पाचोरा येथील उपोषणाचा खरा चेहरा किशोरआप्पांनी सखोल चौकशीला संधी द्यावी

0

पाचोरा — मुंबईतील उपोषणाच्या निमित्ताने पाचोरा मतदारसंघ पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आला आहे. सामाजिक कार्यकर्ते हरीभाऊ पाटील यांनी उपोषणात दोन प्रमुख मागण्या मांडत उपोषणास सुरुवात केली
१) पाचोरा शहरातील अवैध धंदे बंद करावेत आणि पोलीस निरीक्षक अशोक पवार यांची बदली करावी
२) पाचोऱ्यात पत्रकारांवर दाखल गुन्हे रद्द करण्यात यावेत
या दोन्ही मागण्या पाहता, त्या सामाजिक भानातून आणि लोकहिताच्या दृष्टिकोनातून घेतलेल्या वाटतात. पण, जेव्हा आपण थोडं खोलात जातो, तेव्हा यामागचा खरा आशय आणि हेतू अधिक गहिरा व गुंतागुंतीचा वाटू लागतो. उपोषण हे लोकशाहीतील प्रभावी अस्त्र असले तरी त्यामागची पार्श्वभूमी आणि प्रेरणा योग्य आहे का, याचाही तितकाच गांभीर्याने विचार झाला पाहिजे.
अवैध धंद्यांवर कारवाई की ‘व्यवस्था’ टिकवण्याचा प्रयत्न? “पाचोरा शहरातील अवैध धंदे बंद करावेत” – ही एक रास्त आणि लोकहिताची मागणी आहे. मात्र, या मागणीला तात्पुरती संमती देताना जेव्हा अशा अवैध धंद्यांची माहिती तपासली जाते, तेव्हा दिसते की अवैध धंदे सुरू आहेत म्हणुन संबंधित पोलीस निरीक्षक यांची बदली करणे हा प्रकार कितपत योग्य आहे आणि महाराष्ट्रच नव्हे तर देशभरात पाचोरा शहरा पेक्षाही भयंकर अवैध धंदे यांनी थैमान घातले आहे हे कोणाच्या आर्शिवादाने हे नव्याने सांगण्याची गरज नाही परंतु पाचोरा शहरात जे जुगार, चक्री व्यवहार यांचे जाळे शहरात पसरलेले आहे. त्याची सत्यता देखील महत्वाची आहे
विशेष म्हणजे शहरातील कोण ते तथाकथीत पत्रकार होते की त्याच्या घरी झालेल्या काही आठवड्यांपूर्वी एका बैठकीत चक्री जुगारासाठी दरमहा “७० चक्री × १००० रुपये = ७०,००० रुपये” या स्वरूपात ठराविक रक्कम देऊन चक्री धंदे सुरू ठेवण्याचा ठराव करण्यात आला होता. आधी “चक्री बंद करा” अशी मागणी त्यांनीच केली आणि नंतर त्यांनीच “चक्री सुरू करा” असा विरोधाभासी पाठपुरावा करणे हे नक्कीच संशय निर्माण करणारे आहे
ही मागणी मग खरोखर अवैध धंद्यांवर रोष आहे की त्यावरचे नियंत्रण एखाद्या गटाच्या हातात ठेवण्याचा प्रयत्न आहे, हा सवाल उपस्थित होतो.
हरीभाऊंच्या उपोषणात समाविष्ट असलेल्या काही व्यक्तींवर पत्रकार असल्याचा दावा करण्यात येतो. पण त्यांच्या नावे कोणतीही अधिकृत ओळखपत्रे अथवा मान्यताप्राप्त पत्रकार संस्थांची सदस्यता नसल्याचे दिसून येते. उलटपक्षी,सोशल मीडियावरून अनेक वेळा सामान्य नागरिक, व्यापारी, महिला यांना धमकावणाऱ्या ब्लॅकमेलरच्या पोस्ट केल्या गेल्याचे स्पष्ट पुरावे उपलब्ध आहेत. “ब्रेकिंग न्यूज”च्या नावाखाली खंडणी वसूल करण्याचे प्रकारही समोर आले आहेत. त्याहून गंभीर म्हणजे, आपलेच सत्ताधारी असलेले पाचोरा नगर परिषदेच्या सन्मानीय उपनगराध्यक्षां विरोधात “फेक ब्रेकिंग” प्रसिद्ध केल्याचे धाडसही याच व्यक्तींकडून झाल्याची घटना विसरून चालणार नाही
या प्रकरणातील सर्वात महत्त्वाचा आणि वादग्रस्त मुद्दा म्हणजे पोलीस निरीक्षक अशोक पवार यांची बदली. उपोषणकर्त्यांनी त्यांच्यावर आरोप करत बदलीची मागणी केली आहे. पण या मागील काही आठवड्यांतील घटनाक्रम पाहता, या मागणीमागे वैयक्तिक आकस आणि प्रस्थ असलेल्या गटांच्या फायद्याचा संबंध असल्याचे संकेत मिळतात. १४ जून रोजी सोशल मीडियावर पोलीस निरीक्षक अशोक पवार यांच्या विरोधात अत्यंत खालच्या पातळीचे, वैयक्तिक आणि निंदनीय लिखाण करण्यात आले. हे विसरून व बघितल्या शिवाय चालणार नाही पोलीस निरीक्षकांवर अविश्वास दाखवण्यामागे काय कारण आहे हे समजून न घेता केवळ एका बाजूच्या आवाजावर बदलीची कारवाई करण्याची घाई धोकादायक ठरू शकते. अशोक पवार यांच्याविरोधात कोणतीही ठोस चौकशी न करता फक्त “प्रचाराच्या आवाजावर” निर्णय घेतला गेला तर भविष्यात चांगले काम करणाऱ्या अधिकाऱ्यांनाही अशा पोटभरू ब्रेकींग वाल्यांच्या दबावाखाली पाचोर्‍यात झुकावं लागेल, ही शंका उभी राहते.
