Home Blog Page 22

आज दि.05/01/2026 चे सर्व राशीचे भविष्य व शुभ अंक व रंग

0

Loading

मेष-आज आत्मविश्वास वाढलेला राहील व कामात गती येईल. प्रलंबित कामे पूर्ण होण्याची शक्यता आहे. आर्थिक व्यवहारात स्पष्टता ठेवा. कुटुंबाचा पाठिंबा मिळेल.
शुभ अंक: 9 | शुभ रंग: गडद लाल

वृषभ-आज संयम आणि स्थिरता महत्त्वाची ठरेल. कामाच्या ठिकाणी जबाबदाऱ्या वाढू शकतात. खर्चावर नियंत्रण ठेवल्यास फायदा होईल. आरोग्याकडे लक्ष द्या.
शुभ अंक: 6 | शुभ रंग: हिरवट तपकिरी

मिथुन-संवादातून आज महत्त्वाची कामे साध्य होतील. नवीन ओळखी उपयुक्त ठरतील. प्रवास किंवा बैठकीचे योग आहेत. वेळेचे नियोजन आवश्यक आहे.
शुभ अंक: 5 | शुभ रंग: फिकट पिवळा

कर्क-घरगुती बाबींवर लक्ष द्यावे लागेल. भावनिक निर्णय टाळावेत. आर्थिक बाबतीत स्थैर्य येईल. विश्रांतीसाठी वेळ काढा.
शुभ अंक: 2 | शुभ रंग: शुभ्र

सिंह-आज नेतृत्वगुण प्रकट होतील. कामाच्या ठिकाणी मान-सन्मान मिळण्याची शक्यता आहे. अहंकार टाळल्यास संबंध सुधारतील. संधी ओळखा.
शुभ अंक: 1 | शुभ रंग: सोनेरी

कन्या-कामात बारकावे महत्त्वाचे ठरतील. सहकाऱ्यांचे सहकार्य मिळेल. आरोग्याच्या दृष्टीने दिनचर्या सांभाळा. खर्च मर्यादेत ठेवा.
शुभ अंक: 4 | शुभ रंग: निळसर हिरवा

तुळ -आज समतोल राखणे आवश्यक आहे. भागीदारीतील निर्णय चर्चेतून घ्या. खर्च वाढू शकतो म्हणून नियंत्रण ठेवा. नातेसंबंधात स्पष्टता ठेवा.
शुभ अंक: 7 | शुभ रंग: फिकट निळा

वृश्चिक-आज धैर्य आणि आत्मविश्वास वाढेल. गुप्त योजना यशस्वी होऊ शकतात. वाद टाळल्यास फायदा होईल. संयम आवश्यक आहे.
शुभ अंक: 8 | शुभ रंग: गडद मरून

धनु -नवीन विचार व योजना पुढे येतील. शिक्षण व प्रवासासाठी दिवस अनुकूल आहे. उत्साह जास्त राहील. खर्चावर नियंत्रण ठेवा.
शुभ अंक: 3 | शुभ रंग: जांभळा

मकर-कामाचा ताण जाणवला तरी प्रगती दिसेल. वरिष्ठांचे सहकार्य मिळेल. आर्थिक स्थैर्य मजबूत होईल. सातत्य ठेवा.
शुभ अंक: 10 | शुभ रंग: करडा

कुंभ -नवीन संपर्क लाभदायक ठरतील. सामाजिक कामात सहभाग वाढेल. मित्रांचा पाठिंबा मिळेल. आर्थिक निर्णय विचारपूर्वक घ्या.
शुभ अंक: 11 | शुभ रंग: निळसर करडा

मीन-आज मन शांत ठेवणे गरजेचे आहे. आध्यात्मिक विचार वाढतील. कुटुंबाचा आधार मिळेल. आर्थिक बाबतीत सावधपणा ठेवा.
शुभ अंक: 12 | शुभ रंग: फिकट समुद्री हिरवा

वाचकांनी वरील भविष्यवाणीचा अर्थ अचूक भविष्यवाणी म्हणून लावता केवळ आत्मपरीक्षण आणि सकारात्मक प्रेरणा म्हणून घ्यावा.

