Home Blog Page 76

मी अनुभवलेला मिलिंद

0

Loading

पाचोरा – अपार कष्ट, प्रामाणिकपणा, निष्ठा, आत्मिक विश्वास आणि सातत्याने परिश्रमाची तयारी असलेला एक व्यक्तिमत्त्व म्हणजेच आमच्या परिवाराचा हिस्सा मिली उर्फ मिलिंद भास्कर सोनवणे.( Mo 9403018877 ) पत्रकारिता या क्षेत्रात अवघड वाटा पार करत, स्वतःच्या मेहनतीवर आणि संयमावर विश्वास ठेवून आपली ओळख निर्माण करणाऱ्या या व्यक्तीने केवळ शब्दांची धारच नाही, तर जगण्याची एक वेगळी शैली समाजापुढे ठेवली आहे. आपल्या आयुष्यात मिळणाऱ्या प्रत्येक यशामागे आणि सन्मानामागे आपल्या माता-पित्यांचे, बहिणीचे, नातेवाईकांचे आणि सर्व स्नेहीजनांचे मोलाचे सहकार्य व उपकार आहेत, याचे सदैव भान बाळगणारा हा युवक म्हणजे ‘मी अनुभवलेला मिलिंद’. अनेकांना आपली यशोगाथा सांगताना आपलेच योगदान मिरवायची सवय असते. पण मिलिंदच्या बाबतीत हे पूर्णपणे उलट आहे. तो नेहमीच म्हणतो, “माझे यश हे माझे नसून माझ्या घरच्यांचे, माझ्या मित्रांचे, आणि मला संधी देणाऱ्यांचे आहे.” असा नम्र स्वभाव, नम्रवृत्ती आणि आत्मपरीक्षणाची सवय असलेल्या मिलिंदने स्वतःचं आयुष्य केवळ निष्कलंक आणि निर्व्यसनीच ठेवलं नाही, तर समाजातील तरुणांसाठी एक आदर्श जीवनशैलीही निर्माण केली आहे. आज वाढदिवसाच्या या खास दिवशी त्याचे हे सारे गुण पुन्हा एकदा स्मरणात आणावेसे वाटतात. मिलिंदचे बालपण आर्थिकदृष्ट्या फारच आव्हानात्मक होते. कोणत्याही कामाची लाज न बाळगता, किंबहुना लोटगाडीवर हमालीचे काम करून वडिलांना हातभार लावला. पण अशा परिस्थितीतही त्याने कधीही मार्ग चुकवला नाही. अभ्यास, वाचन आणि लेखन यांची त्याला लहानपणापासूनच आवड होती. त्याचे लेखन हे मनातून उमटणाऱ्या विचारांचे प्रतिबिंब होते. माझ्याकडे वृत्तपत्र मित्रांचे काम करीत असताना यातूनच पत्रकारितेकडे त्याचा कल वाढत गेला आणि मग त्याने एकदा अनेक वृत्तपत्रांच्या वितरण एजन्सी घेऊन या क्षेत्राला आपलेसे केले. स्थानिक समस्यांपासून ते सामाजिक विसंगतीपर्यंत अनेक विषयांवर स्पष्ट भाष्य करणारा, पण कुणाच्याही अपमानाशिवाय मुद्दा मांडणारा, असा तो निर्भीड पत्रकार म्हणून ओळखला जातो. मात्र पत्रकारितेचा मार्ग सोपा नसतो. चुकीचे आरोप, विरोध, सामाजिक दबाव यांचा सामना करताना त्याने कधीही तत्त्व सोडले नाही. अनेक प्रसंगी अपमानास्पद वागणूक मिळाल्यावरही त्याचा संयम ढळला नाही. त्याला नेहमी वाटते की, पत्रकार हा केवळ माहिती पुरवणारा नसून समाजाचा आरसा असतो. तो जर खोट दाखवेल, तर समाजात चुकीची दिशा निर्माण होईल. म्हणूनच, सत्य, पारदर्शकता आणि जबाबदारी या तीन गोष्टींवर तो कायम ठाम राहतो. मिलिंदचा आणखी एक गुण म्हणजे आपल्या कुटुंबातील प्रत्येक सदस्याबद्दलची अपार कृतज्ञता. तो आज ज्या उंचीवर पोहोचला आहे, त्याचे श्रेय तो नेहमीच आपल्या आई-वडिलांना, बहिणीला व काकांना देतो. वडिलांनी लहानपणी केलेले कष्ट, आईची मायेची सावली यांच्यासोबतच घरात असलेले तीन शिक्षक काका, तलाठी पदावर कार्यरत असलेल्या काका यांनी वेळोवेळी केलेले मार्गदर्शन, पाठबळ आणि जिवलग मित्रांचे मन:पूर्वक साथ – याला तो आपले भाग्य समजतो. प्रत्येक क्षेत्रात सहज यश मिळत नाही. यश मिळवण्यासाठी कामात सातत्य, प्रामाणिकपणा, जिद्द आणि चिकाटी लागते. आणि मिलिंदने हे सर्व गुण आत्मसात केले आहेत. पण हे सांगताना तो स्वतःचा गौरव करत नाही, उलटपक्षी, तो स्पष्टपणे सांगतो की “मी आज पत्रकारितेत आणि माझ्या आयुष्यात जो काही यशस्वी आहे, त्यामागे जर कोणाचा खरा हात असेल, तर ते आहेत फक्त आणि फक्त संदीपभाऊ महाजन. त्यांनी माझ्या आयुष्यात क्षणा क्षणाला पाठबळ दिलं आहे.खरं सांगायचं तर,मी जीवन जगत असताना अनेकांच्या मदतीला धावून गेलो. कुणी अडचणीत असेल तर मदतीचा हात दिला, अनेकांना नव्या ओळखी, संधी, नातेसंबंध निर्माण करून दिले. उपकार मानावा, ऋण लक्षात ठेवावं, अशी साधी माणुसकीची अपेक्षा होती — पण अनुभव वेगळाच आला. ज्यांच्यावर उपकार केले, ज्यांच्यासाठी केले त्यांच्यातील निम्म्याहून अधिक लोकांनी त्याची जाणीव ठेवण्याऐवजी पाठीतच खंजीर खुपसला. उपकाराच्या बदल्यात विश्वासघातच दिला. पण कदाचित माणुसकी, निष्ठा, कृतज्ञता हे गुण रक्तातच असावे लागतात.
वंदनीय भगवान गौतम बुद्ध आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचा व आशीर्वादाचा मिलींदवर प्रभावच आहे की, आज मिलींद सारखा ऋण मानणारा माणूस माझ्या आयुष्यात आहे. त्याच्या कृतीतून, नम्रपणातून आणि ऋणशीलतेतून हे समजतं — अजूनही काही माणसं सच्ची, मूल्यांवर जगणारी आहेत… आणि त्या माणसांसाठी हे सगळं करून झालं, याचं समाधान वाटतं!  मिलिंदच्या आयुष्यात त्याच्या सहचारिणी कविता हिचा मोलाचा सहभाग आहे. अत्यंत कठीण काळातही तिने साथ दिली, आधार दिला आणि धीर दिला. मिलिंद नेहमी सांगतो की “माझ्या यशात माझी सहचारिणी कविता हिची साथ खूप मोलाची मिळाली. तीने माझी होती त्या परिस्थितीत साथ दिली आणि अजूनही ती साथ अविरतपणे सुरू आहे.” कधीही प्रसिद्धीचा गर्व न बाळगता तो सर्वसामान्य माणसासारखाच राहतो. साधेपणा, नम्रता आणि प्रामाणिकपणा हे त्याच्या जीवनाचे मूलभूत तत्त्व आहेत. ‘निर्व्यसनी जीवन’ हा आजच्या तरुणांसाठी केवळ शब्द झाला आहे. पण मिलिंदने ही संकल्पना प्रत्यक्ष कृतीतून जगून दाखवली आहे. त्याचे बोलणे, वागणे, उठणे-बसणे यामध्ये एक शिस्त आणि गंभीरपणा जाणवतो. व्यसनमुक्त राहून त्याने स्वतःचा आत्मसन्मान जपला, आणि अनेक तरुणांनाही त्या दिशेने चालायला प्रेरणा दिली. आपल्या मित्रमंडळींमध्ये तो नेहमीच सकारात्मक उर्जा निर्माण करतो. कुणी अडचणीत असेल, संकटात असेल, तर मदतीसाठी तो प्रथम पुढे सरसावतो. त्याचा स्वभाव मदतीचा आहे, पण कधीही त्या बदल्यात काही अपेक्षा न ठेवणारा. आजच्या सोशल मीडियाच्या युगात लोक खोटं दाखवून प्रसिद्धी मिळवतात, पण मिलिंदने मात्र प्रामाणिकपणे सत्य मांडून आपली जागा निर्माण केली आहे. त्याच्या बातम्यांमध्ये भावनात्मक ओघही असतो, पण त्यात तथ्यालाही तितकेच महत्त्व असते. स्वतःच्या प्रसिद्धीपेक्षा जनहित त्याला अधिक प्रिय आहे. आज त्याच्या वाढदिवसानिमित्ताने त्याच्याबद्दल लिहिताना मला अभिमान वाटतो की, अशा एका गुणवान आणि विचारशील पत्रकाराशी माझा परिचयच नाहीतर तो माझ्या परिवाराचा एक सदस्य आहे. ‘मी अनुभवलेला मिलिंद’ हा केवळ पत्रकार नाही, तर एक सजग नागरिक, सच्चा निष्कलंक, आदर्श पुत्र आणि निष्ठावान माणूस आहे. अशा व्यक्तीच्या आयुष्यात यश, आनंद, आरोग्य आणि समाधान कायम असो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना. मिलिंदसारख्या तरुणांनी जर समाजाच्या विविध स्तरांमध्ये आपली भूमिका पार पाडली, तर समाज परिवर्तनाचा वेग निश्चितच वाढेल. जेव्हा तो समाजातील भ्रष्टाचार, अन्याय आणि विसंगतीवर आवाज उठवतो, तेव्हा त्यामध्ये कोणताही स्वार्थ नसतो. म्हणूनच त्याचे बोलणे अधिक प्रभावी वाटते. तो समाजासाठी जगतो, समाजाच्या प्रश्नांवर झगडतो, म्हणून समाज त्याच्यावर विश्वास ठेवतो. त्याची ही प्रामाणिक झुंज, सत्याची वकिली आणि मूल्याधिष्ठित जीवनशैली ही आपल्या देशाच्या पत्रकारितेच्या भविष्यासाठी एक आदर्श आहे. त्याच्यासारख्या तरुण पत्रकारांमुळेच भारतीय पत्रकारितेचा खरा चेहरा टिकून आहे. त्याच्या पुढील वाटचालीसाठी आणि आरोग्यासाठी आपण सर्वजण शुभेच्छा देऊ या. वाढदिवसाच्या निमित्ताने, या प्रेरणादायी जीवनयात्रेला अधिक यशस्वी टप्पे लाभोत! परिश्रम, संयम, निष्ठा आणि प्रामाणिकपणाच्या बळावर तू आणखी मोठ्या यशशिखरावर पोहोचावा, हीच ईश्वरचरणी प्रार्थना.
शुभेच्छुक
Dhyeya News
सा. झुंज
संपादक संदीप दा. महाजन व परिवार, पाचोरा, जि. जळगाव
Mo. 7385108510

