Home Blog Page 91

मिनी ट्रॅक्टरसाठी अनुदान योजना,पात्रधारकांनी अर्ज करण्याचे आवाहन

Loading

जळगाव (जिमाका वृत्त ):महाराष्ट्र शासनाच्या समाज कल्याण विभागाच्या अनुदान योजनेतून अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या स्वयंसहाय्यता बचत गटांना मिनी ट्रॅक्टर खरेदीसाठी ५०% अनुदान देण्याची योजना राबवली जात आहे. या योजने करिता अर्ज करणारे बचतगटातील सदस्य हे महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असावेत. बचतगटातील किमान ८०% सदस्य अनुसूचित जाती व नवबौध्द घटकातील असावेत. बचतगटांचे राष्ट्रीयकृत बँकेमध्ये खाते असलेल्या आणि गट विकास अधिकारी, कृषी अधिकारी, किंवा प्रकल्प संचालक, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा यांच्याकडे नोंदणीकृत असलेल्या अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांच्या बँक खात्यात या योजने अंतर्गत ३ लाख १५ हजार ही रक्कम मिनी टॅक्ट्रर खरेदी केल्यानंतर जमा करण्यात येते. मिनी ट्रॅक्टर खरेदीची कमाल मर्यादा तीन लाख पन्नास हजार इतकी राहील. नोंदणीकृत स्वयंसहाय्यता बचत गटांनी कमाल मर्यादा रकमेच्या १०% हिस्सा स्वतः भरल्या नंतरच ते १०, टक्के अनुदानास पात्र राहतील, जास्त अर्ज प्राप्त झाल्यास बचत गटाची निवड लॉटरी पध्दतीने करण्यात येईल. या योजने अंतर्गत पात्र बचतगटांना पहिल्या हप्त्याचे अनुदान मिनी टॅक्ट्रर आणि उपसाधनांची खरेदी केल्याची बिल पावती जमा केल्यानंतर ५०% अनुदान आणि (आरटीओ) उप-प्रादेशिक परिवहन अधिकारी यांच्याकडे नोंदणी करुन नोंदणी प्रमाणपत्र सादर केल्या नंतर ५०% अनुदान दिले जाते. राष्ट्रीयकृत बचतगटाचे खात्यावर दिले जाणार आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी बचत गटांनी जिल्हा समाज कल्याण अधिकारी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, महात्मा रोड, मायादेव मंदिर समोर, जळगाव येथे संपर्क साधावा, असे आवाहन योगेश पाटील, सहायक आयुक्त, समाज कल्याण विभाग, जळगाव यांनी केले आहे.

रेल्वे गाड्यांचे थांबे देण्याची केंद्रीय मंत्री ना रक्षाताई खडसे यांची ठाम मागणी

Loading

रावेर ( सतिष पाटील ) केंद्रीय राज्यमंत्री ना. रक्षाताई खडसे यांनी दिल्लीत रेल्वे भवन येथे रेल्वे बोर्डाचे चेअरमन सतीश कुमार यांची सदिच्छा भेट घेतली. या बैठकीदरम्यान त्यांनी आपल्या रावेर लोकसभा मतदारसंघातील नागरीकांच्या, विशेषतः रेल्वे प्रवाशांच्या, दैनंदिन अडचणी लक्षात घेऊन अनेक महत्त्वाच्या रेल्वेगाड्यांचे थांबे स्थानिक रेल्वे स्थानकांवर देण्यात यावेत, अशी ठोस व मुद्देसूद मागणी केली. यातून रावेर लोकसभा क्षेत्राच्या सर्वांगीण विकासासाठी रक्षाताई खडसे सातत्याने प्रयत्नशील असल्याचे पुन्हा एकदा अधोरेखित झाले. या बैठकीत भुसावळ रेल्वे विभागाअंतर्गत येणाऱ्या विविध स्थानकांवर – विशेषतः रावेर, वरणगाव, बोदवड, निंभोरा, मलकापूर व नांदुरा या प्रमुख स्थानकांवर – काही महत्त्वाच्या गाड्यांचे नियमित थांबे मिळावेत, यासंबंधी सविस्तर चर्चा झाली. सध्या या स्थानकांवरून दररोज हजारो प्रवासी प्रवास करतात. त्यात शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थी, शेतकरी वर्ग, व्यापारी, नोकरदार, कामगार आणि विविध ठिकाणी नोकरी-व्यवसायासाठी स्थलांतर करणाऱ्या सामान्य नागरिकांचा समावेश आहे. मात्र थांब्यांची कमतरता असल्यामुळे प्रवाशांना आपल्या प्रवासासाठी जवळच्या मुख्य स्थानकांवर जावे लागते, परिणामी वेळ, पैसा आणि मेहनत यांचा अपव्यय होतो. ही अडचण दूर करण्यासाठी आणि प्रवाशांच्या सोयीसाठी ही आग्रही मागणी करण्यात आली. रक्षाताई खडसे यांनी या बैठकीत खालील महत्त्वाच्या रेल्वेगाड्यांचे थांबे तातडीने मंजूर करण्यात यावेत, अशी स्पष्ट व ठाम मागणी केली:1) दानापुर – पुणे एक्सप्रेस (गाडी क्रमांक 12150): या गाडीला रावेर स्थानकावर थांबा देण्यात यावा. या मार्गावर प्रवास करणाऱ्या नागरिकांची संख्या मोठी असून, विशेषतः शिक्षणासाठी व नोकरीसाठी पुण्याकडे जाणाऱ्या युवकांसाठी रावेर थांबा अत्यंत फायदेशीर ठरेल. 2 ) नवजीवन एक्सप्रेस (गाडी क्रमांक 12656/12655): या गाडीला बोदवड स्थानकावर थांबा द्यावा, ही मागणी करण्यात आली. दक्षिण भारताकडे जाणाऱ्या प्रवाशांसाठी ही गाडी उपयुक्त असून बोदवडमधून मोठ्या प्रमाणावर प्रवासी या मार्गावर जातात. 3) महानगरी एक्सप्रेस (गाडी क्रमांक 22177/22178): मुंबई – पुणे – मनमाड मार्गावरील या जलदगती गाडीला रावेर स्थानकावर थांबा दिल्यास, संपूर्ण परिसरातील प्रवाशांना उपयुक्त ठरेल. मुंबईत काम करणाऱ्या नोकरदार व व्यावसायिक वर्गासाठी ही सुविधा अत्यंत आवश्यक आहे.
4 )अमृतसर – मुंबई एक्सप्रेस (गाडी क्रमांक 11057/11058): उत्तर भारतात अमृतसरकडे जाणाऱ्या गाडीचा निंभोरा स्थानकावर थांबा देण्याची विनंती करण्यात आली. पंजाब, हरियाणा भागात शिक्षण, काम किंवा नातेवाईक भेटीसाठी जाणाऱ्यांसाठी ही सुविधा उपयोगी ठरेल. 5)गरीब रथ एक्सप्रेस (गाडी क्रमांक 12113/12114): ही कमी दरात लांब पल्ल्याचा प्रवास करणारी सेवा असून, मलकापूर येथे थांबा देण्यात आल्यास नागपूर – मुंबई मार्गावरील प्रवाशांना अत्यंत सोयीचे ठरेल.
6 ) गाडी क्रमांक 12719/12720 व 22137/22138: या गाड्यांना नांदुरा स्थानकावर थांबा देण्याची मागणी करण्यात आली. नांदुरा हे बुलढाणा जिल्ह्यातील प्रमुख व्यापारी केंद्र असून, मोठ्या प्रमाणावर नागरिक या स्थानकाचा वापर करतात. 7)आझाद हिंद एक्सप्रेस (गाडी क्रमांक 12129/12130): या गाडीचा बोदवड स्थानकावर थांबा आवश्यक असल्याची बाब रक्षाताई खडसे यांनी अधोरेखित केली. पूर्व भारत आणि मुंबई जोडणाऱ्या या गाडीचा थांबा मिळाल्यास बोदवडसह आसपासच्या गावांना मोठा फायदा होईल. 8)सूरत – अमरावती एक्सप्रेस (गाडी क्रमांक 20925/20926): या गाडीचा थांबा सुद्धा बोदवड येथे देण्यात यावा, असेही सुचवण्यात आले. गुजरात राज्यात कामासाठी जाणाऱ्या मजूर, व्यापारी यांना यामुळे अधिक सोयीचा प्रवास शक्य होईल.
या सर्व मागण्यांमध्ये स्थानिक जनतेच्या भावना प्रतिबिंबित होत असून, या मागण्यांवर तातडीने निर्णय घेऊन प्रवाशांना दिलासा द्यावा, अशी विनंती रक्षाताई खडसे यांनी सतीश कुमार यांच्याकडे केली. यावेळी रावेर लोकसभा क्षेत्रातील अनेक स्थानिक नागरी संघटनांचे, व्यापारी संघटनांचे तसेच विद्यार्थी संघटनांचे निवेदनांचे दाखलेही सादर करण्यात आले. या बैठकीत चेअरमन सतीश कुमार यांनी सर्व मागण्यांचे गांभीर्य लक्षात घेऊन सकारात्मक प्रतिसाद दिला असून, लवकरच या संदर्भात रेल्वे मंत्रालयाकडून निर्णय घेतला जाईल, असे आश्वासन त्यांनी रक्षाताई खडसे यांना दिले. नागरिकांच्या मागण्या न्याय्य असून, त्यांची योग्य कार्यवाही केली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
या निर्णयामुळे संपूर्ण रावेर लोकसभा मतदारसंघातील प्रवासी सुखावतील. शालेय, महाविद्यालयीन विद्यार्थी, शेतकरी वर्ग, व्यापारी, महिला, वृद्ध नागरिक आणि अन्य सर्व प्रवाशांना रेल्वे प्रवासात दिलासा मिळेल. यामुळे केवळ प्रवास सुलभ होणार नाही, तर स्थानिक अर्थव्यवस्था, व्यवसाय, शिक्षण व रोजगार क्षेत्रालाही चालना मिळेल. यातून रावेर लोकसभा क्षेत्राचा सर्वांगीण सामाजिक आणि आर्थिक विकास साधला जाईल, असे निश्चित वाटते. या बैठकीनंतर बोलताना रक्षाताई खडसे यांनी सांगितले की, “रावेर लोकसभा मतदारसंघातील जनतेच्या मूलभूत सोयी-सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी मी सातत्याने प्रयत्नशील आहे. या मागण्या केवळ राजकीय दृष्टिकोनातून नव्हे, तर नागरी हक्काच्या दृष्टीने महत्त्वाच्या आहेत. या मागण्यांवर लवकरच सकारात्मक निर्णय होईल, अशी मी अपेक्षा करते.”
या चर्चेतून हे स्पष्ट होते की, रावेर लोकसभा मतदारसंघात विकासाचे नवे क्षितिज उलगडण्यासाठी ना रक्षाताई खडसे हे नेतृत्व सातत्याने प्रयत्न करत असून, प्रशासन पातळीवरही या मागण्यांना सकारात्मक प्रतिसाद मिळतो आहे. त्यामुळे भविष्यात रावेरसह आसपासच्या सर्व स्थानकांना महत्त्वपूर्ण स्थान लाभेल, अशी आशा सर्वसामान्य नागरिकांनी व्यक्त केली आहे.

