Home Blog Page 95

‘श्री. गो.से. हायस्कूल पाचोरा’चा निकालाचा नवा शिखरवाटा — यशाची परंपरा ठेवी जपली, गुणवत्तेचा ठसा उमटवला!

Loading

पाचोरा– शिक्षण हे समाज प्रगतीचे खरे साधन आहे आणि याच माध्यमातून एक नवभारत घडवला जातो, हे आपल्या कृतिशीलतेतून सिध्द करणारी एक अत्यंत सकारात्मक व प्रेरणादायी बातमी पाचोऱ्यातून समोर आली आहे. पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्था संचलित श्री. गो.से. हायस्कूल पाचोरा या नामवंत व अत्यंत प्रतिष्ठित शाळेने इयत्ता दहावीच्या यंदाच्या एस.एस.सी. परीक्षेत अपूर्व यश संपादन करून आपल्या गुणवत्तेची उज्ज्वल परंपरा यंदाही ठणकावून जपली आहे.
दरवर्षीप्रमाणे याही वर्षी शाळेने विद्यार्थ्यांना परीक्षेपूर्वी सर्वतोपरी मार्गदर्शन व अभ्यासाचा मजबूत पाया दिला होता. त्याचबरोबर विद्यार्थ्यांचा मानसिक विकास, वेळेचे व्यवस्थापन, प्रश्नपत्रिका लेखन कौशल्य, वाचनसंस्कृती, सुसंगत अभ्यासतंत्र, पुनरावलोकन, परीक्षा सत्रांमध्ये नियमित सराव आणि वैयक्तिक प्रगतीचा बारकाईने घेतलेला आढावा या घटकांचा समावेश करत शाळेने अभ्यासाची भक्कम शिस्त विद्यार्थ्यांमध्ये निर्माण केली होती. याच शिस्तीचा आणि परिश्रमांचा परिणाम म्हणजेच – श्री. गो.से. हायस्कूलचा तब्बल 95.90 टक्के यशाचा शेकडा!
निकालाचे तपशील :
यावर्षी एकूण 440 विद्यार्थ्यांनी परीक्षेला बसून त्यापैकी विशेष प्राविण्य श्रेणीत – 145 विद्यार्थी, प्रथम श्रेणी – 187 विद्यार्थी, द्वितीय श्रेणी – 83 विद्यार्थी आणि फर्स्ट क्लास मध्ये – 7 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. ही आकडेवारी स्वतःच शाळेच्या अभ्यास व मार्गदर्शन धोरणाची साक्ष देते.
यंदाच्या परीक्षेत शाळेच्या निकालाचा मान चौधरी भाग्यश्री सुनील या विद्यार्थिनीने पटकावला असून तिने तब्बल 95.60% गुण मिळवून विद्यालयात प्रथम क्रमांक मिळवला. तिच्या पाठोपाठ पाटील मानसी सुनील हीने 95.20% गुणांसह द्वितीय क्रमांक पटकावला. तर कुमावत ईश्वरी ज्ञानेश्वर हिने 94.80% गुणांसह तृतीय क्रमांक, आणि बोरुडे वैष्णवी बाळू हिने 94% गुणांसह चतुर्थ क्रमांक मिळवून यशाच्या शिडीवर आपले नाव कोरले आहे.
विद्यार्थ्यांचा हा यशस्वी निकाल म्हणजे केवळ परीक्षेतील गुणांची भरारी नव्हे, तर मूल्याधिष्ठित शिक्षण प्रणालीच्या बळावर विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास, कणखरता, आणि स्पर्धात्मक गुणांचा विकास करून त्यांना आयुष्याच्या पुढील टप्प्यांसाठी तयार करणारे बलवत्तर यश आहे.
या उल्लेखनीय यशाबद्दल शाळेच्या विद्यार्थ्यांचे, शिक्षकांचे आणि पालकांचे मन:पूर्वक अभिनंदन करताना संस्थेचे अध्यक्ष व माजी आमदार दिलीपभाऊ वाघ यांनी विद्यार्थ्यांमध्ये असलेल्या प्रज्ञाशक्तीला योग्य दिशा देण्याचे कार्य शाळेतील शिक्षक वर्ग करत असल्याचे नमूद केले. त्यांनी सांगितले की,
“दरवर्षी निकाल घोषित होतो तेव्हा ‘श्री. गो.से. हायस्कूल’च्या गुणवंत विद्यार्थ्यांची नावे गौरवाने उजळून निघतात. हे केवळ आकड्यांचे यश नसून यामागे शिक्षकांचे मार्गदर्शन, संस्थेचे सहकार्य, पालकांची साथ आणि विद्यार्थ्यांची मेहनत आहे.”
संस्थेचे चेअरमन नानासाहेब संजय वाघ यांनी आपल्या प्रतिक्रियेत असे सांगितले की,”आपल्या संस्थेच्या शाळांनी केवळ शैक्षणिकच नव्हे तर चारित्र्य, शिस्त, निष्ठा आणि संस्कार यांचेही शिक्षण दिले असून हेच संमिश्र शिक्षण विद्यार्थ्यांच्या भविष्याची हमी आहे.”
मानद सचिव महेशदादा देशमुख, व्हॉइस चेअरमन नानासाहेब विलास जोशी, शालेय समितीचे चेअरमन खलीलदादा देशमुख, तांत्रिक विभाग प्रमुख वासुदेवअण्णा महाजन यांनी विद्यार्थ्यांना उत्तरोत्तर यश लाभो, अशी शुभेच्छा दिल्या. मुख्याध्यापक एन. आर. ठाकरे व उपमुख्याध्यापक आर. एल. पाटील यांनी परीक्षेच्या संपूर्ण सत्रात शाळेने राबविलेल्या उपक्रमांचा व शिस्तीचा आढावा देताना हे यश संस्थेच्या कार्यपद्धतीचा परिपाक असल्याचे स्पष्ट केले. तांत्रिक विभाग प्रमुख एस. एन. पाटील, कनिष्ठ विभाग प्रमुख मनीष बाविस्कर, वरिष्ठ लिपिक अजयभाऊ सिनकर यांचाही परीक्षेच्या व्यवस्थापनात महत्त्वपूर्ण सहभाग होता.
शाळेतील सर्व विषय शिक्षकांनी परीक्षेपूर्वी संपूर्ण अभ्यासक्रम तंतोतंत पूर्ण केला. विद्यार्थ्यांच्या अडचणी दूर केल्या. गृहपाठ, सराव पेपर, मार्गदर्शन सत्रे यांचे वेळापत्रक नियमित राबविले. दर महिन्याला विद्यार्थ्यांच्या कामगिरीवर आधारित बैठका घेतल्या. निकालानंतर विद्यार्थ्यांचे व्यक्तिगत मूल्यांकन करून त्यांना पुढील शैक्षणिक प्रवासाची दिशादर्शक माहिती दिली. या संपूर्ण प्रक्रियेत शाळेच्या प्रशासनाचा व्यवस्थेवर विश्वास, शिक्षकांचा समर्पण भाव, आणि विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास हे घटक एकत्र आले आणि ‘यश’ या शब्दाची नवी व्याख्या झाली.
या निकालानंतर शाळेतील अनेक विद्यार्थ्यांनी विज्ञान, वाणिज्य आणि कला शाखांमध्ये प्रवेश घेऊन आपापल्या करिअरच्या दिशेने पावले टाकण्याची तयारी सुरू केली आहे. काहींनी डॉक्टर, इंजिनिअर, प्रशासन अधिकारी, सैनिकी सेवा, वकिली, पत्रकारिता, कृषी व संशोधन क्षेत्राकडे झुकाव दाखवला आहे.
विद्यार्थ्यांच्या यशाबद्दल पालक वर्गातून विशेष आनंद व्यक्त करण्यात येत आहे. त्यांनी शाळेच्या शिस्तबद्ध व्यवस्थापनाचे आणि शिक्षकांच्या अतुलनीय परिश्रमांचे विशेष कौतुक केले. विद्यार्थ्यांना केवळ पुस्तकी ज्ञान नव्हे, तर जीवनकौशल्ये, आत्मसंवाद, संवादकौशल्य, वेळ व्यवस्थापन, आणि सामाजिक भान दिल्याबद्दलही कृतज्ञता व्यक्त केली.
श्री. गो.से. हायस्कूल, पाचोरा या शाळेने यंदाही यशाचा झेंडा अभिमानाने फडकावला आहे. ही शाळा केवळ निकालासाठी प्रसिद्ध नाही, तर विद्यार्थ्यांचे सर्वांगीण घडवणूक करणारी, मूल्यप्रधान शिक्षणाची परंपरा जपणारी संस्था आहे. या यशाचा नेमका हेतू हा नव्या पिढीला सक्षम, सुजाण, व कर्तबगार नागरिक बनविणे हाच असून, त्या दिशेने ‘गो.से. हायस्कूल’ची वाटचाल निश्चितच देशाच्या उज्वल भविष्याकडे होत आहे.
या गौरवशाली यशाबद्दल ‘ध्येय न्यूज’, ‘झुंज’ परिवारातर्फे सर्व विद्यार्थ्यांचे व शाळेच्या शिक्षक, प्रशासन, पालकवर्गाचे मन:पूर्वक अभिनंदन!

