Home Blog Page 52

पाचोरा तहसील अनुदान घोटाळा – “करे कोई, भरे कोई” अन्यायाविरुद्ध जनआक्रोश, निर्दोषांच्या पाठीशी उभे राहण्याची वेळ

0

Loading

पाचोरा – तालुक्यातील तहसील कार्यालयातून उघडकीस आलेल्या प्रचंड अनुदान घोटाळ्यामुळे संपूर्ण तालुका हादरून गेला आहे. या घोटाळ्यातील पैसे खाणारे मोकाट फिरत आहे तर कोणतेही कायदेशीर आदेश – नियम नसतांना आपले व आपल्या सहकाऱ्यांची केलेले चुकीच्या कृत्यांवर पांघरू घालण्यासाठी तसेच अपहार केलेली हरामाची रक्कम पचवण्यासाठी निर्दोष शेतकरी, युवक व सामान्य नागरिकांना अन्यायकारक पद्धतीने पैसे भरावे लागत आहेत, बँक खाती सील केली जात आहेत, तर मानसिक छळ सहन करावा लागत आहे. ही स्थिती म्हणजे अगदी “करे कोई, भरे कोई” असे चित्र निर्माण झाले आहे. गेल्या दोन वर्षांत (2022 ते 2024) शेतकरी अनुदान योजनेंतर्गत शासनाने दिलेला निधी शेतकऱ्यांच्या खिशात पोहोचण्याऐवजी काही भ्रष्ट अधिकाऱ्यांनी ,कर्मचारी , एजंट यांनी स्वतःच्या फायद्यासाठी अपहार केला. मालमत्ता विकत घेतल्या प्रथम दर्शनी व चौकशी पारदर्शक विश्वासपात्र नसली तरी तब्बल एक कोटी वीस लाखांहून अधिक रक्कम बेकायदेशीर मार्गाने वळवण्यात आल्याचे चौकशीत स्पष्ट झाले आहे. महसूल सहाय्यक अमोल भोई आणि मुख्यमंत्री युवा प्रशिक्षणार्थी गणेश चव्हाण यांचा सहभाग दाखवुन निर्दोष व्यक्तींकडून नियमबाह्य वसुलीचा तागादा लावत प्रकरण गुंडाळण्याचा प्रयत्न जोरदार सुरू आहे सर्वात धक्कादायक बाब म्हणजे – घोटाळ्यातील खरे मास्टर माईड चौकशीतून सहज बाजूला खड्यासारखे बाहेर फेकलेले दोषी अजूनही मोकाट फिरत आहेत, मात्र निर्दोषांना यात ओढले जात आहे. काहींना पैसे भरायला भाग पाडले तर काहींना पैसे भरायला भाग पाडले जात आहे, तर काहींची खाती बेकायदेशीर थेट सील करण्यात आली आहेत. यातून शेतकरी, महिला व विद्यार्थी वर्गावर प्रचंड मानसिक ताण निर्माण झाला आहे. शासनाच्या योजनांचा लाभ मिळण्याऐवजी, निरपराध लोकच यात बळी पडत आहेत. तालुक्यात जनआक्रोश वाढत चालला आहे. लोकांचा प्रश्न स्पष्ट आहे – “पैसे खाणारे मोकाट कसे? आणि निर्दोषच का भरपाई करतील?” हे दृश्य म्हणजे न्यायव्यवस्थेवरील विश्वास डळमळीत करणारे आहे. या प्रकरणातून एक महत्त्वाचा मुद्दा अधोरेखित होतो – शेतकरी व सामान्य माणसाच्या पाठीशी उभे राहण्याची वेळ आता राजकीय व सामाजिक संघटनांवर आली आहे. केवळ निवडणुका जवळ आल्या की शेतकऱ्यांच्या हक्कांसाठी आवाज उठवण्याऐवजी, या निर्णायक क्षणी ठोस भूमिका घेणे आवश्यक आहे. अन्यथा शेतकरी, युवक व विद्यार्थी वर्गात असलेला रोष येत्या काळात अधिक तीव्र होऊ शकतो. किंबहुना एखादी चुकीची घटना देखील घडू शकते सर्व दोषींवर कठोर फौजदारी कारवाई करून अपहार झालेली संपूर्ण रक्कम त्यांच्या कडून वसूल करावी. निर्दोष व्यक्तींच्या खात्यांवरील अन्यायकारक कारवाई तातडीने मागे घ्यावी. शेतकरी व विद्यार्थ्यांना मानसिक, आर्थिक दिलासा देण्यासाठी शासनाने विशेष उपाययोजना कराव्यात. हा घोटाळा केवळ आर्थिक अपहारापुरता मर्यादित नाही. हा समाजाच्या विश्वासाशी, शेतकऱ्यांच्या हक्कांशी आणि तरुणाईच्या भविष्यासोबत केलेला घोर विश्वासघात आहे. दोषींना शिक्षा होईपर्यंत व निर्दोषांना न्याय मिळेपर्यंत हा लढा सुरू ठेवणे गरजेचे आहे संपूर्ण घटनेतून उभे राहणारे चित्र हे अत्यंत वेदनादायक आहे – “करे कोई, भरे कोई”. त्यामुळेच शेतकरी, युवक व सामान्य माणसाच्या बाजूने आता प्रत्येक राजकीय नेत्याने,पक्षाने व सामाजिक संघटनेने रस्त्यावर उतरून ठोस आवाज उठवण्याची गरज निर्माण झाली आहे.

आज दि.12/09/2025 चे सर्व राशीचे भविष्य व शुभ अंक व रंग

0

Loading

मेष – आज महत्वाचे काम वेळेत पूर्ण होईल. कौटुंबिक जीवनात आनंद राहील. प्रवास फायदेशीर ठरेल. आर्थिक स्थिती स्थिर राहील.
शुभ अंक – २ │ शुभ रंग – लाल

वृषभ – घरगुती वातावरण आनंदी राहील. आर्थिक व्यवहारात फायदा होईल. नोकरीत प्रगतीची शक्यता. आरोग्य उत्तम राहील.
शुभ अंक – ७ │ शुभ रंग – हिरवा

मिथुन – मित्रांचा सहकार्य लाभेल. कामात लक्ष केंद्रीत करा. नवीन कामाची सुरुवात फायदेशीर ठरेल. खर्चावर नियंत्रण ठेवा.
शुभ अंक – ५ │ शुभ रंग – पिवळा

कर्क – आज नवे संपर्क उपयोगी ठरतील. प्रवासाची शक्यता आहे. कौटुंबिक जबाबदाऱ्या वाढतील. मन प्रसन्न राहील.
शुभ अंक – १ │ शुभ रंग – पांढरा

सिंह – मान-सन्मान मिळेल. कार्यक्षेत्रात नवीन संधी मिळतील. आत्मविश्वास वृद्धिंगत होईल. आरोग्य चांगले राहील.
शुभ अंक – ९ │ शुभ रंग – केशरी

कन्या – आरोग्याबाबत काळजी घ्या. खर्चात वाढ होईल. निर्णय घेण्यात संयम ठेवा. घरगुती कामात व्यस्त राहाल.
शुभ अंक – ४ │ शुभ रंग – राखाडी

तुळ – व्यवसायात प्रगती होईल. मित्रांचा आधार लाभेल. नोकरीत स्थैर्य येईल. आनंददायी बातमी मिळेल.
शुभ अंक – ३ │ शुभ रंग – निळा