आयपीएलच्या १८ वर्षांमध्ये आरसीबी पहिल्यांदाच चॅम्पियन बनले; ट्रॉफी जिंकणारा आठवा संघ बनला, अंतिम सामन्यात पंजाबचा केला पराभव

Loading

मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने आयपीएल २०२५ चे विजेतेपद पटकावले आहे. १८ वर्षांची प्रतीक्षा संपली. अखेर विराट कोहली कर्णधार असताना जे शक्य झालं नाही ते रजत पाटिदारने शक्य करून दाखवलं. अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या अंतिम सामन्यात आरसीबीने पंजाबचा सहा धावांनी पराभव केला. नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना आरसीबीने २० षटकांत नऊ गडी गमावून १९० धावा केल्या. प्रत्युत्तरात पंजाबचा संघ सात गडी गमावून केवळ १८४ धावा करू शकला. आयपीएल विजेता बनणारा आरसीबी आठवा संघ आहे. यापूर्वी मुंबई इंडियन्स, राजस्थान रॉयल्स, चेन्नई सुपर किंग्ज, डेक्कन चार्जर्स, गुजरात टायटन्स, कोलकाता नाईट रायडर्स आणि सनरायझर्स हैदराबाद संघ चॅम्पियन बनले आहेत. प्रथम फलंदाजी करताना बंगळुरूने २० षटकांत नऊ गडी गमावून १९० धावा केल्या. नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना बंगळुरूने खराब सुरुवात केली. फिल साॅल्ट नऊ चेंडूत दोन चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने १६ धावा काढून बाद झाला. त्याला जेमिसनने बाद केले. यानंतर विराट कोहलीने मयंक अग्रवालसोबत डाव सांभाळण्याचा प्रयत्न केला, पण मोठा फटका मारण्याच्या नादात चेंडूचा पाठलाग करताना मयंक बाद झाला. १८ चेंडूत दोन चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने २४ धावा काढून तो बाद झाला. यानंतर रजत पाटीदार १६ चेंडूत २६ धावा करून तंबूमध्ये गेला. विराटने लिव्हिंगस्टोनसोबत ३६ धावांची भागीदारी केली. विराटने ३५ चेंडूत तीन चौकारांच्या मदतीने ४३ धावा काढून अजमतुल्लाहचा बळी ठरला. जितेश शर्माने धमाकेदार खेळी केली, पण मोठ्या शॉटचा पाठलाग करताना तो विजय कुमारने बाद केला. जितेशने १० चेंडूत दोन चौकार आणि दोन षटकारांच्या मदतीने २४ धावा काढल्या. अर्शदीपने शेवटच्या षटकात तीन बळी घेतले. त्याने २० व्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर रोमारियो शेफर्ड (१७ धावा), चौथ्या चेंडूवर कृणाल पंड्या (४ धावा) आणि भुवनेश्वर कुमार (१ धावा) यांचे बळी घेतले. पंजाबकडून अर्शदीप आणि जेमिसन यांनी प्रत्येकी तीन बळी घेतले. त्याच वेळी, अझमतुल्लाह उमरझाई, विजयकुमार विशाख आणि युजवेंद्र चहल यांनी प्रत्येकी एक बळी घेतला.
१९१ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना पंजाबच्या संघाची सुरुवात चांगली झाली. प्रियांश आर्य आणि प्रभसिमरन सिंग यांनी ४३ धावांची भागीदारी केली. प्रियांश २४ धावा काढल्यानंतर हेझलवूडने बाद केला. त्यानंतर २२ चेंडूत २६ धावा काढल्यानंतर प्रभसिमरन सिंग बाद झाला. अंतिम सामन्यात श्रेयस अय्यरची बॅट चालली नाही. तो एक धाव घेत बाद झाला. जोश इंग्लिसने चांगली फलंदाजी केली, परंतु २३ चेंडूत एक चौकार आणि चार षटकारांच्या मदतीने ३९ धावा काढल्यानंतर तो तंबूमध्ये परतला. नेहल वधेरा १५ धावा काढून बाद झाला आणि मार्कस स्टोइनिस सहा धावा काढून बाद झाला. अझमतुल्लाह उमरझाई फक्त एक धाव करू शकला. शशांकने ३० चेंडूत तीन चौकार आणि सहा षटकारांसह ६१ धावांची खेळी केली, परंतु ती विजयासाठी पुरेशी नव्हती. बंगळुरूसाठी भुवनेश्वर कुमार आणि कृणाल पंड्या यांनी प्रत्येकी दोन बळी घेतले. त्याच वेळी यश दयाल, जोश हेझलवूड आणि रोमारियो शेफर्ड यांनी प्रत्येकी एक बळी घेतला.
आयपीएलच्या सुरुवातीला २००८ ते २०१० पर्यंत लीगचे नॉकआउट सामने सेमीफायनल स्वरूपात खेळवले जात होते. तथापि, २०११ पासून त्याचे नियम बदलले गेले आणि प्लेऑफ सुरू झाले. क्वालिफायर-१, क्वालिफायर-२ आणि एलिमिनेटर सामने फिक्स झाले. तेव्हापासून २०२५ पर्यंत एकूण १५ हंगाम झाले आहेत आणि त्यापैकी क्वालिफायर-१ जिंकणाऱ्या संघाने १३ वेळा अंतिम सामना जिंकला आहे. गेल्या आठ वर्षांत, क्वालिफायर-१ जिंकणारा संघ चॅम्पियन बनला आहे. २०१८ ते २०२४ पर्यंत, क्वालिफायर-१ जिंकणारा संघ चॅम्पियन बनला आहे. सीएसकेने २०१८, २०२१, २०२३ मध्ये, मुंबईने २०१९ आणि २०२० मध्ये, गुजरातने २०२२ मध्ये आणि केकेआरने २०२४ मध्ये हे केले. हे सर्व संघ क्वालिफायर-१ जिंकून अंतिम फेरीत पोहोचले. आता आरसीबीने ही क्रमवारी कायम ठेवली आहे.
असे फक्त तीन वेळा घडले आहे की क्वालिफायर-१ जिंकणारा संघ विजेतेपद पटकावू शकला नाही. आरसीबीच्या संघालाच यापूर्वी असा त्रास सहन करावा लागला आहे. हा आरसीबीचा चौथा अंतिम सामना होता. यापूर्वी, संघ २००९, २०११, २०१६ मध्ये देखील अंतिम फेरीत पोहोचला होता. २०१६ मध्ये, आरसीबीने क्वालिफायर-१ जिंकून अंतिम फेरीत पोहोचला होता, परंतु सनरायझर्स हैदराबादने अंतिम फेरीत त्यांचा पराभव केला. त्यानंतर एसआरएच संघ एलिमिनेटर खेळून अंतिम फेरीत पोहोचला आणि एसआरएच हा एकमेव संघ आहे जो अंतिम फेरीत पोहोचला आणि एलिमिनेटर खेळून जिंकला. तथापि, आता आरसीबीने त्यावर मात केली आहे.
२०१३, २०१६ आणि २०१७ मध्ये, क्वालिफायर-१ जिंकणाऱ्या संघाला अंतिम फेरीत पराभवाचा सामना करावा लागला. दुसरीकडे, क्वालिफायर-२ जिंकणाऱ्या संघाने तीन वेळा (२०१६ मधील एसआरएचसह) विजेतेपद जिंकले आहे. ही तीन वर्षे २०१३, २०१६ आणि २०१७ आहेत. २०१३ मध्ये, चेन्नई सुपर किंग्जने क्वालिफायर-१ मध्ये मुंबईला हरवून अंतिम फेरीत प्रवेश केला. तथापि, त्यानंतर मुंबईने क्वालिफायर-२ जिंकून अंतिम फेरीत पोहोचले आणि सीएसकेला हरवून चॅम्पियन बनले. दुसरीकडे, मुंबईने २०१७ मध्ये पुन्हा एकदा हे केले. त्यानंतर रायझिंग पुणे सुपरजायंट्सच्या संघाने क्वालिफायर-१ मध्ये मुंबईला हरवले. तथापि, मुंबईने क्वालिफायर-२ जिंकले आणि नंतर अंतिम फेरीत आरपीएसला एका धावेने हरवून विजेतेपद जिंकले.

आज दि 04 /06 /2025 चे प्रत्येक राशी निहाय आजचे भविष्य

Loading

1) मेष (Aries): आजचा दिवस व्यावसायिक निर्णयांसाठी अनुकूल आहे. आत्मविश्वास वाढेल. कुटुंबातील वडीलधाऱ्यांचे मार्गदर्शन लाभेल. आर्थिक लाभाची शक्यता आहे.

2) वृषभ (Taurus): मन थोडं अस्थिर राहील, संयम आवश्यक आहे. जुने प्रश्न चर्चेने मिटवता येतील. घरात आनंददायी वातावरण राहील. आरोग्याकडे लक्ष द्या.

3) मिथुन (Gemini): नवीन संधी मिळू शकतात. प्रवास संभवतो. जवळच्या व्यक्तीसोबत मतभेद होऊ शकतो, शांततेने संवाद साधा. आर्थिक खर्च वाढू शकतो.

4) कर्क (Cancer): आज मनोबल वाढेल. मित्रांकडून चांगली मदत मिळेल. नोकरीत जबाबदारी वाढेल. कौटुंबिक सौख्य लाभेल. नवीन योजना मनात येतील.

5) सिंह (Leo): महत्वाची कामे पुढे ढकलावीत. गैरसमज टाळा. सामाजिक क्षेत्रात तुमची छाप पडेल. व्यायाम व आहार संतुलित ठेवा.

6) कन्या (Virgo): निर्णय घेण्यापूर्वी नीट विचार करा. भागीदारीत लाभ होईल. आरोग्यात सुधारणा होईल. मनःशांती लाभेल. विद्यार्थ्यांना यश मिळेल.

7) तुला (Libra): आर्थिक लाभाची शक्यता आहे. कुटुंबात आनंददायी घटना घडतील. जोडीदाराशी सहकार्य वाढेल. धार्मिक कार्यात रुची वाटेल.

8) वृश्चिक (Scorpio): जुनी थकलेली कामे पूर्ण होतील. आत्मविश्वासामुळे यश मिळेल. मित्रांसोबत वेळ छान जाईल. पैशांचे व्यवहार सावधपणे करा.

9) धनु (Sagittarius): मनात उत्साह असेल. कामात नवीन जबाबदाऱ्या येतील. वादापासून दूर रहा. आज अनपेक्षित लाभ संभवतो. प्रवासात काळजी घ्या.

10) मकर (Capricorn): घरगुती निर्णयात तुमचे मत महत्त्वाचे ठरेल. आर्थिक नियोजन फायदेशीर ठरेल. आरोग्य चांगले राहील. जुने काम पूर्ण होईल.

11) कुंभ (Aquarius): आज कामात समाधान मिळेल. नवे संबंध निर्माण होतील. खर्चावर नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे. आप्तेष्टांकडून मदत मिळेल.

12) मीन (Pisces): आज मनोबल उच्च राहील. कला व सर्जनशीलतेत प्रगती होईल. घरात शांतता राहील. दैनंदिन कामात यश लाभेल. प्रेमसंबंधात सकारात्मकता येईल.

