Home Blog Page 24

कासोदा वसंत सहकारी साखर कारखाना : अपयशी पुनरुज्जीवनानंतर ‘सुरू करण्याच्या’ नावाने पैसे गोळा करण्यामागे नेमका हेतू काय?

0

Loading

पाचोरा – कासोदा वसंत सहकारी साखर कारखाना सुरू करणे व त्याचे पुनरुज्जीवन करणे, या नावाखाली गेल्या काही वर्षांत मोठ्या अपेक्षा निर्माण करण्यात आल्या. स्थानिक शेतकऱ्यांच्या ऊसाला बाजार मिळावा, परिसरात रोजगारनिर्मिती व्हावी आणि सहकार चळवळीचा खरा उद्देश पुन्हा जिवंत व्हावा, अशा भावना पुढे करून अनेक प्रयत्न झाले. मात्र हे सर्व प्रयत्न प्रत्यक्षात पूर्णपणे अपयशी ठरले, हे वास्तव आता लपून राहिलेले नाही. तांत्रिक, आर्थिक, प्रशासकीय आणि कायदेशीर अडचणींमुळे कारखान्याचा पुनरुज्जीवनाचा डाव अक्षरशः कोलमडून पडला असून, “पूर्ण कुच्चा झाला” असे म्हणावे लागेल इतकी स्थिती निर्माण झाली आहे. अशा पार्श्वभूमीवर आता एक नवा प्रश्न गंभीरपणे उपस्थित होत आहे. कारखाना सुरू करण्याच्या नावाने, पुनरुज्जीवनाच्या गोंडस शब्दांचा वापर करून, शेतकरी नसलेल्या, प्रत्यक्ष ऊस उत्पादनाशी किंवा सहकारी तत्त्वाशी काहीही संबंध नसलेल्या भुरट्या पोटभरू लोकांकडून पैसे जमा करण्याचे प्रयत्न का सुरू आहेत? आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे हे पैसे नेमके कशासाठी गोळा केले जात आहेत, याबाबत स्पष्टता का नाही? कासोदा वसंत सहकारी साखर कारखाना हा केवळ एक औद्योगिक प्रकल्प नव्हता, तर तो परिसरातील हजारो शेतकरी कुटुंबांच्या आशा-आकांक्षांचे प्रतीक होता. ऊस शेतीवर अवलंबून असलेल्या शेतकऱ्यांना योग्य दर, वेळेवर बिले आणि स्थानिक रोजगार उपलब्ध व्हावा, हा त्यामागचा मूळ उद्देश होता. मात्र वर्षानुवर्षे गैरव्यवस्थापन, राजकीय हस्तक्षेप, आर्थिक अनियमितता आणि निर्णयक्षमतेचा अभाव यामुळे कारखाना अडचणीत सापडत गेला. पुनरुज्जीवनाचे अनेक आराखडे मांडले गेले, बैठका झाल्या, आश्वासने दिली गेली, पण प्रत्यक्षात कारखाना सुरू होण्याच्या दिशेने ठोस पावले कधीच पडली नाहीत. या अपयशानंतरही जर पुन्हा एकदा “कारखाना सुरू करणार”, “लवकरच गळीत हंगाम चालू होणार”, “नवीन गुंतवणूक येणार” अशा घोषणा करून पैसे गोळा केले जात असतील, तर त्यामागील हेतू संशयास्पद वाटणे साहजिक आहे. कारण आजपर्यंतच्या अनुभवावरून शेतकऱ्यांना हे स्पष्टपणे दिसून आले आहे की, कारखाना सुरू करण्यासाठी आवश्यक असलेली भांडवली गुंतवणूक, तांत्रिक साधनसामग्री, कर्ज पुनर्रचना, शासनाची मान्यता आणि पारदर्शक व्यवस्थापन यापैकी कोणत्याच बाबी ठोसपणे पूर्ण झालेल्या नाहीत. अधिक चिंतेची बाब म्हणजे, हे पैसे प्रत्यक्ष शेतकऱ्यांकडून नव्हे तर शेतकरी नसलेल्या, सहकार चळवळीशी कोणताही दीर्घकालीन संबंध नसलेल्या लोकांकडून गोळा केले जात आहेत. सहकारी साखर कारखान्याची संकल्पना ही शेतकऱ्यांच्या सामूहिक सहभागावर आधारित असते. मग शेतकरी नसलेल्या लोकांचा यात सहभाग का, हा प्रश्न उपस्थित होतो. हा सहभाग केवळ आर्थिक व्यवहारापुरताच मर्यादित असेल, तर सहकाराचे तत्त्वच धोक्यात येते आणि असा उद्योग सहकारी न राहता खासगी किंवा दलालीच्या दिशेने झुकत असल्याचा आरोप होणे स्वाभाविक आहे. या पैसे संकलनाबाबत कोणतीही अधिकृत माहिती, लेखी आराखडा, खर्चाचा तपशील किंवा जबाबदारी निश्चित करणारी यंत्रणा समोर आलेली नाही. जमा होणारा निधी नेमका कुठे वापरण्यात येणार, तो कोणाच्या नियंत्रणाखाली राहणार, आणि जर कारखाना पुन्हा सुरू होऊ शकला नाही तर त्या पैशांचे काय होणार, याची कोणतीही स्पष्ट उत्तरे दिली जात नाहीत. त्यामुळे हा प्रकार केवळ शेतकऱ्यांच्या भावनांचा गैरफायदा घेण्याचा तर नाही ना, असा प्रश्न अधिक तीव्र होत आहे. विशेष म्हणजे, अशा तोतया शेतकरी प्रेमी व्यक्तींचा पूर्वीचा इतिहास, त्यांच्या अनधिकृत संघटना आणि संशयास्पद हालचाली यांची शासकीय स्तरावर वेळीच आणि गांभीर्याने दखल घेणे अत्यंत गरजेचे आहे, जेणेकरून कारखान्याच्या नावाखाली कोणाचीही आर्थिक लुबाडणूक होणार नाही आणि भविष्यात पुन्हा अशा प्रकारांची पुनरावृत्ती टाळता येईल. आज शेतकरी आधीच आर्थिक संकटात आहे. ऊस दर, उत्पादन खर्च, कर्जाचा बोजा आणि नैसर्गिक आपत्ती यामुळे तो त्रस्त आहे. अशा परिस्थितीत कारखान्याच्या नावाखाली निर्माण होणाऱ्या खोट्या आशा आणि त्यातून होणारे आर्थिक व्यवहार हे शेतकरी व परिसराच्या हिताचे नसून, काही मोजक्या लोकांच्या स्वार्थासाठीच असल्याचा संशय बळावत आहे. म्हणूनच आता गरज आहे ती स्पष्टतेची, पारदर्शकतेची आणि जबाबदारीची. कासोदा वसंत सहकारी साखर कारखान्याच्या पुनरुज्जीवनाबाबत जे काही प्रयत्न केले जात आहेत, त्यांची संपूर्ण माहिती सार्वजनिक करणे, आर्थिक व्यवहारांचा हिशेब मांडणे, शासकीय यंत्रणांनी सक्रिय भूमिका घेणे आणि शेतकऱ्यांच्या हिताला प्राधान्य देणे अत्यावश्यक आहे. अन्यथा “कारखाना सुरू करण्याच्या” नावाने पैसे जमा करण्याचा हा प्रकार केवळ फसवणूक ठरेल, आणि त्याचे गंभीर सामाजिक व कायदेशीर परिणाम भोगावे लागतील, अशी तीव्र भावना आता उघडपणे व्यक्त होत आहे.