वास्तवीक माझ्या सहभागाबाबतही संभ्रम निर्माण केला जात आहे. 15 जुन रोजी दाखल झालेल्या गुन्ह्यात मी १९ जूनपर्यंत फक्त बघ्याची भूमिका घेतली होती. बातमी सुद्धा लावली नव्हती परंतु त्याच दिवशी एका विवाह सोहळ्यात माझ्या अनुपस्थितीत माझ्याबाबत आमदार किशोरआप्पा समर्थकां समोर अपशब्द वापरण्यात आल्याचे कळल्यानंतर मी प्रत्यक्षात या विषयात सक्रीय झालो.
२० जूनपासून मी या प्रकरणात उघडपणे भूमिका घेतली कारण माझ्या नावाचा चुकीचा संदर्भ देऊन या गटाने आमदारांविरोधात उभे राहण्याचा प्रयत्न केला. खरंतर माझा पोलीस निरीक्षक अशोक पवार यांच्याशी कोणताही वैयक्तिक संबंध नाही, ना माझे कुठलेही अवैध धंदे आहेत. पण सत्य दडपले जाऊ नये म्हणून मी हे मांडणे आवश्यक समजले.
या प्रकरणात फक्त बाहेरचे गट नाहीत, तर पोलीस यंत्रणेमध्ये असलेली गटबाजीही तितकीच जबाबदार आहे. राहुल शिंपी नावाच्या कर्मचाऱ्यावर पोलिस निरीक्षकांचा अंधविश्वास व त्यातून निर्माण होणारे आंतरिक मतभेद प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर गंभीर परिणाम करत आहेत. त्यामुळे निश्चितच पाचोरा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक यांची बदली होणे ही काळाची गरज आहे परंतु अशा स्वरूपातील आरोपात व अशा वेळी बदली होणे अयोग्य आहे आणि कोणत्याही प्रशासकीय अधिकारी याचे मनोबल खचणारी आहे ही बाब लक्षात न घेता केवळ एका गटाच्या म्हणण्यानुसार पोलीस निरीक्षक यांना बदलणे म्हणजे कारभाराला राजकीय साखळीने गुंडाळणे होय. यापूर्वी वाळू माफियांविरोधात ‘ब्रेकिंग न्यूज’च्या नावाने आवाज उठवणाऱ्या ब्रेकींग किंगला हप्ते मागणीच्या वादातुन पुनगाव रोड साई प्रोव्हिजन समोर जाहीर धुलाई झाली होती तेव्हा आठ दिवस घरातच अंबीहळद लावत उपचार केले तेव्हा कोणत्याही प्रकारचा गुन्हा दाखल का? करण्यात आला नाही किंवा केला नाही तथाकथीत पत्रकार संघटनेने व त्याच्या हितचिंतकांनी त्यावेळी का आवाज उठविला नाही एवढे मात्र निश्चित त्यानंतर कोणत्याही वाळू विषयक बातम्यांचे ब्रेकिंग आले नाही हे निश्चित हाच त्यांच्या शैलीचा ‘पॅटर्न’ म्हणता येईल.
सन्माननीय आमदार आप्पासाहेब, आपण मतदारसंघाचे लोकप्रतिनिधी आहात. त्यामुळे न्याय्य मागण्या ऐकून घेणे व कोणत्याही निर्णयाआधी सत्याची पारख करणे ही आमदार साहेबांना हात जोडून विनंती आहे तसेच त्या मागण्यांमागे कोणाचे – कोणते हितसंबंध आहेत पडद्यामागे काय दडले आहे, हेही समजून घेणे तितकेच गरजेचे आहे.
माझी नम्र मागणी आहे की माझा या प्रकरणाशी नेमका काय संबंध आहे, हे समोरा-समोर मला स्पष्टपणे मांडू द्या पोलीस निरीक्षक अशोक पवार यांच्याविरोधातील पोस्ट्सची आणि माझ्याविरोधात वापरलेली भाषा तपासणी करणे हे देखील महत्वाचे आहे खरोखर कोण समाजहितासाठी काम करत आहे आणि कोण स्वतःच्या स्वार्थासाठी हे शस्त्र वापरत आहे, हे समोर यावे यासाठी मी आपले गैसमज करणाऱ्यां समोरा – समोर येण्यास तयार आहे कारण, अन्याय करणाऱ्यांपेक्षा अन्याय सहन करणारा अधिक दोषी असतो –
आणि त्या दोषातून सुटका फक्त सत्याच्या बाजूने उभं राहिल्यानेच होऊ शकते!

Loading

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here