पाचोरा नगरपालिकेत निवडणुकीचे रणशिंग फुंकले – प्रशासकीय कारभार शिस्तबद्ध, विकासकामे टॉऊन हॉल मधील पार्कीगच्या जागातील अतिक्रमण सोडले तर सर्व कामे युद्धपातळीवर सुरू

0

Loading

पाचोरा – शहरात नगर पालिका निवडणुकीचे रणधुमाळ वातावरण निर्माण झाले असून राजकीय गलियार्‍यांमध्ये चर्चा, गणितं, आणि प्रचार यांचा सूर चढू लागला आहे. एकतर्फी लागेल का निकाल, की दुतर्फी अथवा तीन-चार तर्फी लढत होईल, याबाबत अद्याप ठोस अंदाज व्यक्त करणे कठीण आहे. मात्र यावेळी निवडणुकीचे स्वरूप काहीसे वेगळे राहणार हे निश्चित आहे. असो सध्या नगर पालिकेचा कारभार प्रशासक- मुख्याधिकारी मंगेश देवरे यांच्या मार्गदर्शनाखाली अत्यंत शिस्तबद्ध, नियोजनबद्ध आणि पारदर्शक पद्धतीने चालू आहे. सध्या प्रशासकीय राजवटीमध्ये कोणाचाही कोणत्याही स्तरावर हस्तक्षेप नाही. निर्णय प्रक्रियेत राजकीय दबाव किंवा बाह्य हस्तक्षेप नसल्यामुळे सर्व शासकीय कामकाज नियमानुसार आणि निश्चित वेळेत पार पाडले जात आहे. पाचोरा शहराचा एकंदर विकास व स्वच्छता यामध्ये सातत्याने सुधारणा दिसून येत आहे. प्रशासक तथा मुख्याधिकारी मंगेश देवरे यांच्या नेतृत्वाखाली शहरातील प्रमुख नागरिकांसाठी अत्यंत आवश्यक असलेली विकासकामे युद्धपातळीवर सुरू आहेत.     फक्त छत्रपती शिवाजी महाराज चौक ते सुशील डेअरी आणि साई मंदिर परिसरापर्यंत बसलेल्या भाजीपाला विक्रेते यांच्या विरोधात केंद्रीय स्तरावरून ? स्पेशल ब्रँच सन्मानीय जेष्ठ व भ्रष्टाचार मुक्त अधिकारी यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांना त्रास देण्यासाठी व जे भाजी मार्केट मधील ओटे धारक आपल्या गाल्यांचे नियमित भाडे भरत आहेत किंबहुना डिपॉझिट चा एक रुपया सुद्धा त्यांनी ठेवला नाही अशा भाजी विक्रेत्यांना विशेष आशीर्वाद देण्यासाठी जो स्पेशल फोर्स नियुक्त करण्यात आला ते निस्वार्थी पथक की जे एक रुपयाचा भाजीपाला व फळे देखील कोणाकडून घेत नाही किंबहुना हरामाच्या रकमेला देखील हात लावत नाही असे कर्तव्यदक्ष रोडवरील भाजीपाला विक्रेत्यांना (फळ विक्रेते नाही) असे स्पेशल स्पेशल फोर्सचे अधिकारी भुयारी पुलापासून ते साई मंदिराजवळ बसणारे शेतकरी व भाजीपाला विक्रेते यांच्यावर कटाक्षपणे नजर ठेवून आहेत.                              विशेष बाब म्हणजे हुतात्मा स्मारक समोरील टाऊन हॉल लगत चारचाकी वाहन जाऊ नये यासाठी पाईप लावण्यात आले ( कोणत्या नियमाप्रमाणे व कोणाच्या आशीर्वादाने व आदेशाखाली लावण्यात आले हा भाग वेगळा ) पण हे पाईप लावल्या मुळे तेथे पार्किंगसाठी दुचाकी वाहन ने लावणे सुद्धा अडचणीचे ठरते यापेक्षाही विशेष बाब म्हणजे टाऊन हॉलमध्ये 1 शॉपिंगचा गाळा भाड्याने घ्यायचा त्याचे तेवढ्याच