Home Blog Page 56

परंपराएँ तोड़ते हुए: भारत के औद्योगिक क्षेत्र में महिलाओं की नई पहचान – Principal Deepak Baviskar

0

Loading

नासिक – कभी केवल सिलाई, ब्यूटी पार्लर या फैशन डिज़ाइन तक सीमित रहने वाली महिलाएँ आज मशीन वेल्ड कर रही हैं, इंजन असेंबल कर रही हैं और प्रोडक्शन लाइनों की प्रमुख बन रही हैं। महाराष्ट्र के औद्योगिक प्रशिक्षण संस्थानों (आईटीआई) में एक शांत क्रांति चल रही है, जो साबित कर रही है कि महिलाएँ अब दर्शक मात्र नहीं बल्कि भारत की औद्योगिक विकास यात्रा की असली ताकत हैं। नीता सिद्धार्थ माली की कहानी इसका सबसे बड़ा उदाहरण है। एक साधारण परिवार से आने वाली नीता ने 2005–2007 के बीच नासिक महिला आईटीआई से इलेक्ट्रॉनिक्स मैकेनिक का प्रशिक्षण लिया। इसके बाद उन्होंने रिशभ इंस्ट्रूमेंट्स प्रा. लि. में अप्रेंटिस के रूप में शुरुआत की, नैश रोबोटिक्स में काम किया और आज वह एक महिला उत्पादन इकाई की लाइन इंचार्ज और प्रोडक्शन हेड हैं। इसी तरह, प्रणाली सपटुते, जिन्होंने ड्राफ्ट्समैन मैकेनिक का प्रशिक्षण लिया, आज अनुसंधान एवं विकास डिज़ाइन विभाग में कार्यरत हैं। जीजाबाई गवली, इलेक्ट्रॉनिक्स मैकेनिक की प्रशिक्षु, अब गोग्गटे इलेक्ट्रो सिस्टम्स प्रा. लि. में प्रोडक्शन हेड के पद पर हैं। वहीं दीपाली कुलकर्णी ने आईटीआई प्रशिक्षण के बाद स्वयं की फैक्ट्री स्थापित कर सतपुर औद्योगिक क्षेत्र में उद्यमिता का उदाहरण पेश किया है। अम्रपाली सपकाले, मशिनिस्ट कोर्स पूरा करने के बाद अब भारतीय रेल (भुसावल) में तकनीशियन के पद पर कार्यरत हैं। इन कहानियों ने यह सोच बदल दी है कि महिलाएँ केवल पारंपरिक क्षेत्रों तक ही सीमित हैं। पहले जहाँ कंपनियाँ महिलाओं को शॉप फ्लोर पर नियुक्त करने से हिचकिचाती थीं, वहीं आज महिंद्रा एंड महिंद्रा और टाटा मोटर्स जैसी कंपनियाँ न केवल उन्हें रोजगार दे रही हैं बल्कि विशेष महिला उत्पादन लाइनें भी तैयार कर रही हैं। महिलाएँ अब वाहनों की पेंटिंग से लेकर इंजन असेंबली तक की ज़िम्मेदारी संभाल रही हैं। परिणाम भी उल्लेखनीय हैं – 80% से अधिक महिला प्रशिक्षुओं को अंतिम परीक्षा से पहले ही कैम्पस इंटरव्यू के माध्यम से नौकरी मिल जाती है। इलेक्ट्रॉनिक्स और आईटी जैसे क्षेत्रों में, जहाँ अत्यधिक शुद्धता की आवश्यकता होती है, महिलाओं की सटीकता उन्हें विशेष लाभ देती है। इसी कारण कई कंपनियाँ पूरी की पूरी बैच को भर्ती कर रही हैं। वर्तमान में महाराष्ट्र में 419 सरकारी आईटीआई संचालित हैं, जो 83 विभिन्न व्यावसायिक पाठ्यक्रमों के माध्यम से हर साल 1 लाख से अधिक विद्यार्थियों को प्रशिक्षण देते हैं। इनमें 30% सीटें महिलाओं के लिए आरक्षित हैं। इसके अतिरिक्त, 15 विशेष महिला आईटीआई भी हैं जहाँ 24 ट्रेड्स में हर साल 4,000 से अधिक महिलाओं को प्रशिक्षण दिया जाता है। सबसे महत्वपूर्ण बात यह है कि इसमें आयु की कोई सीमा नहीं है – 14 वर्ष की बालिकाओं से लेकर 50 वर्ष से अधिक आयु की महिलाएँ भी इसमें प्रवेश ले सकती हैं। नासिक में योगिता मोरे और उनकी बेटी आरती मोरे ने साथ-साथ अलग-अलग ट्रेड में दाखिला लिया है, जबकि 56 वर्षीय नूतन हेब्बड़े ने हाल ही में कंप्यूटर ऑपरेटर एवं प्रोग्रामिंग असिस्टेंट का कोर्स पूरा किया है। यह परिवर्तन केवल रोजगार का नहीं बल्कि सम्मान, आत्मनिर्भरता और बाधाएँ तोड़ने का प्रतीक है। औद्योगिक क्षेत्र, जो कभी पुरुष प्रधान माना जाता था, आज महिलाओं की दक्षता और संकल्प से नया आकार ले रहा है। उनकी सफलता न केवल उन्हें सशक्त बना रही है, बल्कि आत्मनिर्भर भारत के स्वप्न को भी साकार कर रही है। सचमुच, जब महिलाएँ आगे बढ़ती हैं, तो राष्ट्र भी आगे बढ़ता है।           -Deepak Vijaya Bhaskar Baviskar
Principal
Sant Mirabai Industrial Training Institute (Women),Nashik Mo-8275270548

आज दि.30/08/2025 चे सर्व राशीचे भविष्य व शुभ अंक व रंग

0

Loading

मेष:
आज सामाजिक व व्यावसायिक क्षेत्रात प्रतिष्ठा वाढेल.
महत्त्वाची कामे पूर्ण होतील. दिवस ऊर्जा देणारा असेल.
शुभ अंक: १
शुभ रंग: भगवा

वृषभ:
नवीन कामाची सुरुवात होऊ शकते. आर्थिक दृष्टीने लाभदायक दिवस.
कुटुंबात आनंददायक वातावरण राहील.
शुभ अंक: ६
शुभ रंग: हिरवा

मिथुन:
दैनंदिन कामे वेळेत पूर्ण होतील. सहकारी मदतीला येतील.
प्रेम व मैत्रीच्या नात्यात मधुरता वाढेल.
शुभ अंक: २
शुभ रंग: पांढरा

