Home Blog Page 78

कर्तव्यनिष्ठेचा गौरव सोहळा: डीवायएसपी धनंजय येरुळे यांचा सेवानिवृत्ती समारंभ उत्साहात संपन्न

Loading

पाचोरा – पोलिस उपविभागाचे अधिकारी धनंजय येरुळे यांनी आपल्या ३५ वर्षांच्या प्रदीर्घ व कर्तव्यपरायण सेवेची यशस्वी सांगता करत दिनांक ३० जून रोजी आपल्या सेवेतून निवृत्ती घेतली. त्यांच्या सेवानिवृत्ती निमित्त दिनांक १ जुलै रोजी भडगाव रोडवरील आशीर्वाद हॉलमध्ये आयोजित करण्यात आलेला सेवानिवृत्ती समारंभ हा

अत्यंत उत्साहात, सुसज्ज आणि भावनांनी भारावलेला असा संपन्न झाला. या समारंभात जिल्हाभरातून पोलीस, महसूल, नगरपालिका, कृषी, राजकीय आणि विविध सामाजिक क्षेत्रातील मान्यवर तसेच कुटुंबीय, नातेवाईक, मित्रपरिवार मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. या समारंभाची सुरुवात एका अनोख्या आणि भव्य मिरवणुकीने झाली. गिरड रोडवरील डीवायएसपी कार्यालयापासून सजवलेल्या खुल्या जीपमध्ये धनंजय येरुळे आणि त्यांच्या पत्नी सौ. राजश्री येरुळे यांची मिरवणूक काढण्यात आली. ही मिरवणूक गिरड चौफुली, बाजार समिती, पोलीस लाईन, राजे संभाजी चौक, इंदिरा नगर मार्गे आशीर्वाद हॉलमध्ये पोहोचली. पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी दोर ओढत देशभक्तिपर घोषणा देत या मिरवणुकीला अभूतपूर्व स्वरूप दिले. मिरवणुकीदरम्यान देशप्रेम जागवणारे घोष, फुलांची उधळण आणि आनंदोत्सवाचे वातावरण पाहायला मिळाले. कार्यक्रमस्थळी पोहोचल्यावर येरुळे दांपत्याचे नातेवाईकांकडून औक्षण करण्यात आले आणि फटाक्यांच्या गजरात, फुलांच्या वर्षावात मंचावर सन्मानाने आणण्यात आले. या सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी प्रांत अधिकारी डॉ. भूषण अहिरे होते. मंचावर मान्यवरांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम अधिक भारदस्त झाला. व्यासपीठावर प्रांत अधिकारी विनय गोसावी, तहसीलदार विजय बनसोडे, नगरपालिका प्रशासक मंगेश देवरे, शंकर अप्पा येरुळे, चंद्रकांत द्वासे, उमाकांत येरुळे, चंद्रकांत येरुळे, मानीक निला, मन्मथ आप्पा फास्के, डॉ. विजयकुमार द्वासे, मल्लिकार्जुन गिरवलकर, अशोक तोंडारे, अतुल फास्के, आदित्यराज येरुळे, सौ. अपूर्वा फास्के, निवृत्त जिल्हा प्लॅनिंग अधिकारी प्रतापराव पाटील, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख दीपकसिंग राजपूत, माजी जि.प. सदस्य भुरा आप्पा पाटील, नानासाहेब देशमुख (भडगाव), राजाराम सोनार, डॉ. सागर गरुड, डी.