जयकिरण प्रभाजी शैक्षणिक संस्था संचलित न्यू इंग्लिश मिडीयम स्कूल पाचोरा या शाळेच्या १३ व्या वर्षीही गरुडझेप कायम

Loading

पाचोरा = जयकिरण प्रभाजी शैक्षणिक व सामाजिक संस्था संचलित न्यू इंग्लिश मीडियम स्कूल पाचोरा या विद्यालयाची दहावी च्या 100% यशाची परंपरा सलग १३ व्या वर्षी ही कायम, प्रथम क्रमांकाने कु.नम्रता सुरेश सोनवणे ९३.८०% द्वितीय क्रमांकाने चि.रुपेश योगेश शेलार ९३.००% तृतीय क्रमांकाने कु.कृतिका माणिक पाटील ९२.६०% उत्तीर्ण झाले आहेत.तसेच शाळेतून 90% च्या वर एकूण 13 विद्यार्थी उत्तीर्ण झालेले असून त्यांचे या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष दिनेश बोथरा , उपाध्यक्ष गिरीष कुळकर्णी, सचिव जीवन जैन,सहसचिव संजयजी बडोला , खजिनदार जगदीश खिलोशिया , स्कूल कमिटी चेअरमन लालचंद केसवानी, स्कूल कमिटी सचिव रितेश ललवानी संचालक संजय चोरडिया,गुलाब राठोड,गोपाल पटवारी, प्रिती जैन,महेंद्रकुमार हिरण,अशोककुमार मोर,शेखरकुमार धाडीवाल,प्राचार्य पुष्पलता पाटील ,सी. ई .ओ.अतुल चित्ते सर ,निर्मला पाटील, प्रतिभा मोरे,रुपाली जाधव,प्रिती शर्मा,योगिता शेंडे,पुजा पाटील,ज्योती बडगुजर,कविता जोशी,रूपाली देवरे, भाग्यश्री ब्राम्हणकर,विद्या थेपडे,शितल महाजन,स्मिता देशमुख, हरिप्रिया नम्र, किशोरी साळुंखे,वाल्मिक शिंदे,किरण बोरसे,संगिता पाटकरी, पुजा अहिरे,पुनम कुमावत, शालिनी महाजन,कल्पना बोरसे,निवृत्ती तांदळे,कृष्णा शिरसाठ,आनंद दायमा, मनोज बडगुजर,शिवाजी ब्राम्हणे,अलका बडगुजर, अश्विनी पाटील, सुनिता शिंपी,मनिषा पाटील,शिवाजी पाटील,विकास मोरे यांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले तसेच भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

“मिठाबाई शाळेचा सन्मानाचा निकाल : गुणवत्तेच्या उंच शिखरावर पाचोऱ्यातील कन्याशक्तीचा झेंडा”

Loading

पाचोरा – शहरातील कन्याशिक्षणाचा आत्मा समजल्या जाणाऱ्या आणि मुलींच्या सशक्त भविष्यासाठी एक मजबूत पाया घालणाऱ्या माध्यमिक व उच्च माध्यमिक मिठाबाई कन्या विद्यालय, कोंडवाडा गल्ली, पाचोरा या शाळेने यंदा इयत्ता दहावीच्या परीक्षेत 95 टक्के निकाल देत पुन्हा एकदा गुणवत्तेची आणि नारीशक्तीच्या उन्नतीची शिखरं गाठली आहेत. हा निकाल केवळ यशाचं प्रतीक नाही, तर शिक्षणात मुलीही कुठेही कमी नाहीत हे दाखवणारा पुरावा आहे.या परीक्षेसाठी मिठाबाई शाळेतून एकूण 63 विद्यार्थिनी प्रविष्ट झाल्या होत्या. त्यापैकी तब्बल 60 विद्यार्थिनी उत्तीर्ण होऊन शाळेच्या यशाचा झेंडा फडकावून गेल्या. हा निकाल केवळ टक्केवारीचा हिशेब नाही, तर प्रत्येक विद्यार्थिनीच्या अथक मेहनतीचा, शिक्षकांच्या मार्गदर्शनाचा आणि संस्थेच्या नियोजनबद्ध कामकाजाचा ठसठशीत पुरावा आहे. संस्थेचे अध्यक्ष श्रीमंत धैर्यशील राजे पवार, सेक्रेटरी रूपालीताई जाधव आणि प्राचार्य संजय पवार यांनी यशस्वी विद्यार्थिनींचे मन:पूर्वक अभिनंदन करून त्यांच्या पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. त्यांनी विद्यार्थिनींच्या या यशामागील पालकांचा सहकार्यभाव, शिक्षकांचे कर्तव्यदक्ष योगदान आणि विद्यार्थिनींच्या जिद्दीचा विशेष उल्लेख केला. निकालात गुणवत्तेनं आघाडी घेत हर्षदा अर्जुन महाजन हिने 89.60% गुणांसह प्रथम क्रमांक पटकावला. तिच्या पाठोपाठ नंदिनी बापू वाणी हिने 89% गुणांसह द्वितीय तर नियती विकास पाटील हिने 88.20% गुणांसह तृतीय क्रमांक मिळवत आपली शैक्षणिक गुणवत्ता सिद्ध केली.या यशाबाबत शाळेतील मुख्याध्यापक संजय पवार यांनी सांगितले की, “मिठाबाई कन्या विद्यालय हे केवळ अभ्यासापुरते मर्यादित नसून येथे विद्यार्थिनींच्या सर्वांगीण विकासावर भर दिला जातो. शाळेच्या अभ्यासक्रमाबरोबरच सांस्कृतिक, सामाजिक आणि नैतिक शिक्षणालाही येथे तितकेच महत्त्व दिले जाते.”

शाळेतील विद्यार्थिनींच्या यशामागे शिक्षकवर्गाचा खंबीर पाठिंबा आणि नियमित वेळापत्रक, परीक्षण चाचण्या, वेळोवेळी पालकसभांचे आयोजन, तसेच शाळेत तयार करण्यात आलेल्या विशेष अभ्यास समूहांचे महत्त्वपूर्ण योगदान आहे. अनेक मुलींचे पालक आर्थिकदृष्ट्या मागास आहेत, तरीही त्यांच्या मुलींनी मेहनत, जिद्द आणि शाळेच्या मदतीने हे यश संपादन केले आहे.मिठाबाई शाळेची स्थापना हे एक ऐतिहासिक पाऊल ठरले आहे. विशेषतः पाचोऱ्यासारख्या जिल्ह्यात ग्रामीण भागातील मुलींसाठी स्वतंत्र शिक्षणसंस्था असणे ही फार मोठी बाब आहे. कोंडवाडा गल्लीतील ही शाळा गेल्या अनेक वर्षांपासून मुलींना गुणवत्तापूर्ण शिक्षण देत आहे. शिक्षणाच्या माध्यमातून त्यांच्या आत्मविश्वासात झालेली वाढ, त्यांच्या विचारसरणीत झालेला सकारात्मक बदल आणि त्यांच्या स्वप्नांना मिळालेली दिशा हेच या यशामागील खरी प्रेरणा आहेत.

या यशानंतर शाळेत आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून, मुख्याध्यापकांनी संपूर्ण शिक्षकवर्ग, शिक्षकेत्तर कर्मचारी, पालक आणि विद्यार्थिनींचे विशेष कौतुक केले आहे. यशस्वी विद्यार्थिनींच्या नावाचे कौतुक शहरभर होत असून, त्यांना शुभेच्छा देण्यासाठी अनेक मान्यवरांनी शाळेला भेटही दिली.श्रीमंत धैर्यशील राजे पवार यांनी विद्यार्थिनींना उद्देशून सांगितले की, “तुमच्या यशामागे असलेली निष्ठा, चिकाटी आणि आत्मविश्वास संपूर्ण समाजासाठी प्रेरणादायी आहे. भविष्यातही तुम्ही असाच लौकिक राखून समाजात आदर्श उभा करा.”रूपालीताई जाधव यांनी यावेळी सांगितले की, “या निकालाने संपूर्ण शाळेच्या प्रतिष्ठेला चार चाँद लागले आहेत. आज पाचोरा शहरात मुलींच्या शिक्षणाच्या क्षेत्रात एक मजबूत पायाभूत संस्था म्हणून मिठाबाई शाळा ओळखली जाते, ही आमच्यासाठी अभिमानाची बाब आहे.”

