![]()
पाचोरा – १९९५ ते २०२५—या तीस वर्षांच्या कालखंडात पाचोरा-भडगाव विधानसभा मतदारसंघाने अनेक चढ-उतार पाहिले. राजकीय परिस्थिती बदलत गेली, जनता आणि कार्यकर्त्यांच्या गरजाही बदलत गेल्या, नवनवीन अपेक्षा डोळ्यासमोर येऊ लागल्या. मात्र या सर्व बदलत्या चित्रात एक नाव कायम आदराने घेतले गेले ते म्हणजे पाचोरा-भडगावचे आमदार स्वर्गीय तात्यासाहेब आर. ओ. पाटील. त्यांचे ध्येय, त्यांची तत्त्वनिष्ठता, त्यांचे कार्य आजही सर्वश्रुत आहे. ते कधीच स्वतःच्या फायद्याचा विचार करणारे नव्हते. त्यांच्या अपेक्षा नेहमी कार्यकर्त्यांच्या घरावर, त्यांच्या उद्योगधंद्यावर, त्यांच्या संसारावर केंद्रित असायच्या. तात्यासाहेबांना वाटायचे—कार्यकर्त्याचे घर सुरक्षित, उद्योग उभा राहिला, संसार सुखी झाला, तर समाज आपोआप उभा राहतो. मात्र बदलत्या स्वार्थी राजकीय वातावरणात ही तत्त्वं निभावणं कठीण होतं. कार्यकर्त्यांच्या अपेक्षा वाढत होत्या, समाजाचा वेग बदलत होता. अशा परिस्थितीत संपूर्ण यंत्रणा सुरळीत चालवण्यासाठी तात्यासाहेबांना एका हक्काच्या व्यक्तीची गरज होती. जणू अधिकाराच्या वजीराची. आणि ती भूमिका निभावली विद्यमान हॅट्रिक आमदार किशोरआप्पा पाटील यांनी. किशोरआप्पा पाटील यांचा प्रवास अनोखा आहे. पोलिस प्रशासनात असताना किंवा त्यानंतर त्यांनी कधी स्वप्नातही विचार केला नव्हता की आपण निवडणूक लढवायची, आमदार व्हायचं, खासदार व्हायचं किंवा नगराध्यक्ष व्हायचं. पण त्यांच्या रक्तातच एक प्रवृत्ती होती—प्रत्येकाशी जिव्हाळा ठेवायचा, जात-धर्म न बघता सुख-दुःखात धावून जायचं. संघटन ही त्यांची ताकद होती. कोणताही राजकीय खेळाडू त्यांच्या या गुणाला आव्हान देऊ शकत नव्हता. त्याकाळी किशोरआप्पांची आर्थिक परिस्थिती मर्यादित होती. लाखो रुपयांच्या वर्गणीच्या पावत्या फाडून टाकणं, जनतेच्या सुखदुःखात खिशातून खर्च करणं ही गोष्ट सोपी नव्हती. पण अपेक्षा नसताना त्यांनी वेळे प्रसंगी हात उसनवारी केली, कर्ज काढलं, वहिनी सुनिताताई पाटील यांच्या दागिन्यांनाही गहाण ठेवण्यासही मागे पुढे पाहीले नाही फक्त एवढंच की जनतेच्या संकटाच्या क्षणी मदतीचा हात मागे राहू नये. हाच त्या घराण्याचा खरा वारसा आहे—त्याग, मदत आणि माणुसकी. गणपती मंडळाचे कार्यकर्ते जेव्हा शिवसेना कार्यालयाजवळ यायचे तेव्हा ते प्रथम पाहायचे—तात्या आहेत का, की एकटे आप्पा आहेत? कारण पावती फाडायची की नाही हा निर्णय ह्याच गोष्टीवर ठरायचा. फक्त पावत्यांचा विषयच नव्हे, तर इतरही मदतीबाबत नेहमी अशीच परिस्थिती असे. आणि जेव्हा तात्यासाहेबांना या मदतीचे आकडे कानी पडायचे, तेव्हा किशोर आप्पांची शाळा ऐकण्यासारखी असायची. कारण स्वार्थी राजकीय वातावरणात व मतलबी लोकांच्या दुनियेत जगत असतांना तात्या साहेबांची त्यावेळची शिकवण व वाक्य खरोखर योग्य व सत्य होते असो
मागील आठवणींचा उल्लेख करतांना कोणतीही चमचेगिरी करण्यासाठी नाही, किंवा मला कोणतीही जाहिरात सुद्धा नको किंवा मला पुरस्कार पण विकायचे नाहीत तर हे सर्व वास्तव मांडण्यासाठी आहे. सत्य लिहिण्याची ताकद ज्या पत्रकाराच्या लेखणीत असते, त्यालाच समाज खरा पत्रकार मानतो. आज पावसामुळे निर्माण झालेल्या भीषण परिस्थितीत जेव्हा प्रत्येक नागरिकाच्या डोळ्यात जमिनीप्रमाणे पाणी साचलं आहे, तेव्हा एक नवं चित्र डोळ्यासमोर आलं आहे. विद्यमान आमदार किशोर आप्पांच्या सुपुत्राने—युवा नेते सुमित किशोर आप्पा पाटील यांनी—वडिलांच्या मार्गावरच नव्हे तर दहा पावलं पुढे टाकत मदतीचं एक नवं पर्व सुरू केलं आहे. दिवस-रात्र न थकता, स्वतःच्या आरोग्याचा विचार न करता, त्यांनी स्वतःची मदतयंत्रणा कार्यान्वित केली आहे. सुमित पाटील यांची सर्वात मोठी वैशिष्ट्यपूर्ण बाब म्हणजे —त्यांच्या मदतीला कोणताही