Home Blog Page 143

मौजे कुरंगी येथे ग्रामस्तरीय दक्षता समितीची बैठक संपन्न

0

Loading

पाचोरा – जळगाव जिल्हाधिकारी व अपर जिल्हाधिकारी यांच्या सूचनेनुसार आज दि. 01 जानेवारी 2025 रोजी दुपारी 03:00 वाजता तहसीलदार पाचोरा यांच्या अध्यक्षतेखाली मौजे कुरंगी येथे ग्रामस्तरीय दक्षता समितीची बैठक पार पडली. या बैठकीस ग्रामपंचायत सरपंच श्रीमती मंगलाबाई पंढरीनाथ पाटील, उपसरपंच श्री. दिनकर सोनवणे, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामसेवक श्री. आबासाहेब पाटील, मंडळ अधिकारी श्रीमती वैशाली पाटील, ग्राम महसूल अधिकारी श्रीमती जिज्ञासा पाटील, तत्कालिन ग्राम महसूल

अधिकारी श्री. नदीम शेख तसेच गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
तत्कालीन ग्राम महसूल अधिकारी श्री. नदीम शेख यांनी गावकऱ्यांना संबोधित करताना वाळू चोरीमुळे होणारे दुष्परिणाम अधोरेखित केले. त्यांनी सांगितले की, नदीतून वाळू काढल्यास पाण्याची पातळी खालावते, विहिरींचे पाणी कमी होते आणि याचा थेट परिणाम गावातील शेती व पिण्याच्या पाण्यावर होतो. यासाठी गावकऱ्यांनी प्रशासनाला सहकार्य करणे गरजेचे आहे. प्रशासन व गावकऱ्यांच्या एकत्रित

प्रयत्नांमुळे अवैध गौणखनिज उत्खनन रोखले जाऊ शकते.
ग्रामपंचायत सदस्य श्री. योगेश पाटील यांनी जिल्हाधिकारी जळगाव यांच्या बैठकीतील सूचनांचा उल्लेख करत वाळू चोरी रोखण्याचा ठाम निर्धार व्यक्त केला. त्यांनी ग्रामपंचायत व ग्रामस्थांच्या वतीने ग्वाही देत, “आजपासून कुरंगी गावातून वाळूचा एकही खडा चोरी होऊ देणार नाही,” असे स्पष्ट केले.
तहसीलदार पाचोरा यांनी उपस्थित ग्रामस्थांना वाळू चोरी विरोधी अभियानात सक्रिय सहभाग नोंदविण्याचे आवाहन केले. त्यांनी सांगितले की, वाळू चोरी रोखणे हे महसूल, पोलीस, परिवहन व ग्रामविकास विभाग यांची संयुक्त जबाबदारी आहे. गावकऱ्यांनी कोणतीही अनधिकृत वाळू वाहतूक आढळल्यास प्रशासनाशी तत्काळ संपर्क साधावा यासाठी त्यांनी आपला मोबाईल क्रमांकही दिला.
तहसीलदारांनी वाळू चोरीमुळे होणाऱ्या दुष्परिणामांवर प्रकाश टाकताना सांगितले की, यामुळे गुन्हेगारी वाढते, सार्वजनिक शांतता भंग पावते आणि अपघात तसेच व्यसनांचे प्रमाण वाढते. गावातील 123 जणांना यापूर्वीच चॅप्टर केसेस नोटीसा दिल्या असून प्रशासन अवैध वाळू उत्खनन विरोधात कठोर पावले उचलत आहे. धमकी दिली गेली तरीही प्रशासन ग्रामस्थांच्या पाठीशी ठामपणे उभे राहील, अशी ग्वाही त्यांनी दिली.
या बैठकीत गावकऱ्यांनी वाळू चोरी रोखण्यासाठी प्रशासनाला पूर्ण सहकार्य करण्याची प्रतिज्ञा घेतली. कुरंगी गावातून अवैध गौणखनिज वाहतूक होऊ नये यासाठी गावकऱ्यांनी कटिबद्ध असल्याचे सांगितले.
ही बैठक गावकऱ्यांच्या एकजुटीची व प्रशासनाच्या ठोस भूमिकेची साक्ष ठरली. पुढील काळात कुरंगी गाव वाळू चोरीमुक्त होईल, असा विश्वास या बैठकीने निर्माण केला.