सिटीझन पोर्टल कोलमडल्याने प्रॉपर्टी मिसिंग दाखला मिळवण्यात नागरिकांची त्रेधा; पोलिस प्रशासनाने तात्काळ दखल घ्यावी

Loading

पाचोरा – नागरिकांच्या दैनंदिन आयुष्यात, अनेकवेळा ओळखपत्र, मालमत्ता कागदपत्रे, मोबाईल, बँक पासबुक, बॅग किंवा अन्य महत्त्वाच्या वस्तू हरवल्या जातात. अशा प्रसंगी प्रॉपर्टी मिसिंगचा दाखला अत्यंत गरजेचा असतो. याआधारे संबंधित व्यक्ती नवीन कागदपत्रे, सिमकार्ड, ओळखपत्र किंवा इतर बदल्या सुलभतेने करून घेऊ शकते. पूर्वीच्या काळात अशा घटनांमध्ये नागरिक थेट संबंधित पोलीस ठाण्यात जाऊन प्रत्यक्ष तक्रार दाखल करत असत. त्यावर तातडीने प्रॉपर्टी मिसिंगचा दाखला देण्यात येत असे. त्यामुळे नागरिकांची गैरसोय टळत असे. मात्र, सध्याच्या काळात पोलिस प्रशासनाने अनेक सुविधा डिजिटल माध्यमावर आणल्या आहेत. त्यातच प्रॉपर्टी मिसिंगची तक्रारही आता ऑनलाईनच दाखल करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. यासाठी राज्य सरकारच्या सिटीझन पोर्टलचा वापर अनिवार्य करण्यात आलेला आहे. पोर्टलवर लॉगिन करून तक्रार नोंदवायची आणि त्यानंतर दाखला स्वतःच प्रिंट करून घेता येतो, अशी पद्धत सुरू करण्यात आली आहे. सुरुवातीला ही योजना नागरिकांच्या सोयीसाठी राबवली गेल्याचे सांगितले गेले होते. परंतु वस्तुस्थिती मात्र याच्या अगदी विरुद्ध आहे. अनेक दिवसांपासून सिटीझन पोर्टल नीट कार्यरत नाही. अनेक वेळा साइट लोड होत नाही, ‘Internal Server Error’, ‘Request Timeout’, ‘Page Not Found’ असे त्रुटी संदेश दाखवले जातात. काही वेळा लॉगिन होत नाही, तर काही वेळा सर्व माहिती भरून ‘Submit’ बटण क्लिक करताच पोर्टल कोलमडते. परिणामी, नागरिक तासन्‌तास प्रयत्न करत राहतात, तरीही तक्रार दाखल होत नाही. विशेषतः ज्यांची कागदपत्रे हरवली आहेत किंवा महत्त्वाची मालमत्ता मिसिंग झाली आहे, अशा व्यक्तींसाठी प्रॉपर्टी मिसिंगचा दाखला हा प्राथमिक आवश्यक कागदपत्र आहे. त्याविना आधारकार्ड, पॅन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, पासपोर्ट, मोबाईल सिम रिअक्टिवेशन, बँकेची सेवा, गॅस कनेक्शन अशा कोणत्याही सेवा मिळवणे शक्य होत नाही. परिणामी नागरिक आर्थिक, सामाजिक व शासकीय गैरसोयींचा सामना करत आहेत. अनेक नागरिकांनी हे लक्षात आल्यानंतर संबंधित पोलीस ठाण्यांमध्ये प्रत्यक्ष जाऊन पूर्वीप्रमाणे दाखला देण्याची विनंती केली. परंतु, आता ऑनलाईन सिस्टमच बंधनकारक असल्याने, पोलिसांकडून सरळ सांगितले जात आहे की ‘ऑनलाईन तक्रार नोंदवूनच दाखला मिळेल’. त्यामुळे नागरिक एकप्रकारे अडचणीत सापडले आहेत. एकीकडे पोर्टल चालत नाही, आणि दुसरीकडे प्रत्यक्ष तक्रार नोंदवता येत नाही, अशा दुहेरी कोंडीत सामान्य माणूस अडकलेला आहे.
सामान्य नागरिकांचे मत स्पष्ट आहे – तंत्रज्ञानाचा वापर स्वागतार्ह असला, तरी तंत्रज्ञान प्रभावी नसेल, तर त्याचा वापर बंधनकारक करण्यात अर्थ नाही. सिटीझन पोर्टल कार्यक्षम नसताना ऑनलाईनच तक्रारीची सक्ती ही अन्यायकारक आहे. याशिवाय, ग्रामीण भागातील नागरिकांना ऑनलाईन प्रक्रियेची नीट माहिती नाही. अनेकांकडे स्मार्टफोन किंवा इंटरनेटचा अडथळा आहे. अशा परिस्थितीत त्यांना शहरातील इंटरनेट केफे किंवा एजंटांकडे जावे लागते. तिथे आर्थिक शोषणही होत आहे.
या पार्श्वभूमीवर आता पोलिस विभाग आणि माहिती-तंत्रज्ञान विभाग यांनी एकत्र येऊन या समस्येवर त्वरित उपाययोजना करणे गरजेचे आहे. सिटीझन पोर्टल तात्काळ सुस्थितीत कार्यान्वित करावे किंवा पर्यायी पद्धत विकसित करावी. जोपर्यंत तांत्रिक अडथळा पूर्णपणे दूर होत नाही, तोपर्यंत नागरिकांना प्रत्यक्ष पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करून दाखला मिळण्याची पूर्वीची पद्धत सुरू ठेवावी, अशी सर्वसामान्यांची मागणी आहे.

मदत छोटी, बदल मोठा ब्रीदवाक्य घेऊन शिवराज्याभिषेक दिनाच्या प्रेरणेतून ‘जीवनशक्ती मायक्रो फायनान्स’चा ६ जून रोजी उद्घाटन सोहळा

