Home Blog Page 117

महाराष्ट्र सरकारचा मीडिया मॉनिटरिंग मास्टर प्लॅन — १० कोटींची योजना, बातम्यांवर ठेवणार बारकाईने नजर!

0

Loading

मुंबई- मंत्रालय ( झुंज वृत्तपत्र & ध्येय न्युज प्रतिनिधी ) -महाराष्ट्र राज्यातील वृत्तपत्रे, इलेक्ट्रॉनिक चॅनेल्स आणि डिजिटल माध्यमांमध्ये प्रकाशित होणाऱ्या बातम्यांचा अभ्यास करून शासनाशी संबंधित माहितीचे विश्लेषण करणे आणि दिशाभूल करणाऱ्या बातम्यांना वेळेत खंडन देणे, यासाठी महाराष्ट्र सरकारने आता एक भव्य मीडिया मॉनिटरिंग मास्टर प्लॅन तयार केला आहे. यासाठी तब्बल १० कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. सरकारच्या या निर्णयामुळे राज्यात मीडिया विश्लेषणाची नवी यंत्रणा उभी राहणार आहे, जी दररोज सकाळी ८ ते रात्री १० या वेळेत कार्यरत राहणार आहे.
राज्य सरकारच्या माहिती व प्रसिद्धी

संचालनालयामार्फत हे ‘मीडिया मॉनिटरिंग सेंटर’ स्थापन करण्यात येणार असून, त्यामार्फत प्रिंट मीडिया (वृत्तपत्रे), ब्रॉडकास्ट मीडिया (टीव्ही चॅनेल्स), तसेच डिजिटल मीडिया (वेब पोर्टल्स, सोशल मीडिया इ.) वर सातत्याने नजर ठेवली जाणार आहे.
यंत्रणेमार्फत दररोज प्रकाशित होणाऱ्या बातम्यांचे ‘मूड अ‍ॅनालिसिस’, टोन अ‍ॅनालिसिस, इश्यू वाईज विश्लेषण, अशा प्रकारे सखोल अभ्यास केला जाईल. यातून सरकारविषयीची सकारात्मक, नकारात्मक किंवा दिशाभूल करणारी माहिती वेगळी काढण्यात येणार आहे. शासन निर्णयानुसार, जर एखादी बातमी दिशाभूल करणारी आढळून आली, तर त्या विरोधात तत्काळ स्पष्टीकरण जारी केले जाईल. मीडिया मॉनिटरिंग सेंटर अशा बातम्यांची नोंद करून संबंधित खात्यांना त्याबाबत माहिती देईल आणि आवश्यक त्या उपाययोजना सुचवेल.
नकारात्मक बातम्यांनाही यामध्ये वेगळा विचार करण्यात येणार असून, त्या बातम्यांवर योग्य स्पष्टीकरण देण्यासाठी प्रो-ऍक्टिव्ह रिस्पॉन्स यंत्रणा तयार केली जाणार आहे.
पीडीएफ स्वरूपात बातम्यांचे संकलन आणि सल्लागाराची नेमणूक
राज्य सरकारने या सेंटरच्या अंमलबजावणीसाठी व्यावसायिक सल्लागाराची नेमणूक करण्याचा निर्णय घेतला आहे. या सल्लागाराच्या जबाबदाऱ्या खालीलप्रमाणे असणार आहेत:
1) रोजच्या सर्व माध्यमांतील बातम्यांचे संकलन त्यांचे वर्गीकरण (Positive, Negative, Neutral)
2) विभागानुसार वर्गीकरण (Revenue, Education, Health इ.)
3) इश्यू-आधारित विश्लेषण (धरण, शेती, गुन्हेगारी इ.)
4) व्यक्तिविशेष संबंधित बातम्यांचे वर्गीकरण
5) तासाला ट्रेंड आणि मूड अ‍ॅलर्ट
या सर्व गोष्टी पीडीएफ स्वरूपात सिस्टेमॅटिक फॉर्मेटमध्ये जमा केल्या जातील आणि वेळोवेळी संबंधित अधिकाऱ्यांना पाठवल्या जातील.
या सर्व कामांसाठी एक वर्षाच्या कालावधीसाठी सल्लागारांची नियुक्ती करण्यात येणार असून ती ई-निविदा प्रक्रियेद्वारे केली जाईल. या सल्लागारांना विशिष्ट कौशल्य आवश्यक आहे — मीडिया अ‍ॅनालिटिक्स, रिपोर्टिंग टूल्सचा अनुभव, डेटा अ‍ॅनालिसिस, मीडिया कम्युनिकेशन आदी.
या संदर्भातील शासन निर्णयात (Government Resolution – GR) स्पष्टपणे म्हटले आहे की, “प्रत्येक बातमीचे विश्लेषण करून तिचा सरकारी यंत्रणांवर काय परिणाम होतो, हे समजून घेणे आवश्यक आहे. त्यामुळे या यंत्रणेच्या माध्यमातून प्रत्येक विभागाच्या मीडिया उपस्थितीवर बारीक नजर ठेवण्यात येणार आहे.”
तसेच, सल्लागाराला या कामासाठी स्पेशल अ‍ॅनालिटिकल सॉफ्टवेअर वापरण्याची मुभा देण्यात आली आहे.
या निर्णयामुळे स्पष्ट होते की, राज्य सरकारने माध्यमांच्या प्रभावाची ताकद ओळखली आहे आणि प्रभावी मीडिया स्ट्रॅटेजीचा भाग म्हणून हा उपक्रम राबवला जात आहे.
नव्या धोरणांमध्ये जनमताचा अभ्यास, सामाजिक ट्रेंड्सची नोंद, जनतेतील भावना आणि सरकारी निर्णयांवर होणारे प्रतिक्रिया यांचा आढावा घेण्याचे उद्दिष्ट ठेवलं आहे.

या मुळे नेमके १) दिशाभूल करणाऱ्या माहितीचे खंडन वेळेत
जनतेतील चुकीच्या समजुती रोखणे
२) शासन धोरणांची योग्य मांडणी
३) विभागनिहाय फीडबॅक प्रणाली मजबूत करणे
४) तत्काळ प्रतिक्रिया देणारी यंत्रणा
माहिती व प्रसिद्धी संचालनालयातील सूत्रांनी सांगितले की, “ही यंत्रणा केवळ ट्रॅकिंगसाठी नाही, तर ती एक सशक्त डेटा बेस आणि इन्टेलिजन्स टूल ठरणार आहे. यातून प्रशासनाला योजना तयार करताना जनतेच्या भावना समजून घेण्याची मदत होईल.”
जनतेचा दृष्टिकोन — माध्यमस्वातंत्र्यावर प्रश्नचिन्ह?
दुसऱ्या बाजूला काही माध्यमकर्मी आणि पत्रकार संघटनांनी या निर्णयावर माध्यमस्वातंत्र्याच्या दृष्टिकोनातून चिंता व्यक्त केली आहे. त्यांचे म्हणणे आहे की, “सरकारकडून मीडिया विश्लेषण करणे म्हणजे माध्यमांवर नजर ठेवण्याचा प्रकार आहे. याचा वापर टीका दबवण्यासाठी केला जाणार नाही ना?” अशी शंका व्यक्त होत आहे.
मात्र, सरकारने यावर स्पष्टीकरण दिलं आहे की, “ही यंत्रणा कोणत्याही माध्यमाची मुस्कटदाबी करण्यासाठी नाही, तर सरकारविरोधी चुकीच्या माहितीचा वेळीच पर्दाफाश करण्यासाठी आहे.”
यामुळे नव्या यंत्रणेचे होणारे फायदे —
१) तांत्रिकदृष्ट्या एक पाऊल पुढे
२) डेटा-बेस्ड मीडिया स्ट्रॅटेजी
३) AI आधारित टोन अ‍ॅनालिसिस सॉफ्टवेअर
४) ट्रेंड विश्लेषण व रिपोर्टिंग टूल्स
५) वास्तविक फीडबॅक प्रणाली
यामुळे एक क्रांतिकारी पाऊल की नियंत्रणाचा धोका? हे प्रश्न चिंन्ह निर्माण झाले आहे
परंतु एकूणच महाराष्ट्र सरकारने उचललेलं हे पाऊल अत्यंत महत्वाचं ठरणार आहे. यातून सरकारला स्वतःच्या कार्यकाळातील जनमत समजून घेण्याची संधी मिळेल, तसेच चुकीच्या माहितीचा मुकाबला करता येईल. मात्र, या उपक्रमाची यशस्विता आणि पारदर्शकता तेव्हाच दिसून येईल जेव्हा यंत्रणा निष्पक्ष, तंत्राधारित आणि पत्रकारितेच्या मुल्यांशी सुसंगत असेल.