लोखंडे परिवाराच्या ‘रेणुका निवास’ वास्तूचा गृहप्रवेश समारंभ उत्साहात संपन्न

0

Loading

जारगाव – तालुका जारगाव येथे एक विट श्रमाची, एक विट आई-वडिलांच्या आशीर्वादाची, एक विट लेकीच्या प्रेमाची आणि एक विट आपुलकीच्या सहकार्याची उभारणी असे विलोभनीय चित्र लोखंडे परिवाराने साकारले

आहे. याच भावनेतून ‘रेणुका निवास’ या नवीन वास्तूचा गृहप्रवेश व वास्तुशांती समारंभ 1 जानेवारी 2025 रोजी मोठ्या उत्साहात पार पडला.
लोखंडे परिवाराचे पितृछत्र असलेल्या स्व. बापुराव लोखंडे यांच्या कार्यप्रेरणेने आणि मातोश्री मंगलबाई लोखंडे यांच्या आशीर्वादाने ‘रेणुका निवास’ हे घर उभारले गेले. या वास्तूत

परिवाराचे सुख-समाधान नांदो, हीच कुटुंबीयांची भावना.
नाथ नगर, जारगाव (ता. पाचोरा) येथील गॅस गोडाऊनच्या पाठीमागे नव्याने उभारलेल्या वास्तूतील गृहप्रवेश व वास्तुशांती विधी समाधान गुरुजी यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला. समारंभात परिवारातील सदस्यांसह नातेवाईक, मित्रपरिवार आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.यावेळी जारगाव येथील सरपंच तथा शिवसेना तालुका प्रमुख सुनिलआबा पाटील आणि ध्येय परिवाराचे संदीप महाजनसर या मान्यवरांची विशेष उपस्थिती लाभली. त्यांनी लोखंडे परिवाराला शुभेच्छा देत त्यांच्या नव्या वास्तूतील सुख-समृद्धीची कामना केली.
‘रेणुका निवास’ उभारण्यात लोखंडे परिवारातील सुकदेव तान्हाजी लोखंडे, सौ. भागाबाई सुकदेव लोखंडे, भुषण बापुराव लोखंडे, सौ. स्वाती भुषण लोखंडे, शुभम बापुराव लोखंडे, सौ. पूजा शुभम लोखंडे, गोपाल बापुराव लोखंडे, सौ. स्नेहल गोपाल लोखंडे यांनी महत्त्वाचे योगदान दिले. त्यांच्या सामूहिक प्रयत्नांमुळे ही वास्तू उभारणी शक्य झाली.समारंभात जारगाव येथील समाधान गुरुजी यांच्या अमृत वार्णीतून संपन्न झालेल्या विविध धार्मिक विधींनंतर परिवारातील सदस्य व उपस्थित पाहुण्यांनी एकत्र येऊन स्नेहभोजनाचा आनंद घेतला. या प्रसंगी नव्या वास्तूत सुख, शांती आणि भरभराट होण्याच्या शुभेच्छा उपस्थितांनी व्यक्त केल्या.लोखंडे परिवाराने परिश्रम, सहकार्य आणि कौटुंबिक एकतेच्या बळावर उभारलेल्या ‘रेणुका निवास’चे वास्तुशांती व गृहप्रवेश समारंभाचे हे पर्व प्रेरणादायी आहे. या नव्या वास्तूतील प्रत्येक दिवस सुखसमृद्धी आणि आनंदाचा ठरो, अशीच सर्वांची प्रार्थना आहे.

मोहाडी येथील शासकीय महिला रुग्णालयात जोखमीची शस्त्रक्रिया यशस्वी; गरजू रुग्णांनी लाभ घेण्याचे आवाहन

0

Loading

जळगाव, दिनांक 31 डिसेंबर (जिमाका वृत्त ) : जळगाव येथील जिल्हा महिला व बाल रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. किरण बळीराम सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली २७ डिसेंबर शुक्रवार रोजी जिल्हा महिला व बाल रुग्णालय मोहाडी येथे डॉ. रोहन पाटील यांनी ०४ चार किलो गर्भपिशवी गाठीची अत्यंत जोखमीची व गुंतागुंतीची

शस्त्रक्रिया अगदी यशस्वीपणे पार पाडली.
तसेच आज ३० डिसेंबर रोजी जिल्हा महिला व बाल रुग्णालय मोहाडी येथे डॉ. मिलींद चौधरी जळगाव यांनी दुर्बिणीद्वारे गर्भपिशवी काढण्याची गुंतागुंतीची शस्त्रक्रिया (LAVH) दोन महिला रुग्णांवर यशस्वीपणे पार पाडली.या दोन्हीं वेगवेगळ्या शस्त्रक्रियेसाठी वैद्यकीय अधीक्षक डॉ. किरण बळीराम सोनवणे यांच्या मार्गदर्शनाने भूलतज्ञ डॉ. प्राची सुरतवाला यांनी

