Home Blog Page 12

विश्ववंद्य छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त पाचोरा येथे शासकीय शिवजयंती महोत्सवाचा भव्य सोहळा

0

Loading

पाचोरा-हिंदवी स्वराज्याचे संस्थापक, पराक्रम, शौर्य, न्यायनीती आणि लोककल्याणकारी राज्यकारभाराचे आदर्श प्रणेते विश्ववंद्य छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त दिनांक १९ फेब्रुवारी २०२६ रोजी पाचोरा शहरात शासकीय शिवजयंती महोत्सव अत्यंत दिमाखदार आणि उत्साहपूर्ण वातावरणात साजरा होत आहे. स्वराज्याच्या प्रेरणादायी इतिहासाची आठवण करून देणारा हा सोहळा केवळ एक उत्सव नसून शिवकालीन संस्कारांची आणि राष्ट्रभक्तीची ज्योत प्रज्वलित करणारा पवित्र उपक्रम ठरणार आहे. या शासकीय शिवजयंती महोत्सवासाठी शासकीय, राजकीय, शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्रातील विविध मान्यवरांना सन्मानपूर्वक आमंत्रित करण्यात आले आहे. समाजातील सर्व घटकांनी एकत्र येऊन छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरणी कृतज्ञतेची पुष्पांजली अर्पण करावी, या भावनेतून कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. कार्यक्रमाची सुरुवात सकाळी ७.३० वाजता छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास मान्यवरांच्या हस्ते माल्यार्पण करून होणार आहे. महाराजांच्या तेजस्वी स्मृतींना अभिवादन करताना “जय भवानी, जय शिवाजी”च्या घोषणांनी परिसर दुमदुमून जाईल. त्यानंतर सार्वजनिक उत्सव समितीचे अध्यक्ष मा. आमदार आप्पासो. किशोर पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहणाचा मानाचा सोहळा पार पडणार आहे. भगव्या ध्वजाच्या साक्षीने स्वराज्याच्या आदर्शांचा जागर केला जाईल. ध्वजारोहणानंतर जिजाऊ वंदना आणि महाराष्ट्र गीत सादर करण्यात येईल. राजमाता जिजाऊ यांच्या संस्कारांची आठवण करून देत मातृशक्तीचा गौरव करण्यात येईल. त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते शिवपालखी पूजन होणार असून या पूजनातून स्वराज्याच्या पवित्र परंपरेचे स्मरण होईल. शिवपालखी ही केवळ परंपरा नसून ती शिवचरित्रातील त्याग, शौर्य आणि धर्मनिष्ठेचे प्रतीक आहे. यानंतर पाचोरा शहरातील सर्व शालेय विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत भव्य प्रभात फेरीची सुरुवात होईल. देशभक्तीपर घोषवाक्ये, लेझीम पथके, ढोल-ताशांच्या गजरात आणि शिवकालीन वेशभूषेत सजलेल्या विद्यार्थ्यांच्या सहभागामुळे वातावरण शिवमय होणार आहे. प्रभात फेरी ही नव्या पिढीला शिवचरित्राची ओळख करून देणारी आणि राष्ट्रप्रेमाची बीजे रुजवणारी ठरणार आहे. प्रभात फेरी संपल्यानंतर विविध स्पर्धांमध्ये यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते बक्षिस वितरणाचा कार्यक्रम संपन्न होईल. या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या कर्तृत्वाचा गौरव करून त्यांना पुढील वाटचालीसाठी प्रेरणा दिली जाईल. शिवाजी महाराजांच्या आदर्शांवर चालत ज्ञान, शौर्य आणि नैतिकता या मूल्यांचा अंगीकार करण्याचा संदेश या सोहळ्यातून दिला जाणार आहे. या पवित्र आणि प्रेरणादायी सोहळ्यास आपण उपस्थित राहून विश्ववंद्य छत्रपती शिवाजी महाराजांप्रती आपला आदर, कृतज्ञता आणि निष्ठा व्यक्त करावी, अशी शिवविनंती आयोजकांनी केली आहे. सकाळच्या या शासकीय शिवजयंती महोत्सवासाठी आपली उपस्थिती लाभून कार्यक्रमाची शोभा वाढवावी, ही नम्र विनंती आहे. या कार्यक्रमाचे आयोजन मराठा सेवा संघ, पाचोरा तसेच संभाजी ब्रिगेड, पाचोरा आणि सार्वजनिक उत्सव समिती, पाचोरा यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले आहे. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विविध पदाधिकारी आणि कार्यकर्ते परिश्रम घेत आहेत. शिवश्री राहुल बोरसे, अध्यक्ष मराठा सेवा संघ, पाचोरा तालुका, शिवश्री एस. ए. पाटील, उपाध्यक्ष मराठा सेवा संघ, पाचोरा तालुका, शिवश्री एस. के. पाटील (आण्णा), जिल्हाकार्याध्यक्ष, जळगांव, शिवश्री नितीन पाटील, शहर अध्यक्ष मराठा सेवा संघ, पाचोरा, शिवश्री सुनिल पाटील सर, जिल्हाउपाध्यक्ष मराठा सेवा संघ आणि शिवश्री जिभाऊ पाटील, अध्यक्ष संभाजी ब्रिगेड, पाचोरा तालुका यांनी सर्व नागरिकांना या महोत्सवात सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. कार्यक्रमाचे ठिकाण छत्रपती शिवाजी महाराज चौक, पाचोरा येथे असून वेळ सकाळी ७.३० वाजता आहे. स्वराज्याच्या तेजस्वी स्मृतींना वंदन करण्यासाठी आणि शिवकालीन प्रेरणेची ज्योत अंतःकरणात प्रज्वलित करण्यासाठी सर्वांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

चोपड्यात महाशिवरात्री निमित्त १८ फूट उंच कच्च्या केळ्यांपासून साकारण्यात येणार भव्य महाशिवलिंग; १५ ते १८ फेब्रुवारीदरम्यान दर्शनाची सुवर्णसंधी