“अवैधधंद्या विरोधात पत्रकारांचा निर्धार पाचोर्‍यातून जनआंदोलनाची नांदी!”

0

Loading

पाचोरा- तातुक्यात भ्रष्टाचार आणि अवैध धंद्यांच्या विळख्यात अडकलेल्या समाजाला मुक्त करण्यासाठी आता पत्रकारांनी पुढाकार घेतला आहे. पाचोरा व परिसरातील सर्वसामान्य नागरिकांच्या हितासाठी, तसेच प्रशासनातील बेजबाबदार आणि भ्रष्ट प्रवृत्तीच्या विरोधात ठाम उभे राहत, पाचोरा तालुक्यातील पत्रकारांनी एका व्यापक जनआंदोलनाचा निर्धार केला आहे.
सद्यस्थितीत पाचोरा पोलीस स्टेशन आणि पिंपळगाव पोलीस स्टेशनच्या कार्यक्षेत्रात विविध स्वरूपाचे अवैध व्यवसाय बिनधास्तपणे सुरू आहेत. हे व्यवसाय केवळ कायद्याला

हरताळ फासणारे नसून, समाजाच्या नैतिक आणि आर्थिक अधःपतनाचे मूळ कारण बनत आहेत. अशा स्थितीत या अवैध व्यवसायांविरोधात समाजात जागरूकता निर्माण करणे, प्रशासनावर दबाव टाकणे आणि नागरिकांना या व्यवस्थेविरोधात एकत्र करणे, ही काळाची गरज बनली आहे.
सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतरही प्रतिबंधित तंबाखूजन्य पदार्थांचा सर्रास व्यापार सुरू आहे. स्थानिक किराणा दुकानदारांपासून थेट घाऊक विक्रेत्यांपर्यंत गुटखा सहज मिळत असून, पोलीस आणि अन्न सुरक्षा विभाग यांचे कथित ‘मूकसंमती’मुळे हा व्यवसाय भरभराटीला जात आहे.
पाचोरा शहरात व तालुक्यात ठीक ठिकाणी गुप्त मार्गाने देशी व विदेशी दारूंचा पुरवठा सुरू आहे. ग्रामीण व शहरी भागांतील युवक दारूपायी नैतिक अधःपतनाकडे झुकत असून, कुटुंबीयांवर मानसिक आणि आर्थिक ओझं वाढत आहे.
दुग्ध व्यवसायातील भेसळ :-दूध आणि दुग्धजन्य पदार्थांमध्ये सुरू असलेल्या भेसळीमुळे नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. केवळ पाण्याची भेसळच नव्हे तर रासायनिक पदार्थ मिसळून ग्राहकांची फसवणूक केली जाते.
वन विभागाच्या हद्दीत अवैधरित्या लाकूड, आणि खनिज उत्खनन चालते. यामध्ये विभागातील काही अधिकाऱ्यांची कथित संलिप्तता असल्याचे पुरावे हाती येत आहेत.
जिलेटिन कांड्यांचा धोकादायक व्यापार :
जिलेटिनच्या नावाखाली सुरू असलेला स्फोटक पदार्थांचा व्यवसाय समाजासाठी अत्यंत धोकादायक बनला आहे. यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो.
महसूल आणि सार्वजनिक बांधकाम विभागात अशीच भ्रष्टकामकाजाची व कारभाराची परिस्थिती आहे भ्रष्टाचाराशिवाय कामे होत नसल्याचे चित्र सामान्य बनले आहे.
वरील सगळ्या पार्श्वभूमीवर समाजात लोकजागृती निर्माण करून प्रशासनासमोर पुराव्यांसह ठोस भूमिका मांडण्यासाठी पत्रकार संदीप दामोदर महाजन .
यांच्या नेतृत्वाखाली पाचोरा शहर व तालुक्यातील पत्रकार एकत्र आले आहेत.याच अनुषंगाने सर्व संबंधित विभागांतील भ्रष्टाचाराची व अवैध धंद्यांची तंतोतंत माहिती, कागदपत्रे, छायाचित्रे आणि प्रत्यक्ष साक्षीपुरावे गोळा करण्याचे काम सुरू झाले आहे. हे सर्व पुरावे जमा झाल्या नंतर वरिष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्यांना, तसेच केंद्र व राज्य सरकारच्या संबंधित खात्यांना निवेदनाच्या माध्यमातून थेट भेटुन सादर करण्यात येणार आहेत
जर निवेदनानंतर प्रशासनाने ठोस कारवाई केली नाही, तर पत्रकारांनी जनतेसोबत विविध मार्गांनी व माध्यमांतून मोहिम राबवली जाणार आहे तरी पत्रकार बांधव व नागरीकांकडे जर अशा कोणत्याही अवैध धंद्यांविषयी माहिती, कागदपत्रे किंवा पुरावे असतील, तर ती तत्काळ पत्रकार संदीप महाजन यांच्याकडे देण्यात यावी हि विनंती
संपर्क : 7385108510

शासन नियमांची पायमल्ली; पाचोरा डाक कार्यालयातील प्रशासकीय अनियमितता उघड

0

Loading

पाचोरा – शहरातील डाक विभाग कार्यालयात कर्मचारी व्यवस्थापन, कार्यालयीन प्रशासन, पोशाख संहितेचे पालन, कार्यालयीन वेळेचा अंमल तसेच तांत्रिक कारणावरून खिडकी सेवा बंद करण्याच्या प्रक्रियेबाबत अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. या संदर्भात माहिती अधिकार कायद्यांतर्गत सविस्तर माहिती मागविण्यात आली असून, यामुळे डाक विभागातील अंतर्गत कारभारावर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत. पाचोरा डाक कार्यालयात कोणते अधिकारी आणि कर्मचारी

