Home Dhyeya News Special ऑप्रेशन सिंधुर: शत्रूच्या बंकरमध्ये भारताची सिंहगर्जना आणि नारीशक्तीच्या पराक्रमाची गगनभेदी साक्ष

ऑप्रेशन सिंधुर: शत्रूच्या बंकरमध्ये भारताची सिंहगर्जना आणि नारीशक्तीच्या पराक्रमाची गगनभेदी साक्ष

0
439

Loading

ऑप्रेशन सिंधुर — ही केवळ एक लष्करी मोहीम नव्हती, ती होती संपूर्ण भारताच्या आत्मसन्मानाची, राष्ट्राभिमानाची आणि युद्धकौशल्याची सिंहगर्जना. पाकिस्तानप्रेरित दहशतवाद्यांच्या भूमीत घुसून त्यांच्या बंकरांवर घाव घालणाऱ्या भारतीय सैन्याच्या या धाडसी कारवाईने जगभरात भारताच्या लष्करी सामर्थ्याची, राजकीय इच्छाशक्तीची आणि धोरणात्मक अचूकतेची एक अमिट छाप उमटवली आहे. या मोहिमेने भारताला केवळ सुरक्षित केलं नाही, तर जगालाही ठाम सांगितलं की भारत आता फक्त आपल्या सीमेवर रक्षण करत नाही, तर शत्रूच्या घरात घुसून त्याच्या स्वप्नांनाही चुरडून टाकतो. ही लढाई गोळ्यांची नव्हती, ती होती भारताच्या सर्जिकल डिटरन्स धोरणाची विजयकथा.ऑप्रेशन सिंधुरच्या यशस्वीतेनंतर भारतीय लष्कराच्या मुख्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत दोन नामांकित महिला अधिकारी समोर आल्या — कर्नल सोफिया कुरेशी आणि विंग कमांडर व्योमिका सिंह. या दोघी अधिकारी केवळ आपली शौर्यगाथा मांडत नव्हत्या, तर त्यांचा आत्मविश्वास, सामर्थ्य आणि निर्णायक भाषा ही समोर बसलेल्या शेकडो पत्रकारांपेक्षा अधिक भारदस्त होती. त्यांचे उच्चार हे केवळ माहिती नव्हते, ते होते भारताच्या आत्मसन्मानाचे प्रतिध्वनी! कर्नल सोफिया कुरेशी — या भारतीय लष्कराच्या सिग्नल कोअरमधील वरिष्ठ अधिकारी असून त्यांनी १९९९ मध्ये ऑफिसर्स ट्रेनिंग अकॅडमी, चेन्नई येथून लष्करात प्रवेश केला. बायो-केमिस्ट्रीमध्ये पदवी घेतलेल्या आणि युद्धनीतीच्या सखोल अभ्यासात पारंगत झालेल्या कर्नल कुरेशी या २०१६ मध्ये “एक्सरसाइज फोर्स १८” या ऐतिहासिक बहुराष्ट्रीय युद्धसरावात भारतीय लष्कराचे नेतृत्व करणाऱ्या पहिल्या महिला अधिकारी ठरल्या. काँगोमधील संयुक्त राष्ट्र शांतता मोहिमेमध्ये त्यांनी केलेली सेवा ही लष्करातील महिला नेतृत्वाचे प्रतीक बनली आहे. त्यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की ऑपरेशन सिंधुर दरम्यान पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील एकूण नऊ दहशतवादी केंद्रं भारतीय लष्कराच्या नियोजनबद्ध आणि अचूक हल्ल्यांतून उद्ध्वस्त करण्यात आली. विशेष गोष्ट म्हणजे या कारवाईदरम्यान निष्पाप नागरिकांना हानी होणार नाही याची पूर्ण दक्षता घेण्यात आली. त्यांच्यासोबत व्योमिका सिंह या भारतीय वायुसेनेतील विंग कमांडर होत्या. त्या हेलिकॉप्टर पायलट असून २०१९ पासून फ्लाइंग ब्रांचमध्ये स्थायिक आहेत. अभियांत्रिकी शिक्षणानंतर वायुसेनेत दाखल झालेल्या व्योमिका यांनी जम्मू-काश्मीर आणि ईशान्य भारतातील अतिदुर्गम भागांमध्ये चेतक व चीता हेलिकॉप्टरच्या माध्यमातून अनेक अवघड मोहीमा यशस्वी केल्या आहेत. २०२१ मध्ये त्यांनी २१,६५० फूट उंचीवर माउंट मणिरंग येथे महिला गिर्यारोहण मोहिमेत सहभाग घेतला होता. त्यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट शब्दांत सांगितले की, “भारतीय सशस्त्र दल संयमाने काम करतं, पण जर पाकिस्तानने पुढचे पाऊल उचलले, तर आम्ही पुन्हा त्यांचं अस्तित्वही नष्ट करू.” या दोघी अधिकाऱ्यांनी ऑपरेशन सिंधुरचा सारांश मांडताना अशा आत्मविश्वासाने, दणकट भाषेत आणि देशप्रेमाच्या ओलाव्याने परिपूर्णतेने मांडला की उपस्थित प्रत्येक जण स्तब्ध झाला. शत्रूवर फक्त गोळ्या झाडण्यापेक्षा, त्याच्या मेंदूत भीतीचे बीज पेरणे किती आवश्यक असते हे या ऑपरेशनने दाखवून दिलं. केवळ सामरिक यश नव्हे तर मानसिक विजय मिळवणं हे नव्या भारताचं वैशिष्ट्य आहे.