कर्क:
मन थोडे अस्थिर राहील. जुन्या गोष्टी आठवून उदास वाटेल.
आध्यात्मिक कार्यात मन रमवा, सकारात्मक विचार ठेवा.
शुभ अंक: ९
शुभ रंग: निळा

सिंह:
स्वतःवरील आत्मविश्वास वाढेल. महत्त्वाची योजना यशस्वी होईल.
संधींचा फायदा घ्या, दिवस अनुकूल आहे.
शुभ अंक: ४
शुभ रंग: सोनरी

कन्या:
थोडा धीर धरावा लागेल. निर्णय घेण्याआधी सल्ला आवश्यक.
कामात अडथळे असले तरी प्रयत्न सुरू ठेवा.
शुभ अंक: ८
शुभ रंग: तपकिरी

तूळ:
व्यवसायात वाढीचा दिवस. कुटुंबात आनंददायक घटना घडतील.
शेवटी तुमचा संयम यश देईल.
शुभ अंक: ५
शुभ रंग: गुलाबी

वृश्चिक:
नवीन जबाबदाऱ्या स्वीकाराव्या लागतील.
सतर्क राहूनच व्यवहार करा. संयम आवश्यक.
शुभ अंक: ३
शुभ रंग: राखाडी

धनु:
विद्यार्थ्यांसाठी चांगला दिवस. अभ्यासात मन लागेल.
प्रवासाची शक्यता आहे. कौटुंबिक आनंद वाढेल.
शुभ अंक: ७
शुभ रंग: केशरी

मकर:
नवीन करार, व्यवहार यशस्वी होतील.
आरोग्य उत्तम राहील. दिवस सकारात्मक आहे.
शुभ अंक: ६
शुभ रंग: हलका हिरवा

कुंभ:
मनातील विचार प्रकट करण्यासाठी योग्य वेळ आहे.
जुन्या ओळखींतून लाभ होईल.
शुभ अंक: २
शुभ रंग: फिकट निळा

मीन:
भावनिक निर्णय टाळा. खर्चावर नियंत्रण आवश्यक.
थोडा वेळ स्वतःसाठी काढा.
शुभ अंक: ५
शुभ रंग: पिवळा

वाचकांनी वरील भविष्यवाणीचा अर्थ अचूक भविष्यवाणी म्हणून न लावता केवळ आत्मपरीक्षण आणि सकारात्मक प्रेरणा म्हणून घ्यावा.

पाचोरा येथे सकल हिंदू समाजातर्फे भव्य मूक मोर्चा : अल्पवयीन मुलीवरील अमानुष अत्याचाराविरोधात संतापाचा ज्वालामुखी फुटला

0

Loading

पाचोरा (जि. जळगाव) – तालुक्यातील पिंपळगाव हरेश्वर पोलीस ठाणे हद्दीतील एका अल्पवयीन १७ वर्षीय शाळकरी मुलीवर झालेल्या अमानुष अत्याचाराने संपूर्ण परिसर हादरून गेला आहे. शालेय बस चालक असलेला ४१ वर्षीय आबिद हुसेन शेख या विकृत प्रवृत्तीच्या व्यक्तीने फोटो आणि व्हिडिओ दाखवून मुलीला मानसिक छळ देत वारंवार तिच्यावर अत्याचार केला. पीडितेच्या निष्पाप आयुष्यावर काळोख पसरवणारी ही घटना उघड होताच समाजमनात प्रचंड संतापाची लाट उसळली. या प्रकरणात पिंपळगाव पोलिसांनी तातडीने गुन्हा दाखल करून आरोपी आबिद हुसेन शेख आणि त्याच्या आईला अटक केली असून, दोघांना न्यायालयीन कोठडीत पाठवून जिल्हा कारागृहात रवानगी करण्यात आली आहे. या विकृत कृत्याचा निषेध करण्यासाठी आणि दोषींना कठोर शिक्षा व्हावी या मागणीसाठी शुक्रवार दि. २९ ऑगस्ट २०२५ रोजी पाचोरा शहरात सकल हिंदू समाजातर्फे भव्य मूक मोर्चा काढण्यात आला. सकाळीच कृष्णापुरी भागातील हनुमान मंदिर परिसरात नागरिकांचा जमाव उसळू लागला. महिला, विद्यार्थिनी, महाविद्यालयीन तरुण, शेतकरी, व्यापारी, सामाजिक कार्यकर्ते, राजकीय नेते—सर्व जण संतप्त मनाने रस्त्यावर उतरले. काहींच्या डोळ्यांत अश्रू दाटले होते, काहींच्या चेहऱ्यावर प्रचंड राग ओसंडून वाहत होता. गालावर रुमाल धरून स्त्रिया रडत होत्या, पण हातात फलक घट्ट पकडून उभ्या होत्या—“आरोपीला फाशी झालीच पाहिजे”, “लव जिहाद थांबवा” असे ठळक संदेश देणारे हे फलक संपूर्ण मोर्चाला धार देत होते. मोर्चामध्ये सहभागी झालेल्या शाळकरी मुलींच्या चेहऱ्यावर भीती, संताप आणि असुरक्षिततेचे मिश्र भाव उमटले होते. “उद्या आमच्या बरोबर असे घडले तर…?” असा प्रश्न त्यांच्या नजरेत दाटलेला जाणवत होता. गावागावांतून आलेल्या महिलांनी आपल्या लहान मुलांना घट्ट मिठी मारत चाल करत सहभाग नोंदवला. पायवाटेवर चालणाऱ्या