कार्यरत आहेत? त्यांच्यावर कोणकोणती कामकाज जबाबदारी सोपविण्यात आली आहे? यासंदर्भात कोणतीही स्पष्ट माहिती सार्वजनिकपणे उपलब्ध नाही.हा प्रकार सुसंगत प्रशासनाच्या धोरणांना विरोधी आहे.
माहिती अधिकार कायद्यानुसार, प्रत्येक शासकीय कार्यालयाने कर्मचारी यादी, पदनाम व कार्य जबाबदाऱ्या स्पष्टपणे दर्शवाव्यात. मात्र पाचोरा डाक कार्यालयात याबाबत पारदर्शकता नाही. नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी ही माहिती प्रवेशद्वारी, सूचना फलकावर उपलब्ध असणे गरजेचे होते.
भारतीय डाक विभागाने कर्मचारी व अधिकाऱ्यांसाठी ठराविक पोशाख संहिता (Dress Code) लागू केली आहे. हा पोशाख कर्मचारी वर्गाची ओळख, शिस्तबद्धता आणि लोकाभिमुख कार्यपद्धती दर्शविणारा असतो. मात्र पाचोरा डाक कार्यालयातील अनेक कर्मचारी पोशाख संहितेचे पालन करताना दिसत नाहीत. विभागाकडून यावर कुठलीही शिस्तपालन भंग कारवाई होत असल्याचे दिसत नाही. यामुळे नागरिकांमध्ये असंतोष वाढत आहे.
सार्वजनिक सेवांसाठी काम करणाऱ्या शासकीय कार्यालयांची वेळ ही निश्चित आणि शिस्तबद्ध असणे अत्यावश्यक आहे. डाक विभागाच्या कार्यालयासाठी ठरविलेली कार्यालयीन वेळ आणि जेवणाची सुटी यासंबंधी निश्चित आदेश असावा लागतो. मात्र पाचोरा कार्यालयात अनेक वेळा कार्यालयीन वेळ न पाळल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. कर्मचारी मनमानी पद्धतीने जेवणाची वेळ असल्याचे सांगत  नागरिकांना वेठीस धरले जाते यामुळे नागरिकांची वेळ वाचण्याऐवजी अधिक खर्ची जात आहे. ह्या संदर्भात नियमांचे उल्लंघन केल्यास वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तात्काळ कार्यवाही करणे गरजेचे ठरत आहे.
माहिती अधिकार कायदा, 2005 अंतर्गत प्रत्येक शासकीय कार्यालयाच्या प्रवेशद्वारी ‘प्रथमदर्शनी माहिती अधिकारी’ आणि ‘आपले अधिकारी’ यांची माहिती देणारा फलक लावणे बंधनकारक आहे. ह्या फलकाच्या माध्यमातून नागरिक थेट जबाबदार अधिकाऱ्यांशी संपर्क साधू शकतात. मात्र पाचोरा डाक कार्यालयात हा फलक लावण्यात आलेला नाही, की कोणतीही अशी माहिती उघडपणे नागरिकांसमोर दिली जात नाही. हा प्रकार कायद्याचे उल्लंघन असल्याने गंभीर स्वरूपाचा आहे.
पाचोरा डाक कार्यालयात अनेक वेळेस ‘तांत्रिक अडचणमुळे सेवा बंद’ असे फलक सहज लावले जातात. किंबहुना ते तसे तयारच करून ठेवण्यात आलेले आहेत या फलकांमागे कोणतीही अधिकृत आदेश प्रक्रिया, परवानगी किंवा कार्यालयीन नोंद आढळून आलेली नाही. नागरिकांची सेवा घेण्याची जबाबदारी झटकण्यासाठी हा फलक केवळ साधन ठरत आहे. हे अत्यंत गैरप्रकाराचे उदाहरण असून, यामागील जबाबदारी निश्चित करून दोषींवर कारवाई होणे अत्यंत आवश्यक आहे.
वरिल सर्व बाबींमुळे सामान्य नागरिकांमध्ये नाराजी आणि संताप निर्माण झाला आहे. पोस्ट कार्यालय हे शासकीय सेवेचे महत्वाचे माध्यम असून, त्याच्यावरचा विश्वास टिकवणे डाक विभागाची जबाबदारी आहे.
या सर्व प्रकारांवर चौकशी व्हावी आणि जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई व्हावी, यासाठी माहिती अधिकार अधिनियम 2005 अंतर्गत स्वतंत्रपणे या बाबींवर माहिती मागविण्यात आली आहे:
या सर्व तक्रारींच्या संदर्भात संबंधित विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना देखील माहिती पाठविण्यात आली आहे.
या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याची तात्काळ दखल घेऊन संबंधित अधिकाऱ्यांकडून खुलासा मागवावा व सुधारात्मक पावले उचलावी, अशी मागणी केली आहे.
कायद्याचे पालन आणि पारदर्शक प्रशासन हाच पर्याय ही बाब केवळ पाचोरा तालुक्यापुरती मर्यादित नाही, तर संपूर्ण डाक विभागाच्या कार्यपद्धतीवर प्रश्न निर्माण करणारी आहे. त्यामुळे अशा प्रकारचे गैरप्रकार रोखण्यासाठी विभागीय सुधारणांची गरज आहे.
तक्रारी नोंदवून, माहिती अधिकाराचा वापर करून, नागरिकांनी लोकशाही प्रक्रिया जपली आहे —स्पर्धेच्या युगात आता डाक विभागाचीच  जबाबदारी आहे की ते कसे विश्वासाला पात्र ठरतील.

मंगळवारी पोलिस यंत्रणेला मिळणार आधुनिक अधिष्ठान! आ.किशोरआप्पा पाटील व जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार भूमिपूजन समारंभ

0

Loading

पाचोरा : पाचोरा शहराच्या विकासात एक नवे पर्व ठरणाऱ्या महत्त्वपूर्ण प्रकल्पाचे भूमिपूजन येत्या मंगळवारी (11 मार्च 2025) दुपारी 2 -00 वाजता पार पडणार आहे. शहरातील पोलिस लाईन परिसरात उभारण्यात येणाऱ्या नवीन पोलिस स्टेशनसह अधिकाऱ्यांसाठी व कर्मचाऱ्यांसाठी सुसज्ज निवासस्थानांच्या बांधकामाचा शुभारंभ आमदार किशोर आप्पा पाटील यांच्या हस्ते होणार असून, या प्रसंगी जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, प्रांताधिकारी भूषण अहिरे, अप्पर पोलिस अधीक्षक कविताताई नेरकर, उपविभागीय पोलिस अधिकारी धनंजय येरुळे, तहसीलदार विजय बनसोडे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
   शहराच्या भौगोलिक विस्तारासोबतच प्रशासन यंत्रणाही अद्ययावत आणि कार्यक्षम असावी, या दृष्टीने गेल्या काही वर्षांपासून अनेक प्रयत्न सुरू होते. विशेषतः पाचोऱ्यातील भडगाव रोडवरील जुन्या पोलिस वसाहतीची झालेली अत्यंत वाईट अवस्था, मोडकळीस आलेली घरे, पाण्याची व स्वच्छतेची अपुरी व्यवस्था, तसेच निवासाची असुविधा यामुळे पोलिस कर्मचाऱ्यांना अडचणींना सामोरे जावे लागत होते.
या समस्येची गंभीर दखल घेत आमदार किशोरआप्पा पाटील यांनी शासन दरबारी सातत्याने पाठपुरावा केला. त्यांच्या अथक प्रयत्नांमुळे गृह विभागाकडून तब्बल ₹२१ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. या निधीतून अत्याधुनिक सुविधा असलेल्या नवीन पोलिस स्टेशनसह वरिष्ठ अधिकाऱ्यांचे व कर्मचाऱ्यांचे स्वतंत्र व सुरक्षित निवासस्थान उभारले जाणार आहे.
       नवीन प्रकल्पात पोलिस कर्मचाऱ्यांची निवास व कार्यालयीन व्यवस्था एकाच ठिकाणी असणार आहे. यामुळे कार्यक्षमता वाढण्यास मदत होणार असून, गस्त आणि आपत्कालीन प्रतिसाद वेळेत मिळणार आहे. पोलिस स्टेशनच्या नव्या इमारतीमध्ये आधुनिक तंत्रज्ञानयुक्त नियंत्रण कक्ष, महिलांसाठी स्वतंत्र कक्ष, तक्रार नोंदणी केंद्र, गुन्हे शाखेचा विभाग, वसतिगृह, शस्त्रास्त्र कक्ष, वाहनतळ आदी सुविधांचा समावेश असणार आहे.
तसेच अधिकारी वर्गासाठी स्वतंत्र अपार्टमेंट स्वरूपाची निवासस्थाने, पोलिस कर्मचाऱ्यांसाठी निवासी क्वार्टर्स, सामायिक सभागृह, व्यायामशाळा, जलपुनर्भरण सुविधा, ग्रीन झोन, सौरऊर्जेचे नियोजन, सीसीटीव्ही निगराणी व्यवस्था यांचा समावेश केला जाणार आहे.
      ज्या बांधवांनी जनतेच्या सुरक्षेसाठी अहोरात्र ड्युटी बजावली, त्यांना योग्य व सुरक्षित निवास मिळणे हे केवळ आवश्यकच नव्हे तर त्यांचा सन्मानही आहे. पाचोऱ्यातील पोलिस कर्मचाऱ्यांना व त्यांच्या कुटुंबियांना वर्षानुवर्षे मोडकळीस आलेल्या घरी राहावे लागत होते. या नव्या वसाहतीमुळे त्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. नव्या सुविधा उपलब्ध झाल्यामुळे त्यांच्या कुटुंबियांच्या सुरक्षिततेसह जीवनमानही उंचावेल.
       या प्रकल्पासाठी स्थानिक प्रशासन, नगरपालिका, लोकप्रतिनिधी, पोलिस विभाग आणि नागरिक यांचा संयुक्त सहभाग लाभला आहे. प्रशासनाच्या विविध विभागांनी वेळोवेळी आवश्यक प्रस्ताव, नकाशे, भूखंड वर्गीकरण आदी प्रक्रिया तत्परतेने पूर्ण केल्या. यामुळे निधीच्या मंजुरीनंतर लगेचच भूमिपूजनासारखा कार्यक्रम आयोजित करता आला.                                 या भूमिपूजन समारंभास अनेक मान्यवरांची उपस्थिती लाभणार आहे. प्रमुख पाहुणे म्हणून आमदार किशोरआप्पा पाटील, जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, प्रांताधिकारी भूषण अहिरे, अप्पर पोलिस अधीक्षक कविताताई नेरकर, उपविभागीय पोलिस अधिकारी धनंजय येरुळे, तहसीलदार विजय बनसोडे, शिवसेनेचे जिल्हा प्रमुख रावसाहेब पाटील, बाजार समितीचे सभापती गणेश पाटील, माजी नगराध्यक्ष संजय गोहिल, नगर परिषद मुख्याधिकारी मंगेश देवरे, तसेच स्थानिक पोलिस निरीक्षक अशोक पवार यांचा समावेश आहे.
    या कार्यक्रमाच्या निमित्ताने नागरिकांना पोलिस प्रशासनाची नवीन दिशा आणि पुढील पिढीसाठी निर्माण होणारी सुविधा प्रत्यक्ष पाहण्याची संधी लाभणार आहे. प्रशासनाच्या वतीने सर्व नागरिकांना आवाहन करण्यात आले आहे की, या ऐतिहासिक भूमिपूजन सोहळ्यास आपली उपस्थिती नोंदवावी.
        शहराच्या सर्वांगीण विकासासाठी आमदार किशोरआप्पा पाटील यांनी केलेल्या प्रयत्नांचे हे आणखी एक फलित आहे. मागील काळात त्यांनी विविध विभागांकडे पाठपुरावा करून शहरासाठी रस्ते, वीज, पाणी, शिक्षण व आरोग्य सुविधा यामध्ये मोठी भर घातली आहे. पोलिस वसाहतीसाठी मंजूर झालेला २१ कोटींचा निधी ही त्यांच्या राजकीय दूरदृष्टीचे उदाहरण आहे.
       या प्रकल्पाच्या उभारणीमुळे पाचोऱ्यातील पोलिस यंत्रणा अधिक सक्षम, आधुनिक आणि जनतेच्या जवळ जाणारी होईल. सर्व घटकांमध्ये सुसंवाद वाढेल आणि कायदा-सुव्यवस्थेच्या दृष्टीने शहर अधिक सुरक्षित होईल. नागरिकांना विश्वास वाटेल की पोलिस फक्त नियंत्रण करणारी संस्था नसून, सेवा देणारी संस्था आहे.
      या भूमिपूजन सोहळ्याच्या निमित्ताने पाचोरा शहराच्या शासकीय यंत्रणेला आधुनिक रूप प्राप्त होणार असून, या विकासाच्या प्रवाहात सर्वसामान्यांचा सहभागही महत्त्वाचा ठरणार आहे. पोलिस दलाला नवा आधार आणि समाजाला नवा विश्वास देणाऱ्या या प्रकल्पाचे यशस्वी फलित भविष्यात आणखी प्रेरणादायी ठरणार आहे.