0

Loading

चोपडा…. (डॉ.अनिलकुमार पालीवाल) : महाशिवरात्री हा हिंदू धर्मातील अत्यंत पवित्र, श्रद्धेचा आणि आत्मजागृती घडविणारा उत्सव म्हणून ओळखला जातो. सृष्टीचे रचयिता, सर्व आत्म्यांचे परमपिता निराकार परमात्मा शिव यांच्या स्मरणाचा हा पावन दिवस मानला जातो. या दिवशी भक्त उपवास, जप, तप, ध्यान, रुद्राभिषेक आणि नामस्मरण करीत आत्मशुद्धीचा संकल्प करतात. अज्ञानातून ज्ञानाकडे, अंध:कारातून प्रकाशाकडे आणि अशांततेतून शांततेकडे जाण्याची प्रेरणा या पर्वातून मिळते. त्यामुळे महाशिवरात्री हा केवळ धार्मिक उत्सव नसून आत्मपरिवर्तनाचा आणि अंतर्मुख होण्याचा दिव्य सोहळा ठरतो. याच पवित्र पर्वानिमित्त , चोपडा यांच्या वतीने एक आगळावेगळा, भक्तीमय आणि पर्यावरणपूरक उपक्रम राबविण्यात येणार आहे. प्रथमच तब्बल १८ फूट उंच आणि २१,१११ (एकवीस हजार एकशे अकरा) कच्च्या केळ्यांपासून साकारण्यात आलेले भव्य महाशिवलिंग उद्यापासून भक्तांच्या दर्शनासाठी खुले करण्यात येणार आहे. या भव्य निर्मितीची तयारी मागील काही दिवसांपासून नियोजनबद्ध पद्धतीने सुरू होती. स्वयंसेवकांनी अथक परिश्रम घेत प्रत्येक केळे योग्य रचनेत बसविले, संतुलन राखले आणि संपूर्ण संरचनेला आकर्षक व देखणे रूप दिले. आज १४ फेब्रुवारी रोजी अंतिम सजावट, प्रकाशयोजना आणि पूजाविधीची तयारी पूर्णत्वाच्या टप्प्यावर पोहोचली आहे. पर्यावरणपूरक संकल्पनेवर आधारित हा उपक्रम विशेष उल्लेखनीय ठरत आहे. नैसर्गिक फळांचा वापर करून साकारलेले हे महाशिवलिंग समाजाला साधेपणा आणि निसर्गसंवर्धनाचा संदेश देत आहे. आधुनिक काळात कृत्रिम सजावटीकडे झुकणाऱ्या प्रवृत्तीच्या पार्श्वभूमीवर हा उपक्रम श्रद्धा आणि पर्यावरण यांचा सुंदर संगम घडवित आहे. या महाशिवलिंगाचे दर्शन घेताना भक्तांच्या मनात भक्तिभाव जागृत होईल आणि ‘ॐ नमः शिवाय’चा जप आपोआप ओठांवर येईल, अशी भावना व्यक्त होत आहे. प्रभू चिंतन भवन, ओम शांतीनगर, यावल रोड, चोपडा येथे १५ फेब्रुवारी ते १८ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत दररोज सकाळी ७ ते रात्री ८ वाजेपर्यंत दर्शनाची व्यवस्था करण्यात येणार आहे. दररोज सकाळी ७:३० वाजता आणि रात्री ७ वाजता आरतीचे आयोजन करण्यात येईल. आरतीच्या वेळी मंत्रोच्चार, घंटानाद आणि सामूहिक प्रार्थना यामुळे संपूर्ण परिसर भक्तिमय आणि शांततेने भारावून जाईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. कार्यक्रमादरम्यान आध्यात्मिक चित्रप्रदर्शनीचेही आयोजन करण्यात येणार आहे. या चित्रप्रदर्शनीतून शिवतत्त्वाचे गूढ, आत्मा-परमात्म्याचे नाते, कर्मसिद्धांत, जीवनमूल्ये आणि सदाचारयुक्त जीवनाची दिशा यांविषयी सुस्पष्ट मार्गदर्शन करण्यात येईल. विशेषतः तरुण पिढीला अध्यात्माशी जोडण्याचा आणि सकारात्मक विचारसरणीची प्रेरणा देण्याचा या उपक्रमामागील उद्देश आहे. समाजात शांती, प्रेम, सहिष्णुता आणि नैतिक मूल्यांची जाणीव दृढ व्हावी, हा या आयोजनाचा केंद्रबिंदू आहे. आयोजकांनी सर्व नागरिकांना सहपरिवार उपस्थित राहून दर्शनाचा लाभ घ्यावा, परमात्म्याचा दिव्य संदेश समजून घ्यावा आणि जीवनात सद्गुणांचा स्वीकार करावा, असे आवाहन केले आहे. महाशिवरात्रीच्या या पावन निमित्ताने चोपडा शहरात साकारण्यात आलेला हा अभूतपूर्व आणि प्रेरणादायी उपक्रम येत्या काही दिवसांत भक्तांसाठी आध्यात्मिक ऊर्जा, सकारात्मकता आणि आत्मिक समाधानाचा स्रोत ठरणार आहे.

लट्टालूर ते खिद्रापूर : राष्ट्रकूट–शिलाहार संबंधांचा ऐतिहासिक सेतू – युवराज पाटील चोबळीकर