या हजारोंच्या जनसमुदायाने मौन बाळगले होते, पण त्यांच्या पावलांचा आवाज जणू काळजाला हादरवणाऱ्या हंबरड्यासारखा घुमत होता. कृष्णापुरी भागातून निघालेला मोर्चा शहरातील मुख्य मार्गाने छत्रपती शिवाजी महाराज चौकापर्यंत गेला. प्रत्येक वळणावर नागरिकांची गर्दी वाढत गेली. बालकांपासून ते वयोवृद्धांपर्यंत सर्वजण रस्त्यावर उतरले होते. अंगावर शहारे आणणारे ते दृश्य—एखाद्या लष्करी तुकडीसारखा शिस्तबद्ध जनसमुदाय, पण हातात हत्यारे नव्हती… होती ती केवळ फलकं, घोषवाक्यं आणि मौनातील आक्रोश. मोर्चाच्या समारोपस्थळी प्रशासनाला निवेदन देण्यात आले. या निवेदनात काही ठोस मागण्या मांडण्यात आल्या—पीडित मुलीला तातडीने मानसिक, आर्थिक व वैद्यकीय मदत मिळावी. आरोपींवर फास्ट ट्रॅक कोर्टात खटला चालवून अल्पावधीत फाशीची शिक्षा सुनावली जावी. शालेय प्रशासनाने तक्रारीकडे दुर्लक्ष केले, त्यांचीही चौकशी करून जबाबदारी निश्चित करावी. यापुढे अशा घटना घडू नयेत म्हणून प्रशासनाने ठोस पावले उचलावीत. निवेदन स्वीकारताना नायब तहसीलदार विनोद कुमावत व पोलिस निरीक्षक राहुलकुमार पवार यांच्यासमोर अनेक महिला डोळ्यात पाणी आणून “आमच्या मुली सुरक्षित ठेवा” अशी हाक देत होत्या. विश्व हिंदू परिषद, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ स्वयंसेवक, धर्मजागरण विभागाचे कार्यकर्ते यांनी मोर्चातील जनतेला संबोधित करताना लव जिहादच्या कटकारस्थानांवर जोरदार भाष्य केले. “ही केवळ एका मुलीची वेदना नाही, तर प्रत्येक हिंदू घरातील लेकीची किंकाळी आहे” असे उद्गार व्यक्त करत त्यांनी समाजाला जागृत राहण्याचे आवाहन केले. गोरक्षनाथ आखाड्याचे महंत योगी दत्तनाथ महाराज यांनी ठाम शब्दांत सांगितले—“यापुढे अशा प्रकारांना हिंदू समाज गप्प बसणार नाही, समाजातील प्रत्येक लेकीला बहीण मानून तिच्या सुरक्षिततेसाठी आपण सज्ज आहोत.” याच घटनेच्या निषेधार्थ शेंदुर्णी व पिंपळगाव हरेश्वर येथेही यापूर्वी मूक मोर्चे निघाले होते. मात्र पाचोरा येथे काढलेला हा मोर्चा अधिक भव्य व प्रचंड लोकसहभागाने यशस्वी ठरला. सर्व जाती, पंथ, संप्रदाय आणि राजकीय पक्षातील हिंदू समाज एकत्र येऊन या अमानुष घटनेविरोधात एकमुखीपणे उभा ठाकला. मोर्चात आमदार किशोरआप्पा पाटील, पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्थेचे चेअरमन नानासाहेब संजय वाघ, भाजप नेत्या वैशालीताई सूर्यवंशी, गोविंद शेलार, दीपक माने, पाचोरा पंचायत समितीचे माजी सभापती बन्सीलाल पाटील, अखिल भारतीय गुर्जर परिषदेचे राष्ट्रीय सचिव संदीप महाजन, एरंडोल पंचायत समितीचे माजी सभापती अनिल महाजन, भाजप युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष परेश पाटील यांच्यासह विविध मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यांच्या उपस्थितीने नागरिकांचा आत्मविश्वास अधिक दृढ झाला. हजारोंचा जनसमुदाय रस्त्यावर उतरल्यानंतर शहरात तणाव निर्माण होण्याची शक्यता होती. परंतु पाचोरा पोलिस निरीक्षक राहुल कुमार पवार यांच्या नेतृत्वाखाली पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त ठेवून संपूर्ण मोर्चा शांततेत पार पडला. मोर्चाच्या अखेरीस नागरिकांच्या डोळ्यांतून एकच संदेश उमटत होता—“आमच्या लेकींवर हात टाकणाऱ्यांना समाज माफ करणार नाही.” हा मोर्चा केवळ एका गुन्ह्याविरोधात नव्हता, तर समाजातील प्रत्येक मुलगी सुरक्षित राहावी यासाठीची सामूहिक प्रतिज्ञा होती.

