![]()
स्वातंत्र्य हे एखाद्या राष्ट्रासाठी परमप्राप्ती असते, पण भारतासाठी ते एक वेदनामय पर्व ठरले. १५ ऑगस्ट १९४७ रोजी भारत स्वतंत्र झाला खरा, पण त्या स्वातंत्र्याच्या पायावर रक्ताचे थेंब होते. लाखो लोकांचे विस्थापन, दंगली, अत्याचार, आणि सर्वात महत्वाचे म्हणजे एका संस्कृतीचे दोन भागांमध्ये तुटणे. डॉमिनिक लॅपिएर आणि लॅरी कॉलिन्स यांच्या ‘Freedom at Midnight’ या पुस्तकात भारताच्या स्वातंत्र्यप्राप्तीचा हा सगळा संघर्ष शब्दबद्ध झालेला आहे – एक जीवंत, धडकी भरवणारी आणि विचारांना गहिवर आणणारी गाथा.
या पुस्तकातील घटनाक्रम केवळ ऐतिहासिक नाही, तर मानवी स्वभावाच्या उत्कटतेचा आरसा आहे. भारताचे शेवटचे व्हाईसरॉय लॉर्ड माउंटबॅटन, महात्मा गांधी, जवाहरलाल नेहरू, मोहम्मद अली जिना यांसह सरदार वल्लभभाई पटेल, नथुराम गोडसे आणि विनायक दामोदर सावरकर या सर्व पात्रांनी त्या काळात आपापल्या भूमिका ताकदीने निभावल्या – काहींनी राष्ट्र एकत्र ठेवण्यासाठी, तर काहींनी अखंड हिंदुराष्ट्र त्यांच्या वैचारिक ध्येयासाठी.
या पुस्तकात लोह पुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांचा विशेष उल्लेख आहे. ते फक्त काँग्रेसचे नेते नव्हते, तर भारताच्या एकात्मतेचे खरे शिल्पकार होते. ‘Freedom at Midnight’ मध्ये वर्णन येते की, जर सरदार पटेल यांच्याकडे राजकीय निर्णयांची मुभा असती, तर फाळणी वेगळ्या पद्धतीने झाली असती किंवा कदाचित टळलीही असती.
पुस्तकात नमूद केले आहे की, सरदार वल्लभभाई पटेल हे जमीनविषयक, राज्यकारभार विषयक आणि सुरक्षाविषयक बाबतीत अत्यंत वास्तववादी आणि कठोर निर्णय घेणारे नेते होते. प्रिन्सली स्टेट्स अर्थात संस्थानांना भारतात विलीन करण्यासाठी त्यांनी वापरलेले राजनैतिक धोरण आणि आवश्यकतेनुसार दाखवलेली धमकीची छटा – ही एक दबंग नायकाची महत्वपुर्ण लक्षणं होती.
हैदराबाद, जुनागढ आणि काश्मीर हे तिन्ही राज्ये त्यांनी योग्य वेळी देशात समाविष्ट केली नसती, तर आजचा भारत म्हणजे शेकडो तुकड्यांचा कोडं राहिला असता. त्यांच्या निर्णयक्षमतेने भारत एकसंध राहिला, आणि हीच गोष्ट ‘Freedom at Midnight’ मध्ये माउंटबॅटनसुद्धा स्पष्टपणे मान्य करतो – ” सरदार पटेल ही माणूस नव्हते, ती संस्था होता.”