0

Loading

मागच्या महिन्यात मी खिद्रापूरचे सहकुटुंब पाहून आलो… अत्यंत देखणे, माझे तिथून पाय निघत नव्हते… आणि ऐतिहासिक गोष्टी पोटात घेवून हे मंदिर उभं आहे… मी गेली अनेक दिवस याचे संदर्भ शोधत होतो.. कमाल म्हणजे आमच्या लातूरचे अप्रत्यक्ष बंध असल्यामुळे थोडी प्रादेशिक अस्मिता जागी झाली, त्यातून लिहलेला हा लेख आहे….!!
महाराष्ट्राच्या मध्ययुगीन इतिहासाकडे पाहताना राष्ट्रकूट आणि शिलाहार ही दोन राजघराणी स्वतंत्रपणे अभ्यासली जातात; मात्र प्रत्यक्षात या दोहोंमधील नातेसंबंध हा केवळ राजकीय अधीनतेपुरता मर्यादित नसून, तो दख्खनच्या सांस्कृतिक, स्थापत्य आणि धार्मिक जडणघडणीचा कणा ठरलेला आहे. हा संबंध समजून घ्यायचा असेल, तर लातूर (प्राचीन लट्टालूर), तेर (प्राचीन तगर) आणि खिद्रापूर या तीन स्थळांना एकाच ऐतिहासिक रेषेत जोडून पाहावे लागते.
लट्टालूर हे राष्ट्रकूट घराण्याचे मूळ स्थान मानले जाते. ‘लट्टालूरपुरवराधीश्वर’ अशी उपाधी धारण करणाऱ्या राष्ट्रकूट सम्राटांनी येथूनच दख्खनच्या राजकारणाला आकार दिला. याच लट्टालूरपासून अवघ्या काही कोसांवर वसलेले तेर (तगर) हे प्राचीन व्यापारी नगर होते. रोम, इजिप्त आणि पश्चिम आशियाशी व्यापार करणाऱ्या या नगरातूनच पुढे शिलाहार राजघराण्याचा उदय झाला, ही बाब इतिहासाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची आहे.
तेर या नगराचे महत्त्व केवळ व्यापारी केंद्र म्हणून नव्हे, तर राजकीय नेतृत्व घडवणाऱ्या भूमी म्हणूनही होते. शिलाहार राजे अभिमानाने स्वतःला ‘तगरपुरवराधीश्वर’ म्हणवून घेत असत. याचा अर्थ, त्यांची सत्ता केवळ कोकणात निर्माण झाली नसून, तिची मुळे दख्खनच्या पठारावर, तगरसारख्या समृद्ध नगरात खोलवर रुजलेली होती. याच तगरमधून शिलाहारांच्या तीन स्वतंत्र, पण परस्परांशी सांस्कृतिकदृष्ट्या जोडलेल्या शाखा निर्माण झाल्या….उत्तर कोकण, दक्षिण कोकण आणि कोल्हापूर शाखा.
उत्तर कोकण शाखेने ठाणे, मुंबई आणि आसपासचा परिसर व्यापला. पुरी किंवा राजपुरी ही त्यांची राजधानी होती. दक्षिण कोकण शाखेने रत्नागिरी–सिंधुदुर्ग किनारपट्टीवर आपले वर्चस्व निर्माण केले, खारेपाटण (बलिपत्तन) हे त्यांचे प्रमुख केंद्र होते. तर कोल्हापूर शाखेने करवीर, सातारा आणि सांगली परिसरावर सत्ता प्रस्थापित करून वळिवडे व पन्हाळा या ठिकाणांना राजकीय महत्त्व प्राप्त करून दिले.
या तिन्ही शाखांचा उगम एकाच भूमीत.,तेरमध्ये…झालेला असला, तरी त्यांच्या राजकीय वाटचालीमागे राष्ट्रकूट साम्राज्याचा स्पष्ट आश्रय होता. राष्ट्रकूट हे दख्खनचे सार्वभौम सम्राट होते आणि शिलाहार हे त्यांचे अत्यंत विश्वासू मांडलिक मानले जात. सम्राट तिसरा गोविंद याने उत्तर कोकण जिंकल्यानंतर तेथे आपला मांडलिक म्हणून पहिला कपर्दी याची नियुक्ती केली. ही नियुक्ती केवळ प्रशासकीय नव्हती, तर ती राष्ट्रकूट–शिलाहार विश्वासाच्या दृढ पायावर उभी होती.
दक्षिण कोकणातही अशीच परिस्थिती दिसते. राष्ट्रकूट सम्राट पहिला कृष्ण याने शिलाहार वीर सणफुल्ल याच्यावर त्या प्रदेशाची जबाबदारी सोपवली. हे मांडलिकत्व इतके घट्ट होते की, पुढे राष्ट्रकूट साम्राज्याचा अस्त झाल्यानंतरही शिलाहार राजांनी आपल्या ताम्रपटांत राष्ट्रकूट सम्राटांची वंशावळ, उपाध्या आणि पराक्रम आदराने कोरून ठेवले. ही बाब त्यांच्या राजनिष्ठेचे आणि ऐतिहासिक स्मरणशीलतेचे द्योतक आहे.
या राजकीय अनुबंधाचा सर्वात ठळक आणि आजही दिसणारा ठसा म्हणजे स्थापत्यकलेचा वारसा. राष्ट्रकूट आणि शिलाहार यांच्या काळात महाराष्ट्रात जी मंदिरे, लेणी आणि शिल्पे निर्माण झाली, ती केवळ धार्मिक स्थळे नसून त्या काळच्या सौंदर्यदृष्टी, तांत्रिक कौशल्य आणि सांस्कृतिक समन्वयाची साक्ष आहेत.
उत्तर कोकणातील अंबरनाथचे शिवमंदिर हे याचे उत्तम उदाहरण आहे. शिलाहार राजे चित्तराज आणि मुम्मुणी यांनी बांधलेल्या या मंदिरात राष्ट्रकूटकालीन स्थापत्यशैलीचा प्रभाव स्पष्टपणे दिसतो. कोरीवकाम, प्रमाणबद्ध रचना आणि शिल्पांची सजीवता यामुळे हे मंदिर दख्खन स्थापत्याचा मानबिंदू ठरते.
मुंबईजवळील घारपुरी (एलिफंटा) लेणी ही राष्ट्रकूट आश्रयाखाली आणि शिलाहार सहभागातून विकसित झाल्याचे अनेक इतिहासकार मानतात. येथील ‘त्रिमूर्ती’ शिल्प हे केवळ शैव परंपरेचे प्रतीक नसून, भारतीय शिल्पकलेचा सर्वोच्च टप्पा मानले जाते.
या सगळ्या परंपरेचा परमोच्च बिंदू म्हणजे खिद्रापूरचे कोप्पेश्वर मंदिर. कोल्हापूरच्या शिलाहार राजांनी उभारलेले हे मंदिर म्हणजे स्थापत्यशास्त्राचा जिवंत ग्रंथच आहे. मंदिराचा स्वर्गमंडप, अधिष्ठानावरील ९५ हत्तींच्या मूर्तींचे गजपीठ, तसेच भिंतींवरील सूक्ष्म शिल्पकाम पाहताना शिलाहार राजांच्या कलारसिकतेचा प्रत्यय येतो. म्हणूनच या मंदिराला योग्य अर्थाने ‘दक्षिणेचे छोटे खजुराहो’ असे म्हटले जाते.
शिलाहारांचे योगदान केवळ स्थापत्यापुरते मर्यादित नव्हते. त्यांनी सांस्कृतिक समन्वय आणि धार्मिक सहिष्णुतेचा आदर्श घालून दिला. कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिराला त्यांनी दान दिलेच, पण त्याचबरोबर जैन बस्त्या आणि बौद्ध विहारांनाही आश्रय दिला. विविध धर्म, पंथ आणि विचारधारांना एकत्र नांदवणारी ही परंपरा त्या काळातील सामाजिक समतोल दर्शवते.
साहित्य क्षेत्रातही शिलाहारांनी मोलाचे योगदान दिले. उत्तर कोकणच्या शिलाहार राजाने लिहिलेली ‘अपरार्क’ ही याज्ञवल्क्यस्मृतीवरील टीका केवळ महाराष्ट्रातच नव्हे, तर काश्मीरपर्यंत पोहोचली होती. यावरून त्या काळातील बौद्धिक देवाणघेवाणीची व्याप्ती लक्षात येते.
आज लातूरच्या लट्टालूरपासून सुरू होणारा हा इतिहासाचा प्रवास, तेरच्या तगरमार्गे खिद्रापूरच्या कोप्पेश्वर मंदिरापर्यंत पोहोचतो, तेव्हा जाणवते की हा केवळ राजसत्तांचा आलेख नाही. हा महाराष्ट्राच्या सांस्कृतिक स्मृतींचा, कलात्मक परंपरेचा आणि धार्मिक उदारतेचा ऐतिहासिक सेतू आहे. ‘तगर ते कोकण’ आणि ‘लट्टालूर ते करवीर’ अशी ही अखंड परंपरा आजही आपल्या लेण्यांत, मंदिरांत आणि शिलालेखांत जिवंत आहे. फक्त्त ती अस्ताव्यस्त आणि विस्तीर्ण भूपट्यावर विस्तारलेली आहे… खूप फिरावं लागेल आणि दस्ताऐवज एकत्र करावा लागेल… खूप मोठा ऐतिहासिक खजिना आहे हे नक्की….!!