आज दि 30/12/2025 चे सर्व राशीचे भविष्य व शुभ अंक व रंग

0

Loading

मेष
कामकाजात आत्मविश्वास असेल, नवीन संधी प्राप्त होतील. पण शेजारी असलेल्या लोकांशी संवादात सावधगिरी बाळगा. स्थानिक प्रवास शक्य.
शुभ अंक:
शुभ रंग: लाल

वृषभ
जुलै महिन्याच्या ग्रह गोचरामुळे (शुक्रमालव्य राजयोग) आर्थिक आणि प्रतिष्ठात्मक वाढ होण्याची शक्यता आहे 
शुभ अंक:
शुभ रंग: गुलाबी

मिथुन
करिअर कौटुंबिक जीवनात सकारात्मक बदलशुभ योग गाजणार आहे
शुभ अंक:
शुभ रंग: पिवळा

कर्क
ग्रह गोचरबाधित असूनही बुधादित्य योगामुळे नफाप्रगतीची शक्यता आहे .
शुभ अंक:
शुभ रंग: निळा

सिंह
ग्रह गोचरामुळे आरोग्य आणि घरातील वातावरणात ताण येऊ शकतो  नेतृत्वगुण मिळतील, तरी संयम आवश्यक.
शुभ अंक:
शुभ रंग: सोनेरी

कन्या
जुलैच्या ग्रह गोचराच्या प्रभावामुळे कामात चढउतार, तणाव आणि निर्णयांमध्ये अडथळे येऊ शकतात 
शुभ अंक:
शुभ रंग: हिरवा

तुला
प्रेमसंवादात सौहार्दपूर्ण काळ. संसर्ग टाळा आणि तुमच्या आवडीनिवडींमध्ये मनःस्थिती राखा.
शुभ अंक:
शुभ रंग: गुलाबी

वृश्चिक
जुलैतील ग्रह गोचरामुळे आत्मविश्वासात वाढ असली तरी गुप्त खर्च/जबाबदायांमध्ये अडथळे येऊ शकतात .
शुभ अंक:
शुभ रंग: काळा

धनु
शनि वक्री आणि ग्रह बदलामुळे स्थानांतरसंबंधित शक्यता; खर्च सावकाश ठेवा 
शुभ अंक:
शुभ रंग: नारिंगी

मकर
सरकारी वा व्यावसायिक प्रकल्पांमध्ये सहयोग उन्नती होण्याची शक्यता राहील .
शुभ अंक:
शुभ रंग: निळा

कुंभ
सामाजिक प्रतिष्ठा वाढ वैयक्तिक संतुलन साधण्यास उत्साह. घरगुती आणि व्यावसायिक क्षेत्रात समाधान.
शुभ अंक:
शुभ रंग: जांभळा

मीन
भावनिक संतुलन आणि आध्यात्मिक प्रगती वाढेल. आर्थिक दृष्ट्या दिवस मध्यम अनुकूल.
शुभ अंक:
शुभ रंग: पांढरा

वाचकांनी वरील भविष्यवाणीचा अर्थ अचूक भविष्यवाणी म्हणून लावता केवळ आत्मपरीक्षण आणि सकारात्मक प्रेरणा म्हणून घ्यावा.

अनुदान म्हणजे मदत की लूट? नोटिसा-बोज्यां बसवणे असे वेळ मारू प्रकार करण्यापेक्षा दोषी हरामखोरांवर थेट गुन्हे दाखल करा – संदीप महाजन