समर्पित सेवेला सलाम – संजय दत्तू सरांचा सेवायात्रेचा अखेरचा टप्पा

0

Loading

पाचोरा : प्रत्येक शिक्षक हा आपल्या कार्यकाळात शेकडो विद्यार्थ्यांचे भविष्य घडवतो. तो केवळ वर्गात शिकवत नाही, तर विद्यार्थ्यांच्या आयुष्यात प्रेरणेचा दीप प्रज्वलित करतो. अशाच तेजस्वी प्रवासातून समाजाला घडवणारे संजय सिताराम दत्तू हे 28 वर्षांच्या अखंड सेवेनंतर 31 ऑगस्ट 2025 रोजी श्री गो से हायस्कूल चे शिक्षक म्हणून सेवानिवृत्त होत आहेत. साध्या शेतकरी कुटुंबात जन्मलेले दत्तूसर लहानपणापासूनच मेहनत, प्रामाणिकपणा आणि चिकाटीचे धनी होते. प्राथमिक शिक्षण अण्णासाहेब सु. भा. पाटील विद्यामंदिर पाचोरा येथे झाले, तर माध्यमिक शिक्षण श्री. गो. से. हायस्कूलमध्ये पूर्ण केले. शिक्षणासोबतच क्रीडाक्षेत्रातही त्यांचे विशेष प्राविण्य होते. कबड्डी, हँडबॉल, बास्केटबॉल आणि ॲथलेटिक्स या खेळांमध्ये त्यांनी प्रावीण्य मिळवून विद्यार्थी जीवनात शाळेचे नाव उज्ज्वल केले. महाविद्यालयीन शिक्षण त्यांनी श्री शेठ एम. एम. कॉलेज, पाचोरा येथे घेतले आणि केमिस्ट्री विषयात बी.एस्सी. पदवी संपादन केली. त्यानंतर शिक्षणक्षेत्राची ओढ मनात बाळगून त्यांनी 1993 मध्ये सद्गुरु एज्युकेशन सोसायटी, जळगाव येथून बी.पी.एड. पदवी संपादन केली. शिक्षक म्हणून विद्यार्थ्यांचे सर्वांगीण व्यक्तिमत्त्व घडवण्याचे ध्येय त्यांनी मनाशी पक्के केले. 1 जुलै 1997 हा त्यांच्या आयुष्यातील अविस्मरणीय दिवस ठरला. कारण याच दिवशी त्यांची नेमणूक श्री. गो. से. हायस्कूल, पाचोरा येथे झाली. या शाळेतच त्यांनी तब्बल 28 वर्षे अखंड सेवा बजावत असंख्य विद्यार्थ्यांच्या जीवनात ज्ञान, संस्कार व शिस्तीचा पाया घातला. शाळेत काम करताना त्यांना नेहमीच मुख्याध्यापकांचे सहकार्य लाभले.त्यात प्रामुख्याने एस. एम. जाधव सर, मथुरवैष्य सर, एस. एच. पवार सर, सौ. पी. एम. वाघ मॅडम आणि एन. आर. पाटील सर यांनी वेळोवेळी दिलेल्या मार्गदर्शनामुळे त्यांची सेवा अधिक परिणामकारक ठरली. पाचोरा तालुका एज्युकेशन सोसायटीचे पदाधिकारी स्वा.सै.दादासाहेब आर एस थेपडे व आप्पासो ओं.ना. वाघ यांच्यामुळे संस्थेच्या कामकाजात आपले योगदान देण्याची संधी मिळाली. संस्थेचे सध्याचे पदाधिकारी माजी आमदार भाऊसाहेब दिलीप वाघ व नानासाहेब संजय वाघ यांनीही त्यांच्या सेवाकाळात अनमोल सहकार्य दिले. या सगळ्या मार्गदर्शनामुळेच आज या यशस्वी वाटचालीचा मुक्काम साध्य झाला, असे दत्तूसर भावुकतेने सांगतात. त्यांचा वैयक्तिक प्रवासही तितकाच प्रेरणादायी आहे. 1998 मध्ये विवाह झाला. पत्नी स्वतः शिक्षिका आहेत. दत्तू यांच्या आयुष्याच्या संपूर्ण कारकिर्दीमध्ये आई – वडील , भाऊ बहीण,पत्नी यांचा मोलाचा वाटा आहे. शैक्षणिक क्षेत्रातील जबाबदाऱ्या पार पाडताना प्रामुख्याने पत्नीने कुटुंबाची धुरा समर्थपणे सांभाळली. नोकरी काळात पतीला प्रत्येक टप्प्यावर प्रेरणा व आधार देत त्यांच्या आयुष्याच्या प्रत्येक यशात ती खंबीरपणे उभी राहिली. म्हणूनच दत्तू सर अभिमानाने सांगतात – “माझ्या या सेवायात्रेच्या यशाचे खरे श्रेय माझ्या माता – पितांसह पत्नीला पण जाते.” तिच्या सहकार्यामुळेच मी कुटुंबातील पुढील पिढीही ज्ञानाच्या परंपरेला पुढे नेत आहे. एक मुलगी एमबीबीएस शिक्षण पूर्ण करून वैद्यकीय क्षेत्रात आपली ओळख निर्माण करत आहे, तर मुलगा अभियांत्रिकीच्या तिसऱ्या वर्षाला शिकत आहे. आई-वडिलांनी जो संस्कारांचा पाया रचला तो त्यांच्या मुलांमध्येही दिसून येत आहे. सेवाकाळात दत्तूसर यांना अनेक हितचिंतक, नातेवाईक आणि बालमित्रांची साथ लाभली. प्रमोद जडे, संदीप महाजन, प्रदीप पाटील, शैलेश मोरे आणि संजय सूर्यवंशी हे बालमित्र त्यांच्या सुख-दुःखात सदैव खंबीरपणे उभे राहिले. या मैत्रीची नाळ आजही तितकीच घट्ट आहे. 31 ऑगस्ट 2025 रोजी जेव्हा सेवानिवृत्तीची घंटा वाजेल, तेव्हा शाळेच्या प्रांगणात एक वेगळेच वातावरण निर्माण होईल. वर्गखोल्यांमध्ये विद्यार्थ्यांच्या आठवणी, खेळाच्या मैदानावर उमटलेले पाऊलखूण, शिक्षकांच्या सभागृहातील गप्पा, सहकाऱ्यांसोबतचे अनमोल क्षण – या साऱ्या आठवणी दत्तू सर यांच्या मनात कायमच्या कोरल्या जातील. “28 वर्षांचा हा प्रदीर्घ प्रवास म्हणजे माझ्या आयुष्यातील एक अखंड साधना आहे. शेकडो विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करता आले, पालकांचा विश्वास संपादन करता आला, सहकाऱ्यांसोबत आयुष्यभर टिकणारे संबंध जोडता आले – हीच माझी खरी कमाई आहे. शाळा, संस्था, सहकारी, मित्र व हितचिंतक यांनी दिलेले आशीर्वाद हे माझ्या जीवनाचे सर्वोच्च बक्षीस आहे,” अशा भावना संजय सिताराम दत्तू आपल्या सहकाऱ्यांसमोर व्यक्त करतात. खरं तर शिक्षकाची सेवानिवृत्ती ही केवळ नोकरी संपल्याची औपचारिकता नसून, ती एका युगाचा समारोप असतो. संजय सिताराम दत्तू यांच्या जाण्याने शाळा व संस्थेत एक पोकळी निर्माण होणार आहे. परंतु त्यांच्या शिकवणीचा ठसा विद्यार्थ्यांच्या हृदयात कायम राहील. शिक्षक म्हणून त्यांनी जो वारसा निर्माण केला आहे, तो पुढील अनेक वर्षे स्मरणात राहील. आज संपूर्ण पाचोरा तालुका एज्युकेशन सोसायटी, सहकारी शिक्षकवर्ग, विद्यार्थी व समाज त्यांचे योगदान मान्य करत कृतज्ञतेची भावना व्यक्त करीत आहे. सर्वजण त्यांना पुढील आयुष्यासाठी उत्तम आरोग्य, आनंद व सुखशांतीच्या शुभेच्छा देत आहेत.