वृश्चिक – आज आर्थिक लाभ होईल. कामकाजात यश मिळेल. नातेवाईकांशी संवाद वाढेल. आरोग्य चांगले राहील.
शुभ अंक – ८ │ शुभ रंग – काळा

धनु – प्रवास लाभदायी ठरेल. कार्यक्षेत्रात नवीन संधी मिळतील. सामाजिक कार्यात मान मिळेल. मन प्रसन्न राहील.
शुभ अंक – ६ │ शुभ रंग – पिवळा

मकर – खर्च वाढेल पण अपेक्षित लाभही मिळेल. नोकरीत जबाबदाऱ्या वाढतील. कुटुंबाचा आधार लाभेल. संयमाने वागा.
शुभ अंक – ५ │ शुभ रंग – तपकिरी

कुंभ – विद्यार्थ्यांसाठी दिवस लाभदायी. नवे प्रकल्प सुरू करता येतील. मित्रपरिवाराचा सहवास मिळेल. आरोग्य सुधारेल.
शुभ अंक – ७ │ शुभ रंग – आकाशी

मीन – धार्मिक व सामाजिक कामात सहभाग घ्याल. कौटुंबिक जीवन आनंदी राहील. अनपेक्षित खर्च संभवतो. संयम ठेवा.
शुभ अंक – ९ │ शुभ रंग – जांभळा

वाचकांनी वरील भविष्यवाणीचा अर्थ अचूक भविष्यवाणी म्हणून लावता केवळ आत्मपरीक्षण आणि सकारात्मक प्रेरणा म्हणून घ्यावा.

अमळनेरात पत्रकारांसाठी राज्यस्तरीय दोन दिवसीय ‘व्हॉईस ऑफ मीडिया पदाधिकारी केडर कॅम्प’ : पत्रकारांच्या सक्षमीकरणासाठी अनोखी दिशा

0

Loading

अमळनेर : पत्रकार हे समाजाचे डोळे व कान मानले जातात. समाजातील अन्याय, भ्रष्टाचार, विकास, धोरणे, शेतकरी-अडचणी, सामान्य जनतेचे प्रश्न यांचा वेध घेऊन शासन-प्रशासनापर्यंत पोहोचविण्याचे महान कार्य पत्रकारितेमार्फत पार पडते. मात्र, आजच्या काळात पत्रकारांवर अनेक प्रकारच्या आव्हानांचा डोंगर उभा राहिला आहे. तांत्रिक बदल, डिजिटल माध्यमांची झपाट्याने वाढ, खोटी माहिती पसरविण्याचे धोके, तसेच व्यावसायिक असुरक्षितता यामुळे पत्रकारांच्या कार्यक्षमतेसोबतच संघटनात्मक ऐक्य वाढविणे ही काळाची गरज बनली आहे. याच पार्श्वभूमीवर पत्रकारांना सजग, सक्षम आणि संघटित करण्यासाठी ‘व्हॉईस ऑफ मीडिया’ या संस्थेतर्फे राज्यस्तरीय दोन दिवसीय पदाधिकारी केडर कॅम्प अमळनेर येथे आयोजित करण्यात आला आहे. १३ व १४ सप्टेंबर २०२५ रोजी सकाळी ९ वाजता या शिबिराला सुरुवात होणार असून, अमळनेर शहरातील ऐतिहासिक व प्रसिद्ध श्री मंगळग्रह मंदिराच्या परिसरात हे आयोजन होणार आहे. विशेष म्हणजे या उद्घाटन सोहळ्यासाठी माजी मंत्री तथा आमदार अनिल पाटील प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहून शिबिराचे उद्घाटन करणार आहेत. तर खासदार स्मिता वाघ या शिबिराच्या प्रमुख मार्गदर्शिका म्हणून कार्यरत राहून पत्रकारांना प्रेरणादायी विचार मांडतील. या राज्यस्तरीय शिबिरासाठी संघटनेचे संस्थापक व राष्ट्रीय अध्यक्ष संदीप काळे, राष्ट्रीय महासचिव दिव्या भोसले, प्रदेशाध्यक्ष अनिल म्हस्के, प्रदेश सरचिटणीस डॉ. डिगंबर महाले, यांच्यासह अनेक मान्यवर पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. त्यांच्या मार्गदर्शनामुळे या शिबिराचा दर्जा अधिक उंचावणार असून, राज्यभरातील पत्रकारांसाठी हा उपक्रम प्रेरणादायी ठरणार आहे. ‘व्हॉईस ऑफ मीडिया’ ही संघटना गेल्या काही वर्षांपासून पत्रकारांच्या हक्कांसाठी लढा देत आहे. ग्रामीण भागातील छोट्या वर्तमानपत्रांपासून ते शहरातील मोठ्या माध्यमांपर्यंत कार्य करणाऱ्या पत्रकारांना एकत्र आणणे, त्यांच्या समस्यांचे निराकरण शासन-प्रशासनासमोर ठामपणे मांडणे, पत्रकार सुरक्षा विधेयकासाठी सातत्याने आवाज उठवणे, तसेच पत्रकारांच्या व्यावसायिक कौशल्यात वाढ घडवून आणणे या संस्थेच्या कामामुळे तिचे महत्त्व सातत्याने वाढत आहे. पत्रकारांच्या मागण्यांवर सातत्याने पांढरपेशा आंदोलन राबविणारी ही संघटना आता प्रशिक्षण आणि केडर बांधणीवरही भर देत आहे. या दोन दिवसीय केडर कॅम्पमध्ये विविध महत्त्वपूर्ण सत्रांचे आयोजन करण्यात आले आहे. त्यामध्ये – पत्रकार सुरक्षेवरील विचारमंथन : पत्रकारांवर होणारे हल्ले, धमक्या, ब्लॅकमेलिंग, तसेच खोट्या गुन्ह्यांमध्ये अडकविण्याच्या घटना वाढत आहेत. अशा परिस्थितीत पत्रकारांनी कायदेशीर तयारी कशी ठेवावी, स्वतःचे व सहकाऱ्यांचे संरक्षण कसे करावे, यावर तज्ज्ञ मार्गदर्शन दिले जाणार आहे. संघटनात्मक प्रशिक्षण व जबाबदाऱ्या : संघटनेतील प्रत्येक पदाधिकारीची जबाबदारी काय, त्यांचे कार्यक्षेत्र कसे ठरवावे, एकत्रित पद्धतीने संघटन कसे मजबूत करावे, या मुद्द्यांवर विशेष मार्गदर्शन होणार आहे. डिजिटल मीडिया कौशल्य कार्यशाळा : आजकाल यूट्यूब, सोशल मीडिया, वेब पोर्टल, पॉडकास्ट या माध्यमांचा वापर पत्रकारितेत प्रचंड वाढला आहे. या क्षेत्रात कसोटीला उतरणारी पत्रकारिता कशी घडवावी, तांत्रिक बाबींचे ज्ञान कसे मिळवावे, या दृष्टीने पत्रकारांना प्रत्यक्ष प्रशिक्षण दिले जाणार आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आणि पत्रकारिता : आधुनिक तंत्रज्ञान पत्रकारितेत किती प्रमाणात वापरावे, एआयमुळे संधी व धोके कोणते, त्यातून बातमी संकलन व सादरीकरण कसे बदलू शकते, यावर चर्चासत्र आयोजित केले जाणार आहे. पत्रकार-शासन संवादाचे धोरण : पत्रकारांनी आपले प्रश्न वाचकांपर्यंत पोहोचवताना शासनाशी संवाद साधण्याची पद्धत कशी असावी, पत्रकारिता आणि प्रशासन यातील समतोल कसा राखावा, यावर संवादात्मक सत्र होईल. ठराव व कार्यआराखडा : शिबिराच्या अखेरीस पत्रकारांच्या हक्कांशी संबंधित ठराव मंजूर करून आगामी कार्यआराखडा जाहीर केला जाणार आहे. या सत्रांमुळे पत्रकारांना केवळ व्यावसायिक ज्ञानच मिळणार नाही, तर संघटनात्मक ताकदही वाढणार आहे. शिबिरात मार्गदर्शक म्हणून विधानसभेचे माजी अध्यक्ष अरुणभाई गुजराथी, नाशिकचे ज्येष्ठ पत्रकार विश्वास देवकर, प्रा. अशोक पवार, तसेच ज्येष्ठ पत्रकार डॉ. युवराज परदेशी यांचे विचार पत्रकारांना लाभणार आहेत. हे सर्व मान्यवर आपल्या समृद्ध अनुभवाच्या आधारे पत्रकारांसमोर कार्यशैली, तत्त्वनिष्ठता, आणि आव्हानांचा सामना करण्याचे मार्ग उलगडून दाखवतील. अमळनेरसारख्या सांस्कृतिक व ऐतिहासिक परंपरेने समृद्ध शहरात हे आयोजन होत असल्यामुळे राज्यभरातून पत्रकार मोठ्या संख्येने सहभागी होतील अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. अमळनेर शहराच्या दृष्टीनेही हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरणार आहे, कारण येथे पत्रकारिता क्षेत्रासाठी अशा प्रकारचे राज्यस्तरीय शिबिर प्रथमच होत आहे. संपूर्ण राज्यातील पत्रकार पदाधिकाऱ्यांना व्यासपीठ उपलब्ध करून देणे, परस्पर संवाद वाढविणे, आणि नव्या पिढीतील पत्रकारांना दिशा देणे हा या शिबिराचा खरा उद्देश आहे. पत्रकारांची खरी ताकद म्हणजे त्यांचे ज्ञान, त्यांची संवेदनशीलता, आणि त्यांची संघटनात्मक जाणीव. हाच विचार ‘व्हॉईस ऑफ मीडिया’ संघटनेच्या या उपक्रमातून अधोरेखित होत आहे. एकंदरीत, अमळनेरात होणारा हा राज्यस्तरीय दोन दिवसीय ‘व्हॉईस ऑफ मीडिया पदाधिकारी केडर कॅम्प’ हा पत्रकारांसाठी एक शिक्षण, चिंतन आणि संघटनात्मक शक्तीचा उत्सव ठरणार आहे. या शिबिरातून पुढे येणाऱ्या पत्रकार चळवळीला नवी ऊर्जा मिळेल आणि पत्रकारांच्या हक्कांच्या लढ्याला अधिक धार येईल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.