जागेची डिपॉझिट व भाडे भरायचे आणि ग्राहकांना जी वाहन पार्किंगची सोय केली आहे त्या जागी जागी मनसोक्त टेबल खुर्च्या,पाण्याची जार ठेवून तिथे चहा पिणाऱ्या ग्राहकांना बसण्याची व्यवस्था करण्यात आल्याचा आजूबा देखील साईबाबा अमृततुल्य चहा विक्रेत्यांचा बघायला मिळत आहे. या प्रकाराकडे विशेषतः फुकटाचा चहा न पिणारे न पा प्रशासनाचे अतिक्रमण विरोधी हे केंद्रीय पथक जाणीवपूर्वक दुर्लक्ष करण्यामागील कारण काय? त्या चहा विक्रेत्यावर विशेष आशीर्वाद ठेवण्याचे कारण काय? हा देखील यक्ष प्रश्न आहे. हे पथक भ्रष्टाचारी नाही किंवा कोणाची फुकटची चहासुद्धा पित नाही म्हणून आणखी कोणती – देवाण घेवाण करण्याचा प्रश्नच नाही वास्तविक टाऊन हॉलच्या पार्किंग झोन मध्ये लोकांना वाहन लावायला जागा नसल्याने ते बाहेरच लावतात, तेथे दुचाकी वाहने चालवणे तर सोडाच, पायी जाणाऱ्यांना देखील हा रस्ता अडचणीचा ठरतो. तिथे हे अतिक्रमण अधिकारी कर्मचारी का? डोळे झाक करतात हा विषय नागरिकांत चर्चेचा आहे. या ठिकाणी गर्दी व वाहतुकीच्या अडचणी निर्माण होत असल्याने त्यावर प्रशासकीय उपाययोजना तातडीने सुरू करणे अत्यावश्यक आहे.                                   हा विषय सोडला तर या व्यतिरिक्त शहरातील इतर विभागांमध्ये किंवा कर्मचाऱ्यांबाबत तक्रारीचा सूर जवळपास नाहीच, आणि एखाद्या किरकोळ कामाबाबत एखादी तक्रार झाली तरी ती तत्काळ निवारण केली जाते. नगरपालिकेतील कर्मचाऱ्यांचा कामकाजाचा वेग, जबाबदारीची भावना आणि जनसंपर्कातील शिस्त यामुळे नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. अनेक वर्षांपासून विकासकामात अडथळा ठरत असलेले राजकीय हस्तक्षेप आता पूर्णपणे थांबलेले दिसतात. परिणामी, कामकाजात पारदर्शकता निर्माण झाली असून प्रत्येक प्रकल्पाच्या अंमलबजावणीसाठी आवश्यक निधी, मंजुरी, आणि नियोजन वेळेवर पूर्ण होत आहे. नगरपालिकेच्या प्रशासकीय कारभारावर लक्ष ठेवणारे स्थानिक ज्येष्ठ नागरिक, सामाजिक कार्यकर्ते , पत्रकार आणि व्यापारी वर्ग सुद्धा सध्याच्या परिस्थितीबद्दल समाधानी आहेत. त्यांचे म्हणणे आहे की, “या काळात पाचोरा शहरात ज्या प्रकारे कामकाज चालू आहे, त्यात कोणत्याही प्रकारचा राजकीय हस्तक्षेप नाही, आणि त्यामुळेच शहरात वादविवाद निर्माण होत नाहीत.” खरं तर प्रशासक तथा मुख्याधिकारी मंगेश देवरे यांनी घेतलेली धोरणात्मक भूमिका शहराच्या सर्वांगीण प्रगतीसाठी अत्यंत सकारात्मक ठरत आहे. पूर्वी नगरपालिकेत एखादे काम मंजूर होण्यापूर्वी त्यावर विविध दबावगट, राजकीय गट किंवा आर्थिक टक्केवारीचे समीकरणे लागू होत. मात्र आता प्रशासकीय पारदर्शकतेमुळे ती प्रथा जवळपास संपुष्टात आली आहे. काही ठिकाणी किरकोळ स्वरूपात अशा