पाचोरा येथे श्री संत शिरोमणी सावता महाराजांच्या पुण्यतिथी भक्तीमय वातावरणात साजरा होणार

0

Loading

पाचोरा – श्री संत शिरोमणी सावता महाराजांच्या पुण्यतिथी निमित्त, कृष्णापुरी पाचोरा येथील वार्षिक अखंड हरिनाम सप्ताहाचे ११वे वर्ष साजरे होत असून, यंदाही भक्तीमय वातावरणात आणि मोठ्या भक्तगणांच्या उपस्थितीत दिनांक १६ जुलै २०२५ रोजी बुधवारी उत्साही प्रारंभ झाला. हा सप्ताह दिनांक २३ जुलै २०२५ पर्यंत अखंड हरिपाठ, कीर्तन आणि प्रवचनांच्या माध्यमातून साजरा होणार आहे. या अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन ‘संत शिरोमणी सावता महाराज मंदिर, कोंडवाडा गल्ली पाचोरा’ येथे करण्यात आले आहे. कार्यक्रमाच्या पहिल्याच दिवशी ह.भ.प. श्री. विकास महाराज खरदेकर यांच्या कीर्तनाने भक्तिप्रेमींना अध्यात्मिक आनंद अनुभवायला मिळाला. या सप्ताहाचे मार्गदर्शक व प्रमुख संयोजक म्हणून ह.भ.प. सावता महाराज मोहाडीकर यांचे विशेष योगदान आहे. त्यांच्या आशीर्वादाने आणि ह.भ.प. योगेश महाराज धामणगांवकर यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व धार्मिक कार्यक्रम नियोजनबद्ध रित्या पार पडत आहेत. संध्याकाळी ६ ते ७ या वेळेत हरिपाठ आणि रात्री ९ ते ११ या वेळेत कीर्तन असा दररोजचा नित्यक्रम असणार आहे. या सप्ताहात दिनांक १६ जुलै रोजी ह.भ.प. श्री. विकास महाराज खरदेकर, १७ रोजी ह.भ.प. श्री. गोपाल महाराज उंदीर खेडकर, १८ रोजी ह.भ.प. श्री. दिपक महाराज रणावण, १९ रोजी ह.भ.प. सौ.संध्याताई माळी,सुरत २० रोजी ह.भ.प. सौ वैशालीताई टाकळे ,चाळीसगाव २१ रोजी ह.भ.प. श्री. सावता महाराज मोहाडी, २२ रोजी ह.भ.प. श्री. योगेश महाराज,धामणगावकर दि 23 रोजी ह भ प गोविंद महाराज केकत निंभोरा यांचे काल्याचे किर्तन होणार आहे. कीर्तनासाठी समस्त भजन मंडळांचे आणि सेवेकऱ्यांचेही मोठे योगदान आहे. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी पाचोरा पंचक्रोशीतील विविध महिला भजन मंडळ, पाचोरा भजन मंडळ, लक्ष्मीबाई वारकरी शिक्षण संस्था, आणि ग्रामस्थ महिला यांचे सहकार्य लाभले आहे सप्ताहाच्या समारोपदिनी, दिनांक २३ जुलै २०२५ रोजी बुधवारी सकाळी ८ वा. सुरुवात सालाबादप्रमाणे पालखी सोहळा संत शिरोमणी सावता महाराज मंदिर, कोंडवाडा गल्ली येथून पाचोरा शहरातून भव्य मिरवणुकीने निघणार आहे. यानंतर नविन विठ्ठल मंदिर, पेट्रोल पंप येथे महाप्रसादाची आयोजन केले असून पाऊस आल्यास कृष्णापुरी येथे मूळ मंदिरात समारोप होणार आहे.या सप्ताहानिमित्त ०३ ऑगस्ट २०२५ रविवार रोजी सकाळी ९ ते १२ या वेळेत ‘विद्यार्थी गुणवंत सन्मान सोहळा’ आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमात शालेय, कनिष्ठ महाविद्यालयीन, डिप्लोमा व इतर परिक्षांमध्ये यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात येणार आहे. या भव्य सप्ताहासाठी ह.भ.प.वासुदेवअण्णा महाजन (नगरसेवक), ह.भ.प. प्रकाश चौधरी देशमुख वाडी, ह भ प मधुकर महाजन ,ह.भ.प. कै बाजीराव महाजन यांच्या स्मरणार्थ संजय बा. महाजन, ह.भ.प. प्रकाश बा.महाजन यांचे अमूल्य सहकार्य लाभले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी माळी समाज व विश्वस्त पंच मंडळ, कृष्णापुरी, पाचोरा यांनी पुढाकार घेतला असून, अध्यक्ष के.एस. महाजन सर, उपाध्यक्ष नाना सां.महाजन, सुनील अ.महाजन,गोरख र. महाजन, सचिव शरद बा.गिते सह सचिव कन्हैयालाल देवरे, यांचा समन्वय लाभलेला आहे. तसेच विश्वस्त मंडळात अध्यक्ष अध्यक्ष चिंधू मोकळ,सचिव श्रीराम( नाना) महाजन ,उपाध्यक्ष संतोष महाजन,सदस्य युवराज महाजन,अशोक महाजन
यांचे मोलाचे मार्गदर्शन व सहभाग लाभला आहे. अखंड हरिनाम सप्ताह हे श्रद्धा, भक्ती व सामाजिक एकोप्याचे प्रतीक बनले असून, कृष्णापुरी परिसरात अध्यात्मिक चैतन्याची अनुभूती देणारा हा कार्यक्रम भाविकांसाठी एक पर्वणी ठरत आहे.