0

Loading

पाचोरा – राज्यातील शेतकरी अनुदान घोटाळा हा आता एखाद्या तहसीलपुरता, एखाद्या गावापुरता किंवा एखाद्या कर्मचाऱ्यापुरता मर्यादित राहिलेला नाही. जालना, मुक्ताईनगर ,पाचोरा तालुक्यात कोट्यवधी रुपयांचा अनुदान घोटाळा उघडकीस आला, गुन्हे दाखल झाले, काही आरोपी सब जेलमध्ये गेले, तरीही जर पाचोरा तालुक्यातील अतुर्ली, वडगाव, हडसन, नगरदेवळा नजिकच्या पिंपळगाव क्षेत्रात त्याचीच पुनरावृत्ती होत असेल, तर हा केवळ प्रशासकीय चुकांचा विषय राहत नाही. हा प्रकार स्पष्टपणे संघटित आर्थिक गुन्ह्याच्या दिशेने जात असल्याचे संकेत देतो. अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने आणि पारदर्शक मदत मिळावी, या उद्देशाने सुरू करण्यात आलेली ई-पंचनामा प्रणाली प्रत्यक्षात गैरवापराची साधन बनत असेल, तर ती यंत्रणा कोणाच्या फायद्यासाठी चालते आहे, हा प्रश्न विचारण्याची वेळ आता आली आहे. पिंपळगाव परिसरात ४७ शेतकऱ्यांच्या खात्यावर जादा अनुदानाची रक्कम जमा झाल्याचे समोर येते, प्रशासन नोटिसा बजावते, आठ दिवसांची मुदत देते, सातबाऱ्यावर सरकारी बोजा बसविण्याचा इशारा देते; पण या सगळ्या प्रक्रियेतून खरा प्रश्न सुटतो का, की तो अधिकच झाकला जातो, याचा गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे. मी, शेतकरी अनुदान घोटाळा आंदोलक संदीप महाजन, ठामपणे मांडतो की आजचा मुद्दा केवळ “जादा रक्कम परत करा” इतक्यापुरता मर्यादित नाही. प्रश्न आहे शासनाच्या अनुदान व्यवस्थेची विश्वासार्हता, तिच्यावर नियंत्रण ठेवणाऱ्या यंत्रणेची जबाबदारी आणि या व्यवस्थेचा गैरवापर रोखण्याची राजकीय व प्रशासकीय इच्छाशक्ती. ई-पंचनामा प्रणाली अतिवृष्टी, अवकाळी पाऊस, नैसर्गिक आपत्ती यामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना त्वरित दिलासा देण्यासाठी सुरू झाली होती. मात्र प्रत्यक्षात या प्रणालीत तांत्रिक त्रुटी, मानवी चुका आणि प्रशासकीय हलगर्जीपणा यांच्या नावाखाली क्षेत्रफळ फुगवणे, डेटा बदलणे, खात्यांत रक्कम वळवणे हे प्रकार घडले. पिंपळगावमध्ये काही शेतकऱ्यांकडे अवघी एक एकर जमीन असताना दोन ते तीन एकर, तर काही प्रकरणांत थेट तीन हेक्टरपर्यंत नुकसानभरपाई गेली, हे वास्तव प्रशासनालाच लाजिरवाणे आहे. याहून गंभीर बाब म्हणजे हे सगळे घडले तरी आजपर्यंत कोणत्याही वरिष्ठ अधिकाऱ्याची जबाबदारी निश्चित झालेली दिसत नाही. तर दुसऱ्या बाजूला तहसील प्रशासन 2019 पासून ते आज पर्यंत पीडीएफ स्वरूपात सविस्तर अनुदान यादी जाहीर करण्यास तयार नाही आज जादा रक्कम मिळालेल्या खातेदारांना नोटिसा देत आहे; पण मी थेट विचारतो की ही रक्कम परत केल्यावर गुन्हा संपतो का. जर एखाद्या बँक खात्यात चुकून जादा पैसे जमा झाले आणि त्या खातेदाराने ते काढून वापरले, तर तो गुन्हा ठरतो. मग शासकीय अनुदानाच्या बाबतीत वेगळा न्याय का. राज्यभर अनुदान घोटाळ्याची चर्चा सुरू असताना, कोणाच्याही खात्यावर अचानक मोठी रक्कम जमा झाली, तर ती वापरणे हे अज्ञान म्हणून चालणार नाही; ती सरळसरळ नैतिक आणि कायदेशीर बेपर्वाई आहे. शेतकऱ्यांचा पैसा हा कोणाच्या बापाचा पैसा नाही की तो मनमानीने काढून वापरला जावा. आज नोटिसा, मुदत, बोजा या सगळ्या गोष्टी सुरू आहेत; पण ही प्रक्रिया जाणीव पुर्वक वेळखाऊ असून ती प्रशासनासाठी सोयीची आणि दोषींना वाचवणारी आहे. या प्रक्रियेत सर्वात मोठा फटका बसतो तो खऱ्या हक्कदार शेतकऱ्यांना. ज्यांचे प्रत्यक्ष नुकसान झाले, ज्यांच्या शेतात पिके वाहून गेली, ज्यांची आर्थिक गणिते कोलमडली, त्यांचे पैसे आजही अडकलेले आहेत आणि त्यांना आजही “तपास सुरू आहे” हेच उत्तर मिळते. प्रशासन जादा रक्कम वसूल करण्याच्या फाईली फिरवत असताना, मूळ लाभार्थ्यांना दिलासा देण्याची कोणतीही ठोस व्यवस्था दिसत नाही. मागील काळात काही प्रकरणांत खातेधारकांची दिशाभूल करून त्यांच्या खात्यात रक्कम मागवण्यात आली, असे सांगण्यात आले तर काहींना त्या नावाखाली जाणीवपूर्वक वाचवले देखील पण आज परिस्थिती वेगळी आहे. आज सर्वत्र अनुदान घोटाळ्याची चर्चा असताना, थेट खात्यात आलेली रक्कम वापरणे हे केवळ दिशाभूल म्हणून झाकता येणार नाही. म्हणूनच मी ठामपणे सांगतो की आता नोटिसा देणे आणि मालमत्तेवर सरकारी बोजा बसवणे हा उपाय नाही. सर्व जबाबदारांवर थेट गुन्हे दाखल करा. हरामखोरांवर कारवाई करा. शेतकऱ्यांचा पैसा बापाचा पैसा समजून काढणाऱ्यांना कायद्याच्या चौकटीत तात्काळ अटक करा आणि पैसे वसूल करा. फक्त महसुली कारवाई पुरेशी नाही; फौजदारी कारवाई हाच एकमेव प्रभावी मार्ग आहे. पण प्रश्न इथेच थांबत नाही. जर तहसीलदार, तलाठी, डेटा ऑपरेटर किंवा एखादा लिपिक दोषी असेल, तर त्यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे; मात्र त्यांच्या वरचे अधिकारी गप्प कसे राहतात, हा प्रश्न अधिक गंभीर आहे. पंचनाम्यांवर सही कोणी केली, डेटा मंजूर कोणी केला, तपास सुरू असतानाही पुन्हा तसाच प्रकार कसा घडतो, याची उत्तरे प्रशासनाला द्यावी लागतील. याचा अर्थ कुठेतरी राजकीय आणि प्रशासकीय संरक्षण आहे, अशी शंका निर्माण होते आणि त्यामुळे हा विषय आता केवळ तहसील कार्यालयापुरता राहत नाही, तर तो थेट राजकीय जबाबदारीचा बनतो. याच पार्श्वभूमीवर मी जळगाव जिल्हा आणि पाचोरा तालुक्यातील सर्व राजकीय पक्षांच्या मान्यवरांना थेट उद्देशून विचारतो की निवडणुकीच्या काळात शेतकऱ्यांच्या बांधावर उभे राहणारे, कर्जमाफी आणि अनुदानाच्या घोषणा करणारे लोकप्रतिनिधी आज कुठे आहेत. पाचोरा तालुक्यात कोट्यवधींचा घोटाळा उघडकीस येऊनही पिंपळगावमध्ये त्याची पुनरावृत्ती होत असेल, तर प्रशासनाला भीती का वाटत नाही, याचे उत्तर राजकीय मौनात दडलेले आहे. दोषी अधिकाऱ्यांवर कारवाईची ठोस मागणी तुम्ही केली आहे का, तहसील कार्यालयाला जाब विचारला आहे का, हक्कदार शेतकऱ्यांना तातडीने अनुदान मिळावे यासाठी तुम्ही कोणती ठोस कृती केली आहे, हे प्रश्न आज अनुत्तरित आहेत. जर आजही भूमिका केवळ “तपास चालू आहे” एवढ्यावरच मर्यादित राहिली, तर उद्या शेतकरी लोकप्रतिनिधींनाच जबाबदार धरतील, कारण हा प्रश्न केवळ पैशांचा नाही, तर विश्वासाचा आहे. आज शेतकऱ्याला असे वाटू लागले आहे की आपत्ती आली तर नुकसान भरपाई मिळेल की कोणाच्या खात्यावर पैसे जातील, हेच निश्चित नसते. अशा व्यवस्थेवर विश्वास ठेवून शेतकरी कसा जगायचा. म्हणून मी, शेतकरी अनुदान घोटाळा आंदोलक संदीप महाजन, जळगाव जिल्हा आणि पाचोरा तालुक्यातील सर्व राजकीय पक्षांच्या मान्यवरांना स्पष्टपणे सांगतो की केवळ निवेदनं देऊन,अधिवेशनात लक्षवेधी उपस्थित करून, भेटीगाठी घेऊन हा विषय संपणार नाही. थेट कारवाईची मागणी करा, गुन्हे दाखल करा, दोषींना अटक करा आणि पैसे वसूल करा. जर आज तुम्ही गप्प बसलात, तर उद्या हा घोटाळा तुमच्याही नावावर लिहिला जाईल, कारण अन्यायाच्या वेळी मौन बाळगणारेही अन्यायाचे भागीदार ठरतात. पिंपळगावचे प्रकरण हा शेवटचा इशारा आहे. आज कठोर निर्णय झाले नाहीत, तर उद्या संपूर्ण जिल्ह्यात अनुदान म्हणजे लॉटरी बनेल. शेतकऱ्यांच्या घामाचे पैसे अशा पद्धतीने लुटले जाणे हे राज्याला परवडणारे नाही. आता वेळ आली आहे नोटिसांपलीकडे जाण्याची, बोज्यांपलीकडे जाऊन थेट गुन्हे दाखल करण्याची आणि शेतकऱ्यांचा विश्वास परत मिळवण्याची.