पारोळा येथील राज्यस्तरीय परिषदेत पाचोरा महाविद्यालयाच्या प्रा. सौ. जयश्री को.वाघ ( वर्मा ) यांचा संशोधन निबंध सादर

0

Loading

पाचोरा ( चेतना हिरे ) अनिर्बंध औद्योगिकीकरण, झपाट्याने वाढणारे शहरीकरण आणि मोठ्या प्रमाणावर होत असलेली जंगलतोड यामुळे आज पर्यावरणासमोर गंभीर आव्हाने उभी ठाकली आहेत. या पार्श्वभूमीवर पर्यावरणाचे नुकसान टाळत आर्थिक प्रगती साधणे ही काळाची गरज बनली असून, प्रदूषण कमी करण्यासाठी सौर ऊर्जा, पवन ऊर्जा तसेच सौर उपकरणांचा व्यापक वापर हाच शाश्वत विकासाचा प्रभावी मार्ग असल्याचे प्रतिपादन उमवि येथील व्यवस्थापन परिषदेच्या सदस्या प्रा. डॉ. सुरेखा पालवे यांनी केले. आजच्या काळातील शिक्षकांची भूमिका दीपस्तंभासारखी असून समाजात विवेकशीलता निर्माण करणे हाच शाश्वत आर्थिक विकासाचा खरा पाया असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. पारोळा येथे शुक्रवार, दिनांक ६ फेब्रुवारी २०२६ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून राबविण्यात येणाऱ्या शैक्षणिक उपक्रमांतर्गत आणि यांच्या संयुक्त विद्यमाने “मानवता आणि पर्यावरण : शाश्वत विकासासाठी बहुविद्याशाखीय दृष्टिकोन” या विषयावर एकदिवसीय आंतरविद्याशाखीय शासकीय परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या परिषदेच्या उद्घाटक म्हणून प्रा. डॉ. सुरेखा पालवे बोलत होत्या. या महत्त्वपूर्ण परिषदेच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. वाय. व्ही. पाटील होते तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून अधिसभा सदस्य प्रा. डॉ. वर्षा पाटील, प्रा. डॉ. भूपेंद्र केसुर आणि प्रा. डॉ. विकास गीते यांनी आपले विचार मांडले. बीजभाषक म्हणून येथील शास्त्रज्ञ डॉ. महेश पाटील यांनी पर्यावरणीय समस्यांचे वैज्ञानिक पैलू, त्यावरील संशोधनाची गरज आणि नव्या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून शाश्वत विकास कसा साधता येईल यावर सखोल मार्गदर्शन केले. या परिषदेस राज्यभरातून मोठा प्रतिसाद मिळाला असून जवळपास २०० प्राध्यापक आणि संशोधकांनी नोंदणी केली तर सुमारे दीडशे संशोधन निबंध प्राप्त झाले. विविध विद्याशाखांतील संशोधकांनी मानवता, पर्यावरण, अर्थशास्त्र, विज्ञान, वाणिज्य आणि सामाजिक शास्त्र यांचा समन्वय साधत शाश्वत विकासाच्या संकल्पनेवर आपले विचार मांडले. या परिषदेत येथील वाणिज्य विभागाच्या प्राध्यापिका प्रा. सौ. जयश्रीताई वर्मा वाघ यांनी संशोधक विद्यार्थिनी म्हणून आपला शोध निबंध सादर केला. त्यांच्या संशोधन निबंधात पर्यावरण संरक्षण आणि आर्थिक विकास यामधील संतुलन तसेच स्थानिक पातळीवर राबवता येणाऱ्या शाश्वत उपाययोजनांचा सखोल अभ्यास मांडण्यात आला होता. त्यांच्या सादरीकरणाला उपस्थित तज्ज्ञ, प्राध्यापक आणि संशोधकांकडून विशेष दाद मिळाली. निबंध सादरीकरणानंतर त्यांनी मनोगतात्मक अभिप्राय व्यक्त करत संशोधन प्रक्रियेत येणाऱ्या अडचणी, त्यावरील उपाय आणि भविष्यातील संशोधनाच्या संधी याविषयी आपले अनुभव सांगितले. याचवेळी प्राचार्य डॉ. जी. एच. सोनवणे यांनी शाश्वत विकासाच्या माध्यमातून पर्यावरण संरक्षण करताना समाजाच्या वाढत्या गरजा कशा संतुलित करता येतील यावर मार्गदर्शन केले. विकासाच्या नावाखाली पर्यावरणाची अपरिमित हानी होऊ न देता नैसर्गिक संसाधनांचा विवेकपूर्ण वापर करण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली. एकूणच पारोळा येथे झालेली ही एकदिवसीय राज्यस्तरीय परिषद शैक्षणिक, सामाजिक आणि पर्यावरणीय दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वपूर्ण ठरली असून मानवता आणि पर्यावरण यांचा समतोल राखत शाश्वत विकास साधण्यासाठी बहुविद्याशाखीय दृष्टिकोन किती आवश्यक आहे हे या परिषदेमधून अधोरेखित झाले.