Loading

पाचोरा – महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शिवराज्याभिषेक दिनाच्या पावन निमित्ताने ‘जीवनशक्ती मायक्रो फायनान्स व अर्थ विकास फाउंडेशन, पाचोरा’ या सामाजिक आणि आर्थिक सक्षमीकरणासाठी कार्यरत संस्थेच्या नव्याने साकारत असलेल्या कार्यालयाचे भव्य उद्घाटन सोहळा शुक्रवार, दि. ६ जून २०२५ रोजी सकाळी १० वाजता आयोजित करण्यात आलेला आहे. “मदत छोटी, बदल मोठा” हे ब्रीदवाक्य घेऊन सुरु झालेल्या या संस्थेच्या कार्याची दिशा आणि दृष्टी दोन्ही या नव्या कार्यालयातून अधिक व्यापक होणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली आहे. ही संस्था ग्रामीण व शहरी भागातील आर्थिक दुर्बल, महिलांसह गरजू घटकांना आर्थिक संधी उपलब्ध करून देण्यासाठी कर्जसुविधा, मार्गदर्शन, आणि रोजगाराभिमुख प्रशिक्षण यांच्या माध्यमातून कार्यरत आहे. या नव्या कार्यालयामुळे संस्थेच्या कार्याचा विस्तार अधिक प्रभावीपणे व विश्वासार्हतेने होणार असून नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. उद्घाटन मा. आप्पासो. संतोष रूपचंद पाटील आणि मा. तात्यासो. रामदास रूपचंद पाटील यांचे शुभहस्ते होणार असून कार्यक्रमास अनेक मान्यवरांची उपस्थिती लाभणार आहे. विशेषतः पाचोरा-भडगाव मतदारसंघाचे आमदार मा. आप्पासो. किशोर धनसिंग पाटील, माजी आमदार मा. भाऊसो. दिलीप वाघ, तसेच शैक्षणिक, प्रशासकीय, कृषी, पोलीस, आणि राजकीय क्षेत्रातील अनेक मान्यवर या कार्यक्रमास उपस्थित राहणार आहेत.यात मा. उत्तमभाऊ राठोड (अध्यक्ष, मा.वि.शि.मं.),
मा. नानासो. संजय वाघ (चेअरमन, पी.टी.सी. पाचोरा),मा. भुषण अहिरे (प्रांताधिकारी, पाचोरा भाग),मा. विजय बनसोडे (तहसीलदार, पाचोरा),
मा. विकास पाटील साहेब (प्राथमिक शिक्षणाधिकारी),
मा. वैशालीताई सूर्यवंशी (संचालिका, निर्मल सिडस्), मा. अमोलभाऊ शिंदे (मा. तालुकाध्यक्ष, भाजपा),मा. हेमराजदादा राठोड (सचिव, मा.वि.शि.मं.),
मा. करणदादा पवार (मा. नगराध्यक्ष, पारोळा),
मा. नानासाहेब प्रतापराव हरी पाटील (अध्यक्ष, किसान संस्था भडगाव),
मा. बापूसाहेब गणेश पाटील (सभापती, कृ.उ.बा. समिती),
मा. धनंजय येरूळे (उपविभागीय पोलीस अधिकारी),मा. आर. आर. पाटील (सहाय्यक निबंधक),मा. अशोक पवार (पोलीस निरीक्षक, पाचोरा),मा. मंगेश देवरे (मुख्याधिकारी, नगरपरिषद पाचोरा),
मा. समाधान पाटील (गट शिक्षणाधिकारी, पाचोरा), मा. श्री. रमेश जाधव (तालुका कृषि अधिकारी)
यासह शहरातील ज्येष्ठ श्रेष्ठ मान्यवरांच्या उपस्थितीमुळे उद्घाटन सोहळ्याचे महत्त्व अधिक वाढणार असून संपूर्ण पाचोरा शहर आणि तालुक्यातून मान्यवर, सामाजिक कार्यकर्ते, व्यावसायिक, शिक्षणतज्ज्ञ आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहे. या कार्यक्रमाच्या आयोजनात व फाउंडेशनसाठी विशेष योगदान देणारे व कार्यक्रमासाठी निमंत्रक
सौ. नूतन व श्री. दीपक मुळे,सौ. वैशाली व श्री. मनोज पाटील सर,
सौ. सोनाली व श्री. संदीप मालपुरे,सौ. जयश्री व श्री. जगदीश पाटील सर,
सौ. रेखा व श्री. राहुल बोरसे सर,सौ. अविना व श्री. विकास पाटील सर यांनी आपण सर्वांना खास निमंत्रित केले असून
कार्यक्रम स्थळ: जीवनशक्ती मायक्रो फायनान्स, तळमजला, गाळा नं. ४९, नवकार प्लाझा, मार्केट कमिटी समोर, पाचोरा, जि. जळगाव येथे उपस्थिती द्यावी
या नव्या कार्यालयाचे उद्घाटन केवळ एका वास्तूचे नव्हे, तर संकल्पनेचे उद्घाटन आहे – जिथून शेकडो कुटुंबे आर्थिक दृष्ट्या सक्षम होण्यासाठी प्रवास सुरू करतील. ‘जीवनशक्ती’च्या माध्यमातून आर्थिक व्यवहार सुलभ, पारदर्शक व गरजूंना केंद्रस्थानी ठेवून पार पडत आहेत. ग्रामीण भागात आर्थिक समावेशनासाठी ‘जीवनशक्ती’ने घेतलेला हा पुढचा टप्पा महत्त्वपूर्ण आहे.
म्हणून आपण फक्त या सोहळ्यात सामील होणे, हे फक्त कार्यालय पाहणे नाही, तर एका प्रेरणादायी योजनेच्या उभारणीचा साक्षीदार होणे आहे. आपण सर्वांनी उपस्थित राहून या कार्यक्रमाची शोभा वाढवावी, ही विनंती आयोजकांनी केली आहे.