रुग्णांना योग्य भूल देऊन अति जोखमीची अशी शस्त्रक्रिया पार पाडली व रुग्णालयातील स्त्रीरोग तज्ञ डॉ. नम्रता आच्छा, डॉ. गुरुप्रसाद वाघ, डॉ. रुपाली बावस्कर तसेच सहाय्यक अधिसेविका श्रीमती. संगीता शिंगारे, परिसेविका श्रीमती. रूपाली जोशी व अधिपरिचारीका श्रीमती. वैशाली भालेराव, श्रीमती. दिपाली बढे, ऋतुजा काळे, श्रीमती. नम्रता नागपुरकर, श्रीमती. तुळसा माळी व कक्षसेवक श्री. विशाल परदेशी, एजाज तडवी यांनी तसेच शस्त्रक्रिय विभागातील इतर सर्व कर्मचारी यांच्या सहकार्य लाभले. जिल्हा महिला व बाल रुग्णालय (मोहाडी) जळगाव येथे दुर्बिणीद्वारे होणाऱ्या शस्त्रक्रिया जसे गर्भपिशवी काढणे, अपेंडिक्स काढणे, हर्निया दुरुस्ती या सर्व शस्त्रक्रिया महात्मा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत विनामुल्य होतात तरी जिल्ह्यातील सर्व गरजू रुग्णांनी लाभ घ्यावा व अशा प्रकारच्या शस्त्रक्रियेसंबधी श्री. चेतन परदेशी ९०६७५३१९२३ व श्री. राहुल पारचा ९६७३६३९७४१ यांना संपर्क साधावा असे आवाहन डॉ. किरण बळीराम सोनवणे यांनी जिल्ह्यातील रुग्णांना केलेले आहे.

इ.९ वी ते १२ वी च्या  विद्यार्थ्यांकरिता ६ व ७ जानेवारी रोजी करिअर मेळाव्याचे आयोजन

0

Loading

जळगाव, दिनांक 31 डिसेंबर (जिमाका वृत्त ) :   जळगाव जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था व माध्यमिक शिक्षणधिकारी कार्यालय, जि.प. जळगाव व जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र  यांच्या संयुक्त विद्यमाने येत्या ६ व ७ जानेवारी २०२५ रोजी सकाळी १०.३० ते दुपारी ०३.०० वाजेपर्यंत करिअर मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.
                      या करिअर मेळाव्यात पहिल्या दिवशी तज्ञांमार्फत विद्यार्थी व पालकांना करिअर समुपदेशन कार्यक्रम घेण्यात येणार आहे. ज्यात ९ वी ते १२ वी च्या विद्यार्थ्यांना त्यांच्या

आवडी निवडी, क्षमता, व्यक्तीमत्व, याबाबत जाणीव निर्माण करण्यासंदर्भात समुपदेशकामार्फत समुपदेशन करण्यात येणार आहे. तर दुस-या दिवशी जिल्हयातील नियाक्तांमार्फत व्यवसाय नियुक्ती संदर्भात विद्यार्थ्यांच्या

मुलाखतीचे आयोजन व प्रत्यक्ष स्थळी नियुक्ती पत्र देण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
                 या करिअर मेळाव्याचे आयोजन जळगाव येथील अॅड. बबन बाहेती, ज्यू. कॉलेज, रोझलँड इंग्लिश स्कूल शेजारी, ख्वॉजामिया दर्गा चौक या ठिकाणी करण्यात आले आहे. या मेळाव्याअंतर्गत उद्योजक त्यांच्या कडील रिक्त पदाच्या अनुषंगाने विद्यार्थ्यांच्या मुलाखती घेऊन इ. १२ वी उत्तीर्ण होणारे व १८ वर्ष वय पूर्ण होणा-या विद्यार्थ्यांस नोकरीच्या संधी उपलब्ध करून देऊ शकतात. त्यामुळे इच्छूक उमेदवारांसाठी ही एक सुवर्ण संधी असून इ.९ वी ते १२ वी च्या विद्यार्थ्यांनी या करिअर मेळाव्याचा लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य डॉ. अनिल झोपे यांनी एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.

वाघोदे बु. येथे गुर्जर बोलीभाषा साहित्य संमेलन आणि पुस्तक विमोचन सोहळा आयोजित

0

Loading

रावेर  ( प्रतीनिधी ) श्री चक्रधर शिक्षण प्रसारक मंडळ, वाघोदे बु।। (ता. रावेर, जि. जळगाव) यांच्या वतीने “हीरक महोत्सवी वर्ष” निमित्ताने विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. गुर्जर भाषिक अल्पसंख्यांक संस्थाचालक संघटना, जळगाव आणि गुर्जर बोलीभाषा साहित्य संवर्धन केंद्र, ऐनपूर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या सोहळ्याचा प्रमुख उद्देश गुर्जर बोलीभाषा आणि साहित्याचे संवर्धन व प्रचार-प्रसार करणे हा आहे. या विशेष निमित्ताने “गुर्जर बोली: साहित्य आणि लोकगाणी” या दुसऱ्या पुस्तकाचे