या यशामुळे इतर विद्यार्थ्यांमध्येही नवा आत्मविश्वास निर्माण झाला असून, शाळा भविष्यात शंभर टक्के निकालाचे उद्दिष्ट ठेवून कार्यरत आहे. मुलींनी शिक्षणात गाठलेली शिखरे हा समाजाला दिलेला संदेश आहे की, योग्य संधी आणि योग्य मार्गदर्शन मिळाल्यास स्त्रिया कोणत्याही क्षेत्रात यशस्वी होऊ शकतात. शिक्षण, संस्कार आणि सक्षम समाजनिर्मितीचा मिलाफ म्हणजे मिठाबाई शाळा – ही ओळख यंदाच्या निकालाने पुन्हा एकदा अधोरेखित केली आहे. पाचोऱ्यातील प्रत्येक नागरिकाच्या मनात अभिमानाचे स्थान मिळवणाऱ्या या शाळेचे यश भविष्यात अधिक समृद्ध होवो,ध्येय न्यूज झुंज वृत्तपत्र परिवारातर्फे हीच अपेक्षा!

अखेर न्यायाचा विजय! संकटमोचक ना. गिरीशभाऊ महाजन यांच्यावरील खोटारडेपणाच्या आरोपावर उच्च न्यायालयाचा शिक्का; विकासाभिमुख नेतृत्वास कायदेशीर मान्यता

Loading

मुंबई – महाराष्ट्राच्या राजकारणात प्रामाणिकपणा, विकासाभिमुख दृष्टिकोन, जनतेशी असलेली नाळ आणि संकटांमध्येही न खचता लढणारी भूमिका हे गुणधर्म जे नेत्यामध्ये पहावयास मिळतात, त्याचे ज्वलंत उदाहरण म्हणजे राज्याचे जलसंपदा मंत्री तथा भाजप नेते संकटमोचक ना. गिरीशभाऊ महाजन. त्यांच्या विरोधात सोशल मीडियाच्या माध्यमातून केले गेलेले खोटे, बिनबुडाचे आणि वैयक्तिक स्वार्थाने प्रेरित आरोप शेवटी न्यायालयात फोल ठरले आहेत. मुंबई उच्च न्यायालयाने या प्रकरणी दिलेल्या स्पष्ट आणि न्यायाधिष्ठित निकालामुळे ना. गिरीशभाऊ महाजन यांची प्रतिमा अधिकच उजळली असून, त्यांच्या नेतृत्वावर असलेला विश्वास पुनः एकदा दृढ झाला आहे. संकटमोचक ना. गिरीशभाऊ महाजन यांच्या विरोधात यूट्यूबर अनिल थत्ते याने सातत्याने एकापेक्षा एक गंभीर स्वरूपाचे आरोप करणारे व्हिडिओ प्रसारित केले होते. या व्हिडिओंमध्ये एका वरिष्ठ IAS अधिकाऱ्याशी संबंध असल्याचा खोटा दावा करण्यात आला होता. असे करताना या यूट्यूबरने कोणताही पुरावा न सादर करता सरळसरळ बदनामीचा उद्देश डोळ्यासमोर ठेवला होता. या प्रकाराने वैयक्तिक जीवनाबरोबरच सार्वजनिक जीवनावर देखील आघात झाला असता, परंतु संकटमोचक ना. गिरीशभाऊ महाजन यांनी अत्यंत शांत आणि शिस्तबद्ध मार्गाचा अवलंब करत, थेट न्यायालयात मानहानीचा दावा दाखल केला.८ मे २०२५ रोजी न्यायमूर्ती आरिफ डॉक्टर यांच्या एकलपीठाने या प्रकरणात दिलेल्या अंतरिम आदेशात सहा व्हिडिओ हटविण्याचे स्पष्ट आदेश दिले. कोर्टाने सांगितले की, हे व्हिडिओ प्रथमदर्शनी बदनामीकारक असून, सार्वजनिक पदावरील व्यक्तीची प्रतिमा मलीन करण्याचा हेतू त्यामागे स्पष्ट आहे. याचबरोबर न्यायालयाने संबंधित यूट्यूब चॅनेल्सना अशा प्रकारचे कोणतेही नवे व्हिडिओ प्रसारित करण्यासही सक्त मनाई केली आहे. न्यायालयाने जणू हेच बजावले – सोशल मीडियावरील स्वैर विखारी प्रचाराला आता बंधन घालायला हवे. या निकालामुळे केवळ संकटमोचक ना. गिरीशभाऊ महाजन यांचं व्यक्तिगत पुनर्वसन झालं नाही, तर समाजात, विशेषतः राजकीय आणि प्रशासकीय क्षेत्रात, सत्याच्या बाजूने उभं राहण्याची प्रेरणा मिळाली. त्यांच्या बाजूने या खटल्यात ज्येष्ठ वकील रवी कदम यांनी अत्यंत नेटका, तथ्याधारित आणि न्यायाच्या तत्वांवर आधारलेला युक्तिवाद मांडला. उलट, अनिल थत्ते किंवा त्याच्या वतीने कोणीही न्यायालयात हजर न राहिल्याने कोर्टाने हा एकतर्फी पण गंभीर स्वरूपाचा निर्णय दिला. हा निकाल केवळ कायद्याचा विजय नसून, महाराष्ट्रातील राजकारणात संकटमोचक ना. गिरीशभाऊ महाजन यांच्या सच्च्या, पारदर्शक आणि कर्तव्यदक्ष कार्यपद्धतीवर शिक्कामोर्तब करणारा ठरला आहे. महाराष्ट्रात पाणीटंचाई, सिंचनाचा अभाव आणि पावसावर अवलंबून असलेले शेतीचं भवितव्य हे मोठे प्रश्न राहिले आहेत. या पार्श्वभूमीवर जलसंपदा विभागाच्या माध्यमातून संकटमोचक ना. गिरीशभाऊ महाजन यांनी ‘जलयुक्त शिवार’, ‘सिंचन विस्तार योजना’ यासारख्या महत्वाच्या योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीसह ग्रामीण भागातील लाखो लोकांचे आयुष्य बदलले आहे.त्यांच्या नेतृत्वात जलसंपदा विभागाने केवळ प्रकल्प राबवले नाहीत, तर त्या योजनांच्या माध्यमातून लोकांच्या जीवनात सुधारणा घडवून आणली आहे. हे कार्य करत असताना त्यांनी कधीही राजकीय प्रसिद्धीसाठी कोणतीही युक्ती वापरली नाही. उलट, त्यांच्या कार्यात लोककल्याण, कार्यक्षमता आणि उत्तरदायित्व हे मूलभूत घटक नेहमीच अधोरेखित झाले आहेत. आणि म्हणूनच त्यांच्या कार्यकर्तृत्वावर किंवा चारित्र्यावर जेव्हा कुणी खोटे आरोप करतो, तेव्हा संपूर्ण राज्य उभं राहतं आणि म्हणतं – “हा नेता खरा आहे!” या प्रकरणाच्या निमित्ताने एक सामाजिक संदेशही उमटला आहे – खोटारडेपणाच्या, वैयक्तिक बदनामीच्या, आणि अफवांच्या बळावर राजकारण करणाऱ्यांना आता वाट मोकळी नाही. माध्यम स्वातंत्र्याचे मूल्य जपले पाहिजे, पण ते जबाबदारीने. कारण एक अपप्रचार लाखो मनांमध्ये विष पेरू शकतो. म्हणूनच, न्यायालयाचा हा आदेश केवळ संकटमोचक ना. गिरीशभाऊ महाजन यांच्यासाठीच नव्हे, तर समाजासाठी देखील रक्षणकवच ठरतो.आज संकटमोचक ना. गिरीशभाऊ महाजन यांची प्रतिमा ही महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात एक विश्वासार्ह, संकटात धावून येणाऱ्या, वचन पाळणाऱ्या आणि निर्णयक्षम नेतृत्वाची बनली आहे. भाजपमधील त्यांचे योगदान, संघटनात्मक बांधणी, आणि सर्वसामान्य कार्यकर्त्यांशी जोडलेली नाळ ही केवळ निवडणूक मते नाही, तर त्यांच्या कार्यपद्धतीमुळेच मिळालेली श्रद्धा आहे. हेच श्रद्धास्थान जेव्हा खोट्या आरोपांनी डागळले जातं, तेव्हा न्यायालयाचा हस्तक्षेप गरजेचा होतो आणि या प्रकरणात तो समयोचित, संतुलित आणि सुस्पष्ट झाला. हा निर्णय आल्यानंतर सोशल मीडियावर ‘#JusticeForGirishMahajan’ ट्रेंड झाला. राज्यभरातून कार्यकर्त्यांनी आपल्या संकटमोचक नेत्याला मिळालेल्या न्यायाचे स्वागत केले. काही ठिकाणी जल्लोष, मेणबत्ती रॅली तर काही ठिकाणी मिठाई वाटप करून या निर्णयाचा आनंद साजरा करण्यात आला या निर्णयानंतर संकटमोचक ना. गिरीशभाऊ महाजन यांनी जे शब्द उच्चारले, ते लाखो कार्यकर्त्यांच्या मनात घर करून गेले – “खोट्या आरोपांना घाबरण्याऐवजी मी सत्याच्या मार्गावर उभा राहिलो. न्यायालयाने दिलेला निर्णय केवळ माझा नाही, तर सामान्य माणसाच्या श्रद्धेचा विजय आहे.” हे विधान त्यांच्या कार्यशीलतेचा आत्मा आणि नेतृत्वाचा पाया ठरतो. एकूणच, हा निकाल एक नवीन पायवाट दाखवतो – की जेव्हा खोटारडेपणा वाढतो, तेव्हा संयमाने, कायद्यातील विश्वासाने आणि सत्याच्या बळावर त्याचा पराभव शक्य असतो. आणि हे करून दाखवलं संकटमोचक ना. गिरीशभाऊ महाजन यांनी. त्यांचा हा विजय केवळ एक व्यक्तीचा नसून, तो एक विचारसरणीचा, मूल्यांचा आणि सच्च्या लोकप्रतिनिधीत्वाचा आहे.                                               सत्य हीच सर्वोच्च शक्ती असते आणि त्या शक्तीवर निष्ठा ठेवणाऱ्यांनाच शेवटी विजय प्राप्त होतो. आणि म्हणूनच, महाराष्ट्र आज अभिमानाने म्हणतो – “जय न्यायाचा! जय संकटमोचक ना. गिरीशभाऊ महाजन!”