कामगार चळवळीचे ज्येष्ठ नेते कॉम्रेड एम. ए. पाटील यांचे निधन

0

Loading

मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : कामगार चळवळीतील प्रखर लढवय्या आणि सर्व श्रमिक संघ महाराष्ट्र राज्याचे प्रणेते कॉम्रेड मारुती आबा पाटील (एम. ए. पाटील) यांचे आज, ११ सप्टेंबर २०२५ रोजी पहाटे मुंबईतील निवासस्थानी अल्पशा आजाराने निधन झाले. ते वयाच्या ७८–८०व्या वर्षीही सक्रिय राहून कामगार चळवळीत कार्यरत होते. जवळपास पाच दशकांहून अधिक काळ ते संघटनेचे अध्यक्ष व मार्गदर्शक होते.

कॉम्रेड पाटील यांनी १९७० च्या दशकापासून सर्व श्रमिक संघात पूर्णवेळ कार्यकर्ता म्हणून काम केले. वाळू उपसा कामगार, रोलिंग मिल कामगार, कोतवाल, वनकामगार, ऊसतोड कामगार, अंगणवाडी कर्मचारी, आशा कर्मचारी आणि शासनाच्या बांधकाम विभागातील कर्मचाऱ्यांना संघटित करून त्यांचे हक्क मिळवून दिले. त्यांच्या प्रयत्नांतून बांधकाम व वन विभागातील शेकडो कर्मचारी कायमस्वरूपी सेवेत रुजू झाले.

अंगणवाडी आणि आशा कर्मचाऱ्यांच्या सेवा शर्तींमध्ये सुधारणा तसेच वेतनवाढीसाठी त्यांनी सातत्याने संघर्ष केला. कोरोना काळात, वयोमानाचा विचार न करता, त्यांनी मंत्रालयात जाऊन संबंधित मंत्र्यांशी प्रत्यक्ष चर्चा करून कर्मचाऱ्यांचे पगार नियमित ठेवण्यास मोठा वाटा उचलला.

गेल्या आठवड्यापर्यंत ते कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करत आणि संघटनात्मक कामकाजात व्यस्त होते. त्यांच्या निधनाने कामगार चळवळीचे मोठे नुकसान झाले असून, सर्व श्रमिक संघ तसेच विविध कामगार संघटनांकडून हळहळ व्यक्त केली जात आहे. संघटनेचे वरिष्ठ पदाधिकारी म्हणाले, “कॉम्रेड पाटील यांनी असंघटित व दुर्लक्षित कामगारांना आवाज दिला. त्यांचे योगदान विसरणे अशक्य आहे.” कॉम्रेड पाटील यांना लाल सलाम अर्पण करून श्रद्धांजली वाहण्यात येत आहे.

कामगार चळवळीचे ज्येष्ठ नेते कॉम्रेड मारुती आबा पाटील

0

Loading

कॉम्रेड मारुती आबा पाटील हे महाराष्ट्रातील कामगार चळवळीतील एक अद्वितीय व्यक्तिमत्त्व होते. त्यांच्या नेतृत्वाखाली “सर्व श्रमिक संघ महाराष्ट्र राज्य” या संघटनेने कामगारांच्या हक्कांसाठी सातत्याने आवाज उठवला. ही संघटना १९७० च्या दशकात स्थापन झाली, जेव्हा महाराष्ट्रातील कामगार वर्ग अनेक सामाजिक व आर्थिक अडचणींमध्ये अडकला होता. पाटील यांनी या संघटनेच्या माध्यमातून तळागाळातील कामगारांना संघटित करून न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न केला आणि संघटनेचा इतिहास कामगार अधिकारांसाठीच्या संघर्षाने भरलेला आहे.

कॉम्रेड पाटील यांनी सुरुवातीपासूनच वाळू उपसा कामगार, रोलिंग मिल कामगार, कोतवाल, वनकामगार, ऊसतोड कामगार, अंगणवाडी कर्मचारी, आशा कर्मचारी आणि शासनाच्या बांधकाम विभागातील कर्मचाऱ्यांना संघटित केले. अंदाजे १५०० हून अधिक कामगार त्यांच्या प्रयत्नांतून संघटित झाले, ज्यामध्ये शेकडो कर्मचाऱ्यांना कायमस्वरूपी नोकरी मिळाली. त्यांच्या नेतृत्वामुळे कामगार वर्गाला सामाजिक ओळख आणि आर्थिक सुरक्षा मिळाली.