श्री. गो. से. हायस्कूल, पाचोरा येथे रमाई आंबेडकर जयंतीनिमित्त सामाजिक समतेचा संदेश

0

Loading

पाचोरा – पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्था संचलित श्री. गो. से. हायस्कूल, पाचोरा येथे रमाई आंबेडकर जयंती अत्यंत सन्मानपूर्वक आणि प्रेरणादायी वातावरणात साजरी करण्यात आली. भारतीय समाजातील सामाजिक परिवर्तनाच्या चळवळीला बळ देणाऱ्या, त्याग, सेवाभाव आणि स्त्रीशक्तीचे प्रतीक ठरलेल्या रमाई आंबेडकर यांच्या विचारांना उजाळा देणारा हा कार्यक्रम विद्यार्थ्यांसह उपस्थितांसाठी मार्गदर्शक ठरला. या जयंती कार्यक्रमाच्या प्रसंगी माजी आमदार संस्थेचे अध्यक्ष भाऊसो दिलीपभाऊ वाघ यांच्या हस्ते रमाई आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. पूजनानंतर उपस्थित मान्यवर, शिक्षकवृंद व विद्यार्थ्यांनी त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी समाजातील वंचित, उपेक्षित घटकांच्या उन्नतीसाठी रमाई आंबेडकर यांनी दिलेल्या योगदानाची आठवण करून देण्यात आली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या सामाजिक चळवळीत रमाई आंबेडकर यांनी दिलेले मोलाचे सहकार्य, त्यागमय जीवन आणि संघर्षमय वाटचाल यावर प्रकाश टाकण्यात आला. कार्यक्रमात बोलताना माजी आमदार दिलीपभाऊ वाघ यांनी रमाई आंबेडकर यांच्या जीवनकार्याचा सविस्तर आढावा घेतला. सामाजिक समता, स्त्रीसन्मान आणि शिक्षणाचे महत्त्व अधोरेखित करत त्यांनी सांगितले की, रमाई आंबेडकर यांचे संपूर्ण आयुष्य हे संघर्ष, संयम आणि सेवाभावाचे जिवंत उदाहरण आहे. त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्यामागे खंबीरपणे उभे राहत समाजपरिवर्तनाच्या लढ्यात मोलाची भूमिका बजावली. आजच्या पिढीने त्यांच्या विचारांपासून प्रेरणा घेऊन सामाजिक बांधिलकी जोपासावी, असे आवाहन त्यांनी केले. यावेळी संस्थेचे चेअरमन नानासाहेब संजय वाघ यांनीही मनोगत व्यक्त करत रमाई आंबेडकर यांच्या कार्याचा गौरव केला. समाजातील स्त्रियांनी आत्मसन्मानाने उभे राहून शिक्षण व संघटनाच्या माध्यमातून प्रगती साधावी, हा संदेश रमाई आंबेडकर यांच्या जीवनातून मिळतो, असे त्यांनी नमूद केले. व्हाईस चेअरमन विलास जोशी यांनी शाळांमधून अशा महनीय व्यक्तींच्या जयंती साजऱ्या केल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये मूल्यशिक्षण रुजते आणि सामाजिक जाणिवा वृद्धिंगत होतात, असे मत व्यक्त केले. कार्यक्रमास शालेय समिती चेअरमन खलील देशमुख, तांत्रिक विभागाचे चेअरमन अण्णासो वासुदेव महाजन, सतीश आप्पा चौधरी, प्रा. भागवत महालपुरे, सौ. मनीषा पाटील, सिताराम पाटील, माजी प्राचार्य बी. एन. पाटील, योगेश पाटील, मुख्याध्यापक एन. आर. पाटील, माजी पर्यवेक्षक शांताराम चौधरी, माजी मुख्याध्यापक विश्वासराव साळुंखे, सुधीर पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. सर्व मान्यवरांनी रमाई आंबेडकर यांच्या सामाजिक योगदानावर आपले विचार व्यक्त करत त्यांच्या विचारांचा वारसा पुढील पिढीपर्यंत पोहोचवण्याचे महत्त्व अधोरेखित केले. विद्यार्थ्यांनीही कार्यक्रमात उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. रमाई आंबेडकर यांच्या जीवनावर आधारित माहितीपर भाषणांमधून विद्यार्थ्यांना सामाजिक न्याय, समानता आणि मानवी मूल्यांचे महत्त्व समजावून सांगण्यात आले. शाळेतील शिक्षकवृंद व शिक्षकेतर कर्मचारी यांनी कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी परिश्रम घेतले. एकूणच श्री. गो. से. हायस्कूल, पाचोरा येथे साजरी करण्यात आलेली रमाई आंबेडकर जयंती ही केवळ औपचारिक कार्यक्रम न राहता, सामाजिक समतेचा, स्त्रीसशक्तीकरणाचा आणि शिक्षणाच्या महत्त्वाचा संदेश देणारी प्रेरणादायी उपक्रम ठरली.