डी. पाटील, सौ. हिरा गिरवलकर, सौ. योजना पाटील, सचिन सोमवंशी, राजधर पांढरे, शिवव्याख्याते सुनील पाटील, शेख रसूल उस्मान, पत्रकार संदीप महाजन, प्रा. सी. एन. चौधरी, अनिल येवले, राजू खैरनार, शांताराम चौधरी, पोलीस निरीक्षक अशोक पवार, सचिन सानप आदी मान्यवर उपस्थित होते. या समारंभात अनेकांनी आपले मनोगत व्यक्त करत येरुळे यांच्या कर्तृत्वाचा गौरव केला. चंद्रकांत द्वासे, डॉ. विजयकुमार द्वासे, आदित्यराज येरुळे, सौ. अपूर्वा फास्के, सचिन सोमवंशी, राजधर पांढरे, निवृत्त प्राचार्य सुनील पाटील, पोलीस कॉन्स्टेबल राहुल सोनवणे, स्थानिक गुन्हे शाखेचे लक्ष्मण पाटील, ईश्वर पाटील, शेख रसूल उस्मान, पत्रकार संदीप महाजन, सुनील पाटील, राहुल सोनवणे आदींनी येरुळे यांच्याबद्दलच्या आपल्या भावना मांडत त्यांना भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी येरुळे यांच्या सुपुत्र आदित्यराज येरुळे व कन्या सौ. अपूर्वा फास्के यांनी आपल्या वडिलांच्या सेवेचा मागोवा घेत एक अनोखा आणि भावनिक सादरीकरण केले. महाराष्ट्र राज्याच्या नकाशात वडिलांनी सेवा बजावलेल्या ठिकाणांचा कल्पक उल्लेख करत ‘सद्रक्षणाय खलनिग्रहणाय’ या पोलीस खात्याच्या घोषवाक्यास अनुसरून त्यांची कार्यकिर्द उभी केली. याशिवाय वैष्णवी दातीर हिने धनंजय येरुळे यांचे सुंदर स्केच तयार करून त्यांना भेट दिले. या सर्व सादरीकरणांनी उपस्थितांचे मन भरून आले. विशेष आकर्षण ठरली ती एक हृदयस्पर्शी व्हिडीओ क्लिप, जी येरुळे दांपत्याच्या कर्तृत्वमय प्रवासावर आधारित होती. अपूर्वा फास्के आणि आदित्यराज येरुळे यांनी ती व्हिडीओ तयार करून उपस्थितांसमोर दाखवली. या व्हिडीओने उपस्थितांना भावनाविवश केले. या सोहळ्याला उत्तर देताना धनंजय येरुळे यांनी आपल्या सेवाजिवनाचा आढावा घेतला. उपनिरीक्षक पदापासून सुरुवात करून डीवायएसपी पदापर्यंतचा प्रवास त्यांनी सुस्पष्ट आणि मार्मिक शब्दांत मांडला. त्यांनी आपल्या नोकरीदरम्यान तपासलेल्या महत्त्वपूर्ण गुन्ह्यांचा, कडक निर्णयांचा, आणि तडफदार कामगिरीचा उल्लेख करून अनेक आठवणींना उजाळा दिला. त्यांनी आपल्या सहकाऱ्यांविषयी कृतज्ञता व्यक्त करत त्यांच्या सहकार्यामुळेच आपण यशस्वी सेवा करू शकलो असे नमूद केले. या सोहळ्याचे प्रास्ताविक पोलीस निरीक्षक अशोक पवार यांनी केले. प्रा. सी. एन. चौधरी व प्रा. शिवाजी शिंदे यांनी सुरेख सूत्रसंचालन केले. समारोपाप्रसंगी आदित्यराज येरुळे यांनी आपल्या भावनांना वाट मोकळी करून उपस्थितांप्रती आभार व्यक्त केले. राष्ट्रगीताने या समारंभाची सांगता झाली. या संपूर्ण सोहळ्याच्या यशस्वी आयोजनासाठी पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले. उत्साही मिरवणूक, शिस्तबद्ध कार्यक्रम, सन्मानाचे वातावरण, आणि भावनांनी भरलेली सादरीकरणे यांनी येरुळे यांच्या सेवानिवृत्ती समारंभाला संस्मरणीय बनवले. धनंजय येरुळे यांनी आपल्या सेवाजिवनात नेहमीच नियमप्रियता, कर्तव्यनिष्ठा, धैर्य, आणि माणुसकी या मूल्यांना जपले. त्यांच्या सेवानिवृत्तीने पोलीस दलातील एक अभ्यासू, शिस्तप्रिय, व कर्मठ अधिकारी निवृत्त झाला आहे, पण त्यांच्या कार्याची प्रेरणा अनेक पोलीस अधिकारी व नवतरुणांसाठी मार्गदर्शक ठरणार आहे.