शिवरायांच्या राज्याभिषेकाच्या प्रेरणेतून सुरू होणारा हा आर्थिक सामाजिक विकासाचा संकल्प, ‘जीवनशक्ती’च्या माध्यमातून प्रत्यक्षात उतरणार आहे. ग्रामीण परिवर्तनासाठी कार्यरत असलेल्या या संस्थेचा पुढचा प्रवास निश्चितच अधिक उज्ज्वल, सशक्त आणि दिशादर्शक ठरणार आहे, यात शंका नाही.संस्थेच्या पुढील वाटचालीस झुंज वृत्तपत्र व ध्येय न्यूज संपादक संदीप महाजन व परिवारातर्फे हार्दिक शुभेच्छा

ना.धों. महानोर पुरस्कारासाठी शिफारशी मागविण्याचे आवाहन— शेती-पाणी व्यवस्थापन व साहित्य क्षेत्रातील युवा प्रतिभेचा सन्मान

Loading

मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : शेती, पाणी व्यवस्थापन आणि मराठी साहित्य या अत्यंत महत्त्वाच्या आणि समाजशील क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या नव्या पिढीतील प्रतिभावान व्यक्तींना प्रोत्साहन देण्यासाठी ‘कविवर्य ना.धों. महानोर साहित्य, शेती-पाणी पुरस्कार’ यंदा दुसऱ्या वर्षी प्रदान करण्यात येणार आहे. या पुरस्काराचे आयोजन यशवंतराव चव्हाण सेंटर, मुंबई आणि भवरलाल अँड कांताबाई जैन फाउंडेशन, जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात येत आहे.
या पुरस्कारांची औपचारिक घोषणा चव्हाण सेंटरचे अध्यक्ष मा. शरद पवार यांनी पूर्वीच केली असून, पुरस्कार वितरण समारंभ १७ सप्टेंबर २०२५ रोजी यशवंतराव चव्हाण सेंटर, मुंबई येथे त्यांच्या हस्ते संपन्न होणार आहे.
पुरस्कारासाठी शिफारशी मागविण्यात येत असलेली क्षेत्रे :
सन २०२५ साठी खालील दोन प्रमुख क्षेत्रांमध्ये कार्य करणाऱ्या युवकांची शिफारस मागविण्यात येत आहे —
१. शेती व पाणी व्यवस्थापन :
नवोन्मेषी, पर्यावरणपूरक आणि पारंपरिक व आधुनिक शेतीपद्धतींचा समन्वय साधणारे प्रयोगशील शेतकरी
एकूण २ शेतकरी (१ पुरुष आणि १ महिला)
२. मराठी साहित्य :
समतामूल्यांना अधोरेखित करणारे, मानवी मूल्यांचा पुरस्कार करणारे आणि कोणत्याही प्रकारच्या सामाजिक विषमतेस विरोध करणारे साहित्यिक
एकूण ३ कवी आणि १ कादंबरीकार
शिफारशी करताना लक्षात घेण्यासारख्या महत्त्वाच्या बाबी :
वयमर्यादा : १ सप्टेंबर २०२५ रोजी उमेदवाराचे वय ४५ वर्षांपेक्षा कमी असावे. हे पुरस्कार नव्या पिढीतील प्रतिभावान कार्यकर्त्यांसाठी आहेत.
शेती व पाणी व्यवस्थापन क्षेत्रात काम करणाऱ्या शेतकऱ्यांनी पारंपरिकतेसोबत आधुनिकता, प्रयोगशीलता आणि पर्यावरणपूरक दृष्टिकोन यांचा समन्वय साधलेला असावा.
साहित्य क्षेत्रात, पुरस्कार हे कोणत्याही एका पुस्तकापुरते मर्यादित नसून, लेखक वा कवी यांच्या एकूण साहित्यिक योगदानाच्या मूल्यांकनावर आधारित असतील.
शिफारस करताना उमेदवाराच्या कार्याची थोडक्यात पार्श्वभूमी, त्याचे समाजावर झालेले परिणाम, कार्याची ठळक वैशिष्ट्ये आणि साहित्य वा शेतीसंबंधी कार्याची सविस्तर माहिती दिली जाणे आवश्यक आहे.
शिफारशी पाठविण्याची अंतिम तारीख : ३० जून २०२५
शिफारशी खालील माध्यमांद्वारे स्वीकारण्यात येतील :
Google Form लिंक : https://forms.gle/KrzrVBuqirJBnxPA6
ईमेल : admin@chavancentre.org
WhatsApp क्रमांक : +91 8169493161
पुरस्कार वितरण समारंभ :
या पुरस्कारांचे वितरण १७ सप्टेंबर २०२५ रोजी, मा. शरदराव पवार यांच्या हस्ते यशवंतराव चव्हाण सेंटर, मुंबई येथे भव्य समारंभात संपन्न होईल.
युवा कार्यकर्त्यांना प्रेरणा देणारे व्यासपीठ :
या पुरस्काराच्या माध्यमातून शेती, पाणी व्यवस्थापन आणि मराठी साहित्य क्षेत्रात नवनवीन प्रयोग करणाऱ्या युवकांचे कार्य समाजासमोर येणार असून, त्यांच्या कार्यास मान्यता व प्रोत्साहन मिळणार आहे. या उपक्रमाविषयी यशवंतराव चव्हाण सेंटरच्या कार्याध्यक्ष मा. सुप्रिया सुळे आणि भवरलाल अँड कांताबाई जैन फाउंडेशनचे अध्यक्ष अशोक जैन यांनी संयुक्तपणे व्यक्त केले की, “हा पुरस्कार नव्या पिढीतील प्रतिभावान कार्यकर्ते व साहित्यिकांना प्रेरणा देणारा ठरेल आणि त्यांच्या सामाजिक भान असलेल्या कार्यास नवी दिशा मिळेल.”
संपर्कासाठी :
पुरस्कारासंबंधी अधिक माहितीसाठी व शंका निरसनासाठी वरील ईमेल किंवा व्हॉट्सअॅप क्रमांकावर संपर्क साधावा.