पाचोऱ्यातील खुशी पटवारी हिची महाराष्ट्र राज्य शिष्यवृत्ती परीक्षेत उत्तुंग झेप – गुणवत्तेत मानाचं स्थान मिळवत परिसराचं नाव उज्वल

0

Loading

पाचोऱ्यासारख्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी प्रेरणास्थान ठरणारी एक अत्यंत आनंददायी आणि गौरवशाली बातमी समोर आली आहे. द वर्ल्ड इंटरनॅशनल स्कूल, पाचोरा येथील आठवी इयत्तेतील कु. खुशी राजेश पटवारी हिने महाराष्ट्र शासनाच्या शिष्यवृत्ती परीक्षेत राज्यस्तरावर उल्लेखनीय यश मिळवत गुणवत्तावान विद्यार्थ्यांच्या यादीत आपली जागा पक्की केली आहे. जानेवारी २०२५ मध्ये महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये सहभागी झालेल्या जवळपास ३,८७,००० विद्यार्थ्यांपैकी खुशी पटवारी हिने उल्लेखनीय कामगिरी करत मेरिट यादीत आपले नाव चमकावले असून तिच्या या यशाबद्दल संपूर्ण जिल्ह्यातून आणि विशेषतः पाचोरा शहरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. ही परीक्षा महाराष्ट्रभरातील लाखो विद्यार्थ्यांसाठी एक मोठी शैक्षणिक संधी असते. या स्पर्धात्मक परीक्षेमध्ये विद्यार्थ्यांची बौद्धिक क्षमता, गणित आणि भाषा विषयातील आकलनशक्ती, तार्किक बुद्धिमत्ता, वाचनगती आणि सखोल समज यांची कसोटी लागते. अशा परीक्षेत मेरिट यादीत स्थान मिळवणे ही एक अत्यंत सन्मानाची आणि मेहनतीची गोष्ट असते. खुशीने ही गोष्ट आपल्या चिकाटी, अभ्यास, आणि सातत्यपूर्ण प्रयत्नाच्या जोरावर साकारली आहे. तिच्या या यशामुळे तिला महाराष्ट्र शासनाच्या वतीने शिष्यवृत्तीच्या स्वरूपात दर महिन्याला आर्थिक मानधन मिळणार असून हे मानधन तिच्या पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी निश्चितच उपयोगी ठरणार आहे. खुशीचा हा यशस्वी प्रवास केवळ तिच्या परीक्षेतील गुणांपुरता मर्यादित नसून, ती एक सर्वांगिण गुणवत्तेची विद्यार्थिनी आहे. यापूर्वीही तिने विविध स्तरांवरील परीक्षा, स्पर्धा व उपक्रमांमध्ये सहभाग घेत आपल्या शालेय आयुष्यात अनेक गौरवशाली कामगिरी बजावली आहे. तिला विविध विषयांमध्ये विशेष गोडी असून, ती नेहमीच ज्ञानप्राप्तीसाठी उत्सुक असते. तिच्या अभ्यासातील सातत्य, वेळेचे योग्य नियोजन, आणि आत्मविश्वास हे तिच्या यशामागचे मुख्य घटक आहेत. खुशी पटवारी हिची पार्श्वभूमी देखील उल्लेख करण्याजोगी आहे. ती कृषी उत्पन्न बाजार समिती पाचोरा येथील भुसार मालाचे व्यापारी सतीशशेठ यांची नात असून, प्रसिद्ध ज्येष्ठ पत्रकार राजेश पटवारी यांची ज्येष्ठ कन्या आहे. वडीलांच्या सामाजिक जाणीवा, वृत्तपत्र क्षेत्रातील दीर्घ अनुभव आणि आई-वडिलांचे सातत्यपूर्ण प्रोत्साहन हे तिच्या घडणीत मोलाचे ठरले आहे. ज्ञान, शिस्त, आणि समाजप्रती असलेली बांधिलकी यांचे संस्कार तिला बालपणापासूनच लाभले आहेत. या यशाचा परिसरात अत्यंत सकारात्मक प्रभाव पडला आहे. विविध सामाजिक, शैक्षणिक आणि सांस्कृतिक क्षेत्रातील मान्यवरांनी खुशीच्या या यशाचे कौतुक करत तिला उज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. तिच्या शाळेतील शिक्षक, वर्गमित्र, शेजारी, नातेवाईक, तसेच पाचोऱ्यातील सर्वच नागरिक तिच्या यशाबद्दल अभिमान व्यक्त करत आहेत. विशेषतः विद्यार्थिनी असूनही अशा मोठ्या स्तरावरील शिष्यवृत्ती परीक्षेत गुणवत्ता यादीत स्थान मिळवणे हे इतर विद्यार्थिनींसाठीही एक प्रेरणादायी उदाहरण ठरले आहे. खुशी हिने याआधीही वेगवेगळ्या परीक्षांमध्ये आपली गुणवत्ता सिद्ध करत विविध सन्मान, प्रशस्तीपत्रे, आणि गोल्ड मेडल्स मिळवले आहेत. त्यामुळे तिचे नाव आधीपासूनच शैक्षणिक क्षेत्रात प्रसिद्ध होतेच, मात्र शिष्यवृत्ती परीक्षेतील हे यश तिच्या नावाला अधिक प्रतिष्ठा आणि ओळख देणारे ठरले आहे. तिच्या शाळेतील शिक्षिका व मुख्याध्यापकांनीही सांगितले की, खुशी ही अत्यंत नम्र, शिस्तप्रिय, अभ्यासू आणि ध्येयवेडी विद्यार्थिनी आहे. अभ्यासाव्यतिरिक्त सांस्कृतिक कार्यक्रमांमध्येही ती सक्रीय सहभाग घेत असल्यामुळे तिच्या व्यक्तिमत्त्वात सर्वांगीण घडण दिसून येते. तिच्या यशामुळे तिच्या शाळेच्या शिक्षणपद्धतीला आणि व्यवस्थापनाला देखील दाद मिळत आहे. द वर्ल्ड इंटरनॅशनल स्कूल हे पाचोऱ्यातील एक नामांकित शिक्षणसंस्थान असून, येथील विद्यार्थी राज्य व राष्ट्रीय स्तरावर आपली गुणवत्ता सिद्ध करत असतात. त्यामध्ये खुशीच्या यशाची भर पडल्यामुळे इतर विद्यार्थ्यांमध्येही एक सकारात्मक ऊर्जा संचारली आहे. या यशाचे खरे श्रेय खुशीच्या अथक मेहनतीला, पालकांच्या प्रोत्साहनाला आणि शाळेच्या शैक्षणिक वातावरणाला जाते. तिने आपल्या नावाप्रमाणेच खरंतर संपूर्ण कुटुंबात आणि परिसरात आनंदाचा माहोल निर्माण केला आहे. तिचा हा प्रवास यशाकडून अधिक मोठ्या यशाकडे घेऊन जाईल याची खात्री बाळगता येते. तिचे भविष्यातील स्वप्न काय आहे, कोणत्या क्षेत्रात ती पुढे जाईल हे येणारा काळच सांगेल, मात्र इतकं निश्चित की तिची जिद्द, कष्टाची तयारी आणि यश मिळवण्याची तीव्र इच्छा तिला नक्कीच शैक्षणिक व व्यावसायिक जीवनात उत्तुंग शिखरांवर घेऊन जाईल. या गौरवशाली क्षणी तिच्या कुटुंबियांना, शिक्षकवर्गाला, शाळेला आणि परिसरातील सर्व नागरिकांना मनापासून शुभेच्छा. पाचोऱ्यातील खुशी पटवारीसारख्या विद्यार्थिनींमुळे ग्रामीण भागातील मुलींनाही आपले स्वप्न मोठे बघण्याची आणि ते सत्यात उतरवण्याची प्रेरणा मिळत आहे. खुशीचे हे यश केवळ एका विद्यार्थिनीचे यश नसून, ते संपूर्ण पाचोऱ्याचे, जिल्ह्याचे आणि ग्रामीण भागातील गुणवत्तेचे प्रतीक आहे. तिच्या पुढील वाटचालीसाठी मन:पूर्वक शुभेच्छा.

पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या प्रेरणेतून होतकरू विद्यार्थ्यांसाठी पुस्तक वाटप उपक्रम संपन्न

0

Loading

जळगाव – पद्मालय गेस्ट हाऊस येथे एक अत्यंत स्तुत्य व सामाजिक बांधिलकी अधोरेखित करणारा उपक्रम नुकताच पार पडला. महाराष्ट्र राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री आणि जळगाव जिल्ह्याचे खंबीर नेतृत्व, लोकसंग्रही पालकमंत्री मा. ना.भाऊसो. गुलाबराव पाटील यांच्या प्रेरणेतून व मार्गदर्शनातून त्यांच्या स्वीय सहाय्यक मा. नवलसिंगराजे पाटील यांच्या पुढाकाराने हा विशेष उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमांतर्गत जळगाव तालुक्यातील आसोदा गावातील स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या होतकरू, ग्रामीण व अल्पसाधनांवर शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना अत्यंत उपयुक्त व दर्जेदार पुस्तकांचे मोफत वाटप करण्यात आले. आजच्या स्पर्धात्मक युगात गुणवंत विद्यार्थ्यांना पुस्तके, माहिती व मार्गदर्शन या त्रिसूत्रीची गरज अधिक आहे. परंतु अनेक विद्यार्थ्यांची पार्श्वभूमी ग्रामीण व आर्थिकदृष्ट्या मर्यादित असल्याने त्यांना हवी ती साधने सहज उपलब्ध होत नाहीत. हीच बाब हेरून, शिक्षणाच्या माध्यमातून नवी दिशा देण्यासाठी, विद्यार्थ्यांमधील आत्मविश्वास वाढवण्यासाठी आणि त्यांच्या कष्टांना बळ देण्यासाठी मा. नवलसिंगराजे पाटील यांनी हृदयपूर्वक पुढाकार घेत विद्यार्थ्यांच्या हाती ज्ञानाची श्रीमंती देण्याचे कार्य केले. या कार्यक्रमास तालुकाप्रमुख शिवराज पाटील, आसोदा येथील उपसरपंच गिरीशभाऊ भोळे, ग्रामपंचायत सदस्य सुनील पाटील, अजय महाजन, अनिलभाऊ उमेश पाटील, अजय देशमुख यांच्यासह गावातील नागरिक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या सर्व मान्यवरांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत त्यांना प्रेरणा दिली.मान्यवरांनी विद्यार्थी व पालकांशी संवाद साधून समाजातील शिक्षणमूल्यांचे महत्त्व अधोरेखित केले. विशेष म्हणजे, हा संपूर्ण उपक्रम गाजावाजाविनाच, अत्यंत मनःपूर्वक व सेवाभावाने राबविण्यात आला. पुस्तक वाटप करताना विद्यार्थ्यांच्या डोळ्यांतील आनंद, आश्वस्ततेचे प्रतिबिंब आणि त्यांच्या स्वप्नांकडे वाटचाल करण्याचा निर्धार स्पष्ट दिसून येत होता. या प्रसंगी बोलताना मा. नवलसिंगराजे पाटील म्हणाले, “मा. गुलाबराव पाटील साहेब हे केवळ मंत्री नाहीत, तर विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी सदैव आस्थेने विचार करणारे एक संवेदनशील नेतृत्व आहेत. त्यांच्याच प्रेरणेतून आणि सामाजिक जाणिवेतून आम्ही हे पुस्तक वाटपाचे कार्य हाती घेतले आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना संधी दिल्यास ते नक्कीच यशस्वी होतात, ही आमची ठाम श्रद्धा आहे.” मा. ना. भाऊसो. गुलाबराव पाटील साहेब हे जळगाव जिल्ह्याचे अत्यंत सक्रिय, कार्यक्षम आणि लोकाभिमुख पालकमंत्री म्हणून परिचित आहेत. विकासाच्या प्रत्येक वाटेवर त्यांची अष्टपैलू भूमिका असतेच, परंतु शिक्षणासारख्या मूलभूत आणि दीर्घकालीन परिणाम देणाऱ्या क्षेत्रातही त्यांची असलेली आस्था प्रेरणादायक ठरते. जिल्ह्यातील अनेक शैक्षणिक उपक्रमांना त्यांनी वेळोवेळी चालना दिली असून, विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी त्यांनी कधीही कमी पडू दिलेले नाही. या उपक्रमात विद्यार्थ्यांना सामान्य ज्ञान, चालू घडामोडी, अंकगणित, बुद्धिमत्ता चाचणी, मराठी व इंग्रजी व्याकरण, राज्यसेवा व केंद्र सरकारच्या स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त अशा निवडक व दर्जेदार संदर्भ ग्रंथांचे वाटप करण्यात आले. या पुस्तकांचा लाभ विद्यार्थ्यांच्या अभ्यासक्रमाबरोबरच त्यांच्या सर्वांगीण बौद्धिक विकासासाठी उपयुक्त ठरणार आहे. तालुकाप्रमुख शिवराज पाटील यांनी आपल्या भाषणात सांगितले की, “सामाजिक जाणीव ठेऊन केलेले हे कार्य खरंच कौतुकास्पद आहे. नवलसिंह पाटील यांचा हा उपक्रम इतरांनीही अनुकरणीय समजून पुढे न्यावा.” उपसरपंच गिरीशभाऊ भोळे यांनी विद्यार्थ्यांना सतत अभ्यास, चिकाटी आणि आत्मविश्वास बाळगण्याचे आवाहन केले. “या पुस्तकांच्या रूपाने तुम्हाला यशाची चावी मिळाली आहे. आता ही संधी सोडू नका, स्वतःवर विश्वास ठेवा आणि मेहनत करत राहा,” असे ते म्हणाले. या उपक्रमामुळे गावातील वातावरण शिक्षणाभिमुख व सकारात्मक बनले. पालकांमध्ये उत्साह निर्माण झाला, तर विद्यार्थी अधिक सजगतेने अभ्यासाला लागतील, असा विश्वास व्यक्त करण्यात आला. शिक्षण क्षेत्रात गावपातळीवरून अशी प्रगल्भ आणि दूरदृष्टीपूर्ण पावले उचलली जात असल्याने भविष्यात या भागातून अधिकाधिक विद्यार्थी स्पर्धा परीक्षांमध्ये यश संपादन करून पुढे जातील, हे निश्चित. कार्यक्रमाच्या यशस्वीतेचे श्रेय पुन्हा एकदा मा. ना.
भाऊसो गुलाबराव पाटील साहेब यांच्याच सामाजिक जाणिवांना आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या अंमलात आणलेल्या योजनांना दिले गेले. त्यांच्या नेतृत्वाखाली शिक्षणासारख्या क्षेत्रात जेव्हा असे उपक्रम राबविले जातात, तेव्हा त्याचा थेट लाभ गावागावांतील तरुणांना, त्यांच्या कुटुंबांना आणि संपूर्ण समाजाला होतो. संपूर्ण कार्यक्रम संयमी, मनापासून आणि विधायक पद्धतीने पार पडला. यावेळी विद्यार्थ्यांनीही आपले मनोगत व्यक्त करत, मिळालेली पुस्तके ही त्यांच्यासाठी नवी उमेद, नव्या स्वप्नांची वाट खुली करणारी देणगी असल्याचे सांगितले. त्यांच्या चेहऱ्यावरचे आत्मविश्वासाचे हास्य हेच या उपक्रमाचे खरे यश होते.

