Home Blog Page 68

आज दि.13/08/2025 चे सर्व राशीचे भविष्य व शुभ अंक व रंग

0

Loading

मेष
नवीन कल्पना प्रभावी ठरतील. सामाजिक मान-सन्मान मिळेल. महत्वाची कामे पार पाडाल. जुने प्रश्न सुटतील.
शुभ अंक: 3 शुभ रंग: तांबडा

वृषभ
आज शांतपणे निर्णय घ्या. आर्थिक बाजू बळकट होईल. कामात स्थिरता राहील. घरात आनंदाचे वातावरण.
शुभ अंक: 6 शुभ रंग: पांढरा

मिथुन
मन आनंदी राहील. मित्रपरिवाराकडून आनंददायक बातमी मिळेल. एखादा अचानक लाभ संभवतो.
शुभ अंक: 5 शुभ रंग: हिरवा

कर्क
दिवस मध्यम आहे. कामात थोडा त्रास संभवतो. आरोग्याकडे दुर्लक्ष नको. शांततेने निर्णय घ्या.
शुभ अंक: 2 शुभ रंग: चंदेरी

सिंह
तुमचे विचार ऐकले जातील. कार्यक्षेत्रात यश मिळेल. नवीन संधी मिळण्याची शक्यता. आत्मविश्वास वाढेल.
शुभ अंक: 1 शुभ रंग: केशरी

कन्या
जुने व्यवहार पूर्ण होण्याची शक्यता. कामात अचूकता ठेवावी लागेल. अनावश्यक खर्च टाळा.
शुभ अंक: 7 शुभ रंग: राखाडी

तुळ
दिवस उत्साहदायक असेल. मनाजोगती कामे पार पडतील. सौंदर्य व कलात्मक कामात रस वाटेल.
शुभ अंक: 9 शुभ रंग: गुलाबी

वृश्चिक
गोंधळाची स्थिती निर्माण होऊ शकते. स्वतःचे मत ठामपणे मांडा. निर्णयात विलंब करू नका.
शुभ अंक: 4 शुभ रंग: गडद जांभळा

धनु
नवे कार्य सुरू करण्यास योग्य वेळ. नशिबाची साथ लाभेल. विद्यार्थ्यांसाठी प्रगतीचा दिवस.
शुभ अंक: 8 शुभ रंग: पिवळा

मकर
घरातील वातावरण आनंददायक राहील. एखाद्या महत्त्वाच्या व्यक्तीची भेट घडेल. निर्णय सकारात्मक ठरतील.
शुभ अंक: 10 शुभ रंग: तपकिरी

कुंभ
थोडा मानसिक तणाव जाणवू शकतो. खर्च वाढू शकतो. परिश्रमाचे योग्य फळ मिळेल. संयम बाळगा.
शुभ अंक: 11 शुभ रंग: निळा

मीन
आज तुम्हाला मन:शांती लाभेल. जोडीदाराचा सल्ला उपयुक्त ठरेल. आर्थिक लाभ मिळण्याची शक्यता.
शुभ अंक: 6 शुभ रंग: आकाशी

वाचकांनी वरील भविष्यवाणीचा अर्थ अचूक भविष्यवाणी म्हणून लावता केवळ आत्मपरीक्षण आणि सकारात्मक प्रेरणा म्हणून घ्यावा.

पाचोरा शहरासाठी अभिमानाचा क्षण — जगप्रसिद्ध JNU विद्यापीठाचा विद्यार्थी साकेत सोनार ‘कौन बनेगा करोडपती’च्या हॉट सीटवर बिग बी अमिताभ बच्चन यांच्या सोबत

0

Loading

पाचोरा शहरातील समाजकार्य, राजकारण आणि वित्तीय क्षेत्रात आपले वेगळे स्थान निर्माण करणाऱ्या कुटुंबाचा वारसा पुढे नेत, शहराचा लौकिक वाढविणारा एक अभिमानास्पद प्रसंग नुकताच घडला आहे. सामाजिक कार्यकर्ते तसेच माजी नगरसेवक, दि पाचोरा पिपल्स बॅंकेचे माजी संचालक आणि संत नरहरी ना पतसंस्थेचे माजी चेअरमन नंदकुमार सोनार( Mo. 9665821559) यांचा मुलगा साकेत सोनार हा लोकप्रिय आणि प्रतिष्ठेचा मान मिळालेल्या ‘कौन बनेगा करोडपती’ या दूरचित्रवाहिनीवरील कार्यक्रमाच्या हॉट सीटवर पोहोचला आहे. हा कार्यक्रम हिंदी चित्रपटसृष्टीतील महानायक, भारतीय चित्रपटविश्वातील अतुलनीय व्यक्तिमत्त्व अमिताभ बच्चन यांच्या सूत्रसंचालनाखाली सादर केला जातो. देशभरातील लाखो प्रेक्षक ज्यांना ‘बिग बी’ या नावाने प्रेमाने हाक मारतात, त्यांच्या समोर बसून, ज्ञानाच्या आधारे प्रश्नांची उत्तरे देत आपली प्रतिभा दाखविण्याची संधी मिळणे, ही केवळ साकेतसाठीच नव्हे तर संपूर्ण पाचोरा शहरासाठी मोठी अभिमानाची बाब आहे. साकेत सोनार हा केवळ पाचोराचाच नव्हे, तर राष्ट्रीय आणि शैक्षणिक क्षेत्रातही एक ओळख निर्माण करणारा तरुण आहे. तो सध्या जगप्रसिद्ध दिल्ली येथील जवाहरलाल नेहरू विद्यापीठ (JNU) येथे शिक्षण घेत आहे. JNU हे देशातील उच्च दर्जाचे संशोधन आणि शैक्षणिक कार्यासाठी ओळखले जाणारे संस्थान असून, येथून अनेक विद्वान, विचारवंत आणि प्रशासकीय अधिकारी घडले आहेत. या नामांकित विद्यापीठातील विद्यार्थी म्हणून साकेतची निवड होणे हेच त्याच्या बौद्धिक क्षमतेचे आणि कष्टाळू वृत्तीचे द्योतक आहे. JNU मधील शिक्षणामुळे त्याच्या ज्ञानाचा व्याप अधिक व्यापक झाला असून, चालू घडामोडींपासून ते जागतिक राजकारण, अर्थशास्त्र, संस्कृती आणि विज्ञान या विविध विषयांवर त्याची सखोल समज वाढली आहे. हाच बळकट शैक्षणिक पाया त्याला ‘कौन बनेगा करोडपती’च्या हॉट सीटपर्यंत पोहोचण्यात उपयोगी ठरला. विशेष म्हणजे, कोरोना काळात जेव्हा सर्वत्र भीती आणि अनिश्चितता पसरली होती, त्या काळात साकेत पाचोरा येथेच वास्तव्यास होता. त्यावेळी त्याने आपल्या ज्ञानाचा उपयोग समाजोपयोगी कार्यासाठी करत, ‘ध्येय न्यूज’ या माध्यमातून नागरिकांना विनामूल्य जर्मन भाषेचे शिक्षण आणि त्यासंबंधी सविस्तर माहिती दिली होती. या उपक्रमामुळे अनेक तरुणांना नवीन भाषा शिकण्याची आणि रोजगाराच्या संधींबाबत मार्गदर्शन मिळाले. त्याच काळात ‘ध्येय न्यूज’च्या स्टुडिओमध्ये प्रा. डॉ. वैष्णवी मॅडम यांनी साकेतची खास मुलाखत घेण्याचा योग आला होता, ज्यात त्याने भाषाशिक्षण, शिक्षणातील संधी आणि युवकांच्या प्रगतीसाठी आवश्यक मार्गदर्शन या

https://youtu.be/NNwC4ul0MWA?si=CKfPFaPagEXfUKZ  वरील लिंक ला टच करून साकेत सोनार याची थेट मुलाखत आपण बघू शकता