आज दि 29/12/2025 चे सर्व राशीचे भविष्य व शुभ अंक व रंग

0

Loading

मेष
आज तुमचा उत्साह ऊर्जावान असेल. कामकाजात निर्णय घेण्याची क्षमता वाढेल. मात्र, अचानक वादविवाद टाळा.
शुभ अंक:
शुभ रंग: लाल

वृषभ
शुक्र देवाच्या गोचरामुळे आर्थिक आणि प्रतिष्ठात्मक लाभ होण्याची शक्यता आहे; गुंतवणुकीत सावधगिरी घ्या.
शुभ अंक:
शुभ रंग: गुलाबी 

मिथुन
आज करिअर आणि आर्थिक स्थिरतेत फायदा; कौटुंबिक वातावरण देखील आनंददायी राहील.
शुभ अंक:
शुभ रंग: पिवळा 

कर्क
महालक्ष्मी राजयोगामुळे मालमत्तेत वाढ आणि नोकरीसाठी लाभदायक योग; पालकांशी संबंध सुधारतील.
शुभ अंक:
शुभ रंग: निळा 

सिंह
नेतृत्वगुण वृद्धिंगत होतील; आर्थिक प्रतिष्ठेत वाढ होईल आणि मानमंदिरांचा फायदा मिळेल.
शुभ अंक:
शुभ रंग: सोनेरी

कन्या
जुलैमध्ये व्यावसायिक प्रवासात अडचणी येऊ शकतात; आज संयम आणि लक्ष्य साध्य करण्यासाठी तग धरावा.
शुभ अंक:
शुभ रंग: हिरवा 

तुला
राजयोगामध्ये तुम्हाला कामात उन्नती आणि आर्थिक लाभ मिळतील; कौटुंबिक वातावरण सुखकर राहील.
शुभ अंक:
शुभ रंग: गुलाबी

वृश्चिक
आज गुप्त खर्चात नियंत्रण ठेवा, निर्णय घेताना विचारपूर्वक वागा.
शुभ अंक:
शुभ रंग: काळा 

धनु
गुरुसूर्य युतीमुळे वाद मिटतील, कामात सुधारणा; तथापि, खर्च नियंत्रणात ठेवा.
शुभ अंक:
शुभ रंग: नारिंगी 

मकर
शासन/व्यवसाय क्षेत्रात प्रगती; आरोग्य भक्कम, पण जबाबदाऱ्यांची जाणीव ठेवा.
शुभ अंक:
शुभ रंग: निळा 

कुंभ
सामाजिक स्तरावर मान वाढेल, वैवाहिकनातेसंबंध सुधारतील; नवीन प्रकल्पांसाठी अनुकूल दिवस.
शुभ अंक:
शुभ रंग: जांभळा

मीन
आज राजयोगाचा परिणाम तुमच्या करिअर, ओळखी आर्थिक यशात दिसेल. मानसिक संतुलनही राहील.
शुभ अंक:
शुभ रंग: पांढरा

वाचकांनी वरील भविष्यवाणीचा अर्थ अचूक भविष्यवाणी म्हणून लावता केवळ आत्मपरीक्षण आणि सकारात्मक प्रेरणा म्हणून घ्यावा.

शेतकऱ्यांच्या उदासिनतेचा फायदा घेत पाचोरा तहसील अंतर्गत अनुदान घोटाळा सुरूच; शेतकऱ्यांचे कैवारी म्हणून ओळख असलेले पालकमंत्री नामदार गुलाबराव पाटील यांची रहस्यमय चुप्पी, दोषींवर तातडीने गुन्हे दाखल करून कठोर कारवाईची मागणी

0

Loading

पाचोरा : पाचोरा तहसील कार्यालयाच्या कार्यक्षेत्रात शेतकरी अनुदान व विमा रकमेबाबत सुरू असलेला घोटाळा थांबण्याचे नाव घेत नसून, शेतकऱ्यांच्या उदासिनतेचा आणि महसूल प्रशासनातील अनागोंदीचा गैरफायदा घेत परस्पर रक्कम वर्ग करण्याचे प्रकार सातत्याने समोर येत आहेत. नगरदेवळा येथे सुमारे ५० ते ५५ शेतकऱ्यांना अपेक्षेपेक्षा जास्त अनुदान मिळाल्याचे उघडकीस येताच संपूर्ण तालुक्यात एकच खळबळ उडाली असून गावात व पंचक्रोशीत या प्रकरणावर जोरदार चर्चा सुरू आहे. या प्रकरणी काही शेतकऱ्यांनी स्वतःहून तहसील कार्यालयात आपली बाब कळवल्याची माहिती असून, संबंधित शेतकऱ्यांना नोटिसा बजावून रक्कम भरण्याबाबत सूचना देण्यात आल्याचे समजते. मात्र, मुळात शेतकऱ्यांच्या नावावर मंजूर झालेली रक्कम दुसऱ्यांच्या खात्यात कशी वळली, कुणाच्या आदेशाने व कुणाच्या संगनमताने हा प्रकार घडला, याबाबत प्रशासनाकडून ठोस, स्पष्ट व पारदर्शक भूमिका मांडली जात नसल्याने संशय अधिकच बळावत आहे. शेतकरी अनुदान घोटाळा आंदोलक संदीप महाजन यांनी या संदर्भात सातत्याने एकच ठाम मागणी लावून धरली आहे. २०१९ पासून आजपर्यंत शेतकरी अनुदान असो किंवा पीक विमा, ज्या-ज्या शेतकऱ्यांना कोणत्याही योजनेअंतर्गत रक्कम मिळाली आहे, ती संपूर्ण माहिती गावनिहाय व लाभार्थीनिहाय पीडीएफ स्वरूपात सार्वजनिक करण्यात यावी, जेणेकरून प्रत्येक शेतकऱ्याला आपले पैसे आले की नाहीत, किती आले, कोणत्या योजनेतून आले आणि कोणाच्या खात्यात जमा झाले याची स्पष्ट व पारदर्शक माहिती मिळू शकेल. मात्र, तहसील कार्यालयाने जाणीवपूर्वक अशी माहिती देणे शक्य नसल्याचे लेखी स्वरूपात कळवले असून, हे शासनाच्या पारदर्शकतेच्या धोरणालाच हरताळ फासणारे असल्याचे महाजन यांनी नमूद केले. शासनाचे अधिकृत परिपत्रक अस्तित्वात असताना अनुदान व विमा रकमेची माहिती सार्वजनिक करण्यास तहसील कार्यालय का टाळाटाळ करत आहे, असा गंभीर सवाल उपस्थित केला जात असून, तहसीलदार स्वतःला पारदर्शक प्रशासनाचे समर्थक म्हणवत असतील तर “कर नाही तर डर कशाला” या उक्तीप्रमाणे सर्व माहिती जाहीर करण्यास अडचण काय, असा थेट प्रश्न शेतकऱ्यांकडून विचारला जात आहे. या प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर पाचोरा-भडगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार किशोर आप्पा पाटील तसेच भविष्यात जिल्हा परिषद, पंचायत समिती व ग्रामपंचायत निवडणुकांसाठी इच्छुक असलेल्या सर्व लोकप्रतिनिधींनी व विविध पक्षातील राजकारणी मान्यवर प्रतिनीधीनी या प्रश्नावर स्पष्ट भूमिका घ्यावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. दरम्यान, स्वतःला शेतकरी पुत्र व शेतकऱ्यांचे कैवारी म्हणून घेणारे जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार गुलाबराव पाटील या गंभीर प्रकरणावर अद्याप चुप्पी साधून असल्याचे चित्र असून, शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर नेहमी आक्रमक भूमिका घेणारा त्यांचा बाणा स्वतःच्याच जिंल्हयात या प्रकरणात कुठे गेला, असा सवाल पंचक्रोशीत चर्चेचा विषय ठरला आहे. स्वतः जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री असताना त्यांच्या जिंल्हयात एवढा मोठा अनुदान घोटाळा उघडकीस येऊनही ठोस प्रतिक्रिया न देणे, चौकशीचे आदेश न देणे किंवा दोषींवर कठोर कारवाईची भूमिका न मांडणे यामुळे शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. दुर्दैवाने पाचोरा तालुक्यातील अनेक शेतकरी या प्रकाराबाबत उदासीन असल्याचे चित्र असून, वडगाव, अंतुर्ली, नगरदेवळा अशी सलग प्रकरणे उघडकीस येऊनही ठोस जनआंदोलन उभे राहत नसल्याने घोटाळेखोरांचे मनोबल वाढत आहे. नुकत्याच झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकरी आधीच संकटात सापडला असून, शेतीमालाला भाव मिळत नसताना शासनाची मदतही चुकीच्या खात्यांत वळवली जात असेल तर हा शेतकऱ्यांवर दुहेरी अन्याय ठरत आहे. या पार्श्वभूमीवर आमदार किशोरआप्पा पाटील त्यांचे पुत्र नगरसेवक सुमित किशोरआप्पा पाटील यांनी पूरस्थितीत कमरे बरोबर स्वतःपाण्यात शिरून गरजूंना शासकीय सह स्वतः वैयक्तिक सुद्धा मदत केली, मात्र कर्मचारी याच प्रणालीतील त्रुटीचा गैरफायदा घेत काही शासकीय कर्मचाऱ्यांनी अनुदानाची रक्कम ओळखीच्या व नातेवाईकांच्या खात्यात वळवल्याचे गंभीर आरोप समोर आले आहेत. या प्रकरणावर कोणाचाही प्रभावी अंकुश नसल्याने महसूल विभागात मनमानी व जाणीवपूर्वक अनागोंदीचा कारभार सुरू असल्याचा आरोप होत असून, ज्या शेतकऱ्यांची रक्कम जाणीव पुर्वक काढली आणि परस्पर वापरली आहे त्यांच्याकडून वसुली करण्याऐवजी प्रत्यक्ष दोषींवर तातडीने गुन्हे दाखल करून रक्कम वसूल करावी तसेच संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कठोर विभागीय व फौजदारी कारवाई करावी, अशी ठाम मागणी शेतकरी अनुदान घोटाळा आंदोलक संदीप महाजन यांनी केली आहे.