छत्रीखाली विश्वासाचे छत्र: मराठे निलेश विनायक यांची सडेतोड उमेदवारी

Loading

पाचोरा – दि. पाचोरा पिपल्स को-ऑप बँक लि. पाचोरा ही बँक गेली अनेक दशके पाचोऱ्यासह संपूर्ण तालुक्याच्या आर्थिक घडामोडींमध्ये आपले महत्त्वपूर्ण योगदान देत आहे. सहकारी बँकिंगच्या माध्यमातून ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळ देणाऱ्या या संस्थेच्या पंचवार्षिक निवडणुकीकडे संपूर्ण सभासद वर्गाचे लक्ष लागलेले आहे. या निवडणुकीत मराठे निलेश विनायक हे सर्वसाधारण मतदार संघातून उमेदवारी करीत असून त्यांनी अत्यंत स्पष्ट, ठाम आणि ज्वलंत मुद्यांच्या आधारे ही उमेदवारी सादर केली आहे. मराठे निलेश विनायक यांनी त्यांच्या उमेदवारीची घोषणा करताच, अनेक सर्वसामान्य सभासदांमध्ये आशेचा किरण निर्माण झाला आहे. त्यांनी आपल्या जाहीर विनंती पत्रकात निवडणुकीच्या निमित्ताने कोणत्या मुद्यांसाठी ही लढाई आहे, हे परखडपणे आणि निर्भीडपणे मांडले आहे. त्यांनी सांगितले आहे की, ही निवडणूक केवळ संचालकपदासाठीची लढाई नसून ही संघर्षाची निवडणूक आहे – विशिष्ट मक्तेदारीविरुद्ध लोकशाहीचा लढा आहे, आणि ही निवडणूक म्हणजे सभासदांच्या न्यायहक्कासाठीचा यज्ञ आहे. त्यांच्या उमेदवारीमागील प्रमुख उद्दिष्टे ही सभासदांच्या हितासाठी आणि बँकेच्या कायदेशीर, पारदर्शक आणि प्रामाणिक कारभारासाठीच केंद्रित आहेत. त्यांनी स्पष्ट शब्दांत मांडले आहे की – “मी केवळ संचालक होण्यासाठी उभा नाही आहे. मी सभासदांचा खरा प्रतिनिधी बनून त्यांच्या प्रश्नांना न्याय मिळवून देण्यासाठी उभा आहे.” त्यांनी जाहीरनामा प्रसिद्ध करताना जो मुद्देसूद आढावा मांडला आहे, तो पाहता त्यांच्या या लढाईमध्ये वैयक्तिक महत्वाकांक्षा नसून, बँकेतील दीर्घकालीन अकार्यक्षमता, स्वार्थी कारभार, काही विशिष्ट लोकांची हुकूमशाही वृत्ती आणि सर्वसामान्य सभासदांच्या हक्कांचे सातत्याने होणारे उल्लंघन – याविरुद्धचा संघर्ष आहे. बँकेच्या पारदर्शक आणि स्वच्छ कारभारासाठी : बँकेच्या आर्थिक व्यवहारांमध्ये पारदर्शकता असणे गरजेचे आहे. संचालक मंडळाने घेतलेले निर्णय हे सर्व सभासदांच्या भल्यासाठी असावेत, कोणत्याही प्रकारचा भेदभाव किंवा स्वार्थ त्यामध्ये नको, ही त्यांची भूमिका स्पष्ट आहे. एकाधिकारशाही संपवण्यासाठी : सध्याच्या व्यवस्थेत काही विशिष्ट लोकांनी बँकेच्या निर्णयप्रक्रियेवर अघोषित मक्तेदारी निर्माण केली आहे. सभासदांचा आवाज, प्रश्न आणि सहभाग दुर्लक्षित केला जातो. हे वातावरण बदलणे, हीच त्यांची लढाई. गरजू आणि प्रामाणिक सभासदांच्या हक्कांसाठी : बँक ही सर्वसामान्य सभासदांची आहे. प्रामाणिक व्यवसाय करणाऱ्या, कष्टकरी वर्गासाठी बँक मदतीचा हात बनावी, हे त्यांचे प्रमुख उद्दिष्ट