संघटनात्मक कामकाजात त्यांनी अनेक अडचणींवर मात केली. स्थानिक प्रशासन, शासकीय अधिकारी आणि विरोधकांच्या दबावासमोरही त्यांनी एक तटस्थ, परंतु ठाम भूमिका घेतली. त्यांनी राजकीय हस्तक्षेप, स्थानिक गटबाजी आणि विरोधकांच्या अडचणींचा सामना करत कामगारांसाठी ठोस निर्णय घेतले. या संघर्षातून त्यांची धैर्यशीलता आणि नेतृत्वाची गुणवत्ता स्पष्ट झाली, ज्यामुळे कामगार संघटना ठोस पद्धतीने कार्य करू शकली आणि विरोधकांनाही सामोरे जाण्याची क्षमता निर्माण झाली.

कॉम्रेड पाटील यांचे वैयक्तिक जीवनही प्रेरणादायी होते. त्यांनी नेहमी साधेपणा, संयम आणि समर्पणाचे मूल्य जपले. कोणत्याही वैयक्तिक लाभाशिवाय, समाज आणि कामगारांसाठी त्यांनी आपले जीवन अर्पण केले. त्यांच्या व्यक्तिमत्त्वातील साधेपणा, प्रामाणिकपणा आणि न्यायप्रियता हे गुण कार्यकर्त्यांना आणि संघटनांना सातत्याने प्रेरित करत राहिले.

अंगणवाडी व आशा कर्मचाऱ्यांसाठी त्यांनी विशेष प्रयत्न केले. सेवा शर्ती सुधारणे, वेतनवाढ सुनिश्चित करणे आणि सामाजिक ओळख मिळवून देणे हे त्यांचे मुख्य उद्दिष्ट होते. त्यांनी मंत्रालयात जाऊन प्रत्यक्ष संबंधित मंत्री, अधिकारी यांच्यासोबत संवाद साधून कामगारांसाठी सकारात्मक निर्णय घेण्यासाठी चर्चा केली. यामुळे या कर्मचाऱ्यांचे पगार नियमित राहिले आणि सेवा शर्ती सुधारण्यात मोठा बदल झाला.

कोरोना महामारीच्या काळात त्यांनी वयोमानाचा विचार न करता कामगारांसाठी सक्रिय भूमिका बजावली. त्यांनी शासकीय कार्यालयांना भेट दिली, समस्या नोंदवल्या आणि कर्मचाऱ्यांसाठी आवश्यक मदत सुनिश्चित केली. या काळात त्यांच्या प्रयत्नांमुळे कामगारांनी संकटाचा सामना यशस्वीरित्या केला, ज्यामुळे त्यांच्या नेतृत्वाची खरी छटा स्पष्ट झाली.

कॉम्रेड पाटील यांचे नेतृत्व फक्त संघटनात्मक नव्हते, तर ते मानसिक दृष्ट्या देखील अत्यंत सक्षम होते. त्यांनी कामगार चळवळीतील तणाव, राजकीय अडचणी आणि विरोधकांच्या संघर्षात संयम राखला. त्यांच्या कार्यपद्धतीत ‘साधेपणा आणि अखंडता’ हे तत्त्व कायम होते. यामुळे कामगार वर्गात त्यांच्यावर प्रगाढ विश्वास निर्माण झाला आणि संघटनेतील पिढ्या त्यांच्या मार्गदर्शनाखाली प्रेरित राहिल्या.

ग्रामीण भागातील कामगारांचे जीवनमान सुधारण्यासही त्यांचा मोठा वाटा होता. कोतवाल, वनकामगार, ऊसतोड कामगार यांसारख्या कामगारांना स्थिर नोकरी मिळवून देणे, हक्कांबाबत जागरूकता वाढवणे आणि आर्थिक सुरक्षा सुनिश्चित करणे हे त्यांच्या कार्याचे ठळक परिणाम ठरले. त्यांचे नेतृत्व या कामगार वर्गासाठी मार्गदर्शक ठरले आणि त्यांच्या प्रयत्नांमुळे कामगारांनी समाजात आपली उपस्थिती ठामपणे निर्माण केली.

कॉम्रेड पाटील यांचा प्रभाव फक्त महाराष्ट्रापुरता मर्यादित नव्हता; त्यांच्या कार्यपद्धतीने इतर राज्यांतील कामगार संघटनांनाही मार्गदर्शन मिळाले. विविध प्रशिक्षण कार्यक्रमांमध्ये आणि मार्गदर्शन बैठका आयोजित करून त्यांनी कामगार चळवळीतील नव्या पिढीला नेतृत्व शिकवले. त्यांच्या अनुभवातून अनेक संघटना सक्षम झाल्या आणि कामगार वर्गाची सामाजिक व आर्थिक जागरूकता वाढली. आज कॉम्रेड मारुती आबा पाटील यांचे निधन फक्त संघटनेसाठीच नव्हे, तर संपूर्ण कामगार चळवळीसाठी मोठे नुकसान आहे. त्यांच्या अनुभवाचा, साहसाचा आणि नेतृत्वाचा वारसा पुढील पिढ्यांसाठी प्रेरणास्त्रोत राहील.