शिक्षणसंस्कारांची उज्ज्वल परंपरा – एसएससी परीक्षेत पिटीसी संस्थेची यशोशिखराकडे दमदार वाटचालसंस्थेच्या विविध शाळांनी घवघवीत यश संपादन करत शिक्षणविश्वात नवा आदर्श निर्माण केला

Loading

पाचोरा – पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्था ही गेल्या अनेक दशकांपासून आपल्या कार्यकर्तृत्वाने शिक्षणाच्या क्षेत्रात एक विश्वासार्ह नाव ठरली आहे. संस्थेच्या शाळांनी घडवलेल्या हजारो विद्यार्थी, शिक्षकांचे सातत्यपूर्ण मार्गदर्शन, शाळांची गुणवत्ता आणि व्यवस्थापनाची निष्ठा – या सर्व गोष्टींमुळे पिटीसी ही संस्था फक्त शिक्षण संस्था नसून शैक्षणिक संस्कृतीचे मंदिर ठरली आहे. यावर्षी २०२५ साली घोषित झालेल्या इयत्ता दहावीच्या (एसएससी) परीक्षेचा निकाल हा त्याच उज्ज्वल परंपरेचा साक्षात पुरावा ठरला आहे.
संस्थेच्या एकूण ९ शाळांमधून विद्यार्थ्यांनी परीक्षेला बसून घवघवीत यश मिळवले आहे. अनेक विद्यार्थ्यांनी ९० टक्क्यांहून अधिक गुण मिळवत आपली मेहनत, शिक्षकांचे मार्गदर्शन आणि संस्थेच्या व्यवस्थापनाची शिस्तीची फळं जनतेसमोर मांडली आहेत.
१) श्री. गो. से. हायस्कूल, पाचोरा
संपूर्ण पाचोरा शहरात शैक्षणिक सन्मान प्राप्त असलेल्या या हायस्कूलचा निकाल ९५.९०% इतका लागला असून, भाग्यश्री सुनील चौधरी ९५.६०% गुणांसह प्रथम आली आहे. तिच्यानंतर मानसी सुनील पाटील (९५.२०%) व ईश्वरी ज्ञानेश्वर कुमावत (९४.८०%) या विद्यार्थिनींनी अनुक्रमे द्वितीय व तृतीय स्थान पटकावले. या यशाने विद्यालयाच्या शिस्तीची आणि गुणवत्ता शिक्षणाची मोहोर अधोरेखित केली आहे.
२) सौ. सु. गी. पाटील विद्यालय, भडगाव
९५ टक्क्यांचा भक्कम निकाल देत या विद्यालयाने आपल्या शैक्षणिक गुणवत्ता सिद्ध केली आहे. चिन्मय संदीप पाटील (९७.८०%), ध्रुवेश राकेश राजपूत (९७.२०%) आणि कृष्णा संतोष पाटील (९७%) यांनी अनुक्रमे प्रथम, द्वितीय व तृतीय स्थान पटकावून विद्यालयाच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे.
३) डॉ. राम मनोहर लोहिया विद्यालय, बांबरुड (राणीचे)
या ग्रामीण भागातील शाळेने देखील ९५.९०% इतका वाखाणण्याजोगा निकाल दिला. राठोड विशाल विजय (९१.४०%) प्रथम, पाटील नक्षत्रा दिवाकर (८६%) द्वितीय आणि काळे पंकज रविंद्र (८५%) तृतीय आले आहेत. ही आकडेवारी सांगते की पिटीसी संस्थेचे शिक्षण हे फक्त शहरापुरते मर्यादित नसून ग्रामीण विद्यार्थ्यांनाही उज्ज्वल भवितव्य देणारे आहे.
४) एच. बी. सांघवी हायस्कूल, खेडगाव नंदीचे
या शाळेचा निकाल ९६.६६% असून, रईस युनूस पिंजारी (८७.४०%), मानसी प्रशांत पाटील (८५.६०%) आणि रोशनी देविदास महाजन (८३.८०%) यांनी यशाचे शिखर गाठले आहे.
५) शां. न. जैन माध्यमिक विद्यालय, वाडी
या शाळेचा ९३.७५% निकाल देखील शैक्षणिक उत्कृष्टतेची ग्वाही देतो. जागृती नामदेव तायडे (८५.२०%), ममता ज्ञानेश्वर पाटील (८१.८०%) आणि आसिफ शरद तडवी (८०.२०%) हे विद्यार्थी यामध्ये आघाडीवर राहिले.
६) सु. वि. माध्यमिक विद्यालय, माहेजी
९०.९०% निकालासह ही शाळा यशाच्या उंबरठ्यावर असून, रिया शेख युनिस (९४.२०%), विनय संजय शिरसाठ (८१.६०%) व अनिकेत प्रवीण भोई (७८.८०%) हे यशस्वी विद्यार्थी.
७) आदर्श माध्यमिक विद्यालय, कुर्‍हाड खुर्द
संपूर्ण संस्थेतील सर्वोत्तम निकाल ९९.२६% याच विद्यालयाने प्राप्त केला आहे. शैलेश भरत राठोड (९२.२०%), जीवन गणेश पाटील (८७%) आणि ललित दीपक माळी (८३.८०%) यांनी ही यशोगाथा लिहिली आहे.
८) श्रीमती च. ही. राजपूत विद्यालय, दहीगाव संत
या विद्यालयाने ९५% निकाल दिला असून कुणाल बाळकृष्ण पाटील (७३.८०%) प्रथम, आनंदसिंग समाधान पाटील द्वितीय आणि सौरभ समाधान सोनवणे तृतीय आले आहेत.
९) महात्मा फुले हायस्कूल, भोजे चिंचपूरे
८९.४७% निकालासह रेणुका संदीप भिवसने (८१%), कुणाल एकनाथ जाधव व तेजस कैलास माळी (८०.२०%) द्वितीय, व कुणाल खुशाल हिवाळे (७८%) तृतीय स्थानावर.
१०) पोस्ट बेसिक विद्यालय, सातगाव डोंगरी
७८.७८% निकालासह लालीराम ईश्वर बारेला (६८.६०%), अतुल लहानू तडवी (६६.८०%) व रोशनी चंपालाल पावरा (६३.२०%) ही विद्यार्थी यशस्वी ठरले.
या भव्य यशामागे संस्थेचे अध्यक्ष माजी आमदार भाऊसो. दिलीप ओंकार वाघ, चेअरमन नानासो संजय ओंकार वाघ, मानस सचिव ॲड. महेशदादा देशमुख, व्हॉइस चेअरमन नानासो व्ही. टी. जोशी आणि सर्व संचालक मंडळाचे प्रभावी नेतृत्व व शाळा समित्यांचे योगदान हेच मुख्य घटक आहेत. प्रत्येक शाळेतील शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या व्यक्तिगत गरजांचा विचार करत सातत्यपूर्ण मेहनत घेतली.
पिटीसी संस्थेच्या शाळांमध्ये फक्त पुस्तकी शिक्षणच नाही, तर मूल्यशिक्षण, चारित्र्यविकास, सांस्कृतिक घडामोडी आणि विद्यार्थ्यांमधील आत्मविश्वास वृद्धिंगत करणारी सर्वांगीण प्रणाली आहे. त्यामुळेच हे निकाल केवळ आकड्यांमध्ये मर्यादित न राहता शाळेच्या मूल्यांचा परावश दर्शवतात.
पिटीसी सारख्या ग्रामीण भागात कार्यरत संस्थेचा पाया मजबूत असल्यामुळेच हजारो गरीब, मध्यमवर्गीय पालकांच्या घरात ज्ञानाचा दीप पेटतो आहे. संस्थेने हे यश आपल्या चिकाटीने, गुणवत्ता शिक्षणाने आणि सामाजिक बांधिलकीच्या भावनेने मिळवले आहे – याचा प्रत्येक विद्यार्थी, पालक आणि कर्मचारी यांना अभिमान आहे.