पत्रकारदिनी गर्दी, पुरस्कारांची बाजारपेठ आणि पोटभरू पत्रकारितेचा उघडा चेहरा

0

Loading

६ जानेवारी आला की पत्रकारितेचे तथाकथित उत्सव सुरू होतात. शुभेच्छांचे फलक, सोशल मीडियावर फोटो, एकमेकांवर कौतुकाचा वर्षाव आणि अचानक उगवलेली पत्रकारांची गर्दी—हे दृश्य आता नवीन राहिलेले नाही. वर्षभर बातम्यांत दिसणारी नावे मोजकीच असतात; पण पत्रकारदिनी आणि पाकीटे वाटप प्रसंगी मात्र पत्रकारांची संख्या दुपटीने-तिपटीने वाढल्यासारखी भासते. हे केवळ हास्यास्पद नाही, तर पत्रकारितेच्या मुळावर घाव घालणारे वास्तव आहे. आजची कटू वस्तुस्थिती अशी आहे की अनेक ठिकाणी बातम्या केवळ १० ते १५ ठराविक लोकांच्याच नावावर सातत्याने लागतात. उर्वरित अनेक जण वर्षभर कुठेच नसतात. मात्र दीपावली भेट, पाकीट वाटप, सत्कार समारंभ किंवा पत्रकार दिन आला की हेच चेहरे पत्रकार म्हणून पुढे येतात. पत्रकारिता ही जबाबदारी नसून संधी असल्यासारखी वागणूक दिली जाते. पत्रकारिता हा व्यवसाय नसून समाजसेवा असल्याचे आपण वर्षानुवर्षे सांगतो. पण प्रत्यक्षात अनेक ठिकाणी पत्रकारदिन , दिवाळी, पाकीट वाटप प्रसंगी पत्रकार जन्माला येतात. वर्षभर सामान्य माणसाचे प्रश्न, शेतकऱ्यांचे दु:ख, कामगारांचे हाल, महिलांवरील अन्याय, प्रशासनातील भ्रष्टाचार याकडे दुर्लक्ष करणारे काही लोक ६ जानेवारीला & भेट वस्तु वाटप प्रसंगी मात्र व्यासपीठावर झळकतात. भाषणे करतात, सन्मान स्वीकारतात आणि दुसऱ्या दिवशी पुन्हा अदृश्य होतात. खरे पत्रकार ऊन-पावसाची पर्वा न करता बातमीसाठी उभे राहतात. धमक्या, दबाव, आर्थिक अडचणी, अपमान सहन करूनही सत्य मांडतात. पण त्यांची संख्या मर्यादित असताना, पोटभरू प्रवृत्तीची गर्दी वाढत चालली आहे. पत्रकारिता आता ओळखपत्र, प्रेस कार्ड, वाहनावरील स्टिकर किंवा सोशल मीडियावरील डीपीपुरती मर्यादित होत चालली आहे. या सगळ्यात सर्वात गंभीर आणि लाजीरवाणी बाब म्हणजे पत्रकारांच्या नावावर किंवा पत्रकार संघटनांच्या नावावर लायकी नसलेल्या व्यक्तींची पुरस्कार देणाऱ्यांची—खरे तर विकणाऱ्यांची—संख्या वाढत चालली आहे. पत्रकारितेशी काहीही संबंध नसलेले, समाजासाठी शून्य योगदान असलेले लोक केवळ पैशांच्या जोरावर किंवा ओळखीच्या आधारे पुरस्कार मिळवतात. हे पुरस्कार सन्मानाचे नसून व्यवहाराचे साधन बनले आहेत. जे पुरस्कार खऱ्या पत्रकारांच्या मेहनतीसाठी असायला हवेत, ते आज बाजारात विक्रीस ठेवलेल्या वस्तूसारखे वाटू लागले आहेत. यामुळे प्रामाणिक पत्रकारांचा अपमान तर होतोच, पण समाजाच्या नजरेत पत्रकारितेची किंमतही घसरते. “हा पण पत्रकार?” असा प्रश्न सामान्य माणसाच्या मनात निर्माण होतो आणि हीच पत्रकारितेची सर्वात मोठी शोकांतिका आहे. यात भर म्हणून ‘ब्रेकिंग’च्या नावाखाली सुरू असलेली भंपक पत्रकारिता. अर्धवट माहिती, अप्रमाणित बातम्या, अफवा आणि केवळ प्रसिद्धीसाठी दिलेले ब्रेकिंग—यामुळे पत्रकारितेचा दर्जा रसातळाला गेला आहे. बातमीची खातरजमा, भाषेची शुद्धता, शिक्षणाची कमी या आशयाची जबाबदारी यांचा विचारच केला जात नाही. अनेकांना शुद्ध मराठी बोलता किंवा लिहिता येत नाही; तरीही पत्रकार असल्याचा आव आणला जातो. भाषा ही विचारांची शिस्त असते. जिथे भाषा गंडते, तिथे विचारही गंडतात. अशा अपुऱ्या भाषिक क्षमतेसह समाजाला दिशा देण्याचा दावा करणारी पत्रकारिता ही दिशाभूल करणारी ठरते. पत्रकार दिन हा केवळ शुभेच्छा, फोटोसेशन आणि सत्कारांचा दिवस नसावा. तो आत्मपरीक्षणाचा दिवस असायला हवा. आपण वर्षभर काय केले? कुणासाठी उभे राहिलो? कुणाचा आवाज बनलो? सत्तेला प्रश्न विचारले का, की सोयीसाठी गप्प बसलो? या प्रश्नांची प्रामाणिक उत्तरे शोधली गेली, तरच पत्रकारितेचा आत्मा जिवंत राहील. खऱ्या पत्रकारांना ओळख देण्याचा, बनावट पत्रकार, पुरस्कारविक्रेते आणि पोटभरू प्रवृत्तीला आरसा दाखवण्याचा हा दिवस ठरायला हवा. अन्यथा पत्रकारदिनी, दीपावली भेटीच्या वेळी किंवा पाकीट वाटपाच्या प्रसंगी जन्माला येणाऱ्या पत्रकारांची व पत्रकार संघटनेची संख्या वाढतच राहील आणि वर्षभर बातम्या मात्र मोजक्याच लोकांच्या नावावर राहतील. सोशल मीडियासाठीचा आशयही याच वास्तवाकडे निर्देश करतो—पत्रकारदिनी जन्माला येणारे, भेटवस्तू व पुरस्कारांवर जगणारे आणि ‘ब्रेकिंग’वर पोट भरणारे चेहरे वाढत असताना, वर्षभर सत्यासाठी उभे राहणारे पत्रकार आजही मोजकेच आहेत.

आज दि.04/01/2026 चे सर्व राशीचे भविष्य व शुभ अंक व रंग

0

Loading

मेष-आज कामात पुढाकार घ्यावा लागेल. निर्णय घेताना घाई टाळल्यास यश मिळेल. आर्थिक बाबतीत स्थैर्य राहील. कुटुंबातील चर्चा सकारात्मक दिशेने जातील.
शुभ अंक: 9 | शुभ रंग: गडद केशरी

वृषभ-आज मन स्थिर राहील आणि विचार स्पष्ट होतील. कामाच्या ठिकाणी जबाबदाऱ्या नीट पार पडतील. खर्चावर नियंत्रण ठेवा. आरोग्यासाठी नियमितपणा आवश्यक आहे.
शुभ अंक: 6 | शुभ रंग: ऑलिव्ह हिरवा

मिथुन-संवाद कौशल्यामुळे आज कामे सोपी होतील. नवीन ओळखी उपयुक्त ठरतील. प्रवास किंवा बैठकीचे योग आहेत. वेळेचे नियोजन महत्त्वाचे ठरेल.
शुभ अंक: 5 | शुभ रंग: फिकट लिंबूसरी

कर्क -घरगुती वातावरणात शांतता राखणे आवश्यक आहे. भावनिक निर्णय टाळा. आर्थिक बाबतीत सावधपणा ठेवल्यास नुकसान टळेल. विश्रांतीला वेळ द्या.
शुभ अंक: 2 | शुभ रंग: क्रीम

सिंह -आज आत्मविश्वास वाढलेला राहील. कामाच्या ठिकाणी मान-सन्मान मिळण्याची शक्यता आहे. अहंकार टाळल्यास संबंध अधिक दृढ होतील. संधी ओळखा.
शुभ अंक: 1 | शुभ रंग: सोनेरी पिवळा

कन्या-कामात बारकावे महत्त्वाचे ठरतील. सहकाऱ्यांचे सहकार्य मिळेल. आरोग्याच्या दृष्टीने आहारावर लक्ष ठेवा. आर्थिक निर्णय शांतपणे घ्या.
शुभ अंक: 4 | शुभ रंग: निळसर हिरवा

तुळ -आज समतोल राखणे गरजेचे आहे. भागीदारीतील निर्णय चर्चेतून घ्या. खर्च वाढू शकतो म्हणून नियंत्रण ठेवा. नातेसंबंधात स्पष्टता ठेवा.
शुभ अंक: 7 | शुभ रंग: फिकट निळा

वृश्चिक -आज धैर्य व आत्मविश्वास वाढेल. गुप्त योजना यशस्वी होऊ शकतात. वाद टाळल्यास फायदा होईल. संयम ठेवा.
शुभ अंक: 8 | शुभ रंग: गडद मरून

धनु -नवीन विचार व योजना आकार घेतील. शिक्षण व प्रवासासाठी दिवस अनुकूल आहे. उत्साह जास्त राहील. खर्च मर्यादेत ठेवा.
शुभ अंक: 3 | शुभ रंग: जांभळा

मकर -कामाचा ताण वाढला तरी प्रगती दिसेल. वरिष्ठांचे सहकार्य लाभेल. आर्थिक स्थैर्य हळूहळू मजबूत होईल. सातत्य ठेवा.
शुभ अंक: 10 | शुभ रंग: करडा

कुंभ -नवीन संपर्क व कल्पना लाभदायक ठरतील. सामाजिक कामात सहभाग वाढेल. मित्रांचा पाठिंबा मिळेल. आर्थिक निर्णय विचारपूर्वक घ्या.
शुभ अंक: 11 | शुभ रंग: निळसर करडा

मीन-आज मन संवेदनशील राहील. आध्यात्मिक विचार वाढतील. कुटुंबाचा आधार मिळेल. आर्थिक बाबतीत सावधपणा आवश्यक आहे.
शुभ अंक: 12 | शुभ रंग: फिकट समुद्री हिरवा

वाचकांनी वरील भविष्यवाणीचा अर्थ अचूक भविष्यवाणी म्हणून लावता केवळ आत्मपरीक्षण आणि सकारात्मक प्रेरणा म्हणून घ्यावा.

