Home Blog Page 96

पाडळसा आरोग्य केंद्राच्या वतीने डेंग्यू जनजागृती व मान्सूनपूर्व सर्वेक्षण मोहीम राबविण्यात

Loading

पाडळसा (ता. यावल) – येथे दिनांक २४ मे २०२५ रोजी पाडळसा प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वतीने डेंग्यूसारख्या तापरोगांविषयी जनजागृती तसेच मान्सूनपूर्व आरोग्य सर्वेक्षण मोहीम मोठ्या प्रमाणात हाती घेण्यात आली. यामागील प्रमुख उद्देश गावकऱ्यांमध्ये आरोग्य जागरूकता वाढवणे, संभाव्य तापरोगांचे प्रतिबंधात्मक उपाय सुचवणे, आणि येत्या पावसाळ्यात जलजन्य व डासजन्य रोगांचा

प्रादुर्भाव रोखणे हा होता.गेल्या काही दिवसांपासून हवामानात अचानक बदल झाल्याने आणि उष्णता व आर्द्रता यामध्ये वाढ झाल्याने डासांची उत्पत्ती आणि तापरोगांच्या वाढीचा धोका मोठ्या प्रमाणात निर्माण झाला आहे. याच पार्श्वभूमीवर जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सचिन भायेकर, तसेच जिल्हा हिवताप नियंत्रण अधिकारी डॉ. प्रमोद यशवंतराव सोनवणे यांनी तातडीचे निर्देश देत आरोग्य पथकांना सज्ज राहण्यास सांगितले. त्यांच्या आदेशानुसार तालुका आरोग्य अधिकारी डॉ. राजू तडवी आणि प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. प्राजक्ता चव्हाण व डॉ. मोबशीर सैय्यद यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण पाडळसा व परिसरातील १८ गावांमध्ये एकसंध आरोग्य तपासणी मोहिम राबविण्यात आली.या व्यापक मोहिमेसाठी आरोग्य निरीक्षक, हिवताप निरीक्षक, आरोग्य सेवक, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, आणि आशा स्वयंसेविका यांचे स्वतंत्र पथक तयार करण्यात आले. यामध्ये प्रामुख्याने तापरोग व कंटेनर सर्वेक्षण, डासोत्पत्ती होणाऱ्या जागांचा शोध, दूषित पाण्याचे स्रोत, तसेच पाण्याच्या पुरवठ्यातील गळती, नळ व पाईपलाइन तपासणी, परिसर स्वच्छतेचा आढावा, आणि गावांमध्ये साचलेल्या सांडपाण्यामुळे उद्भवणाऱ्या समस्या यांचा समावेश होता. तापरोग प्रतिबंधासाठी केलेल्या या मोहिमेमध्ये गावातील प्रत्येक घरात जाऊन संबंधित नागरिकांची विचारपूस करण्यात आली. घरामध्ये पाणी साठवले जात असलेल्या भांड्यांची तपासणी करण्यात आली आणि त्यामध्ये डास अंडी घालू शकतात का, याचे निरीक्षण करण्यात आले. पाण्याचे कंटेनर, बादल्या, ड्रम, कुंड्या यांची नियमित स्वच्छता व झाकण लावण्याची माहिती देऊन लोकांमध्ये जनजागृती करण्यात आली.आरोग्य पथकाने गावातील पिण्याच्या पाण्याचे स्त्रोत शोधून त्यांची स्थिती तपासली. कुठे पाईपलाईनमध्ये गळती आहे का, कुठे नळांना तोटी नाही, कुठे वॉल्वमध्ये त्रुटी आहेत, हे सर्व प्रत्यक्ष पाहून ग्रामपंचायतींच्या माध्यमातून संबंधित दोष दूर करण्याचे निर्देश देण्यात आले. गावांमध्ये साचलेल्या पाण्यामुळे होणाऱ्या डासजन्य रोगांना आळा घालण्यासाठी, गटारी व नाल्यांची साफसफाई, उकिरड्यांचे व्यवस्थापन, तसेच शेण-कचरा उचलण्याची मोहीम राबवली गेली.डेंग्यू व हिवताप प्रतिबंधक उपाय म्हणून गावांमध्ये ‘कोरडा दिवस’ पाळण्याबाबत दवंडी देऊन जनजागृती करण्यात आली. ‘कोरडा दिवस’ म्हणजे आठवड्यातून एक दिवस सर्व नागरिकांनी आपल्या घरातील व परिसरातील साठवलेले पाणी पूर्णतः रिकामे करणे आणि त्या जागा कोरड्या ठेवणे, जेणेकरून डासांना अंडी घालण्यासाठी जागाच मिळणार नाही. या सर्व उपक्रमामध्ये पाडळसा गावाबरोबरच परिसरातील इतर १८ गावांचा समावेश करण्यात आला. प्रत्येक गावात आरोग्य कर्मचाऱ्यांचे स्वतंत्र पथक नेमण्यात आले. या सर्वेक्षण मोहिमेत तालुका हिवताप पर्यवेक्षक विजय नेमाडे, आरोग्य निरीक्षक विजय देशमुख, हितेंद्र पाटील, स्वप्नील भालेराव, प्रयोगशाळा तंत्रज्ञ अधिकारी नीरज राणे यांच्या देखरेखीखाली सर्व कामकाज पार पाडण्यात आले.आरोग्य सेवक नितीन पाटील, सतीश पवार, गिरीश जावळे, भरत धांडे, दिनेश बच्छरे, अनिकेत बोरसे यांनी घरोघरी जाऊन तापरोग सर्वेक्षण केले. आशा सेविका प्रगती पाटील, शारदा पाटील, पुष्पा पाटील यांच्यासह सर्व आशा गटप्रवर्तकांनी महिलांमध्ये आरोग्यविषयक जनजागृती घडवून आणली. प्रत्येक घरात सुसंवाद साधून नागरिकांना त्यांच्या घरातील स्वच्छतेचे महत्त्व पटवून देण्यात आले.या मोहिमेदरम्यान गावकऱ्यांना काही ठिकाणी डासांची उत्पत्ती होणाऱ्या ठिकाणांची माहिती नव्हती. आरोग्य कर्मचाऱ्यांनी त्यांना त्या ठिकाणी होणारे धोके समजावून सांगितले. उदाहरणार्थ, घराबाहेरील झाडाच्या कुंड्या, जुनी खेळणी, रिकाम्या बाटल्या, नारळाच्या करवंट्या या सर्व ठिकाणी पाणी साचून राहिल्यास डासांची उत्पत्ती होते, हे सांगून त्या वस्तू काढून टाकण्याची सूचना करण्यात आली.याशिवाय, दूषित पाण्यामुळे उद्भवणाऱ्या जलजन्य रोगांचा म्हणजेच गॅस्ट्रोएन्टेरिटिस, टायफॉईड, हिपॅटायटीस आदी रोगांचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी, पिण्याच्या पाण्याचे उकळून वापरणे, टाकीत ब्लीचिंग टाकणे, आणि पाणी शुद्धीकरणाचे महत्त्व पटवून देण्यात आले. अनेक ठिकाणी क्लोरीन टॅब्लेट्स वितरित करण्यात आल्या. तालुका आरोग्य अधिकारी डॉ. राजू तडवी आणि डॉ. प्राजक्ता चव्हाण यांनी या सर्व मोहीमेची नियमित पाहणी केली. त्यांनी गावपातळीवर ग्रामपंचायत सदस्यांसोबत बैठक घेऊन स्थानिक पातळीवर स्वच्छता मोहीम चालवण्याचे आवाहन केले. ग्रामपंचायतींना पत्रकाद्वारे सूचना देऊन पाण्याच्या गळतीचे तातडीने निराकरण, नळांना तोटी बसविणे, परिसरात ब्लीचिंग फवारणी करणे, अशा उपाययोजना त्वरीत हाती घेण्यास सांगण्यात आले.या सर्व मोहिमेमुळे पाडळसा व त्यासमोरील गावांमध्ये नागरिकांमध्ये आरोग्याबद्दलची जाणीव वाढली आहे. अनेक ठिकाणी नागरिकांनी स्वतः पुढाकार घेऊन आपल्या परिसराची स्वच्छता ठेवण्यास सुरुवात केली आहे. महिला व युवकांमध्ये देखील आरोग्य विषयक सकारात्मक बदल दिसून येत आहे. एकंदरीतच, पावसाळ्यापूर्वीचा हा उपाययोजना कार्यक्रम खरोखरच प्रशंसनीय असून डेंग्यू व जलजन्य रोगांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात आटोक्यात येण्यास निश्चितच मदत होणार आहे. जिल्हा व तालुका आरोग्य यंत्रणांचा तातडीने आणि प्रभावी प्रतिसाद, तसेच प्राथमिक आरोग्य केंद्र पाडळसा अंतर्गत संपूर्ण पथकाची एकसंध व निष्ठावान कार्यशैली यामुळे ही मोहीम यशस्वी झाली. जनतेने देखील या मोहिमेला भरभरून प्रतिसाद दिला असून पुढील काळातही असे उपक्रम सातत्याने राबविणे गरजेचे असल्याचे मत स्थानिक ग्रामस्थांनी व्यक्त केले. डॉ. सचिन भायेकर, डॉ. प्रमोद सोनवणे, डॉ. राजू तडवी, डॉ. प्राजक्ता चव्हाण, आणि संपूर्ण आरोग्य कर्मचारीवर्गाचे स्थानिक प्रशासन आणि जनतेने विशेष कौतुक केले आहे. अशा प्रयत्नांतूनच ‘स्वस्थ गाव – सशक्त गाव’ ही संकल्पना प्रत्यक्षात साकार होईल, याकडेच ही मोहीम निश्चितपणे वाटचाल करत आहे.