पाचोरा गणपती विसर्जन मिरवणुकीसाठी विद्युत तारांचे अडथळे दूर करण्याची मागणी

0

Loading

पाचोरा : यावर्षी पाचोरा शहरात भव्य उंचीच्या गणरायाच्या मूर्तीचे आगमन झाले असून जय मल्हार गणेश मित्र मंडळ, देशमुखवाडी यांची २२ फूट उंचीची गणेश मूर्ती भक्तांच्या दर्शनासाठी विराजमान झाली आहे. मात्र विसर्जन मिरवणुकीदरम्यान रस्त्यावरील विद्युत तारा, इंटरनेट केबल्स व डिक्स वायर यांचा गंभीर अडथळा निर्माण होणार असल्याने दुर्घटनेची शक्यता व्यक्त केली जात आहे. मंडळाने दिलेल्या निवेदनानुसार विसर्जन मिरवणुकीचा मार्ग देशमुखवाडी → गजानन हॉस्पिटल → जुने कोर्ट → हिंद ऑईल मिल रोड → जामनेर रोड → छत्रपती शिवाजी महाराज चौक → वी.पी. रोड → आठवडे बाजार असा निश्चित करण्यात आला आहे. या मार्गांवर विविध ठिकाणी विद्युत तारा व केबल्स खाली झुकलेल्या स्थितीत असल्याने उंच मूर्तीला स्पर्श होण्याचा धोका निर्माण झाला आहे. जर विसर्जन मिरवणुकीदरम्यान तारेला धक्का लागला तर अपघात होण्याची दाट शक्यता असून यामुळे मिरवणुकीत गोंधळ उडू शकतो, असेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
याबाबत पाचोरा येथील शांतता समितीच्या बैठकीत अप्पर पोलीस अधीक्षक सौ. नेरकर मॅडम व आमदार किशोर आप्पा पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत महावितरण विभागाने तारा अडथळा ठरणार नाही, असे आश्वासन दिले होते. तथापि, 20 जुलै रोजी अर्ज दिल्यानंतरही अद्याप कोणतीही ठोस हालचाल झालेली नाही, अशी खंत मंडळाने व्यक्त केली आहे.
जय मल्हार गणेश मित्र मंडळाने याबाबत महावितरण विभाग प्रमुख अभियंत्यांना स्मरण-विनंती पत्र दिले असून त्यात तातडीने विद्युत तारा व वायरिंग योग्यरित्या व्यवस्थित करून अडथळामुक्त मार्ग उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे. प्रशासनाने या विषयाची गांभीर्याने दखल घेऊन आवश्यक ती कार्यवाही केल्यास विसर्जन मिरवणूक निर्विघ्नपणे व सुरक्षितरीत्या पार पडेल, असा विश्वास मंडळाने व्यक्त केला आहे.
शहरातील नागरिकांनी देखील याबाबत प्रशासनाने तातडीने लक्ष घालून विद्युत तारा, इंटरनेट व डिक्स वायर यांची योग्य ती सोय करून मिरवणुकीत अडथळा होणार नाही याची दक्षता घ्यावी, अशी मागणी केली आहे.
प्रत माहितीसाठी हे पत्र आमदार किशोरआप्पा पाटील, उपविभागीय अधिकारी पाचोरा, उपविभागीय पोलीस अधिकारी पाचोरा, तहसीलदार पाचोरा, पोलीस निरीक्षक पाचोरा पोलीस स्टेशन तसेच नगरपालिका मुख्याधिकारी यांना पाठविण्यात आले आहे.

आज दि.29/08/2025 चे सर्व राशीचे भविष्य व शुभ अंक व रंग

0

Loading

मेष:
आज तुमचे विचार स्पष्ट राहतील. महत्वाची निर्णय क्षमता विकसित होईल.
कामात यश मिळेल. काही नवीन संधी येऊ शकतात.
शुभ अंक: ५
शुभ रंग: तांबडा

वृषभ:
घरगुती कामात व्यस्त राहाल. खर्च वाढण्याची शक्यता.
शांत राहा आणि वेळेचे योग्य नियोजन करा.
शुभ अंक: ३
शुभ रंग: पिवळा

मिथुन:
प्रेमसंबंधात गोडवा वाढेल. नवे मैत्र निर्माण होईल.
तोंडी कामात यश मिळेल. मन प्रसन्न राहील.
शुभ अंक: ६
शुभ रंग: हिरवा

कर्क:
कुटुंबातील मतभेद दूर होतील. मनःशांती लाभेल.
जुने अपूर्ण काम पूर्ण होण्याची शक्यता.
शुभ अंक: २
शुभ रंग: सफेद

सिंह:
आर्थिक बाजू सुधारेल. एखादा प्रलंबित व्यवहार मार्गी लागेल.
शारीरिक थकवा जाणवेल, काळजी घ्या.
शुभ अंक: ९
शुभ रंग: केशरी

कन्या:
दैनंदिन कामात अडथळे येतील. संयमाने काम घ्या.
एखादा मित्र मदतीला येईल. विचारपूर्वक निर्णय घ्या.
शुभ अंक: १
शुभ रंग: फिकट गुलाबी

तूळ:
विद्यार्थ्यांना यशस्वी दिवस. नवीन संधींचा फायदा घ्या.
सकारात्मक ऊर्जा जाणवेल. प्रवास टाळा.
शुभ अंक: ४
शुभ रंग: निळा

वृश्चिक:
नवीन योजना यशस्वी होतील. अधिकारी वर्गाकडून सहकार्य मिळेल.
मनातील भीती दूर करा.
शुभ अंक: ८
शुभ रंग: जांभळा

धनु:
शुभ बातमी मिळेल. प्रवास घडू शकतो.
प्रेमसंबंधात सकारात्मक बदल दिसतील.
शुभ अंक: ७
शुभ रंग: पांढरा

मकर:
कौटुंबिक सुख वाढेल. एखादा निर्णय मनासारखा होईल.
स्वतःवर विश्वास ठेवा. यश तुमच्याकडेच येईल.
शुभ अंक: ६
शुभ रंग: तपकिरी

कुंभ:
कामातील मेहनतीचे फळ मिळेल. वरिष्ठांचे कौतुक लाभेल.
सकारात्मक वातावरण असेल.
शुभ अंक: ३
शुभ रंग: राखाडी

मीन:
नवीन संपर्कातून लाभ होईल. घरात शुभकार्याची चर्चा होईल.
मन उत्साही राहील.
शुभ अंक: ५
शुभ रंग: फिकट निळा

वाचकांनी वरील भविष्यवाणीचा अर्थ अचूक भविष्यवाणी म्हणून न लावता केवळ आत्मपरीक्षण आणि सकारात्मक प्रेरणा म्हणून घ्यावा.

१ सप्टेंबरपासून पाचोरा तालुक्यात ‘अनुदान अपहार’विरोधात उपोषण निश्चित – फक्त कर्मचारीच नाही तर अधिकाऱ्यांसह सर्वांची ईडी व अँटीकरप्शन चौकशीची मागणी