जगद्गुरू संत तुकाराम महाराज बीज निमित्त बांबरूड बुद्रुक येथे अखंड हरिनाम सप्ताहाचे भव्य आयोजन — वर्ष ३३ व्या किर्तन सप्ताहाला भक्तजनांचा उदंड प्रतिसाद अपेक्षित

0

Loading

भडगाव – तालुक्यातील एक धार्मिक, आध्यात्मिक आणि सांस्कृतिक दृष्टिकोनातून महत्त्वपूर्ण गाव म्हणजे बांबरूड बुद्रुक प्र.उ. तालुका भडगाव, जिल्हा जळगाव. येथे दरवर्षीप्रमाणे यंदाही जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज बीज निमित्त अखंड हरिनाम किर्तन सप्ताहाचे भव्य व भक्तिभावपूर्ण आयोजन करण्यात आले आहे. या पवित्र हरिनाम सप्ताहाचे यंदाचे हे सलग ३३वे वर्ष असून, दिनांक १६ मार्च २०२५ ते २३ मार्च २०२५ दरम्यान सप्ताहभर दररोज सकाळ-संध्याकाळ हरिनामाचा गजर बांबरूड बुद्रुक परिसरात निनादत राहणार आहे.
    या सप्ताहाचे आयोजन श्री लक्ष्मी नारायण भजनी मंडळ, ग्रामस्थ बांबरूड बुद्रुक यांच्यावतीने करण्यात आले असून, साधुसंतांचे आशीर्वाद, वैकुंठवासी मोठे बाबा आळंदी, तसेच वैकुंठवासी शंकर बाबा दहिवदकर यांचे पुण्यस्मरण या सप्ताहाच्या आध्यात्मिक बळाचे अधिष्ठान आहे. याशिवाय ह.भ.प. सावता महाराज मोहाडीकर यांचे कुशल मार्गदर्शन या सप्ताहाचे प्रमुख वैशिष्ट्य ठरणार आहे.
     सप्ताहाचे सर्व दिवस प्रख्यात आणि गोड वाणीतील कीर्तनकार, भाविकांमध्ये आध्यात्मिक चेतना जागवणारे कीर्तनकार आपली बहारदार हरिपाठ व कीर्तनाची सेवा अर्पण करणार आहेत. कीर्तनाचे वेळापत्रक पुढीलप्रमाणे आहे:
     १६ मार्च २०२५ (रविवार): सप्ताहाची भव्य सुरुवात ह.भ.प. साहिल महाराज कासार, तळेगाव यांच्या भक्तिमय कीर्तनाने होणार आहे. त्यांच्या सुस्वर वाणीतील हरिपाठ भाविकांना आध्यात्मिक उन्नतीकडे नेईल.
   १७ मार्च २०२५ (सोमवार): ह.भ.प. योगेश महाराज धामणगाव, ह.मु. पाचोरा यांचे प्रभावी कीर्तन. त्यांची कीर्तनशैली मनाला भिडणारी असून, अध्यात्मासोबतच सदाचाराचे महत्व सांगणारी आहे.
   १८ मार्च २०२५ (मंगळवार): सुप्रसिद्ध ह.भ.प. विनोद सम्राट नाना महाराज, दोंडाईचा यांचे जाज्वल्य कीर्तन अनुभवण्याची संधी. त्यांच्या कीर्तनांतून संत परंपरेचा ठसा आणि भक्तीचा सागर अनुभवता येतो.
     १९ मार्च २०२५ (बुधवार): भावभावनांचा सुरेल संगम करणारे ह.भ.प. स्वरगंधर्व कोमल महाराज पाटील, खेडी भोकरी यांचे भावपूर्ण कीर्तन होणार आहे. त्यांच्या सादरीकरणात भक्तिरसाची गोडी असते.
२० मार्च २०२५ (गुरुवार): दोन विभूतींचे कीर्तन अनुभवण्याची दुर्मीळ संधी:
ह.भ.प. ज्ञानेश्वर महाराज थोरकर, कंदानेकर
ह.भ.प. उमेश महाराज मोरफळकर या दोघांच्या कीर्तनातून गीता, भागवत व संत विचारांचे सखोल विवेचन होईल.
२२ मार्च २०२५ (शनिवार): सप्ताहाच्या शेवटच्या टप्प्यात आध्यात्मिक उंची वाढवणारे ह.भ.प. महामंडलेश्वर सूर्यभान महाराज शेळगावकर यांचे प्रभावी कीर्तन होणार असून, त्यांच्या अनुभवसंपन्न प्रवचनातून प्रत्येक श्रोत्याच्या जीवनात नवचैतन्य संचारेल.
२३ मार्च २०२५ (रविवार): सप्ताहाची सांगता ह.भ.प. ज्ञानेश्वर माऊली महाराज शेलुदकर यांच्या काल्याच्या कीर्तनाने सकाळी ९ ते ११ वाजेपर्यंत होणार आहे. या अंतिम दिवशी भक्तिभाव व भक्तांचे समर्पण आपल्या शिखरावर पोहोचेल.
       साप्ताहिक उत्सवाच्या समारोप दिवशी म्हणजेच २३ मार्च २०२५ रोजी, सकाळी १२ ते ३ या वेळेत महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. अनेक वर्षांची परंपरा लाभलेला हा महाप्रसाद सोहळा म्हणजे संपूर्ण पंचक्रोशीतील भक्तांसाठी एक भक्तीमय व सामाजिक एकात्मतेचे प्रतीक आहे.
     या सप्ताहामध्ये केवळ कीर्तन किंवा महाप्रसाद नव्हे, तर संपूर्ण ग्रामसमाजाची एकत्र येण्याची, संत विचारांमध्ये रंगून जाण्याची आणि जीवनात भक्ती व नितीमूल्यांची प्रचिती घेण्याची सुवर्णसंधी आहे.
     श्री लक्ष्मी नारायण भजनी मंडळ, ग्रामस्थ बांबरूड बुद्रुक, तसेच सर्व सहकारी मंडळींनी अत्यंत नियोजनबद्धपणे आणि भक्तिभावाने सप्ताहाच्या सर्व व्यवस्थांची आखणी केली आहे. प्रसाद व्यवस्थापन, सभामंडप सजावट, वीज व्यवस्था, स्वच्छता, श्रोत्यांच्या बसण्याची व्यवस्था आदी सर्व गोष्टींबाबत नियोजन अत्यंत आदर्शरित्या करण्यात आले आहे.
   या सप्ताहाच्या निमित्ताने संत तुकाराम महाराजांचे जीवनकार्य पुन्हा एकदा भाविकांच्या स्मरणात येते. त्यांच्या अभंगांतील सामाजिक जाण, भक्तीभाव, आत्मचिंतन आणि जनजागृतीचे संदेश आजच्या काळातही तितकेच प्रासंगिक आहेत.
    सप्ताहामध्ये अनेक कीर्तनकार त्यांच्या अभंगांद्वारे समाजप्रबोधन करणार असून, विशेषतः तरुण पिढीला हे कीर्तन एक नवा दिशा देण्यास सहाय्यक ठरेल.
    या भक्तिरसपूर्ण अखंड हरिनाम सप्ताहाचा लाभ घेण्यासाठी पंचक्रोशीतील तसेच दूरदूरच्या गावातील भाविक भक्तांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे सादर आवाहन बांबरूड बुद्रुक ग्रामस्थ, आयोजक मंडळ व श्री लक्ष्मी नारायण भजनी मंडळ यांच्यावतीने करण्यात आले आहे.
    या सप्ताहात सहभागी होणं म्हणजे केवळ एका कार्यक्रमात उपस्थित राहणं नव्हे, तर ते आपल्या आत्मिक प्रगतीचा एक टप्पा, संत परंपरेशी नातं दृढ करणारा एक सुंदर अनुभव आह

