पद, पैसा आणि विसरलेले संबंध

0

काल पर्वा सहज ओळखीतील बाल पणा पासुन एकत्रीत राहीलेल्या परंतु आता अति उच्च पदावर असलेल्या मित्राला एक किरकोळ काम सांगण्याचा योग आला काम इतके सहज होते की आपल्या शिपायाला सांगून सदरचा कागद त्याच्या कार्यालयाच्या जवळीलच संबंधित ठिकाणी पोचवायचा होता परंतु एवढा कटू अनुभव पहिल्यांदाच अनुभवास आला कटू आहेत पण मनातील काही शब्द कागदावर मांडावे लागत आहे

        पद, पैसा आणि यश मिळाल्यावर अनेकजण स्वतःचा भूतकाळ आणि जुने नातेवाईक & मित्र विसरतात. आजच्या स्पर्धात्मक जगात, यशाचे मोजमाप पैसा आणि पद , प्रतिष्ठेवरच केले जाते, त्यामुळे कदाचित काहींना वाटते की आता जुन्या संबंधांना महत्त्व नाही. परंतु, हा विचार केवळ त्यांच्या संकुचित वृत्तीचे दर्शन घडवतो.
जेव्हा एखाद्या व्यक्तीच्या आयुष्याचा प्रवास सुरू होतो, तेव्हा अनेक लोक त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहतात – कधी मित्र, कधी कुटुंबीय, कधी मार्गदर्शक. यश मिळवताना या सर्वांचा आधार घेऊनच ती व्यक्ती प्रगती करते. पण एकदा का यशाच्या शिखरावर पोहोचले की काही लोक “आता मला कोणीच लागत नाही,” असा अति आत्मविश्वास ठेवतात. भूतकाळातील संघर्ष आणि त्या संघर्षांत साथ देणाऱ्या व्यक्तींना विसरून जाणे हे केवळ दुर्दैव नाही, तर हे व्यक्तिमत्त्वाच्या कमकुवतपणाचे लक्षण आहे.
विसरलेला भूतकाळ – का?
अशा लोकांची वृत्ती स्वार्थीपणाची असते. पद आणि पैशाचा माज आल्यानंतर त्यांना जुन्या नात्यांचा स्वीकार करण्याची लाज वाटते. “माझ्यामुळेच आज मी आहे,” असा अघोषित अहंकार त्यांच्यात झळकतो. पण वास्तवात, यश म्हणजे फक्त स्वतःचा पराक्रम नसतो; तो कधी कधी आपल्यासाठी रात्रंदिवस झगडणाऱ्या माणसांचाही वाटा असतो.
अशी वृत्ती का चुकीची आहे?
1. यश तात्पुरते असते: जीवनात पैसा आणि पद हे तात्पुरते असते. संकटाची वेळ येते, तेव्हा तुमचे खरे स्नेहीच तुमच्या पाठीशी उभे राहतात. तुम्ही त्यांना दूर लोटले असेल तर त्या वेळेस कोण उभे राहणार?
2. विश्वास गमावणे: जे तुमच्यावर कधीकाळी विश्वास ठेवायचे, त्यांना तुम्हीच फसवल्यास, पुढे जाऊन समाज तुमच्यावर कसा विश्वास ठेवेल?
3. मूल्यांचा अभाव: पैसा आणि प्रतिष्ठेच्या शर्यतीत माणूस जर नातेसंबंध & मित्र गमावत असेल, तर तो यशस्वी कसा म्हणायचा? कारण खरं यश म्हणजे नात्यांमध्ये टिकणारा संवाद आणि आदर.
डोळ्यात अंजन घालणारी शिकवण
“पद आणि पैसा तुमचा भूतकाळ पुसू शकत नाही.” जर आपण आपले नातेवाईक, मित्र आणि संघर्षाच्या साथीदारांना विसरत असाल, तर लक्षात ठेवा, यशाचे शिखरही एकाकी आहे.
शेवटी, “लोक तुमचं पद विसरतील, पैसा नष्ट होईल, पण तुमचं वागणं आठवत राहील.” म्हणून कोणत्याही यशामागे असलेल्या हातांचा आदर करा. जिथून सुरुवात झाली, ती जागा विसरणे हा फक्त मूर्खपणाच नाही, तर स्वतःच्या मुळांवर कुर्‍हाड घालण्यासारखे आहे.
पद आणि पैसा घेऊन आलेल्या “माज”ला बाजूला ठेवा आणि माणूसपण टिकवून ठेवा ही सांगायची & पाचोरा शहरातीलच जिवंत परंतु अजिवन आठवणीत राहिल ही या घटनेवरून सांगायची वेळ आली आहे
      ते म्हणजे पाचोरा शहरात ज्या कंपनीमुळे एक काळ होता शहरातीलच नव्हे तर पंचक्रोशीतील अनेक लोकांना त्यामुळे रोजगार मिळत होता तर भारतामध्ये त्या मालकाची व कंपनीची एक ओळख होती परंतु जेव्हा वैभव गेले त्यांच्या अंत्ययात्रेला फक्त 13 लोक हजर होते
याउलट पद नाही पैसा नाही परंतु कष्टाने शून्यातून विश्व निर्माण करणारे डोक्यावर बर्फ आणि तोंडात साखर ठेवून प्रत्येकासाठी होकार देणारे कृष्णापुरी भागातील रवी टेंन्ट हाऊसचे संचालक स्व सुनिलभाऊ पाटील यांचा जेव्हा स्वर्गवास झाला त्यावेळी त्यांच्या अंत्ययात्रेच्या वेळी अक्षरशः स्मशानभूमीत त्यांचे प्रेत तर शेवटचा मनुष्य त्यांच्या घराजवळ एवढा मोठा सर्व जाती – धर्माचा जनसमुदाय त्यांना शेवटचा निरोप देण्यासाठी उपस्थित होता हे याच जन्मात आणि फार कमी वर्षात स्वतः मी पाहिले आहे
बस 
     यातून काय सांगायचे ते आपल्याला समजले असेलच

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here