आज दि.28/12/2025 चे सर्व राशीचे भविष्य व शुभ अंक व रंग

0

Loading

मेष
आज तुमचा आत्मविश्वास वाढेल. कामात नियोजन करून निर्णय घेतल्यास फायदा होईल. कुटुंबात संवाद साधताना संयम हवा.
शुभ अंक:
शुभ रंग: लाल

वृषभ
आज गुरु ग्रहाचे उदय तुमच्यासाठी लाभदायक ठरेल. आर्थिक स्थिती बळकट होईल आणि घरगुती कामाच्या आयुष्यात संतुलन निर्माण होईल 
शुभ अंक:
शुभ रंग: गुलाबी

मिथुन
गुरु ग्रह तुमच्यासाठी राजयोग निर्माण करत आहेकरिअरमध्ये प्रगती, सामाजिक संबंध आणि आर्थिक स्थैर्य यात सुधारणा होईल 
शुभ अंक:
शुभ रंग: पिवळा

कर्क
आज गुरु ग्रहामुळे मनःशांती लाभण्या बरोबर धार्मिक प्रवासाबाबत संधी देखील मिळतील. करिअरमध्ये उन्नती होण्याची शक्यता आहे .
शुभ अंक:
शुभ रंग: निळा

सिंह
गुरुची कृपा तुमच्यात राजयोग निर्माण करेल, आर्थिक स्थिती सुधारेल, नेतृत्वगुण वाटतील आणि पारिवारिक सौहार्द वाढेल 
शुभ अंक:
शुभ रंग: सोनेरी

कन्या
आज ग्रह गोचरामुळे सजग राहावे. कामात अचानक बदल किंवा थोडासा ताण अनुभवायला मिळेल. निर्णयात संयम ठेवा 
शुभ अंक:
शुभ रंग: हिरवा

तुला
आज गुरुमंगलचंद्र युतीमुळे राजयोग निर्माण होतो आहे. कामात प्रगती आणि आर्थिक लाभ मिळतील; प्रेमनीय संबंधात सुख राहील 
शुभ अंक:
शुभ रंग: गुलाबी

वृश्चिक
आज खर्च आणि जबाबदाऱ्यांमध्ये अडचणी येऊ शकतात. शब्दनियंत्रण खर्चावर नियंत्रण ठेवा; निर्णय विचारपूर्वक घ्या 
शुभ अंक:
शुभ रंग: काळा

धनु
आज साधारण सुखद; जोडीनात्यांत सुधारणा होईल, तसेच शिक्षकता, प्रवासशिक्षणसंधी योग राहील.
शुभ अंक:
शुभ रंग: नारिंगी

मकर
आज खर्च वक्री शनीच्या परिणामांनी नियंत्रित राहतील. तज्ञांचा सल्ला घेतल्यास व्यवसायात प्रगती होईल 
शुभ अंक:
शुभ रंग: निळा

कुंभ
गुरु ग्रहाचा उदय अधिकारी प्रभावासाठी उत्तम योग देत आहे. सामाजिक प्रतिष्ठा वाढेल, आर्थिक स्थैर्यता बनेल आणि प्रकल्पांमध्ये स्वीकृती मिळेल 
शुभ अंक:
शुभ रंग: जांभळा

मीन
आज महालक्ष्मी राजयोगामुळे आर्थिक लाभ, करिअरमध्ये उन्नती आत्मविश्वास मिळेल. जोडप्रेमातही सामंजस्य राहील 
शुभ अंक:
शुभ रंग: पांढरा

वाचकांनी वरील भविष्यवाणीचा अर्थ अचूक भविष्यवाणी म्हणून लावता केवळ आत्मपरीक्षण आणि सकारात्मक प्रेरणा म्हणून घ्यावा.