©गुरुदत्त दिनकर वाकदेकर, मुंबई
दिनांक :११/०९/२०२५ वेळ : १३:०५

पाचोरा शेतकरी अनुदान घोटाळा आजचे आत्मदहन आंदोलन तुर्त स्थगीत – संदीप महाजन

0

Loading

पाचोरा – तालुक्यातील महसूल विभागात उघडकीस आलेल्या तब्बल सव्वा कोटी रुपयांच्या अनुदान घोटाळ्याला आता कायदेशीर व गुन्हेगारीचे स्वरूप प्राप्त झाले आहे. शासनाच्या योजना आणि शेतकऱ्यांचा हक्काचा पैसा यामध्ये झालेल्या फसवणुकीमुळे शेतकरी वर्गामध्ये तीव्र संताप उसळला आहे. आंदोलक संदीप महाजन यांनी याविरोधात आमरण उपोषणासह आत्मदहनाचा इशारा दिल्यानंतर प्रशासनाला तातडीने हालचाल करावी लागली, आणि अखेर हा गुन्हा जळगाव येथील आर्थिक गुन्हा शाखेकडे वर्ग करण्यात आला. सन 2022 ते 2024 या कालावधीत पाचोरा तहसील कार्यालयात मोठ्या प्रमाणावर गैरव्यवहार घडून आला. तत्कालीन महसूल सहाय्यक अमोल सुरेश भोई यांनी स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी मुख्यमंत्री युवा प्रशिक्षणार्थी गणेश हेमंत चव्हाण याच्यासोबत संगनमत करून शासनाच्या महसुलाचा अपहार केला. असे तहसील विभागाच्या प्राथमिक तपासात समोर आले की 2022-23 मध्ये 122 आणि 2024-25 मध्ये 225 अशा एकूण 347 व्यक्तींच्या नावाने खोटे अभिलेख तयार करून नैसर्गिक आपत्ती अनुदान वितरित करण्यात आले. जुन ते ऑक्टोबर 2022 मधील पंचनाम्यांचे अभिलेख खोट्या स्वरूपात तयार करून त्यावर बनावट शिक्के व सह्या करण्यात आल्या. इतकेच नव्हे तर तहसीलदार यांचे लॉगिन आयडी व पासवर्डचा अनधिकृत वापर करून शासकीय संगणकीय प्रणालीत प्रवेश केला गेला, ज्यामुळे गंभीर सुरक्षाभंग उघड झाला. या प्रकरणातील सर्वाधिक चिंताजनक बाब म्हणजे एमपीएससी, यूपीएससी तसेच पोलिस भरतीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांची वैयक्तिक कागदपत्रे या फसवणुकीत वापरण्यात आली. आधारकार्ड, पॅनकार्ड आणि बँक पासबुक यांच्या आधारे शेतकरी अनुदानाची रक्कम विद्यार्थ्यांच्या खात्यात जमा करण्यात आली. या कागदपत्रांचा वापर कसा झाला, ती आरोपींपर्यंत कशी पोहोचली आणि निधी पुढे कुठे वळविला गेला, हे अद्याप तपासाचा महत्त्वाचा मुद्दा आहे. प्राथमिक तपासानुसार आरोपी अमोल भोई यांनी संगनमताने शासनाचा ₹1,20,13,517/- इतका निधी अपहार केला आहे, ज्यामध्ये गणेश हेमंत चव्हाण याचा सहभाग असल्याचेही निष्पन्न झाले आहे. या प्रकरणाचा तपास सुरुवातीला तहसील विभागाने केला. परंतु या तपासामध्ये पूर्ण पारदर्शकता राहिलेली नाही, अशी शंका शेतकरी आंदोलक श्री महाजन यांनी व्यक्त केली आहे. आरोपी मध्ये तहसील कार्यालयातील तहसीलदार, अधिकारी, सर्कल, तलाठी तसेच CSC सेंटरचे हस्तक यांना सोयीस्करपणे बाजूला सारले गेले असून फक्त दोन व्यक्तींवर दोषारोप ठेवण्यात आले. त्यामुळे हा तपास एकतर्फी व संशयास्पद ठरतो याच कारणामुळे 2019-20 पासूनच्या सर्व प्रकरणांची चौकशी व्हावी, तसेच शिक्षण घेत असलेल्या युवकांची दिशाभूल करून त्यांना फसविणाऱ्या रॅकेटचा शोध घेऊन कठोर कारवाई करावी, अशी मागणी आजही संदीप महाजन यांची कायम आहे. या प्रकरणी पाचोरा पोलीस ठाण्यात गुन्हा क्र. 428/2025 नोंदविण्यात आला असला तरी सदरचा गुन्हा आर्थिक गुन्हा शाखेकडे वर्ग झाल्यानंतर प्र. उपअधीक्षक संदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष तपास पथकाने चौकशी सुरू केली आहे. दरम्यान दोन्ही आरोपींनी अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल केले आहेत. गणेश हेमंत चव्हाण यांच्या अर्जावर 9 सप्टेंबर रोजी सुनावणी होऊन पुढील तारीख 12 सप्टेंबर निश्चित झाली आहे, तर अमोल सुरेश भोई यांच्या अर्जावर 11 सप्टेंबर रोजी सुनावणी होणार आहे. या घोटाळ्यामुळे शेतकरी व विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड असंतोष पसरला आहे. या पार्श्वभूमीवर संदीप महाजन यांनी 1 सप्टेंबर रोजी प्रांताधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले. होते या मागण्यांची गंभीर दखल आमदार किशोरआप्पा पाटील यांनी तातडीने घेऊन प्रांताधिकारी भुषण अहिरे, तहसीलदार विजय बनसोडे व पोलीस निरीक्षक राहुलकुमार ।पवार यांच्या उपस्थितीत चर्चा झाली. मागण्या मान्य झाल्याने महाजन यांनी उपोषण मागे घेतले. मात्र, ठोस कारवाई न झाल्याने त्यांनी 11 सप्टेंबर रोजी आत्मदहन करण्याचा इशारा दिला. महाजन यांच्या आत्मदहनाच्या इशाऱ्यामुळे प्रशासन व पोलिस यंत्रणा सावध झाली. अवघ्या 24 तासांत गुन्हा आर्थिक गुन्हा शाखेकडे वर्ग करण्यात आला. तरीदेखील आंदोलक संदीप महाजन यांना या संदर्भात अधिकृत पत्र दिले गेले नव्हते. अखेरीस 10 सप्टेंबर रोजी तहसीलदार विजय बनसोडे यांनी पत्राद्वारे महाजन यांना माहिती दिली व आत्मदहन टाळण्याचे आवाहन केले. यानंतर महाजन यांनी आपला निर्णय तात्पुरता स्थगित केला. महाजन यांनी स्पष्ट केले की, आर्थिक गुन्हा शाखेतर्फे पारदर्शक तपास होऊन दोषींविरुद्ध आरोपपत्र दाखल झाल्यानंतरच शेतकरी व विद्यार्थ्यांना न्याय मिळणार आहे. त्यांनी शेतकऱ्यांना एकजुटीने पुढे येण्याचे आवाहन केले आहे. मे जिल्हा सत्र न्यायालय व मे औरंगाबाद उच्च न्यायालयात पिडीत शेतकऱ्यांच्या बाजूने विनामूल्य खाजगी वकिलांची फळी उभी राहणार असून, यासाठी शेतकऱ्यांकडून कोणत्याही प्रकारची आर्थीक मदत न घेता फक्त प्रतिज्ञापत्रे व सह्या अत्याआवश्यक आहेत. या घोटाळ्यामुळे महसूल विभागावरचा विश्वास कमी झाला असून, सर्वसामान्य जनतेत संभ्रम व संताप आहे. शेतकरी आणि विद्यार्थ्यांना न्याय मिळवण्यासाठी संदीप महाजन यांनी दिलेला लढा आज शेतकऱ्यांच्या संघर्षाचे प्रतीक बनला आहे. या प्रकरणाचा तपास 2019-20 पासून सखोल होऊन संपूर्ण रॅकेट उघडकीस येणे, दोषींना कठोर शिक्षा मिळणे आणि शेतकऱ्यांचा पैसा परत मिळणे हीच जनतेची व शेतकऱ्यांची आजची मुख्य अपेक्षा असुन यासाठी माझा लढा व सातत्य पाठपुरावा सुरूच राहणार असल्याचे शेतकरी आंदोलक संदीप महाजन यांनी सांगितले

आज दि.11/09/2025 चे सर्व राशीचे भविष्य व शुभ अंक व रंग

0

Loading

मेष – नोकरीत वरिष्ठांची मदत होईल. महत्वाचे निर्णय आज घेऊ नका. खर्चावर संयम ठेवा. आरोग्य सुधारेल.
शुभ अंक – ३ │ शुभ रंग – लाल

वृषभ – कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. आर्थिक लाभ संभवतो. सामाजिक प्रतिष्ठा वाढेल. प्रवासाचा योग आहे.
शुभ अंक – ६ │ शुभ रंग – हिरवा

मिथुन – कार्यक्षेत्रात अनुकूल बदल घडतील. मित्रपरिवाराचा आधार लाभेल. नवीन ओळखी उपयुक्त ठरतील. आरोग्य ठीक राहील.
शुभ अंक – ५ │ शुभ रंग – पिवळा

कर्क – अडकलेली कामे मार्गी लागतील. नोकरीत स्थैर्य येईल. कौटुंबिक जीवन समाधानकारक राहील. आत्मविश्वास वाढेल.
शुभ अंक – २ │ शुभ रंग – पांढरा

सिंह – मान-सन्मान मिळेल. महत्वाचे करार अनुकूल ठरतील. प्रवास फलदायी होईल. आत्मविश्वास वृद्धिंगत होईल.
शुभ अंक – ९ │ शुभ रंग – केशरी