आहे. लोकशाही मार्गाने मतदानाचा हक्क मिळवून देणारा लढा : बँकेने ५१/- रुपये भागधारक सभासदांचा मतदानाचा हक्क बेकायदेशीरपणे काढून घेतला हा हक्क पुन्हा मिळवण्यासाठी त्यांनी केलेला लढा आहे हीच त्यांची लोकशाहीतील श्रद्धा आणि जिद्द दर्शवते. कर्जवाटप प्रक्रियेतील सुसूत्रता : कोणतेही कर्ज हे केवळ ‘ओळखी’च्या आधारावर न देता, सर्व संचालकांच्या संमतीने आणि कायदेशीर प्रक्रियेनुसार दिले जावे, ही मागणी त्यांनी पुढे केली आहे. सभासदांची बाजू घेणारा खंबीर आवाज : “बदाम काजू खाऊन मान डोलवणारे नव्हे, तर सभासदांच्या हक्कासाठी न्यायालयापर्यंतही लढणारा आवाज व्हायचं आहे” – हे त्यांचे विधान त्यांच्या ठाम भूमिकेचा पुरावा आहे. बेकायदेशीर खर्च वसुली थांबवण्याचा निर्धार : विविध नावांनी होणारे अनावश्यक खर्च, दडपशाहीने वसुली, सभासदांची मुस्कटदाबी – हे सारे थांबवण्याचा आणि कारभारात शिस्त व शुद्धता आणण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे. मराठे निलेश विनायक यांच्या या भूमिकेमुळे बँकेतील नवा बदल, नवसंस्कार आणि नवदृष्टीकोन निर्माण होईल, अशी अपेक्षा मोठ्या संख्येने सभासद व्यक्त करत आहेत. त्यांनी जाहीर केले आहे की, “सभासदांनी दिलेला एक मत म्हणजे केवळ विजयी करणारा आकडा नव्हे, तर बदल घडवणारी क्रांती आहे.” सभासदांच्या हक्कांच्या संरक्षणासाठी, पारदर्शी कारभारासाठी आणि संस्थेच्या मूळ उद्देशांना नवसंजीवनी देण्यासाठी ते सज्ज आहेत. या निवडणुकीसाठी त्यांचे प्रातिनिधिक चिन्ह आहे ‘छत्री’ – ही छत्री म्हणजे विश्वासाचे आणि न्यायाचे प्रतीक आहे. त्यांनी विनंती केली आहे की, “दि. १३ जुलै २०२५, रविवार रोजी सकाळी ८ ते सायं. ४ या वेळेत मतदान करून छत्री या चिन्हासमोर फुलीचा शिक्का मारून मला विजयी करावे.” त्यांची ही विनंती कळकळीची आणि सभासदाभिमुख आहे. यामध्ये अभिमान, कृतज्ञता आणि बांधिलकीचे भाव दडले आहेत. त्यांनी आपला क्रमांक – अ.क्र. ८, आणि संपूर्ण नाव – मराठे निलेश विनायक (सर्वसामान्य प्रतिनिधी), स्पष्टपणे दिले आहे. निवडणूक माहिती – मतदान दिनांक : दि. १३/०७/२०२५ रविवार, वेळ : सकाळी ८ ते सायं. ४ वा., उमेदवार क्रमांक : ८, प्रतिनिधी प्रकार : सर्वसामान्य, निवडणूक चिन्ह : छत्री. सभासद बांधवांनो, आपल्या मताचे सामर्थ्य हे केवळ आकड्यात नाही, तर सत्य, न्याय आणि समानतेसाठी असलेल्या जिद्दीत असते. आपण प्रत्येकाने हा निर्णय डोळसपणे, विचारपूर्वक आणि सत्याचा पाठपुरावा करणाऱ्याच्या बाजूने दिल्यास ही निवडणूक नवा इतिहास घडवू शकते. “आपला एक मत म्हणजे बँकेच्या कारभारात नवा सूर, नवा प्रकाश आणि नव्या आशेचा उदय” – हे लक्षात ठेवून मराठे निलेश विनायक यांना आपल्या बहुमोल मताने विजयी करा, हीच कळकळीची विनंती.

