Home Dhyeya News Special आमदार किशोरआप्पा पाटील यांच्या निकटवर्तीय स्थानिक नेत्यांचा गांधी नगर भागातील रस्त्याच्या दुरुस्तीसाठी...

आमदार किशोरआप्पा पाटील यांच्या निकटवर्तीय स्थानिक नेत्यांचा गांधी नगर भागातील रस्त्याच्या दुरुस्तीसाठी पुढाकाराने काम युद्धपातळीवर पुर्ण

0
1103

Loading

पाचोरा – शहरातील गांधीनगर भागातील श्री अंबाजी माता मंदिराचा २६ वा वर्धापनदिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यासाठी विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. ४ मार्च २०२५ रोजी होणाऱ्या या उत्सवात महाप्रसाद (भंडारा), महापूजा, पार्थिव शिवलिंग पूजन आणि महाआरती यांसारख्या धार्मिक विधींना भाविक मोठ्या संख्येने हजेरी लावणार आहेत. हजारोंच्या संख्येने येणाऱ्या भाविकांमुळे मंदिर परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. परंतु, या धार्मिक सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर गांधीनगर परिसरातील खराब रस्ते व खड्डे ही मोठी समस्या ठरत होती. त्यामुळे स्थानिक नागरिक व भाविकांची अनेक दिवसा पासुन नगरपालिका प्रशासनाकडे रस्त्यांची दुरुस्ती करण्याची मागणी केली जात होती.
     गांधीनगर परिसरातील भुयारी गटारींमुळे मुख्य रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले होते. विशेषतः श्री अंबाजी माता मंदिराकडे जाणाऱ्या मार्गावर अनेक ठिकाणी खड्डे असल्यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होण्याची शक्यता होती. भाविकांच्या मोठ्या गर्दीमुळे संभाव्य अपघाताचा धोका निर्माण झाला होता. त्यामुळे स्थानिक नागरिक, व्यापारी आणि सामाजिक संघटनांनी एकत्र येऊन पालिकेकडे तातडीने रस्त्यांचे डांबरीकरण अथवा खड्डे बुजवण्याची सतत मागणी केली जात होती गेल्या काही दिवसांपासून रस्त्यांची दुरवस्था ही नागरिकांसाठी मोठ्या चिंतेचा विषय ठरली होती. अनेकदा “आज उद्या काम सुरू होईल” अशा आश्वासनांवर ही समस्या प्रलंबित ठेवण्यात आली होती. त्यामुळे नागरिक आशेने या रस्त्यांकडे पाहत होते. मात्र, श्री अंबाजी माता मंदिराचा वर्धापनदिन अवघ्या काही दिवस व तासावर येऊन ठेपलेला असताना, ध्येय न्यूज आणि झुंज वृत्तपत्राने या समस्येवर रोक- ठोक वृत्त प्रसिद्ध केले. या पत्रकारितेच्या प्रभावामुळे नगरपालिका प्रशासनासह अनेक सामाजिक व राजकीय व्यक्तींना तातडीने पावले उचलण्यास भाग पाडले.
   पत्रकारांनी केलेल्या आवाहनाची नगरपालिका प्रशासनाने त्वरित दखल घेतली. त्यामुळे या भागातील रस्त्यांचे मुरूम टाकण्याचे काम हाती घेण्यात आले. यासाठी आमदार किशोरआप्पा पाटील यांचे निकटवर्तीय आणि कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती तसेच या प्रभागाचे भावी नगरसेवक गणेश भीमराव पाटील व भावी नगरसेवक सुनील उर्फ नाना गौड यांनी विशेष पुढाकार घेतला. तर सुनील गौड यांनी स्वतः प्रत्यक्ष उभे राहून या कामाची जबाबदारी