“शून्याचा अर्थ शोधणारा संशोधक – पाचोऱ्याचा अभिमान : डॉ. किरण वाणी यांना पीएचडी पदवी

Loading

पाचोरा तालुक्याला शैक्षणिक व संशोधन क्षेत्रात नावलौकिक मिळवून देणारी अत्यंत गौरवास्पद अशी बातमी नुकतीच समोर आली आहे. पाचोरा येथील रहिवासी आणि अभ्यासू वृत्तीचा युवा वैज्ञानिक डॉ. किरण वाणी यांना खगोल भौतिकविज्ञान या उच्च दर्जाच्या आणि अत्यंत गुंतागुंतीच्या विषयात पीएचडी पदवी प्राप्त झाली आहे. संशोधनाच्या मार्गावर अविरत झगडणारा, जिज्ञासू वृत्तीचा किरण वाणी हा आज देशातील सर्वोच्च खगोल संस्थांमध्ये एक मान्यताप्राप्त पोस्ट-डॉक्टरल संशोधक म्हणून कार्यरत असून, त्याच्या या यशामुळे केवळ पाचोऱ्याच नव्हे तर संपूर्ण जिल्ह्याचे आणि महाराष्ट्राचेही नाव उज्ज्वल झाले आहे.
    डॉ. किरण वाणी यांचा जन्म पाचोरा येथील एका मध्यमवर्गीय कुटुंबात झाला. त्यांचे वडील अरुण वाणी हे समाजात अत्यंत प्रतिष्ठित