कन्या – आरोग्याबाबत काळजी घ्या. पैशाचे नियोजन करा. कामकाजात संयम ठेवा. घरगुती वातावरण शांत राहील.
शुभ अंक – ४ │ शुभ रंग – राखाडी

तुळ – नवीन जबाबदाऱ्या मिळतील. आर्थिक स्थितीत सुधारणा होईल. मित्रपरिवाराचा सहकार्य लाभेल. नातेवाईकांशी संपर्क वाढेल.
शुभ अंक – ७ │ शुभ रंग – निळा

वृश्चिक – गुंतवणूक फायदेशीर ठरेल. कामकाज सुरळीत होईल. संबंध दृढ होतील. आरोग्य ठीक राहील.
शुभ अंक – ८ │ शुभ रंग – काळा

धनु – नवे मार्ग उघडतील. कार्यक्षेत्रात प्रगती होईल. प्रवास यशस्वी ठरेल. मन प्रसन्न राहील.
शुभ अंक – १ │ शुभ रंग – पिवळा

मकर – कुटुंबाचा आधार लाभेल. नोकरीत स्थैर्य येईल. खर्चात वाढ होईल. संयमाने वागा.
शुभ अंक – ५ │ शुभ रंग – तपकिरी

कुंभ – विद्यार्थ्यांसाठी दिवस लाभदायी. नवी योजना सुरू करता येईल. मित्र-नातेवाईकांचा सहवास लाभेल. आत्मविश्वास वाढेल.
शुभ अंक – ६ │ शुभ रंग – आकाशी

मीन – धार्मिक कार्यात सहभाग घ्याल. सामाजिक कार्यातून मान मिळेल. अनपेक्षित खर्च संभवतो. संयम आवश्यक आहे.
शुभ अंक – ९ │ शुभ रंग – जांभळा

वाचकांनी वरील भविष्यवाणीचा अर्थ अचूक भविष्यवाणी म्हणून लावता केवळ आत्मपरीक्षण आणि सकारात्मक प्रेरणा म्हणून घ्यावा.

पाचोरा शेतकरी अनुदान घोटाळा – सब गोलमाल है भाई, गोलमाल है!एका वर्षात पुनगाव रोड भागात तब्बल ९० लाख रुपये किमतीचे प्लॉट सासऱ्याच्या नावाने पैसे लाटणारा अद्याप पडद्यावर का नाही?

0

Loading

पाचोरा – तालुक्यातील शेतकरी अनुदान घोटाळा दिवसेंदिवस अधिकच संतापजनक, विस्मयकारक आणि हास्यास्पद वळण घेताना दिसत आहे. शेतकऱ्यांच्या हक्काच्या अनुदानाची अफरातफर होऊन ज्या कार्यालयाकडून शेतकऱ्यांना न्याय मिळायला हवा, त्याच कार्यालयात शेतकऱ्यांना अन्याय सहन करावा लागत आहे, असे चित्र स्पष्ट झाले आहे. या घोटाळ्याच्या मुळाशी तहसील कार्यालय असून, कितीही जबाबदारी झटकली तरी तात्कालीन तहसीलदारांच्या कर्तव्यातील कसूर अधोरेखित होते. प्रमुख तक्रारदाराने वरिष्ठांकडे अधिकृत तक्रार दाखल केली होती. या तक्रारीवर वरिष्ठांनी चौकशी समिती नेमून तपासाचे आदेश द्यायला हवे होते. परंतु, वरिष्ठ स्तरावर हालचाल सुरू होण्याआधीच तक्रारदाराला सोयीस्कर पद्धतीने बाजूला सारण्यात आले. किंबहुना काही प्रसार माध्यमांना पाकीटे देऊन बातम्या दाबणे, तक्रारदार,पत्रकार व मुळ आंदोलनकर्ते संदीप महाजन यांचे नांव बातमीतुन कट करायला लावणे सर्व काही तहसील विभागाने उघडकीस आणले असे भासवण्याचे हे काम युद्ध पातळीवर करण्यात आले व केले जात आहे पण “ए पब्लीक है बाबु सब जानती है ” नव्हे तर मागील तारखेत दुसऱ्याच व्यक्तीस तक्रारदार दाखवून तहसीलदारांनी स्वतःच्या मर्जीप्रमाणे चौकशी समिती गठित केली आणि केवळ दोन कर्मचाऱ्यांवर आरोपपत्र दाखल करून तडकाफडकी एफ.आय.आर. नोंदवली. या कृतीमुळे तहसीलदारांवर नियमबाह्यपणे काम केल्याचा ठपका ठेवला जात आहे. यातील गंभीर मुद्दा म्हणजे हा गुन्हा आधीच आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला असताना तहसील कार्यालयाकडून हस्तक्षेप सुरूच ठेवण्यात आला. वसुलीच्या नावाखाली नोटिसा बजावणे, लोकांना बोलावणे, अशा हालचाली तहसील कार्यालयाकडून केल्या जात असल्याचे उघड झाले आहे. न्याय मिळवून देण्याऐवजी शेतकऱ्यांना व मूळ तक्रारदारालाच तहसील कार्यालयाच्या उंबरठ्यावर धाव घ्यावी लागत आहे. प्रत्येक शासकीय कार्यालयात शासकीय ऑडिट हा हिशेबाची खात्री करण्याचा महत्त्वाचा टप्पा असतो. मात्र या चौकशी समितीत ऑडिट अहवालाचा वा वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या टिप्पण्यांचा कोणताही उल्लेख नाही. त्यामुळे ही चौकशी वरवरची असल्याचे सर्वसामान्यांना वाटत आहे. परिणामी संपूर्ण चौकशीच्या निष्पक्षतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या पार्श्वभूमीवर नागरिक आता या प्रकरणाची तुलना संजय गांधी निराधार योजनेतील अनुदान प्रकरणाशी करू लागले आहेत. तिथेही बोगस अकाऊंट, बनावट लाभार्थी आणि गैरव्यवहाराची चर्चा होती. त्यामुळे पाचोऱ्यातील शेतकरी अनुदान सारखीच संजय गांधी प्रकरणातही “काहीतरी गडबड आहे” अशी शंका गडद होत आहे. दरम्यान, या घोटाळ्यातील काही नवे तपशीलही पुढे आले आहेत. ज्याचे नाव अद्याप अधिकृतरीत्या घोटाळ्यात आलेले नाही, किंबहुना ज्याला वाचवले जात आहे, त्याने अवघ्या एका वर्षात पुनगाव रोड भागात तब्बल ९० लाख रुपये किमतीचे प्लॉट खरेदी केल्याची माहिती समोर आली आहे. एवढेच नव्हे तर पहिल्या टप्प्यातील अपहारात त्याने आपल्या नातेवाईकांच्या, विशेषतः सासऱ्याच्या नावासह जवळपास ४५ लोकांच्या नावाने प्रत्येकी ४०,८०० रुपयांप्रमाणे रक्कम ट्रान्सफर केल्याचे समजते. यापैकी तब्बल १५० किलोमीटर अंतरावर राहणाऱ्या लोकांच्या नावाने पैसे वर्ग झाले, ही गोष्ट अधिकच संशयास्पद ठरत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पहिल्या वसुलीतच ३४ लोकांचे पैसे भरल्याचेही नोंद आहे. यापेक्षा वरचढ म्हणजे चक्क एका कोतवालाच्या नावानेही पैसे टाकण्यात आले, अशी माहिती समोर आली आहे. हे उघड झाल्यामुळे प्रकरण अधिकच गंभीर बनले आहे. याशिवाय, तात्कालीन तहसीलदार चव्हाण के. साहेबांच्या बदलीच्या हालचाली सुरू होताच, केवळ ८ ते १५ दिवसांच्या काळात जवळपास ३० लाखांची रक्कम कुठे, कशी आणि का वर्ग करण्यात आली? हा मुद्दाही चौकशीतील महत्त्वाचा भाग ठरत आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणावर रक्कम हलवली गेली, हे बरेच काही सांगणारे आहे. तक्रारदाराने मा. जिल्हाधिकारी आणि मा.प्रांत अधिकाऱ्यांकडे धाव घेतली, पण अद्याप कोणतीही अधिकृत प्रेसनोट वा पत्रकार परिषद झालेली नाही. वरीष्ठ अधिकारी सुद्धा अधिकारी गप्प राहिल्याने लोकांच्या मनातील शंका अधिकच वाढत आहेत. एवढा मोठा घोटाळा केवळ दोन कर्मचाऱ्यांच्या नावावर खापर फोडून संपवला जाणार का, हा प्रश्न शेतकऱ्यांपासून सर्वसामान्यांपर्यंत प्रत्येकाच्या मनात घर करू लागला आहे. शेतकऱ्यांच्या हक्काच्या पैशांची अफरातफर ही केवळ आर्थिक गैरव्यवहार नसून त्यांच्या जीवनमरणाशी संबंधित बाब आहे. भ्रष्टाचाराच्या विळख्यात त्यांचा पैसा अडकला, तर कुटुंबांचे भवितव्य उध्वस्त होणार आहे. त्यामुळे पारदर्शक चौकशी, खरी माहिती उघड करणे आणि सर्व दोषींना शिक्षा होणे हीच वेळेची खरी गरज आहे. एकूणच, पाचोरा तहसील कार्यालयातील हा शेतकरी अनुदान घोटाळा “सब गोलमाल है भाई, गोलमाल है!” या वाक्याला न्याय देणारा ठरत आहे. तपासातील विलंब, मर्जीप्रमाणे नेमलेली समिती, मूळ तक्रारदाराला दूर ठेवणे, ऑडिटचा अभाव, निवडकांवर कारवाई आणि आता नव्याने उघड झालेले मोठ्या व्यवहारांचे पुरावे – या सगळ्यामुळे हा घोटाळा अधिकच गडद, संतापजनक व थरारक बनला आहे. आता तरी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तातडीने हस्तक्षेप करून निष्पक्ष चौकशी करणे आणि सर्व दोषींवर कठोर कारवाई करणे अत्यावश्यक आहे. अन्यथा शेतकऱ्यांचाच नव्हे तर संपूर्ण जनतेचा विश्वास कायमस्वरूपी ढासळण्याची शक्यता आहे.