पण दुर्दैव असे की, काँग्रेसच्या नेतृत्वात नेहरूंच्या प्रभावाखाली गांधीजींची निवड झाली आणि पटेल यांना हेतुपुर्वक दूर ठेवण्यात आले. अनेक अभ्यासकांचे आणि लेखकांचे स्पष्ट मत आहे खरोखर जर स्वतंत्र भारताचा पहिले पंतप्रधान सरदार वल्लभभाई पटेल झाले असते, तर भारताच्या सीमावर्ती समस्या आणि अंतर्गत सुरक्षेचे प्रश्न अधिक काटेकोरपणे हाताळले गेले असते.आणि हे विष कायमस्वरूपी संपवले असते
‘Freedom at Midnight’ मध्ये नथुराम गोडसे यांच्या बाबतचा भाग एक अत्यंत क्लिष्ट आणि भावनिक बिंदू आहे. लेखकांनी नथ्युराम गोडसे यांना केवळ ‘खून करणारा’ ठरवून थांबले नाहीत, तर त्याच्या मानसिकतेचा, वैचारिक पृष्ठभूमीचा आणि त्याच्या संतापाचा वेध घेण्याचा प्रयत्न केला आहे.
नथुराम गोडसे हे एक राष्ट्रप्रेमी,अभ्यासू, वैचारिकदृष्ट्या प्रभावी आणि इंग्रजीतून

उत्तम बोलणारे तरुण होते. त्यांनी गांधीजींवर आरोप केला की त्यांनी पाकिस्तानच्या निर्मितीस मूक संमती दिली, आणि हिंदूंवर अन्याय झाला तरी मुस्लिम तुष्टीकरणाची भूमिका घेतली. गांधीजींच्या उपोषणामुळे जिनाच्या हट्टा खाली भारताने पाकिस्तानला ५५ कोटी रुपये देण्याचा निर्णय घेतला तो सुद्धा गांधीच्या हट्टापायी यामुळे नथ्थुराम गोडसेच्या संतापाने उच्चांक गाठला.
त्यांच्या मते, गांधी हे हिंदूंच्या हिताच्या विरोधात गेले होते आणि ते मुस्लिम समुदायासंदर्भात अधिक सहानुभूती दाखवत होते. म्हणूनच गांधींची हत्या त्यांनी एक ‘राजकीय आवश्यक निर्णय’ म्हणून मांडली.
पुस्तकात गोडसेच्या कोर्टात दिलेल्या आत्मसमर्पक निवेदनाचा हवाला दिला आहे, ज्यात ते म्हणतात – “मी गांधीजींचा आदर करतो, पण राष्ट्राच्या एकतेसाठी त्यांनी केलेले प्रयत्न आमच्या दृष्टीने आत्मघातकी ठरले.” आणि त्यांना जेव्हा फाशी देण्यात आली तर त्यांची अस्थीविसर्जची शेवटी इच्छा आणि आज पर्यंत त्या अस्थी जशाच्या तशा सुद्धा ठेवण्यात आल्या आहेत पुस्तका बाहेरील मात्र अधिक माहिती करिता नाथूराम गोडसे यांच्या अस्थी आजही पुण्यातील शिवाजीनगर येथील एका इमारतीत सुरक्षित ठेवण्यात आल्या आहेत. ही इमारत ‘अजिंक्य डेव्हलपर्स’ या रिअल इस्टेट कंपनीचे कार्यालय आहे, ज्याचे मालक गोडसे यांचे नातू आहेत .
नाथूराम गोडसे यांनी त्यांच्या शेवटच्या इच्छेत नमूद केले होते की, त्यांच्या अस्थी सिंधू नदीत (इंडस नदी) तेव्हाच विसर्जित कराव्यात, जेव्हा ती नदी स्वतंत्र भारताच्या अधिपत्याखाली पुन्हा वाहू लागेल . त्यांच्या या इच्छेनुसार, त्यांच्या कुटुंबीयांनी आजपर्यंत त्या अस्थी विसर्जित केल्या नाहीत .
गोडसे यांच्या अस्थी एका चांदीच्या कलशात ठेवण्यात आल्या असून, त्या शिवाजीनगर, पुणे येथील एका इमारतीत जतन करण्यात आल्या आहेत . या इमारतीत गोडसे यांचे काही कपडे आणि हस्तलिखित नोट्सही ठेवण्यात आल्या आहेत .