नव्या आशेचा दीप पेटला कन्या शाळेच्या दारी,ज्ञान–संस्कारांची वाट दाखवी हातात जबाबदारी,अनुभव, अभ्यास, संवेदना एकत्र येती येथे, शिवाजी शिंदे प्राचार्य—शाळेच्या उज्ज्वल भवितव्याचे नवे स्वप्न साकारते येथे.

0

Loading

पाचोरा : नगरदेवळा येथील विश्वासराव पवार ट्रस्ट संचलित माध्यमिक व उच्च माध्यमिक कन्या विद्यालय, पाचोरा या शाळेच्या प्राचार्यपदी शिवाजी शिंदे यांची पदोन्नतीने नियुक्ती करण्यात आली आहे. शाळेच्या माजी प्राचार्या श्रीमती उज्वला देशमुख सेवानिवृत्त झाल्यानंतर रिक्त झालेल्या जागेवर ही नियुक्ती करण्यात आली असून संस्थेच्या व्यवस्थापन मंडळाने त्यांच्या प्रदीर्घ सेवाकार्याची दखल घेत हा निर्णय घेतला आहे. शिवाजी शिंदे यांना शिक्षण क्षेत्रातील तब्बल ३१ वर्षांचा प्रदीर्घ आणि समृद्ध अध्यापनाचा अनुभव आहे. शिक्षक म्हणून कार्यरत असताना त्यांनी केवळ अभ्यासक्रमापुरते मर्यादित न राहता विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासावर विशेष भर दिला आहे. शैक्षणिक गुणवत्ता, शिस्त, नैतिक मूल्ये आणि जीवनोपयोगी कौशल्ये यांचा समतोल साधत त्यांनी अनेक विद्यार्थिनींच्या आयुष्याला योग्य दिशा दिली आहे. त्यांच्या अध्यापन पद्धतीत स्पष्टता, समजूतदारपणा आणि विद्यार्थ्यांशी असलेली भावनिक जवळीक ही वैशिष्ट्ये कायम दिसून येतात. शैक्षणिक पात्रतेच्या बाबतीतही शिवाजी शिंदे यांची वाटचाल उल्लेखनीय आहे. त्यांनी इंग्रजी विषयात एम.ए. व बी.एड. पदवी प्राप्त केली आहे.शिक्षण आणि आरोग्य या दोन्ही क्षेत्रातील त्यांचे ज्ञान विद्यार्थिनींसाठी तसेच समाजासाठी उपयुक्त ठरत आहे. शिवाजी शिंदे हे नामांकित गिरणाई शिक्षण संस्थेचे सहसचिव म्हणूनही कार्यरत असून संस्थात्मक जबाबदाऱ्या सांभाळताना त्यांनी प्रशासन, नियोजन व शैक्षणिक धोरणांमध्ये सक्रिय सहभाग घेतला आहे. शिक्षण संस्थेच्या प्रगतीसाठी राबविलेले विविध उपक्रम, शैक्षणिक गुणवत्ता वाढविण्याचे प्रयत्न तसेच शिक्षक–विद्यार्थी समन्वय यामुळे त्यांची ओळख एक सक्षम व दूरदृष्टी असलेले शैक्षणिक नेतृत्व म्हणून निर्माण झाली आहे. याचबरोबर शिवाजी शिंदे हे नामांकित पत्रकार, संवेदनशील कवी आणि उत्कृष्ट निवेदक म्हणूनही परिचित आहेत. सामाजिक विषयांवर केलेले लेखन, साहित्यिक कार्यक्रमांतील सहभाग आणि प्रभावी निवेदनशैलीमुळे त्यांनी वेगळी ओळख निर्माण केली आहे. अभ्यासू शिक्षक म्हणून सातत्याने वाचन, संशोधन आणि आत्मविकासावर त्यांचा भर राहिला आहे. प्राचार्यपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर कन्या विद्यालयाच्या शैक्षणिक गुणवत्तेत अधिक वाढ, आधुनिक शिक्षण पद्धतींचा अवलंब, विद्यार्थिनींसाठी नव्या संधी निर्माण करणे तसेच सुरक्षित व प्रेरणादायी वातावरण घडवण्यासाठी ते कटिबद्ध असल्याचे मत शिक्षण क्षेत्रातील जाणकार व्यक्त करत आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली विद्यालय निश्चितच नवे शिखर गाठेल असा विश्वास पालक, शिक्षक व विद्यार्थी वर्गातून व्यक्त केला जात आहे. शिवाजी शिंदे यांच्या या नियुक्तीबद्दल शिक्षण क्षेत्र, सामाजिक संस्था, साहित्यिक, पत्रकार तसेच विविध स्तरातून त्यांचे अभिनंदन होत असून त्यांच्या पुढील कार्यकाळासाठी सर्वत्र शुभेच्छांचा वर्षाव केला जात आहे.