0

Loading

पाचोरा – जालना  जिल्ह्यात उघडकीस आलेल्या तब्बल ३५ कोटींच्या जवळपास अनुदान घोटाळ्याने राज्यभर खळबळ उडवली असतानाच पाचोरा तालुक्यातही याच धर्तीवर गंभीर गैरव्यवहार झाल्याचे धक्कादायक वास्तव उघडकीस आले आहे. शेतकऱ्यांसाठी मंजूर झालेले अनुदान हा जीवदायी श्वास असताना त्यावर भ्रष्ट कर्मचारी व अधिकाऱ्यांनी डल्ला मारल्याची वस्तुस्थिती आता टाळता येणार नाही. फक्त सन २०२३-२४ मध्ये अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी मंजूर झालेल्या कोट्यवधी रुपयांच्या निधीपैकी काही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा न होता थेट इतरांच्या खिशात गेल्याचे पुरावे प्रकाशात आले आहेत. ही बाब केवळ दोन-चार शेतकऱ्यांपुरती मर्यादित नसून पाचोरा तालुक्यातील अष्टपैलू भागभर पसरली असल्याचे स्पष्ट झाले आहे. याप्रकरणी पत्रकार संदीप दामोदर महाजन यांच्याकडे शेतकऱ्यांनी कागदपत्रे, उतारे व पुरावे जोडून तक्रारी नोंदवायला सुरुवात केली आहे. महाजन यांना मिळालेल्या दस्तऐवजांवरून हा प्रकार किती मोठा व संगनमताने घडवून आणला गेला आहे हे चांगल्याप्रकारे स्पष्ट होते. यामुळे आता फक्त डिपार्टमेंटल चौकशीत वेळ घालवण्यापेक्षा या प्रकरणाचा तपास थेट एसआयटी, आर्थिक गुन्हा शाखा (EOW), सीआयडी, ईडी व अँटीकरप्शन विभागाकडून व्हावा अशी महाजन यांची ठाम मागणी आहे. कारण, महसूल विभागातील हा अपहार फक्त तलाठी, ग्रामसेवक किंवा दोन-चार कारकुनांपुरता मर्यादित नसून यामध्ये टप्प्याटप्प्याने उच्चस्तरीय अधिकाऱ्यांचे संगनमत असल्याची शंका बळावत आहे. त्यामुळे तहसीलदारांपासून संपूर्ण महसूल यंत्रणेची सखोल चौकशी अत्यावश्यक ठरत आहे. शेतकऱ्यांना मिळणाऱ्या थोड्याफार रकमा खात्यात जमा करून “सर्व काही नीट सुरू आहे” असा दिखावा केला जात असला, तरी प्रत्यक्षात कोट्यवधी रुपयांचे पैसे कुठे गेले, कोणाच्या खिशात शिरले आणि कोणत्या अधिकार्‍यांनी गिळंकृत केले, याचे सत्य अजूनही गडद अंधारातच आहे. शेतकरी बांधवांनो, जालना घोटाळ्यानंतर आता पाचोरा तालुक्यातील हा अनुदान घोटाळा प्रकरण तितकाच गंभीर आहे. आपणच जागरूक राहून आपल्याकडील माहिती, पुरावे व कागदपत्रे पुढे आणली तरच ह्या भ्रष्ट माफियांचे जाळे उघडकीस येईल. अन्यथा आपल्याच हक्काचे पैसे कायमचे गडप होतील. व ही मालिका सुरूच राहील
निर्धार पक्का १ सप्टेंबर पासून उपोषण होणारच आणि आता मागणी एकच :– सन २०१९ पासून आजपर्यंतच्या सर्व अनुदान वाटपाची गावनिहाय यादी तातडीने जाहीर व्हावी. सर्व आरोपींवर तातडीने फौजदारी गुन्हे दाखल करून कठोर शिक्षा व्हावी

आज दि.28/08/2025 चे सर्व राशीचे भविष्य व शुभ अंक व रंग

0

Loading

मेष:
नवीन संधीची चाहूल लागेल. आरोग्य चांगले राहील. मनात उत्साह राहील.
शुभ अंक: ९
शुभ रंग: भगवा

वृषभ:
महत्त्वाची बैठक यशस्वी होईल. खर्चाचे नियोजन करा. नातेवाईक भेटतील.
शुभ अंक: २
शुभ रंग: क्रीम

मिथुन:
कामात सतत सुधारणा होईल. एखादी शुभवार्ता येण्याची शक्यता.
शुभ अंक: ७
शुभ रंग: पांढरा

कर्क:
घरात एखादा प्रसंग साजरा होईल. जुने मित्र भेटतील. मनात समाधान राहील.
शुभ अंक: ४
शुभ रंग: फिकट निळा

सिंह:
दिवस कार्यक्षमतेने जातो. सरकारी कामात यश मिळेल. वरिष्ठांकडून कौतुक होईल.
शुभ अंक: ६
शुभ रंग: सोनेरी

कन्या:
जुने रेंगाळलेले व्यवहार पूर्ण होतील. मानसिक स्थैर्य लाभेल. संयम ठेवावा.
शुभ अंक: ५
शुभ रंग: राखाडी

तूळ:
व्यवसायात विस्ताराचा विचार पुढे सरकवू शकता. घरात थोडे वाद संभवतात.
शुभ अंक: १
शुभ रंग: गडद हिरवा

वृश्चिक:
आर्थिक लाभ होण्याची शक्यता. मनात स्थिरता राहील. मित्रांचे सहकार्य लाभेल.
शुभ अंक: ३
शुभ रंग: तपकिरी

धनु:
स्वतःच्या निर्णयावर ठाम राहा. थोडेसे एकटेपण जाणवेल. देवपूजा लाभदायक ठरेल.
शुभ अंक: ८
शुभ रंग: फिकट पिवळा

मकर:
जमिनी-संपत्तीचे व्यवहार पुढे जाऊ शकतात. वादविवाद टाळा. शांतता ठेवा.
शुभ अंक: २
शुभ रंग: जांभळा

कुंभ:
कौटुंबिक जबाबदाऱ्या पार पाडाव्या लागतील. वेळेचे योग्य नियोजन हवे.
शुभ अंक: ७
शुभ रंग: निळसर

मीन:
दिवस मध्यम आहे. निर्णय थोडा उशिराने घ्या. जुने अनुभव उपयोगी ठरतील.
शुभ अंक: ५
शुभ रंग: फिकट गुलाबी

वाचकांनी वरील भविष्यवाणीचा अर्थ अचूक भविष्यवाणी म्हणून न लावता केवळ आत्मपरीक्षण आणि सकारात्मक प्रेरणा म्हणून घ्यावा.

लोकमान्यांच्या गणेशोत्सवाची मूळ संकल्पना कुठे हरवली?

0

Loading

“आरास नव्हे, तर जागृती; गोंगाट नव्हे, तर विचारांची ज्योत; हीच टिळकांच्या गणेशोत्सवाची खरी ओळख होती.”

भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील अविस्मरणीय व्यक्तिमत्त्व म्हणजे लोकमान्य बाळ गंगाधर टिळक. त्यांनी उभारलेला सार्वजनिक गणेशोत्सव हा केवळ धार्मिक सोहळा नव्हता, तर तो एक सामाजिक आणि राजकीय क्रांतीचा दीपस्तंभ होता. गणपती हा घराघरातील भक्तीचा देव; परंतु टिळकांनी त्याला सार्वजनिक पातळीवर आणून समाजाच्या हृदयात एकता, ऐक्य आणि जागृतीचा दिवा प्रज्वलित केला. त्या उत्सवाच्या गजरात देशभक्तीचे गीत झंकारले, तरुणांच्या मनात स्वराज्याची ठिणगी पेटली आणि गुलामगिरीतल्या भारताला स्वातंत्र्याचा श्वास जाणवला.