अजितदादा सर्वार्थाने लोकनेते – महाराष्ट्राने हरपला एक नेतृत्वाचा आधारस्तंभ

0

Loading

पाचोरा — स्वर्गीय अजितदादा पवार हे महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वार्थाने लोकनेते होते. त्यांच्या आकस्मिक निधनाने राज्याने एक कर्तृत्ववान, दूरदृष्टी असलेला आणि सामान्य माणसाशी नाळ जुळवून ठेवणारा नेता गमावला आहे. ही उणीव महाराष्ट्रासाठी कधीही न भरून निघणारी आहे, असे भावनिक उद्गार माजी आमदार दिलीपभाऊ वाघ यांनी काढले. दिनांक 28 जानेवारी 2026 रोजी सकाळी बारामती येथे विमान अपघातात स्वर्गीय अजितदादा पवार यांचे दुर्दैवी निधन झाले. या घटनेने संपूर्ण महाराष्ट्र शोकसागरात बुडाला. या पार्श्वभूमीवर पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्थेतर्फे श्री. गो. से. हायस्कूल येथील कलादालनात श्रद्धांजली व शोकसभेचे आयोजन करण्यात आले होते. या शोकसभेत बोलताना माजी आमदार दिलीपभाऊ वाघ यांनी अजितदादांच्या कार्यकाळातील आठवणींना उजाळा दिला. वाघ परिवार व संस्थेशी असलेले अजितदादांचे स्नेहपूर्ण आणि आपुलकीचे संबंध त्यांनी उपस्थितांसमोर मांडले. अजितदादांची कार्यशैली नेहमीच परिणामकारक, निर्णयक्षम आणि लोकहिताला केंद्रस्थानी ठेवणारी होती. पद, पक्ष किंवा राजकीय समीकरणांपेक्षा सामान्य माणसाचे प्रश्न सोडविणे हेच त्यांच्या राजकारणाचे मुख्य सूत्र होते, असे त्यांनी सांगितले. संस्थेचे चेअरमन नानासाहेब संजय वाघ यांनी आपल्या मनोगतात अजितदादांच्या नेतृत्वगुणांचे विशेष कौतुक केले. पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्थेच्या विविध शैक्षणिक व सामाजिक उपक्रमांना अजितदादांनी वेळोवेळी उपस्थित राहून दिलेले मार्गदर्शन हे संस्थेसाठी दीपस्तंभ ठरल्याचे त्यांनी नमूद केले. पक्षीय आणि जातीय राजकारणाच्या पलीकडे जाऊन अजितदादांनी सामान्य माणसाला आपल्या राजकारणाच्या केंद्रस्थानी ठेवले. त्यामुळेच त्यांच्या निधनामुळे संपूर्ण महाराष्ट्र शोकाकुल झाला असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. कार्यक्रमाच्या सुरुवातीला स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या प्रतिमेस माल्यार्पण करून दीपप्रज्वलन करण्यात आले. त्यानंतर उपस्थितांनी दोन मिनिटांचे मौन पाळून श्रद्धांजली अर्पण केली. यावेळी संस्थेचे शालेय समिती चेअरमन दादासो खलील देशमुख, संचालक प्रा. भागवत महालपुरे, माजी प्राचार्य बी. एन. पाटील, भडगाव विद्यालयाचे प्राचार्य एन. एन. गायकवाड यांनी आपली मनोगते व्यक्त करत अजितदादांच्या सामाजिक व राजकीय योगदानाचा गौरव केला. यावेळी व्यासपीठावर संस्थेचे व्हाईस चेअरमन नानासो व्ही. टी. जोशी, श्री. गो. से. हायस्कूलच्या तांत्रिक विभागाचे चेअरमन अण्णासो वासुदेव महाजन उपस्थित होते. तसेच संस्थेचे संचालक सतीश आप्पा चौधरी, योगेश पाटील, डॉ. पितांबर पाटील, जगदीश सोनार, सौ. मनीषा पाटील, शाळेचे मुख्याध्यापक एन. आर. ठाकरे, श्री. एम. एम. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शिरीष पाटील, माजी मुख्याध्यापक एस. एच. पवार, एस. एस. चौधरी, विश्वासराव साळुंखे, सुधीर पाटील, उपप्राचार्य वासुदेव वले, संस्थेतील माजी मुख्याध्यापक, विविध शाखांचे मुख्याध्यापक, उपमुख्याध्यापक, पर्यवेक्षक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महेश कौंडिण्य यांनी केले. एकूणच ही शोकसभा केवळ श्रद्धांजलीपुरती मर्यादित न राहता, स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या लोकाभिमुख नेतृत्वाचा, कर्तृत्वाचा आणि त्यांच्या प्रेरणादायी वारशाचा गौरव करणारी ठरली.

आज दि.07/02/2026 चे सर्व राशीचे भविष्य व शुभ अंक व रंग

0

Loading

मेष (Aries):
आज कामाच्या ठिकाणी जबाबदाऱ्या वाढतील. संयमाने व नियोजनाने काम केल्यास यश मिळेल. आर्थिक बाबतीत खर्च नियंत्रणात ठेवा. कुटुंबातील व्यक्तीचा सल्ला उपयुक्त ठरेल.
शुभ अंक: 9 | शुभ रंग: गडद लाल

वृषभ (Taurus):
आज स्थिरता व सुरक्षिततेची भावना वाढेल. व्यवसायात छोटा पण निश्चित लाभ होईल. जुने वाद मिटण्याची शक्यता आहे. आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका.
शुभ अंक: 6 | शुभ रंग: फिकट हिरवा

मिथुन (Gemini):
आज संवाद कौशल्यामुळे अडलेली कामे मार्गी लागतील. नवीन ओळखी फायदेशीर ठरू शकतात. प्रवासाचे योग संभवतात. मन आनंदी राहील.
शुभ अंक: 5 | शुभ रंग: पिवळा

कर्क (Cancer):
आज भावनांवर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. कामात लक्ष केंद्रित केल्यास प्रगती होईल. कुटुंबात शांतता राहील. आर्थिक परिस्थिती मध्यम राहील.
शुभ अंक: 2 | शुभ रंग: पांढरा

सिंह (Leo):
आज नेतृत्वगुण अधोरेखित होतील. वरिष्ठांकडून कौतुक मिळू शकते. आत्मविश्वास वाढेल. मात्र बोलताना शब्द जपून वापरा.
शुभ अंक: 1 | शुभ रंग: केशरी

कन्या (Virgo):
आज नियोजनबद्ध कामामुळे यश मिळेल. आरोग्याबाबत जागरूक रहा. आर्थिक निर्णय सावधपणे घ्या. सहकाऱ्यांचे सहकार्य लाभेल.
शुभ अंक: 4 | शुभ रंग: निळा

तूळ (Libra):
आज वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवनात समतोल साधावा लागेल. नवीन संधी समोर येतील. नातेसंबंधात सकारात्मक बदल होतील. खर्चावर लक्ष ठेवा.
शुभ अंक: 7 | शुभ रंग: गुलाबी

वृश्चिक (Scorpio):
आज आत्मविश्वास आणि धाडस वाढेल. महत्त्वाचे निर्णय घेण्यास दिवस योग्य आहे. आर्थिक लाभ संभवतो. गुप्त गोष्टी उघड होण्याची शक्यता आहे.
शुभ अंक: 8 | शुभ रंग: मरून

धनु (Sagittarius):
आज शिक्षण, अभ्यास किंवा नवीन कौशल्यासाठी उत्तम दिवस आहे. प्रवासातून अनुभव मिळेल. मित्रांचे सहकार्य लाभेल. आरोग्य चांगले राहील.
शुभ अंक: 3 | शुभ रंग: पिवळसर

मकर (Capricorn):
आज मेहनत आणि चिकाटी यांचे फळ मिळेल. नोकरीत स्थैर्य जाणवेल. वरिष्ठांशी संबंध सुधारतील. कौटुंबिक जबाबदाऱ्या वाढू शकतात.
शुभ अंक: 10 | शुभ रंग: करडा

कुंभ (Aquarius):
आज नवीन विचार आणि योजना प्रत्यक्षात आणता येतील. सामाजिक क्षेत्रात मान-सन्मान मिळेल. मित्रमंडळींचा पाठिंबा मिळेल. मन प्रसन्न राहील.
शुभ अंक: 11 | शुभ रंग: निळसर

मीन (Pisces):
आज अंतर्मुख होऊन निर्णय घेण्याचा दिवस आहे. अध्यात्मिक विचार वाढतील. खर्चावर नियंत्रण ठेवा. कुटुंबातील व्यक्तीकडून आधार मिळेल.
शुभ अंक: 12 | शुभ रंग: फिकट निळा

वाचकांनी वरील भविष्यवाणीचा अर्थ अचूक भविष्यवाणी म्हणून लावता केवळ आत्मपरीक्षण आणि सकारात्मक प्रेरणा म्हणून घ्यावा.