विमोचन आणि “गुर्जर बोलीभाषा साहित्य संमेलन” आयोजित करण्यात येणार आहे. कार्यक्रमाचे ठिकाण प्रकाश विद्यालय व ज्यु. कॉलेज, मोठे वाघोदे, ता. रावेर, जि. जळगाव असून, दिनांक ४ जानेवारी २०२५ रोजी सकाळी ९:३० वाजता हा कार्यक्रम पार पडणार आहे.
    या कार्यक्रमात “गुर्जर बोली: साहित्य आणि लोकगाणी” या पुस्तकाचे विमोचन मा. श्री. गोकुल श्रावण महाजन, कार्यकारी अभियंता, तापी

पाटबंधारे विकास महामंडळ, जळगाव यांच्या शुभहस्ते होणार आहे. तर “गुर्जर बोलीभाषा साहित्य संमेलन” चे उद्घाटन मा. श्री. डॉ. विनोद पाटील, कुलसचिव, कवी कालिदास बहुजन चळवळ विद्यापीठ, जळगाव यांच्या शुभहस्ते संपन्न होईल. कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. श्री. प्रल्हाद त्र्यंबक महाजन, अध्यक्ष, श्री चक्रधर शिक्षण प्रसारक मंडळ, वाघोदे बु।। असतील.
    प्रमुख अतिथी म्हणून मा. श्री. वसंतराव लक्ष्मण महाजन, कृषी तज्ज्ञ, चिनावल आणि मा. श्री. डॉ. विलास जगन्नाथ पाटील, बालरोगतज्ज्ञ, बेदसाई हॉस्पिटल, सावदा उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी श्री. श्रावण सिताराम महाजन, श्री. डी. के. महाजन, श्री. किशोर जगन्नाथ पाटील यांच्यासह संपूर्ण संचालक मंडळ, मुख्याध्यापक, पर्यवेक्षक, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी वर्ग अहोरात्र मेहनत घेत आहेत.
   कार्यक्रमानंतर सर्व उपस्थितांसाठी स्नेहभोजनाचीही विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. हे भोजन दुपारी १२:३० ते २:०० वाजेपर्यंत उपलब्ध असेल. गुर्जर समाजाच्या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी आणि समाजातील एकतेचा अनुभव घेण्यासाठी सर्व समाजबांधवांनी कार्यक्रमास उपस्थित राहावे, असे संयोजकांकडून आवाहन करण्यात आले आहे.
    कार्यक्रमाचे स्थळ प्रकाश विद्यालय व ज्यु. कॉलेज, मोठे वाघोदे, ता. रावेर, जि. जळगाव येथे असून, अधिक माहितीसाठी श्री. विजयकुमार बाजीराव पाटील (व्हॉ. चेअरमन) किंवा श्री. पी. एल. महाजन (सहसचिव) यांच्याशी संपर्क साधावा. “गुर्जर बोली संवर्धनासाठी एक पाऊल पुढे” हा संदेश देत हा कार्यक्रम निश्चितच समाजाच्या उज्ज्वल भविष्यासाठी महत्त्वपूर्ण ठरेल.

10 टक्के रक्कम भरा अन् शेतात सौर कृषी पंप बसवा; शेतकऱ्यांसाठी सरकारची महत्त्वाकांक्षी योजना

0

Loading

मुंबई- मंत्रालय  ( झुंज वृत्तपत्र & ध्येय न्युज प्रतिनिधी ) शेतकऱ्यांच्या ऊर्जेच्या गरजा आणि सिंचनाच्या समस्या सोडवण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारने सौर कृषी पंप योजना सुरू केली आहे. या योजनेंतर्गत शेतकऱ्यांना केवळ 10 टक्के रक्कम भरून सौरऊर्जेवर चालणारे

कृषी पंप बसवता येणार आहेत. उर्वरित खर्च सरकारतर्फे अनुदान स्वरूपात दिला जाणार आहे. शेतकऱ्यांच्या वीज बिलाचा भार कमी करण्यासह सिंचनाच्या प्रक्रियेत स्वयंपूर्णता देणे हे या योजनेचे उद्दिष्ट आहे.                           या योजनेत सहभागी होण्यासाठी शेतकऱ्यांनी जिल्हा कृषी अधिकारी कार्यालय, तालुका कृषी कार्यालय किंवा जवळच्या ऊर्जा विभागाच्या कार्यालयात अर्ज सादर करावा. काही राज्यांमध्ये ऑनलाइन अर्जाची सुविधा देखील उपलब्ध आहे. अर्ज करताना

शेतजमिनीचा 7/12 उतारा, आधार कार्ड, ओळखपत्र, बँक खाते माहिती, आणि सिंचनासाठी लागणाऱ्या पाण्याच्या साठ्याचा तपशील या कागदपत्रांची आवश्यकता भासेल. अर्ज मंजूर झाल्यानंतर 10 टक्के रक्कम भरून सौर कृषी पंप बसवण्याची प्रक्रिया सुरू होईल.