नियम कागदावरच, व्यवहार पैशावर? पाचोरा ग्रामीण रुग्णालयातील विवाह नोंदणी विभागाचा भोंगळ कारभार

0

Loading

पाचोरा – ग्रामीण रुग्णालयात कार्यरत असलेल्या विवाह नोंदणी विभागामध्ये सध्या अत्यंत भोंगळ व अनागोंदी स्वरूपाचा कारभार सुरू असल्याचा गंभीर प्रकार समोर येत आहे. शासनाने नागरिकांना सुलभ, पारदर्शक व वेळेत सेवा मिळाव्यात या उद्देशाने विवाह नोंदणीची सुविधा उपलब्ध करून दिली असली, तरी प्रत्यक्षात या विभागात सर्वसामान्य नागरिकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. या विभागातील संबंधित कर्मचारी यांच्या जाण्या-येण्याची वेळ निश्चित नसल्याने नागरिकांना कार्यालयात येऊनही तासन्‌तास वाट पाहावी लागते. अनेक वेळा कार्यालय उघडे असतानाही लाईट व पंखे सुरू ठेवलेले असतात; मात्र प्रत्यक्षात कार्यालयात कोणताही कर्मचारी उपस्थित नसतो, अशी तक्रार वारंवार केली जात आहे. परिणामी, दूरवरून आलेल्या अर्जदारांचा वेळ, पैसा आणि श्रम वाया जात आहेत. नागरिकांनी दूरध्वनीवरून संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, “कामानिमित्त बाहेर आहे” असे सांगून वेळ मारून नेली जाते, असा अनुभव अनेकांनी व्यक्त केला आहे. विशेष म्हणजे, काही वेळा आर्थिक देवाण-घेवाण केल्यास कामे त्वरित पूर्ण होतात, तर नियमाप्रमाणे अर्ज सादर करणाऱ्या सामान्य नागरिकांना मात्र आठवड्यांनंतरही दाखल्यासाठी प्रतीक्षा करावी लागते, असा आरोपही होत आहे. हा प्रकार प्रशासनाच्या पारदर्शकतेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण करणारा आहे. विवाह नोंदणीचा अर्ज दिल्यानंतर विवाह दाखला तयार होण्यासाठी नियमाने किती कालावधी लागतो, याची स्पष्ट माहिती कार्यालयात कुठेही दर्शविण्यात आलेली नाही. त्यामुळे नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण होतो. तसेच अनेक वेळा अपूर्ण अर्ज स्वीकारले जातात आणि नंतर कागदपत्रांच्या नावाखाली पुन्हा-पुन्हा नागरिकांना बोलावले जाते. एकाच वेळी कोणती कागदपत्रे आवश्यक आहेत, याची सविस्तर माहिती दर्शविणारा फलक कार्यालयात लावण्यात यावा, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. याशिवाय, संबंधित कार्यालयात कार्यरत असलेले अधिकारी व कर्मचारी कोण आहेत, त्यांची नावे, हुद्दे व संपर्क क्रमांक यांची माहिती दर्शविणारा फलक असणे अत्यावश्यक आहे. मात्र सध्या अशी कोणतीही माहिती उपलब्ध नसल्याने नागरिकांना नेमके कोणाशी संपर्क साधावा, हेही समजत नाही. तसेच संबंधित कर्मचारी स्थानिक रहिवासी आहेत की अप-डाऊन करून ये-जा करतात, याचीही वरिष्ठ स्तरावरून सखोल परताळणी करण्यात यावी, अशी मागणी पुढे येत आहे. या संपूर्ण प्रकरणाची वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तातडीने दखल घेऊन चौकशी करावी, विवाह नोंदणी विभागातील कारभार नियमबद्ध, पारदर्शक व नागरिकाभिमुख करण्यासाठी ठोस उपाययोजना राबवाव्यात, अशी अपेक्षा पाचोरा परिसरातील नागरिक व्यक्त करीत आहेत. अन्यथा शासनाच्या लोकाभिमुख सेवेची संकल्पना केवळ कागदावरच राहील, अशी संतप्त भावना नागरिकांमध्ये व्यक्त होत आहे.

आज दि 27/12/2025 चे सर्व राशीचे भविष्य व शुभ अंक व रंग

0

Loading

मेष
आज स्वविकासाच्या संधी दिसतील; जुन्या प्रयत्नांचे फळ मिळू शकते, परंतु एखाद्या निर्णयात ताण येऊ शकतो.
शुभ अंक: शुभ रंग: लाल

वृषभ
गुरुउदय आणि मालव्य राजयोगामुळे कामव्यवसायात आणि आर्थिक क्षेत्रात स्थैर्य आणि वाढ दिसेल.
शुभ अंक: शुभ रंग: गुलाबी 

मिथुन
आज तुमची बुद्धिमत्ता आणि संवादकौशल्य उपयोगी ठरेल. पण ग्रह गोचरामुळे मानसिक तणाव जाणवू शकतोसंयम ठेवा.
शुभ अंक: शुभ रंग: पिवळा

कर्क
मालव्य राजयोगामुळे करिअर आणि प्रवासाच्या संधी मिळतील; नवीन कल्पना राबवण्यासाठी अनुकूल.
शुभ अंक: शुभ रंग: निळा

सिंह
राजयोगाचा परिणाम कुटुंब व्यवसायात दिसून येईल, पण आरोग्य संयम याचा विचार करा.
शुभ अंक: शुभ रंग: सोनेरी 

कन्या
आज कार्यप्रकारात स्पर्धा आणि विरोध होऊ शकतो; निर्णयात सतर्कता आवश्यक.
शुभ अंक: शुभ रंग: हिरवा

तुला
वर्तमान गोचरात संभाषण आणि आर्थिक बाबींमध्ये सतर्कता गरजेची आहे; घडामोडी नियंत्रणात ठेवा.
शुभ अंक: शुभ रंग: गुलाबी 

वृश्चिक
मालव्य राजयोग आणि शनि वक्री यांच्या परिणामी आर्थिक वाढ, पण खर्चावर लक्ष ठेवणे गरजेचे आहे.
शुभ अंक: शुभ रंग: काळा 

धनु
आज प्रवास, शिक्षण किंवा नवकल्पनांमध्ये फायदा मिळू शकतो; याचवेळी, खर्च नियंत्रणात ठेवा.
शुभ अंक: शुभ रंग: नारिंगी 

मकर
शनि वक्रीमुळे काही आव्हाने असली तरी, करिअर आर्थिक योजनांमध्ये बळकट निर्णय घेण्याची संधी राहील.
शुभ अंक: शुभ रंग: निळा 

कुंभ
मालव्य राजयोगामुळे सामाजिक प्रतिष्ठा करिअरमध्ये प्रगती होईल, पण मानसिक शांती राखण्यासाठी ध्यान उपयुक्त ठरेल.
शुभ अंक: शुभ रंग: जांभळा 

मीन
शनि वक्रीच्या परिणामामुळे आर्थिक स्थैर्य प्रगती दिसून येईल, पण खर्चावर लक्ष द्या.
शुभ अंक: शुभ रंग: पांढरा

वाचकांनी वरील भविष्यवाणीचा अर्थ अचूक भविष्यवाणी म्हणून लावता केवळ आत्मपरीक्षण आणि सकारात्मक प्रेरणा म्हणून घ्यावा.