आज दि.04/02/2026 चे सर्व राशीचे भविष्य व शुभ अंक व रंग

0

Loading

मेष
आज निर्णय घेताना स्पष्टता राहील. कामात नवीन जबाबदाऱ्या मिळू शकतात. आत्मविश्वासाच्या जोरावर अडचणी दूर होतील. आर्थिक बाबतीत संयम आवश्यक आहे.
शुभ अंक: 9 | शुभ रंग: लाल

वृषभ
आज स्थैर्य आणि व्यवहारकौशल्य उपयोगी पडेल. कुटुंबातील प्रश्न शांतपणे सोडवता येतील. खर्चावर नियंत्रण ठेवल्यास लाभ होईल. दिवस समाधानकारक आहे.
शुभ अंक: 6 | शुभ रंग: हिरवा

मिथुन
संवाद आणि विचारांची देवाणघेवाण आज महत्त्वाची ठरेल. नवीन माहिती किंवा संधी मिळू शकते. प्रवासाचे योग संभवतात. उत्साह टिकून राहील.
शुभ अंक: 5 | शुभ रंग: पिवळा

कर्क
आज भावनिक समतोल राखणे गरजेचे आहे. कामात लक्ष दिल्यास अपेक्षित परिणाम मिळतील. घरगुती वातावरण सुधारेल. आर्थिक निर्णय विचारपूर्वक घ्या.
शुभ अंक: 2 | शुभ रंग: पांढरा

सिंह
आज तुमच्या नेतृत्वगुणांना संधी मिळेल. वरिष्ठ किंवा ज्येष्ठ व्यक्तींचा पाठिंबा लाभेल. मानसन्मान वाढण्याची शक्यता आहे. नम्रता ठेवा.
शुभ अंक: 1 | शुभ रंग: केशरी

कन्या
आज बारकावे आणि शिस्त महत्त्वाची ठरेल. कामात सातत्य ठेवल्यास प्रगती होईल. आरोग्याकडे लक्ष द्या. अनावश्यक टीका टाळा.
शुभ अंक: 4 | शुभ रंग: फिकट हिरवा

तुला
नातेसंबंधात समतोल साधावा लागेल. निर्णय घेताना मन आणि व्यवहार दोन्हींचा विचार करा. आर्थिक व्यवहारात सावधगिरी आवश्यक आहे.
शुभ अंक: 7 | शुभ रंग: गुलाबी

वृश्चिक
आज गुप्त योजना किंवा विचार प्रत्यक्षात आणण्याचा दिवस आहे. संयम ठेवल्यास फायदा होईल. मेहनतीचे फळ लवकरच मिळण्याचे संकेत आहेत.
शुभ अंक: 8 | शुभ रंग: जांभळा

धनु
आज आशावाद आणि उत्साह वाढलेला राहील. नवीन कामाची सुरुवात करण्यास अनुकूल दिवस आहे. शिक्षण आणि प्रवासासाठी चांगला काळ आहे.
शुभ अंक: 3 | शुभ रंग: निळा

मकर
आज जबाबदाऱ्यांची जाणीव अधिक राहील. शिस्त आणि मेहनतीमुळे कामात प्रगती होईल. आर्थिक बाबतीत स्थैर्य राखले जाईल.
शुभ अंक: 10 | शुभ रंग: तपकिरी

कुंभ
नवीन विचार आणि प्रयोग यामुळे यश मिळू शकते. मित्रांकडून सहकार्य मिळेल. बदल स्वीकारल्यास दिवस लाभदायक ठरेल.
शुभ अंक: 11 | शुभ रंग: आकाशी

मीन
आज सर्जनशीलता आणि संवेदनशीलता वाढलेली राहील. कला, लेखन किंवा ध्यानासाठी योग्य दिवस आहे. मनःशांती अनुभवता येईल.
शुभ अंक: 12 | शुभ रंग: समुद्री हिरवा

वाचकांनी वरील भविष्यवाणीचा अर्थ अचूक भविष्यवाणी म्हणून लावता केवळ आत्मपरीक्षण आणि सकारात्मक प्रेरणा म्हणून घ्यावा.

आज दि.03/02/2026 चे सर्व राशीचे भविष्य व शुभ अंक व रंग

0

Loading

मेष
आज कामात गती येईल आणि आत्मविश्वास वाढलेला जाणवेल. अडथळे दूर करण्याची संधी मिळेल. सहकाऱ्यांचे सहकार्य लाभेल. आर्थिक व्यवहार करताना घाई टाळा.
शुभ अंक: 9 | शुभ रंग: लाल

वृषभ
आज स्थिरता आणि संयम राखणे गरजेचे आहे. नियोजनपूर्वक काम केल्यास अपेक्षित यश मिळेल. घरगुती विषयात समजूतदार भूमिका घ्या. खर्चावर नियंत्रण ठेवा.
शुभ अंक: 6 | शुभ रंग: हिरवा

मिथुन
संवादकौशल्यामुळे आज अनेक प्रश्न सुटू शकतात. नवीन संपर्क लाभदायक ठरतील. प्रवास किंवा बदलाचे संकेत आहेत. मन प्रसन्न राहील.
शुभ अंक: 5 | शुभ रंग: पिवळा

कर्क
आज भावनिक संवेदनशीलता वाढलेली राहील. कामात लक्ष केंद्रित केल्यास समाधान मिळेल. कुटुंबातील व्यक्तींशी संवाद वाढवा. आर्थिक बाबतीत सावध रहा.
शुभ अंक: 2 | शुभ रंग: पांढरा

सिंह
आज नेतृत्वगुण पुढे येतील. महत्त्वाचे निर्णय घेण्याची संधी मिळेल. वरिष्ठांकडून मान्यता मिळण्याची शक्यता आहे. नम्रता ठेवल्यास यश वाढेल.
शुभ अंक: 1 | शुभ रंग: केशरी