आज दि.10/09/2025 चे सर्व राशीचे भविष्य व शुभ अंक व रंग

0

Loading

मेष – कामात अपेक्षित यश मिळेल. नवीन संधी मिळू शकतात. मित्रपरिवाराचा आधार राहील. खर्चावर संयम ठेवा.
शुभ अंक – १ │ शुभ रंग – लाल

वृषभ – घरगुती वातावरण आनंददायी राहील. आर्थिक लाभ होईल. नातेसंबंध दृढ होतील. आरोग्य सुधारेल.
शुभ अंक – ६ │ शुभ रंग – हिरवा

मिथुन – प्रवास लाभदायी ठरेल. कामकाजात गती येईल. नवे संबंध उपयुक्त ठरतील. परिश्रमाचे योग्य फळ मिळेल.
शुभ अंक – ५ │ शुभ रंग – पिवळा

कर्क – वरिष्ठांचे सहकार्य मिळेल. अडकलेली कामे मार्गी लागतील. कौटुंबिक वातावरणात शांतता राहील. मानसिक समाधान मिळेल.
शुभ अंक – २ │ शुभ रंग – पांढरा

सिंह – आत्मविश्वास वाढेल. सामाजिक क्षेत्रात मान-सन्मान मिळेल. महत्वाचे निर्णय अनुकूल ठरतील. कुटुंबाचा आधार लाभेल.
शुभ अंक – ९ │ शुभ रंग – केशरी

कन्या – आरोग्याच्या बाबतीत काळजी घ्या. नोकरीत स्थिरता राहील. आर्थिक व्यवहार जपून करा. संयम आवश्यक आहे.
शुभ अंक – ४ │ शुभ रंग – राखाडी

तुळ – आर्थिक स्थितीत सुधारणा होईल. प्रवास आनंददायी ठरेल. मित्र-नातेवाईकांचा सहकार्य मिळेल. मन प्रसन्न राहील.
शुभ अंक – ७ │ शुभ रंग – निळा

वृश्चिक – गुंतवणुकीतून फायदा संभवतो. कामकाज यशस्वी होईल. संबंध दृढ होतील. घरात समाधानाचे वातावरण राहील.
शुभ अंक – ८ │ शुभ रंग – काळा

धनु – नवी संधी उपलब्ध होतील. समाजात प्रतिष्ठा वाढेल. आरोग्याची काळजी घ्या. प्रवास टाळावा.
शुभ अंक – ३ │ शुभ रंग – पिवळा

मकर – कुटुंबात ऐक्य राहील. नोकरी-व्यवसायात प्रगती होईल. आर्थिक बाबतीत उतार-चढाव राहतील. संयमाने वागा.
शुभ अंक – ५ │ शुभ रंग – तपकिरी

कुंभ – विद्यार्थ्यांसाठी शुभ दिवस आहे. नवी योजना सुरू करता येईल. मित्रपरिवाराचा आधार लाभेल. आत्मविश्वास वाढेल.
शुभ अंक – ६ │ शुभ रंग – आकाशी

मीन – धार्मिक वा सामाजिक कार्यात सहभाग वाढेल. कामकाजातील जबाबदाऱ्या वाढतील. अनपेक्षित खर्च संभवतो. संयम आवश्यक.
शुभ अंक – ९ │ शुभ रंग – जांभळा

वाचकांनी वरील भविष्यवाणीचा अर्थ अचूक भविष्यवाणी म्हणून लावता केवळ आत्मपरीक्षण आणि सकारात्मक प्रेरणा म्हणून घ्यावा.