महेंद्रभाई – हितेशभाई द्वारा मातृगया श्राद्ध: सिद्धपुर की पवित्र भूमि से मातृऋण की पूर्णता

Loading

पाचोरा -भारत भुमी श्रद्धा, संस्कृति और सनातन परंपराओं का खजाना है। जन्म से मृत्यु तक मानव जीवन अनेक कर्मकांडों से जुड़ा हुआ होता है। उसमें ‘श्राद्ध विधि’ का विशेष महत्व है। कई लोगों ने गया यानी बिहार के प्रसिद्ध पितृश्राद्ध तीर्थ के बारे में सुना होगा। लेकिन माता के लिए, यानी मातृश्राद्ध के लिए भारतवर्ष में जो स्थान सर्वोत्तम और एकमात्र माना जाता है, वह है गुजरात का सिद्धपुर। इस स्थान को ‘मातृगया’ के नाम से भी जाना जाता है। गुजरात राज्य के पाटण जिले में स्थित

सिद्धपुर धार्मिक, पौराणिक और भावनात्मक दृष्टि से अत्यंत महत्वपूर्ण माना जाता है। यहां मातृश्राद्ध अर्थात् मां की आत्मा की शांति के लिए विशेष विधि की जाती है। यह अनुभव केवल श्रद्धा का नहीं, बल्कि हृदय की कृतज्ञता का होता है। सिद्धपुर का पौराणिक महत्व अद्वितीय है। त्रिदेवों में से ब्रह्मदेव का एकमात्र प्राचीन मंदिर यहीं पर था, जो आज भी उस काल की ऐतिहासिक साक्ष देता है। यहां का बिंदु सरोवर भी ब्रह्माजी के आंसुओं से उत्पन्न हुआ ऐसा माना जाता है। इसीलिए यह तीर्थक्षेत्र विशिष्ट माना गया है। सिद्धपुर वह स्थान है जहाँ तप, श्राद्ध, स्नान और आत्मशांति एक साथ होते हैं। जहाँ केवल विधि नहीं, बल्कि हृदय से कृतज्ञता व्यक्त की जाती है। गया में पितृश्राद्ध होता है, यह हम सभी ने सुना है। लेकिन माता का श्राद्ध अर्थात् मातृश्राद्ध केवल सिद्धपुर में करने से ही उसका पूर्ण फल मिलता है, ऐसी दृढ़ श्रद्धा है। हम अक्सर पिता के ऋण की स्मृति करते हैं, परंतु मां का ऋण, जो जन्मदात्री के रूप में होता है, वह बहुत ही गहरा और भावनात्मक होता है। ऐसी माता के लिए, उनकी आत्मा की शांति हेतु की जाने वाली विधि ही है सिद्धपुर की मातृगया श्राद्ध। स्कंद पुराण और वायु पुराण में इस स्थान का उल्लेख ‘मातृगया’ के रूप में स्पष्ट रूप से किया गया है। सिद्धपुर में श्राद्ध विधि करने की एक विशेष विधि है। यह विधि पूर्णतः विधिपूर्वक, शास्त्रोक्त और सम्पूर्ण तरीके से केवल दिंडोरी प्रणीत श्री स्वामी समर्थ केंद्र द्वारा और प.पू. गुरुमाऊली के आशीर्वाद से, प.पू. चंद्रकांतदादा के मार्गदर्शन में संपन्न होती है। यहाँ पं. महेंद्र भाई और हितेशभाई पंड्या (मो. 9825561729, 9825504407) पिछले तीस वर्षों से अनुभवी और श्रद्धा से मार्गदर्शन करने वाले पंडित हैं। पालनपुर रेलवे स्टेशन से मात्र 35 किलोमीटर की दूरी पर स्थित बिंदु सरोवर के पास यह संपूर्ण विधि की जाती है। विशेष बात यह है कि केवल ₹500 की नाममात्र राशि में नीचे दी गई विधियाँ अत्यंत भावनापूर्वक संपन्न की जाती हैं: 1. त्रिपिंडी श्राद्ध 2. मातृगया पिंडदान 3. स्नान और तर्पण 4. भोजन इन सभी विधियों में लगभग 6 घंटे का समय लगता है। विशेष रूप से, महेंद्रभाई और हितेशभाई पंड्या के यहां इस विधि को करते समय कोई भी शॉर्टकट या व्यवसायिक प्रवृत्ति नहीं होती। प्रत्येक विधि अत्यंत भावुकता, पूर्ण श्रद्धा और शास्त्रोक्त मंत्रोच्चार के साथ संपन्न होती है। इससे पहले मैंने त्र्यंबकेश्वर में शिखरे गुरुजी के पास नारायण नागबली विधि का अनुभव लिया था। तब भी स्वामी समर्थ केंद्र के प्रयास से वह विधि अत्यंत पारदर्शी और संतोषजनक रूप से पूर्ण हुई। यहां भी वही संतोष और और अधिक श्रद्धा का अनुभव हुआ। विशेष रूप से बिंदु सरोवर के आसपास घूमते समय जब अन्य स्थानों पर चल रही विधियों का निरीक्षण किया, तब श्रद्धालुओं से अधिक जानकारी प्राप्त करने पर यह ज्ञात हुआ कि सिद्धपुर के कई स्थानों पर भारी आर्थिक लूट और बहुत कम समय में विधि पूरी करने की प्रवृत्ति दिखाई देती है। उसकी तुलना में स्वामी समर्थ केंद्र द्वारा की गई विधि में कहीं कोई छल-कपट या आर्थिक शोषण नहीं था। यह केवल एक धार्मिक विधि नहीं थी, बल्कि यह हृदय, कृतज्ञता और भावना की अभिव्यक्ति थी। हमारी मां हमारे लिए जो कुछ करती है, उस ऋण का यह एक आध्यात्मिक उत्तर होता है। सिद्धपुर का यह अनुभव केवल एक विधि भर नहीं रहता, बल्कि वह जीवनभर स्मरण में रहता है। स्वामी समर्थ केंद्र द्वारा संपन्न होने वाली यह विधियाँ किसी भी प्रकार की व्यावसायिकता से मुक्त होती हैं, यही उसकी विशेषता है। आज के युग में, जहां श्रद्धा को भी व्यापार बना दिया गया है, वहाँ ऐसे केंद्रों के माध्यम से संपन्न होने वाली विधियाँ ही सच्ची आध्यात्मिकता का परिचय देती हैं। अंत में एक भावनात्मक विचार: “पिता का ऋण गया में चुकाया जा सकता है, लेकिन मां के ऋण का पूर्ण प्रायश्चित्त केवल सिद्धपुर में ही संभव है।” हर किसी को कम से कम एक बार सिद्धपुर में मातृश्राद्ध करना चाहिए। यह केवल धार्मिक नहीं, बल्कि मानव संस्कृति की ऋण परंपरा का आदर करने का एक विनम्र प्रयास है। स्वामी समर्थ केंद्र द्वारा प.पू. गुरुमाऊली के आशीर्वाद और चंद्रकांतदादा के मार्गदर्शन में पं. महेंद्र भाई, हितेश भाई पंड्या द्वारा संपन्न यह आध्यात्मिक उपक्रम केवल एक कर्मकांड नहीं, बल्कि मातृत्व के ऋण की भावनात्मक प्रतिपूर्ति है। यह विधि हमारे जीवन में मां द्वारा किए गए त्याग, ममता और प्रेम की स्मृति दिलाने वाला एक पवित्र क्षण है। मां हमें जन्म देती है, बड़ा करती है, कभी थके बिना हमारे लिए जीती है। उसके इस अनंत प्रेम का ऋण हम केवल ऐसे श्रद्धा विधियों द्वारा ही थोड़ा-बहुत चुका सकते हैं। सिद्धपुर की मातृगया श्राद्ध उस अनमोल ऋण की भावनात्मक और आध्यात्मिक व्याख्या है। यहाँ जब हम अपनी मां की आत्मा के लिए पिंड अर्पण करते हैं, तब केवल मंत्र नहीं गूंजते, बल्कि हमारे अंतर्मन के आँसू भी उस जल में घुल जाते हैं। यह उपक्रम मन को छूने वाला, आत्मा को झकझोरने वाला और श्रद्धा से परिपूर्ण अनुभव देने वाला है। ऐसी पवित्र भूमि पर, पवित्र उद्देश्य से, पवित्र मन से की गई यह विधि हर किसी ने जीवन में कम से कम एक बार अनुभव करनी चाहिए, क्योंकि “मां जैसी कोई और देवी नहीं।” सिद्धपुर के बिंदु सरोवर से लौटने वाला हर श्रद्धालु केवल संतोष ही नहीं लेकर लौटता, बल्कि वह अपने जीवन में मां के अस्तित्व की फिर से गहरी अनुभूति करता है… और तभी उसके होंठों पर बस एक ही वाक्य होता है — “मातृदेवो भव” -संदीप दा महाजन, पाचोरा – 7385108510