“माझा सातबारा, अद्यावत सातबारा” अभियानासाठी तालुकास्तरीय शिबिरांचे आयोजन – शेतकऱ्यांना मिळणार विविध सातबारा समस्यांवरील सुलभ आणि जलद सेवा

0

Loading

पाचोरा : शासन निर्णयानुसार क्षेत्रीय शासकीय व निमशासकीय कार्यालयांसाठी 100 दिवसांच्या कृती आराखड्याचे अनुषंगाने “माझा सातबारा, अद्यावत सातबारा” या अभियानांतर्गत पाचोरा तालुक्यात 11 मार्च 2025 ते 17 मार्च 2025 या कालावधीत विविध शेतकऱ्यांचे सातबारा/खातेदार/नागरिक यांचे अर्ज संबंधित ग्राम महसूल अधिकारी सजेवर स्विकारणारआहे. त्यानंतर अर्जांची कार्यवाही करून दिनांक 21 मार्च 2025 रोजी मंडळ कार्यालयाच्या ठिकाणी सकाळी 10.00 ते संध्याकाळी 5.00 वाजेपर्यंत बैठकीद्वारे शिबिर आयोजित करण्यात येणार आहे.
या अभियानाचा उद्देश शेतकऱ्यांना त्यांचे सातबारा उतारे अद्यावत करणे, त्यामध्ये आवश्यक असलेल्या नोंदी करणे, व विविध बाबींवरून शेतकऱ्यांना होणाऱ्या अडचणी दूर करणे हा आहे. शेतकऱ्यांची जमीन व त्यावर असलेल्या हक्काच्या नोंदी, वारस हक्क, बँक/सहकारी संस्था कर्ज, जुनी कालबाह्य नोंदी, चुकीच्या प्रविष्ठ्या यांसारख्या बाबी या मोहिमेद्वारे सोडवल्या जाणार आहेत.
या शिबिरांत पुढीलप्रमाणे अर्ज स्वीकारले जाणार आहेत :
1) ऍग्रीस्टॅग बाबत दिनांक 11/03/2025 ते 17/03/2025 या कालावधीमध्ये गावातील ज्या शेतकरी यांचे फार्मर आयडी तयार झालेले नाही अशा शेतकऱ्यांना गावातील सीएससी केंद्र चालक यांच्याकडे घेऊन जाऊन त्यांचे फार्मर आयडी तयार करणार आहे.
2) अपाक शेरा कमी करणे :- शेतकऱ्यांनी अपाक शेरा कमी करण्यासाठी अर्ज दिल्यास त्यासाठी आवश्यक कागदपत्रांसह फॉर्म भरावा लागेल. जसे की, व्यक्ती सध्या 18 वर्ष पूर्ण झालेली आहे किंवा शाळा सोडल्याचा दाखला, जन्मदाखला यांची प्रमाणित प्रत आवश्यक राहील. शेरा मध्ये बदल नोंदवून जमीन हक्क अद्यावत केला जाईल.
3) एकूक/एकूमॅ कमी करणे :- 7/12 उताऱ्यावर ‘एकूक/एकुमॅ’ असे उल्लेख असल्यास ते काढून टाकण्यासाठी अर्ज आवश्यक आहे. यासाठी संबंधित शेतकऱ्यांनी एकूक/एकूमॅ काढण्याच्या विनंतीसाठी पुरावे जोडून अर्ज करावा लागेल. अनेकदा ही नोंद जुनी असून अद्यावत होणे आवश्यक असते.
4) इतर अधिकारातील बँकांच्या/बोजाच्या/जुना नोंदी कमी करणे :- शेतकऱ्यांच्या 7/12 उताऱ्यावर अनेकदा जुन्या बँकांची कर्जाची नोंद असते, जी कर्जफेडीनंतरही तशीच राहते. या बाबी दूर करण्यासाठी संबंधित बँकेचे प्रमाणपत्र, कर्जफेडीचा दाखला सादर करणे गरजेचे आहे. शेतकऱ्यांनी आपले अर्ज तयार ठेवून कर्जफेड प्रमाणपत्र, बँकेच्या अधिकार्‍यांची स्वाक्षरी असलेली नोंद, संस्थेची कागदपत्रे संलग्न करावी.
5) इतर अधिकारातील कालबाह्य नोंदी कमी करणे :- शेतकऱ्यांच्या 7/12 उताऱ्यांवर अनेकदा जुने, कालबाह्य हक्क असतात. जसे की इतर व्यक्तींची नावं, जुने तक्रारी, स्थगिती आदेश वगैरे. अशा नोंदी काढण्यासाठी अर्जदाराने स्पष्ट माहिती देऊन अर्ज करणे आवश्यक आहे. या अर्जासोबत संस्थेचे प्रमाणपत्र आवश्यक राहते.
या सर्व प्रकारातील अर्ज स्वीकारण्याची तारीख 11 मार्च 2025 ते 17 मार्च 2025 ही असून, 21 मार्च 2025 रोजी मंडळ कार्यालयात विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरात तलाठी, मंडळ अधिकारी, उपस्थित राहणार असून, शेतकऱ्यांच्या अर्जांवर तात्काळ कार्यवाही करून त्यांना अद्यावत सातबारा मिळवून देण्यात येईल.
या मोहिमेत नागरिकांना थेट सहभाग घेता येणार असून, त्यांना सातबारा संदर्भात कुठल्याही अडचणी असल्यास या शिबिराचा लाभ घेता येईल. शेतकऱ्यांनी व नागरिकांनी अर्जासह आवश्यक कागदपत्रे सादर करून आपली नोंद प्रक्रिया पूर्ण करावी.
या योजनेचा मुख्य हेतू म्हणजे महसूल नोंदींच्या प्रक्रियेत पारदर्शकता आणि सुसूत्रता आणणे. त्यामुळे शेतकऱ्यांची विविध शासकीय योजनांमधील पात्रता स्पष्ट होईल, कर्ज प्रकरणे सुरळीत होतील आणि जमीन मालकीबाबतचा वादही टळतील.
या अभियानाद्वारे प्रशासन आणि नागरिक यांच्यातील सुसंवाद वाढवण्याचा प्रयत्न आहे. यामध्ये प्रत्येक तलाठी मंडळाने एक दिवस राखून शिबिर राबवायचे आहे, जेणेकरून सर्वच अर्जदारांना आपली कामे सोप्या पद्धतीने पार पडतील.
पाचोरा तहसीलदार विजय बनसोडे यांनी याबाबत संपूर्ण नियोजन केले असून, मंडळ कार्यालयात प्रत्येक अर्जाची नोंद, छाननी आणि निपटारा करण्यात येईल.
सदर शिबिर ही एक सुवर्णसंधी असून, शेतकऱ्यांनी वेळेत अर्ज सादर करून शिबिरात सहभागी व्हावे व आपले सातबारा उतारे अद्यावत करून घ्यावेत.शेतकऱ्यांनी या शिबिराचा पूर्ण लाभ घ्यावा, असे आवाहन महसूल विभागामार्फत करण्यात आले आहे.