लेवेगुजर भवन खारघर: विद्यार्थिनींसाठी सुरक्षित, विश्वासार्ह आणि आपलेच घर

0

Loading

पाचोरा – माझी मुलगी डॉ. कादंबरी संदीप महाजन हिने एमजीएम मेडिकल कॉलेज येथे फिजिओथेरेपीचे शिक्षण यशस्वीपणे पूर्ण केले असून तिची इंटर्नशिप सुरू होती. शिक्षणाच्या प्रारंभापासून ते ३१ डिसेंबर २०२५ पर्यंत तिचा निवास कामोठे येथेच होता. मात्र एक जानेवारीपासून सदर रूम खाली करणे आवश्यक असल्याने अचानक निवासाचा प्रश्न निर्माण झाला. दुसरीकडे तिच्या इंटर्नशिपचे केवळ सात–आठ दिवस शिल्लक होते. एवढ्या अल्प कालावधीसाठी सुरक्षित, सोयीस्कर आणि नियमबद्ध निवास मिळवणे हे मोठे आव्हान ठरले. या काळात अनेक ठिकाणी रूमचा शोध घेतला, मात्र अपेक्षेप्रमाणे सुविधा कुठेच मिळाल्या नाहीत. काही ठिकाणी भाड्याच्या अटी अत्यंत जाचक होत्या, तर काही ठिकाणी सुरक्षिततेबाबत समाधानकारक वातावरण नव्हते. मुलगी एकटी असल्याने हॉटेलमध्ये राहणेही सुरक्षित वाटत नव्हते. या सगळ्या परिस्थितीत पालक म्हणून मनात मोठी चिंता आणि अस्वस्थता होती. याच दरम्यान खारघर येथे गुजर मंडळावर मुलींसाठी निवासाची सुविधा असल्याची माहिती मिळाली. याबाबत अधिक चौकशी करण्यासाठी तेथील व्यवस्थापक निळूभाऊ चौधरी (Mo.98199 18088 ) आणि महेश भाऊ (Mo 8169487076)यांच्याशी संपर्क साधला. सुरुवातीला ‘मंडळावर ठेवणे’ ही कल्पना थोडी संकुचित वाटली. मात्र एमजीएम मेडिकल कॉलेज खारघरजवळ असल्याने आणि केवळ दोन–तीन दिवसांचा अनुभव घेण्याच्या उद्देशाने मुलीला तिथे ठेवण्याचा निर्णय घेतला. मात्र अवघ्या काही दिवसांतच आमचा दृष्टिकोन पूर्णपणे बदलला. रेवे गुजर भवन खारघर येथील स्वच्छता, शिस्त, सुरक्षितता, नियमबद्ध व्यवस्था, विद्यार्थिनींसाठी असलेले अनुकूल वातावरण आणि आपुलकीची वागणूक पाहून मनापासून समाधान वाटले. विशेषतः मुलींसाठी स्वतंत्र, सुरक्षित आणि संस्कारक्षम वातावरण निर्माण करण्यात आलेले आहे, हे प्रत्यक्ष अनुभवातून जाणवले वेळेचे काटेकोर पालन, जबाबदार व्यवस्थापन आणि एकूणच सकारात्मक शिस्त यामुळे पालक म्हणून मनाला मोठा दिलासा मिळाला. सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे अभियांत्रिकी, वैद्यकीय शिक्षण संस्था तसेच विविध स्पर्धा परीक्षा कोचिंग क्लासेस हे सर्व परिसरातच जवळ उपलब्ध आहेत. एखादी शैक्षणिक संस्था थोडी दूर असली तरीही सहज व सुरक्षित वाहन व्यवस्था उपलब्ध असल्यामुळे विद्यार्थिनींच्या दैनंदिन प्रवासाची कोणतीही अडचण भासत नाही. त्यामुळे अभ्यास, क्लासेस आणि इंटर्नशिप यांचा ताण न येता नियोजनबद्ध दिनक्रम ठेवणे सहज शक्य होते. तसेच आपल्या समाजातील मुले-मुली बाहेरगावी शिक्षणासाठी गेल्यानंतर सर्वात मोठी अडचण भासते ती जेवणाची. या दृष्टीने लेवेगुजर भवन खारघर येथे अन्न व आरोग्य व्यवस्थेला विशेष महत्त्व आहे. येथे घरगुती डब्याद्वारे दिले जाणारे Food & Health हे सकस, स्वच्छ, घरगुती आणि सात्विक स्वरूपाचे असून समाजाच्या खानदेशी चवीप्रमाणे आखलेला मेन्यू असल्याने मुलांना घरचीच आठवण होते. योग्य पोषण, आरोग्यदायी आहार आणि नियमित वेळेचे जेवण यामुळे विद्यार्थिनींच्या आरोग्यावरही सकारात्मक परिणाम दिसून येतो. खरं तर या अनुभवामुळे एकच खंत मनात राहिली की खारघर गुजर मंडळ सुरू झाल्यानंतर आपण सुरुवातीलाच मुलीला इथे का शिफ्ट केले नाही. हा माझा स्वतःचा अनुभव आहे आणि तो मांडताना कोणतीही औपचारिकता नाही, तर एका पालकाच्या मनातील प्रामाणिक भावना आहेत. आजच्या काळात, विशेषतः मुंबईसारख्या मेट्रो सिटी परिसरात शिक्षणासाठी येणाऱ्या विद्यार्थिनींसाठी सुरक्षित निवास ही सर्वात मोठी गरज आहे. अशा वेळी खारघर गुजर मंडळ ही केवळ निवास व्यवस्था नसून, ती विश्वासाची

आणि सुरक्षिततेची हमी देणारी जागा आहे. याच अनुषंगाने व्यवस्थापक मंडळालाही नम्र विनंती करावीशी वाटते की इतकी मोठी इमारत उभारणे आणि त्याचे नियमित मेंटेनन्स करणे, तेही मेट्रो सिटीसारख्या ठिकाणी, हे निश्चितच आव्हानात्मक आणि खर्चिक असते. त्यामुळे सुरुवातीच्या टप्प्यात आपल्या समाजबांधवांच्या शिफारशीवरून तसेच आवश्यक तपासणी करून इतर समाजातील विद्यार्थिनींनाही रूम उपलब्ध करून देण्याचा विचार केला तर तो सर्वार्थाने सकारात्मक ठरेल. यामुळे रूमची उपलब्धता वाढेल, मंडळाच्या देखभालीस हातभार लागेल आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे विद्यार्थिनींना विद्यार्थिनींचीच साथ मिळेल. सुरक्षिततेच्या दृष्टीनेही मुलींची संख्या अधिक असणे हे अधिक आश्वासक ठरते आणि सामूहिक राहणीमानातून परस्पर सहकार्य व आपुलकी वाढीस लागते. त्यामुळे गुजर बांधवांना आवर्जून सांगावेसे वाटते की आपल्या मुला–मुलींना इकडे–तिकडे असुरक्षित ठिकाणी ठेवण्यापेक्षा खारघर गुजर मंडळासारख्या आपल्या हक्काच्या, आपल्या माणसांच्या आणि आपल्या संस्कृतीच्या ठिकाणी ठेवावे. हे मंडळ म्हणजे केवळ इमारत नसून, ते आपलेच घर आहे, ही भावना इथे काही दिवस राहिल्यानंतर ठळकपणे जाणवते. सुरक्षेच्या दृष्टिकोनातून हे मंडळ अत्यंत महत्त्वपूर्ण असून पालक आणि विद्यार्थिनी दोघांनाही मानसिक स्थैर्य देणारे आहे. खारघर गुजर मंडळ उभारणीसाठी ज्या दात्यांनी आर्थिक मदत दिली, ज्यांच्या मनात ही संकल्पना होती, ज्यांनी वेळ, श्रम आणि ऊर्जा खर्च केली, तसेच प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे ज्ञात–अज्ञात सर्वांनी जे सहकार्य केले, त्या सर्वांप्रती मनापासून कृतज्ञता व्यक्त करावीशी वाटते. आज अनेक पालक निर्धास्तपणे आपल्या मुलींना उच्च शिक्षणासाठी पाठवू शकतात, यामागे या मंडळाच्या उभारणीमागील दूरदृष्टी, सामाजिक भान आणि सेवाभाव कारणीभूत आहे. अशा संस्थांची गरज भविष्यात आणखी वाढणार आहे. खारघर गुजर मंडळ हे त्याचे उत्तम उदाहरण असून, समाजाने एकत्र येऊन उभ्या केलेल्या या सुरक्षित आश्रयस्थानी अनेक विद्यार्थिनींची स्वप्ने सुरक्षितपणे पूर्णत्वाकडे जात आहेत. या सर्व सेवाभावी हातांना शतशः प्रणाम.