शासकीय आधार नाही. ते प्रत्येक गावात, प्रत्येक वाड्यात, प्रत्येक नुकसानग्रस्त कुटुंबात स्वतः खिशात हात घालून मदत करत आहेत. त्यांच्या या प्रयत्नामुळे डोळ्यात पाणी तर आलंच, पण मनही हेलावून गेलं आहे. गावागावांतून फक्त एकच वाक्य ऐकायला मिळत आहे—”आजच्या काळात जेव्हा सगळे शासकीय मदतीची वाट बघत आहेत, तेव्हा खऱ्या अर्थाने मानवतेची सेवा करणारा एकमेव राजकीय व्यक्ती म्हणजे सुमित किशोर आप्पा पाटील.” यावेळी एक मात्र निश्चितच गोष्ट आठवते—एका गावाला प्रचंड आग लागली होती. प्रत्येक व्यक्ती ती आग विझवण्यासाठी प्रयत्न करत होता. अशावेळी एक ईवलीशी चिमणी आपल्या चोचीतून पाणी आणून आग विझवण्याचा प्रयत्न करत होती. काही उपहासात्मक लोकांनी तिची थट्टा केली—“तुझ्या चोचीतील पाण्याने एवढी मोठी आग विझणार आहे का?” पण त्यावेळी एका बुद्धिवंताने म्हटलं—“या इवल्याशा चोचीतील पाण्याने कदाचित आग विझणार नाही, पण या चिमणीचं नाव मात्र इतिहासात आग विझवणाऱ्यांच्या यादीत लिहिलं जाईल, आग लावणाऱ्यांच्या नाही.” तशीच उपमा आज सुमित पाटील यांच्याबाबत द्यावी लागेल. संपूर्ण मतदारसंघात पूरासारखी भीषण परिस्थिती असताना त्यांच्या हातून दिली जाणारी मदत कदाचित पुरेशी वाटणार नाही, पण स्वतःच्या खिशातून त्यांची देण्याची प्रवृत्ती, त्यांची माणुसकी सिद्ध होते. आणि इतिहास लिहिला जाईल तेव्हा या प्रवृत्तीचं नाव निश्चितच मानवतेच्या रक्षणकर्त्यांच्या यादीत असेल. याच क्षणी भूतकाळाची आठवण जागी होते. स्वर्गीय तात्यासाहेब आर. ओ. पाटील आणि किशोर आप्पा पाटील यांच्या कार्याची, त्यांच्यावरील विश्वासाची. त्यांच्या कार्याला कधीच राजकीय पदाचा स्पर्श नव्हता. त्यांच्या मदतीत कोणताही राजकीय स्वार्थ नव्हता. आणि आज सुमित पाटील यांच्या कृतीतून तीच परंपरा पुनश्च जिवंत होताना दिसते आहे. आज संपूर्ण मतदारसंघात प्रत्येक गावात, प्रत्येक वाड्यात, प्रत्येक गल्लीत हेच बोलले जात आहे—“आप्पांनी जसा जनतेला आधार दिला, तसाच आधार सुमित आप्पा आज देत आहेत.” वडिलांची परंपरा केवळ टिकवून ठेवणेच नाही, तर तिला नवा आयाम देणे हे एखाद्या सुपुत्रालाच शक्य असते. सुमित पाटील यांनी ते सिद्ध केले आहे. गेल्या तीस वर्षांचा इतिहास बघताना मनात एकच विचार ठाम होतो—तात्यासाहेबांनी ज्या तत्त्वांची मशाल पेटवली, किशोर आप्पांनी तिला ज्योत बनवलं, त्या ज्योतीला आज नवा प्रकाश देण्याचं काम सुमित पाटील करत आहेत. या प्रकाशाने मतदारसंघातील अंधार दूर होतो आहे. त्यांच्या प्रत्येक मदतीच्या कृतीने नागरिकांच्या डोळ्यातून ओघळलेले अश्रू पुसले जात आहेत. या लेखी प्रपंचाचा उद्देश केवळ वास्तव मांडणे हा आहे. जे दिसलं, जे अनुभवलं ते मांडलं. कारण पैसे तर थोड्याफार फरकाने सर्वांजवळच असतात परंतु त्यांनी जेव्हा ते त्यांच्या गरजेच्या वेळी दिले ते त्यांचे स्वार्थ असते & जेव्हा समोरच्यांना गरज असते तेव्हा जर दिले तर ती खरी मदत असते आणि हे सत्य वाचतांना प्रत्येकाच्याच डोळ्यात पाणी येतं, मन द्रवून जातं. प्रत्येकाला असं वाटतं—“हा लेख लिहिणाऱ्या व्यक्तीला आपण एकदा तरी फोन करून आपलं मनोगत सांगावं.” कारण ही कथा फक्त एका घराण्याची नाही, तर एका मतदारसंघाच्या आत्म्याची आहे. तात्यासाहेबांची तत्त्वनिष्ठा, किशोर आप्पांची त्यागशीलता आणि सुमित पाटील यांची मानवतेची झळाळी—ही त्रिसूत्री आज पाचोरा-भडगाव विधानसभा मतदारसंघाला खऱ्या अर्थाने अभिमानाने मिरवता येईल अशी संपत्ती आहे.
शब्दांकन – Dhyeya News & सा. झुंज संपादक संदीप दा. महाजन, पाचोरा जि. जळगाव
(M.A.B.Ed) & Journalism
M0. 94222 75807/ 7588645907 /73 8510 8510
ध्येय न्यूज चॅनेलच्या बातम्या मिळवण्यासाठी येथे क्लिक करून आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.