धर्माआबा राजपूत – एक आदर्श सामाजिक नेतृत्व

0

Loading

समाजात काही व्यक्ती असतात, ज्या केवळ यशस्वी उद्योजक म्हणून नव्हे, तर त्यांच्या कर्मशीलतेने, समाजाभिमुख दृष्टिकोनाने आणि निस्वार्थ सेवेच्या वृत्तीने समाजाच्या हृदयात स्थान मिळवतात. त्यांची ओळख ही राजकीय पदांपेक्षा मोठी असते आणि त्यांचे कार्य समाजाच्या असंख्य गरजांचे उत्तर ठरते. पाचोरा तालुक्यातील पद्माई कन्स्ट्रक्शनचे संस्थापक धर्माआबा राजपूत हे अशा व्यक्तिमत्त्वांचे सर्वोत्तम उदाहरण ठरतात. त्यांनी आपल्या यशस्वी व्यावसायिक कारकिर्दीबरोबरच सामाजिक नेतृत्वाचे एक जिवंत आणि आदर्श प्रतिमान समाजासमोर उभे केले आहे.
        धर्माआबांचे जीवन म्हणजे मूल्यांची सजीव साक्षात्कृती. त्यांच्या व्यक्तिमत्त्वाची पायाभरणी झाली ती त्यांच्या वडिलांच्या आणि मातोश्रीच्या सुसंस्कारांमधून. वडील स्व.हरसिंग धुडकू ठाकरे यांनी

आयुष्यभर समाजसेवा, परिश्रम आणि सत्यतेचा मार्ग आचरला, तर मातोश्री हिरकोरआई यांनी घरातील प्रत्येकाला निःस्वार्थ सेवा, सहकार्य आणि माणुसकीचे महत्त्व शिकवले. याच पार्श्वभूमीवर घडलेले धर्माआबा आज समाजासाठी एक प्रेरणादायी दीपस्तंभ ठरले आहेत.
     त्यांच्या जीवनशैलीत एक विशेष आकर्षण म्हणजे साधेपणा आणि सर्वसामान्यांप्रती आत्मियता. त्यांच्या व्यक्तिमत्त्वात अभिमानाचा लवलेशही नाही. कोणत्याही कार्यक्रमात अगदी सामान्य पातळीवर राहून, सर्वांशी संवाद साधणाऱ्या धर्माआबांचे हे वर्तनच त्यांना समाजात अत्यंत आपलेसे बनवते.
    व्यवसायात त्यांनी पद्माई कन्स्ट्रक्शन या नावाचा उल्लेखनीय ब्रँड निर्माण केला आहे. गुणवत्तापूर्ण काम, वेळेची शिस्त आणि आर्थिक प्रामाणिकता यामुळे त्यांचा व्यवसाय विश्वासार्हतेचा मानदंड बनला आहे. पण याहून महत्त्वाचे म्हणजे त्यांनी या यशातून समाजासाठी काही करण्याची जबाबदारी घेतली आहे. त्यांच्या दैनंदिन जीवनाचा भाग असलेले सामाजिक उपक्रम हे केवळ सेवा नव्हे, तर त्यांच्या जीवनाचा एक धर्म आहे.
      ते म्हणतात, “जेवढे मिळते त्यातून काही समाजासाठी राखून ठेवले पाहिजे, कारण समाजच आपल्याला उभं करतो.” ही विचारधारा त्यांच्या प्रत्येक कृतीत दिसून येते. त्यांनी केवळ निधी उभारून मदत केली नाही, तर समाजाची गरज ओळखून त्यावर दीर्घकालीन उपाययोजना सुरू केल्या.
     धर्माआबा यांनी विविध सामाजिक क्षेत्रांत आपले योगदान दिले आहे. त्यांची सामाजिक बांधिलकी हे त्यांच्या नेतृत्वाचे वैशिष्ट्य ठरते.
गरीब विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक साहित्य वाटप
शाळांमध्ये पाण्याच्या टाक्या, स्वच्छतागृहांची उभारणी
आरोग्य तपासणी शिबिरे आणि रक्तदान शिबिरांचे आयोजन
स्वच्छता मोहिमा व पर्यावरण संरक्षण कार्यक्रम
गरीब मुलींच्या विवाहासाठी आर्थिक सहाय्य
अंत्यविधीसाठी गरजू कुटुंबांना मदत
मंदिरांचे विकासकाम आणि धार्मिक उत्सवांत सहकार्य
महिला मंडळांना स्वयंरोजगारासाठी प्रोत्साहन
   हे सर्व उपक्रम त्यांनी स्वतः पुढाकार घेऊन, लोकसहभागातून राबवले आहेत.
  बांबरुड महादेव येथे पार पडलेला अखंड हरिनाम सप्ताह हा धर्माआबांच्या सामाजिक नेतृत्वाचा एक सर्वोत्तम नमुना ठरला. या धार्मिक कार्यक्रमात त्यांनी केवळ आर्थिक सहाय्य दिले नाही, तर एक वेगळा सामाजिक संदेश दिला. त्यांनी आपल्या वडिलांच्या स्मृतीप्रित्यर्थ, गरिब मुलींच्या विवाहासाठी ११ हजार रुपये, आणि गरजू कुटुंबांच्या अंत्यविधी खर्चाची जबाबदारी घेतली.
    हा निर्णय समाजात नवा आदर्श निर्माण करणारा ठरला. ही घोषणा करताना सभागृहातील प्रत्येक भाविक भावविवश झाला. त्यांच्या मदतीमागे केवळ प्रसिद्धी नव्हती, तर समाजाचे दुःख समजून घेण्याची अंतःकरणी भावना होती.
    या सप्ताहात सहभागी झालेले कीर्तनकार, प्रवचनकार आणि गायनाचार्य यांनी कीर्तनांमधून समाजप्रबोधन केले. व्यसनमुक्ती, स्त्रीसन्मान, बालविवाह प्रतिबंध, शिक्षणाचे महत्त्व, आणि पर्यावरण संवर्धन या विषयांवर प्रभावी विचार मांडण्यात आले. धर्माआबांनी स्वतःही या सर्व उपक्रमांना सक्रिय पाठींबा दिला. त्यांनी दाखवून दिलं की धर्म हा केवळ पूजा नाही, तर समाजासाठी सेवा करणं हाच खरा धर्म आहे.
     धर्माआबा राजपूत यांना गावकऱ्यांनी केवळ दाता म्हणून नाही, तर एक ‘अंगाचा आधार’ मानले आहे. गावातील प्रत्येक थरातील व्यक्ती त्यांच्यावर आपुलकीने विश्वास ठेवतो. त्यांच्या कामगिरीमुळे गावातील सामाजिक वातावरण समृद्ध झालं आहे.
     गावातील एक ज्येष्ठ नागरिक म्हणतात: “धर्माआबा म्हणजे गावाचा आधारस्तंभ. त्यांची उभारी म्हणजे गावाचं भाग्य आहे.”
      गावाचे सरपंच मंदाकिनीताई पाटील “महिलांना आत्मनिर्भर करण्यासाठी त्यांनी दिलेले मार्गदर्शन आम्हाला रोज प्रेरणा देतं.”
     धर्माआबांचे जीवन हे तरुण पिढीसाठी एक मार्गदर्शन परिपाठ आहे. त्यांनी दाखवून दिलं की, यश मिळवायचं असेल तर प्रामाणिक श्रम आणि सामाजिक उत्तरदायित्व एकत्र असावं लागतं. त्यांच्या साधेपणातही एक तेज आहे, आणि त्यांच्या वर्तनातही एक कृतीशील संदेश असतो.
   धर्माआबा राजपूत हे आमदार किशोर आप्पा पाटील यांचे निकटवर्तीय असून, त्यांच्या कार्यशैलीतील सामाजिक जाणिवा व दूरदृष्टी या आमदार साहेबांच्या नेतृत्वाला समर्पक अशा आहेत. अशा सहकाऱ्यांच्या माध्यमातून आमदार साहेबांच्या जनतेशी नातं अधिक घट्ट होत आहे. धर्माआबांसारखी मूल्यनिष्ठ आणि लोकाभिमुख व्यक्ती आपल्या सोबत आहे, ही बाब आमदार साहेबांसाठीही एक गौरव आहे.
     धर्माआबा राजपूत यांचे कार्य हे समाजासाठी एक प्रेरणादायी यशकथा आहे. त्यांनी केवळ सामाजिक मदतीची वाट दाखवली नाही, तर समाजासाठी आपण काय करू शकतो याची उत्तम शिकवण दिली आहे. त्यांच्या कार्यामुळे पिढ्यानपिढ्या प्रेरणा घेणारी एक नेतृत्व परंपरा निर्माण झाली आहे.
   अशा नेतृत्वाची गरज केवळ पाचोरा तालुक्याला नाही, तर संपूर्ण देशाला आहे. आजच्या काळात धर्माआबांसारख्या नेतृत्वातूनच समाजात खरे परिवर्तन घडू शकते. त्यांचा आदर्श आणि आमदार किशोर आप्पा पाटील यांचे मार्गदर्शन यामुळे पाचोरा तालुका हे सामाजिक प्रगतीचे उदाहरण बनत आहे.