ज्याने पक्षासाठी सोने दिले तो उपनगराध्यक्ष… किशोर बारावकर, तर संकटात धावणारा सुमित पाटील गटनेता

0

Loading

पाचोरा – शहराच्या राजकीय इतिहासात निष्ठा, संघर्ष आणि सेवाभावाला न्याय देणाऱ्या निर्णयांची नोंद नेहमीच महत्त्वाची राहिली आहे. शिवसेनेचे कार्यसम्राट आमदार किशोरआप्पा पाटील यांच्या कार्यपद्धतीचे जिवंत उदाहरण ठरणारी किशोर बारावकर यांची उपनगराध्यक्ष पदावर झालेली नेमणूक आणि सुमितदादा किशोरआप्पा पाटील यांची गटनेता म्हणून निवड ही केवळ पदांची घोषणा नाही, तर जनतेच्या विश्वासावर शिक्कामोर्तब करणारा निर्णय मानला जात आहे. या दोन्ही नियुक्त्यांमधून कार्यकर्त्यांच्या त्यागाला मान, निष्ठेला योग्य सन्मान आणि युवा नेतृत्वाला स्पष्ट दिशा देण्याची आमदार किशोरआप्पा पाटील यांची भूमिका पुन्हा एकदा ठळकपणे समोर आली आहे. उपनगराध्यक्ष किशोर बारावकर यांची निवड करताना कोणतेही आर्थिक, सामाजिक किंवा जातीचे गणित लावलेले नाही, तर सर्वसामान्यांचा हक्काचा, रस्त्यावरचा कार्यकर्ता आणि चोवीस तास उपलब्धता हेच एकमेव निकष डोळ्यासमोर ठेवण्यात आले आहेत. महाविद्यालयीन जीवनापासून भारतीय विद्यार्थी सेनेच्या माध्यमातून शिवसेनेत सक्रिय झालेले किशोर बारावकर हे पाचोरा शिवसेनेच्या संघर्षकाळाचे साक्षीदार आहेत. त्या काळात कार्यकर्त्यांची आर्थिक परिस्थिती अत्यंत हालाखीची असताना मुंबई येथील तालुका संपर्कप्रमुखांना स्वतःच्या घरी मुक्काम, जेवणाची व्यवस्था करणे, प्रचारासाठी साधनसामग्री उभी करणे, हे सारे जबाबदारीने पार पाडणारा हा कार्यकर्ता होता. पाचोरा विधानसभा मतदारसंघात शिवसेनेचे तिकीट अशोकबंधू मिसाळ यांना मिळाल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज चौकातील अशोक दत्तू पाटील यांची पान टपरी आणि गोराडखेडा येथील दादासाहेब हनुमान बुधा पाटीत यांचे दुकान हेच शिवसेनेचे कार्यालय म्हणून वापरले जात होते. ज्या कार्यकर्त्याच्या घरी संधी मिळेल तिथे जेवण, दिवसभर प्रचार आणि पुन्हा संघर्ष, अशी ती परिस्थिती होती. त्या काळातील एक प्रसंग आजही कार्यकर्त्यांच्या स्मरणात आहे. प्रचाराच्या पहिल्याच दिवशी क्रूझर मिळाली, मात्र डिझेलसाठी पैसे नव्हते. पहाटेपासून उभी असलेली क्रूझर दुपारचे दोन वाजून गेले तरी हलू शकली नाही. अखेर किशोर बारावकर यांनी आपल्या गिरड रोडवरील एम.एस.ई.बी. कॉलनी निवासस्थानी जाऊन मावशींना म्हणजेच आपल्या आईंना परिस्थिती सांगितली. व सोने मागीतले ते घरातील सोने गहाण ठेवून डिझेलची व्यवस्था करण्यात आली आणि प्रचाराचा रथ पुढे सरकला. हा प्रसंग केवळ त्यागाचा नाही, तर कार्यकर्त्याच्या निष्ठेचा, पक्षासाठी सर्वस्व अर्पण करण्याच्या वृत्तीचा दाखला आहे. अशा या कार्यकर्त्याच्या आयुष्याचे सोने स्वर्गीय तात्यासाहेब आर. ओ. पाटील, स्वर्गीय मुकुंदआण्णा बिल्दीकर आणि प्रामुख्याने हॅट्रिक आमदार किशोरआप्पा पाटील यांनी ओळखले. आमदार किशोरआप्पा पाटील यांनी दिलेली उपनगराध्यक्ष पदाची  ही पावती म्हणजे एका सर्वसामान्य रस्त्यावरच्या कार्यकर्त्याला दिलेला न्यायच म्हणावा लागेल. तसेच पाचोरा नगरपालिका शिवसेनेच्या गटनेतेपदी सुमित किशोरआप्पा पाटील यांची झालेली निवड ही युवा नेतृत्वाला चालना देणारा निर्णायक टप्पा ठरत आहे. वडील आमदार आहेत, आई नगराध्यक्ष आहे म्हणून मुलगा गटनेतेपदी असा कोणताही निकष या निवडीमागे लावलेला नाही, हे पाचोरा शहर, तालुका आणि पंचक्रोशीतील जनता सहज सांगेल. उलट आमदार किशोरआप्पा पाटील यांना अभिमान वाटावा असा सुपुत्र त्यांच्या पोटी जन्माला आला आहे, असेच या निवडीकडे पाहिले जात आहे. सुमितदादा यांची नम्रता, मितभाषी स्वभाव, निर्व्यसनी जीवनशैली आणि सर्वसामान्यांशी थेट संवाद हे गुण मतदारसंघाने अनेक वेळा अनुभवले आहेत. विशेषतः नुकत्याच झालेल्या अतिवृष्टीच्या काळात सुमितदादांनी दाखवलेली कृती संपूर्ण मतदारसंघाच्या मनात घर करून गेली. सरकारी यंत्रणा काय करेल, वडील आमदार म्हणून काय भूमिका घेतील याची वाट न पाहता, स्वतः खिशातून पैसे खर्च करून गुडघ्याएवढ्या, कधी कधी कमरेएवढ्या पाण्यातून थेट नागरिकांच्या घरापर्यंत जाऊन मदत करण्याची वृत्ती त्यांनी दाखवली. हा अनुभव केवळ पाचोरा मतदारसंघानेच नव्हे, तर महाराष्ट्रानेही पाहिला. राजकीय वारसा असूनही केवळ वारशावर विसंबून न राहता स्वतःच्या कर्तृत्वावर राजकीय प्रवाहात कसे विलीन होता येते, याचे हे जिवंत उदाहरण आहे. बापापेक्षा बेटा सवाई ही म्हण येथे आठवावी, मात्र अनेकांच्या मते आ. किशोरआप्पा पाटील यांच्या कार्यशैलीचा वारसा पुढे नेत सुमितदादा पाचपटीने पुढे जात असल्याचे दिसून येते. पाचोरा नगरपालिका सभागृहात प्रथमच नगरसेवक म्हणून प्रतिनिधित्व मिळाल्यानंतर लगेचच गटनेतेपदाची जबाबदारी त्यांच्या खांद्यावर आली आहे. ही निवड म्हणजे त्यांच्या आतापर्यंतच्या कार्याची पावतीच मानली जात आहे. उपनगराध्यक्ष किशोर बारावकर आणि गटनेते सुमित किशोरआप्पा पाटील यांच्या निवडीमुळे शिवसेनेतील कार्यकर्त्यांच्या मनात नवा आत्मविश्वास निर्माण झाला असून हे फक्त पद नाही, ही जबाबदारी आणि जनतेचा विश्वास आहे ही भावना अधिक बळकट झाली आहे. या दोन्ही नियुक्त्यांबद्दल ध्येय न्यूज व साप्ताहिक झुंज वृत्तपत्रातर्फे किशोर बारावकर आणि सुमित किशोरआप्पा पाटील यांचे हार्दिक अभिनंदन करण्यात येत असून, त्यांच्या कार्यकाळातून पाचोरा शहराच्या विकासाला आणि सर्वसामान्यांच्या प्रश्नांना नवी दिशा मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