हॉटेल पद्मालया : शुद्ध शाकाहारी जेवणाची नवी ओळख, वावडदामध्ये भव्य शुभारंभ

Loading

पाचोरा – रोडवरील बिलखेडा-वावडदा परिसरात येणाऱ्या नागरिकांसाठी आणि प्रवाशांसाठी एक आनंददायी बातमी आहे. अन्न हे पूर्णब्रह्म मानणाऱ्या संस्कृतीत शुद्ध शाकाहारी भोजनाचा आनंद घ्यायची एक नवी जागा आता आपल्या सेवेत सज्ज झाली आहे. शुक्रवार, दिनांक २३ मे २०२५ पासून हॉटेल पद्मालया या नावाने एक उत्कृष्ट शाकाहारी हॉटेल आपल्या सेवेतील एक नवा अध्याय सुरू करत आहे. सौ. हेमांगी शालिग्राम मालकर (प्रोप्रायटर्स, हॉटेल पद्मालया वावडदा), संकेत शालिग्राम मालकर (प्रोप्रा. हॉटेल प्रधान, वडगाव), शालिग्राम ओंकार मालकर (प्रोप्रा. हॉटेल प्रधान, वावडदा) आणि खुशबू शालिग्राम मालकर या सर्वांचे सामूहिक प्रयत्न आणि परिश्रमातून साकार झालेलं हे हॉटेल म्हणजे