“जनतेचा डॉक्टर, पक्षाचा धुरा—जळगावच्या विश्वासाचे नाव डॉ. राधेश्यामदादा चौधरी!”

Loading

जळगाव – भारतीय जनता पक्षाच्या जळगाव पश्चिम जिल्हाध्यक्षपदी डॉ. राधेश्यामदादा चौधरी यांची नुकतीच अत्यंत बहुमानाने व विश्वासाने निवड करण्यात आली असून, त्यांच्या नियुक्तीमुळे संपूर्ण जिल्ह्यात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. वैद्यकीय सेवा, सामाजिक बांधिलकी, संघटनात्मक कौशल्य आणि जनतेशी असलेला सजीव संवाद या सर्व बाबींचा संगम म्हणजे डॉ. राधेश्यामदादा चौधरी हे नाव आज जळगावच्या राजकारणात आणि समाजात विश्वासाने घेतले जाते.
१९७५ मध्ये जन्मलेले डॉ. चौधरी हे गुर्जर समाजाचे असून, त्यांनी एम.बी.बी.एस. आणि डी.जी.ओ. ही पदवी घेत स्त्रीरोग, प्रसूतीतज्ज्ञ व वंध्यत्व उपचारांमध्ये विशेष प्राविण्य प्राप्त केले आहे. त्यांनी स्थापन केलेल्या सृष्टी हॉस्पिटल, जळगाव या रुग्णालयामार्फत गेल्या अनेक वर्षांपासून हजारो रुग्णांना निःशुल्क सल्ला, तपासणी आणि उपचार मिळाले आहेत. मात्र त्यांचे योगदान केवळ वैद्यकीय क्षेत्रापुरते मर्यादित नाही, तर ते विविध सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक आणि राजकीय उपक्रमांतही अग्रभागी राहिले आहेत.
डॉ. चौधरी यांनी आपल्या नेतृत्वगुणांचा वापर भारतीय जनता पक्षाच्या विविध यंत्रणांत सिद्ध केला आहे. २०२४ च्या जळगाव लोकसभा निवडणुकीत त्यांनी प्रमुख प्रभारी म्हणून महत्त्वाची भूमिका बजावली. त्यानंतर जिल्हा समन्वयक म्हणून विधानसभा निवडणूक २०२५ साठी देखील त्यांची नियुक्ती झाली. महायुतीचे समन्वयक, संवाद केंद्राचे संयोजक आणि विस्तारक योजनेत पालक प्रतिनिधी म्हणून त्यांनी संघटनेच्या अंतःशक्तीचा परिपूर्ण वापर करून पक्षाच्या यंत्रणेत नवे प्राण फुंकले.
२०१९ पासून ते जळगाव महानगर भाजपाचे सरचिटणीस पद भूषवत आहेत. ‘मन की बात’ कार्यक्रमाचे जिल्हा संयोजक म्हणून त्यांनी १५०० पेक्षा जास्त बुथांवर प्रवास करून पक्षाची विचारसरणी प्रत्येक कुटुंबापर्यंत पोहोचवली आहे. विविध मंडळे, आघाड्या, प्रकोष्ठे आणि शक्तिकेंद्रांचे जाळे अधिक प्रभावी करण्यासाठी त्यांचा मार्गदर्शक अनुभव कार्यकर्त्यांना उभारी देतो.
सामाजिक, शैक्षणिक आणि आरोग्य क्षेत्रातील समांतर योगदान
डॉ. राधेश्याम चौधरी हे “जळगाव फर्स्ट” या १६००० हून अधिक फॉलोअर्स असलेल्या लोकचळवळीचे समन्वयक आहेत. महाराष्ट्रातील गुर्जर समाजाच्या सामाजिक संघटनांमध्ये त्यांनी २०१२ पासून अखिल भारतीय गुर्जर परिषदेचे प्रदेशाध्यक्ष म्हणून नेतृत्व केले आहे. दोडे गुर्जर संस्थानचे सचिव म्हणून त्यांनी शैक्षणिक मदत, मुलींचे सक्षमीकरण, आणि कौटुंबिक सल्ला या गोष्टींवर भर दिला आहे.
आरोग्य क्षेत्रातील योगदानात त्यांनी आयएमए (इंडियन मेडिकल असोसिएशन) जळगाव शाखेचे सचिव, तसेच जळगाव जिल्हा ओब्सट्रेटीक गायनेक सोसायटीचे (JOGS) माजी सचिव म्हणून काम पाहिले. शासकीय पीसीपीएनडीटी सल्लागार समितीच्या चेअरमनपदावर त्यांनी २०१५ ते २०२१ दरम्यान भूषणावह कार्य केले. कोरोना काळात जिल्हा कोविड-१९ टास्क फोर्स सदस्य आणि आपत्ती निवारण समितीचे संयोजक म्हणून त्यांनी केलेल्या उपाययोजना आजही जिल्ह्याच्या आरोग्य प्रशासनाला दिशा देतात.
डॉ. चौधरी हे केवळ चिकित्सक किंवा राजकीय नेते म्हणूनच नव्हे, तर सामाजिक प्रश्नांवर कायदेशीर मार्गाने लढा देणारे नागरिकसज्ज नेते म्हणून देखील परिचित आहेत. त्यांनी २१७५ गाळेधारकांच्या भाडे करार नुतनीकरण आणि हुडको कर्जफेड संदर्भात उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करून नागरिकांच्या बाजूने ठोस भूमिका घेतली. याशिवाय, महामार्गावरील समांतर रस्त्यांच्या विकासासाठी, ४५ दारू दुकाने बंद करण्यासाठी आणि सहा रस्त्यांच्या अवर्गीकरणाविरोधात त्यांनी राज्य सरकारविरुद्ध याचिका दाखल केल्या आहेत.
या सर्व जनहित याचिकांद्वारे त्यांनी सामान्य जनतेच्या प्रश्नांवर न्याय मिळवून देण्यासाठी निवडणुकीपलीकडे जाऊन काम केलं आहे. त्यांच्या या कार्यामुळे सामाजिक भान असलेले एक कणखर नेतृत्व भाजपला लाभले आहे.
२०१८ मध्ये त्यांची निवड स्वच्छ भारत अभियानाचे स्वच्छतादूत (ब्रँड अॅम्बेसडर) म्हणून करण्यात आली. २०१३ साली ५ व्या आंतरराष्ट्रीय गुर्जर इतिहास परिषदेचे आयोजन सचिव म्हणून त्यांनी इतिहास, परंपरा आणि समाजभान यांचे महत्त्व अधोरेखित केले.
नेतृत्वशैली आणि जनमानसात विश्वास
डॉ. राधेश्यामदादा चौधरी यांची एक ठळक विशेषता म्हणजे ते कोणत्याही पदावर असो, कार्यकर्त्यांशी संपर्क आणि संवादाची सततची परंपरा पाळतात. त्यांनी आजवर अनेक तरुण नेत्यांना मार्गदर्शन करत पक्षाच्या जळगाव जिल्ह्यातील नव्या पिढीचा विश्वास संपादन केला आहे. त्यांच्या नेतृत्वात भाजपची संघटनशक्ती अधिक परिणामकारकपणे एकवटेल, असे सर्वसामान्य मत आहे.
नवनियुक्त जिल्हाध्यक्ष म्हणून आशेचा किरण
आज जळगाव लोकसभा क्षेत्रात भाजपसाठी ज्या प्रकारची रणनीती, लोकांशी संवाद, आणि सर्वसमावेशक नेतृत्व आवश्यक आहे, त्या सर्व बाबींमध्ये डॉ. चौधरी सक्षमपणे उभे राहतात. त्यांची नियुक्ती ही केवळ एक राजकीय भूमिका नाही, तर जळगावच्या जनतेच्या आशा-आकांक्षांना दिशा देणारा महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे.
“जनसेवा हीच ईश्वरसेवा” या तत्वाला त्यांनी प्रत्यक्ष कृतीतून अधोरेखित केलं आहे. त्यांनी केवळ राजकारणात नव्हे, तर समाजकारणातही जनतेचा डॉक्टर म्हणून स्थान निर्माण केलं आहे.
आज त्यांच्या या नव्या जबाबदारीसाठी जिल्हाभरातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
भाजप – जळगाव लोकसभा मतदारसंघाचे नवनियुक्त जिल्हाध्यक्ष डॉ. राधेश्यामदादा चौधरी यांना झुंज वृत्तपत्र व ध्येय न्युज परिवाराच्या वतीने हार्दिक शुभेच्छा!