आज दि.03/01/2026 चे सर्व राशीचे भविष्य व शुभ अंक व रंग

0

Loading

मेषआज कामात गती येईल आणि आत्मविश्वास वाढलेला राहील. प्रलंबित निर्णय मार्गी लागण्याची शक्यता आहे. आर्थिक व्यवहारात सावधपणा ठेवा. कुटुंबीयांचा पाठिंबा मिळेल.
शुभ अंक: 9 | शुभ रंग: तांबूस

वृषभआज संयम स्थिरता राखणे आवश्यक आहे. कामाच्या ठिकाणी जबाबदाऱ्या वाढू शकतात. खर्चावर नियंत्रण ठेवल्यास फायदा होईल. आरोग्याकडे लक्ष द्या.
शुभ अंक: 6 | शुभ रंग: गडद हिरवा

मिथुनसंवादातून आज महत्त्वाची कामे साध्य होतील. नवीन ओळखी उपयुक्त ठरतील. प्रवासाचे संकेत आहेत. वेळेचे नियोजन योग्य ठेवा.
शुभ अंक: 5 | शुभ रंग: फिकट पिवळा

कर्कघरगुती प्रश्नांकडे लक्ष द्यावे लागेल. भावनिक निर्णय टाळावेत. आर्थिक बाबतीत स्थैर्य येण्यास सुरुवात होईल. विश्रांती गरजेची आहे.
शुभ अंक: 2 | शुभ रंग: मोत्यासारखा पांढरा

सिंहआज नेतृत्वगुणांना वाव मिळेल. कामात यश मिळण्याची शक्यता आहे. अहंकार टाळल्यास संबंध सुधारतील. सकारात्मक विचार ठेवा.
शुभ अंक: 1 | शुभ रंग: केशरी पिवळा

कन्याकामात अचूकता आणि शिस्त राखावी लागेल. सहकाऱ्यांचे सहकार्य मिळेल. आरोग्याच्या बाबतीत दिनक्रम सांभाळा. आर्थिक निर्णय विचारपूर्वक घ्या.
शुभ अंक: 4 | शुभ रंग: निळसर राखाडी

तुळआज समतोल साधण्याचा प्रयत्न करा. भागीदारीत स्पष्ट संवाद आवश्यक आहे. खर्च उत्पन्न यांचा ताळमेळ ठेवा. नातेसंबंधात सौहार्द राहील.
शुभ अंक: 7 | शुभ रंग: हलका गुलाबी

वृश्चिकआज आत्मविश्वास आणि धैर्य वाढेल. गुप्त शत्रूंवर मात करण्याची क्षमता राहील. वाद टाळल्यास फायदा होईल. संयमाने वागा.
शुभ अंक: 8 | शुभ रंग: गडद मरून

धनुनवीन संधींचा शोध घेण्याचा दिवस आहे. शिक्षण प्रवासासाठी अनुकूलता आहे. उत्साह वाढलेला राहील. खर्च मर्यादेत ठेवा.
शुभ अंक: 3 | शुभ रंग: निळसर जांभळा

मकरकामाचा ताण वाढला तरी यश मिळेल. वरिष्ठांचे मार्गदर्शन लाभेल. आर्थिक स्थैर्य मजबूत होईल. संयम सातत्य ठेवा.
शुभ अंक: 10 | शुभ रंग: गडद तपकिरी

कुंभआज नवीन कल्पना प्रत्यक्षात आणण्याची संधी मिळेल. सामाजिक संपर्क वाढतील. मित्रांचे सहकार्य लाभेल. आर्थिक निर्णय विचारपूर्वक घ्या.
शुभ अंक: 11 | शुभ रंग: निळसर पांढरा

मीनआज मन शांत ठेवणे गरजेचे आहे. आध्यात्मिक विचारांकडे ओढ वाढेल. कुटुंबातील सहकार्य मिळेल. आर्थिक बाबतीत सावध रहा.
शुभ अंक: 12 | शुभ रंग: फिकट समुद्री हिरवा

वाचकांनी वरील भविष्यवाणीचा अर्थ अचूक भविष्यवाणी म्हणून लावता केवळ आत्मपरीक्षण आणि सकारात्मक प्रेरणा म्हणून घ्यावा.

जेलमध्ये आरोपी तरीही पाचोऱ्यात अनुदानाचा घोटाळा सुरूच? शेतकरी अनुदान प्रकरणाने पुन्हा उभे केले गंभीर प्रश्न