पाचोरा शेतकरी अनुदान घोटाळा दि 11 रोजी महाजन आत्मदहनसाठी सज्ज तर आरोपी अटकपूर्व जमिनीसाठी जिल्हा सत्र न्यायालयात

0

Loading

पाचोरा – तालुक्यातील महसूल विभागामध्ये उघडकीस आलेल्या सव्वा कोटींच्या अनुदान घोटाळ्याला आता कायदेशीर स्वरूप प्राप्त झाले असून शेतकऱ्यांचा हक्काचा पैसा परत मिळावा व दोषींवर कठोर दंडात्मक कारवाई व्हावी या मागण्यांसाठी आंदोलक संदीप महाजन यांनी आमरण उपोषणासह आत्मदहनाचा इशारा दिल्यामुळे प्रशासनाने तातडीने हालचाल केली आणि अखेर हा गुन्हा जळगाव येथील आर्थिक गुन्हा शाखेकडे वर्ग करण्यात आला. सन 2022 ते 2024 या कालावधीत पाचोरा तहसील कार्यालयात झालेल्या या गैरव्यवहारात तत्कालीन महसूल सहाय्यक अमोल सुरेश भोई यांनी स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी मुख्यमंत्री युवा प्रशिक्षणार्थी गणेश हेमंत चव्हाण याच्यासोबत संगनमत करून शासनाच्या महसुलाचा अपहार केला. प्राथमिक तपासात असे उघडकीस आले की 2022-23 मध्ये 122 आणि 2024-25 मध्ये 225 अशा एकूण 347 व्यक्तींच्या नावाने खोटे अभिलेख तयार करून व फसवणुकीने नैसर्गिक आपत्ती अनुदान वितरित केले गेले. जुन ते ऑक्टोबर 2022 मधील पंचनाम्यांचे अभिलेख खोट्या स्वरूपात तयार करून त्यावर बनावट शिक्के व बनावट सह्या लावण्यात आल्या. शिवाय तहसीलदार यांचे लॉगिन आयडी व पासवर्डचा अनधिकृतरीत्या वापर करून शासकीय संगणकीय प्रणालीत प्रवेश करून गंभीर प्रकारचा सुरक्षाभंग करण्यात आला. या प्रकरणातील सर्वाधिक गंभीर बाब म्हणजे एमपीएससी, यूपीएससी तसेच पोलिस भरतीसाठी तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांची वैयक्तिक कागदपत्रे फसवणुकीसाठी वापरण्यात आली. आधारकार्ड, पॅनकार्ड व बँक पासबुक यांच्या आधारे शेतकरी अनुदानाची रक्कम त्यांच्या खात्यात वर्ग करण्यात आली. ही कागदपत्रे आरोपींपर्यंत कशी पोहोचली, विद्यार्थ्यांना फसविण्यात कोणते माध्यम वापरण्यात आले व रक्कम पुढे हस्तांतरित झाली का, याचा शोध तपास यंत्रणा घेत आहे.प्राथमिक तपासात आरोपी अमोल भोई यांनी फसवणुकीने व संगनमताने शासनाचा ₹1,20,13,517/- (एक कोटी वीस लाख तेरा हजार पाचशे सतरा रुपये मात्र) इतक्या निधीचा अपहार केला आहे. या प्रकरणात गणेश हेमंत चव्हाण याचा सहभाग असल्याचेही स्पष्ट झाले. त्यामुळे दोन्ही आरोपींविरुद्ध पाचोरा पोलीस ठाण्यात गुन्हा क्र. 428/2025 नोंदविण्यात आला आहे. हा गुन्हा भारतीय न्याय संहिता 2023 मधील कलम 316(4), 316(5), 318(4), 335, 336(2)(3), 340(2), 3(5) अन्वये दंडनीय अपराध ठरतो. त्यानुसार आरोपींविरुद्ध फौजदारी कार्यवाही सुरू करण्यात आली आहे. सदर घोटाळा उघडकीस आल्यानंतर शेतकऱ्यांमध्ये तीव्र संताप पसरला. आंदोलक संदीप महाजन यांनी 1 सप्टेंबर 2025 रोजी प्रांताधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले. त्यांनी शासनाचा निधी परत मिळावा, दोषींवर कठोर कारवाई व्हावी व संपूर्ण रॅकेट उघड व्हावे अशी मागणी केली. यावेळी आमदार किशोरआप्पा पाटील, प्रांताधिकारी भुषण अहिरे, तहसीलदार विजय बनसोडे व पोलीस निरीक्षक राहुलकुमार पवार यांच्या उपस्थितीत चर्चेनंतर मागण्या मान्य झाल्याने उपोषण मागे घेण्यात आले. तथापि 4 दिवस झाले तरी ठोस कारवाई न झाल्याने महाजन यांनी 10 सप्टेंबरपर्यंत मागण्या पूर्ण न झाल्यास 11 सप्टेंबर रोजी आत्मदहन करण्याचा इशारा दिला. या इशाऱ्यामुळे प्रशासन व पोलीस यंत्रणा तात्काळ सावध झाली आणि अवघ्या 24 तासांत गुन्हा आर्थिक गुन्हा शाखेकडे वर्ग करण्यात आला. जळगाव आर्थिक गुन्हा शाखेचे प्र. उपअधीक्षक संदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आर्थिक गुन्हा शाखेचे विशेष तपास पथक काम करत आहे. या प्रकरणातील अटकपूर्व जामिनासाठी दोन्ही आरोपींनी अर्ज सादर केले आहेत. गणेश हेमंत चव्हाण यांच्या अर्जावर 9 सप्टेंबर रोजी सुनावणी घेण्यात आली असून पुढील सुनावणी 12 सप्टेंबर रोजी निश्चित झाली आहे. अमोल सुरेश भोई यांच्या अर्जावर सुनावणी होऊन पुढील सुनावणी 11 सप्टेंबर रोजी होणार आहे.तहसील विभागाने आपल्याच विभागाचा केलेल्या तपासाच्या या प्रकरणात केवळ महसूल सहाय्यक व प्रशिक्षणार्थीपुरतीच कार्यवाही मर्यादित न राहता, तहसील कार्यालयातील इतर अधिकारी-कर्मचारी तसेच CSC सेंटर चालकांचा सहभाग होता की आणखी काही रॅकेट कार्यरत होते याचा खरा शोध आर्थीक गुन्हा शाखेची यंत्रणाच लावु शकेल यासाठी सदर प्रकरणी तातडीने दोषींवर आरोपपत्र दाखल करून तातडीने अटक होणे आणि शेतकऱ्यांचा पैसा परत मिळणे आवश्यक आहे, अशी सर्वसामान्यांची अपेक्षा आहे. सदर अनुदान घोटाळ्यामुळे शासनाच्या योजनांवरचा विश्वास डळमळीत झाला आहे. शेतकरी व विद्यार्थी दोघेही फसवले गेल्याने समाजात तीव्र रोष आहे. आंदोलक संदीप महाजन यांचे आमरण उपोषण व आत्मदहनाचा इशारा हे शेतकऱ्यांच्या संघर्षाचे प्रतीक ठरले. या दबावाखाली गुन्हा अखेर आर्थिक गुन्हा शाखेकडे वर्ग करण्यात आला असल्याचे प्रसारण माध्यमाद्वारे आंदोलन महाजन यांना समजले असले तरी अद्याप त्यांना प्रशासनाकडून कोणत्याही प्रकारची पत्र देण्यात आलेले नाही त्यामुळे आजही ते त्यांच्या आत्मदहनाच्या निर्णयावर ठाम आहेत हा तपास आर्थिक गुन्हा शाखेतर्फे पारदर्शक पूर्ण होऊन दोषींविरुद्ध दोषारोपपत्र दाखल झाल्यानंतरच शेतकऱ्यांना व विद्यार्थ्यांना न्याय मिळणार आहे. हे निश्चित मे जिल्हा सत्र न्यायालयात व मे उच्च न्यायालयात पिडीत शेतकऱ्यांच्या बाजुने विनामूल्य खाजगी वकिलांची फळी उभी राहणार असली तरी यासाठी पिडीत शेतकऱ्यांचे प्रतिज्ञापत्र व सह्या आवश्यक आहेत तरी शेतकरी बांधवांनी आंदोलक संदीप महाजन यांच्याशी Mo.7385108510 संपर्क साधावा

ताज्या बातम्या

error: Content is protected !!