“छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान पाचोरा शिबिरात नागरिकांना मिळालेल्या सेवांचा भरघोस लाभ”

0

पाचोरा – शासनाच्या “छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान” अंतर्गत दिनांक 23 जून 2025 रोजी पाचोरा तालुक्यातील पाचोरा येथे आयोजित विशेष शिबिरास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. विविध विभागांच्या सहभागातून या शिबिरात तब्बल 620 लाभांचे वितरण करण्यात आले. शासनाच्या विविध योजनांचा लाभ प्रत्यक्षात नागरिकांपर्यंत पोहोचवण्याचा उद्देश या उपक्रमामागे असून, शिबिर यशस्वी करण्यासाठी प्रशासनाने संपूर्ण ताकदीने कार्य केले.
या विशेष शिबिरात पाचोरा विधानसभा मतदारसंघाचे आमदार किशोरआप्पा पाटील यांनी उपस्थित राहून नागरिकांशी संवाद साधला. त्यांनी उपस्थित कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की, “महाराजस्व अभियानाचा मुख्य हेतू म्हणजे शासनाच्या विविध योजनांचा थेट लाभ ग्रामीण जनतेपर्यंत पोहोचवणे आणि प्रशासन व नागरिक यांच्यातील अंतर कमी करणे. पाचोरा तालुक्यातील सर्वसामान्य नागरिकांनी याचा मोठ्या प्रमाणावर लाभ घ्यावा, हा या उपक्रमाचा खरा उद्देश आहे.” या शिबिरास उपविभागीय अधिकारी भूषण अहिरे, माजी जिल्हा परिषद सदस्य मधुभाऊ काटे, पाचोरा नगरपालिकेचे मा. नगराध्यक्ष संजय गोहिल, उपनगराध्यक्ष शरद पाटे, तहसीलदार पाचोरा, गटविकास अधिकारी पाचोरा, भडगाव RTO, आरोग्य विभाग, परिवहन विभागाचे अधिकारी, तसेच परधाडे, दुसखेडे, भातखंडे मंडळ भागातील सरपंच आणि अनेक मान्यवर यांची उपस्थिती होती. या शिबिरात विविध शासकीय विभागांनी आपापल्या सेवांचा लाभ देत नागरिकांचे प्रश्न व अर्ज तत्काळ निकाली काढले. एकूण 600 ते 650 नागरिकांनी या शिबिराला भेट दिली. नागरिकांनी अत्यंत सकारात्मक प्रतिसाद देत प्रत्येक विभागाच्या स्टॉलवर जाऊन आपले प्रश्न उपस्थित केले व योजनांचा लाभ घेतला. यात                              संजय गांधी योजना लाभार्थी :
शिबिरात 65 लाभार्थ्यांना संजय गांधी निराधार योजना अंतर्गत लाभ वितरित करण्यात आला. या योजनेतून वयोवृद्ध, विधवा व अनाथ नागरिकांना मासिक आर्थिक सहाय्य दिले जाते.               आरोग्य तपासणी :
शासकीय आरोग्य विभागाच्या संयुक्त पुढाकारातून 57 नागरिकांनी आरोग्य तपासणी करून घेतली. रक्तदाब, मधुमेह, हिमोग्लोबिन, दृष्टी तपासणी आदी तपासण्या करण्यात आल्या.            आयुष्मान भारत कार्ड वाटप : 22 नागरिकांना आयुष्मान भारत योजनेचे कार्ड वितरित करण्यात आले. यामुळे लाभार्थ्यांना 5 लाख रुपयांपर्यंत मोफत वैद्यकीय उपचार मिळू शकणार आहेत.                          कृषी विभाग माहिती :
तालुका कृषी अधिकारी कार्यालयामार्फत 34 शेतकऱ्यांना शेतसंबंधित योजनांची माहिती देण्यात आली. खत अनुदान, पीकविमा, जलसंधारण व सेंद्रिय शेती यासंदर्भात मार्गदर्शन झाले.              पुरवठा शाखा :
नवीन शिधापत्रिकांसाठी 123 अर्ज प्राप्त झाले. त्यापैकी 35 अर्जांवर तत्काळ कार्यवाही करून लाभ मंजूर करण्यात आला. CSC केंद्र सेवा :