विषयांवर सखोल चर्चा केली होती. साकेत हा स्वभावाने अत्यंत शांत, अभ्यासू आणि कष्टाळू युवक आहे. बालपणापासूनच त्याला विविध क्षेत्रातील माहिती आत्मसात करण्याची आवड आहे. शिक्षणकाळात तो नेहमीच वाचनप्रिय राहिला असून, इतिहास, भूगोल, विज्ञान, क्रीडा, चालू घडामोडी, साहित्य अशा अनेक विषयांत त्याला विशेष रस आहे. त्याच्या या बहुविध ज्ञानाच्या आवडीमुळेच त्याची ‘कौन बनेगा करोडपती’च्या हॉट सीटपर्यंत वाटचाल शक्य झाली. या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी देशभरातून हजारो जण अर्ज करतात, अनेक फेऱ्यांमधून कठोर निवड प्रक्रिया पार करावी लागते. साकेतनेही या प्रक्रियेत आपली बुद्धिमत्ता, तत्परता आणि आत्मविश्वास दाखवून यश मिळवले. मुंबईतील ‘कौन बनेगा करोडपती’च्या भव्य आणि भव्यदिव्य सेटवर पाऊल ठेवणे ही स्वतःतच एक रोमांचक अनुभूती आहे. साकेतचा पुढील खेळ परवा होणार असून, त्याच्या बुद्धिमत्तेच्या बळावर आणखी मोठा टप्पा गाठण्याची शक्यता वर्तवली जात आहे. पाचोरा शहरातील नागरिकांमध्ये या घटनेने प्रचंड उत्साह आणि अभिमानाची लाट उसळली आहे. सोशल मीडियावर साकेतचे फोटो, व्हिडिओ आणि संदेश मोठ्या प्रमाणावर शेअर होत आहेत. नागरिक आपल्या ओळखीच्या, आपल्या परिसरातील एका तरुणाने राष्ट्रीय पातळीवरील या व्यासपीठावर पोहोचून शहराचा गौरव वाढवल्याबद्दल आनंद व्यक्त करत आहेत. अनेकांनी सोशल मीडियावर ‘साकेत सोनार — पाचोराचा अभिमान’ अशा शुभेच्छा संदेशांचा वर्षाव केला आहे. साकेतचा परिवारही या यशामुळे अत्यानंदित आहे. वडील नंदकुमार सोनार यांनी साकेतच्या मेहनतीबद्दल बोलताना सांगितले की, “साकेतला लहानपणापासूनच वाचनाची आवड आहे. पुस्तक, वर्तमानपत्र, मासिकं वाचण्यात तो रमतो. अनेक स्पर्धा परीक्षांसाठी तयारी करताना त्याने घेतलेले वाचन आणि ज्ञान याचा उपयोग आज या मंचावर झाला आहे. ‘कौन बनेगा करोडपती’ हा केवळ प्रश्नोत्तरांचा खेळ नाही, तर तो ज्ञान, वेगवान विचार आणि आत्मविश्वास यांची मोठी कसोटी आहे, आणि साकेतने ती यशस्वीरीत्या पार केली आहे, याचा आम्हाला अभिमान आहे.” कार्यक्रमाचे प्रक्षेपण 20 व 21 ऑगस्ट रोजी दूरचित्रवाहिनीवर होणार आहे. या दोन दिवसांत पाचोरा शहरातील अनेक घरांमध्ये, दुकानदारांच्या दुकानात, कार्यालयात आणि मित्रांच्या गटांमध्ये हा कार्यक्रम सामूहिकपणे पाहण्याची तयारी सुरू झाली आहे. गावोगावी, वाड्यावस्त्यांवर लोकांना कार्यक्रमाची तारीख आणि वेळ सांगण्यात येत आहे. साकेतला प्रत्यक्ष हॉट सीटवर पाहण्याची उत्सुकता सर्वत्र दिसत आहे. या संधीमुळे पाचोरा शहराचा उल्लेख देशभरातील लाखो प्रेक्षकांच्या कानावर जाईल, ही गोष्ट निश्चितच शहराच्या ओळखीत भर घालणारी आहे. अनेकदा एखाद्या व्यक्तीच्या कर्तृत्वामुळे संपूर्ण समाजाचा गौरव होतो, आणि साकेत सोनारच्या या यशामुळे पाचोरा शहराचा गौरव राष्ट्रीय पातळीवर पोहोचला आहे. कार्यक्रमाच्या चित्रिकरणावेळी साकेतने बिग बींसोबत घेतलेला अनुभव, सेटवरील वातावरण, प्रकाशयोजना, प्रेक्षकांचा उत्साह, आणि प्रश्न विचारण्यापूर्वीची हुरहूर — हे सर्व त्याने आपल्या मित्रपरिवार आणि नातेवाईकांना सांगितले असून, ते ऐकताना लोकही भावूक होतात. त्याने सांगितले की, “अमिताभ बच्चन सर अत्यंत साधे, प्रामाणिक आणि प्रोत्साहन देणारे आहेत. त्यांनी माझ्या प्रत्येक उत्तराला प्रतिसाद दिला आणि मधूनमधून हलक्या फुलक्या गप्पाही मारल्या. त्यांच्यासोबतचा हा क्षण आयुष्यभर लक्षात राहील.” या यशामुळे साकेत सोनार हा पाचोरातील तरुणांसाठी प्रेरणास्थान ठरला आहे. विशेषत: ग्रामीण भागातील मुलांना, सतत अभ्यास, ज्ञान आणि आत्मविश्वास यांच्या जोरावर मोठमोठ्या मंचांवर पोहोचता येते, हा संदेश त्याच्या उदाहरणातून मिळत आहे. पाचोरातील शिक्षक, शिक्षणप्रेमी, सामाजिक संघटना आणि मित्रमंडळींनी साकेतचे अभिनंदन केले आहे. 20 व 21 ऑगस्ट रोजी साकेतचा खेळ दूरचित्रवाहिनीवर प्रसारित झाल्यानंतर, त्याच्या यशाचा आनंद साजरा करण्यासाठी शहरात स्वागत समारंभ, अभिनंदन सोहळे आणि मिरवणुका काढण्याची शक्यता आहे. अनेकांनी आधीच साकेतसाठी अभिनंदनाच्या बॅनर्स आणि पोस्टर्सची तयारी सुरू केली आहे. पाचोरा शहरासाठी हा केवळ अभिमानाचा क्षण नसून, पुढील पिढ्यांसाठी प्रेरणादायी घटना आहे. ज्ञानाची आवड, मेहनत, JNU सारख्या उच्च दर्जाच्या शैक्षणिक संस्थेतील शिक्षण आणि योग्य संधी यांची सांगड घालून कोणतीही स्वप्ने साकार होऊ शकतात, हे साकेत सोनारने आपल्या कृतीतून दाखवून दिले आहे. त्याच्या पुढील खेळात तो अधिकाधिक रक्कम जिंकून पाचोराचे नाव आणखी उज्ज्वल करो, हीच सर्वांची प्रार्थना आहे.

जागतिक स्तनपान सप्ताहानिमित्त राज्यस्तरीय परिसंवाद – ‘स्तनपानाला प्राधान्य द्या: शाश्वत आधार प्रणाली तयार करा’

0

Loading

मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : जागतिक स्तनपान सप्ताहाचे औचित्य साधून श्रीमती मंजुलाबेन गुणवंतराय शाह पदव्युत्तर अभ्यास विभाग (एमएससी. क्लिनिकल न्यूट्रिशन आणि आहारशास्त्र), डॉ. बी. एम. कॉलेज ऑफ होम सायन्स (स्वायत्त) आणि नुट्रीशन सोसायटी ऑफ इंडिया, मुंबई विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने, रुसा प्रायोजित राज्यस्तरीय एक दिवसीय परिसंवादाचे यशस्वी आयोजन करण्यात आले. यंदाचा परिसंवाद ‘स्तनपानाला प्राधान्य द्या: शाश्वत आधार प्रणाली तयार करा’ या विषयावर केंद्रित होता. स्तनपान ही केवळ नैसर्गिक प्रक्रिया नसून बालआरोग्याचा मजबूत पाया घालणारी, माता–बाल नात्यातील विश्वास आणि प्रेम वृद्धिंगत करणारी जीवनशैली आहे, यावर परिसंवादाचा विशेष भर होता.