सेवा, स्वाद आणि सौंदर्य यांचे त्रिसूत्री तत्त्व एकत्रित करणारा प्रकल्प आहे.
हॉटेल पद्मालयाचा उद्घाटन समारंभ शुक्रवार, २३ मे रोजी संध्याकाळी ५ वाजता होणार असून, सर्व स्नेही, हितचिंतक, ग्रामस्थ, राजकीय, सामाजिक, व्यापारी आणि पत्रकार बांधवांना सस्नेह आमंत्रित करण्यात आले आहे. कार्यक्रमाची वेळ ‘संध्याकाळी ५ ते आपल्या आगमनापर्यंत’ असे ठेवण्यात आलेली आहे, ज्यामुळे कोणत्याही व्यक्तीला वेळेच्या अडचणीमुळे या आनंदसोहळ्यापासून वंचित राहावं लागणार नाही
बिलखेडा-वावडदा परिसरातील पाचोरा रोड हा एक महत्त्वाचा मार्ग असून, रोज अनेक प्रवासी आणि स्थानिक नागरिक याच मार्गावरून ये-जा करतात. मात्र या भागात दर्जेदार, स्वच्छ आणि शुद्ध शाकाहारी जेवणाची सोय नव्हती. हीच गरज ओळखून हॉटेल पद्मालयाची संकल्पना साकारण्यात आली. या ठिकाणी येणाऱ्या प्रत्येक ग्राहकाला घरगुती चव, पारंपरिक पदार्थ, उत्तम सेवा आणि प्रसन्न वातावरण मिळावे, यासाठी मालकर कुटुंबाने संपूर्ण मनापासून हा उपक्रम साकारला आहे.
हॉटेल पद्मालयामध्ये सर्व वयोगटासाठी स्वादिष्ट शुद्ध शाकाहारी भोजनाची उत्तम सोय आहे. उत्तम आसनव्यवस्था, भरपूर नैसर्गिक प्रकाश आणि स्वच्छता यांचा अनुभव येथे प्रत्येक पाहुण्याला मिळणार आहे. संपूर्ण कुटुंबासाठी एकत्र बसून जेवण करता येईल अशा व्यवस्था करण्यात आल्या असून, लहान मुलांपासून ते वयोवृद्ध पर्यंत सर्वांचे स्वागत अत्यंत आदरपूर्वक आणि आपुलकीने केले जाणार आहे.
हॉटेल पद्मालयाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे येथे खासगी समारंभ, वाढदिवस, गेट-टुगेदर, नामकरण, स्नेहमेळावे आणि लहान मोठ्या पार्टींसाठी स्वतंत्र हॉल व निसर्गरम्य गार्डनची उत्तम सुविधा करण्यात आलेली आहे. हा परिसर उत्सवप्रिय कुटुंबांसाठी आणि कार्यक्रम आयोजित करणाऱ्या मंडळांसाठी एक आदर्श ठिकाण ठरणार आहे. स्वच्छ व हवेशीर परिसर, खास मेन्यू, सुशिक्षित व सभ्य कर्मचारीवर्ग आणि घरगुती चव यांचा आनंद येथे घेता येणार आहे.
हॉटेल पद्मालया हे केवळ एक व्यवसायिक उपक्रम नाही, तर हा एक सामाजिक बांधिलकीने प्रेरित असलेला सेवाभाव आहे. सौ. हेमांगी शालिग्राम मालकर यांच्या संयमी आणि व्यवस्थापनक्षम दृष्टिकोनातून या हॉटेलचे नियोजन झाले आहे. त्यांना संकेत शालिग्राम मालकर आणि शालिग्राम ओंकार मालकर या कुटुंबातील तरुण नेतृत्वाने साथ दिली. विशेष म्हणजे या तिघांनी हॉटेल प्रधानच्या यशस्वी अनुभवावर आधारित हॉटेल पद्मालया साकारले असून, त्यात नवकल्पना आणि आधुनिक गरजांची पूर्तता यांचे उत्तम संतुलन राखले आहे.
हॉटेल पद्मालया या मंगल कार्यानिमित्ताने मालकर परिवाराने समाजातील सर्व स्तरातील लोकांना निमंत्रण दिले असून, ‘आपली उपस्थिती हीच आमच्यासाठी सर्वात मोठा शुभाशिर्वाद’ असे आवाहन केले आहे. निमंत्रण पत्रिकेतील शब्दांमध्ये आपुलकी, साधेपणा आणि सामाजिक जाणीव स्पष्टपणे दिसते. पाचोरा, भडगाव, वडगाव, बिलखेडा, वावडदा या परिसरातील प्रत्येक नागरिक, राजकीय-सामाजिक कार्यकर्ते, व्यापारी वर्ग, पत्रकार, महिला मंडळे, तरुण मंडळे, शिक्षक आणि प्रशासकीय अधिकारी यांना निमंत्रण देण्यात आले आहे.
हॉटेल पद्मालया हे भविष्यातील सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक उपक्रमांचेही केंद्र ठरणार आहे. येथे अनेक समाजोपयोगी कार्यक्रम, आरोग्यविषयक चर्चासत्रे, युवकांसाठी मार्गदर्शन शिबिरे इत्यादी उपक्रम घेण्याचा मानस मालकर परिवाराने व्यक्त केला आहे. व्यवसायाबरोबरच समाजहिताची जाण ठेवणारा हा दृष्टिकोन खरंच स्तुत्य आहे.
हॉटेल पद्मालया ही फक्त भोजनालय नाही, ती एक अनुभवांची जागा आहे. येथे आलेला प्रत्येक ग्राहक केवळ अन्नाने नव्हे तर सेवाभावानेही तृप्त होईल, हा विश्वास सौ. हेमांगी शालिग्राम मालकर आणि त्यांच्या कुटुंबाला आहे. स्वच्छता, दर्जा, पारंपरिक चव, आधुनिक सोयीसुविधा, नैसर्गिक वातावरण आणि आत्मियता यांचा मिलाफ म्हणजेच हॉटेल पद्मालया.
जिल्ह्यातील नागरिकांनी आणि पंचक्रोशीतून येणाऱ्या पाहुण्यांनी हॉटेल पद्मालया या नव्याने साकारलेल्या संस्थेच्या शुभारंभास उपस्थित राहून सौ. हेमांगी शालिग्राम मालकर व त्यांच्या कुटुंबाच्या उपक्रमास शुभाशीर्वाद द्यावेत, अशी साद मालकर कुटूंबियांच्या वतीने करण्यात आली आहे.

गुजरातमध्ये लखनौचा सुपर विजय

Loading

मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : लखनौ सुपर जायंट्सने गुजरात टायटन्सचा ३३ धावांनी पराभव करून हंगामातील त्यांचा सहावा विजय नोंदवला. गुरुवारी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या या सामन्यात, नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी केल्यानंतर लखनौने २० षटकांत दोन गडी गमावून २३५ धावा केल्या. प्रत्युत्तरात गुजरातला निर्धारित षटकांत नऊ गडी गमावून फक्त २०२ धावा करता आल्या. घरच्या मैदानावर सलग चार विजयांनंतर गुजरातचा हा पहिलाच पराभव आहे. लखनौकडून विल्यम ओ’रोर्कने तीन तर अवेश खान आणि आयुष बदोनी यांनी प्रत्येकी दोन विकेट घेतल्या. दरम्यान, आकाश सिंग आणि शाहबाज अहमद यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.
लक्ष्याचा पाठलाग करताना गुजरातची सुरुवात चांगली झाली. साई सुदर्शन आणि शुभमन गिल यांच्यात ४६ धावांची भागीदारी झाली, जी विल्यम ओ’रोर्कने मोडली. त्याने सुदर्शनाला आपला बळी बनवले. १६ चेंडूत २१ धावा करून तो बाद झाला. यानंतर, आवेश खानने कर्णधार गिलला तंबूचा रस्ता दाखवला. तो फक्त ३५ धावा करू शकला. तर, जोस बटलरला १८ चेंडूत फक्त ३३ धावा करता आल्या.
यानंतर, चौथ्या क्रमांकावर आलेल्या शेरफेन रदरफोर्डने शाहरुख खानसोबत डाव सांभाळला. दोघांनीही ४० चेंडूत ८६ धावा जोडल्या. रुदरफोर्ड ३८ धावा काढून बाद झाला आणि शाहरुख ५७ धावा काढून बाद झाला. तथापि, दोघेही त्यांच्या संघाला विजय मिळवून देऊ शकले नाहीत. त्यांच्याशिवाय राहुल तेवतियाने दोन, अर्शद खानने एक, कागिसो रबाडाने दोन आणि साई किशोरने एक धाव केली. दरम्यान, रशीद खान चार धावा काढून नाबाद राहिला.
याआधी लखनौची सुरुवातही चांगली झाली होती. एडन मार्कराम आणि मिशेल मार्श यांच्यात ९१ धावांची भागीदारी झाली. साई किशोरने मार्करामला शाहरुख खानकडे झेलबाद केले. तो ३६ धावा करून बाद झाला. यानंतर मार्शसोबत निकोलस पूरन सामील झाला. दोघांनीही ५२ चेंडूत १२१ धावा जोडल्या. यादरम्यान, ऑस्ट्रेलियन फलंदाज मार्शने आयपीएलमधील पहिले शतक झळकावले. तो ६४ चेंडूत १० चौकार आणि आठ षटकारांच्या मदतीने ११७ धावा काढून परतला. त्याच वेळी, निकोलस पूरन ५६ धावांवर आणि ऋषभ पंत १६ धावांवर नाबाद राहिले. गुजरातकडून अर्शद खान आणि साई किशोर यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.