घेतली आणि गांधीनगर परिसरातील रस्त्यांचे मुरूम टाकण्याचे काम मार्गी लावले. त्यांच्या या तत्परतेमुळे नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले असून, त्यांचे कौतुक होत आहे. श्री अंबाजी माता मंदिराचा वर्धापन दिन हा भाविकांसाठी श्रद्धेचा मोठा सोहळा असतो. नव्हे तर या परिसरात जणू यात्रेचे स्वरूप दिसून येते त्यामुळे मंदिर परिसरात येणाऱ्या भाविकांची गैरसोय होऊ नये, तसेच कार्यक्रम निर्विघ्न पार पडावा, यासाठी नगरपालिकेने तसेच विद्यमान नगरसेवक आणि भावी नगरसेवकांनी तातडीने लक्ष घालून संबंधित रस्त्यांची दुरुस्ती करावी, अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली होती. नगरपालिकेने वेळीच उपाययोजना केल्यास या धार्मिक सोहळ्यात सहभागी होणाऱ्या भाविकांना कोणत्याही अडचणीचा सामना करावा लागणार नाही आणि कार्यक्रम निर्विघ्न पार पडेल. प्रशासनाने या गंभीर प्रश्नाची दखल घेत त्वरित उपाययोजना केल्यामुळे संपूर्ण गांधीनगर परिसरातील नागरिक आणि भाविकांत समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.
   मंदिराच्या २६ व्या वर्धापन दिनानिमित्त भाविकांसाठी भव्य महाप्रसाद (भंडारा) चे आयोजन करण्यात आले आहे. तसेच महापूजा, पूजन आणि महाआरती हे धार्मिक विधीही संपन्न होणार आहेत. या सोहळ्याला हजारो भक्तगण मोठ्या संख्येने उपस्थित राहतील, असा अंदाज वर्तवण्यात येत आहे.  गांधीनगर भागात मोठ्या प्रमाणात भाविकांचा ओघ लक्षात घेऊन पोलीस प्रशासनानेही सुरक्षा व्यवस्थेची तयारी केली आहे. भाविकांची गर्दी नियोजनबद्धरीत्या नियंत्रित करण्यासाठी मंदीराकडून विशेष पथके तैनात करण्यात आले आहेत.
रस्त्यांचे काम तातडीने पूर्ण होण्यास आमदार किशोरआप्पा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सभापती गणेश पाटील आणि सुनील गौड यांचा मोठा वाटा होता. त्यांनी आपल्या वैयक्तिक पातळीवर प्रयत्न करून रस्त्यांचे मुरूम टाकण्याचे काम वेगाने पार पाडले. त्यामुळे या लोकप्रतिनिधींचे आणि सामाजिक कार्यकर्त्यांचे नागरिकांकडून कौतुक होत आहे.
        संपूर्ण गांधीनगर परिसरात श्री अंबाजी माता मंदिराच्या वर्धापन सोहळ्याची तयारी मोठ्या जोशात सुरू आहे. मंदिर सुशोभित करण्यात आले असून, भाविकांच्या सोयीसाठी स्वच्छता मोहीम, रस्त्यांची दुरुस्ती, वाहतूक नियंत्रण आणि महाप्रसादासाठी योग्य नियोजन करण्यात आले आहे. गेल्या अनेक वर्षांपासून गांधीनगर परिसरातील रस्त्यांची अवस्था गंभीर आहे. धार्मिक सण-उत्सवाच्या वेळीच सुधारणा केली जाते, मात्र स्थायी उपाययोजना करण्याची गरज आहे, अशी नागरिकांची भावना आहे. यासंदर्भात प्रशासनाने कायमस्वरूपी रस्त्यांच्या डांबरीकरणासाठी उचित निधी मंजूर करावा आणि भविष्यात अशा समस्यांचा पुन्हा सामना करावा लागू नये, याची काळजी घ्यावी, अशी मागणी होत आहे.
श्री अंबाजी माता मंदिराच्या वर्धापनदिनानिमित्त गांधीनगर परिसरात धार्मिक वातावरण निर्माण झाले असून, भाविकांची मोठी उपस्थिती अपेक्षित आहे. नगरपालिकेने वेळीच रस्त्यांचे दुरुस्तीचे काम केल्याने भाविकांची गैरसोय टळली आणि धार्मिक सोहळा निर्विघ्न पार पडण्यास मदत होणार आहे. भविष्यात या भागातील रस्त्यांसाठी स्थायी उपाययोजना करण्याची मागणी नागरिकांनी केली असून, प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!