ऑप्रेशन सिंधुरमधील तांत्रिक अचूकता, गुप्तचर यंत्रणांचा पराक्रम आणि एकात्मिक सैन्य नेतृत्व ही या यशाची प्रमुख कारणं आहेत. नौदलाच्या विशेष कमांडो युनिट्सने अचूक सागरी मार्गाने घुसखोरी करत दहशतवादी तळांवर अशी कारवाई केली की पाकिस्तानच्या गुप्तचर यंत्रणांनीही हादरून जावं. या ऑपरेशनमध्ये शत्रूच्या सायबर नेटवर्क्सवर तसेच त्याच्या संचार केंद्रांवर अचूक लक्ष्य करून संपूर्ण प्रणाली laminalize करण्यात आली. त्यांचं संप्रेषण तुटलं, त्यांच्या हालचालींवर नियंत्रण सुटलं आणि त्यांच्या संपूर्ण दहशतवादी यंत्रणेची मुळेच नष्ट झाली. या कारवाईवर देशातील काही तथाकथित पुरोगामी बुद्धिवाद्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले. तेच नेहमीचे — जे जवानांचा मृत्यू झाला की मौन बाळगतात, पण जेव्हा शत्रूवर प्रतिघात होतो तेव्हा “मानवाधिकार”, “संविधान”, “संघीयता” असे ढोंगी शब्द उगारतात. यांचं असं म्हणणं आहे की युद्ध थांबावं, पण युद्धासाठी खतपाणी घालणाऱ्या शत्रूवर कोणीही आवाज उठवू नये! यांचं नेहमीचं धोरण म्हणजे — शत्रूचा बचाव कर, भारताचं नाव बदनाम कर, आणि तेच पत्रकारितेचं किंवा बुद्धिवादाचं गोंडस चिलखत घालून स्वतःचं पाप लपव. हे लोक फ्रीडम ऑफ एक्सप्रेशनच्या नावाखाली देशविघातक अजेंडा चालवतात. पण ऑपरेशन सिंधुरने अशा सगळ्या विचारसरणींना तोंडघशी पाडलं आहे.आज भारतीय जनता राष्ट्रभक्तीच्या मार्गावर एकवटली आहे. सोशल मीडियावरून, गावातल्या चौकात, महाविद्यालयाच्या कट्ट्यांवर, शाळेच्या प्रार्थनात आणि सैनिकांच्या बूटांखालून एकच गर्जना ऐकू येते — भारत आता थांबणार नाही! ऑपरेशन सिंधुर ही घोषणा आहे — की जर कोणी भारताच्या शौर्याला आव्हान दिलं, तर त्याचे अस्तित्वच इतिहासात मिटवले जाईल. आता भारत केवळ सैन्यानेच नाही, तर मानसिक, आर्थिक आणि धोरणात्मक पातळीवरही विजय मिळवत आहे. या ऑपरेशनचे एक वेगळे आणि शक्तिशाली वैशिष्ट्य म्हणजे यात नेतृत्वाची सूत्रं दोन महत्त्वाच्या महिला अधिकाऱ्यांकडे होती. भारताच्या संरक्षण व्यवस्थेत स्त्रीशक्ती हे आता फक्त औपचारिकतेपुरते प्रतिनिधित्व न राहता निर्णायक नेतृत्वाची नवी दिशा बनली आहे. कर्नल सोफिया कुरेशी आणि विंग कमांडर व्योमिका सिंह या दोन अधिकारी म्हणजे देशातील प्रत्येक तरुणीला सांगणारा आदर्श आहेत — “सीमा ही मर्यादा नाही, ती संधी आहे!” ऑप्रेशन सिंधुर केवळ सैनिकी विजय नाही, तो आहे राष्ट्रीय उर्जेचा स्फोट! हा स्फोट एका नवीन भारताच्या जन्माची घोषणा आहे. हा भारत आता मागे हटणारा नाही. हा भारत आता गुलामीच्या आठवणींमध्ये अडकलेला नाही. हा भारत आता शांततेच्या ढोंगाला बळी पडणारा नाही. हा भारत आता रणभूमीवर लढतो, आणि रणांगणाबाहेरही विचारांच्या युद्धात विजयी होतो. शेवटी, ज्यांनी भारतमातेच्या चरणावर रक्त वाहिलं त्यांना वंदन. ज्यांनी शत्रूंना उखडून फेकलं त्यांना सलाम. आणि ज्यांनी देशाच्या पराक्रमाला विरोध केला त्यांना नम्रतेने पण ठामपणे एकच उत्तर — “तुमचं युग संपलं आहे, भारताचा काळ सुरू झाला आहे!”                                        “यावर मला कवितेच्या खालील काही ओळी सुचल्या आहेत”