आधार कार्डसाठी 22 अर्ज प्राप्त झाले. तांत्रिक कारणास्तव वाटप तत्काळ झाले नाही, परंतु माहिती देण्यात आली व 35 नागरिकांना इतर डिजिटलक सेवा समजावून सांगण्यात आल्या.
पंचायत समिती विभाग :
विविध योजनांची माहिती 56 नागरिकांना देण्यात आली. यात महिला व बालकल्याण योजना, श्रमयोगी योजना, शिक्षणविषयक योजना यांचा समावेश होता.               ICDS योजना :
या विभागाद्वारे 4 लाभार्थी महिलांना “बेबी कीट” चे वाटप करण्यात आले. हे किट नवजात बालकांच्या निगा राखणीसाठी उपयोगी ठरते.
जिवंत सातबारा योजनेअंतर्गत :
45 लाभार्थ्यांना 7/12 उतारे मिळाले. 35 जणांना उत्पन्न दाखले वाटप करण्यात आले. 12 जणांना नॉन क्रिमीलेयर दाखले मिळाले. मात्र, रहिवासी दाखल्याच्या बाबतीत शून्य नोंद झाली.                                        बॅंक ऑफ बडोदा :
बँकेमार्फत 55 नागरिकांना बँकिंग सेवा, बचत खाती, PMJJBY, PMSBY, किसान क्रेडिट कार्ड इत्यादींबाबत सविस्तर माहिती देण्यात आली.                     MSEB अर्ज :
वीजबिल सवलत, नवीन कनेक्शन आदी बाबतीत 12 अर्ज प्राप्त झाले.
पशुवैद्यकीय विभाग :
सदर विभागाकडून यावेळी कोणतीही सेवा वितरीत झाली नाही, मात्र भविष्यात त्याचा लाभ घेण्यासाठी नागरिकांनी नोंदणी केली.
या संपूर्ण शिबिरात विविध विभागांकडून एकूण 620 लाभ देण्यात आले. हे शिबिर हे “सर्वांच्या सेवेसाठी शासन” या तत्त्वावर आधारित असल्याने, नागरिकांनी आपल्या गरजांनुसार योजनांचा लाभ घेतला.
या शिबिरात सहभागी झालेल्या नागरिकांनी शासकीय यंत्रणेच्या कार्यपद्धतीबद्दल समाधान व्यक्त केले. काही नागरिकांनी शिबिर वारंवार आयोजित व्हावे अशी मागणीही केली. महिला लाभार्थ्यांनी ICDS व आरोग्य विभागाच्या सेवांचा विशेष उल्लेख केला. शिबिराच्या समारोपप्रसंगी आमदार किशोरआप्पा पाटील यांनी प्रत्येक विभागाच्या कार्याची प्रशंसा केली. त्यांनी सांगितले, “या अभियानातून प्रशासनाचे खरे उद्दिष्ट सफल होत आहे. नागरिकांना स्वतःच्या हक्कांच्या योजनांची माहिती मिळत असून त्यांचा थेट लाभही मिळतो आहे. हीच खरी लोकशाहीची ताकद आहे.” उपविभागीय अधिकारी भूषण अहिरे यांनी प्रशासनाला संदेश देतांना सांगीतले
“योजना केवळ कागदावर न राहता प्रत्यक्ष जनतेपर्यंत पोहोचणे हीच आपली जबाबदारी आहे. प्रत्येक अधिकाऱ्याने यात सक्रिय सहभाग घ्यावा.” असे त्यांनी सांगितले.
संपूर्ण शिबिर नियोजनबद्ध, कार्यक्षम आणि लोकाभिमुख ठरले. विविध विभागांतील अधिकाऱ्यांनी एकत्रितपणे काम करत नागरिकांना वेळेत सेवा पुरविल्या. भविष्यात या अभियानाचे अधिक व्यापक स्वरूपात आयोजन होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान शिबिर हे पाचोरा तालुक्यात यशस्वी झाले असून त्यातून नागरिकांना त्वरित सेवा आणि योजनांचा लाभ मिळाला. शासनाच्या ‘डोअर टू डोअर’ सेवा पोहचवण्याच्या दृष्टीने हा उपक्रम आदर्शवत ठरला आहे. यामुळे ग्रामीण भागातील लोकांचा शासनावरचा विश्वास अधिक दृढ झाला आहे. भविष्यातही असे उपक्रम सातत्याने आयोजित व्हावेत, अशी नागरिकांची अपेक्षा आहे.

Loading

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here