0

Loading

पाचोरा – तालुक्यात सन २०१९ पासून सुरू असलेले शेतकरी अनुदानातील कथित घोटाळे आता केवळ प्रशासकीय चुकांपुरते मर्यादित न राहता संघटित स्वरूपाच्या रॅकेटकडे निर्देश करत असल्याचे चित्र स्पष्ट होत आहे. विशेष बाब म्हणजे या प्रकरणात काही आरोपी निश्चित करून त्यांच्यावर गुन्हे दाखल झाले असून सध्या ते सब जेलमध्ये आहेत आणि मागील आठवड्यात न्यायालयात या प्रकरणांची चार्जशीट देखील दाखल झालेली आहे. असे असतानाही २०२५ मध्ये झालेल्या अतिवृष्टीनंतर पाचोरा तालुक्यातील शेतकऱ्यांच्या अनुदान वितरणाबाबत एकामागून एक संशयास्पद बाबी समोर येत असून आरोपी जेलमध्ये असतानाही अनुदानातील गैरव्यवहार कसे सुरू आहेत असा थेट सवाल उपस्थित होत आहे. या संपूर्ण प्रकरणा बाबत सामाजिक कार्यकर्ता व पत्रकार संदीप दामोदर महाजन यांनी तहसीलदार पाचोरा तसेच प्रांताधिकारी व जिल्हाधिकारी जळगाव यांच्याकडे सविस्तर व लेखी अर्ज व निवेदन सादर करून सत्य व अधिकृत माहितीची मागणी केली असून त्यांच्या अर्जांमुळे शेतकरी अनुदान प्रकरण पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आले आहे. सन २०१९ पासून अतिवृष्टी, नैसर्गिक आपत्ती, नुकसानभरपाई तसेच विविध शासकीय योजनांतर्गत शेतकऱ्यांना देण्यात येणाऱ्या अनुदानाच्या वितरणात मोठ्या प्रमाणावर तक्रारी प्राप्त झाल्याचे त्यांनी आपल्या निवेदनात स्पष्ट केले आहे. विशेषतः २०२५ मध्ये काही महिन्यांपूर्वी झालेल्या अतिवृष्टीनंतर शेजारील जामनेर व चाळीसगाव तालुक्यांमध्ये बागायत व कोरडवाहू शेतीचे पंचनामे स्वतंत्रपणे करण्यात आले आणि त्या पंचनाम्यांच्या आधारे त्या तालुक्यातील संबंधित शेतकऱ्यांना अनुदानाची रक्कम वितरितही करण्यात आली.पाचोरा तालुक्यात मात्र अशा प्रकारे स्वतंत्र पंचनामे का करण्यात आले नाहीत हा प्रश्न अद्याप अनुत्तरित आहे. जामनेर व चाळीसगावमध्ये प्रक्रिया पूर्ण होत असताना पाचोऱ्यात शेतकऱ्यांना अनुदानापासून वंचित ठेवण्यामागे नेमके गूढ काय, असा सवाल आता उघडपणे विचारला जात आहे. आरोपी जेलमध्ये असूनही पाचोऱ्यात शेतकऱ्यांच्या नावावर मंजूर झालेल्या अनुदानाच्या रकमा अजूनही त्रयस्थ किंवा इतर व्यक्तींच्या खात्यावर कशा काय वर्ग होत आहेत हा मुद्दा अधिक गंभीर ठरत आहे. जर मुख्य आरोपी तुरुंगात आहेत आणि चार्जशीट दाखल आहे तर प्रशासकीय यंत्रणेमधील कोणत्या पातळीवरून ही प्रक्रिया पुढे चालू आहे याची चौकशी होणे अत्यावश्यक असल्याची भावना व्यक्त होत आहे आणि यावरूनच शेतकरी अनुदानातील रॅकेट पूर्णपणे संपुष्टात न येता अजूनही कार्यरत असल्याचा संशय बळावत आहे. संदीप दामोदर महाजन यांनी तहसीलदार पाचोरा यांना दिलेल्या अर्जात सन २०१९ पासून आजपर्यंत शेतकरी अनुदानासंदर्भात प्राप्त झालेल्या तक्रारींचा वर्षनिहाय तपशील, चुकीच्या खात्यावर वर्ग झालेल्या रकमेची संख्यात्मक माहिती, त्यावर करण्यात आलेली कारवाई तसेच प्रत्यक्ष किती शेतकऱ्यांना रक्कम मिळाली व किती प्रकरणे प्रलंबित आहेत याची अधिकृत माहिती मागितली असून ही माहिती वरिष्ठ प्रशासकीय स्तरावर व न्यायालयीन स्तरावर सादर करण्यासाठी आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. त्याचबरोबर प्रांताधिकारी व जिल्हाधिकारी यांच्याकडे दिलेल्या निवेदनात त्यांनी तहसील स्तरावर काही प्रमाणात चौकशी झाल्याचे सांगितले जात असले तरी संपूर्ण व पारदर्शक माहिती आजतागायत सार्वजनिक झालेली नसल्याने शेतकऱ्यांमध्ये संभ्रम, नाराजी व अविश्वासाची भावना निर्माण होत असल्याचे नमूद केले आहे. अनुदान ही शेतकऱ्यांसाठी मदत असावी की लूट असा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून पाचोरा तालुक्यातील अनेक शेतकरी आधीच नैसर्गिक आपत्ती, वाढता उत्पादन खर्च आणि बाजारातील अस्थिरतेमुळे आर्थिक संकटात सापडले असताना शासनाकडून मिळणारे अनुदान चुकीच्या खात्यावर जाणे किंवा मिळण्यात विलंब होणे ही बाब शेतकऱ्यांसाठी दुहेरी मार ठरत आहे. त्यामुळे या प्रकरणाकडे केवळ प्रशासकीय फाईल म्हणून न पाहता शेतकऱ्यांच्या हक्कांचा प्रश्न म्हणून पाहिले जावे अशी मागणी जोर धरू लागली आहे. आरोपी जेलमध्ये असतानाही अनुदानातील गैरव्यवहार सुरू असल्याचे संकेत मिळत असतील तर ही बाब प्रशासनासाठी गंभीर इशारा मानली जात असून दोषी व्यक्ती कोणत्याही पातळीवर असोत त्यांच्यावर कठोर कारवाई होणे आणि संपूर्ण यंत्रणेची सखोल चौकशी होणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त होत आहे. संदीप दामोदर महाजन यांनी कायदेशीर, संयमित व अभिलेखांवर आधारित मार्गाने ही बाब पुढे नेली असून गरज पडल्यास न्यायालयीन पातळीवरही पाठपुरावा केला जाईल असे संकेत दिले आहेत. आता प्रशासन या संपूर्ण प्रकरणावर काय भूमिका घेते, पाचोरा तालुक्यातील पंचनामे का झाले नाहीत, चुकीच्या खात्यावर गेलेल्या रकमेचा माग कसा घेतला जातो आणि शेतकऱ्यांना प्रत्यक्ष न्याय कधी मिळतो याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले असून शेतकरी अनुदानातील हा कथित घोटाळा भूतकाळापुरता न राहता वर्तमानातही कार्यरत असल्याचे जर सिद्ध झाले तर त्याचे परिणाम प्रशासनाच्या विश्वासार्हतेवर दूरगामी ठरणार आहेत.