येवले दांपत्यांचा आ.किशोर आप्पा पाटील यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत शिवसेना शिंदे गटात सक्रीय प्रवेश

0

Loading

पाचोरा – पाचोरा कृषी उत्पन्न बाजार समिती मार्केट यार्ड व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष सचिन येवले यांनी नुकताच आपल्या सहधर्मचारिणीसह म्हणजेच सौ. जयश्री सचिन येवले यांच्यासह शिवसेना शिंदे गटात अधिकृत प्रवेश केला आहे. या प्रवेशामुळे स्थानिक राजकारणात नवचैतन्य निर्माण झाले असून, उबाठा परिसरातील शिवसेना कार्यकर्त्यांमध्येही एक नवसंजीवनी निर्माण झाली आहे. शिंदे गटाच्या नेतृत्वावर आणि विशेषतः पाचोरा विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार किशोर आप्पा पाटील यांच्या मार्गदर्शनावर विश्वास ठेवून येवले दाम्पत्याने हा प्रवेश केला आहे.
सचिन येवले हे पाचोरा तालुक्यातील व्यापारी वर्गात एक अत्यंत प्रभावशाली व कर्तृत्ववान व्यक्तिमत्त्व म्हणून ओळखले जातात. ते हल्ली पाचोरा कृ उ बाजार समितीच्या व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष असून अनेक व्यापाऱ्यांच्या प्रश्नांवर त्यांनी प्रभावी पद्धतीने काम केले आहे. व्यापार, प्रशासन व सामाजिक क्षेत्रात त्यांचे कार्य विशेष उल्लेखनीय राहिले आहे. विविध सामाजिक उपक्रम, व्यापारी संघटनांचे प्रतिनिधित्व आणि जनतेशी असलेली त्यांची थेट बांधिलकी यामुळे ते समाजात एक विश्वासार्ह नेतृत्व म्हणून ओळखले जातात.
राजकीय क्षेत्रातही त्यांचा चांगला अनुभव असून, यापूर्वी ते शिवसेनेच्या उबाठा गटाशी जोडलेले होते. मात्र मागील काही काळापासून स्थानिक पातळीवर उबाठा गटाचे अस्तित्व बळकट न राहिल्यामुळे आणि नेतृत्वाच्या स्पष्टतेअभावी त्यांनी नव्याने विचार करत शिंदे गटाच्या शिवसेनेत सामील होण्याचा निर्णय घेतला. या प्रवेशावेळी त्यांच्या पत्नी सौ. जयश्री सचिन येवले यांनी देखील शिंदे शिवसेनेत सक्रिय सहभाग नोंदवला आहे. त्या उबाठा गटाच्या महिला शहर संघटिका म्हणून काम पाहत होत्या. सामाजिक व राजकीय क्षेत्रात त्यांचे कार्य नेहमीच समर्पित आणि सक्रिय राहिले आहे. महिलांच्या समस्या, आरोग्य, शिक्षण आणि स्थानिक विकासकामांमध्ये त्यांनी सहभाग घेतला असून, त्या परिसरातील महिलांमध्ये एक सशक्त नेतृत्व म्हणून ओळखल्या जातात. शिवसेना शिंदे गटात प्रवेश करताना दोघांनीही माननीय आमदार किशोर आप्पा पाटील यांच्या कार्यपद्धतीवर, लोकाभिमुख योजनांवर, मतदारसंघातील सर्वसमावेशक विकासकामांवर आणि जनतेशी असलेल्या दृढ संबंधांवर विश्वास व्यक्त केला. आमदार किशोर आप्पा पाटील यांनी शिंदे गटात असलेल्या सर्व कार्यकर्त्यांचे नेतृत्व करताना स्थानिक प्रश्नांवर मोठ्या ताकदीने लढा दिला आहे. त्यांच्या नेतृत्वामुळे संपूर्ण मतदारसंघात शिवसेनेला नवीन बळकटी मिळाली असून, अनेक नवे चेहरे पक्षात सक्रिय झाले आहेत. सचिन येवले व सौ. जयश्री येवले यांचा शिवसेना शिंदे गटात झालेला प्रवेश ही एक केवळ औपचारिकता नसून, त्यांच्या राजकीय इच्छाशक्तीचा, पक्षवाढीसाठीच्या बांधिलकीचा आणि लोकसेवेच्या विचारांचा परिपाक आहे. स्थानिक पातळीवर व्यापारी वर्ग, महिला मंडळ, सामाजिक संस्था व सामान्य नागरिकांमध्ये या प्रवेशाबाबत समाधानाची भावना व्यक्त होत आहे.
या प्रवेशामुळे उबाठा परिसरात शिंदे गटाचे संघटन अधिक बळकट होणार आहे. विशेषतः व्यापारी वर्ग व महिला संघटनांमध्ये नव्या जोमाने काम सुरू होईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. स्थानिक राजकारणातील हे एक महत्त्वाचे पाऊल ठरू शकते, ज्यामुळे आगामी काळात शिंदे गटाच्या संघटनेला अधिक चालना मिळण्याची शक्यता आहे.
आगामी पालिका, पंचायत समिती, जिल्हा परिषद व विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर विविध पक्षांमध्ये फेरजुळणीचे व नवीन गटबांधणीचे राजकारण सुरू असतानाच, सचिन येवले व त्यांच्या पत्नी यांचा शिंदे शिवसेनेत प्रवेश ही एक महत्वाची राजकीय हालचाल मानली जात आहे. सचिन येवले यांच्या नेतृत्वात व्यापारी वर्गाला एक सक्षम आवाज मिळणार असून, त्यांच्या अनुभवाचा उपयोग शिंदे गटाच्या धोरण व नियोजनात मोलाचा ठरणार आहे. सौ. जयश्री येवले यांच्यासारख्या सशक्त महिलांचा सहभाग हे देखील पक्षासाठी एक सकारात्मक पाऊल आहे.
या संपूर्ण प्रवेश सोहळ्यास शिंदे गटाचे अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते, महिला संघटनांच्या प्रतिनिधी व व्यापारी वर्गातील मान्यवरांची उपस्थिती लाभली. या प्रसंगी येवले दाम्पत्याला पुष्पगुच्छ व शुभेच्छा देऊन सत्कार करण्यात आला.
सचिन येवले यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, “शिवसेना शिंदे गट हा एक लोकशाही मूल्यांवर आधारित आणि सामान्य जनतेच्या प्रश्नांना प्राधान्य देणारा पक्ष आहे. आमदार किशोर आप्पा पाटील यांच्या नेतृत्वाखाली पक्षाचे कार्य हे पारदर्शक, प्रामाणिक व विकासाभिमुख असून, आम्ही दोघेही पूर्ण ताकदीने पक्षासाठी काम करू.”
सौ. जयश्री येवले यांनी आपल्या भावना व्यक्त करताना सांगितले की, “महिलांचे प्रश्न हे सामाजिक बदलाचे केंद्रबिंदू आहेत. शिंदे गटात महिलांना दिले जाणारे महत्त्व बचत गटाद्वारे कार्य व त्यांना नेतृत्व देण्याची संस्कृती पाहता, मला वाटते की हा पक्ष माझ्यासाठी एक योग्य व्यासपीठ आहे. मी संपूर्ण शक्तीनिशी पक्षासाठी काम करणार आहे.” या प्रवेशामुळे पाचोरा तालुक्यातील शिंदे गटाची ताकद अधिक वाढेल, अशी भावना स्थानिक राजकीय वर्तुळातून व्यक्त केली जात आहे. त्यामुळे येवले दाम्पत्याचा हा निर्णय पक्षासाठी एक नवे बळ व दिशा देणारा ठरेल, याबाबत कुठलीही शंका नाही.