पहिल्या सत्रात डॉ. अमृता देसाई, स्तनपान व्यवस्थापन सल्लागार, एनआयसीयू विभाग, केईएम हॉस्पिटल, पुणे यांनी ‘स्तनपान व्यवस्थापन: एक समाधानकारक करिअर’ या विषयावर आभासी पद्धतीने विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. त्यांनी या क्षेत्रात करिअर घडविण्यासाठी आवश्यक असलेल्या मान्यताप्राप्त कोर्सेसची माहिती दिली, तसेच स्तनपान व्यवस्थापन सल्लागार म्हणून लागणाऱ्या कौशल्ये आणि गुणवत्तांविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. आपल्या अनुभवातून त्यांनी सांगितले की, “जन्मानंतरच्या पहिल्या तासात बाळाला आईचे दूध पाजण्याची सवय लावल्यास त्याच्या प्रतिकारशक्तीवर दीर्घकालीन सकारात्मक परिणाम होतात.”

दुसऱ्या सत्रात श्रीमती मालती डहाणूकर ट्रस्ट (एसएमडीटी), नाशिक यांच्या समूहाने स्तनपान करण्याच्या प्रभावी पद्धतींचे प्रत्यक्षिक सादर केले. जुळ्या मुलांना स्तनपान देण्याच्या पद्धती, तान्ह्या मुलाला पाजल्यानंतर ढेकर काढण्याचे योग्य मार्ग तसेच गरोदर व स्तनपान देणाऱ्या मातांसाठी आणि मुलांसाठी संतुलित आहाराबाबत उपयुक्त मार्गदर्शन करण्यात आले.

या परिसंवादात मुंबई, पुणे, नाशिक, संभाजीनगर आणि अमरावती येथून सुमारे ३०० विद्यार्थी, राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक आणि शिक्षणतज्ज्ञ ऑनलाइन व ऑफलाइन या दोन्ही माध्यमांतून सहभागी झाले. उपस्थितांनी कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद देत, अशा उपक्रमांनी मातृत्व आणि बालआरोग्य क्षेत्रात जागरूकता वाढण्यास मोठी मदत होत असल्याचे मत व्यक्त केले.

“छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श डोळ्यांसमोर ठेवून मार्गक्रमण करा” – डॉ. कविता आल्मेडा

0

Loading

विरार (गुरुदत्त वाकदेकर) : ज्ञानदीप मंडळ संचलित सेंट जोसेफ कला आणि वाणिज्य महाविद्यालय, सत्पाळा येथे, आय क्यू ए सी अंतर्गत मराठी विभाग आणि इतिहास विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने सोमवार, ११ ऑगस्ट २०२५ रोजी “किल्ल्यांची बाराखडी” या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. युनेस्को मान्यता प्राप्त १२ किल्ल्यांची माहिती विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविणे हा प्रमुख उद्देश या कार्यक्रमाचा होता.

सदर प्रसंगी महाविद्यालयाच्या प्रभारी प्राचार्य डॉ. कविता आल्मेडा यांनी उपस्थितांना प्रेरणादायी शब्दांत मार्गदर्शन केले. त्यांनी सांगितले की, “छत्रपती शिवाजी महाराज महाराष्ट्राचे आराध्य दैवत आहेत. आपण प्रत्येकाने त्यांचा आदर्श डोळ्यांसमोर ठेवून मार्गक्रमण करायला हवे.”

इतिहास विभाग प्रमुख डॉ. विन्सेंट डिमेलो यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा संपूर्ण इतिहास रसपूर्ण पद्धतीने, जिवंत चित्रणासह विद्यार्थ्यांसमोर उलगडून दाखविला. यानंतर एस. वाय. बी. ए. वर्गातील शिव व्याख्याती साक्षी मोरे हिने पीपीटीच्या माध्यमातून युनेस्को मान्यता प्राप्त १२ किल्ल्यांचा परिचय उपस्थित शिवप्रेमी विद्यार्थ्यांना करून दिला.

कार्यक्रमादरम्यान उपस्थित विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत अनेक किल्ल्यांबद्दल आपली उत्सुकता व्यक्त केली. सभागृहात इतिहासाविषयी अभिमान आणि प्रेरणेची भावना ओसंडून वाहत होती.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मराठी विभाग प्रमुख जगदीश अनंत संसारे यांनी उत्साहपूर्ण शैलीत केले, तर मंथन कदम या विद्यार्थ्याने कृतज्ञतापूर्वक सर्वांचे आभार मानले. हा उपक्रम विद्यार्थ्यांच्या इतिहासावरील प्रेमाला आणि शिवकालीन वारसा जपण्याच्या प्रेरणेला नवीन उभारी देणारा ठरला.

अवैध धंद्यांचे ‘राजकीय’ डावपेच – पाचोरा-भडगावमध्ये पत्रकारांवर अन्यायाची नवी पद्धत

0

Loading

पाचोरा-भडगाव विधानसभा मतदारसंघ हा जरी राजकीय दृष्ट्या एकत्र असला, तरी मतदारसंख्या व राजकीय समीकरणात पाचोरा 70 टक्के आणि भडगाव 30 टक्के असा स्पष्ट तफावत आहे. हेच प्रमाण येथील अनेक सामाजिक, आर्थिक व व्यावसायिक व्यवहारांमध्ये दिसून येते. आता या राजकीय समीकरणाच्या छायेत अवैध धंद्यांचा अघोरी खेळही सुरू झाला असून, यात राजकारण्यांची शैली आत्मसात करून स्वतःचे ‘नेटवर्क’ वाढवणारे धंदेवाले पुढे सरसावले आहेत. पाचोरा शहरात काही स्वाभिमानी पत्रकार आहेत ज्यांनी आजवर

त्यांच्या हातावर अवैध धंदेवाले किंवा अशा गटांकडून मासिक हप्त्याचे एकही पैसे लागू दिले नाहीत. परंतु दुसरीकडे काही बोगस व स्वयंघोषित पत्रकारांची फौज तयार झाली आहे. त्यात बाहेरगावचे भुरटे पत्रकार आणि स्थानिक स्तरावर पत्रकारितेशी दूरदूरचा संबंध नसणारे लोकदेखील आहेत. हे लोक काही ‘नियोजित’ पद्धतीने पकडले जातात, त्यांना पाचोरामध्ये आणून अवैध धंदेवाले यांच्या ठिकाणी कमिशनवर पैसे गोळा करण्यासाठी पाठवले जाते. त्यानंतर ते पैसे मिळाल्यावर लगेच हॉटेलवर बोलावून तेथूनच हिशोब उरकला जातो. ही साखळी गेल्या चार-पाच वर्षांपासून शहरात सुरू आहे आणि त्यामागे काही स्वयंघोषित पत्रकार नेते सक्रिय असल्याचे बोलले जाते. यांची