बांबरुड महादेव येथे अखंड हरिनाम सप्ताह उत्साहात संपन्न – धर्माआबा राजपूत यांची सामाजिक जाणिवेची प्रेरणादायी घोषणा – गावाचा & आमदार किशोरआप्पा यांचा अभिमान वाढवणारे व्यक्तिमत्त्व

0

Loading

पाचोरा – तालुक्यातील पवित्र बांबरुड महादेव मंदिर प्रांगणात तब्बल 24 वर्षा पासुन अखंड सुरू असलेला हा कार्यक्रम यावर्षीही महाशिवरात्रीच्या निमित्ताने अखंड हरिनाम सप्ताह साजरा झाला. अध्यात्म आणि सामाजिक बांधिलकीचा सुंदर संगम ठरलेला हा कार्यक्रम केवळ धार्मिक उत्सव न राहता, एक सामाजिक चळवळ बनत चालल्याचे चित्र यंदा विशेष ठळकपणे दिसून आले.
सप्ताहाच्या उद्घाटनापासून समारोपा पर्यंत प्रत्येक दिवशी अध्यात्मिक उत्साह व भक्तिभाव वातावरणात अनुभवायला मिळाला. भल्या पहाटेपासून रात्रीपर्यंत अखंड हरिपाठ, कीर्तन, भजन, प्रवचन यांमधून गावकरी आणि पंचक्रोशीतील भाविक एकवटले.
सप्ताहात सहभागी कीर्तनकारांनी फक्त धार्मिक गोष्टी सांगून थांबले नाहीत, तर सामाजिक विषमता, कन्यादानाचे महत्त्व, व्यसनमुक्ती, नारीशक्तीचा सन्मान यासारखे महत्त्वाचे विषय आपल्या

कीर्तनातून प्रभावीपणे मांडले.
‘नातं देवाशी जोडलं की माणूस माणसाशी जोडतो’ – सरजेराव महाराज विसरणेकर
‘स्त्री ही शक्ती आहे, तिला शिक्षण, सन्मान व स्वावलंबन मिळालं पाहिजे’ – विकास महाराज मोरफडकर
‘दान हे देण्याच्या भावनेत असावे, प्रसिद्धीच्या हव्यासात नव्हे’ – विशाल महाराज बोरनार
‘मृत्यूनंतरही आपण इतरांसाठी उपयोगी ठरतो, हेच खरं जीवनमूल्य’ – योगेश महाराज चिंचोलीकर
हा कार्यक्रम मनाच्या तारा छेडणारा असल्याची जाणीव झाली त्यामुळे
कार्यक्रमात सहभागी झालेल्या काही भाविकांनी आपल्या भावना व्यक्त करतांना
भाऊसाहेब पाटील बांबरुड यांनी सांगीतले “दरवर्षी येतो, पण यंदाचा सप्ताह अधिक भावस्पर्शी झाला. धर्माआबा यांची घोषणा ऐकून डोळे पाणावले.”
बांबरुडगावाचे सरपंच मंदाकिनी पाटील “अशा कीर्तनातून केवळ भक्ती नव्हे, तर शिकण्यासारखे खूप काही मिळते.”
“धर्माच्या नावाने एकत्र येणाऱ्या लोकांनी समाजासाठी एकत्र काम करावे, हेच खरे धर्म.”असे सांगितले
तसेच मागील वर्षाचे थंडीचे मानकरी धर्माआबा राजपूत – पद्माई कन्स्ट्रक्शनचे संस्थापक, सामाजिक जाणिवेने परिपूर्ण व्यक्तिमत्त्व, आमदार किशोरआप्पा यांचे निकटवर्तीय. त्यांचा साधेपणा, कार्यकुशलता आणि समाजाबद्दलची आंतरिक बांधिलकी यामुळे त्यांचं नाव सर्वसामान्यांच्या मनात आदराने घेतलं जातं.
त्यांनी आपल्या वडील पिताश्री स्व. धर्मसिंग हरसिंग राजपूत आणि मातोश्री गं.भा.हिरकोरआई यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ सामाजिक मदतीचा अभिनव उपक्रम जाहीर केला. त्यांनी गरजू मुलींच्या लग्नासाठी ११ हजार रुपयांची मदत देण्याची आणि गरीब कुटुंबातील अंत्यविधी खर्चाची जबाबदारी स्वतःवर घेण्याची घोषणा करताच, परिसरात एक आदर्श निर्माण झाला.
“ही केवळ आर्थिक मदत नाही, ही आमच्या संस्कृतीची जबाबदारी आहे. आपण समाजाने दिलेले परत द्यावे लागते – त्याच भावनेतून ही मदत सुरू केली आहे. हे कार्य मी माझ्या मातापित्यांच्या स्मरणार्थ करतो.” असेही धर्माआबा यांनी सांगितले
गावकरी, कार्यक्रमाचे संयोजक आणि भाविक यांच्यात एकच भावना ठळक दिसून आली – ‘धर्माआबा यांच्यासारखा माणूस आमच्या गावात आहे, ही आमची ताकद आहे.’ याच कार्यक्रमामुळे धर्माआबा राजपूत यांचे नाव फक्त एका यशस्वी उद्योजकाचे नाही, तर समाजासाठी समर्पित व्यक्तीमत्त्व म्हणून उजळून आले आहे. त्यांच्या कार्याने आमदार किशोरआप्पा यांचे नेतृत्व अधिक सशक्त झाले असून, अशा सहकार्यांच्या माध्यमातूनच गावात सकारात्मक परिवर्तन घडत आहे.
कार्यक्रमाच्या समारोपाला सर्वांनी एकमुखाने असे कार्यक्रम दरवर्षी वाढत्या प्रमाणात आयोजित करावेत, सामाजिक उपक्रमांची व्याप्ती वाढावी आणि गावाच्या प्रगतीसाठी एकत्र काम करावे, असे मत धर्मा आबा यांनी व्यक्त केले.
बांबरुड महादेव येथे पार पडलेला हा अखंड हरिनाम सप्ताह अध्यात्म, समाजसेवा आणि एकतेचे प्रतीक ठरला. धर्माआबा राजपूत यांची समाजाभिमुख घोषणा ही या कार्यक्रमाची आत्मा ठरली. यामुळे गावाचा गौरव वाढला, आमदार किशोरआप्पा यांचे सामाजिक भान अधोरेखित झाले आणि संपूर्ण पंचक्रोशीत एक प्रेरणादायी उदाहरण निर्माण झाले.