चर्चा झाल्या तरी त्या अधिकाऱ्यांच्या कारभारावर परिणाम करत नाहीत. कर्मचारी वर्गालाही यामुळे निश्चित नियम, शिस्त आणि वेळेच्या चौकटीत राहून काम करण्याचे स्वातंत्र्य मिळाले आहे. आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नागरिकांत एक वेगळेच वातावरण निर्माण झाले आहे. अनेकांना वाटते की, जर पुढील काळात सुद्धा प्रशासकीय पद्धतीनेच नगरपालिकेचे कामकाज चालवले गेले, तर शहराची प्रगती आणखी वेगाने होईल. कारण सध्या सुरू असलेली कामे “राजकारणमुक्त” वातावरणात होत आहेत आणि तीच पद्धत कायम राहिली तर विकासाचे प्रमाण अधिक वाढेल. नगरपालिकेच्या अंतर्गत विकासाच्या दृष्टीने मुख्याधिकारी मंगेश देवरे यांचा दृष्टिकोन अत्यंत दूरदर्शी आहे. शहरातील स्वच्छ भारत अभियानांतर्गत घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प, नळजोडणी योजनांची प्रगती, आणि नवीन रस्त्यांचे सिमेंट-काँक्रीटीकरण ही कामे नियोजित वेळेत पूर्ण होत आहेत. पाचोरा शहरातील अनेक भागांमध्ये दिवसरात्र काम सुरू असून नागरिकांच्या सोयीसाठी प्रशासकीय पथके सतत गस्त घालत आहेत. पूरग्रस्त परिस्थिती काळात तर नगरपालिका प्रशासनाची कामगिरी नेत्रदीपक होती. भविष्यात नगर पालिका निवडणुकीनंतर कोणते राजकीय पक्ष किंवा पॅनल सत्तेवर येतील हे जरी अनिश्चित असले, तरी सध्याच्या कारभाराने एक आदर्श नमुना समोर ठेवला आहे. निवडणुकीत एकतर्फी निकाल लागो वा दुतर्फी किंवा बहुतर्फी लढत होवो, प्रशासक काळातील शिस्तबद्ध कामकाज हे पुढील प्रतिनिधींसाठी प्रेरणादायी ठरेल यात शंका नाही. शहरातील नागरिकांचा स्पष्ट मतप्रवाह असा आहे की, “आता राजकारणापेक्षा विकास हेच शहराचे मुख्य लक्ष्य असावे.” निवडणुकीनंतर जर सर्वानुमते असा निर्णय घेण्यात आला की, ज्या टक्केवारीने (%) कामांची वाटप सध्या चालू आहे ती तडजोड अंती योग्य पद्धत पुढेही ठेवायची, आणि प्रशासक काळातील नियमानुसार शिस्त कायम ठेवायची, तर शहराचा विकास नियंत्रित व स्थिर राहील. शेवटी एक गोष्ट निश्चित सांगता येते की, सध्याच्या प्रशासकीय नेतृत्वाखाली प्रशासक तथा मुख्याधिकारी मंगेश देवरे यांच्या संयमित, निर्णयक्षम नेतृत्वामुळे पाचोरा शहरात “काम बोले – राजकारण नव्हे” ही नवी संस्कृती रुजताना दिसते आहे. सार्वजनिक निधीचा योग्य वापर, नागरिकांच्या समस्यांना प्राधान्य, आणि कोणत्याही वादविवादाशिवाय विकासाच्या वाटचालीकडे पाचोरा नगरपालिकेची वाटचाल सुरू आहे. प्रशासक तथा मुख्याधिकारी मंगेश देवरे यांच्या कार्यतत्पर, संयमित आणि सुजाण नेतृत्वामुळे शहराची प्रगती एका नवेपणाच्या शिखरावर पोहोचत आहे आणि हीच दिशा पुढील पिढ्यांसाठी आदर्श ठरणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here