रेल्वे तिकिट घोटाळ्याचा धक्कादायक प्रकार! अजूनही योगेश वाणीने धडा घेतला नसल्यास न्यायालयीन शिक्षा अटळ?

Loading

पाचोरा – कोणत्याही परिस्थितीत देशसेवा करणाऱ्या भारतीय सैनिकांच्या भावनांची आणि गरजांची लाज न ठेवता त्यांच्या मजबुरीचा गैरफायदा घेणाऱ्यांवर आता कायद्याचा करडा चाप बसण्याची वेळ आली आहे. पाचोरा शहरातील कृषी उत्पन्न बाजार समिती समोर रेल्वे तिकीट एजंटगिरी करणारा योगेश वाणी नावाचा एजंट सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. याआधी मतिमंद विद्यार्थ्यांकडून वाजवीपेक्षा जास्त पैसे वसूल करून तिकिटे देतानाचा प्रकार समोर आला होता, त्यानंतर पत्रकार संदीप महाजन यांनी धडक तक्रार करीत त्या प्रकरणात आर पी एफ कडून कारवाईही झाली होती. परंतु दुर्दैवाने या व्यक्तीने यातून कोणताही धडा घेतलेला दिसत नाही.
नुकत्याच घडलेल्या प्रकारात सी आय एस एफ मध्ये कार्यरत असलेल्या जवान प्रदीप बाविस्कर यांच्याकडून योगेश वाणी याने तब्बल १६०० रुपये वसूल केले. विशेष म्हणजे या बदल्यात कोणतेही आरक्षण किंवा खात्रीशीर तिकीट सुविधा न देता त्यांच्याशी फसवणुकीसारखी वागणूक करण्यात आली. हे सर्व प्रकरण यामुळे अधिक गंभीर ठरतं की देश युद्धजन्य स्थितीत असताना, सैनिकांना त्यांच्या सेवास्थळी तातडीने पोहोचणे अपेक्षित असते आणि अशा वेळी त्यांच्या देशप्रेमाच्या भावनेचा फायदा घेत त्यांच्याकडून अवाजवी रक्कम उकळणे हे केवळ अनैतिकच नाही तर थेट भारतीय दंड संहितेच्या कलम 420 अन्वये फसवणूक म्हणून ओळखले जाते.
या प्रकरणी पत्रकार संदीप महाजन यांनी बातमी प्रसिद्ध करताच तातडीने हालचाल होऊन संबंधित सैनिकाच्या खात्यात वसूल केलेली रक्कम काही मिनिटांत परत ट्रान्स्फर करण्यात आली. ही बाब योगेश वाणीने घाबरून केलेली आणि पत्रकारितेच्या ताकदीचा थेट पुरावा आहे. संबंधित व्यक्तीने याआधीही अशा प्रकारे बऱ्याच गरजूंना गंडवत असल्याची माहिती विविध माध्यमांतून समोर येत आहे.
योगेश वाणी याने अजूनही लालच सोडावी
जर का या प्रकरणात उच्च स्तरावर सखोल चौकशी केली गेली तर संबंधित सैनिकाच्या आय डी वरून काढलेले तिकिट, त्याचा संगणक, वापरलेला इंटरनेट आयपी अ‍ॅड्रेस, आर्थिक व्यवहारांची ट्रांजेक्शन रेकॉर्ड, फोन नंबर आणि सी आय एफ एम एस वर नोंद असलेली माहिती या सर्व गोष्टी पुराव्याच्या स्वरूपात इतक्या ठोस आहेत की कोणत्याही कागदोपत्री साक्षांशिवायही या प्रकरणी न्यायालयात दणदणीत पुरावे मांडले जाऊ शकतात. त्यानुसार योगेश वाणी याला शिक्षा होणे अटळ आहे.मात्र पत्रकार संदीप महाजन यांनी स्पष्टपणे मांडले आहे की पत्रकारिता म्हणजे कोणाचेही कुटुंबाचे उद्ध्वस्त होणे नव्हे, पण जेव्हा कोणीतरी ‘व्यवसाय’ या नावाखाली नागरिकांच्या गरजांचा, भावनांचा, आणि विशेषतः सैनिकांच्या कर्तव्यनिष्ठेचा फायदा घेतो, तेव्हा माध्यम म्हणून ही जबाबदारी बनते की त्यावर आवाज उठवावा. योगेश वाणी याने याआधी झालेल्या प्रकरणातून काही धडे घेतले असते तर आज ही वेळ आली नसती. मात्र आता निदान या ताज्या प्रकारातून त्यांनी हे समजून घ्यावे की, पैशाच्या हव्यासापोटी करत असलेला हा ‘छोटा वाटणारा’ प्रकार एका सैनिकाच्या मनावर, त्याच्या कुटुंबावर, आणि अखेर समाजाच्या सुरक्षिततेवर किती घातक परिणाम करू शकतो.
कायदा, प्रशासन आणि माध्यम यांचे त्रिसूत्री बळ जर एकत्रितपणे काम करू लागले, तर पाचोऱ्यातील असे एजंटगिरी करणारे अनेक ‘स्वघोषित’ दलाल आणि भामटे उघडकीस येतील. जनतेनेही अशा प्रकरणांची माहिती वेळेवर संबंधित अधिकाऱ्यांना किंवा पत्रकारितेला द्यावी, जेणेकरून या लुटीचा मक्ता संपवता येईल.
पुनश्च सांगायचं झाल्यास, कोणत्याही व्यवसायात नीतिमत्ता, पारदर्शकता आणि माणुसकी असणे आवश्यक आहे. जर ही त्रिसूत्री सोडून कुणी केवळ नफा आणि लालच व हव्यासाच्या बळावर नागरिकांना लुटत असेल, तर तो ‘व्यवसाय’ नसून एक ‘गुन्हा’ ठरतो.
योगेश वाणी याने तातडीने याची जाणीव ठेवून भविष्यात अशी फसवणूक पुन्हा आपल्या हातून होणार नाही याची खबरदारी घ्यावी, अन्यथा न्यायव्यवस्थेचा कोप त्यांच्या वाट्याला येणे अटळ आहे. जनतेनेही अशा घटनांबाबत सजग राहून लोकशाहीच्या चौथ्या स्तंभावर विश्वास ठेवत योगेश वाणी सारख्यांच्या चुकीच्या गोष्टींविरुद्ध आवाज उठवावा.
हीच खरी पत्रकारितेची ताकद आणि जबाबदारी आहे – नागरिकांच्या हक्कांसाठी लढणं, अन्यायाला उघड करणं आणि चुकणाऱ्यांना सुधारायला भाग पाडणं!

