शेतकरी जीवनाचे प्रेरणास्थान… आदरणीय नानासाहेब प्रल्हादभाऊ पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

पाचोरा – तालुक्यातील गिरणामाईच्या कुशीत वसलेल्या पुनगाव एक नावाजलेलं गाव. या गावाचा लौकिक केवळ निसर्ग संपन्नतेमुळेच नाही, तर येथे जन्मलेल्या आणि आपल्या कार्यकर्तृत्वातून गावाच्या, पंचक्रोशीच्या आणि तालुक्याच्या विकासात मोलाची भर घालणाऱ्या व्यक्तीमत्त्वांमुळे अधिक आहे. या गावाने अनेक कर्तबगार घडवले, पण यामध्ये एक नाव विशेष उल्लेखनीय आहे – आदरणीय नानासाहेब प्रल्हादभाऊ पाटील (Mo.9421639025 ) आज त्यांचा वाढदिवस… आणि हीच योग्य संधी आहे त्यांच्या कार्याचा, त्यांच्या गुणांचा आणि त्यांच्या शांत, पण ठाम व्यक्तिमत्त्वाचा थोडक्यात आढावा घेण्याची. एका आदर्श शेतकऱ्यापासून ते एक उत्तम संघटक आणि समाजसुधारक पर्यंतचा त्यांचा प्रवास अनेकांसाठी प्रेरणादायी ठरतो आहे.नानासाहेब प्रल्हादभाऊ पाटील हे नाव आज पाचोरा तालुक्यात आदर्श शेतकरी म्हणून ओळखलं जातं. शेती ही केवळ व्यवसाय नसून एक जबाबदारी, समाजासाठी उपयुक्त काम असल्याचा त्यांचा दृढ विश्वास आहे. त्यांनी केवळ पारंपरिक पद्धती न वापरता आधुनिक तंत्रज्ञानाचा योग्य वापर करत उत्पादनवाढीवर भर दिला.पुनगाव परिसरात त्यांनी स्वतः शेतात जमीनीच्या परीक्षणापासून ते पीक संरचनेपर्यंत विविध प्रयोग करत अनेक शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. सिंचनाच्या नव्या पद्धती, ठिबक सिंचन, पीकवापसी, आणि सेंद्रिय शेती यामध्ये त्यांनी स्वतः आदर्श निर्माण केला आणि ते इतरांना शिकवले.नानासाहेब प्रल्हादभाऊ हे सध्या पुनगाव विकास सहकारी सेवा सोसायटीचे चेअरमन आहेत. त्यांनी या संस्थेचे नेतृत्व आपल्या निस्वार्थ, पारदर्शक आणि सामाजिक दृष्टिकोनातून अत्यंत जबाबदारीने पार पाडले आहे. संस्थेच्या कारभारात शिस्त, नियमितता, आणि सभासदांना वेळेवर सेवा हे त्यांच्या काळातील ठळक वैशिष्ट्य राहिले.ते स्वतः कायम म्हणतात, “संस्थेवर लोकांचा विश्वास टिकवायचा असेल तर संस्थेला नफा नको, लोकांना दिलासा हवा!” आणि याच तत्वावर त्यांनी संस्था चालवली. आज त्यांच्या नेतृत्वाखाली संस्था एक विश्वासार्ह केंद्र म्हणून ओळखली जाते जिथे सर्वसामान्य शेतकऱ्याला आधार मिळतो.नानासाहेब प्रल्हादभाऊ यांचं व्यक्तिमत्त्व मनमिळावू, नम्र, आणि सुसंस्कृत आहे. त्यांच्या वागण्या-बोलण्यात कुठेही अहंकार नाही, अगदी गावातील लहान माणसाशीही ते तितक्याच आपुलकीने बोलतात. त्यांनी कधीही प्रसिद्धीची हाव ठेवली नाही, त्यांना मान-सन्मान हवेत असा आग्रह नाही. उलट कामातून समाधान मिळतं यावर त्यांचा विश्वास.त्यांनी समाजात कधीही भेदभाव केला नाही. कोणत्याही जाती-धर्माच्या माणसाशी ते जसे प्रेमाने वागतात, तसेच ते लोकांच्या अडचणी समजून घेतात. त्यामुळेच गावातील प्रत्येक माणसाच्या मनात त्यांच्याविषयी अपार प्रेम आणि आदर आहे.पुनगाव आणि आसपासच्या पंचक्रोशीतील सोसायटी व गावाच्या विकासासाठी नानासाहेब प्रल्हादभाऊ यांनी सतत प्रयत्न केले. रस्ते, वीज, पाणी, शिक्षण अशा मूलभूत गरजांकडे त्यांनी प्रशासनाचे लक्ष वेधले. तलाठी, ग्रामसेवक, कृषी अधिकारी अशा शासकीय यंत्रणेशी संवाद साधून गावासाठी सकारात्मक निर्णय मिळवले. त्यांच्या प्रयत्नातून गावात बऱ्याच सुधारणा झाल्या, विशेषतः पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडवण्यात त्यांचे योगदान मोठे आहे.