“जेव्हा माझ्या सिंदूरावर आच येते…”

मी सीता आहे…
त्यागाचं प्रतीक, मर्यादेची मूर्ती,
प्रत्येक अग्निपरीक्षेत जळले,
पण कुणालाही दोष न देता, मौन पाळले .कुलमर्यादा जपली.                                          मी सरस्वती आहे…
शब्दसाधनेची तेजस्विनी, ज्ञानाची धार,
माझ्या वीणेच्या प्रत्येक सुरातून,
जगाला विवेकाचा मार्ग दाखवला.              पण समजू नका — हे मौन माझं दुर्बलपण नाही!
ही शांतता माझा पराभव नाही — ती माझी सजगता आहे!
जेव्हा माझ्या सिंदूरावर कुणी आच आणेल,
तेव्हा मी दुर्गा बनेन — जळणाऱ्या ज्वाळेची उग्रमूर्ती!                                                  मी त्या प्रलयाची साद बनेन,
जी अन्यायाच्या गाभ्यालाच हादरवेल,
मी त्या हाताची ताकद बनेन,
जो अत्याचाराच्या गळ्याला गच्च पकडेल!  कारण माझा सिंदूर — केवळ सौंदर्य नाही,
तो माझा आत्मसन्मान आहे, माझं अस्तित्व आहे,
तो माझ्या पतीचा जीवनसूत्र नाही फक्त,
तो माझ्या ओळखीचा तेज आहे, माझ्या श्रद्धेचीज्योतआहे!                                         मी कधी शांत, कधी तेजस्विनी,
मी कधी करूणा, कधी क्रांतीची आग,
मी स्त्री आहे — या सृष्टीच्या प्रत्येक निर्मितीची शिला,
आणि जेव्हा माझ्या अस्मितेला ललकार दिला जाईल,
तेव्हा इतिहास पुन्हा लिहिला जाईल —
मी पुन्हा दुर्गा बनून रणभूमीत उतरेन,
सिंदूराच्या प्रत्येक थेंबातून अग्नी वर्षाव करीन!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!