कार्यपद्धती अशोकाच्या झाडासारखी आहे – ज्या झाडाची सावली फक्त स्वतःपुरती असते, इतरांना दिलासा देत नाही, ज्याला फुल-फळ येत नाही, पक्षीदेखील बसत नाहीत, आणि लाकूडसुद्धा अंत्यविधीसाठी उपयोगी पडत नाही. म्हणजेच, ही मंडळी स्वतःच्या फायद्यापलीकडे कोणताही सामाजिक किंवा व्यावसायिक हित साधत नाहीत. स्वाभिमानी पत्रकारांची अपेक्षा फार मोठी नसते. त्यांना केवळ वर्धापन दिन, दिवाळी अंक यासारख्या महत्त्वाच्या प्रसंगी जाहिराती मिळाव्यात एवढीच इच्छा असते. पण ज्या प्रकारे राजकीय नेते ‘एक वेळा भडगावला, एक वेळा पाचोराला जाहिरात’ असे पद्धतशीर नियोजन करतात, त्याच धर्तीवर पाचोऱ्यातील अवैध धंद्यांचे हेडक्वार्टरदेखील जाहिरात देताना समान पद्धत वापरू लागले आहे. वास्तविक, पाचोरा-भडगाव – पिंपळगाव हरे पो स्टे हद्दीमध्ये खुलेआम अवैध धंदा चालतो आहे. “हे कोणाच्या बापाकडून बंद होणार नाही” अशी उघडपणे भाषा वापरली जाते. या क्षेत्रातील नफा तिघंही ठिकाणी वेगळा असतो, तिघही पोलिस स्टेशन निहाय हप्ते वेगळे असतात, तिघेही पोलीस स्टेशनचे कलेक्शन करणारे स्वतंत्र असतात आणि तिघेही पोलीस स्टेशनला दरमहा स्वतंत्र वेगवेगळे हप्ते दिले जातात. मग अशा परिस्थितीत अवैध धंदेवाले जाहिरात देताना भेदभाव का करतात, हा प्रश्न उपस्थित होतो. शहरातील पत्रकारांच्या अडचणी यापुढे अधिक गंभीर झाल्या आहेत. जाहिरात दिल्यानंतर सहा-सहा महिने पेमेंट मिळत नाही. अखेरीस, पत्रकारांना कलेक्शन करणाऱ्या पोलीस ‘दादा’च्या मागे लागून पैसे मिळवावे लागतात. ही परिस्थिती शहरातील माध्यम क्षेत्रासाठी अत्यंत अपमानजनक आहे. प्रसारमाध्यमांचे वरिष्ठ स्तरावरील प्रमुख संपादक, मालक आणि वरिष्ठ पत्रकारांनी आता या विषयावर गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे. जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या स्तरावरून काही हालचाल होणे अत्यावश्यक आहे.  हप्ते घेणारे पोलीस दादा आणि देणारे अवैध धंद्यांचे दादा – या दोघांनीही आता विचार करावा की, किमान ज्यांचे हात स्वच्छ आहेत, जे स्वाभिमानाने कोणत्याही प्रकारचा त्रास न देता , संघटनेच्या व कार्यक्रमाच्या नावाने पावत्या न फाढता पत्रकारिता करत आहेत, त्यांना तरी अभिमानाने जाहिराती द्याव्यात. पत्रकारिता ही लोकशाहीचा चौथा स्तंभ मानली जाते. पण या चौथ्या स्तंभावर अवैध धंद्यांच्या सावल्या पडत असतील, तर लोकशाहीच्या आरोग्यावरच प्रश्नचिन्ह निर्माण होते. अशा प्रकारच्या हानीकारक साखळ्या मोडण्यासाठी प्रामाणिक पत्रकारांना एकत्र येणे, माध्यमांच्या मालकांनी निर्भीड भूमिका घेणे, आणि प्रशासनाने धाडसी पाऊल उचलणे – हे तिन्ही घटक आवश्यक आहेत. अन्यथा, पाचोरा-भडगावसारख्या ठिकाणी पत्रकारिता ही फक्त नावापुरती राहील आणि तिच्या मागे केवळ हप्त्यांच्या व कमिशनच्या साखळ्या वावरतील. ही वेळ केवळ विचार करण्याची नाही, तर कारवाईची आहे. स्वच्छ पत्रकारितेचा मार्ग मोकळा करण्यासाठी आता राजकारणाची स्टाईल शिकलेल्या अवैध धंदेवाल्यांच्या जाळ्याला धडा शिकवायलाच हवा.

पुनगांव ग्रामपंचायतीत स्वातंत्र्यदिनानिमित्त उच्च गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांच्या हस्ते ध्वजारोहणाचा मान – शैक्षणिक यशाचा गौरव आणि राष्ट्रभक्तीचा संगम