श्री संत शिरोमणी नामदेव महाराज संजीवन समाधी सोहळा उत्साहात साजरा होणार

0

Loading

पाचोरा ( सरेश शिंपी Mo.9175556750 ) येथील श्री क्षत्रिय अहिर शिंपी समाज सेवा मंडळ, पाचोरा यांच्या वतीने संत शिरोमणी नामदेव महाराज संजीवन समाधी सोहळा दिनांक २२ जुलै २०२५ रोजी, मंगळवार दिनी भक्तिभावाने व मोठ्या उत्साहात साजरा करण्याचा निर्णय मंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून, सर्व समाजबांधव व भगिनींनी एकत्र येऊन या सोहळ्यात सहभाग घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
कार्यक्रमाचे औचित्य साधून संत नामदेव महाराज यांची पालखी नगरपरिक्रमेच्या स्वरूपात हरिनामाच्या गजरात मिरवणार असून, हळदीकुंकू, सत्यनारायण पूजा व महाप्रसाद आदी कार्यक्रमांच्या माध्यमातून संपूर्ण वातावरण भक्तिमय होणार आहे.
कार्यक्रमाची रूपरेषा पुढीलप्रमाणे राहणार आहे
सकाळी ७.३० वाजता
संत नामदेव महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन, सत्यनारायण पूजा, हळदीकुंकू कार्यक्रम व तिर्थप्रसाद व अल्पोपहाराचे आयोजन भुषण शिंपी यांच्या निवासस्थानी (तावरे कन्या शाळेजवळ, देशमुख वाडी) करण्यात आले आहे.
सकाळी ८.०० वाजता
त्याच ठिकाणाहून संत नामदेव महाराज यांच्या प्रतिमेची पालखी भव्य मिरवणूक स्वरूपात निघणार असून, हरिनाम संकीर्तनाच्या गजरात पालखी मार्गक्रमण करणार आहे.
पालखी मार्ग: देशमुखवाडी → राधेकृष्ण मंदिर → रंगार गल्ली → सोनार गल्ली → जामनेर रोड → छत्रपती शिवाजी महाराज चौक → स्वा. सै. अण्णासाहेब दामोदर लोटन महाजन चौक ( न पा ) प्रकाश टॉकी → समाज मंदिर.
पालखीचा समारोप समाज मंदिरात होणार आहे. सर्व समाजबांधवांनी आपले व्यवसाय बंद ठेवून कुटुंबासह या मिरवणुकीत सहभागी व्हावे, असे आयोजकांनी आवाहन केले आहे. सकाळी ११ ते दुपारी १.३० वाजेपर्यंत
कै. कुसुमबाई सदाशिव सोनवणे सभागृह, कै. अप्पासाहेब वाल्मीक ओंकारशेठ शिंपी समाज मंदिर, संत नामदेव महाराज मंदिर, संत नामदेव महाराज मार्ग, संभाजीनगर, पाचोरा येथे संजीवन समाधी सोहळ्याचा मुख्य कार्यक्रम पार पडणार आहे.
दुपारी १.३० ते ४ वाजेपर्यंत
सर्व भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.
या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भिकनशेठ शिंपी बसवणार असून
व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती नयनाताई निकम (जिल्हा अध्यक्षा, जळगाव जिल्हा महिला आघाडी, अ.भा. क्ष.अ. शिंपी समाज मध्यवर्ती संस्था) विजय खैरनार (म.का. सदस्य, अ.भा. क्ष.अ. शिंपी समाज मध्यवर्ती संस्था)
राजेंद्र शिंपी (माजी जिल्हा संघटक, अ.भा. क्ष.अ. शिंपी समाज मध्यवर्ती संस्था) कार्यक्रम व्यवस्थापक: धनराजशेठ सोनवणे, प्रविण शिंपी,
भुषण शिंपी, जितेंद्र शिंपी,
एकनाथ शिंपी व्यासपीठावर उपस्थित राहणार आहेत
कार्यक्रम यशस्वीतेसाठी सर्व शिंपी समाज बंधू-भगिनींसह
सुरेश शिंपी (सचिव)
मुकेश जगताप (उपाध्यक्ष)
विजय कापुरे (उपाध्यक्ष) दिपक प्रकाशशेठ (कार्याध्यक्ष) डॉ. मनोहर बाविस्कर (अध्यक्ष)
अंजली सोनवणे (महिला सचिव) दिपाली शिंपी (महिला उपाध्यक्षा)
नयना निकम (महिला कार्याध्यक्षा) मिना जगताप (महिला अध्यक्षा)
युवती मंडळाचे जान्वी जगताप (सचिव) श्रृती शिंपी (उपाध्यक्षा) दिपाली कापुरे (कार्याध्यक्षा)
अश्विनी शिंपी (अध्यक्ष)
युवक मंडळ: अक्षय पुणेकर (सचिव) विजयन निकम (उपाध्यक्ष) गणेश खैरनार (युवाध्यक्ष)
सदर कार्यक्रमाचे आयोजन अत्यंत भक्तिभाव, सामाजिक ऐक्य आणि सांघिक सहभागाच्या माध्यमातून समाजाच्या आध्यात्मिक उन्नतीसाठी केले जात आहे. सर्व समाज बांधवांनी व भगिनींनी कार्यक्रमात उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी, अशी नम्र विनंती आयोजकांनी केली आहे.