ही योजना शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरणारी आहे. सौरऊर्जा वापरल्याने शेतकऱ्यांचे वीज बिल मोठ्या प्रमाणात कमी होईल. पिकांना वेळेवर सिंचन करता येईल, वीजपुरवठ्यावर अवलंबून राहावे लागणार नाही आणि पर्यावरणाचेही रक्षण होईल. सौरऊर्जा स्वच्छ आणि स्वस्त असल्यामुळे ही दीर्घकालीन टिकाऊ उपाययोजना आहे. सरकारने ही योजना सुरू करताना शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासोबत पर्यावरणीय समतोल राखण्याचा उद्देश ठेवला आहे. ‘

योजनेला शेतकऱ्यांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. काही शेतकऱ्यांनी सांगितले की, “सौर कृषी पंपामुळे आम्हाला सिंचनासाठी वीजटंचाईची चिंता राहिली नाही. पिकांना हवामानानुसार वेळेवर पाणी देता येते.” मात्र, योजनेत अजूनही सुधारणा गरजेच्या असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. अर्ज प्रक्रिया अधिक सुलभ करणे, दूरच्या भागांमध्ये जनजागृती मोहीम राबवणे आणि लाभार्थ्यांची अचूक निवड करणे आवश्यक आहे.सौर कृषी पंप योजना शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या स्वयंपूर्ण बनवून त्यांचे उत्पन्न वाढवण्यास मदत करू शकते. इच्छुक शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घेत आपल्या शेतीत सुधारणा घडवून आणावी.

गावातील 125 लोकांनी स्टॅम्प पेपरवर लिहून दिलंय, पण मला तिथं 60 मतं; कोर्ट बदमाश, तरीही कोर्टात जाणार – बच्चू कडू

0

Loading

मुंबई- मंत्रालय ( झुंज वृत्तपत्र & ध्येय न्युज प्रतिनिधी )  प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक आणि नेते बच्चू कडू यांनी निवडणुकीसंदर्भात एक खळबळजनक विधान केले आहे. त्यांनी आरोप केला की, गावातील 125 लोकांनी

स्टॅम्प पेपरवर त्यांच्या समर्थनाचा लेखी पुरावा दिला होता, मात्र प्रत्यक्षात निवडणुकीत त्यांना केवळ 60 मतं मिळाली. ही घटना घडल्यावर त्यांनी निवडणूक प्रक्रियेमध्ये झालेल्या गैरप्रकारांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
      बच्चू कडू यांनी या प्रकरणी न्यायालयीन प्रक्रियेसाठी आपल्या निर्धाराचा पुनरुच्चार केला आहे. “कोर्ट बदमाश असलं तरी मी कोर्टात जाणार,” असे त्यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले. त्यांचे हे विधान सध्या राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरले आहे. कडू यांच्या मते, या प्रकारामुळे लोकशाहीची विश्वासार्हता धोक्यात आली असून,