0

Loading

पाचोरा – तालुक्यातील पुनगांव येथे १५ ऑगस्ट हा दिवस भारतीय जनतेच्या हृदयात एक विशेष स्थान राखून आहे. हा दिवस केवळ एका दिनदर्शिकेतील तारखेसारखा नसून, तो आपल्या स्वातंत्र्यसैनिकांच्या बलिदानाची, संघर्षाची आणि त्यागाची आठवण करून देणारा पवित्र क्षण आहे. १९४७ साली आपण ब्रिटिश सत्तेच्या जोखडातून मुक्त झालो आणि स्वातंत्र्याचा पहिला श्वास घेतला. त्यानंतर दरवर्षी हा दिवस आपण अभिमानाने साजरा करतो. गावोगावी, शहरोगावी, शाळांमध्ये, सरकारी कार्यालयांत आणि संस्थांमध्ये ध्वजारोहण सोहळे उत्साहात पार पडतात. मात्र पुनगांव ग्रामपंचायतीने यंदाचा स्वातंत्र्यदिन एक वेगळ्या पद्धतीने, प्रेरणादायी आणि स्मरणीय करण्याचा संकल्प केला आहे. ग्रामपंचायत व शालेय व्यवस्थापन समितीच्या संयुक्त पुढाकाराने, यावर्षीचा ध्वजारोहण सोहळा गावातील उच्च गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांच्या हस्ते पार पडणार आहे. म्हणजेच, पुनगांव ग्रामपंचायतीच्या हद्दीतील ज्या विद्यार्थ्यांनी २०२५ मध्ये १२वी किंवा पदवी (ग्रॅज्युएशन)च्या परीक्षेत उत्कृष्ट गुण मिळवले आहेत, त्यांना या मानाचा सन्मान मिळवण्याची संधी आहे. हा उपक्रम केवळ एका विद्यार्थ्याच्या हातून ध्वजारोहण करण्यापुरता मर्यादित नसून, तो संपूर्ण गावातील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीचा आणि मेहनतीचा गौरव करणारा आहे. निवड प्रक्रियेचे स्वरूप आणि अटी या मानासाठी पात्र ठरण्यासाठी विद्यार्थ्यांनी आपली गुणपत्रिकेची झेरॉक्स प्रत १२ ऑगस्ट ते १४ ऑगस्ट या कालावधीत जिल्हा परिषद शाळा, पुनगांव येथे जमा करणे आवश्यक आहे. सर्व अर्जांची तपासणी करून, सर्वाधिक गुण मिळवणाऱ्या विद्यार्थी किंवा विद्यार्थिनीची निवड केली जाईल. येथे एक महत्त्वाची अटही आहे – विद्यार्थ्यांचे प्राथमिक शिक्षण पुनगांव ग्रामपंचायतीच्या हद्दीतील जिल्हा परिषद शाळेत झालेले असणे बंधनकारक आहे. यामागील उद्देश असा आहे की, गावातील मूळ शैक्षणिक संस्कार घेऊन मोठे झालेले विद्यार्थीच या सन्मानाला पात्र ठरावेत. गावाच्या प्रगतीकडे नेणारे पाऊल सरपंच सौ. सुनिता चिंतामण पाटील यांनी सांगितले, “गावातील विद्यार्थी देशाचे भविष्य आहेत. त्यांना योग्य वेळी प्रोत्साहन मिळाले, त्यांचा सन्मान झाला तर त्यांचा आत्मविश्वास वाढतो. हा आत्मविश्वासच त्यांना पुढील मोठ्या उद्दिष्टांकडे घेऊन जातो. ध्वजारोहणाचा मान मिळवणाऱ्या विद्यार्थ्याचा हा क्षण संपूर्ण गावासाठी प्रेरणादायी ठरेल.” उपसरपंच मनोज मोरे यांनीही या उपक्रमाचे स्वागत करताना सांगितले, “शैक्षणिक गुणवत्तेचा गौरव करणे हा गावाच्या प्रगतीचा एक महत्त्वाचा टप्पा आहे. स्वातंत्र्यदिनासारख्या ऐतिहासिक दिवशी हा सन्मान मिळणे, हा त्या विद्यार्थ्याच्या जीवनातील अविस्मरणीय क्षण ठरेल.” शालेय व्यवस्थापन समितीचा सहभाग आणि संदेश शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष व सदस्यांनी विद्यार्थ्यांना आवाहन केले आहे की, त्यांनी आपल्या गुणपत्रिका वेळेत जमा करून या उपक्रमात सहभाग नोंदवावा. समितीचे मत आहे की, “ही संधी फक्त एका विद्यार्थ्यासाठीच नसून, संपूर्ण गावातील विद्यार्थ्यांच्या प्रगतीचा उत्सव आहे. जो विद्यार्थी ध्वजारोहणाचा मान मिळवेल, तो इतरांसाठी प्रेरणादायी ठरेल.” समितीने असेही स्पष्ट केले आहे की, निवड प्रक्रिया पूर्णपणे पारदर्शक राहील आणि केवळ गुणवत्तेच्या आधारावरच निर्णय घेतला जाईल. कार्यक्रमाची रूपरेषा आणि सांस्कृतिक सोहळा १५ ऑगस्ट रोजी सकाळी ७ वाजता जिल्हा परिषद शाळेच्या प्रांगणात ध्वजारोहण सोहळा पार पडणार आहे. ध्वजारोहणानंतर विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी मिळून राष्ट्रगीत गायले जाईल. यानंतर देशभक्तीपर गीते, स्वातंत्र्यलढ्यावरील लघुनाटिका, विद्यार्थ्यांची भाषणे, वादविवाद स्पर्धा, चित्रकला व निबंध स्पर्धांचे बक्षीस वितरण अशा विविध कार्यक्रमांची रेलचेल असेल. या कार्यक्रमात गावातील ज्येष्ठ नागरिक, माजी सैनिक, निवृत्त शिक्षक तसेच सामाजिक कार्यकर्ते उपस्थित राहून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतील. सन्मानित विद्यार्थ्याचा परिचय ध्वजारोहणाचा मान मिळवणाऱ्या विद्यार्थ्याची शैक्षणिक कारकीर्द, त्याने घेतलेली मेहनत, पालकांचे योगदान आणि शिक्षकांचे मार्गदर्शन याविषयी कार्यक्रमात विशेष उल्लेख केला जाईल. हा परिचय केवळ एक माहिती नसून, इतर विद्यार्थ्यांसाठी प्रेरणेचा स्रोत ठरेल. शालेय व्यवस्थापन समितीच्या मते, अशा उपक्रमांमुळे गावातील प्रत्येक विद्यार्थी स्वतःच्या क्षमतांवर विश्वास ठेवून मोठ्या यशासाठी प्रयत्नशील राहतो. गावातील शैक्षणिक वातावरणाला चालना पुनगांव ग्रामपंचायतीचा हा उपक्रम गावात शिक्षणाबद्दल आदर आणि आकर्षण वाढवणारा ठरेल. अनेकदा ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना त्यांच्या गुणवत्तेचा योग्य सन्मान मिळत नाही. मात्र, अशा उपक्रमांमुळे त्यांची दखल घेतली जाते आणि समाजात त्यांचे कौतुक होते. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये स्पर्धात्मक भावना वाढीस लागते आणि पालकही आपल्या मुलांच्या शिक्षणासाठी अधिक तत्पर होतात. भविष्यासाठी आदर्श उपक्रम हा उपक्रम केवळ यंदापुरता मर्यादित राहू नये, तर दरवर्षी याच पद्धतीने गावातील गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांचा गौरव व्हावा, अशी अपेक्षा ग्रामस्थ व्यक्त करत आहेत. यामुळे शिक्षणाची पातळी उंचावेल, विद्यार्थ्यांमध्ये अभ्यासाविषयी आवड निर्माण होईल आणि पुनगांव ग्रामपंचायत ‘शिक्षणप्रेमी’ गाव म्हणून अधिक ओळख निर्माण करेल. शेवटी, सरपंच सौ. सुनिता चिंतामण पाटील, उपसरपंच मनोज मोरे, सर्व सन्माननीय सदस्य तसेच शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष व सदस्य यांनी सर्व विद्यार्थ्यांना वेळेत गुणपत्रिकेच्या प्रती जमा करण्याचे आणि स्वातंत्र्यदिन सोहळ्यात उत्साहाने सहभाग नोंदवण्याचे आवाहन केले आहे. हा दिवस केवळ ध्वजारोहणाचा नाही, तर शिक्षण, प्रगती आणि राष्ट्रभक्ती यांचा संगम साजरा करण्याचा आहे.

हुतात्मा स्मारकाजवळील अतिक्रमण न काढल्यास 15 ऑगस्ट रोजी राष्ट्रभक्तीपर गीतांनी जनजागृती आंदोलन