लुबाडणारा रेल्वे एजंट!” भारतीय सैनिकालाही सोडत नाही

Loading

पाचोरा –देशात युद्धजन्य परिस्थितीचे सावट असताना, प्रत्येक नागरिक देशप्रेमाने ओतप्रोत भरलेला आहे. सीमेवरील सैनिकांसाठी समाजातील अनेक लोक स्वतःहून आपली आरक्षित तिकिटं देऊन मदतीचा हात पुढे करत आहेत. परंतु अशा संवेदनशील काळातसुद्धा काही लाचार, बेजबाबदार अनधिकृत व्यक्ती आपली माणुसकी विकून केवळ पैशासाठी देशाच्या रक्षणासाठी झटणाऱ्या जवानांची सुद्धा लुबाडणूक करत आहेत.
पाचोरा शहरातील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या समोर बसविण्यात आलेल्या रेल्वे तिकिट एजंट संदर्भात यापूर्वीही अनेक तक्रारी नागरिकांनी केल्या होत्या. या एजंटकडून वाजवीपेक्षा जास्त रक्कम आकारली जात असल्याची गंभीर माहिती पत्रकार संदीप महाजन यांच्या माध्यमातून समोर आली होती. विशेषतः मतिमंद विद्यार्थ्यांना आणि गरजू प्रवाशांना अधिकच त्रास देण्याचा प्रकार याआधीही उघडकीस आला होता. पत्रकार संदीप महाजन यांच्या तक्रारीनंतर आरपीएफ दलाने तात्काळ कारवाई करत या अनधिकृत एजंटवर गुन्हा दाखल केला होता. ही कारवाई संपूर्ण शहरात कौतुकाचा विषय ठरली होती.
पण तरीही या एजंटच्या मनात भीती निर्माण झाली नसल्याचे दिसून येते. कारण काही दिवसांपूर्वी पुन्हा एकदा त्याच अनधिकृत एजंटने भारतीय केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलातील (CISF) जवान प्रदीप बाविस्कर यांची खुलेआम फसवणूक केली आहे. पिंपरी सार्वे येथील राहणारे जवान प्रदीप बाविस्कर यांना त्यांच्या सेवास्थळी तातडीने परतण्याचा आदेश मिळाल्यानंतर त्यांनी रेल्वे प्रवासासाठी तिकिट काढण्याचा प्रयत्न केला. या घाईच्या परिस्थितीत पाचोऱ्यातील अनधिकृत एजंटकडे त्याने मदतीची विनंती केली. मात्र देशसेवेसाठी जाणाऱ्या या जवानाचा मोबदला या एजंटने तब्बल 1600 रुपयांची लुबाडणूक करून दिला.
सैनिक प्रदीप बाविस्कर यांनी पत्रकार संदीप महाजन यांच्याशी संवाद साधताना सांगितले की, संबंधित एजंटने IRCTC चा तिकीट बुकिंग आयडी बेकायदेशीरपणे वापरत त्यांच्या नावाने तिकीट काढण्याचे आश्वासन दिले. मात्र प्रत्यक्षात कोणतेही तिकीट न देता सैनिकाची फसवणूक करण्यात आली. इतकेच नाही तर संबंधित एजंटने या जवानाचा मोबाईल नंबर ब्लॅकलिस्टमध्ये टाकला आणि त्याच्या कोणत्याही फोन किंवा संवादाला प्रतिसाद दिला नाही.
आज देशाची परिस्थिती गंभीर आहे. सीमारेषेवर तणाव आहे. सरकारकडून प्रत्येक जवानाला आदेश देण्यात आले आहेत की, तो आपल्या युनिटमध्ये तातडीने हजर व्हावा. त्यामुळे अनेक सैनिक आपल्या घरी असताना जे काही साधन उपलब्ध असेल त्याद्वारे प्रवास करत आहेत. देशभरात तिकीटांच्या रांगेत सर्वसामान्य नागरिक स्वतःहून सैनिकांना प्राधान्य देत आहेत, त्यांच्यासाठी आपल्या जागा रिकाम्या करत आहेत, काही जण तर स्वतःची आरक्षित सीट देऊन सैनिकांना बसवतात – ही आहे खरी देशभक्ती! पण याचवेळी हे अनधिकृत एजंट मात्र याच सैनिकांना लुबाडून स्वतःचे खिसे भरत आहेत.
याप्रकरणी पत्रकार संदीप महाजन यांनी पुन्हा एकदा सक्रिय भूमिका घेतली असून संबंधित एजंटच्या विरोधात पुन्हा कारवाई करण्याची मागणी केली आहे. त्यांनी सांगितले की, “याआधीही याच एजंटविरोधात तक्रार करून आरपीएफच्या माध्यमातून गुन्हा दाखल केला होता. आता पुन्हा एकदा देशसेवेसाठी निघालेल्या जवानाशी फसवणूक झाल्याचे समजल्यावर याचा गंभीरपणे पाठपुरावा करू
या प्रकरणावरुन आणखी एक बाब समोर आली आहे की, या एजंटकडून सतत असेच प्रकार घडत आहेत. तात्काल आरक्षणाच्या नावाखाली गरजू व्यक्तींकडून वाजवीपेक्षा अधिक रक्कम आकारली जाते, तरीही तिकीट दिले जात नाही, काही वेळा बोगस पावत्या दिल्या जातात.विशेष म्हणजे, या एजंटकडे अधिकृत रेल्वे एजन्सीची परवानगी देखील नसल्याचे आता स्पष्ट झाले आहे.
हे सर्व प्रकार पाहता रेल्वे प्रशासन, आरपीएफ आणि स्थानिक पोलीस यंत्रणांनी याकडे गांभीर्याने लक्ष देणे गरजेचे आहे. शहरात असे अनधिकृत एजंट जर उघडपणे कार्यरत असतील, तर सामान्य प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण होतो. देशासाठी झटणाऱ्या सैनिकांनाही जर या ठिकाणी लुटले जात असेल, तर हे पूर्ण समाजासाठी लाजिरवाणं आहे.
या प्रकरणाची अधिक सखोल चौकशी होण्यासाठी आणि याला कायमस्वरूपी आळा घालण्यासाठी पत्रकार संदीप महाजन यांनी वरिष्ठ रेल्वे अधिकाऱ्यांशी संपर्क साधून तक्रार दिली आहे.
यावेळी राजकीय ,सामाजिक कार्यकर्ते, नागरिक आणि पत्रकार संघटनांनी देखील या प्रकारणी दखल घेणे गरजेचं आहे भारतीय सैनिकांबाबत समाजात प्रचंड आदर असून, त्यांना कोणताही त्रास देणं म्हणजे देशद्रोहाचं पातकच म्हणावं लागेल
शेवटी एकच प्रश्न –
जेव्हा देशासाठी लढायला जाणाऱ्या वीर सैनिकालाही तिकीट एजंटकडून लुबाडलं जातं ही विषवल्ली किती खोलवर मुळं रोवली असती?
आज वेळ आहे की, अशा एजंटांविरोधात कठोर कारवाई करून समाजात एक उदाहरण निर्माण व्हावं. आणि सैनिकाला मदत करणं ही आपल्या प्रत्येकाची जबाबदारी आहे.

“अस्थी विसर्जन न जलात… तर जीवनदायी वृक्षात – स्व. शंकरराव चौधरी यांच्या स्मृतीला संस्कारांचा सजीव अंजन!” – गणेशअण्णा परदेशी (माजी नगराध्यक्ष- भडगाव न पा )