निवडणूक प्रक्रियेत पारदर्शकता राखणे अनिवार्य आहे.
     125 जणांच्या समर्थनाचा पुरावा
बच्चू कडू यांनी म्हटले आहे की, निवडणुकीपूर्वी गावातील 125 लोकांनी त्यांना लेखी स्वरूपात स्टॅम्प पेपरवर आपले समर्थन दिले होते. या समर्थनाच्या आधारे त्यांनी निवडणुकीत विजयाची अपेक्षा व्यक्त केली होती. मात्र, प्रत्यक्ष मतदानाच्या निकालांमध्ये त्यांना केवळ 60 मते मिळाल्याचे दिसून आले. त्यांनी असा आरोप केला की, हा आकडा निवडणूक प्रक्रियेतील गैरप्रकारांचा पुरावा आहे.
     या प्रकरणामुळे निवडणूक प्रक्रियेतील पारदर्शकतेवर मोठे प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. बच्चू कडू यांनी निवडणूक यंत्रणेवर अविश्वास व्यक्त केला आहे. त्यांचा दावा आहे की, या निवडणुकीत केवळ त्यांच्याच नव्हे, तर अनेक ठिकाणी मतदान प्रक्रियेत गंभीर त्रुटी आणि अनियमितता झाल्या आहेत.
       जरी त्यांनी कोर्टावर टीका केली असली, तरीही ते न्याय मिळवण्यासाठी न्यायालयीन प्रक्रियेत जाणार असल्याचे सांगितले. त्यांच्या मते, लोकशाहीचे रक्षण करण्यासाठी निवडणुकीत घडलेल्या अनियमिततांचा तपास होणे आवश्यक आहे. बच्चू कडू म्हणाले की, “लोकशाही ही जनतेचा अधिकार आहे, आणि हा अधिकार कुणीही हिरावून घेऊ शकत नाही.”
           या प्रकरणामुळे राज्यातील राजकीय वातावरण तापले आहे. बच्चू कडू यांच्या आरोपांमुळे विरोधी पक्षांनीही निवडणूक यंत्रणेवर टीका सुरू केली आहे. काही पक्षांनी बच्चू कडू यांचे समर्थन केले असून, या प्रकरणाचा सखोल तपास करण्याची मागणी केली आहे. दुसरीकडे, सत्ताधारी पक्षांनी त्यांचे आरोप फेटाळले आहेत.
     आगामी कारवाई आणि पुढील पाऊल
बच्चू कडू यांनी सांगितले की, ते या प्रकरणाचा तपशीलवार अहवाल तयार करून न्यायालयात सादर करतील. त्यांनी आपल्या समर्थकांना शांतता राखण्याचे आवाहन करतानाच सांगितले की, हा लढा लोकशाही आणि निवडणूक प्रक्रियेत पारदर्शकता आणण्यासाठी आहे.
    या प्रकरणावर निवडणूक आयोगाकडून कोणती प्रतिक्रिया येते, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. बच्चू कडू यांचा हा आरोप निवडणूक प्रक्रियेत सुधारणा आणि विश्वासार्हता आणण्यासाठी महत्त्वाचा ठरू शकतो.
      बच्चू कडू यांचा हा निर्धार लोकशाही व्यवस्थेसाठी प्रेरणादायक ठरतो, मात्र यामुळे निवडणूक प्रक्रियेवर उभे राहिलेले प्रश्न भविष्यात कशाप्रकारे मिटतील, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

मालेगावमध्ये बांगलादेशी रोहिंग्यांना भारतीय बनवण्याचा कारखाना; किरीट सोमय्यांचा खळबळजनक आरोप

0

Loading

  मुंबई- मंत्रालय ( झुंज वृत्तपत्र & ध्येय न्युज प्रतिनिधी )  मालेगावमध्ये बांगलादेशी आणि रोहिंग्या घुसखोरांना भारतीय नागरिकत्व मिळवून देण्यासाठी एक प्रकारचा ‘कारखाना’ सुरू असल्याचा खळबळजनक दावा भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केला आहे. त्यांनी म्हटले की, या प्रकरणात बनावट

कागदपत्रे तयार करून घुसखोरांना भारतीय नागरिक ठरवण्याचा मोठा कट रचला जात आहे. त्यांच्या या विधानामुळे राज्यातील राजकीय वातावरण तापले असून विविध स्तरांवर चर्चा रंगली आहे.
      किरीट सोमय्या यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, मालेगाव परिसरात मोठ्या प्रमाणावर बांगलादेशी आणि रोहिंग्या घुसखोरांनी प्रवेश केला आहे. या घुसखोरांना भारतीय नागरिकत्व मिळवून देण्यासाठी बनावट कागदपत्रे, आधार कार्ड, मतदार ओळखपत्र, आणि इतर शासकीय दाखले तयार करण्याचा गोरखधंदा मोठ्या प्रमाणावर चालू आहे. त्यांनी या प्रकरणाचा छडा लावून संबंधितांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
    सोमय्या यांच्या मते, या प्रकरणात काही स्थानिक अधिकारी आणि राजकीय नेत्यांचा सहभाग असल्याचा संशय आहे. बनावट कागदपत्रांच्या मदतीने घुसखोरांना ना केवळ भारतात प्रवेश दिला जातो, तर