0

Loading

पाचोरा – शहराच्या ऐतिहासिक ओळखीचा व स्वातंत्र्यलढ्याच्या अभिमानाचा प्रतीक असलेल्या हुतात्मा स्मारकाजवळ पुन्हा एकदा अतिक्रमणाचे सावट गडद झाले आहे. स्वच्छता व वाहतूक व्यवस्थेची वाताहत झाल्याने नागरिकांत संताप व्यक्त होत असून, पत्रकार व स्वातंत्र्यसैनिक पुत्र संदीप महाजन यांनी या गंभीर समस्येकडे पाचोरा नगरपालिका प्रशासनाचे लक्ष वेधत तातडीने अतिक्रमण हटविण्याची मागणी केली आहे. स्मारकाजवळील अतिक्रमण तातडीने न काढल्यास 15 ऑगस्ट रोजी सकाळी 11 वाजल्यापासून नगरपालिकेच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर जोपर्यंत सदरचे अतिक्रमण काढले जात नाही तो पर्यंत दररोज नगरपालिकेच्या मुख्य प्रवेशद्वारांजवळ राष्ट्रभक्तीपर गीत वाजवून जनजागृती आंदोलन छेडण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.
हुतात्मा स्मारक हे केवळ पाचोराच नव्हे तर संपूर्ण जळगाव जिल्ह्याच्या स्वातंत्र्यलढ्याच्या इतिहासातील एक अत्यंत महत्त्वाचे स्मारक आहे. जिल्ह्यात फक्त पाचोरा व आडगाव येथेच अशा स्वरूपाचे स्मारक असल्याने, येथे अतिक्रमण व अस्वच्छतेचे प्रमाण वाढणे हे नागरिकांच्या भावनांशी थेट जोडलेले प्रकरण आहे. या स्मारकाचा परिसर स्वच्छ, शिस्तबद्ध व अतिक्रमणमुक्त राखणे ही नगरपालिका प्रशासनाची जबाबदारी आहे.
पूर्वी तात्कालीन मुख्याधिकारी शोभाताई बाविस्कर यांच्या कार्यकाळात छत्रपती शिवाजी महाराज चौकापासून महादेव मंदिर व सुलभ शौचालयापर्यंत संपूर्ण परिसर केवळ एका तासात अतिक्रमणमुक्त करण्यात आला होता. मात्र, अलीकडच्या काळात पुन्हा येथे बेकायदेशीरपणे लोटगाडी, खोके, टरबुजविक्री (या अतिक्रमणाची सुरुवात माजी नगरसेवक यांच्या आशीर्वादाने खास टरबूज विक्रीच्या दुकानांपासूनच झाली हे लक्षणिय आहे ) त्यानंतर व्यापाऱ्यांनी व टोकर, कलताण लावुन, टपरी ठेऊन जागा अडवून बसल्याचे दिसून येत आहे. परिणामी, रिक्षा स्टॅण्डजवळील चालकांना नियमानुसार रिक्षा उभ्या करण्यास अडचणी येत आहेत, वाहतुकीत अडथळे निर्माण होत आहेत आणि कचराकुंडीमुळे परिसरात अस्वच्छतेचे वातावरण पसरले आहे.
याशिवाय, येथे गटई कामगारांना देण्यात येणारे पत्र्याचे स्टॉलसुद्धा नियमांचे उल्लंघन करून बसवण्यात आल्याचे समोर आले आहे. नियमानुसार, अशा स्टॉलसाठी जी जागा मागितली जाते ती नगरपालिका प्रशासनाने संबंधितास भाड्याने, करारनाम्याने, खरेदीने किंवा मोफत परंतु अधिकृतरीत्या ताब्यात दिलेली असावी. मात्र, सदर ठिकाणी हे सर्व नियम धाब्यावर बसवून स्टॉल ठेवण्यात आला आहे आणि मुख्य म्हणजे त्याच्या आडोशाला किंवा त्याच्या नावाखाली संबंधित अतिक्रमणधारकांनी स्वतःचा फायदा करून घेण्याचे प्रकार सुरू आहेत. या जागेचा कोणताही भाडेपट्टा किंवा मालकीहक्क नगरपालिका प्रशासन देऊ शकत नसल्याने, त्या पत्र्याच्या स्टॉलसह सर्व अतिक्रमण तातडीने हटविणे आवश्यक असल्याची मागणी करण्यात आली आहे.
या परिसरात विद्यमान आमदार किशोरआप्पा पाटील यांचे कार्यालय, विविध शासकीय विभागांचे अधिकारी व नागरिकांची सतत वर्दळ असते. अतिक्रमणामुळे पार्किंगसाठी जागा उपलब्ध राहत नाही, तसेच स्वच्छतेच्या अभावामुळे स्मारकाचे सौंदर्य मलिन होत आहे. हे केवळ नियमांचे उल्लंघन नसून, स्वातंत्र्यसैनिकांच्या स्मारकाचा अवमान आहे, असे महाजन यांनी आपल्या निवेदनात नमूद केले आहे.
महाजन यांनी मागणी केली आहे की –
1) हुतात्मा स्मारकाजवळील अतिक्रमण तातडीने हटवावे.
2) परिसराची स्वच्छता व सौंदर्यीकरण कायम ठेवावे.
3) अतिक्रमणाची पुनरावृत्ती टाळण्यासाठी कायमस्वरूपी देखरेखीची व्यवस्था करावी.
4) रिक्षा स्टॅण्ड व पार्किंगसाठी शिस्तबद्ध नियोजन करावे.
या निवेदनाची प्रत पाचोरा प्रांताधिकारी व जळगाव जिल्हाधिकारी यांनाही पाठविण्यात आली असून, आता प्रकरण वरच्या स्तरावर पोहोचले आहे. नगरपालिका प्रशासनाने निवेदनानंतर साफसफाईची काही कामे हाती घेतली असली तरी स्मारकाच्या लगतचे अतिक्रमण मात्र जैसे थे आहे. त्यामुळेच, जर 14 ऑगस्टपर्यंत अतिक्रमण काढण्यात आले नाही, तर 15 ऑगस्ट रोजी सकाळी 11 वाजल्यापासून नगरपालिकेच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ राष्ट्रभक्तीपर गीत वाजवून बलिदान दिलेल्या सैनिकांच्या शौर्याची आठवण करून देत जनजागृती आंदोलन केले जाईल, असा स्पष्ट इशारा महाजन यांनी दिला आहे.
नागरिकांचे म्हणणे आहे की, ऐतिहासिक स्थळांचे संरक्षण हे केवळ कागदोपत्री न राहता प्रत्यक्ष कृतीत उतरवणे गरजेचे आहे. हुतात्मा स्मारक परिसरात अतिक्रमण होणे ही प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उभे करते. “स्वातंत्र्यसैनिकांच्या स्मृती जपणारा हा परिसर म्हणजे आपल्या शहराचा सन्मान आहे आणि त्याचा अपमान कोणत्याही परिस्थितीत सहन केला जाणार नाही,” असा इशारा देशप्रेमी नागरिकांनी दिला आहे. आता पाहणे महत्त्वाचे ठरेल की, नगरपालिका व जिल्हा प्रशासन या जनभावनांचा आदर करून स्वातंत्र्यदिनाच्या आधीच ठोस कारवाई करते की आंदोलनानंतरच कारवाईला गती मिळते.

आज दि.12/08/2025 चे सर्व राशीचे भविष्य व शुभ अंक व रंग

0

Loading

मेष
आज नवे कार्य आरंभ करण्यास अनुकूल दिवस आहे. उत्साहात वाढ होईल. अधिकारी वर्गाकडून सहकार्य मिळेल. वैचारिक स्पष्टरूप येईल.
शुभ अंक: 3 शुभ रंग: भगवा

वृषभ
कामात स्थैर्य लाभेल, पण आरोग्याच्या तक्रारी उद्भवू शकतात. संयमाने बोलणे आवश्यक. खर्चांवर मर्यादा ठेवा.
शुभ अंक: 6 शुभ रंग: क्रीम

मिथुन
व्यवसायात लाभदायक संधी मिळू शकते. संवादात गोडवा ठेवा. मित्रपरिवारातून सहकार्य मिळेल.
शुभ अंक: 5 शुभ रंग: पानसरी हिरवा

कर्क
कुटुंबातील मतभेद टाळावेत. मानसिक तणाव संभवतो. घरगुती खर्च वाढू शकतो. वादातून दूर राहा.
शुभ अंक: 2 शुभ रंग: पांढरा

सिंह
सृजनशीलतेला वाव मिळेल. अधिकार प्राप्त होण्याची शक्यता. वरिष्ठांकडून प्रशंसा मिळेल. नवीन यशाचा दिवस.
शुभ अंक: 1 शुभ रंग: सोनेरी पिवळा

कन्या
प्रशासकीय कामात यश मिळेल. जुने अडकलेले पैसे परत मिळू शकतात. आत्मविश्वास वाढेल. प्रवासातून लाभ होईल.
शुभ अंक: 7 शुभ रंग: राखाडी

तुळ
सामाजिक सन्मानाची शक्यता आहे. थोडी मानसिक अस्वस्थता जाणवेल. कुटुंबात संवाद वाढवा. संयम आवश्यक.
शुभ अंक: 9 शुभ रंग: गुलाबी

वृश्चिक
गोपनीय बाबी गुपित ठेवा. कामात काटेकोरपणा आवश्यक. वरिष्ठांशी मतभेद टाळा. गुंतवणूक विचारपूर्वक करा.
शुभ अंक: 4 शुभ रंग: गडद जांभळा

धनु
धार्मिक कार्यात सहभाग घ्याल. एखादी जुनी इच्छा पूर्ण होईल. मानसिक समाधान लाभेल. प्रवास शक्यतो टाळा.
शुभ अंक: 8 शुभ रंग: पिवळसर नारिंगी

मकर
नवीन संकल्पना प्रभावी ठरतील. महत्वाचे निर्णय पुढे ढकला. वरिष्ठांचा सल्ला उपयोगी ठरेल.
शुभ अंक: 10 शुभ रंग: तपकिरी

कुंभ
आजचा दिवस बऱ्यापैकी संमिश्र आहे. जोखीम घेणे टाळा. कार्यक्षेत्रात संयम आवश्यक. आर्थिक गणित सांभाळा.
शुभ अंक: 11 शुभ रंग: निळसर करडा

मीन
तणावात निर्णय घेणे टाळा. काही जुने मित्र संपर्कात येतील. मनातील विचार शांतपणे मांडा.
शुभ अंक: 6 शुभ रंग: आकाशी निळा

वाचकांनी वरील भविष्यवाणीचा अर्थ अचूक भविष्यवाणी म्हणून लावता केवळ आत्मपरीक्षण आणि सकारात्मक प्रेरणा म्हणून घ्यावा.

