Home Dhyeya News Special सेवा परमो धर्म : जनतेच्या संकटात सुमीतने दिला चार पावले पुढे जाण्याचा...

सेवा परमो धर्म : जनतेच्या संकटात सुमीतने दिला चार पावले पुढे जाण्याचा संदेश

0
134

Loading

पाचोरा – तालुक्यातील काही भागात अचानक निर्माण झालेल्या ढगफुटी सदृश्य परिस्थितीमुळे अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले. काहींना त्यांच्या कष्टाने उभ्या केलेल्या झोपड्याही टिकल्या नाहीत. एका क्षणात सर्वस्व वाहून गेले, काहींचे घर कोसळले, काहींच्या डोळ्यातले स्वप्न ढासळले. अशा वेदनादायी प्रसंगी शासनाने आपल्या जबाबदारीचे भान ठेवून तातडीने

पंचनामे केले, दिलासा देण्याचा प्रयत्न केला. परंतु, लोकांची खरी ओळख त्यांना संकटाच्या क्षणी येणाऱ्या मदतीतून होते. इथेच खऱ्या सेवेचे आणि त्यागाचे दर्शन घडते. याच वेळी, पाचोरा तालुक्याचे आमदार किशोरआप्पा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आणि त्यांच्या आशीर्वादातून त्यांच्या सुपुत्राने, सुमित किशोरआप्पा पाटील यांनी संकटग्रस्त कुटुंबांच्या अश्रूंना हात पुसण्यासाठी पुढाकार घेतला. शासनाने केलेल्या पंचनाम्यांवर न थांबता, स्वतःच्या पुढाकारातून त्यांनी थेट प्रत्येक गरजूंच्या घरापर्यंत जाऊन मदतीचा हात पुढे केला. केवळ एका दिवसाचा आधार नव्हे, तर पुढील दोन महिने त्यांच्या कुटुंबाचा चुल पेटेल, मुले उपाशी राहणार नाहीत याची खात्री देणारा किराणा व आवश्यक सामान वाटप करून त्यांनी आपली समाजसेवेची बांधिलकी सिद्ध केली. लोकांच्या दुःखात सहभागी होणे ही केवळ राजकारणाची जबाबदारी नव्हे, तर ती एक मानवी कर्तव्य भावना आहे. किशोरआप्पा पाटील यांनी लोकसेवा करताना उभी केलेली मोलाची परंपरा लोकांनी अनुभवलेली आहेच; पण त्याहूनही अधिक स्पर्श करणारी गोष्ट म्हणजे त्यांचा मुलगा सुमित यांनी या परंपरेत केवळ पाऊल टाकले नाही, तर ती चार पावले पुढे नेण्याचा प्रयत्न केला. “वडिलांपेक्षा मुलगा चार पावले पुढे” हा संदेश त्यांनी आपल्या कृतीतून जिवंत केला. ही मदत म्हणजे फक्त धान्याच्या पोत्यातली मोजकी धान्यकण नाहीत, तर यात समर्पण आहे, माणुसकी आहे, आणि “सेवा परमो धर्म” या जीवनमूल्याचा जिवंत प्रत्यय आहे. आपल्या हातून मिळालेल्या या छोट्याशा पण हृदयाला स्पर्श करणाऱ्या मदतीमुळे अनेक कुटुंबांना पुन्हा उभे राहण्याचे बळ मिळाले. संकटाच्या काळात एखाद्याच्या दारात उभा राहून त्यांच्या डोळ्यांत पाझरलेला विश्वास पाहणे, हेच खरे यश असते. सुमित किशोरआप्पा पाटील यांची ही कृती दाखवून देते की, समाजसेवा ही वारशाने मिळणारी मालमत्ता नसते, ती अंतःकरणातून येणारी प्रेरणा असते. वडिलांनी पेरलेल्या सेवाभावाच्या बीजाला आता मुलाने खतपाणी घालत चार पावले पुढे नेण्याचे काम सुरू केले आहे. हा वारसा पुढील काळातही जनतेसाठी एक विश्वासाचा दीपस्तंभ ठरेल, याची खात्री जनतेच्या मनात निर्माण झाली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!