आज दि.26/12/2025 चे सर्व राशीचे भविष्य व शुभ अंक व रंग

0

Loading

मेष
आजच्या ग्रहस्थितीत तुमच्या मेहनतीला मान्यता मिळेल. आर्थिक प्रतिष्ठात्मक क्षेत्रात वाढ होऊ शकते. निर्णय घेताना थोडी सावधगिरी आवश्यक.
शुभ अंक: शुभ रंग: लाल

वृषभ
भावनांच्या बाजूने थोडे अस्थिरता येऊ शकतात, त्यामुळे निर्णय मागे घेण्याचा विचार करा. कामात समर्पण नेहमी प्रमाणे फायदेशीर ठरेल.
शुभ अंक: शुभ रंग: गुलाबी

मिथुन
मानसिक ताण जाणवेल आणि कामातील जबाबदाऱ्या वाढतील. दिवसभर संयमाने वागल्यास काम सुगम होईल.
शुभ अंक: शुभ रंग: पिवळा

कर्क
आजचा दिवस सर्जनशील व्यावसायिक दोन्ही बाबतीत सकारात्मक ठरू शकतो. प्रवास किंवा संभाषणातून फायदा होईल.
शुभ अंक: शुभ रंग: निळा

सिंह
तुमच्या नेतृत्वगुणांना बल मिळेल. कोणताही निर्णय घ्यायचा असल्यास आत्मविश्वासातून पावले टाका; आरोग्यावर ताण टाळा.
शुभ अंक: शुभ रंग: सोनेरी

कन्या
विरोधकांच्या दबावाखाली येऊ शकता; परंतु योग्य नियोजनाने तो मात करता येईल. खर्चात संयम ठेवा.
शुभ अंक: शुभ रंग: हिरवा

तुला
आर्थिक बाबींमध्ये सावधगिरी आवश्यक आहे. प्रिय व्यक्तींसोबत संवादातून समाधान मिळेल.
शुभ अंक: शुभ रंग: गुलाबी

वृश्चिक
आज आर्थिक लाभ आणि खर्च दोन्ही दिसणार आहेत. परंतु अनावश्यक खर्च टाळायला हवे.
शुभ अंक: शुभ रंग: काळा

धनु
शारीरिक आणि मानसिक उर्जा चांगली राहील. पण खर्चाविषयी जागरूक रहा. प्रवास किंवा शिक्षणाची संधी लाभदायक राहील.
शुभ अंक: शुभ रंग: नारिंगी

मकर
आज वक्री शनीचा प्रभाव तुम्हाला कठोर निर्णयांची शक्यता देऊ शकतो. कारकिर्दीत सुधारणा तर होतच, पण संयम आवश्यक राहील.
शुभ अंक: शुभ रंग: निळा

कुंभ
सभोवताली सामाजिक वातावरण सकारात्मक राहील. जुनी गुंतवणूक वा कामातून स्थिरता लाभेल.
शुभ अंक: शुभ रंग: जांभळा

मीन
शासन आणि आर्थिक समतोल साधण्याचा योग दिसतोय. परंतु खर्च आणि भावनिक दोन्हीकडे नियंत्रण आवश्यक.
शुभ अंक: शुभ रंग: पांढरा

वाचकांनी वरील भविष्यवाणीचा अर्थ अचूक भविष्यवाणी म्हणून लावता केवळ आत्मपरीक्षण आणि सकारात्मक प्रेरणा म्हणून घ्यावा.

पाचोऱ्यात शेतकरी अनुदान घोटाळा कारवाई नंतरही रॅकेट सुरूच; 2025 मध्ये डॉक्टराचे पावणे दोन लाख चुकीच्या खात्यावर पैसेही काढले – पाणी नेमकं कुठे मुरतंय?