गुन्हेगारांचा कर्दनकाळ आणि जनतेचा विश्वास – पाचोरा पोलीस निरीक्षक राहुलकुमार पवार साहेब यांच्या अल्पावधीत ठसा उमटवणारी वाटचाल

0

Loading

पाचोरा : पाचोरा पोलीस स्टेशनचे विद्यमान पोलीस निरीक्षक राहुलकुमार पवार साहेब यांची नियुक्ती होऊन अवघा अल्पकाळ झाला असला, तरीसुद्धा त्यांच्या कार्यशैलीचा ठसा संपूर्ण तालुक्यात महत्वपूर्ण उमटत आहे. ते आज गुन्हेगारांच्या हृदयात भीती निर्माण करणारे, तर सर्वसामान्य नागरिकांच्या मनात विश्वास आणि आपुलकी निर्माण करणारे अधिकारी म्हणून ओळखले जात आहेत. पोलीस दलातील संख्या तुलनेने कमी असतानाही, त्यांनी आपल्या कार्यशैलीतून दाखवून दिले आहे की, खरी ताकद मनापासूनच्या निष्ठेत, सततच्या उपस्थितीत आणि तातडीने न्याय देण्याच्या वृत्तीत असते. त्यांच्या कारकिर्दीत, फक्त गुन्ह्यांची आकडेवारी वाढवणे किंवा औपचारिक नोंदी करणे हा उद्देश राहिलेला नाही, तर प्रत्येक घटनेतून नागरिकांचा विश्वास संपादन करणे हा त्यांच्या कामाचा मुख्य पाया बनला आहे. राहुलकुमार पवार साहेब हे केवळ आपल्या दालनात बसून आदेश देणारे अधिकारी नाहीत, तर ते प्रत्यक्ष रस्त्यावर उतरून परिस्थितीचा अंदाज घेणारे आणि प्रत्येक घटनेत स्वतः सहभाग घेणारे अधिकारी आहेत. पाचोरा शहर व परिसरातील सुरक्षेची जबाबदारी पार पाडताना ते विशेषतः रात्रीच्या गस्तीस महत्त्व देतात. रात्रीचा काळ हा अनेकदा गुन्हेगारी हालचालींसाठी अनुकूल मानला जातो, मात्र पवार साहेब यांच्या नियमित, नियोजनबद्ध आणि ठाम गस्तींमुळे गुन्हेगारांची हालचाल आटोक्यात येत असल्याचे स्पष्टपणे दिसून येत आहे. त्यांच्या नेतृत्वाखालील गस्ती पथके केवळ मुख्य रस्त्यांवरच नव्हे, तर गल्लीबोळ, ओसाड जागा, संवेदनशील ठिकाणे आणि गावाबाहेरील हद्दीतही सतत फिरत असतात. त्यांची एक खास कार्यशैली म्हणजे, सर्वसामान्य नागरिकांना थेट भेटण्याची आणि त्यांचे म्हणणे स्वतः ऐकून घेण्याची तयारी. पोलीस स्टेशनमध्ये एखादा तक्रारदार आल्यास, त्याची तक्रार केवळ लिखित स्वरूपात घेऊन, ‘एनसी’ नोंदवून प्रकरण संपवण्याची पद्धत पवार साहेब यांनी बदलली आहे. त्यांच्या मते, ‘एनसी’ म्हणजे फक्त आकड्यांची भर नाही, तर प्रत्येक घटनेत योग्य ती कारवाई होऊन पीडित व्यक्तीला दिलासा मिळणे आवश्यक आहे. त्यामुळे, तक्रारदाराचे म्हणणे ऐकून घेऊन, त्यावर तातडीने आणि प्रभावीपणे कारवाई करण्यावर त्यांचा भर असतो. या दृष्टिकोनामुळे पोलीस दलाविषयी नागरिकांमध्ये सकारात्मक भावना निर्माण झाली आहे. गुन्हेगारी रोखण्यासाठी आणि कायदा सुव्यवस्था टिकवण्यासाठी पवार साहेब यांनी फक्त पोलीस दलावरच नाही, तर स्थानिक नागरिकांवरही विश्वास ठेवला आहे. ते सतत नागरिकांशी संवाद साधतात, त्यांचे प्रश्न जाणून घेतात आणि आवश्यक असल्यास त्वरित उपाययोजना करतात. ‘जनतेचा पोलीस’ म्हणून त्यांची ओळख निर्माण होण्यामागे हाच नागरिकाभिमुख दृष्टिकोन आहे. त्यांच्या कार्यपद्धतीत, पोलीस भाषेचा ठप्पा हा औपचारिकतेसाठी नसून, तो कायदेशीर प्रक्रियेचा महत्त्वपूर्ण भाग ठरतो, ज्यामुळे प्रकरणाला न्याय मिळतो. पाचोरा परिसरातील विविध गुन्ह्यांवर त्यांनी तातडीने केलेली कारवाई ही त्यांच्या कार्यक्षमतेची साक्ष आहे. चोरी, मारामारी, महिलांवरील अत्याचार, अवैध धंदे, वाहतूक नियमांचे उल्लंघन अशा विविध गुन्ह्यांवर पवार साहेब यांनी कठोर पावले उचलली आहेत. विशेष म्हणजे, कारवाईनंतर संबंधितांना न्यायालयीन प्रक्रियेपर्यंत पोहोचवणे आणि त्यांना कायद्याच्या कचाट्यात आणणे यात त्यांची भूमिका निर्णायक ठरते. गावोगावी, बाजारपेठेत, चौकाचौकात त्यांच्या कार्याविषयी नागरिक बोलतात. “पवार साहेब आल्यापासून गुन्हेगारांना वचक बसला आहे” असे म्हणणे आज सहज ऐकायला मिळते. दुसरीकडे, एखाद्या सामान्य माणसाला अडचण आली, की “थेट पवार साहेबांना भेटा” असा सल्ला लोक देतात. ही लोकप्रियता केवळ पदाच्या जोरावर आलेली नाही, तर त्यांच्या सातत्यपूर्ण, प्रामाणिक आणि धाडसी कामगिरीमुळे निर्माण झालेली आहे. राहुलकुमार पवार साहेब यांनी पोलीस दलातील मर्यादित संसाधनांचा योग्य वापर करून दाखवला आहे. पोलीस संख्या कमी असतानाही, त्यांनी ड्यूटीचे वेळापत्रक असे आखले आहे की, प्रत्येक वेळेला संवेदनशील भागात पोलिसांची उपस्थिती राहते. तसेच, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून गुन्ह्यांची तपासणी अधिक जलद आणि अचूक करण्यावरही त्यांचा भर आहे. सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचा वापर, डिजिटल पुरावे गोळा करणे आणि गुन्हेगारांचा डेटाबेस अद्ययावत ठेवणे यामुळे अनेक प्रकरणे सोडविण्यात मदत झाली आहे. पवार साहेब यांच्या अल्पावधीतल्या कार्यकाळात पोलिसांनी केवळ गुन्ह्यांवर नियंत्रण मिळवले नाही, तर समाजातील विविध घटकांशी समन्वय साधत कायदा व सुव्यवस्था राखण्याचे कामही केले आहे. शाळा, महाविद्यालयांत जाऊन विद्यार्थ्यांना कायद्याची जाणीव करून देणे, वाहतूक शिस्त पाळण्याबाबत जनजागृती करणे, तसेच महिलांच्या सुरक्षिततेसाठी विशेष उपक्रम राबवणे हे त्यापैकी काही ठळक उपक्रम आहेत. याशिवाय, शहरात एखादी आपत्कालीन घटना घडली, अपघात झाला किंवा कुठे आग लागली, तर पवार साहेब स्वतः घटनास्थळी पोहोचून परिस्थितीचा आढावा घेतात आणि आवश्यक ती मदत पुरवतात. अशा प्रसंगी, “साहेब स्वतः आले” ही भावना पीडितांच्या मनातील असुरक्षितता कमी करते आणि त्यांना दिलासा देते. त्यांच्या नेतृत्वाखाली पाचोरा पोलीस स्टेशन आज ‘फक्त तक्रारी घेणारे ठिकाण’ न राहता, नागरिकांना आधार, मदत आणि न्याय मिळवून देणारे केंद्र बनले आहे. या बदलामुळे नागरिकांचा सहभाग वाढला आहे, कारण लोकांना खात्री आहे की त्यांच्या तक्रारींवर न्याय मिळेल. गुन्हेगारांवर कठोर हात आणि नागरिकांशी मैत्रीपूर्ण वर्तन – या संतुलित धोरणामुळे राहुलकुमार पवार साहेब यांनी केवळ काही महिन्यांतच पाचोरा पोलीस स्टेशनला एक वेगळी ओळख दिली आहे. त्यांच्या अल्प कार्यकाळातच नागरिकांचा विश्वास जिंकून, गुन्हेगारीवर आळा घालणे आणि कायदा व सुव्यवस्था राखणे – हे त्यांनी केवळ कर्तव्य म्हणून नाही, तर समाजाप्रती असलेली जबाबदारी म्हणून पार पाडले आहे. अशा प्रकारे, पाचोरा पोलीस निरीक्षक राहुलकुमार पवार साहेब हे केवळ एका तालुक्याचे पोलीस अधिकारी नसून, जनतेचे मित्र, गुन्हेगारांचे कर्दनकाळ आणि खऱ्या अर्थाने ‘जनतेचा पोलीस’ ठरले आहेत. त्यांच्या अल्पावधीतल्या कार्यामुळे पाचोरा पोलीस स्टेशन आज नागरिकांसाठी विश्वासार्ह ठिकाण बनले आहे आणि हा विश्वास टिकवून ठेवणे हीच त्यांची खरी यशोगाथा आहे.