निष्पक्ष पत्रकारितेच्या दिशेने निर्णायक वाटचाल – व्हॉईस ऑफ मीडियाच्या राष्ट्रीय अधिवेशनात केंद्रीय मंत्री जितनराम मांझी यांचे मनोगत

Loading

नवी दिल्ली ( गणेश ज. शिंदे ) देशहितासाठी आणि लोकशाहीच्या रक्षणासाठी निष्पक्ष पत्रकारिता अत्यंत आवश्यक असून, तळागाळातील जनतेला न्याय मिळवून देण्याचे कार्य पत्रकार जगत करत आहे. अशा परिस्थितीत सत्याचा आवाज बुलंद करणाऱ्या पत्रकारांची एकजूट ही काळाची गरज बनली आहे, असे ठाम मत केंद्रीय सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग मंत्री जितनराम मांझी यांनी व्यक्त केले. व्हॉईस ऑफ मीडियाच्या राष्ट्रीय अधिवेशनात ते बोलत होते.
पाच दशकांहून अधिक काळात देशाच्या कानाकोपऱ्यात काम करणाऱ्या आणि ५२ देशांतील सुमारे ४ लाख ७० हजार पत्रकारांचा सहभाग असलेल्या व्हॉईस ऑफ मीडियाच्या या दोन दिवसीय अधिवेशनात संपूर्ण भारतभरातून राज्य अध्यक्ष, महासचिव, संपादक व कार्यकर्त्यांनी सहभाग नोंदवला. ‘व्हॉईस ऑफ मीडिया’ व ‘व्हीओएम इंटरनॅशनल फोरम’ यांच्या संयुक्त विद्यमाने या अधिवेशनाचे आयोजन करण्यात आले होते.
या अधिवेशनाच्या अध्यक्षस्थानी व्हॉईस ऑफ मीडियाचे संस्थापक अध्यक्ष संदीप काळे हे स्वतः होते. त्यांच्या नेतृत्वाखाली गेल्या काही वर्षांपासून संघटना केवळ पत्रकारांसाठीच नव्हे, तर त्यांच्या कुटुंबीयांच्या आरोग्य, निवास, शिक्षण आणि सेवानिवृत्तीच्या हितासाठी कार्यरत आहे.
केंद्रीय मंत्री जितनराम मांझी यांनी यावेळी स्पष्ट शब्दांत सांगितले की, ‘‘प्रामाणिक पत्रकारांचे संरक्षण आणि सन्मान यासाठी संघटित प्रयत्न आवश्यक आहेत. पत्रकारांच्या मागण्या आणि समस्या यावर केवळ चर्चाच नव्हे, तर कृतीशील निर्णय घेणारी संघटना म्हणजे व्हॉईस ऑफ मीडिया आहे. आज जेव्हा माध्यमांवर व्यावसायिक दबाव आणि राजकीय हस्तक्षेप वाढतो आहे, तेव्हा अशा संघटना लोकशाहीचा किल्ला मजबूत करण्याचे कार्य करत आहेत.’’
या अधिवेशनात केंद्रीय मंत्री महोदयांच्या हस्ते देशभरातील राज्याध्यक्ष, महासचिव आणि मान्यवर पत्रकारांना पदग्रहण प्रमाणपत्र, ओळखपत्र आणि पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. उपस्थित पत्रकारांना देशहितासाठी आणि पत्रकारिता मूल्यांसाठी समर्पित राहण्याची शपथदेखील देण्यात आली.
या महत्त्वाच्या अधिवेशनात एकूण दहा ठराव एकमताने संमत करण्यात आले. या ठरावांचे वाचन राष्ट्रीय महासचिव दिव्या भोसले यांनी केले. यात पत्रकारांसाठी विमा सुरक्षा, निवृत्तीनंतरचा आधार, पत्रकारांसाठी सरकारी आरक्षण योजना, वकील संरक्षण यंत्रणा, प्रशिक्षण उपक्रम, डिजिटल ओळखपत्रांचे वैधता प्रमाणपत्र, जिल्हास्तरावरील पत्रकार सुरक्षा समिती, महिला पत्रकारांसाठी सुरक्षितता यंत्रणा, पत्रकार अपघात मदत निधी आणि फेक पत्रकारांवर कारवाई अशा विविध बाबींचा समावेश होता.
दुसऱ्या दिवशीच्या पहिल्या सत्रात पत्रकार प्रशिक्षण सत्र आयोजित करण्यात आले. या सत्रात ऊर्जा पाटील यांनी कोच, सायकोलॉजिस्ट व काउन्सिलर म्हणून देशभरातून आलेल्या पत्रकारांना संघटनात्मक बांधणी, टीमवर्क आणि नेतृत्व कौशल्याबाबत सखोल मार्गदर्शन केले. त्यांनी विविध प्रात्यक्षिके आणि खेळांच्या माध्यमातून व्यावसायिक वातावरणात कार्यक्षम संघ कसा तयार करावा हे समजावून सांगितले.
अधिवेशनाचा दुसरा भाग विशेषतः पुरस्कार सोहळ्याने अधिक गौरवशाली ठरला. यामध्ये अनेक मान्यवर व्यक्तींना विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कार्यासाठी गौरविण्यात आले. खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांना ‘संसद भूषण’ पुरस्कार, आमदार समीर कुणावार यांना ‘विकास पुरुष’ पुरस्कार, आदित्य अनघा मल्टिस्टेट क्रेडिट को-ऑपरेटिव्ह सोसायटीच्या अनघा समीर सराफ यांना ‘उद्योग रत्न’ पुरस्कार, व्यंकटेश जोशी यांना ‘समाज रत्न’ पुरस्कार, डॉ. पंजाब खानसोले यांना ‘विकास रत्न’ पुरस्कार तर पारधी सर यांना देखील त्यांच्या सामाजिक कार्याबद्दल गौरविण्यात आले.
या कार्यक्रमात संघटनेच्या राष्ट्रीय कोअर टीमची नव्याने निवड करण्यात आली. या कोअर टीममध्ये विविध राज्यांचे प्रतिनिधी सहभागी करण्यात आले असून, महाराष्ट्राचे अनिल म्हस्के, मध्यप्रदेशचे दीपक शर्मा, उत्तर प्रदेशाचे प्रेम पाठक, हिमाचल प्रदेशचे विकास शर्मा, हरियाणाचे बन्सीलाल पांचाल, जम्मू काश्मीरचे अक्षित महाजन, आसामच्या स्वप्ना दत्ता, नागालँडचे मॅक्स खिया आणि मेघालयचे कर्मलांग करिया यांचा समावेश आहे.
या निवडीमुळे देशभरातील पत्रकार संघटनांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले असून, प्रत्येक राज्यात व्हॉईस ऑफ मीडियाचे कार्य अधिक प्रभावीपणे सुरू राहणार आहे. पत्रकारांच्या हितासाठी यापुढेही अशीच धोरणात्मक बैठक, चर्चासत्रे आणि प्रशिक्षण कार्यक्रम राबवले जातील, असे संदीप काळे यांनी सांगितले.
अधिवेशनात ‘पत्रकार सुरक्षा कायदा’ लवकरात लवकर लागू करावा, फेक पत्रकार संघटनांवर बंदी आणावी, पत्रकारांना डिजिटल साक्षरता प्रशिक्षण देण्यात यावे, आणि पत्रकारांची नोंदणी अधिकृतरीत्या करण्यासाठी केंद्रीकृत पोर्टल तयार करावे, या बाबींबाबत ठोस मागण्या उपस्थित करण्यात आल्या.
हे अधिवेशन केवळ एक औपचारिक बैठक नव्हती, तर एक प्रेरणादायी चळवळ होती. ज्यामध्ये देशभरातून आलेल्या पत्रकारांनी अनुभवांची देवाणघेवाण केली, संघटनात्मक उद्दिष्टांची दिशा ठरवली आणि भविष्यातील पत्रकारितेच्या ध्येय-धोरणावर चर्चा केली.
व्हॉईस ऑफ मीडियाचे हे राष्ट्रीय अधिवेशन पत्रकार बांधवांमध्ये एकजूट निर्माण करणारे, सत्यस्वरूप पत्रकारितेची ग्वाही देणारे आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नव्या पर्वाची नांदी करणारे ठरले आहे. पत्रकारांच्या हक्कासाठी सशक्त लढा देण्याच्या निर्धाराने हे अधिवेशन संपन्न झाले.
संपूर्ण अधिवेशनात संयोजन व शिस्तबद्धता यांचा उत्कृष्ट नमुना पाहायला मिळाला. माध्यम जगतातील सर्व स्तरांतील प्रतिनिधींनी एकत्र येऊन आपापल्या जबाबदाऱ्यांची जाणीव घेत आगामी काळात पत्रकारांच्या प्रश्नांना वाचा फोडण्याच्या दिशेने सकारात्मक पुढाकार घेतल्याचे या दोन दिवसीय अधिवेशनातून स्पष्टपणे दिसून आले.
अशा प्रकारे ‘व्हॉईस ऑफ मीडिया’च्या या राष्ट्रीय अधिवेशनाने देशातील पत्रकार समाजात नवसंजीवनी निर्माण केली असून, ही वाटचाल निष्पक्ष, निर्भय आणि जनहितैषी पत्रकारितेकडे नेणारी ठरली आहे.