त्यांना स्थायिक होण्यासाठी विविध शासकीय योजनांचाही लाभ मिळवून दिला जात आहे. सोमय्यांनी असेही नमूद केले की, या घुसखोरांमुळे स्थानिक सुरक्षा आणि सामाजिक सलोखा धोक्यात आला आहे.
     मालेगाव शहर आधीच धार्मिकदृष्ट्या संवेदनशील भाग मानला जातो. अशा परिस्थितीत, बाहेरील घुसखोरांचा सहभाग असलेल्या अशा घटनांमुळे परिस्थिती अधिक बिघडू शकते, अशी भीती व्यक्त केली जात आहे. यापूर्वीही मालेगावमध्ये अनेकदा सुरक्षा संबंधित मुद्दे पुढे आले आहेत. त्यामुळे हा नवीन आरोप अधिक गांभीर्याने घेतला जात आहे.
    किरीट सोमय्यांच्या या आरोपांनंतर विरोधी पक्षांनी भाजपवर टीकेची झोड उठवली आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने या आरोपांना खोटे ठरवत, भाजप केवळ राजकीय लाभासाठी असे खोटे दावे करत असल्याचा आरोप केला आहे. काँग्रेसने सांगितले की, भाजपला स्थानिक लोकांमध्ये द्वेष आणि भीती निर्माण करून राजकीय फायद्याचे वातावरण तयार करायचे आहे.
   या प्रकरणानंतर महाराष्ट्र सरकारने या दाव्यांची तातडीने दखल घेतली असून, मालेगावमधील परिस्थितीची सखोल चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. गृह विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखालील विशेष समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीला तातडीने अहवाल सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
    या प्रकरणामुळे स्थानिक समाजामध्येही अस्वस्थता निर्माण झाली आहे. बांगलादेशी आणि रोहिंग्या घुसखोरांचा मुद्दा राष्ट्रीय पातळीवर अनेकदा चर्चेचा विषय ठरला आहे. मात्र, मालेगावसारख्या संवेदनशील भागात याचा गंभीर परिणाम होऊ शकतो. अशा परिस्थितीत प्रशासनाने योग्य ती कारवाई करून शांतता आणि सलोखा राखण्याचे आवाहन केले जात आहे.
     या प्रकरणावर केंद्र सरकारकडूनही कठोर प्रतिक्रिया येण्याची शक्यता आहे. रोहिंग्या आणि बांगलादेशी घुसखोरांचा प्रश्न केंद्र सरकारच्या अजेंड्यावर कायम असून, यापूर्वीही या संदर्भात कठोर पावले उचलण्याचे आश्वासन दिले गेले आहे.
      मालेगावमधील हा मुद्दा कितपत खरा आहे, याचा तपास होणे अत्यावश्यक आहे. मात्र, या प्रकारामुळे स्थानिक आणि राष्ट्रीय राजकारणात मोठी उलथापालथ होण्याची शक्यता आहे.

तालिबानचा पाकिस्तानवर एअर स्ट्राईक! ड्युरंड लाईनवर तणाव वाढला, युद्धसदृश परिस्थिती निर्माण

0

Loading

 मुंबई- मंत्रालय ( झुंज वृत्तपत्र & ध्येय न्युज प्रतिनिधी )  ड्युरंड लाईन, जी पाकिस्तान आणि अफगाणिस्तान या दोन शेजारी देशांची सीमा रेषा मानली जाते, तिथे सध्या परिस्थिती अतिशय तणावपूर्ण झाली आहे. तालिबानने पाकिस्तानच्या सीमेवर हवाई हल्ला केल्याच्या वृत्तामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर

खळबळ उडाली आहे. या घटनेनंतर दोन्ही देशांमधील आधीच संवेदनशील संबंध अधिकच बिघडले असून, या भागात युद्धसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे.
तालिबानचा हल्ला आणि त्याचे परिणाम
तालिबानने पाकिस्तानच्या सीमाभागावर मोठ्या प्रमाणावर एअर स्ट्राईक केल्याचे वृत्त आहे. या हल्ल्यात सीमारेषेवर तैनात असलेल्या पाकिस्तानच्या