व्यक्ती असून त्यांनी आपल्या मुलामध्ये शिस्त, जिज्ञासा आणि अभ्यासाची नितांत निष्ठा बालपणापासून रुजवली. शालेय व महाविद्यालयीन शिक्षण काळात किरण यांचा ओढा इंजिनिअरिंग किंवा मेडिकल शाखेपेक्षा थेट शास्त्रीय संशोधनाच्या दिशेने होता. इतर विद्यार्थी पारंपरिक मार्ग निवडत असताना, किरण यांना अंतराळातील गूढ रहस्ये, ताऱ्यांचे जीवनचक्र, ब्लेझार्ससारख्या उच्च-ऊर्जेच्या खगोलीय घटकांची कार्यपद्धती आणि गॅलॅक्सींचे स्वरूप या सगळ्यांविषयी विलक्षण आकर्षण होते.
  ही ओढ हळूहळू त्याच्या अभ्यासात, वाचनात, प्रकल्पांमध्ये आणि करिअरच्या दिशादर्शक निर्णयांमध्ये प्रकट होऊ लागली. शालेय स्तरावर विविध विज्ञान प्रदर्शनांमध्ये सहभाग, विज्ञानविषयक निबंध आणि चर्चांमध्ये सहभागी होणं यामुळे त्याची एक वेगळी ओळख निर्माण झाली.
   डॉ. किरण वाणी यांचा खगोल विज्ञानातील गाढ अभ्यास आणि निस्सीम आवड पाहता त्यांची निवड आर्यभट्ट रिसर्च इन्स्टिट्यूट ऑफ ऑब्झर्वेशनल सायन्सेस (ARIES), नैनीताल या भारत सरकारच्या महत्त्वाच्या संशोधन संस्थेत 2020 मध्ये झाली. येथे त्यांनी 2020 ते 2025 या कालावधीत “अ‍ॅक्टिव्ह गॅलॅक्सी” या विषयावर सखोल संशोधन केले.
     ARIES संस्थेत डॉ. हरित्मा गौर या ज्येष्ठ मार्गदर्शकांच्या देखरेखीखाली त्यांनी अस्ट्रॉनॉमी आणि अ‍ॅस्ट्रोफिजिक्स विभागात कार्य केले. विशेषतः “Active Galaxies” या विषयावरील त्यांचे कार्य हे अत्यंत उल्लेखनीय ठरले. अ‍ॅक्टिव्ह गॅलॅक्सी म्हणजे अशा गॅलॅक्सी ज्या त्यांच्या मध्यभागी असलेल्या सुपरमॅसिव्ह ब्लॅक होल मुळे उच्च उर्जा उत्सर्जन करतात. या अशा गॅलॅक्सीमधून येणाऱ्या विविध प्रकारच्या किरणोत्सर्गाचे निरीक्षण करून त्यामागील यंत्रणा, त्यांची विशिष्ट वैशिष्ट्ये आणि उत्क्रांती याबाबतची माहिती मिळवण्याचा त्यांनी यशस्वी प्रयत्न केला.
   या संशोधनासाठी विविध राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय खगोल वेधशाळांमधून डेटा प्राप्त करून, त्याचा विश्लेषणात्मक अभ्यास त्यांनी केला. या संपूर्ण संशोधन कालावधीत किरण वाणी यांनी भारत सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयाकडून संशोधनासाठी शिष्यवृत्तीही प्राप्त केली होती.
   ARIES मधील व्यावहारिक संशोधनासोबतच, डॉ. किरण वाणी यांनी पीएचडीसाठी “Studies of Flux and Spectral Variability of Blazars” या अत्यंत आव्हानात्मक आणि नावीन्यपूर्ण विषयाची निवड केली. या संशोधनाचे मार्गदर्शन नांदेड विद्यापीठातील प्रा. डॉ. एम. के. पाटील यांनी केले. ब्लेझार्स हे ब्रह्मांडातील सर्वात तेजस्वी आणि उर्जा-प्रचंड स्रोतांपैकी एक आहेत. त्यांच्या प्रकाशमानतेतील (Flux) आणि वर्णपटातील (Spectral) अनियमिततेचा अभ्यास करून डॉ. किरण वाणी यांनी अनेक महत्त्वाचे निष्कर्ष काढले. विशेषतः त्यांच्या संशोधनाने ब्लेझार्सच्या वर्तनातील विविध सुसंगत पॅटर्न्स, त्यांच्याशी संबंधित ध्रुवीकरण आणि स्पेक्ट्रल फ्रिक्वेन्सीमध्ये दिसणारे बदल यांची वैज्ञानिक पद्धतीने मांडणी केली. त्यांच्या या अभ्यासामुळे खगोल भौतिकशास्त्राच्या क्षेत्रात नवीन संशोधनदिशा उघडल्या गेल्या आहेत. त्यांच्या संशोधन प्रबंधाची दखल राष्ट्रीय स्तरावर घेतली गेली असून, काही आंतरराष्ट्रीय जर्नल्समध्ये त्यांचे लेख प्रसिद्धही झाले आहेत. सध्या डॉ. किरण वाणी हे भारतातील अत्युच्च दर्जाच्या खगोलशास्त्र संस्थांपैकी एक असलेल्या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ॲस्ट्रोफिजिक्स (IIA), बंगळुरु येथे पोस्ट-डॉक्टरल संशोधक म्हणून कार्यरत आहेत. येथे त्यांचे संशोधन आणखी गहिरं आणि परिणामकारक ठरत असून, आधुनिक उपकरणांचा आणि जागतिक स्तरावरील खगोल संशोधन समुदायाचा लाभ त्यांना मिळत आहे.  “Multi-wavelength Observational Studies of Blazar Emission Mechanism” या व्यापक विषयाभोवती केंद्रित आहे. या माध्यमातून डॉ. किरण वाणी हे भारताच्या अंतराळ संशोधनामध्ये महत्त्वाची भर घालत आहेत. “इंजिनिअरिंग आणि मेडिकल या पारंपरिक क्षेत्रांपेक्षा वेगळी वाट निवडण्याची प्रेरणा मला बालपणातच मिळाली होती. माझं स्वप्न नेहमीच अंतराळाच्या रहस्यांचा मागोवा घेण्याचं होतं. संशोधन क्षेत्र हे खडतर असलं तरी समाधानकारक आणि आत्मिक समाधान देणारं आहे,” असं डॉ. किरण वाणी यांनी सांगितलं.
त्यांच्या मते, भारतात तरुणांनी विज्ञान आणि संशोधन क्षेत्रात अधिक संख्येने यावं, यासाठी शासनाने संशोधनासाठी अधिक निधी आणि प्रेरणा द्यायला हवी. शाळा-कॉलेजांमधून वैज्ञानिक दृष्टिकोन रुजवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. डॉ. किरण वाणी यांच्या या थोर यशाबद्दल सर्व स्तरातून अभिनंदन आणि कौतुक होत आहे. शैक्षणिक, सामाजिक आणि वैज्ञानिक वर्तुळात त्यांचं नाव आदराने घेतलं जात आहे. पाचोरा तालुक्यातील अनेक विद्यार्थी आणि पालकांसाठी त्यांनी एक आदर्श निर्माण केला आहे.
त्यांच्या आई-वडिलांचेही सर्वत्र अभिनंदन होत आहे. डॉ. किरण यांचे गुरू, मार्गदर्शक आणि सहकारी देखील त्यांच्या कर्तृत्वाची मुक्तकंठाने स्तुती करत आहेत.
अशा बुद्धिमान, सातत्यपूर्ण प्रयत्न करणाऱ्या आणि भारतीय खगोल विज्ञानाच्या भविष्यासाठी झटणाऱ्या तरुण वैज्ञानिकाला आज देशाच्या सर्वोच्च वैज्ञानिक संस्थांमध्ये कार्य करण्याची संधी मिळणं हे पाचोऱ्यासाठी गौरवाची बाब आहे. डॉ. किरण वाणी यांचे यश हे केवळ त्यांच्या व्यक्तिगत कर्तृत्वाचे प्रतीक नसून, नव्या पिढीतील तरुणांनी वैज्ञानिक क्षेत्रात उत्कृष्टता गाठू शकते याचा वस्तुपाठ आहे. खगोल भौतिकविज्ञानासारख्या विशिष्ट आणि गुंतागुंतीच्या विषयात त्यांनी दाखवलेली निष्ठा, चिकाटी आणि अभ्यास त्यांच्या भविष्याच्या यशाचा मजबूत पाया आहे.
  “शून्याचा अर्थ शोधणारा संशोधक – पाचोऱ्याचा किरण वाणी” या शीर्षकाने डॉ. किरण वाणी यांची ही यशोगाथा विज्ञानप्रेमी आणि युवकांसाठी एक प्रेरणादायी दीपस्तंभ ठरेल, याची खात्री आहे.

आज दि 03 /06 /2025 चे प्रत्येक राशी निहाय आजचे भविष्य

Loading

१. मेष (Aries):
आज तुमच्या आत्मविश्वासात वाढ होईल. नवे करार किंवा व्यावसायिक संधी तुमच्यासाठी लाभदायक ठरतील. कौटुंबिक सौख्य टिकवण्यासाठी संयमाने संवाद साधा.

२. वृषभ (Taurus):
आज तुमच्याकडून महत्त्वाचे निर्णय घेतले जाऊ शकतात. आर्थिक व्यवहारात सावधगिरी बाळगा. जुने मित्र भेटण्याची शक्यता आहे.

३. मिथुन (Gemini):
कामाच्या ठिकाणी तुमचे विचार सकारात्मक बदल घडवतील. प्रवास घडू शकतो. कौटुंबिक विषयात थोडे तणाव जाणवू शकतात.

४. कर्क (Cancer):
आज तुमच्या कल्पकतेचा चांगला उपयोग होईल. कला, लेखन किंवा अध्यात्मिक कामात रस वाढेल. मन:शांती लाभेल, पण खर्चावर नियंत्रण ठेवा.

५. सिंह (Leo):
महत्त्वाची जबाबदारी तुमच्या खांद्यावर येऊ शकते. यश मिळवण्यासाठी धैर्याची गरज भासेल. आरोग्याकडे थोडे लक्ष द्या.

६. कन्या (Virgo):
व्यवसायात स्थिरतेची लक्षणे आहेत. घरातील वडीलधाऱ्यांचे मार्गदर्शन उपयोगी ठरेल. सायंकाळी अचानक लाभाची शक्यता आहे.

७. तुळ (Libra):
आज मानसिक स्थैर्य गरजेचे आहे. नोकरीतील बदलाचा विचार होऊ शकतो. प्रेमसंबंधात थोडी असमजूत निर्माण होऊ शकते.

८. वृश्चिक (Scorpio):
आत्मपरीक्षणासाठी योग्य दिवस. जुने अपूर्ण काम पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. कौटुंबिक वातावरण सुखद वाटेल

९. धनु (Sagittarius):
धाडसी निर्णय आज यश देऊ शकतात. तुमचं मत मांडताना स्पष्टता ठेवा. मित्रपरिवारात गोड संवाद होईल.

१०. मकर (Capricorn):
कामात स्थिरता वाटेल. आर्थिक व्यवहारात विचारपूर्वक पावले टाका. नवीन संपर्क लाभदायक ठरतील.