घरफोडी गुन्ह्याचा पर्दाफाश : जळगाव LCB पोलिसांची कुशल कारवाई; i20 चारचाकीसह आरोपी अटकेत

Loading

चाळीसगाव – शहरात काही दिवसांपूर्वी घडलेल्या धाडसी घरफोडी प्रकरणाचा शोध अखेर लागला असून, या गुन्ह्याचा समांतर तपास करताना जळगाव LCB पोलीसांनी मोठे यश मिळवले आहे. घरफोडीप्रकरणी दाखल गुन्ह्याचा तपास करताना पोलीसांनी उत्तरप्रदेश आणि धुळे जिल्ह्यातील चार आरोपी निष्पन्न केले असून, त्यापैकी एकास ताब्यात

घेण्यात पोलिसांना यश आले आहे. त्याच्याकडून महत्त्वाचे खुलासे झाले असून, त्याच्या मदतीने हा गुन्हा उघडकीस आणण्यात आला आहे. ही महत्त्वपूर्ण कारवाई दिनांक 22 मे 2025 रोजी जळगाव स्थानिक गुन्हा शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बबन आव्हाड साहेब यांच्या आदेशानुसार राबविण्यात आली. चाळीसगाव शहर पोलीस ठाणे येथे CCTNS गुन्हा रजिस्टर नंबर 144/2025 नुसार भारतीय नवीन फौजदारी संहिता (BNS) कलम 305 आणि 331(3) अन्वये अज्ञात व्यक्तींविरोधात दिवसाढवळ्या घरफोडीप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. तपासादरम्यान घटनास्थळाच्या सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक विश्लेषण, मोबाईल लोकेशन तपास, गोपनीय माहिती आणि विशिष्ट पद्धतीने केलेल्या पोलीस सूत्रांच्या तपासावरून चार संशयित आरोपी निष्पन्न करण्यात आले. निष्पन्न आरोपींची नावे पुढीलप्रमाणे आहेत – ✨कैलास चिंतामण मोरे (रा. मोहाडी, जिल्हा धुळे), ✨राहुल प्रभाकर अहिरे (रा. सोनगीर, जिल्हा धुळे), ✨जयप्रकाश यादव (रा. उत्तरप्रदेश), आणि ✨वीरेन ठाकूर (रा. उत्तरप्रदेश). या आरोपींपैकी आरोपी क्रमांक 2 – राहुल प्रभाकर अहिरे यास पोलिसांनी ताब्यात घेतले असता त्याने सदर गुन्हा आपल्या इतर साथीदारांच्या मदतीने केल्याची कबुली दिली. तसेच, गुन्हा करताना वापरण्यात आलेली i20 चारचाकी कार व त्यामध्ये ठेवलेला चोरीचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. सदर आरोपीला ताब्यात घेऊन पुढील कायदेशीर कारवाईसाठी चाळीसगाव शहर पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे. या संपूर्ण कारवाईसाठी एक समर्पित व अनुभवी पोलिसांची टीम कार्यरत होती. या पथकात PSI शेखर डोमाळे यांच्या नेतृत्वाखाली हेडकॉन्स्टेबल मुरलीधर धनगर, पोलीस नाईक दीपक माळी, पोलीस शिपाई महेश पाटील, पोलीस शिपाई भूषण शेलार, पोलीस शिपाई सागर पाटील तसेच चालक हेडकॉन्स्टेबल दीपक चौधरी आणि चालक भरत पाटील यांचा समावेश होता. या सर्वांनी सातत्याने गुप्त माहिती संकलन, संशयित आरोपींचा मागोवा, तांत्रिक यंत्रणांचा वापर, आणि गस्त वाढवून तपासाला गती दिली. त्यांच्या सामूहिक प्रयत्नामुळे हा गुन्हा अत्यंत वेगाने उघडकीस आला. पोलिसांनी अटक केलेल्या आरोपी राहुल अहिरे याच्याकडे सखोल चौकशी केली असता त्याने कबूल केले की, त्याने व त्याच्या इतर साथीदारांनी धुळे, जळगाव, संभाजीनगर व अहिल्यानगर जिल्ह्यांमध्ये अशाच पद्धतीने घरफोडीचे अनेक गुन्हे केले आहेत. त्याच्या खुलाशांवरून ही टोळी एक संगठित गुन्हेगारी गट असून ते घरफोडीपूर्वी टार्गेट निवडून संबंधित परिसरात रात्र व दिवस निरीक्षण करत, घरात कोणी नसल्याची खात्री करूनच चोरी करत होते. चोरीनंतर ते गाडीने दूर पळ काढत असत आणि त्यांच्या गुन्ह्याचा पद्धतीने शोध लावणे कठीण व्हावे यासाठी वारंवार त्यांचे लोकेशन व वाहनं बदलत असत. या टोळीच्या उर्वरित तीन सदस्यांचा शोध सध्या सुरू असून पोलिसांनी त्यांचा शोध घेण्यासाठी विविध जिल्ह्यांमध्ये पथके रवाना केली आहेत. त्यांचे मोबाईल लोकेशन, नातेवाईकांचे संपर्क, सीसीटीव्ही फुटेज आणि रहदारी तपासणीच्या आधारे लवकरच त्यांना अटक केली जाईल, असा पोलिसांचा विश्वास आहे. या प्रकारामुळे नागरिकांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली असून पोलिसांची जनतेस विनंती केली आहे की, कोणतीही संशयास्पद व्यक्ती, वाहन किंवा हालचाल निदर्शनास आल्यास तात्काळ पोलीस ठाण्यास माहिती द्यावी. तसेच, घर बंद ठेवताना सुरक्षित कुलुप, सीसीटीव्ही यंत्रणा, शेजाऱ्यांची कल्पना देणे यासारख्या प्राथमिक उपाययोजना कराव्यात. या गुन्ह्याचा अवघ्या काही दिवसांत छडा लावल्यामुळे जळगाव स्थानिक गुन्हा शाखेची पोलिसांची कार्यक्षमता पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे. गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी पोलिसांनी घेतलेली तत्परता आणि धोरणात्मक तपासपद्धती नागरिकांसाठी दिलासादायक ठरली LCB चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांच्या सूक्ष्म निरीक्षणाखाली व अनुभवाच्या जोरावर ही कारवाई योग्य दिशेने व प्रभावीपणे पार पडली. पुढील काही दिवसांत या प्रकरणातील इतर आरोपी देखील पोलिसांच्या तावडीत सापडण्याची शक्यता आहे. अशा संगठित गुन्हेगारी टोळ्यांना कायद्याचा चाप बसवण्यासाठी पोलिसांकडून विशेष मोहीम राबविली जात असून चाळीसगाव व परिसरात अशा प्रकारच्या गुन्ह्यांवर आळा घालण्यात येणार असल्याचेही पोलिसांनी स्पष्ट केले आहे.