हुतात्मा स्मारक परिसरात पुन्हा अतिक्रमण; स्वच्छता व पार्किंगची व्यवस्था कोलमडली, तात्काळ कारवाईची मागणी

0

Loading

पाचोरा – शहरातील ऐतिहासिक व अभिमानाचे प्रतीक असलेल्या हुतात्मा स्मारक परिसरात पुन्हा एकदा अतिक्रमणाचे सावट पसरले असून, परिसरातील स्वच्छता व वाहतूक व्यवस्था कोलमडल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे. स्वातंत्र्यलढ्यात बलिदान दिलेल्या वीरांच्या स्मृती जपणाऱ्या या स्मारकाच्या जतनासाठी तातडीने कारवाई करण्याची मागणी पत्रकार व स्वातंत्र्यसैनिक पुत्र संदीप महाजन यांनी पाचोरा नगरपालिका मुख्याधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. हुतात्मा स्मारक हे केवळ पाचोराचेच नव्हे तर जळगाव जिल्ह्याच्या स्वातंत्र्यलढ्याच्या इतिहासातील एक महत्त्वपूर्ण स्मारक आहे. जिल्ह्यात केवळ पाचोरा व आडगाव येथेच अशा प्रकारचे स्मारक उभारले गेले असून, स्वातंत्र्यवीरांच्या त्यागाची आठवण करून देणारा हा परिसर भावनिक दृष्ट्या नागरिकांशी जोडलेला आहे. या स्मारकाचे ऐतिहासिक व सांस्कृतिक महत्त्व लक्षात घेता, येथे स्वच्छता, शिस्त व अतिक्रमणमुक्त वातावरण राखणे ही स्थानिक प्रशासनाची जबाबदारी आहे. पूर्वी तात्कालीन मुख्याधिकारी शोभाताई बाविस्कर यांनी या परिसरातील अतिक्रमणावर कठोर कारवाई करून, छत्रपती शिवाजी महाराज चौकाजवळील महादेव मंदिरापासून सुलभ शौचालयाच्या शेवटच्या कोपऱ्यापर्यंतचा संपूर्ण परिसर अतिक्रमणमुक्त केला होता. ही कारवाई केवळ एका तासात पूर्ण झाली होती आणि संबंधित कर्मचाऱ्यांना भविष्यात पुन्हा अतिक्रमण होऊ नये म्हणून स्पष्ट सूचना देण्यात आल्या होत्या. मात्र, आता पुन्हा एकदा त्याच ठिकाणी अतिक्रमण झालेले दिसून येत आहे. मंदिरालगत कचराकुंडी निर्माण होऊन परिसरात अस्वच्छतेचे वातावरण आहे. रिक्षा स्टॅण्डजवळील चालकांना आपल्या रिक्षा नियमानुसार उभ्या करण्यास अडचणी येत आहेत. परिणामी, वाहतुकीत अडथळा निर्माण होतो आहे. सदर परिसरात विद्यमान आमदार किशोरआप्पा पाटील यांचे कार्यालय असल्याने, येथे नागरिक, विविध विभागांचे अधिकारी व मान्यवरांची सतत वर्दळ असते. अतिक्रमणामुळे पार्किंगची जागा उपलब्ध राहत नसल्याने येथील येणाऱ्या-जाणाऱ्या प्रत्येकालाच त्रास सहन करावा लागत आहे. स्वच्छतेच्या अभावामुळे परिसराचे सौंदर्य देखील मलिन होत आहे, जे या ऐतिहासिक स्थळाच्या प्रतिष्ठेला धक्का पोहोचवणारे आहे. पत्रकार व स्वातंत्र्यसैनिक पुत्र या नात्याने संदीप महाजन यांनी दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे की, अतिक्रमण व अस्वच्छता ही केवळ नगररचना व स्वच्छता नियमांचे उल्लंघन नसून, स्वातंत्र्यसैनिकांच्या स्मारकाचा अवमान आहे. त्यामुळे पाचोरा नगरपालिका प्रशासनाने — अतिक्रमण तातडीने हटवणे, परिसराची स्वच्छता व सौंदर्यीकरण कायम ठेवणे, अतिक्रमणाची पुनरावृत्ती टाळण्यासाठी कायमस्वरूपी देखरेखीची व्यवस्था करणे, रिक्षा स्टॅण्ड व पार्किंगसाठी शिस्तबद्ध नियोजन करणे, या बाबींवर तातडीने ठोस व परिणामकारक पावले उचलावीत. या प्रकरणाची गंभीरता लक्षात घेऊन, सदर निवेदनाची प्रत माहिती व योग्य त्या कार्यवाहीसाठी पाचोरा प्रांत अधिकारी तसेच जळगाव जिल्हाधिकारी यांना देण्यात आली आहे. त्यामुळे आता केवळ नगरपालिका नव्हे, तर वरच्या स्तरावरील प्रशासनालाही याची माहिती मिळाल्याने कारवाईस गती मिळण्याची शक्यता आहे. नागरिकांचे मत आहे की, ऐतिहासिक स्थळांचे संरक्षण हे केवळ कागदोपत्री राहून चालणार नाही, तर प्रत्यक्ष पातळीवर कठोर अंमलबजावणी गरजेची आहे. हुतात्मा स्मारकासारख्या ठिकाणी अतिक्रमण होणे आणि अस्वच्छता वाढणे हा नागरिकांच्या जाणीवजागृतीचा आणि प्रशासनाच्या कार्यक्षमतेचा दोन्हीचा प्रश्न आहे. “स्वातंत्र्यसैनिकांच्या स्मृती जपणारा परिसर म्हणजे आपल्या शहराचा सन्मान आहे, आणि त्याचा अपमान सहन केला जाणार नाही,” असेही अनेक नागरिकांनी सांगितले. प्रशासनाने तात्काळ पावले उचलून, हुतात्मा स्मारक परिसर पुन्हा अतिक्रमणमुक्त आणि स्वच्छ करावा, अशी एकमुखाने मागणी होत आहे. आता पाहावे लागेल की, पाचोरा नगरपालिका व जिल्हा प्रशासन या मागणीवर किती तातडीने कारवाई करते आणि शहराचा हा ऐतिहासिक अभिमान पुन्हा एकदा सन्मानपूर्वक उभा राहतो की नाही.

ताज्या बातम्या

error: Content is protected !!