महिला सक्षमीकरणासाठी ‘अनुभूती’ विशेष कार्यक्रमाचे आयोजन

0

भाईंदर (गुरुदत्त वाकदेकर) : महिला सक्षमीकरणाच्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल उचलत स्वयंसिद्धा फाउंडेशन आणि सहकार भारती, मिरा भाईंदर जिल्हा यांच्या संयुक्त विद्यमाने ‘अनुभूती – महिला सक्षमीकरण काळाची गरज’ हा विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने होणारा हा कार्यक्रम २३ मार्च २०२५ रोजी सायं. ३.०० ते ६.०० या वेळेत भाईंदर सेकंडरी स्कूल, उत्तन रोड, भाईंदर पश्चिम येथे संपन्न होणार आहे.

कार्यक्रमात महिला सक्षमीकरण काळाची गरज (उद्योजकत्वास पोषक शासकीय योजना), डिजिटल मार्केटिंग, दक्षता – ऑनलाइन फसवणुकीपासून बचाव ह्या विषयांवर मार्गदर्शन केले जाणार आहे. तसेच नाविन्यपूर्ण व भरीव कामगिरीसाठी महिला संस्था व व्यक्तींचा सत्कार करण्यात येणार आहे. त्याचबरोबर व्यावसायिक मंच (उत्पादन व विपणन) घोषणा देखील केली जाणार आहे.

सदर कार्यक्रमाचे उद्घाटन वैशाली आवाडे (महिला प्रमुख – महाराष्ट्र प्रदेश) यांच्या हस्ते होणार आहे. त्यावेळी प्रमुख अतिथी म्हणून शरदजी जाधव (संगठन प्रमुख – महाराष्ट्र प्रदेश) तसेच विशेष निमंत्रित म्हणून भूषणजी पैठणकर, सचिव, महाराष्ट्र प्रदेश, विजयजी जोशी, सचिव, स्वयंसिद्धा फाउंडेशन, डॉ. तेजस्वी शिंदे, पोलीस निरीक्षक, शरदजी गांगल, बँक प्रकोष्ठ प्रमुख – महाराष्ट्र प्रदेश, अध्यक्ष टीजेएसबी बँक, डॉ. आदित्य मानके, संचालक, संजीवनी कॅन्सर हॉस्पिटल, मधुसूदनजी पाटील, उपाध्यक्ष, महाराष्ट्र प्रदेश, आशा बिटाने, उद्योजिका, मंगेश पवार, महामंत्री, मुंबई प्रदेश, प्रवीण बुल्लाख, सह संगठन प्रमुख, राजू ठाणगे, कोकण विभाग प्रमुख, वीणा मोकाशी, कोकण विभाग सह प्रमुख, जया अलीमचांदानी, महिला सहकारी संस्था, महाराष्ट्र प्रदेश, अश्विनी बुल्लाख, हाउसिंग प्रकोष्ठ प्रमुख, महाराष्ट्र प्रदेश, भारती पवार, महिला सहकारी संस्था प्रमुख – महाराष्ट्र प्रदेश हेदेखील उपस्थित राहणार आहेत.

या भव्य उपक्रमात ५०० हून अधिक महिला उद्योजिकांचा सहभाग अपेक्षित असून, व्यावसायिक संधींबाबत सखोल मार्गदर्शन मिळणार आहे. महिलांना उद्योजकता आणि आत्मनिर्भरतेसाठी प्रेरित करण्यासाठी हा उपक्रम एक महत्त्वपूर्ण मंच ठरेल. महिला उद्योजकांनी आणि इच्छुकांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आयोजकांनी आवाहन केले आहे.

सदर कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी स्वयंसिद्धाचै विश्वस्त मानसी जोशी, राजेश पाटील, संचाक मेघना गावडे, आराधी ठाकूर, दत्ताराम वाळवणकर, कल्पना उबाळे तसेच निलेश गोसावी, जिल्हा अध्यक्ष, जयेव वाडकर, जिल्हा महामंत्री, किशोर थिटे, जिल्हा संगठन प्रमुख, चारूशिला शेळके, जिल्हा महिला सह प्रमुख, मीरा खोस, जिल्हा बचत प्रमुख, मयुरी घाडगे, जिल्हा बचत सह प्रमुख, सुजाता सकपाळ, जिल्हा हाऊसिंग प्रमुख हे अथक परिश्रम घेत आहेत.

Loading

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here