मुंबईने दिल्लीच्या आशा धुळीस मिळवल्या, मुंबई प्लेऑफमध्ये; सूर्यकुमारनंतर सँटनेर-बुमराह चमकले

Loading

मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : मुंबई इंडियन्सने दिल्ली कॅपिटल्सचा ५९ धावांनी पराभव केला. यासह, मुंबई आयपीएल २०२५ च्या प्लेऑफमध्ये पोहोचणारा चौथा संघ बनला. यापूर्वी गुजरात टायटन्स, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि पंजाब किंग्ज यांनी प्लेऑफसाठी पात्रता मिळवली होती. बुधवारी वानखेडे स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या✨ सामन्यात नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी करणाऱ्या मुंबईने सूर्यकुमार यादवच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर पाच विकेट गमावून १८० धावा केल्या. प्रत्युत्तरात दिल्लीला १८.२ षटकांत फक्त १२१ धावा करता आल्या आणि त्यांचा डाव संपला. मुंबईकडून जसप्रीत बुमराह आणि मिशेल सँटनर यांनी प्रत्येकी तीन तर ट्रेंट बोल्ट, दीपक चहर, विल जॅक्स आणि कर्ण शर्मा यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.
दिल्लीला हरवून मुंबईने थेट प्लेऑफमध्ये प्रवेश मिळवला आहे. तथापि, दोन्ही संघांचा गट टप्प्यात अजूनही एक सामना शिल्लक आहे. दिल्ली कॅपिटल्सचा सामना २४ मे (शनिवार) रोजी पंजाब किंग्जशी होईल तर मुंबई इंडियन्सचा सामना २६ मे (सोमवार) रोजी पंजाब किंग्जशी होईल. हे दोन्ही सामने जयपूरमध्ये खेळवले जातील.
लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या दिल्लीला त्यांच्या फलंदाजांनी निराश केले. त्यांच्याकडून समीर रिझवीने सर्वाधिक ३९ धावांची खेळी खेळली. याशिवाय, फक्त तीन फलंदाजांना दुहेरी अंक गाठता आला. त्यात केएल राहुल (११), विप्रज निगम (२०) आणि आशुतोष शर्मा (१८) यांचा समावेश आहे. मुंबईविरुद्धच्या सामन्यात संघाचा नियमित कर्णधार अक्षर पटेल प्रकृती अस्वास्थ्यामुळे खेळला नाही. त्याच्या जागी, फाफ डु प्लेसिसने दिल्लीचे नेतृत्व केले. त्याला फक्त सहा धावा करता आल्या. याशिवाय अभिषेक

पोरेलने सहा, ट्रिस्टन स्टब्सने दोन, माधव तिवारीने तीन आणि कुलदीप यादवने सात धावा केल्या. त्याच वेळी, मुस्तफिजूर रहमानला खातेही उघडता आले नाही तर दुष्मंथा चामीरा आठ धावा करून नाबाद राहिला.
त्याआधी, मुंबईची सुरुवात खराब झाली. माजी कर्णधार रोहित शर्मा फक्त पाच धावा करून बाद झाला. यानंतर, विल जॅक्स आणि रायन रिकेल्टन यांनी जबाबदारी सांभाळण्याचा प्रयत्न केला, परंतु जॅक्स १३ चेंडूत २१ धावा काढून बाद झाला तर रिकेल्टनला फक्त २५ धावा करता आल्या. तिलक वर्माने २७ आणि हार्दिक पंड्याने तीन धावा केल्या. त्याच वेळी, सूर्यकुमार यादवने ४३ चेंडूत सात चौकार आणि सहा गगनचुंबी षटकारांच्या मदतीने ७३ धावांची नाबाद खेळी केली. याशिवाय, नमन धीरने आठ चेंडूत दोन चौकार आणि तितक्याच षटकारांसह २४ धावा केल्या आणि नाबाद राहिला. सूर्यकुमार यादव आणि नमन धीर यांनी शेवटच्या 12 चेंडूत 48 धावा केल्या. दिल्लीकडून मुकेश कुमारने दोन तर दुष्मंथ चामीरा, मुस्तफिजूर रहमान आणि कुलदीप यादवने प्रत्येकी एक विकेट घेतली.

हजारो वर्षांच्या श्रद्धेचा नवा अध्याय : आर्यादी श्री जनार्दन मंदिराचा भव्य जीर्णोद्धार सोहळा उत्साहात संपन्न

Loading

पांगाला, उडुपी (कर्नाटक) (गुरुदत्त वाकदेकर) : उडुपी जिल्ह्यातील पांगाला, कापू येथे दहाव्या शतकापासून श्रद्धेचे केंद्र असलेल्या आर्यादी श्री जनार्दन मंदिराचा जीर्णोद्धार आणि पुनःप्रतिष्ठा सोहळा अतीव भक्तिभाव आणि मंत्रमुग्ध करणाऱ्या वातावरणात पार पडला. पाच दिवस चाललेल्या या उत्सवात शास्त्रोक्त विधी, वैदिक पूजा-अर्चा, कलशारोहण आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.

या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार ठरले श्री माधवाचार्य मूळ महासंस्थान, आडामरू नरहरी तीर्थ मठाचे वेदमूर्ती श्री श्री श्री विश्वप्रिय तीर्थ श्रीपादेरु आणि सोदे वदिराजा मठाचे जगद्गुरू श्री श्री श्री विश्ववल्लभ तीर्थ श्रीपादेरु, ज्यांच्या हस्ते प्राणप्रतिष्ठा व कलशोत्सव विधी पार

पडले.

कार्यक्रमास जिल्हा न्यायाधीश सौ. हेमावती, खासदार श्रीनिवास पुजारी, बंगळुरू येथील एम.आर.जी. समूहाचे प्रमुख डॉ. के. प्रकाश शेट्टी, आमदार सुरेश गुरमे-शेट्टी, योगेश व्ही. शेट्टी, डॉ. पी. मोहनदास भट, पी. गोविंद शेट्टी, बाळकृष्ण टी. शेट्टी, शैलेश शेट्टी आणि सुधीर शेट्टी आदी मान्यवर उपस्थित होते. यासोबतच महाराष्ट्र, विशेषतः मुंबईहून आलेल्या हजारो भाविकांनीही सहभाग घेतला.

दंडतीर्थातील गुरुकुल परंपरा आणि माधव विजय पर्वात या मंदिराचा उल्लेख आढळतो. शतके उलटून गेली, तरीही येथील श्री जनार्दन मूर्तीच्या दर्शनाने मनःशांती आणि समाधान मिळते, अशी दृढ श्रद्धा आजही अबाधित आहे.

या भक्तिसंपन्न सोहळ्यामुळे पांगाला, कापू, पडबद्री, खटपडी आणि उडुपी परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते. दिवसरात्र चाललेल्या मंत्रोच्चारांनी परिसर पवित्रतेने भारून गेला होता. विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांनी ही पर्वणी संस्मरणीय ठरली.

तसेच ही नव्या रूपात पुनरुत्थित झालेली परंपरा, श्रद्धा आणि संस्कृतीची वास्तू भाविकांच्या मनात नवचैतन्याचा दीप उजळून गेली आहे.