“डॉ. कादंबरी : स्वप्नपूर्तीची पहिली पायरी, स्वातंत्र्याच्या मुळांशी जोडलेली सेवा!”

Loading

आजचा दिवस म्हणजे “डॉक्टर डे” — एक असाच दिवस जो समाजासाठी झटणाऱ्या, रात्रंदिवस न थकता सेवा देणाऱ्या वैद्यकीय क्षेत्रातील प्रत्येक व्यक्तीला अभिमानाने वंदन करण्याचा. परंतु यंदाचा डॉक्टर डे आमच्या कुटुंबासाठी केवळ एक सण नाही, तर पिढ्यानपिढ्या चालत आलेल्या कर्तव्यभावनेच्या परंपरेला नवा श्वास देणारा, नवे स्वप्न साकारलेला दिवस आहे.
कारण आज मी पहिल्यांदा माझ्या कन्येला – डॉ. कादंबरी ला “डॉक्टर डे” च्या शुभेच्छा देतो आहे… तीही तिच्या डॉक्टर होण्याच्या पहिल्याच वर्षी. दोन महिन्यांपूर्वीच तिने फिजिओथेरपी पदवी प्राप्त केली. तिच्या यशाचे क्षण आम्हा सर्वांना आनंदाश्रू देणारे होते, पण आज डॉक्टर डे निमित्ताने ती ‘आपली लेक डॉक्टर झाली आहे’ हे शब्द उच्चारताना ज्या भावना मनात उसळतात, त्या शब्दांत व्यक्त करणे फार कठीण आहे.
“हाती घेतला ज्ञानदीप, हृदयात सेवा भाव,
फिजिओथेरपीतून मिळवली आयुष्याची वाटचाल नव्याने.
डॉ. कादंबरीच्या पदवीला वंदन,”
स्वातंत्र्यसैनिकांच्या घरात जन्मलेली ती आज आरोग्यसेवेची शपथ घेते अभिमानाने…
डॉ. कादंबरी केवळ एका वैद्यकीय पदवीधारक मुलीचं नाव नाही, तर ती आमच्या पिढ्यांची शान आहे. तिच्या आजोबांनी ह्या देशासाठी लढा दिला — स्वातंत्र्यसैनिक म्हणून त्यांनी जीवन झिजवलं. आज त्याच घरातील एक कन्या आरोग्याच्या क्षेत्रात प्रवेश करून समाजसेवेच्या वाटेवर निघाली आहे. हा फक्त आमच्या कुटुंबाचा नव्हे, तर आमच्या मूळ स्वातंत्र्यप्रेरणेचाही सन्मान आहे.
तिने घेतलेली फिजिओथेरपी ही पदवी ही केवळ शिक्षण नव्हे, तर रुग्णांच्या वेदनांवर प्रेमाने, स्पर्शाने आणि समजून घेण्याने उपचार करण्याची एक नाजूक पण अत्यंत गरजेची दिशा आहे. डॉक्टर म्हणजे औषधांचा उपयोग करणारा व्यक्ती इतकंच मर्यादित स्वरूप न राहता, ती आता माणसांच्या हालचालींमध्ये आशा फुंकणारी एक जाणती ‘हेलिंग आर्टिस्ट’ झाली आहे.
ती आता पदव्युत्तर शिक्षण घेण्याच्या तयारीत आहे. शिक्षणाची ही वाट अर्थातच सोपी नाही. पण ती तिच्या यशाच्या पहिल्या टप्प्यावर न थांबता अजून पुढे जाण्याचा संकल्प करत आहे, हे आम्हाला अधिक आनंददायी वाटतंय. तिचं हे ध्येय, तिचा चिकाटीचा स्वभाव आणि तिचा आतला सेवाभाव पाहता तिचा प्रवास नक्कीच यशस्वी होईल याची खात्री आहे.