आज दि.21/07/2025 चे सर्व राशीचे भविष्य व शुभ अंक व रंग

0

Loading

मेष
आज मेहनती प्रयत्नांना मान्यता मिळणार आहे. आर्थिक क्षेत्रात जागरूकता आवश्यक आहे, परंतु पूर्वीच्या यशाचा फायदा मिळू शकतो.
शुभ अंक: १ • शुभ रंग: लाल

वृषभ
मालव्य राजयोगामुळे करिअरमध्ये प्रगती शक्य आहे, परंतु काही वैयक्तिकत स्तरावर ताण जाणवू शकतो. विश्रांती व ताळमेळ साधा.
शुभ अंक: ६ • शुभ रंग: गुलाबी

मिथुन
मानसिक ताण जाणवू शकतो, तरी बुधादित्य योगामुळे संवाद व करिअर दोन्हीमध्ये चांगली वाढ होईल.
शुभ अंक: ५ • शुभ रंग: पिवळा

कर्क
प्रवास आणि सर्जनशीलतेतून फायदा होईल. करिअरमध्ये बदल शक्य आहेत, विशेषतः संवादाच्या माध्यमातून.
शुभ अंक: ३ • शुभ रंग: निळा

सिंह
नेतृत्वगुण स्पष्ट होतील, राजयोगाचा फायदा मिळण्याची शक्यता आहे, परंतु कौटुंबिक वा शारीरिक ताण टाळा.
शुभ अंक: ९ • शुभ रंग: सोनेरी

कन्या
आज विरोध किंवा अडचणींना सामना करावा लागू शकतो. निर्णय घेण्यासाठी दोनदा विचार करणे आवश्यक.
शुभ अंक: ५ • शुभ रंग: हिरवा

तुला
आर्थिक तसेच संवादात्मक बाबींमध्ये सावधगिरी आवश्यक आहे. मात्र नात्यांमध्ये सौहार्द टिकेल.
शुभ अंक: २ • शुभ रंग: गुलाबी

वृश्चिक
मालव्य राजयोगामुळे आर्थिक जाणवली जाईल, परंतु खर्चावर नियंत्रण महत्वाचे.
शुभ अंक: ७ • शुभ रंग: काळा

धनु
काम, शिक्षण किंवा प्रवासात शक्यता आहे; मात्र बजेटवर नियंत्रण ठेवा.
शुभ अंक: ३ • शुभ रंग: नारिंगी

मकर
आत्मपरीक्षणाचा योग आहे; दीर्घकालीन निर्णयासाठी आजचा दिवस उपयुक्त ठरेल.
शुभ अंक: ८ • शुभ रंग: निळा

कुंभ
करिअर व सामाजिक प्रतिष्ठेत वाढ होण्याची शक्यता आहे; जुनी गुंतवणूक फळू शकते.
शुभ अंक: ४ • शुभ रंग: जांभळा

मीन
आर्थिक व करिअरमध्ये लाभ संभवतो; परंतु खर्च व भावना संतुलित ठेवणे आवश्यक आहे.
शुभ अंक: ७ • शुभ रंग: पांढरा

वाचकांनी वरील भविष्यवाणीचा अर्थ अचूक भविष्यवाणी म्हणून न लावता केवळ आत्मपरीक्षण आणि सकारात्मक प्रेरणा म्हणून घ्यावा.

मातापिता गोशाळा पिंपळगाव (हरेश्वर) आयोजित शुद्ध देशी गोवंश जतन व संवर्धन दिन २२ जुलै रोजी साजरा होणार

0

Loading

पिंपळगाव (हरेश्वर) येथील मातापिता गोशाळेच्या वतीने शुद्ध देशी गोवंशाच्या जतन व संवर्धनासाठी महाराष्ट्र शासनाच्या संकल्पनेनुसार मंगळवार, दिनांक २२ जुलै २०२५ रोजी सकाळी ११ वाजता विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. देशी गायीच्या महत्त्वाची जाणीव निर्माण करण्याच्या दृष्टीने आणि तिच्या संगोपन व संवर्धनाच्या उद्देशाने हा कार्यक्रम अत्यंत श्रद्धा व भावनेने साजरा करण्यात येणार आहे. या उपक्रमामागे समाजात गोवंशाबाबत आदरभाव, संवेदनशीलता आणि जागरुकता वाढवण्याचा हेतू आहे. महाराष्ट्र शासनाने गायीस ‘राज्यमाता’ गोमाता म्हणून घोषित केले असून दरवर्षी २२ जुलै हा दिवस ‘शुद्ध देशी गोवंश जतन व संवर्धन दिन’ म्हणून पाळण्यात यावा, असा निर्णय राज्याच्या पशुसंवर्धन मंत्री ⭐नामदार पंकजाताई मुंडे यांनी घेतला आहे. त्या निर्णयानुसार व प्रेरणेतून या वर्षीही गावोगाव विविध उपक्रमांचे आयोजन होत आहे. पिंपळगाव (हरेश्वर) येथील मातापिता गोशाळेच्या वतीनेही सदर दिनाचे औचित्य साधून गोवंश रक्षण आणि गोमातेच्या पूजनाचे धार्मिक तसेच सामाजिकदृष्ट्या महत्त्वपूर्ण असे आयोजन केले गेले आहे. ✨या कार्यक्रमाचे शुभहस्ते ह.भ.प. शिवानंदजी महाराज, संस्थानाधिपती गोविंद मंदिर संस्थान पिंपळगाव हरे. हे करणार असून त्यांनी सर्व गोभक्त, ग्रामस्थ, धर्मप्रेमी आणि सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या नागरिकांना उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे. कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून माजी आमदार तथा सामाजिक कार्यात सतत अग्रेसर असलेले मा. आमदार दिलीप ओंकार वाघ तसेच विद्यमान आमदार पाचोरा-भडगाव विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रतिनिधी मा. आमदार किशोरआप्पा पाटील हे कार्यक्रमास उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत. या कार्यक्रमाला पिंपळगाव-शिंदाड गटाचे जिल्हा परिषद सदस्य मा. मधुकर सुकदेव काटे, माजी पंचायत समिती सदस्य मा. विजय कडू पाटील, वाणेगाव तांडा येथील ह.भ.प. लक्ष्मणजी पवार, कवली येथील सरपंच मा. वसंत सांडू बनकर तसेच बजरंग दल, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व समस्त गोरक्षक यांची मान्यवर उपस्थिती लाभणार आहे. या कार्यक्रमाचे स्थळ माता-पिता गोशाळा, कवली ता. सोयगाव जि. छत्रपती संभाजीनगर असे असून ग्रामस्थांच्या व विविध संघटनांच्या सहकार्याने कार्यक्रमाची जय्यत तयारी करण्यात आलेली आहे. गोमातेचे धार्मिक व आध्यात्मिक महत्त्व भारतीय संस्कृतीत अनन्यसाधारण आहे. तिच्या प्रत्येक अंगा-खांद्याला पूजनीयत्व प्राप्त असून तिच्या शेण, दूध, गोमुत्र आदी गोवस्तूंचे आरोग्य व पर्यावरण रक्षणात उपयोगी योगदान आहे. अलीकडील काळात देशी गोवंशावर संकटांची छाया वाढली आहे. अशा वेळी शुद्ध देशी गायींच्या संगोपनासाठी समर्पित संस्थांची गरज आणि अशा कार्यक्रमांचे महत्त्व अधिक अधोरेखित होते. या कार्यक्रमाच्या माध्यमातून गावकऱ्यांमध्ये गोरक्षणाविषयी आदर व कृतज्ञतेची भावना जागृत होणार असून त्यातून अनेक तरुण गोरक्षणाच्या कामात सक्रिय सहभाग घेतील, असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला आहे. मातापिता गोशाळेच्या सर्व संचालक मंडळाच्या वतीने या कार्यक्रमासाठी व्यापक निमंत्रण देण्यात आले असून पंचक्रोशीतील भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून गोमातेसमवेत पूजनात सहभागी व्हावे, ही नम्र विनंती करण्यात आली आहे. कार्यक्रमानंतर गोमातेचे पारंपरिक पूजन, प्रवचन, आरती तसेच गायींच्या संगोपनासंदर्भातील मार्गदर्शनपर सत्रही आयोजित करण्यात येणार आहे. गोरक्षक व स्वयंसेवकांसाठी विशेष सन्मान समारंभाचे आयोजनही यावेळी करण्यात येणार असून गोशाळेतील कार्यकर्त्यांचे मनोबल वाढवण्यासाठी हा सोहळा अत्यंत प्रेरणादायी ठरेल, अशी अपेक्षा आयोजकांकडून व्यक्त केली जात आहे. गोमातेच्या रक्षणासाठी शासन, संस्था आणि ग्रामस्थ एकत्र येऊन ठोस कार्यवाही करत आहेत हेच या उपक्रमाचे वैशिष्ट्य असून ‘गोरक्षण हे राष्ट्ररक्षण’ या संकल्पनेला बळकटी देणाऱ्या या कार्यक्रमासाठी संपूर्ण गाव सध्या सज्ज झाला आहे. उपस्थित राहणाऱ्या प्रत्येक भाविक भक्तासाठी हा दिवस गोमातेसमवेत साधना, सेवा व श्रद्धेचा ऐतिहासिक क्षण ठरणार आहे.