आयपीएल २०२५ : बीसीसीआयने प्लेऑफचे नवे वेळापत्रक केले जाहीर

Loading

मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) आयपीएल २०२५ च्या प्लेऑफचे सुधारित वेळापत्रक जाहीर केले आहे. त्यानुसार, आता या हंगामातील विजेतेपदाचा सामना कोलकात्यातील ईडन गार्डन्सऐवजी अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर

खेळवला जाईल. भारत आणि पाकिस्तानमधील तणावामुळे, आयपीएलचा चालू हंगाम एका आठवड्यासाठी पुढे ढकलण्यात आला होता, जो १७ मे पासून पुन्हा सुरू झाला. 
बीसीसीआयने उर्वरित सामन्यांचे सुधारित वेळापत्रक जाहीर केले होते परंतु अंतिम फेरी आणि प्लेऑफची ठिकाणे जाहीर केली नव्हती. कोलकाता अंतिम सामन्याचे यजमानपद हिसकावून घेऊ शकेल असे मानले जात होते आणि मंगळवारी ते अधिकृतपणे निश्चित झाले. बीसीसीआयच्या सुधारित वेळापत्रकानुसार, न्यू चंदीगडमधील पीसीए स्टेडियममध्ये २९ मे रोजी क्वालिफायर-१ आणि ३० मे रोजी एलिमिनेटर सामना होईल. 
त्याच वेळी, जगातील सर्वात मोठे क्रिकेट स्टेडियम, नरेंद्र मोदी स्टेडियम, १ जून रोजी क्वालिफायर-२ आणि ३ जून रोजी अंतिम सामना आयोजित करेल. जुन्या वेळापत्रकानुसार, हैदराबाद आणि कोलकाता प्लेऑफ सामने आयोजित करणार होते. आयपीएलने आपल्या निवेदनात म्हटले आहे की, हवामान आणि इतर कारणांमुळे आयपीएल गव्हर्निंग कौन्सिलने प्लेऑफ आणि अंतिम सामन्यांचे ठिकाण बदलले आहे.
आयपीएल २०२५ चा हंगाम आता अंतिम टप्प्यात पोहोचला आहे आणि आतापर्यंत पंजाब किंग्ज, गुजरात टायटन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (आरसीबी) यांनी प्लेऑफमध्ये आपले स्थान निश्चित केले आहे आणि मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात चौथ्या स्थानासाठीची लढाई अजूनही सुरू आहे. गतविजेत्या कोलकाता नाईट रायडर्स (केकेआर), लखनौ सुपर जायंट्स, चेन्नई सुपर किंग्ज (सीएसके), सनरायझर्स हैदराबाद आणि राजस्थान रॉयल्स यांचा प्रवास गट टप्प्यातच संपला आहे.
आयपीएल गव्हर्निंग कौन्सिलने बेंगळुरूमध्ये होणाऱ्या आरसीबी आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यातील सामन्याचे ठिकाणही बदलले आहे. आरसीबी आणि हैदराबाद यांच्यातील आयपीएल २०२५ चा ६५ वा सामना बंगळुरूमध्ये खेळवला जाणार होता, परंतु आता तो लखनौमधील भारतरत्न श्री अटलबिहारी वाजपेयी एकाना स्टेडियममध्ये खेळवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आयपीएलने म्हटले आहे की बेंगळुरूमधील खराब हवामान लक्षात घेता हा सामना लखनऊला हलवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
यापूर्वी, १७ मे रोजी होणारा आरसीबी आणि केकेआर यांच्यातील सामना पावसामुळे रद्द करण्यात आला होता आणि त्यात नाणेफेक होऊ शकली नाही. भारतीय हवामान खात्याने गुरुवारपर्यंत बेंगळुरूमध्ये ऑरेंज अलर्ट जारी केला आहे आणि मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. यामुळेच बोर्डाला शेवटच्या क्षणी या सामन्याचे ठिकाण बदलावे लागले आहे.
आयपीएल गव्हर्निंग कौन्सिलने २० मे पासून प्लेऑफसह ग्रुप स्टेजच्या उर्वरित सामन्यांमध्ये एक अतिरिक्त तास जोडला आहे. याचा अर्थ असा की जर कोणत्याही कारणास्तव सामना उशिरा सुरू झाला तर खेळासाठी एक अतिरिक्त तास उपलब्ध असेल. आयपीएल २०२५ मध्ये आतापर्यंत पावसामुळे तीन सामने रद्द करावे लागले आहेत.

चेन्नईविरुद्धच्या राजस्थानचा विजय पण प्रवास संपला,; युधवीर-आकाशनंतर वैभव सूर्यवंशी चमकला

Loading

मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : वैभव सूर्यवंशी आणि संजू सॅमसन यांच्यातील ९०+ धावांच्या भागीदारीच्या जोरावर राजस्थान रॉयल्सने चेन्नई सुपर किंग्जचा सहा विकेट्सने पराभव केला. यासह, संजू सॅमसनच्या नेतृत्वाखालील संघाचा स्पर्धेतला प्रवास संपला. हा त्यांचा गट टप्प्यातील शेवटचा सामना होता. त्याच वेळी, चेन्नईला २५ मे रोजी गुजरात टायटन्सविरुद्ध शेवटचा सामना खेळायचा आहे. राजस्थान आणि चेन्नई आधीच प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडले आहेत.
मंगळवारी दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या या सामन्यात, चेन्नई सुपर किंग्जने नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी करताना २० षटकांत आठ गडी गमावून १८७ धावा केल्या. प्रत्युत्तरात, राजस्थानने १७.१ षटकांत चार गडी गमावून १८८ धावा केल्या आणि स्पर्धेतील त्यांचा

चौथा विजय नोंदवला.
लक्ष्याचा पाठलाग करताना राजस्थानची सुरुवात चांगली झाली. वैभव सूर्यवंशी आणि यशस्वी जैस्वाल यांनी पहिल्या विकेटसाठी ३७ धावांची भागीदारी केली जी अंशुल कंबोजने तोडली. जयस्वाल १९ चेंडूत ३६ धावा करून बाद झाला. यानंतर, सूर्यवंशीला कर्णधार संजू सॅमसनची साथ मिळाली. दोघांनीही दुसऱ्या विकेटसाठी ९८ धावांची भागीदारी केली. सॅमसन ४१ धावा करून बाद झाला आणि सूर्यवंशी ५७ धावा करून बाद झाला. या सामन्यात रियान परागला चांगली कामगिरी करता आली नाही आणि तो तीन धावा करून बाद झाला. ध्रुव जुरेल ३१ आणि शिमरॉन हेटमायर १२ धावांवर नाबाद राहिले. चेन्नईकडून अश्विनने दोन तर अंशुल कंबोज आणि नूर अहमद यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.
त्याआधी, चेन्नईची सुरुवात निराशाजनक झाली. डेव्हॉन कॉनवेला युधवीर सिंगने पायचीत केले. तो फक्त १० धावा करू शकला. यानंतर, त्याने उर्विललाही तंबूचा रस्ता दाखवला, जो खातेही उघडू शकला नाही. चेन्नईकडून आयुष म्हात्रेने ४३, देवाल्ड ब्रेव्हिसने ४२ आणि शिवम दुहेने ३९ धावांची मोठी खेळी केली. त्याच वेळी, कर्णधार धोनी १७ चेंडूत १ षटकारासह १६ धावा काढून बाद झाला. राजस्थानकडून युधवीर सिंग आणि आकाश माधवाल यांनी प्रत्येकी तीन विकेट घेतल्या तर तुषार देशपांडे आणि वानिंदू हसरंगा यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.

ताज्या बातम्या

error: Content is protected !!