तिच्या निकालाच्या दिवशी तिने तिच्या आजोबांचा फोटो हळूच बघितला होता… डोळ्यात पाणी होतं, पण चेहऱ्यावर अभिमान. कारण ती ज्या वाटेवर चालली आहे ती वाट त्याच मातीची आहे — समाजासाठी काही करून दाखवण्याची!
“जगाच्या आरोग्याला हात घालणारी ती,
पण हृदयात आजोबांच्या लढ्याची ज्वाळा.
ज्ञानाने पावलं टाकणारी, सेवेची दिशा घेणारी,
फिजिओथेरपीच्या पायऱ्यांवरून स्वातंत्र्याची शिकवण घेणारी…”
आज माझ्या लेकीला पहिल्यांदाच डॉक्टर डे च्या शुभेच्छा देताना, मला आठवतं तिचं ते लहान वय… हातात डॉक्टर सेट घेऊन रुग्ण ‘उपचार’ करणारी ती चिमुकली, आज खऱ्या अर्थाने डॉ. कादंबरी झाली आहे. तिच्या हातात आता उपचाराची ताकद आहे आणि हृदयात सेवाभावाचं तेज आहे.
ती डॉक्टर झाली हे केवळ तिचं यश नाही, तर माझंही यश आहे — एक बाप म्हणून, एक मार्गदर्शक म्हणून, आणि एक विश्वास ठेवणारा म्हणून. तिच्या आईने दिलेला आधार, तिला प्रोत्साहन देणाऱ्या शिक्षकांची मोलाची साथ, आणि तिनं स्वतःने घेतलेली मेहनत हे सगळं आठवतं आणि डोळ्यांत पाणी येतं.
तिचा पुढील प्रवास समाजासाठी अत्यंत मोलाचा असणार आहे. शरीराने अपंग, वेदनांनी ग्रासलेले रुग्ण, अपघातानंतर हालचाली गमावलेली माणसं, आणि वृद्धत्वाने हतबल झालेले जीव — यांना ती पुन्हा चालायला शिकवेल, पुन्हा आशेने जगायला शिकवेल. ही तिची नवी भूमिका आहे — अत्यंत महत्वाची, संवेदनशील आणि माणुसकीने भरलेली.
ती डॉक्टर आहे — पण औषध नाही, तर स्पर्श, स्नेह, आणि सेवा तिचं बळ आहे.
“नव्या पिढीचं नवं स्वप्न, पण मूळ तीच जळते मशाल,
सेवेच्या व्रताला दिले वंशाचे मोलाचं भान.
डॉ. कादंबरी — तुझा प्रवास असो यशोशिखरांकडे,
तू झळको सेवा-सन्मानात, स्वातंत्र्याच्या वारशासह!”
आजचा डॉक्टर डे आमच्यासाठी खास आहे कारण आम्ही केवळ डॉक्टरांना शुभेच्छा देत नाही, तर आपल्या घरातील ‘नवीन डॉक्टर’ ला, डॉ. कादंबरी ला अभिमानाने वंदन करत आहोत. तिच्या शिक्षणाच्या पुढच्या टप्प्याला आमच्याकडून शुभेच्छा आणि तिच्या हृदयातील सेवाभावाला आमचं प्रेम आणि आशीर्वाद.
स्वातंत्र्यसैनिकांच्या घराण्यात जन्मलेली, कुटुंबाच्या कष्टांवर उभी राहिलेली, आणि समाजाच्या आरोग्याच्या वाटेवर सेवा करणारी ही कन्या — तिचा आजचा दिवस, तिचं यश, हे सर्व आपल्या संस्कृतीच्या आणि कुटुंबाच्या सन्मानाचं प्रतीक आहे.
डॉ. कादंबरी, तुला डॉक्टर डे च्या मनःपूर्वक शुभेच्छा!
तू झळकशील ज्ञान, सेवा आणि संस्कारांनी उजळलेल्या वाटेवर…
एक अभिमानी वडील, आपल्या कन्येच्या डॉक्टर होण्याच्या प्रवासाच्या क्षणांना हृदयातून अनुभवत..