महिला सक्षमीकरणाचा निर्धार ठळक करणारा पाचोऱ्यातील उद्याचा ऐतिहासिक पदग्रहण सोहळा

0

Loading

पाचोरा शहरात राजमाता माँसाहेब जिजाऊ जयंती, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले जयंती तसेच महिला मुक्तिदिनाचे औचित्य साधून उद्या आयोजित करण्यात येणारा लोकनियुक्त नगराध्यक्ष पदाचा पदग्रहण समारंभ हा केवळ राजकीय कार्यक्रम न राहता सामाजिक जाणीव आणि महिला सक्षमीकरणाचा ठोस संदेश देणारा ठरणार आहे. शिवसेनेच्या लोकनियुक्त नगराध्यक्ष सौ. सुनिताताई किशोर आप्पा पाटील यांच्या पदग्रहणानिमित्त पाचोरा शहरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून नागरिकांमध्ये मोठी अपेक्षा दिसून येत आहे. दिनांक ३ जानेवारी २०२६ रोजी सकाळी १० वाजता पाचोरा येथील मानसिंगा ग्राऊंड येथे हा भव्य पदग्रहण सोहळा पार पडणार आहे. या कार्यक्रमात महिला मुक्तिदिनाचे औचित्य साधून महिला बचत गटांसाठी विशेष मार्गदर्शन शिबीर आयोजित करण्यात आले असून महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणावर विशेष भर देण्यात येणार आहे. महिलांनी स्वयंरोजगाराच्या माध्यमातून आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हावे, स्वतःचे व कुटुंबाचे भविष्य सक्षमपणे घडवावे यासाठी बचत गटांचे महत्त्व, विविध शासकीय योजना, आर्थिक शिस्त आणि उद्योजकतेच्या संधी याबाबत मार्गदर्शन केले जाणार आहे. राजमाता जिजाऊ आणि सावित्रीबाई फुले यांच्या विचारांचा वारसा पुढे नेणाऱ्या या कार्यक्रमातून महिलांचे शिक्षण, स्वाभिमान आणि नेतृत्वक्षमतेचे महत्त्व अधोरेखित केले जाणार आहे. लोकनियुक्त नगराध्यक्ष पदाची शपथ स्वीकारताना सौ. सुनिताताई किशोर आप्पा पाटील या पाचोरा शहराच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध राहण्याचा निर्धार व्यक्त करणार असून शहरातील मूलभूत सुविधा, स्वच्छता, पाणीपुरवठा, रस्ते, आरोग्य व शिक्षण या क्षेत्रात पारदर्शक आणि लोकाभिमुख कारभार करण्याची दिशा मांडणार आहेत. महिलांसाठी विशेष योजना प्रभावीपणे राबवून त्यांना निर्णयप्रक्रियेत सामावून घेण्यावर भर देण्यात येणार असल्याचेही त्या यावेळी स्पष्ट करणार आहेत. नगराध्यक्षपद हे अधिकाराचे नव्हे तर जबाबदारीचे पद असून नागरिकांच्या विश्वासाला पात्र ठरण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न केले जातील, असा विश्वास या पदग्रहणाच्या माध्यमातून व्यक्त होणार आहे. या कार्यक्रमाचे आयोजन शिवसेना, युवासेना, महिला आघाडी व सर्व अंगीकृत संघटना, पाचोरा यांच्या वतीने करण्यात आले असून शिवसेनेच्या संघटनात्मक ताकदीचे दर्शन या सोहळ्यात घडणार आहे. विविध क्षेत्रातील मान्यवर, पदाधिकारी, महिला बचत गटांच्या प्रतिनिधी, शिवसैनिक आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे. पदग्रहण समारंभाची औपचारिकता आणि सामाजिक बांधिलकीतून महिलांसाठी मार्गदर्शन शिबीर असा दुहेरी उद्देश साधणारा हा उपक्रम पाचोरा शहरासाठी प्रेरणादायी ठरणार असून महिला नेतृत्व, लोकशाही मूल्ये आणि सकारात्मक राजकारणाची दिशा दाखवणारा हा कार्यक्रम ठरेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

पाचोरा अग्रवाल समाज एकजुटीची नवी ऊर्जा; नूतन कार्यकारिणी समाज विकासाच्या दिशेने सज्ज

0

Loading

पाचोरा – येथील अग्रवाल समाजाची नूतन कार्यकारिणी नुकतीच जाहीर करण्यात आली असून समाजाच्या संघटनात्मक बळकटीकरणासाठी हा महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे. समाजातील सर्व घटकांना सोबत घेऊन सामाजिक, सांस्कृतिक व सेवाभावी उपक्रम अधिक प्रभावीपणे राबविण्याच्या उद्देशाने ही कार्यकारिणी गठित करण्यात आली आहे. अनुभवी, सक्रिय आणि समाजकार्याची जाण असलेल्या सदस्यांचा समावेश केल्यामुळे पुढील काळात समाजहिताचे निर्णय आणि उपक्रम अधिक गतिमान होतील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. नूतन कार्यकारिणीत अध्यक्षपदी रमेश शंकरलाल मोर यांची निवड करण्यात आली आहे. उपाध्यक्षपदी सिताराम (मुन्ना) बन्सीलाल अग्रवाल यांची जबाबदारी देण्यात आली असून सचिवपदी मोहन चंद्रकांत अग्रवाल यांची नियुक्ती झाली आहे. सहसचिव म्हणून राजेश सतिश पटवारी काम पाहणार आहेत. कार्याध्यक्षपदी राजेश शांतीलाल मोर यांची निवड करण्यात आली असून कोषाध्यक्षपदी दिनेश चंदुलाल अग्रवाल यांच्याकडे आर्थिक शिस्त व नियोजनाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. सहकोषाध्यक्ष म्हणून रवी गोपाल मोर कार्य पाहतील, तर सहकार्याध्यक्षपदी लक्ष्मीकांत गोविंदलाल पटवारी यांची निवड करण्यात आली आहे. समाजातील उपक्रमांची माहिती प्रभावीपणे पोहोचविण्यासाठी प्रसिध्दी प्रमुखपदी निखिल सुभाष मोर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. कार्यकारिणीतील सदस्य म्हणून सुभाष जगन्नाथ अग्रवाल, किशोर तेजमल अग्रवाल, गोपाल सुरजमल अग्रवाल, संजय मगनलाल पटवारी, निर्मल कैलास पटवारी, अनुराग राजकुमार भारतीया, महावीर भवरलाल अग्रवाल आणि नवील अशोक मोर यांचा समावेश आहे. या सर्व सदस्यांच्या अनुभवाचा आणि सक्रिय सहभागाचा लाभ समाजाच्या विविध उपक्रमांना निश्चितच होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे. नूतन कार्यकारिणीचा प्रमुख उद्देश समाजातील ऐक्य अधिक दृढ करणे, युवकांना नेतृत्वाच्या संधी उपलब्ध करून देणे, महिलांच्या सहभागाला प्रोत्साहन देणे तसेच शिक्षण, आरोग्य, आपत्ती मदत आणि सांस्कृतिक उपक्रमांमध्ये सक्रिय योगदान देणे हा आहे. समाजातील गरजू घटकांसाठी मदतकार्य, मार्गदर्शन शिबिरे, शैक्षणिक प्रोत्साहन आणि सामूहिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार असल्याचे संकेत देण्यात आले आहेत. या निवडीबद्दल समाजातील ज्येष्ठ, युवक आणि महिला वर्गातून समाधान व्यक्त करण्यात येत असून नूतन कार्यकारिणीच्या माध्यमातून पाचोरा अग्रवाल समाज अधिक संघटित, सक्रिय आणि समाजोपयोगी वाटचाल करेल, अशी सर्वांची अपेक्षा आहे. आगामी काळात सर्व सदस्यांच्या सहकार्याने समाजहिताचे निर्णय घेतले जातील आणि पाचोरा शहरात अग्रवाल समाजाचा सकारात्मक ठसा अधिक ठळकपणे उमटेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.

ताज्या बातम्या

error: Content is protected !!