तो गणेशोत्सव म्हणजे विचारमंथनाचे व्यासपीठ, जनतेच्या वेदना मांडण्याचे साधन, समाजातील जातीभेदावर फुंकर घालणारा शुद्ध आत्मभाव. देवाच्या पायरीवर सारे समान — हा संदेश समाजाच्या प्रत्येक शिरेशिरेत भिनवण्याची ताकद या उत्सवात होती. त्यातून केवळ पूजाअर्चा नव्हे, तर व्याख्याने, नाटके, कीर्तनं, देशभक्तीपर गीतांद्वारे स्वराज्याचा मंत्र जनतेला मिळत होता. हेच टिळकांचे स्वप्न होते — गणरायाच्या मंडपातून स्वराज्याचा गजर व्हावा.

मात्र काळाच्या ओघात या संकल्पनेचे रूपांतर झाले आणि जे परिवर्तनाचे व्यासपीठ होते ते हळूहळू प्रदर्शनाच्या झगमगाटात हरवले. आजचे चित्र वेगळेच दिसते. प्रचंड अवाढव्य मूर्ती, महागड्या सजावट, डीजेच्या कर्णकर्कश आवाजात हरवलेले भजन, गर्दीत विसरलेली भक्ती, राजकीय नेत्यांच्या छायेत झाकोळलेली समाजजागृती आणि व्यावसायिकतेच्या नफ्यात गिळंकृत झालेले सांस्कृतिक मूल्य — ही वस्तुस्थिती आहे. श्रद्धा ही जिव्हाळ्याची भावना राहिली नाही, तर ती दिखाव्याच्या धामधुमीत दडपून गेली. पर्यावरणाचा ऱ्हास, नदी-तलावांचे प्रदूषण, आवाजाचा त्रास आणि वाहतुकीची कोंडी — या सर्व विसंगतींनी लोकमान्यांच्या संकल्पनेवर जणू काळा धूरच फासला.

आज प्रश्न उभा राहतो — टिळकांच्या संकल्पनेला सुरुंग कोणी लावला? केवळ राजकारण्यांनी का? केवळ व्यावसायिकांनी का? की आपण सर्वांनी मिळून या संकल्पनेचे अध:पतन घडवून आणले? कारण उत्सवाच्या माध्यमातून समाजजागृती घडवण्याऐवजी आपण त्याला नुसता सोहळा, नुसती दिखाऊ स्पर्धा, नुसता कोलाहल बनवून टाकला आहे. आपण विसरलो की, गणेशोत्सव हा फक्त दहा दिवसांचा गडबडीचा कल्लोळ नव्हे, तर तो एक प्रेरणा आहे — समाजाला बांधणारी, एकत्र आणणारी, न्याय-अन्यायाचा विचार करणारी.

आजच्या काळात माध्यमांचा व समाजमाध्यमांचा प्रभावही प्रचंड आहे. थेट प्रक्षेपण, लाईव्ह अपडेट्स, स्पर्धात्मक मंडळांच्या जाहिराती — यातून भक्तीचे नव्हे, तर स्पर्धेचे प्रदर्शन घडते. यातून मूळ उद्देश झाकोळला जातो. मात्र माध्यमांची ही ताकद सकारात्मकतेसाठी वापरली तर? पर्यावरणपूरक मूर्तींचा प्रचार, सामाजिक उपक्रमांचे कौतुक, आणि उत्तम कार्याची प्रेरणा — हे सर्व समाजाला नवी दिशा देऊ शकते.

मात्र अजूनही सर्व काही हरवलेले नाही. अनेक मंडळे आजही रक्तदान, आरोग्य शिबिरे, शालेय मदत, पर्यावरणपूरक मूर्ती या मार्गाने समाजकारणाची वाट धरताना दिसतात. हे चित्र आशेचा किरण दाखवते. आपली जबाबदारी आहे की हा किरण अधिक तेजोमय करावा. आपणच ठरवायचे आहे की गणेशोत्सव हा समाजजागृतीचा दीपस्तंभ राहील की गोंगाटात हरवलेली सामाजिक जत्रा?

लोकमान्यांनी दिलेली प्रेरणा आपल्याला पुन्हा जागवावी लागेल. गणेशोत्सव हा विचारांचा उत्सव बनवावा लागेल. मूर्ती मातीची असावी, पण आपले विचार लोखंडासारखे कठीण असावेत. सजावट साधी असावी, पण अंत:करणातील श्रद्धा झगमगावी. गजर जोराचा असावा, पण तो समाजजागृतीचा असावा. टिळकांच्या संकल्पनेला पुन्हा तेजस्वी करणे ही आपली जबाबदारी आहे, कारण गणेशोत्सव हा केवळ उत्सव नाही — तो आपल्या राष्ट्रीय अस्तित्वाचा, आपल्या सांस्कृतिक ओळखीचा, आणि आपल्या सामाजिक जबाबदारीचं अधिष्ठान आहे.

लोकमान्यांनी प्रज्वलित केलेला हा दीप आजही विझलेला नाही, फक्त त्याभोवती धुरकटलेली अवनतीची सावली आहे. आपणच ती झाडून टाकली पाहिजे. गणेशोत्सवाला पुन्हा समाजजागृतीचे, ऐक्याचे, संस्कृतीरक्षणाचे व्यासपीठ बनवणे ही आपली सामूहिक जबाबदारी आहे. गणरायाच्या साक्षीने आपण स्वतःला प्रश्न विचारू या — आपण या उत्सवाला खऱ्या अर्थाने पवित्र ठेवतो आहोत का?

“गणपती बाप्पा मोरया” च्या जयघोषात फक्त भक्ती नव्हे, तर कर्तव्याची जाणीव, जबाबदारीची जाणीव आणि परिवर्तनाची तळमळ दडलेली असावी. जर हे साधता आले, तरच लोकमान्य टिळकांची संकल्पना पुन्हा उजळून निघेल आणि गणेशोत्सव खऱ्या अर्थाने राष्ट्रजागृतीचे पर्व ठरेल. नाहीतर आपल्या पुढच्या पिढ्यांसमोर फक्त पोकळ सजावट आणि प्रदूषणाने भरलेला उत्सव उरेल, ज्यात टिळकांची मौलिकता हरवून जाईल.

आणि मग खरा प्रश्न असा उरेल — आपण पुढच्या पिढ्यांना काय देतो आहोत: जागृतीचा दीप की विकृत संस्कृती?