भारताचा ऐतिहासिक विजय: २०२५ चॅम्पियन्स ट्रॉफीचे विजेतेपद पटकावत इतिहास रचला!

0

Loading

मुंबई  (गुरुदत्त वाकदेकर) : भारतीय क्रिकेट संघाने आपल्या अप्रतिम कामगिरीने न्यूझीलंडवर ४ गडी राखून विजय मिळवत २०२५ आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली. या विजयासह भारताने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये वर्चस्व प्रस्थापित करत गेल्या ८ महिन्यांत दुसरे मोठे आयसीसी विजेतेपद पटकावले आहे.
*सामन्याच्या ठळक घडामोडी:-*     न्यूझीलंड: २५१/७ (५०)
भारत: २५४/६ (४९)
भारत ४ गडी राखून विजयी
रोहित शर्मा (७६) आणि शुभमन गिल (३१) यांनी दमदार सलामी दिली, १७ व्या षटकात १०० धावांची भागीदारी पूर्ण.
श्रेयर अय्यर (४८) आणि अक्षर पटेल (२९) यांनी मधल्या फळीत संघाला सावरले.
के. एल. राहुल (३४) आणि रवींद्र जडेजा (१२) यांनी संयमी खेळी करत भारताला विजय मिळवून दिला.
न्यूझीलंडकडून मायकल ब्रेसवेल (५०), डॅरिल मिचेल (६३) आणि ग्लेन फिलिप्स (३४) यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले.
कुलदीप यादव आणि वरुण चक्रवर्तीने प्रत्येकी २ बळी घेत न्यूझीलंडला २५१ धावांवर रोखले.
रोहित शर्माने ४१ चेंडूत अर्धशतक पूर्ण करत आक्रमक सुरुवात दिली.
कर्णधार रोहित शर्माने ८३ चेंडूत ७६ धावांची जबरदस्त खेळी केली.
श्रेयर अय्यर अर्धशतकापासून अवघ्या २ धावांनी मुकला.
के. एल. राहुल आणि रवींद्र जडेजाने शेवटपर्यंत धीरगंभीर फलंदाजी करत भारताचा विजय निश्चित केला.
रवींद्र जडेजाने विजयी चौकार लगावत भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.
*पुरस्कार व विक्रम:-*
सामनावीर : रोहित शर्मा (७६ धावा)
स्पर्धावीर : रचिन रवींद्र (महत्त्वपूर्ण अष्टपैलू योगदान)
भारताने २०१३ नंतर दुसऱ्यांदा चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली.
भारताचा आयसीसी स्पर्धांमध्ये न्यूझीलंडविरुद्धचा पहिला अंतिम फेरीतील विजय.
भारताने २०२४ टी२० विश्वचषक जिंकल्यानंतर २०२५ चॅम्पियन्स ट्रॉफीही जिंकली – एका वर्षात दोन आयसीसी विजेतेपदे.
भारत-न्यूझीलंड यांच्यात आजवर ११९ सामने झाले आहेत. त्यापैकी ६१ सामने भारताने तर ५० सामने न्यूझीलंडने जिंकले आहेत. एक सामना बरोबरीत सुटला तर ७ सामन्यांचे निकाल लागले नाहीत.
विजयानंतर संपूर्ण भारतीय संघाने मैदानावर आनंदोत्सव साजरा केला.
बीसीसीआय सचिव जय शाह यांनी रोहित शर्माच्या हाती चॅम्पियन्स ट्रॉफी सुपूर्द केली.
संघाने पारंपरिक “लॅप ऑफ ऑनर” घेत चाहत्यांचे आभार मानले.
भारतीय खेळाडूंनी “वुई आर द चॅम्पियन्स” गाण्यावर ड्रेसिंग रूममध्ये जल्लोष केला.
रोहित शर्मा (भारताचा कर्णधार): “ही एक अविस्मरणीय वेळ आहे. संपूर्ण संघाने योगदान दिले आणि आमच्या गोलंदाजांनी सामन्यातील महत्त्वाचे क्षण निर्माण केले. भारतीय चाहत्यांसाठी हा विजय आहे!”
मिचेल सॅंटनर (न्यूझीलंड कर्णधार): “आम्ही चांगली लढत दिली, पण भारताचा संघ अधिक चांगला खेळला. पुढच्या स्पर्धेत पुनरागमन करण्याचा आम्ही प्रयत्न करू.”
भारताने हा ऐतिहासिक विजय मिळवत आपले आयसीसी स्पर्धांतील वर्चस्व पुन्हा सिद्ध केले. न्यूझीलंडने दिलेल्या आव्हानाला समर्थपणे सामोरे जात, भारताने दमदार कामगिरी केली. आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ च्या विजेतेपदाने भारताचा क्रिकेटमधील सुवर्णकाळ सुरू असल्याचे स्पष्ट झाले!

गणेश गल्ली चौक परिसरात भव्य स्वच्छता मोहीम – नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग

0

Loading

मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : गणेश गल्ली चौक परिसरात वाढता कचरा, दुर्गंधी, डासांचा प्रादुर्भाव आणि साथीचे रोग या समस्यांवर उपाय म्हणून ८ मार्च रोजी सकाळी १० वाजता भव्य स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. या मोहिमेला नागरिकांसह महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

या मोहिमेद्वारे कचऱ्याचे ढीग हटवण्यात आले, रस्त्यावरील खड्डे बुजवण्यात आले आणि डासांची उत्पत्ती होणाऱ्या ठिकाणांची विशेष स्वच्छता करण्यात आली. स्थानिक रहिवासी, सामाजिक कार्यकर्ते आणि महानगरपालिका कर्मचाऱ्यांनी या मोहिमेत सक्रिय सहभाग घेतला.

या अभियानात सहाय्यक अभियंता श्रीकांत राठोड, राजेश गोसावी (सुपरवायझर, एस डब्ल्यू एम), पूजा साटम (ज्युनिअर सुपरवायझर, एस डब्ल्यू एम), महेंद्र मारू (मुकादम, एस डब्ल्यू एम – मेंटेनन्स), जितेंद्र साळुंखे (पीसीओ), रवींद्र जिमन, श्री. कांबळे आणि लालबाग विभागातील कचरा व्यवस्थापन कर्मचारी यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले.

महिला दिनाचे औचित्य साधून ८ मार्च रोजीही परिसरात विशेष स्वच्छता उपक्रम राबवण्यात आला. या उपक्रमात महिलांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला आणि परिसर स्वच्छतेचा संदेश दिला.

या मोहिमेच्या यशस्वी आयोजनासाठी महेंद्र मंदाकिनी जगन्नाथ तावडे (प्रशासन व उपाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, दक्षिण मुंबई जिल्हा) यांनी विशेष पुढाकार घेतला. “परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी ही मोहीम केवळ एक दिवसापुरती मर्यादित न राहता सातत्याने राबवली जावी,” असे मत त्यांनी व्यक्त केले. या अभियानामुळे गणेश गल्ली चौक परिसर अधिक स्वच्छ आणि आरोग्यदायी झाला असून, नागरिकांनी परिसर स्वच्छ ठेवण्याचा संकल्प केला आहे.

ताज्या बातम्या

error: Content is protected !!