आज रोटरी क्लब पाचोरा-भडगावचा पद्ग्रहण समारंभ

0

Loading

पाचोरा – सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या रोटरी क्लब ऑफ पाचोरा-भडगावच्या अध्यक्षस्थापना व नवीन संचालक मंडळाच्या नियुक्तीचा सोहळा आज, रविवार दि. २० जुलै २०२५ रोजी सायंकाळी ७ वाजता भडगाव रोडवरील हॉटेल स्वप्नशिल्प रेसिडेन्सी येथे मोठ्या उत्साहात संपन्न होणार आहे.
आज रोटरी इंटरनॅशनल डिस्ट्रिक्ट ३०३० अंतर्गत येणाऱ्या या क्लबच्या अध्यक्षस्थापना या सोहळ्याला “UNITE FOR GOOD” हे प्रेरणादायी घोषवाक्य लाभले असून, सामाजिक विकासाच्या दिशेने रोटरीची पुढील वाटचाल यानिमित्ताने निश्चित होणार आहे. या विशेष कार्यक्रमात डिस्ट्रिक्ट गव्हर्नर २०२५-२६ रोटेरियन ज्ञानेश्वर शेवाळे हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार असून, त्यांच्या हस्ते नूतन अध्यक्ष आणि संचालक मंडळाची औपचारिक स्थापना होणार आहे. तसेच कार्यक्रमाला विशेष सन्माननीय पाहुणे म्हणून बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे माजी कुलगुरु डॉ. के. बी. पाटील,रोटरीचे असिस्टंट गव्हर्नर किरण देशमुख हेही कार्यक्रमास उपस्थित राहणार आहेत.
2025-26 या कार्यवर्षासाठी रो.डॉ. मुकेश तेली हे अध्यक्षपद भूषवणार असून, सचिवपदी रो.डॉ. अजयसिंह परदेशी यांची निवड झाली आहे. या दोघांच्या नेतृत्वाखाली यावर्षी रोटरी क्लब विविध सामाजिक, शैक्षणिक व आरोग्यविषयक उपक्रम हाती घेणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
या सोहळ्याचे अध्यक्ष यजमानपद क्लबचे विद्यमान अध्यक्ष रोटेरियन डॉ. पवन पाटील आणि सचिव रोटेरियन डॉ. शिवाजी शिंदे हे पार पाडणार असून, विविध मान्यवरांचे स्वागत व सन्मान करण्याची त्यांनी तयारी पूर्ण केली आहे
कार्यक्रमाचे आयोजन भव्य स्वरूपात करण्यात आले असून, रोटरीच्या स्थानिक सदस्यांसोबतच विविध क्षेत्रांतील प्रतिष्ठित नागरिक, पत्रकार, डॉक्टर, व्यापारी वर्ग, सामाजिक कार्यकर्ते आदी मान्यवरांची उपस्थिती राहणार आहे.
तरी निमंत्रितांनी वेळेवर उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले असून, पाचोरा व भडगाव परिसरातील रोटरी सदस्यांमध्ये उत्सुकता व आनंदाचे वातावरण आहे.

आज दि.20/07/2025 चे सर्व राशीचे भविष्य व शुभ अंक व रंग

0

Loading

मेष
आज तुमचा आत्मविश्वास आणि परिश्रम यांना बळ मिळेल. आर्थिक व्यवहारात सावधगिरी बाळगा. ज्यांचे पूर्वीचे प्रयत्न फळाला आले नाहीत, त्यांना आज ती संधी मिळेल.
शुभ अंक: १ • शुभ रंग: लाल

वृषभ
मालव्य राजयोगाचा परिणाम जाणवेल—कारकिर्दीत प्रगती शक्य, पण भावनिक पातळीवर ताण येऊ शकतो; विश्रांती आणि ताळमेळ राखा 
शुभ अंक: ६ • शुभ रंग: गुलाबी

मिथुन
आज बुधादित्य योगामुळे करिअरमध्ये सकारात्मक बदल येतील; आर्थिक लाभाच्या संधी दिसतील, पण मानसिक ताण जाणवू शकतो 
शुभ अंक: ५ • शुभ रंग: पिवळा

कर्क
ज्या लोकांना प्रमोशन, नवीन जबाबदारी किंवा प्रवासाची अपेक्षा होती, त्यांना आज त्याची संधी मिळेल; सर्जनशीलतेवर भर द्या 
शुभ अंक: ३ • शुभ रंग: निळा

सिंह
आज तुम्ही नेतृत्वगुणांनी स्वतःला सिद्ध करू शकता; राजयोगाचा परिणाम त्यात वृद्धी करेल. आरोग्यावर लक्ष ठेवणे आवश्यक 
शुभ अंक: ९ • शुभ रंग: सोनेरी

कन्या
आज कामात विरोध किंवा मानसिक ताण वाटू शकतो; निर्णय घेण्यापूर्वी दोनदा विचार करा आणि संयम ठेवा 
शुभ अंक: ५ • शुभ रंग: हिरवा

तुला
शत्रूप्रभावाचा धोका आहे, त्यामुळे आर्थिक आणि संवादात दक्षता बाळगा; नात्यांमध्ये समर्पण ठेवा 
शुभ अंक: २ • शुभ रंग: गुलाबी

वृश्चिक
मालव्य राजयोगामुळे आर्थिक प्रगती होण्याची शक्यता आहे, परंतु खर्चाचा विचारपूर्वक विचार करा 
शुभ अंक: ७ • शुभ रंग: काळा

धनु
आज काम, शिक्षण किंवा प्रवासाच्या संदर्भात मोठ्या यशाची शक्यता आहे, पण खर्चावर नियंत्रण ठेवा 
शुभ अंक: ३ • शुभ रंग: नारिंगी

मकर
आत्मपरीक्षणाचा योग असल्याने दीर्घकालीन निर्णयांसाठी योग्य दिवस आहे. संयम ठेवा, आणि चांगल्या परिणामांची अपेक्षा ठेवा 
शुभ अंक: ८ • शुभ रंग: निळा

कुंभ
आर्थिक व करिअर संबंधित स्थितीत वाढ होईल, सामाजिक प्रतिष्ठेतही प्रगती होण्याची शक्यता आहे
शुभ अंक: ४ • शुभ रंग: जांभळा

मीन
बुद्धियुक्त निर्णय घेण्याचा योग आहे; आर्थिक व कार्यक्षेत्रात उन्नतीची शक्यता दिसते, पण खर्च व भावना संतुलित ठेवा 
शुभ अंक: ७ • शुभ रंग: पांढरा

वाचकांनी वरील भविष्यवाणीचा अर्थ अचूक भविष्यवाणी म्हणून न लावता केवळ आत्मपरीक्षण आणि सकारात्मक प्रेरणा म्हणून घ्यावा.

ताज्या बातम्या

error: Content is protected !!