मित्रांनो, आता ठरवायचे आहे ते आपल्यालाच. आपण हा उत्सव केवळ बाह्य दिखाव्याचा मेळावा बनवतोय की टिळकांच्या स्वप्नातील समाजजागृतीचा दीप पुन्हा पेटवतोय? आज प्रत्येक घराघरातून, प्रत्येक मंडपातून हा संदेश निघाला पाहिजे की “गणपती बाप्पा मोरया” म्हणजे फक्त गजर नव्हे, तर एक बदलाचा हुंकार आहे.

©गुरुदत्त दिनकर वाकदेकर, मुंबई
दिनांक : २७/०८/२०२५ वेळ : १३:२३

पिंपळगाव हरे. पो.स्टे. बालिका बलात्कार गुन्हा दाखल प्रकरणी पाचोऱ्यात 29 रोजी भव्य मूक मोर्चा; संतापाचा ज्वालामुखी रस्त्यावर येणार

0

Loading

पाचोरा : जळगाव जिल्ह्यातील पाचोरा तालुक्यातील पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्टेशन हद्दीत घडलेल्या अल्पवयीन बालिकेवरील अमानुष अत्याचार प्रकरणाने संपूर्ण परिसर हादरून गेला आहे. या घटनेने केवळ गावकुसापुरतेच नव्हे, तर संपूर्ण पंचक्रोशीसह जिल्हाभर संतापाची लाट उसळली आहे. या प्रकरणी पत्नी व दोन मुले असलेला आरोपी हबीब हुसेन शेख व त्याला सहकार्य करणारी त्यांची आई फातिमा अभिषेक जलील सह जे पण तपासात आरोपी निष्पन्न होतील अशा सर्व आरोपींना कठोर शिक्षा व्हावी, मुलींच्या सुरक्षिततेबाबत जागृती व्हावी तसेच “लव्ह जिहाद” विरोधात ठोस संदेश द्यावा यासाठी पाचोरा शहरात शुक्रवार दि. २९ ऑगस्ट २०२५ रोजी भव्य मूक मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. हा मोर्चा सकाळी १०.३० वाजता कृष्णपुरी येथील हनुमान मंदिरापासून प्रारंभ होणार असून आाठवडे बाजार, गांधी चौक, जामनेर रोड या प्रमुख मार्गावरून छत्रपती शिवाजी महाराज चौकात समारोप होईल. पिंपळगाव हरेश्वर पो स्टे हद्दीतील अल्पवयीन बालिके वरील झालेल्या बलात्कार प्रकरणाने गावागावात संताप उसळला आहे. नागरिकांचे म्हणणे आहे की अशा घटनांनी समाजातील सुरक्षिततेचा प्रश्न अधिक गंभीर बनला आहे. “आज जर आपण आवाज उठवला नाही तर उद्या पुन्हा कुणाच्या तरी मुलीवर, बहिणीवर हात टाकला जाईल. म्हणूनच अशा नराधमांना कठोरात कठोर शिक्षा झालीच पाहिजे”, असा एकमुखी आवाज या मोर्चातून उमटणार आहे. या मोर्चामध्ये महिलांची उपस्थिती लक्षणीय राहणार आहे. महिलांनी रणरागिणीच्या रूपात आरोपींना कठोर शिक्षा द्यावी, मुलींच्या सुरक्षेसाठी कडक कायदे व्हावेत, अशी मागणी जोरकसपणे मांडण्याची तयारी दर्शवली आहे. विशेष म्हणजे हा मोर्चा सर्व जाती – धर्मीय, सर्वपक्षीय स्वरूपाचा असल्याने समाजातील प्रत्येक घटक या आंदोलनात सहभागी होणार आहे. आयोजकांनी स्पष्ट केले आहे की, “हा मोर्चा फक्त मूक मोर्चा नाही तर हिंदू समाजाच्या स्वाभिमानाची आणि अस्तित्वाची लढाई आहे. लव्ह जिहादसारख्या घृणास्पद घटनांना आळा घालण्यासाठी समाजाने आता एकजूट दाखवणे आवश्यक आहे. समाजातील शांततेचा आणि मुलींच्या सुरक्षिततेचा प्रश्न हा केवळ एका घटनेपुरता मर्यादित नाही, तर हा हिंदु धर्माच्या प्रतिष्ठेचा व मानवतेच्या सुरक्षेचा प्रश्न आहे.” मोर्च्यादरम्यान कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी प्रशासनाने कडेकोट बंदोबस्त ठेवण्याची तयारी सुरू केली आहे. पाचोरा शहरातील प्रमुख मार्गांवर पोलीस तैनात करण्यात येणार असून, कोणताही अनुचित प्रकार घडू नये याची काळजी घेतली जाणार आहे. पोलिस अधिकाऱ्यांच्या मते, “नागरिकांनी शांततेत आणि शिस्तीत मोर्चा काढावा. दोषींना शिक्षा होणारच, मात्र कायद्यावर विश्वास ठेवणे गरजेचे आहे.” या प्रकरणी नागरिकांचा एकच सूर आहे – “या गुन्ह्यातील सर्व आरोपींना कठोरात कठोर शिक्षा झालीच पाहिजे! शिक्षा फक्त तुरुंगवासापुरती न राहता फाशीपर्यंत पोहोचली पाहिजे, तेव्हाच मुलींच्या सुरक्षेला खरा न्याय मिळेल.” या घटनेच्या पार्श्वभूमीवर समाजातील नेते, कार्यकर्ते आणि नागरिकांनी एकच मागणी पुढे केली आहे की मुलींच्या सुरक्षेसाठी पालक, शाळा, सामाजिक संस्था यांनी एकत्रितपणे जागृती केली पाहिजे. लव्ह जिहाद, छेडछाड, अत्याचार यांना आळा घालण्यासाठी कठोर कायद्याची आवश्यकता आहे, अशी भावना व्यक्त होत आहे. पाचोरा येथे होणारा हा मोर्चा केवळ आरोपी विरोधातील संताप नाही, तर समाजाच्या एकजुटीचा संदेश देणारा आहे. हिंदू समाजासह सर्वधर्मीय नागरिकांनी या मोर्चात सहभाग घेण्याचे आवाहन केले असून, हा मोर्चा शांततेत पार पाडून प्रशासनाला ठोस संदेश दिला जाणार आहे. एकूणच, पिंपळगाव हरेश्वर पो स्टे हद्दीत घडलेल्या या अमानुष घटनेने लोकांच्या भावना चिघळल्या आहेत. मुलींच्या सुरक्षिततेसाठी, समाजाच्या एकतेसाठी आणि न्यायासाठी हा मोर्चा ऐतिहासिक ठरणार आहे यात शंका नाही.

ताज्या बातम्या

error: Content is protected !!