११. कुंभ (Aquarius):
सर्जनशीलतेला चालना मिळेल. नवे शिकण्याची संधी मिळेल. वैयक्तिक आयुष्यात समजूतदारपणा गरजेचा आहे.

१२. मीन (Pisces):
आज मन काहीसं अस्थिर राहू शकते. आपल्या मतांवर ठाम राहा, पण इतरांचेही ऐकायला शिका. अध्यात्मिक आकर्षण वाढेल.

“प्रफूल्ल संघवी अध्यक्ष, समाज में नवचेतना!”

Loading

पाचोरा के सामाजिक कार्यकर्ता, पूर्व नगरसेवक तथा विभिन्न क्षेत्रों में अपनी छाप छोड़ने वाले प्रतिष्ठित उद्योजक प्रफुल्लकुमार (पप्पू भाऊ) जवाहरलाल संघवी को दिनांक 1 जून को ‘शेट बछराजजी रुपचंदजी संघवी जैन पाठशाला, पाचोरा’—इस शताब्दी पार कर चुकी प्रतिष्ठित सामाजिक संस्था—के अध्यक्ष पद पर सर्वसम्मति से नियुक्त किया गया है। संस्था की नियमित बैठक में यह चयन जैन समाज के प्रमुख मार्गदर्शकों और सदस्यों की उपस्थिति में संपन्न हुआ। उनके इस चयन से पाचोरा जैन समाज में आनंद और उत्साह का वातावरण है।
प्रफुल्लकुमार संघवी केवल नाम से ही नहीं, बल्कि अपने कार्यों से भी एक आदर्श व्यक्तित्व माने जाते हैं। पूर्व नगरसेवक के रूप में उन्होंने पाचोरा शहर के विकास हेतु विशेष योगदान दिया। सामाजिक कार्यों में सक्रिय भूमिका निभाते हुए उन्होंने कई जनहितैषी उपक्रम हाथ में लिए। जरूरतमंदों और छात्रों के लिए शैक्षणिक सहायता, स्वास्थ्य शिविर, जलसंवर्धन, वृक्षारोपण, सांस्कृतिक कार्यक्रम जैसे अनेक क्षेत्रों में उन्होंने महत्वपूर्ण कार्य किया है।
प्रफुल्लकुमार संघवी ‘महावीर नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित, पाचोरा’ के भी संचालक हैं। सहकार क्षेत्र में उन्होंने पारदर्शिता, विश्वास और उचित प्रबंधन के सिद्धांतों पर कार्य करते हुए संस्था की आर्थिक वृद्धि और सदस्यों के हितों से संबंधित निर्णयों में सक्रिय सहभागिता निभाई है। उनकी कार्यकुशलता के कारण संस्था की विश्वसनीयता निरंतर बढ़ रही है।
निर्माण क्षेत्र में वे MSP बिल्डकॉन और साई इन्फ्रा के माध्यम से उल्लेखनीय कार्य कर रहे हैं। ईमानदारी, प्रतिबद्धता और गुणवत्ता पर आधारित उनकी कार्यशैली ने पाचोरा तालुका में निर्माण व्यवसाय में विश्वास का एक नया आधार स्थापित किया है। विभिन्न आवासीय और व्यावसायिक प्रकल्पों के माध्यम से उन्होंने क्षेत्र की सुंदरता को बढ़ाया है और रोजगार निर्माण में भी योगदान दिया है।
‘शेट बछराजजी रुपचंदजी संघवी जैन पाठशाला, पाचोरा’ संस्था पिछले सौ वर्षों से अधिक समय से सामाजिक, शैक्षणिक और सांस्कृतिक क्षेत्र में कार्यरत है। यह संस्था जैन समाज की संस्कृति का संरक्षण, नैतिक शिक्षा का प्रचार और विद्यार्थियों के सर्वांगीण विकास के लिए कार्य कर रही है। संस्था के इतिहास में अनेक दानवीर व्यक्तियों का योगदान रहा है और आज भी यह संस्था पारंपरिक मूल्यों और आधुनिक आवश्यकताओं के बीच संतुलन साधते हुए आगे बढ़ रही है।
1 जून को हुई बैठक में प्रफुल्लकुमार संघवी का सर्वसम्मति से अध्यक्ष पद पर चयन हुआ। इस अवसर पर समाज के कई प्रमुख गणमान्यजन उपस्थित थे जिनमें रतनचंदजी संघवी, डॉ. जवाहरजी संघवी, किशोरजी संघवी, पूर्व अध्यक्ष बबलू संघवी, महेंद्र शेठ संचेती, कांतीलालजी जैन, जीवन जैन, प्रफुल्लजी बांठीया, दिनेश बोथरा, मिलिंद संघवी, नितीन संघवी, प्रदीपकुमार संघवी तथा अन्य मान्यवर सम्मिलित थे।
प्रफुल्लकुमार संघवी के अध्यक्ष बनने से समाज में सकारात्मक ऊर्जा का संचार हुआ है। उनके अनुभवसम्पन्न नेतृत्व में जैन पाठशाला के माध्यम से समाजहित के नए उपक्रम, गुणवत्तापूर्ण शैक्षणिक सुविधाएं और नैतिक शिक्षा के प्रचार पर विशेष बल दिया जाएगा, ऐसी उम्मीद व्यक्त की जा रही है। विशेषकर युवाओं को प्रोत्साहन देना, महिलाओं के आत्मनिर्भरता हेतु योजनाएं लाना, पर्यावरण अनुकूल परियोजनाओं को बढ़ावा देना तथा विद्यार्थियों के सर्वांगीण विकास के लिए नई योजनाएं आरंभ करना—इन उद्देश्यों के लिए उन्होंने प्रयास शुरू कर दिए हैं।
प्रफुल्लकुमार संघवी के इस चयन की सर्वत्र सराहना हो रही है। पाचोरा तालुका के जैन समाज के विभिन्न घटकों, सामाजिक संस्थाओं, व्यापारी संगठनों, शैक्षणिक क्षेत्र के विद्वानों और सामान्य नागरिकों ने भी उनके अध्यक्ष पद पर चयन का स्वागत किया है। इस चयन को एक प्रेरणादायक नेतृत्व के समाज सेवा में पुनः सक्रिय होने के रूप में देखा जा रहा है।
पाचोरा शहर और तालुका के जैन समाज में उनके नेतृत्व से नवचेतना उत्पन्न होने के संकेत मिल रहे हैं। सामाजिक सेवा, शिक्षा, स्वास्थ्य, संस्कार और धर्मप्रसार जैसे सभी क्षेत्रों में आधुनिक दृष्टिकोण से कार्य करने वाला यह नेतृत्व समाज को एक नई दिशा देने के लिए तैयार है।
प्रफुल्लकुमार (पप्पू भाऊ) संघवी सामाजिक सजगता, व्यावसायिक ईमानदारी और नेतृत्व गुणों का उत्कृष्ट उदाहरण हैं। जैन समाज की अत्यंत प्रतिष्ठित और ऐतिहासिक संस्था ‘शेट बछराजजी रुपचंदजी संघवी जैन पाठशाला’ के अध्यक्ष पद पर उनका चयन एक प्रेरणादायी युग का प्रारंभ होगा, ऐसी आशा की जा रही है। पाचोरा जैन समाज के उज्ज्वल भविष्य के लिए यह चयन निश्चित ही एक मील का पत्थर सिद्ध होगा। उनके आगामी कार्यों के लिए जैन समाज समेत सम्पूर्ण पाचोरा नगर की शुभकामनाएं उनके साथ हैं

ताज्या बातम्या

error: Content is protected !!