0

Loading

पाचोरा – तालुक्यात शेतकऱ्यांच्या अनुदानाचा प्रश्न पुन्हा एकदा गंभीर वळणावर येऊन ठेपला असून चुकीच्या बँक खात्यांत अनुदानाची रक्कम वर्ग होण्याचे प्रकार अद्याप थांबलेले नाहीत, त्यामुळे संपूर्ण अनुदान वितरण व्यवस्थेची विश्वासार्हता धोक्यात आली असून प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर तीव्र प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. विशेष म्हणजे यापूर्वी अशा चुकीच्या खात्यांवर कारवाई करून अनेक बँक खाती ब्लॉक करण्यात आली होती तसेच काही प्रकरणांमध्ये गुन्हे दाखलही झाले होते, तरीही नव्या वर्षात पुन्हा त्याच स्वरूपाचे प्रकार घडत असल्याने ही बाब केवळ तांत्रिक चूक म्हणून झटकून टाकता येणार नाही अशी ठाम भूमिका आता जनतेतून पुढे येत आहे. या संपूर्ण प्रकरणाची पार्श्वभूमी पाहिली असता शेतकरी अनुदान घोटाळा प्रकरणी आंदोलन सुरू झाल्यापासूनच शेतकरी अनुदान घोटाळा आंदोलक संदीप महाजन सातत्याने प्रशासनाकडे पारदर्शकतेची मागणी करत असून २०१९ पासून त्यांनी माहिती अधिकार कायद्यांतर्गत पाचोरा तहसील कार्यालयाकडे शेतकरी अनुदानाची संपूर्ण यादी पीडीएफ स्वरूपात उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे. शासनाचे स्पष्ट परिपत्रक, नियमांतील तरतुदी आणि माहिती अधिकार कायद्याची बंधनकारक अंमलबजावणी असतानाही ही यादी आजपर्यंत जाहीर करण्यात आलेली नाही, विशेष म्हणजे ही माहिती देण्यास तहसीलदारांकडून वारंवार नकार देण्यात आला असून ती अद्याप सार्वजनिक करण्यात आलेली नाही, हा प्रकार अत्यंत गंभीर व संशयास्पद असल्याचे मत व्यक्त केले जात आहे. संदीप महाजन यांचा आरोप आहे की शेतकरी अनुदान यादी जाणीवपूर्वक लपवली जात आहे कारण ती जाहीर झाल्यास अनेक गैरप्रकार, चुकीची खाती, अपात्र लाभार्थी आणि संभाव्य संगनमत उघडकीस येण्याची शक्यता आहे, माहिती अधिकार कायद्याचा उद्देशच प्रशासनातील पारदर्शकता वाढवणे हा असताना त्याच कायद्याचे उल्लंघन करून माहिती न देणे हे प्रशासनाच्या हेतूंवर गंभीर संशय निर्माण करणारे आहे. या प्रकरणातील आणखी गंभीर बाब म्हणजे ज्या तहसील कार्यालयात हा संपूर्ण अनुदान घोटाळा घडला आहे त्याच कार्यालयातील तहसीलदारांच्या मर्जीतील अधिकाऱ्यांचीच तपासणी समिती नेमण्यात आली असून या प्रकरणात फिर्यादी देखील तेच तहसीलदार आहेत, त्यामुळे आपणच आरोपी, आपणच तपासकर्ता आणि आपणच फिर्यादी अशी परिस्थिती निर्माण झाली आहे, अशा तपासातून सत्य बाहेर येईल का असा प्रश्न उपस्थित होत असून ही परिस्थिती नैसर्गिक न्यायाच्या तत्त्वांना हरताळ फासणारी असल्याचे मत व्यक्त केले जात आहे. दरम्यान चुकीच्या खात्यांवर कारवाई होऊनही पुन्हा नव्याने इतर खात्यांमध्ये शेतकऱ्यांची अनुदानाची रक्कम वळवली जाणे आणि ती रक्कम निर्लज्जपणे काढून वापरली जाणे यामागे अजूनही एक मोठे, संघटित आणि सक्रिय रॅकेट कार्यरत असल्याची दाट शक्यता व्यक्त केली जात आहे, ज्या खात्यांवर पूर्वी संशय होता ती खाती ब्लॉक झाल्यानंतरही नव्या खात्यांद्वारे हा गैरव्यवहार सुरू राहणे हे प्रशासनातील गंभीर त्रुटी, दुर्लक्ष किंवा जाणूनबुजून केलेले संगनमत दर्शवते. या संदर्भात संदीप महाजन यांनी अत्यंत ठाम आणि रोखठोक भूमिका घेत स्पष्ट शब्दांत सांगितले आहे की एखाद्या खातेदाराच्या खात्यात चुकून शेतकऱ्यांची अनुदानाची रक्कम वर्ग झाली असेल तर ती रक्कम वापरणे हा थेट गुन्हा आहे, संबंधित खातेदारांनी ती रक्कम तात्काळ न काढता प्रामाणिकपणे तहसील कार्यालयात जाऊन माझ्या खात्यावर चुकून रक्कम आली आहे अशी माहिती देणे कायदेशीर आणि नैतिकदृष्ट्या आवश्यक होते, मात्र तसे न करता काही खातेदारांनी ती रक्कम काढून स्वतःच्या उपयोगात आणल्याचे प्रकार समोर आले असून अशा व्यक्तींना कोणतीही गय देता कामा नये अशी ठाम मागणी त्यांनी केली आहे. त्यांनी उदाहरण देत सांगितले की यापूर्वी सव्वा लाख रुपयांच्या आसपासची रक्कम चुकीच्या खात्यांत वर्ग झाल्याचे प्रकरण समोर आले होते, आता मात्र जवळपास पावणे दोन लाख रुपयांची रक्कम पाचोरा तालुक्यातील अंतुर्ली खु. प्र.पा. परिसरातील एका वैद्यकीय व्यवसायीक तसेच प्रगतिशील शेतकरी यांच्या बाबतीत चुकीच्या पद्धतीने इतर व्यक्तीच्या खात्यात वर्ग झाल्याचा प्रकार उघड झाला आहे, ही रक्कम मोंढाळे येथील एका व्यक्तीच्या खात्यावर वर्ग झाली असून संबंधित डॉक्टरांनी त्या व्यक्तीशी संपर्क साधला असता त्याने आपल्या खात्यात रक्कम आल्याचे तसेच ती रक्कम काढून वापरल्याचे मान्य केल्याची माहिती पुढे आली आहे. हा प्रकार केवळ चूक म्हणून दुर्लक्षित करता येणार नाही कारण याआधीही अशाच स्वरूपाचे प्रकार घडले होते आणि त्यावर कारवाईही करण्यात आली होती, असे असताना नव्या वर्षात पुन्हा अशाच पद्धतीने रक्कम वर्ग कशी झाली, ती काढण्यासाठी संबंधित खातेदारांना परवानगी कशी मिळाली, बँकिंग प्रणालीतील अलर्ट्स का वाजले नाहीत आणि तहसील व संबंधित विभागांनी याची दखल का घेतली नाही असे अनेक गंभीर प्रश्न उपस्थित झाले असून त्यामुळेच अजूनही एक मोठे रॅकेट सक्रिय असल्याची शंका अधिक बळावत आहे. या पार्श्वभूमीवर जरी काही आरोपींवर चार्जशीट दाखल झालेल्या असल्या तरी संपूर्ण पाचोरा तहसील अनुदान घोटाळा प्रकरणाची चौकशी उच्च स्तरावरून होणे अत्यावश्यक असल्याचे मत संदीप महाजन यांनी व्यक्त केले असून केवळ खालच्या स्तरावरील कर्मचारी किंवा काही मोजक्याच खातेदारांवर कारवाई करून प्रकरण संपवण्याचा प्रयत्न झाला तर भविष्यात असे प्रकार पुन्हा पुन्हा घडण्याची शक्यता नाकारता येणार नाही असेही त्यांनी स्पष्ट केले आहे. या प्रकरणाकडे राजकीय स्तरावरूनही अपेक्षित ती गंभीरता दिसून येत नसल्याची खंत व्यक्त केली जात असून सत्ताधारी असोत किंवा विरोधक, फक्त बोलायची भात आणि बोलायची कडी या उक्तीप्रमाणे स्टेजवर भाषणे, प्रसारमाध्यमांसमोर प्रतिक्रिया आणि आश्वासने दिली जात आहेत मात्र प्रत्यक्षात कोणतीही ठोस कृती किंवा ॲक्शन मोड दिसून येत नाही, याच निष्क्रियतेमुळे हा प्रकार पुन्हा पुन्हा घडत असल्याचा आरोप होत आहे. शेतकऱ्यांच्या हक्काच्या पैशांचा प्रश्न असल्याने पाचोरा भडगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार किशोरआप्पा पाटील, माजी आमदार दिलीप भाऊ वाघ, अमोल भाऊ शिंदे आणि वैशालीताई सूर्यवंशी यांनी आपल्या मंत्र्यांच्या माध्यमातून या प्रकरणाकडे उच्च स्तरावरून लक्ष केंद्रित करावे अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली असून राजकीय मतभेद बाजूला ठेवून शेतकऱ्यांच्या हितासाठी एकत्रितपणे ठोस पावले उचलली जाणे गरजेचे असल्याचे मत व्यक्त होत आहे. दरम्यान या संपूर्ण घडामोडींमधून एक कटू वास्तव पुन्हा समोर आले आहे ते म्हणजे प्रामाणिक शेतकरी आजही असहाय्य आहे, शासनाच्या योजनांचा लाभ मिळवण्यासाठी तो सर्व नियम, कागदपत्रे आणि अटी पूर्ण करतो मात्र त्याच्याच नावावर मंजूर झालेली रक्कम इतर कुणाच्या खात्यात जाते आणि तोच शेतकरी तहसील, बँक आणि कार्यालयांच्या फेऱ्या मारत बसतो, त्यामुळे शेतकऱ्यांनी आता स्वतःच अधिक जागृत होणे अत्यंत आवश्यक आहे. शेतकऱ्यांनी आपल्या बँक खात्यात येणारी रक्कम, अनुदानाचे तपशील, संदेश आणि व्यवहार यांची नियमित तपासणी करावी, कुठलीही संशयास्पद बाब, रक्कम न मिळणे किंवा चुकीच्या व्यवहाराची शंका आल्यास तात्काळ तहसील कार्यालय, बँक आणि संबंधित प्रशासनाकडे लेखी तक्रार नोंदवावी कारण जोपर्यंत शेतकरी स्वतः सावध होत नाही तोपर्यंत त्याच्या हक्काच्या पैशांचे संरक्षण करणारा कोणी वाली नाही हे या प्रकरणातून पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे. एकूणच चुकीच्या खात्यांत अनुदान वर्ग होणे आणि ती रक्कम वापरणे हा केवळ आर्थिक गैरव्यवहार नसून शेतकऱ्यांच्या विश्वासाशी, त्यांच्या कष्टाशी आणि त्यांच्या जगण्याशी केलेली फसवणूक आहे, त्यामुळे या प्रकरणात कर्तव्यात कसूर करणारे अधिकारी, कर्मचारी तसेच चुकीने पैसे मिळूनही ते वापरणारे खातेदार यांना आरोपी करून कठोर कारवाई करणे आवश्यक असून भविष्यात असे प्रकार रोखण्यासाठी पारदर्शक, स्वतंत्र आणि उच्चस्तरीय चौकशी तसेच तांत्रिकदृष्ट्या सक्षम यंत्रणा उभी करणे ही काळाची नितांत गरज असल्याचे स्पष्टपणे दिसून येत आहे.

ताज्या बातम्या

error: Content is protected !!