सुरक्षादलांचे मोठे नुकसान झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे. अफगाणिस्तानातून ड्युरंड लाईनच्या लगत सुरू असलेल्या हालचालींवर पाकिस्तानने अनेकदा आक्षेप घेतला आहे. मात्र, तालिबानने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारल्याने हा मुद्दा अधिक गंभीर झाला आहे.
ड्युरंड लाईनवरील तणावाचा इतिहास
ड्युरंड लाईन ही 1893 साली ब्रिटिश भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील सीमा म्हणून ठरवली गेली होती. मात्र, अफगाणिस्तानने या सीमारेषेला कधीही मान्यता दिली नाही. पाकिस्तानच्या निर्मितीनंतरही अफगाणिस्तान आणि पाकिस्तान यांच्यात या सीमावादावरून अनेकदा तणाव निर्माण झाला आहे. तालिबान सत्तेत आल्यानंतर अफगाणिस्तानच्या सीमाभागात अस्थिरता अधिक वाढली आहे. ड्युरंड लाईनवरील तणाव आणि चकमकींमुळे दोन्ही देशांमधील द्विपक्षीय संबंध बिघडले आहेत.
        या हल्ल्यानंतर पाकिस्तानने आपल्या सुरक्षा दलांना सतर्क राहण्याचे निर्देश दिले आहेत. याशिवाय, तालिबानशी थेट चर्चा करून हा तणाव निवळवण्याचा प्रयत्न केला जाईल, असे पाकिस्तान सरकारने म्हटले आहे. पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाने तालिबानवर कठोर शब्दांत टीका केली असून, आंतरराष्ट्रीय स्तरावर तालिबानविरोधात कडक पावले उचलण्याचे संकेत दिले आहेत.
     या घटनेमुळे आंतरराष्ट्रीय स्तरावरही चिंता व्यक्त केली जात आहे. संयुक्त राष्ट्र आणि अनेक मोठ्या देशांनी या परिस्थितीकडे लक्ष दिले असून, या दोन्ही देशांना तणाव निवळवण्यासाठी शांततामय तोडगा काढण्याचे आवाहन केले आहे. तालिबान आणि पाकिस्तानमधील तणावामुळे दक्षिण आशियातील स्थैर्य धोक्यात आले आहे.
       तज्ज्ञांच्या मते, तालिबानच्या या कृतीमुळे पाकिस्तान आणि तालिबान यांच्यातील संबंधांवर दीर्घकालीन परिणाम होऊ शकतात. या भागात दहशतवादी कारवायांसाठी अनुकूल वातावरण तयार होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तसेच, या घटनेचा प्रभाव केवळ या दोन देशांपुरता मर्यादित न राहता संपूर्ण दक्षिण आशियातील राजकीय समीकरणांवर होण्याची शक्यता आहे.
     ड्युरंड लाईनवरील हा तणाव शांततेच्या दिशेने कसा जाईल, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. मात्र, या घटनेने पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमधील आधीच नाजूक असलेल्या संबंधांना आणखी धक्का दिला आहे.

यशस्वी जायसवालच्या वादग्रस्त बादकीवर बीसीसीआयची तीव्र प्रतिक्रिया; उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांचा थेट सवाल

0

Loading

   मुंबई- मंत्रालय ( झुंज वृत्तपत्र & ध्येय न्युज प्रतिनिधी ) मेलबर्न क्रिकेट मैदानावर ऑस्ट्रेलिया आणि भारत यांच्यातील चौथ्या कसोटीच्या पाचव्या दिवशी, भारतीय सलामीवीर यशस्वी जायसवालच्या वादग्रस्त बादकीने क्रिकेट जगतात खळबळ उडवली आहे. पॅट कमिन्सच्या लेग साइडवरून जाणाऱ्या बाउन्सरवर हुक शॉट खेळण्याच्या प्रयत्नात, जायसवालच्या बॅटशी

संपर्क न होता देखील, ऑस्ट्रेलियन खेळाडूंनी कॅचची अपील केली. मैदानी पंच जोएल विल्सन यांनी नॉट आउट दिल्यानंतर, ऑस्ट्रेलियाने डीआरएसचा वापर केला. तथापि, स्निकोमीटरवर कोणतीही हालचाल नोंदली न गेल्यानेही, तिसऱ्या पंच सैकत शरफुद्दौला यांनी व्हिडिओ फुटेजच्या आधारे जायसवालला आउट घोषित केले.
या निर्णयावर बीसीसीआयचे उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. त्यांनी सोशल मीडियावर लिहिले, “यशस्वी जायसवाल स्पष्टपणे नॉट आउट होते. तिसऱ्या पंचांनी

तंत्रज्ञानाने दिलेल्या संकेतांकडे लक्ष द्यायला हवे होते. मैदानी पंचांच्या निर्णयाला ओव्हररूल करण्यासाठी तिसऱ्या पंचांकडे ठोस कारणे असणे आवश्यक आहे.”
या निर्णयामुळे भारतीय चाहत्यांमध्येही नाराजी पसरली आहे. मैदानात उपस्थित असलेल्या भारतीय प्रेक्षकांनी ‘चीटर, चीटर’ अशा घोषणा देत आपला विरोध दर्शवला. या वादग्रस्त निर्णयानंतर, ऑस्ट्रेलियाने उर्वरित भारतीय फलंदाजांना जलद गतीने बाद करून 184 धावांनी विजय मिळवला आणि पाच सामन्यांच्या मालिकेत 2-1 अशी आघाडी घेतली.
या घटनेने तंत्रज्ञानाच्या वापराबाबत आणि पंचांच्या निर्णय प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. क्रिकेट तज्ञ आणि माजी खेळाडू देखील या निर्णयावर आपली नाराजी व्यक्त करत आहेत. या प्रकरणामुळे भविष्यातील सामन्यांमध्ये तंत्रज्ञानाच्या योग्य वापराबाबत चर्चा वाढण्याची शक्यता आहे.

ताज्या बातम्या

error: Content is protected !!