जळगाव – राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा श्रीमती रूपाली चाखणकर या जळगाव येथे आले असता जळगाव जिल्हा एकता संघटना मार्फत फारुक शेख यांच्या नेतृत्वात जळगाव शहरातील विविध राजकीय व सामाजिक क्षेत्रातील जबाबदार व्यक्तींनी डॉ अब्दुल गफ्फार मलिक निवास येथे त्यांची भेट घेऊन त्यांना साकडे घातले की आपण शासनात आहात आपले राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष अजित पवार हे उपमुख्यमंत्रीआहात.
तुम्ही शासनात असले तरी तुमची विचारधारा वेगळी आहे असे असताना सुद्धा जर या पुरोगामी महाराष्ट्रात रामगिरी महाराज हे मुस्लिम समाजाचे अंतिम प्रेषित हजरत मोहम्मद (स अ) यांच्याबाबत आक्षेपार्य वक्तव्य केल्यावर त्यांच्यावर महाराष्ट्रात ४८ गुन्हे नोंद झाले असेल तरी त्यांना अद्याप अटक का केली गेली नाही ? तसेच आमदार नितेश राणे हे संविधान पदावर असून सुद्धा असविधानिक भाषा वापरून मुस्लिम समाजाला मशिदीत घुसून मारण्याची धमकी देत आहे, एवढेच नव्हे तर मुस्लिमांशी कोणत्याही स्वरूपाचे व्यवहार करू नका अशी शपथ नागरिकांना देत आहेत.
अशा प्रकारे दोन समाजात तेढ निर्माण करणाऱ्या रामगिरी महाराज व नितेश राणे यांच्यावर कडक कायदेशीर कारवाई करावी.
केंद्र शासनाने वक्फ कायद्यात संशोधन करण्याचा जो निर्णय घेऊन अल्पसंख्यांक समाजावर अन्याय करीत आहे त्याबद्दल आपण त्या ठरावाच्या विरोधात सभागृहात विरुद्ध मत नोंदवावे व त्यास मान्यता देऊ नये अशी मागणी करण्यात आली.
यावेळी संघटने मार्फत नदीम मलिक, फारुक शेख, जमील शेख, अमजद पठाण,निजाम पैलवान, कासिम रफिक,अन्वर खान, मुजाहिद खान आदींची उपस्थिती होती.
फोटो कॅप्शन
रूपाली चाकणकर यांना निवेदन देताना फारुक शेख, सोबत नदीम मलिक, जमील शेख, अमजद पठाण, निजाम पैलवान आदी दिसत आहे
ध्येय न्यूज चॅनेलच्या बातम्या मिळवण्यासाठी येथे क्लिक करून आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.