नाथूराम गोडसे यांच्या अस्थी आजही पुण्यात सुरक्षितपणे ठेवण्यात आल्या आहेत. त्यांच्या शेवटच्या इच्छेनुसार, त्या तेव्हाच विसर्जित केल्या जातील, जेव्हा सिंधू नदी पुन्हा स्वतंत्र भारताच्या अधिपत्याखाली वाहू लागेल . असो
यावर एक स्वतंत्र लेखच तयार होईल
परंतु ‘Freedom at Midnight’ स्वातंत्र्य विर वि.दा.सावरकरांचा गांधीहत्या प्रकरणाशी संबंध होता की नाही, यावर पुस्तक स्पष्ट निर्णय घेत नाही. मात्र, लेखकांनी स्वातंत्र्य विर सावरकरांच्या राजकीय विचारांचा, विशेषतः हिंदुत्वविचारसरणीचा, नथ्थुराम गोडसेसारख्या युवकांवर कसा परिणाम झाला, याचा ऊहापोह केला आहे.
नथ्थुराम गोडसे स्वतः ‘हिंदू महासभा’शी संलग्न होते, आणि स्वातंत्रविर वि दा सावरकरांचे विचार त्याच्या मनावर खोलवर बिंबलेले होते. तथापि, कोर्टात स्वातंत्रविर वि दा सावरकर यांच्यावर आरोप झाले असले तरी थेट पुरावे नसल्यामुळे त्यांची निर्दोष मुक्तता झाली. परंतु एवढे निश्चित भारत स्वातंत्र्यानंतर स्वातंत्र्यविर वि दा सावरकर हे असे एकमेव क्रांतीकारी होते की त्यांची जेलमध्ये गांधी हत्ये प्रकरणी रवानगी करण्यात आली होती. Freedom at Midnight यात सावरकरांचा उल्लेख ‘intellectual influence’ म्हणून येतो – ज्यांनी क्रांती, राष्ट्रवाद, आणि हिंदू अस्मिता यांचं बिंब रोवलं.
लेखक लिहितात – ” स्वातंत्रविर वि दा सावरकर हे एक ज्वालामुखीसारखे होते – बाह्य शांत, पण अंतर्गत धगधगता. त्याचे विचार तरुणांच्या मनात क्रांतीचा वणवा पेटवत होते.” ( म्हणूनच हिंदु हृदय सम्राट स्व.बाळासाहेब ठाकरे यांची तुलना सावरकरांशी करण्यात येते )
Freedom at Midnight हे पुस्तक स्वातंत्र्याच्या वेदनेचा दस्तावेज आहे. हे पुस्तक गांधीजींच्या पवित्रतेला नमते घेते, पण त्याचबरोबर नथ्थुराम गोडसेच्या आक्रोशालाही दुर्लक्षित करत नाही. नेहरूंच्या आशावादाला स्थान देते, पण सरदार वल्लभभाई पटेल यांची वास्तववादी दूरदृष्टीही मांडते. भारताच्या स्वातंत्र्याच्या मध्यरात्री – एक महाशक्ती नवी झाली, पण त्या पायाशी कित्येकांच्या स्वप्नांचा चुराडा झाला. त्या चुराड्यातूनच उभा राहिला आजचा भारत – एक हळूवार पण ठाम राष्ट्र.
यामुळे हे पुस्तक केवळ ऐतिहासिक वाचन नसून, आजच्या काळात आपल्या सामाजिक, धार्मिक, आणि राजकीय चिंतनासाठी एक प्रेरणादायी आरसा आहे.
संदर्भ – ‘Freedom at Midnight’ (Dominique Lapierre & Larry Collins) —- संदीप दा महाजन
ध्येय न्यूज चॅनेलच्या बातम्या मिळवण्यासाठी येथे क्लिक करून आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.