कन्या
आज बारकाईने काम करण्याची गरज आहे. वेळेचे योग्य नियोजन केल्यास ताण कमी होईल. आरोग्याची काळजी घ्या. अनावश्यक चिंता टाळा.
शुभ अंक: 4 | शुभ रंग: फिकट हिरवा

तुला
नातेसंबंधात संतुलन राखावे लागेल. निर्णय घेताना घाई नको. आर्थिक व्यवहारात स्पष्टता ठेवा. दिवस मध्यम पण स्थिर आहे.
शुभ अंक: 7 | शुभ रंग: गुलाबी

वृश्चिक
आज अंतर्मुख होऊन विचार करण्याचा दिवस आहे. गोष्टी शांतपणे हाताळल्यास फायदा होईल. मेहनतीचे परिणाम हळूहळू दिसू लागतील.
शुभ अंक: 8 | शुभ रंग: जांभळा

धनु
आज उत्साह आणि आशावाद वाढलेला राहील. नवीन संधी तुमच्याकडे चालून येऊ शकतात. शिक्षण व प्रवासासाठी अनुकूल दिवस आहे.
शुभ अंक: 3 | शुभ रंग: निळा

मकर
आज जबाबदाऱ्या वाढल्या तरी तुम्ही त्या समर्थपणे पार पाडाल. कामात शिस्त ठेवल्यास प्रगती होईल. आर्थिक स्थिती स्थिर राहील.
शुभ अंक: 10 | शुभ रंग: तपकिरी

कुंभ
नवीन कल्पना आणि वेगळा दृष्टिकोन आज फायदेशीर ठरेल. सामाजिक संपर्क वाढतील. अचानक बदल स्वीकारावे लागतील. मन सकारात्मक ठेवा.
शुभ अंक: 11 | शुभ रंग: आकाशी

मीन
आज सर्जनशील विचारांना चालना मिळेल. भावनांना योग्य दिशा दिल्यास मनःशांती लाभेल. विश्वासू व्यक्तीकडून सहकार्य मिळेल.
शुभ अंक: 12 | शुभ रंग: जांभळट निळा

वाचकांनी वरील भविष्यवाणीचा अर्थ अचूक भविष्यवाणी म्हणून लावता केवळ आत्मपरीक्षण आणि सकारात्मक प्रेरणा म्हणून घ्यावा.

अतिवृष्टीग्रस्त बहिरम नगरमधील नागरिकांना मदतीचे आदेश; नुकसानभरपाई व योजनांवर तहसीलदारांची तातडीची दखल

0

Loading

पाचोरा – शहरात 22 नोव्हेंबर 2025 रोजी झालेल्या मुसळधार अतिवृष्टीमुळे बहिरम नगर परिसरात मोठ्या प्रमाणावर वित्तीय व जीवनावश्यक नुकसानीची झळ नागरिकांना बसली होती. घरांमध्ये पाणी शिरणे, संसारोपयोगी साहित्याचे नुकसान, भिंती व छतांना तडे जाणे, तसेच काही ठिकाणी अन्नधान्य साठा व कागदपत्रे भिजून खराब होण्याच्या घटना घडल्या. या पार्श्वभूमीवर शासनाकडून जाहीर होणारी नुकसानभरपाई अद्याप काही नागरिकांना मिळालेली नसल्याने परिसरात नाराजीचे वातावरण निर्माण झाले होते. या प्रकरणी बहिरम नगरमधील बाधित नागरिकांनी एकत्र येत माननीय तहसीलदार पाचोरा यांना लेखी स्मरणपत्र सादर केले. स्मरणपत्रात नुकसान झालेल्या घरांची पाहणी, पंचनामे पूर्ण करून प्रलंबित प्रकरणांवर तातडीने निर्णय घेण्याची मागणी करण्यात आली. स्मरणपत्र प्राप्त होताच तहसीलदार साहेबांनी विषयाची गंभीर दखल घेत संबंधित महसूल अधिकाऱ्यांना त्वरित कारवाईचे आदेश दिले. प्रलंबित अहवालांची पडताळणी करून पात्र लाभार्थ्यांना नुकसानभरपाई लवकरात लवकर अदा करण्याचे निर्देश देण्यात आले असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले. यासोबतच परिसरातील अनेक कुटुंबांना स्वस्त धान्य दुकानातून नियमित रेशन मिळण्यात येणाऱ्या अडचणींबाबतही नागरिकांनी तक्रारी मांडल्या. काहींची रेशन कार्डे अद्ययावत नसणे, नावनोंदणीतील त्रुटी, तर काहींच्या कुटुंबीय बदलांमुळे लाभ थांबले असल्याचे निदर्शनास आणून देण्यात आले. या संदर्भात तहसीलदार साहेबांनी अन्न व नागरी पुरवठा विभागाशी समन्वय साधून पात्र नागरिकांना त्वरित रेशन उपलब्ध करून देण्याची प्रक्रिया गतिमान करण्याचे आश्वासन दिले. तसेच, आर्थिकदृष्ट्या दुर्बल व निराधार कुटुंबांसाठी महत्त्वाच्या असलेल्या संजय गांधी निराधार योजनेच्या लाभासाठी सादर करण्यात आलेल्या अर्जांवरही तातडीने निर्णय घेण्याचे निर्देश देण्यात आले. अर्जांची छाननी, आवश्यक कागदपत्रांची पूर्तता आणि मंजुरी प्रक्रिया वेगाने पूर्ण करून पात्र लाभार्थ्यांना नियमित सहाय्य सुरू करण्याबाबत प्रशासन कटिबद्ध असल्याचे तहसीलदारांनी स्पष्ट केले. यामुळे अतिवृष्टीने आधीच संकटात सापडलेल्या कुटुंबांना दिलासा मिळण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे. या बैठकीदरम्यान ॲड. अंबादास गोसावी, श्याम पाटील, गणेश भोसले उपस्थित होते. त्यांनीही बाधित नागरिकांच्या समस्या मांडत प्रशासनाने दाखविलेल्या तत्परतेचे स्वागत केले. प्रशासनाकडून दिलेल्या आश्वासनांची अंमलबजावणी वेळेत होऊन प्रत्यक्ष लाभ नागरिकांपर्यंत पोहोचेल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली. बहिरम नगरमधील नागरिकांनी प्रशासनाच्या या निर्णयामुळे दिलासा मिळाल्याची भावना व्यक्त करत, पुढील काळातही समस्यांवर संवेदनशीलतेने कारवाई व्हावी, अशी मागणी केली आहे.

ताज्या बातम्या

error: Content is protected !!