असल्याची घोषणा केली आहे.त्यावर ते ठाम आहेत
घोटाळा उघड झाल्यानंतर काही संबंधित ज्या शेतकऱ्यांचे अनुदान चुकीच्या खात्यात वर्ग झाले होते, त्या शेतकऱ्यांकडे जाऊन, “आम्हाला ती रक्कम मिळाली आहे” अशा आशयाचे लेखी घेण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. पत्रकार महाजन यांनी यावर तीव्र प्रतिक्रिया देत शेतकऱ्यांना आवाहन केले आहे की, “आज तुम्हाला दारापर्यंत येऊन पैसे देणारे ओळखा लक्षात ठेवा हेच लोक आहेत, ज्यांच्या दारापर्यंत तुम्ही मदतीसाठी फिरत होता.
म्हणून आता तुम्ही कोणाच्या पाठीशी राहायचे हे ठरवा. आज जर तुम्ही लेखी दिले, तर उद्या तुमच्यासाठी कोणीही आंदोलनाला उतरणार नाही.एवढे निश्चित राहिला प्रश्न तो अनुदान घोटाळ्याचा शेवटी सर्व व्यवहार ऑनलाईन झालेले असून त्यांचे पुरावे कायमस्वरूपी उपलब्ध आहेत. एक रुपयाचा अपहार असो की कोटींचा, तो अपहारच ठरतो व शिक्षा सारखीच होते.” महाजन यांनी पुढे सांगितले की, “जालना जिल्ह्यात देखील याच पद्धतीने प्रकरण दडपण्यासाठी तंत्र वापरण्यात आले होते.ते यशस्वी न झाल्याने शेवटी कोट्यावधी रुपयाची रॅकेट समोर आले आणि आरोपींची लाईनच लागली आता पाचोऱ्यातही अशाच या प्रकरणाची चौकशी झाली तर हे घबाड केवळ लाखोंमध्ये नाही, तर कोट्यवधींमध्ये असल्याचे बाहेर येणारच आहे.” पत्रकार महाजन यांचे उपोषण आता अपरिहार्य दिसत असून, शेतकरी वर्गामध्ये या घोटाळ्याबद्दल मोठा संताप आहे. प्रशासनाने या प्रकरणात जर पारदर्शक, निष्पक्ष आणि ठोस कारवाई केली नाही, तर केवळ पाचोरा नव्हे तर संपूर्ण जळगाव जिल्ह्यात प्रशासनावरील विश्वास डळमळीत होऊ शकतो. महाजन म्हणाले, “माझा लढा हा फक्त ऑनलाईन व्यवहारांच्या ठोस पुराव्यांवर आधारित आहे. दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषण अपरिहार्य आहे. शेतकऱ्यांचा पैसा खाल्लेला कुणीही सुटणार नाही. दोषींना वाचवण्यासाठी शेतकऱ्यांकडून लेखी घेण्याचा प्रकार हा भ्रष्टाचार झाकण्याचा नवा डाव आहे, मात्र सत्य बाहेर निघणारच आणि शेतकऱ्यांना न्याय मिळणारच असे संदीप महाजन यांनी सांगितले शेतकऱ्यांना विनंती कोणत्याही आमिषाला बळी न पडता लेखी देऊन तुम्ही देखील शेतकऱ्यांच्या अनुदानाच्या लूट मधील आरोपी होऊ नका

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here