Loading

भडगाव – शहरातील एक आदर्श, निष्ठावान, कार्यनिष्ठ आणि समाजशील व्यक्तिमत्त्व, मा. नगरसेवक मनोहरभाऊ चौधरी यांचे पिताश्री स्व. शंकर राघो चौधरी (वय ८२) यांचे वृद्धापकाळाने दि. ४ मे २०२५ रोजी सायंकाळी ५ वाजता शांत निधन झाले. त्यांच्या निधनाने चौधरी कुटुंबीयांप्रमाणेच भडगाव शहरासह पंचक्रोशीतील सर्वच समाजबांधवांना हळहळ वाटत आहे. त्यांचा दशक्रिया विधी १३ मे रोजी, तर गंधमुक्ती व उत्तरकार्याचा कार्यक्रम १६ मे रोजी नियोजित असून, त्या दिवशी एक नवा सामाजिक आदर्श घालून देणारा उपक्रमही चौधरी परिवाराच्या वतीने राबविण्यात येणार आहे.
स्वर्गीय शंकर राघो चौधरी — ज्यांना आप्पासाहेब या नावाने समस्त पंचक्रोशीत ओळखले जात होते — हे फक्त एक शासकीय कर्मचारी नव्हते. त्यांनी महाराष्ट्र राज्य वीज मंडळात सेवा बजावताना आपल्या कर्तव्यात कधीही कसूर केली नाही, पण याहीपलीकडे जाऊन त्यांनी आपल्या जीवनात दुग्ध व्यवसाय, समाजसेवा आणि कुटुंब संस्कार यांचा त्रिवेणी संगम साधला. एकीकडे नोकरीचे काटेकोर पालन, तर दुसरीकडे पहाटे ४ वाजता उठून गावातील लोकांसाठी दुधाचा पुरवठा हे त्यांचे दशकांपासूनचे नित्यकर्म होते. त्यांच्या जीवनशैलीत एक विलक्षण शिस्त होती. कोणतीही विश्रांती न घेता, कधीही थकवा न दर्शवता, त्यांनी केवळ आपलेच नव्हे, तर अनेकांच्या आयुष्याचा प्रवास सुकर केला. सरकारी नोकरी करताना ज्या गावाला वीजपुरवठा व्हावा यासाठी त्यांनी अनेक वेळा स्वतःची सुट्टी खर्च करून, पावसात, उन्हात, वादळात काम केले. अनेक गरजू आणि गरीब कुटुंबांच्या घरात त्यांनी स्वतःहून जाऊन वायरिंग केले, फ्यूज सुधारले, आणि घर उजळवले — तेही कधी मोबदल्याची अपेक्षा न ठेवता.
त्यांचं आयुष्य केवळ कर्तव्यनिष्ठेपुरतं मर्यादित नव्हतं, तर त्यांनी आपल्या कुटुंबाला सांभाळताना ‘कर्तव्य + संवेदना + सेवा’ यांचा आदर्श घालून दिला. त्यांनी केवळ कुटुंब सांभाळलं नाही, तर त्यांचं घडवणं, शिक्षण, सुसंस्कार आणि आत्मविश्वास देणं — हे कार्यही निष्ठेने पार पाडलं. त्यांच्या चार अपत्यांमध्ये दोन मुलगे आणि दोन कन्यांचा समावेश असून सर्वांनी त्यांच्या मार्गदर्शनाचा आदर्श घेत आपल्या जीवनात यश प्राप्त केलं आहे. त्यांचे ज्येष्ठ पुत्र मा. नगरसेवक मनोहर शंकर चौधरी हे आज भडगाव शहराच्या राजकारणात सामाजिक जाणिवेचे भान बाळगणारे आणि अत्यंत मदतीस तत्पर म्हणून ओळखले जातात. त्यांनी आपल्या वडिलांचा वारसा जपत समाजकार्य, आधुनिक व्यवसाय व्यवस्थापन आणि सामान्यांच्या गरजा ओळखून त्या पूर्ण करण्यासाठी स्वतःला झोकून दिले आहे. त्याचबरोबर त्यांचे दुसरे पुत्र प्रा. प्रेमचंद शंकर चौधरी यांनी शिक्षक म्हणून कार्य करताना विद्यार्थ्यांमध्ये संस्कार रुजविण्याचे कार्य सुरु ठेवले आहे. त्यांच्या कन्यांनी देखील आपल्या वडिलांचे संस्कार, आत्मभान आणि सहकार्य यांचा प्रभाव घेत, उच्च शिक्षण घेतले आणि आपल्या संसारात यशस्वीपणे स्थिरावले. या मुलीही आपल्या वडिलांच्या प्रत्येक जबाबदारीत खांद्याला खांदा लावून उभ्या राहिल्या. या सगळ्या गोष्टींमधून अप्पासाहेब शंकरराव चौधरी यांची एक उत्तम ‘पिता’ म्हणून असलेली भूमिका स्पष्ट होते. स्व. आप्पासाहेब शंकरराव चौधरी यांनी समाजासाठी राबवलेल्या अनेक कार्यांपैकी सर्वाधिक स्तुत्य बाब म्हणजे त्यांचं सुसंस्कृत विचार आणि मूल्यांचा वारसा पुढे नेण्यावर असलेला विश्वास. त्यांच्या जाण्यानंतर त्यांच्या अस्थींचं विसर्जन जलप्रवाहात न करता, भडगाव नगरपालिकेच्या ऑक्सिजन पार्क परिसरात नियोजित विपश्यना केंद्राजवळ वड, पिंपळ आणि उंबर या तीन पवित्र वृक्षांच्या मुळाशी त्यांच्या अस्थींचे विसर्जन करण्यात येणार आहे. या वृक्षांची संपूर्ण जबाबदारी आणि संगोपनही चौधरी कुटुंबाच्या वतीनेच पार पडणार आहे. या अनोख्या निर्णयामुळे चौधरी कुटुंबीयांनी केवळ पर्यावरण रक्षणाचे भान जपलेले नाही, तर एक आदर्श पायंडा पाडला आहे की, आपल्या प्रिय व्यक्तीच्या आठवणी कायम ठेवण्यासाठी नैसर्गिक व सकारात्मक उपायही शक्य आहेत. पंचक्रोशीत या अभिनव उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे. अनेक जण या संकल्पनेने प्रेरित होऊन अशा प्रकारचे पर्यावरणाभिमुख स्मृतीचिन्ह पुढे राबविण्याच्या विचारात आहेत.
स्व अप्पासाहेब शंकरराव चौधरी यांचा जीवनप्रवास केवळ त्यांच्या कुटुंबापुरता मर्यादित नव्हता. गावातील प्रत्येक मोठ्या सण-उत्सवात, गणेशोत्सवात, धार्मिक कार्यक्रमांत आणि सामाजिक प्रसंगात त्यांची उपस्थिती ही अत्यंत सकारात्मक उर्जा देणारी असायची. त्यांच्या सल्ल्याशिवाय कोणताही निर्णय घेतला जायचा नाही. गावातील वयोवृद्ध आणि तरुण वर्गात एक आदराचे स्थान त्यांनी मिळवले होते.त्यांचा स्वभाव अत्यंत सौम्य, नम्र, पण ठाम होता. त्यांनी जीवनात कोणतीही तक्रार न करता, कोणत्याही परिस्थितीत हसतमुख राहून जगण्याचा संदेश दिला. त्यांनी समाजातील भेदाभेद पुसून टाकत सर्वांशी समता, स्नेहभाव आणि आपुलकीने वागण्याचे तत्त्व आयुष्यभर पाळले.
चौधरी परिवारातील सदस्यांची श्रद्धा, संस्कार आणि कृतज्ञता त्यांच्या स्मृतीस अर्पण करताना दिसते. त्यांच्या जाण्यानंतर सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. ते फक्त एक वडील नव्हते, ते एक प्रेरणास्रोत होते, एक कार्यकर्ते होते, एक शिक्षक होते आणि समाजाला मार्ग दाखवणारे दीपस्तंभ होते. नामदेव राघो चौधरी
तुकाराम राघो चौधरी
नारायण राघो चौधरी
मनोहर शंकर चौधरी (मा. नगरसेवक)
प्रा. प्रेमचंद शंकर चौधरी
समस्त चौधरी परिवार, भडगाव हे आप्पा साहेबांच्या जाण्याने चौधरी कुटुंबासाठी अपूरणीय पोकळी निर्माण झाली आहे पण त्यांच्या संस्कारांची पायाभरणी इतकी भक्कम आहे की, त्यांचा वारसा, त्यांचे विचार आणि त्यांच्या आठवणी चौधरी कुटुंबासह संपूर्ण भडगावकरांच्या मनात अखंडपणे जिवंत राहतील.
आप्पासाहेबांना भावपूर्ण श्रद्धांजली! –
शब्दांकन – गणेशअण्णा परदेशी
( मा. नगराध्यक्ष भडगाव नगरपालिका)

पाचोऱ्याचा गणेश शिंदे पत्रकार पुण्यात गाठतोय यशाची नवी वाट – मेहनतीने घेतली मालवाहतूक गाडी, आता स्वतःच्या कष्टावर उभारली संधी!

Loading

पाचोरा (प्रतिनिधी) – पत्रकार गणेश शिंदे आपल्या जन्मगावी असलेल्या पाचोऱ्यातून पुणे या प्रगत महानगरात स्थायिक होऊन तरुण पत्रकाराने केवळ नोकरी करून न थांबता स्वतःचे स्वप्न उभे करण्यासाठी घेतलेले कष्ट आज प्रेरणादायी ठरत आहेत. पाचोरा येथील मूळ रहिवासी असलेल्या आणि पत्रकारितेच्या माध्यमातून सामाजिक भान जपणाऱ्या गणेश शिंदे या युवकाने सध्या पुणे येथे नोकरी करत असतानाच मेहनतीच्या बळावर एक महिंद्रा पिकअप मालवाहतूक गाडी आज स्वतःच्या मालकीची घेतली आहे.
हे केवळ वाहन खरेदी नाही, तर एका सर्वसामान्य पत्रकाराने केलेली स्वबळावरची सुरुवात आहे. विशेष म्हणजे या गाडीचे नामांकित कंपनीत यशस्वीपणे कंत्राटीनुसार नियोजन केले असून, त्यामार्फत नियमित उत्पन्नाचा स्रोत निर्माण केला आहे. ही मालवाहतूक गाडी पुणे परिसरात वापरली जात असून, सद्यस्थितीत गाडी चालविण्यासाठी विश्वासू आणि प्रामाणिक चालकाची गरज आहे.
या संदर्भात इच्छुक उमेदवारांसाठी खास व्यवस्था करण्यात आली असून, मासिक पगार १२ हजार रुपये, दोन वेळचे सकस जेवण, दोन वेळचा नाश्ता व चहा तसेच निवासाची मोफत सोय यांचा समावेश असणार असल्याचे शिंदे यांनी सांगीतले आहे.विशेष म्हणजे हे सर्व लाभ निश्चित अटी व नियमांच्या अधीन राहूनच देण्यात येणार आहेत.
आपल्या मेहनतीवर विश्वास ठेवत, मोठ्या स्वप्नांची बीजे पेरणाऱ्या या पत्रकाराने यशाचा मार्ग निर्माण करताना स्वतःच्या कष्टावर उभ्या केलेल्या या योजनेमुळे अनेकांना प्रेरणा मिळणार आहे. अत्यंत नम्रतेने, कुठलीही गाजावाजा न करता गणेश शिंदे म्हणतो – “आज गाडी घेतली आहे, उद्या दोन होतील; पण प्रत्येक यश मागे प्रामाणिक काम आणि सातत्य असावं लागतं.”
अशा या मेहनती, मनोबलाने प्रेरित आणि ध्येयवेड्या तरुणाचा संपर्क क्रमांक – ९०२८८८००४५ असून, गरजूंनी त्याच्याशी थेट संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

ताज्या बातम्या

error: Content is protected !!