नानासाहेब प्रल्हादभाऊ तरुणांमध्ये एक विश्वासार्ह मार्गदर्शक म्हणून ओळखले जातात. कुठलाही तरुण नव्या व्यवसायासाठी, शैक्षणिक मार्गदर्शनासाठी किंवा कौटुंबिक निर्णयासाठी त्यांच्याकडे सल्ला मागतो. आणि ते सुद्धा वेळ देऊन त्याला समजावून सांगतात, शक्य असल्यास मदतीचा हात देतात.वृद्धांसाठी देखील त्यांचा दृष्टिकोन फारच आदरयुक्त आहे. गावातील ज्येष्ठ मंडळींचा सन्मान करणं, त्यांच्या अडचणी जाणून घेणं, त्यांना कार्यक्रमात पुढे स्थान देणं ही त्यांची सवयच झाली आहे. त्यामुळे नानासाहेब प्रल्हादभाऊ म्हणजे “सर्वांचे नानासाहेब प्रल्हादभाऊ” अशी ओळख निर्माण झाली आहे.नानासाहेब प्रल्हादभाऊ यांनी केवळ शेती आणि संस्था यापुरतेच कार्य मर्यादित ठेवले नाही, तर गावातील अनेक धार्मिक आणि सांस्कृतिक उपक्रमांमध्ये ते सक्रीय आहेत. आषाढी एकादशी, हरिनाम सप्ताह, गणेशोत्सव, होळी, शिवजयंती, व बालदिन यासारख्या कार्यक्रमांना ते उपस्थित राहतातच, पण आर्थिक मदत आणि व्यवस्थापनात देखील हातभार लावतात.ते वारकरी परंपरेचा आदर राखणारे आहेत. कीर्तन, प्रवचन यामध्ये ते श्रद्धेने सहभागी होतात. त्यांचा विश्वास आहे की अध्यात्म आणि समाजकारण हे एकमेकांना पूरक असावे.त्यांचे कुटुंब म्हणजे गुणांचा संग्रह. मुलांमध्ये त्यांनी शिक्षणाची आवड निर्माण केली. सून, नातवंड यांच्याशी त्यांचे जिव्हाळ्याचे संबंध आहेत. कुटुंबात कोणतीही गोष्ट छुपी नाही – सगळं खुलेपणाने बोलणं आणि एकमेकांची मते ऐकणं हे त्यांच्या घरातील संस्काराचे मूळ आहे.त्यांच्या पत्नीसुद्धा त्यांच्या सामाजिक कार्यात कधी अडथळा ठरत नाहीत, उलट सहकार्य करतात. त्यामुळे नानासाहेब प्रल्हादभाऊ यशस्वी कुटुंबप्रमुख म्हणूनही गावात ओळखले जातात.मृतभाषीक नानासाहेब प्रल्हादभाऊ कुठेही भेटले की ओठावर हसू असते. त्यांच्या चेहऱ्यावर नेहमीच प्रसन्नता असते. कोणतीही मोठी समस्या असो, ते शांतपणे ऐकतात आणि शांतपणे मार्ग शोधतात. त्यांचं हे संयमी आणि नम्र वर्तन अनेकांना शिकण्यासारखं आहे.आजच्या काळात अनेकजण केवळ स्वतःच्या फायद्याचा विचार करतात, पण नानासाहेब प्रल्हादभाऊ पाटील हे नाव आजही सामूहिक हितासाठी काम करणाऱ्या व्यक्तीमत्त्वाचं उदाहरण आहे. त्यांनी “माणसात गुंतवणूक केली तर समाज फुलतो” हे आपल्याला दाखवून दिलं आहे.आज नानासाहेब प्रल्हादभाऊ यांचा वाढदिवस. पण तो केवळ शुभेच्छांचा, फुलांचा आणि केकचा कार्यक्रम नाही – तो त्यांच्या आयुष्याकडे नव्याने पाहण्याचा, त्यांच्या कार्यातून प्रेरणा घेण्याचा आणि त्यांच्या मार्गावर चालण्याचा संकल्प करण्याचा दिवस आहे.आदरणीय नानासाहेब प्रल्हादभाऊ पाटील यांना वाढदिवसानिमित्त मनःपूर्वक शुभेच्छा देताना, आपण सगळेच त्यांच्या कार्याला सलाम करतो. त्यांचं आरोग्य उत्तम राहावं, दीर्घायुषी जीवन लाभावं आणि त्यांचं अनुभवसंपन्न मार्गदर्शन आपल्याला पुढील अनेक वर्षं लाभत राहावं, हीच झुंज वृत्तपत्र व ध्येय न्यूज संपादक संदीप महाजन यांच्यातर्फे ईश्वरचरणी प्रार्थना. शेवटी एवढेच “मितभाषी स्वभाव आणि निसर्गाच्या सान्निध्यात राहणारे, शेतकरी ते समाजसुधारक हा प्रवास पूर्ण करणारे – नानासाहेब प्रल्हादभाऊ यांच्या जीवनाची हीच खरी ओळख आहे.”

Loading

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here