स्वादिष्ट शाकाहारी भोजनाचा नवा ठेवा – ‘स्वाDish Veg’ चे भव्य उद्घाटन सोहळा ३ जुलै रोजी

Loading

पाचोरा – शहराच्या खाद्यसंस्कृतीत एक नवा आणि अनोखा अध्याय जोडणारा उपक्रम ‘स्वाDish Veg’ शाकाहारी रेस्टॉरंटच्या माध्यमातून सुरु होत आहे. बनोटीवाला कुटुंबियांच्या पुढाकारातून भडगाव रोडवरील बनोटीवाला फार्म हाऊस येथे नव्याने उभारण्यात आलेल्या या शाकाहारी भोजनगृहाचे उद्घाटन येत्या गुरुवार, दिनांक ३ जुलै २०२५ रोजी सायंकाळी ५ ते १० या वेळेत एका धार्मिक आणि स्नेहमिलनाच्या सोहळ्यात संपन्न होणार आहे. या खास प्रसंगी भाविक वातावरणात ‘श्री सत्यनारायण महापूजा’ आयोजित करण्यात आली आहे. पारंपरिक धार्मिक विधी, भक्तिपूर्वक पूजन आणि प्रसाद वितरणाद्वारे या नव्या उपक्रमाची शुभ सुरुवात करण्यात येणार आहे. या मंगल प्रसंगी उपस्थित राहून शुभाशीर्वाद द्यावेत, असा सादर आग्रह आयोजकांनी केला आहे. भडगाव रोड वरील बनोटीवाला फार्म हाऊस लागत पाचोरा शहराच्या मध्यवर्ती भागात असूनही निसर्गाच्या सान्निध्यात, प्रशस्त व सुशोभित परिसरात उभारलेले हे रेस्टॉरंट हे केवळ एक भोजनगृह नसून एक अनुभव केंद्र असेल. इथे स्वच्छता, पारंपरिक चव, आधुनिकतेचा स्पर्श, आणि ग्राहकसेवा या चारही गोष्टींचे अनोखे मिश्रण अनुभवायला मिळणार आहे. ‘स्वाDish Veg’ मध्ये उत्तम प्रतीचे विविध प्रकारचे शाकाहारी पदार्थ मिळणार असून, पारंपरिक महाराष्ट्रीयन थाळीपासून ते पंजाबी, साउथ इंडियन, चायनीज व इतर लोकप्रिय शाकाहारी खाद्यपदार्थांची रेलचेल असेल. स्वादात नव्हेच, तर आरोग्यदृष्ट्याही उत्कृष्ट अशा भोजनाची खात्री येथे दिली जाणार आहे.
‘स्वाDish Veg’ ही केवळ व्यवसायिक संकल्पना नसून बनोटीवाला कुटुंबाची अनेक वर्षांची स्वप्नपूर्ती आहे. पारंपरिक आदरातिथ्य, शुद्धता आणि संस्कृती या मूल्यांच्या अधिष्ठानावर उभे असलेले हे रेस्टॉरंट आजच्या ग्राहकांच्या अपेक्षा पूर्ण करत नव्या पिढीला स्वादाचा नवा अनुभव देण्याच्या उद्देशाने उभारले आहे. ‘स्वाDish’ या नावात ‘स्वाद’ आणि ‘डिश’ या दोन महत्त्वपूर्ण कल्पनांचा संगम आहे – ज्यामध्ये पारंपरिक चव आणि आधुनिक रुचिपरिपूर्णपणा यांचा मेळ साधला गेला आहे.
या उद्घाटनाच्या निमित्ताने आयोजकांनी ‘श्री सत्यनारायण महापूजा’ आयोजित करून एक आध्यात्मिक आणि मंगल वातावरण तयार केले आहे. दैनंदिन धकाधकीच्या जीवनात शांतता, समाधान आणि सकारात्मक ऊर्जा मिळवण्यासाठी अशा पूजांचे महत्त्व मोठे आहे. या पूजेसाठी पंचामृत, नैवेद्य, फलाहार आणि आरतीचा समावेश असणार आहे. भक्तिपूर्ण गजरात आणि मंत्रोच्चारांमध्ये एकत्र येऊन नव्या प्रवासाची सुरूवात करणं हे केवळ धार्मिक विधी नव्हे तर एक सामाजिक ऐक्याचं प्रतीकदेखील ठरेल.
या प्रसंगी आपल्या उपस्थितीने कार्यक्रमाची शोभा वाढवावी, आयोजकांना आपल्या शुभेच्छांचा उत्स्फूर्त पाठिंबा द्यावा, आणि एकत्र येऊन नव्या रेस्टॉरंटच्या यशासाठी प्रार्थना करावी, अशी विनंती करण्यात आली आहे. समाजातील विविध क्षेत्रातील मान्यवर, कुटुंबमित्र, व्यावसायिक, पत्रकार, आणि सामाजिक संस्था या सोहळ्यास उपस्थित राहणार असून, एक प्रेरणादायी आणि मनःपूर्वक आठवण बनणार आहे.या नव्या उपक्रमामागे असलेली संकल्पना, कल्पकता आणि मेहनत ही कांतीलालशेठ, जीवनभाऊ, मनोजभाऊ, प्रवेश, मितेश, पूर्वश श्रीश्रीमाळ या बनोटीवाला कुटुंबियांची आहे. सामाजिक प्रतिष्ठा, व्यावसायिक अनुभव आणि सद्भावना यांचे मूर्तिमंत प्रतीक असलेले हे कुटुंब गेली अनेक दशके ‘बनोटीवाला ज्वेलर्स’च्या माध्यमातून पाचोरकरांच्या मनात घर करून आहे. आता ‘स्वाDish Veg’ या नावाने ते अन्नसंस्कृतीच्या क्षेत्रात एक नवा अध्याय लिहिणार आहेत. ‘बनोटीवाला ज्वेलर्स’ ही गांधी रोड, पाचोरा येथील एक सुप्रसिद्ध आणि विश्वासार्ह संस्था असून, गेली अनेक वर्षे दर्जेदार दागिने आणि विश्वासार्ह सेवा देणाऱ्या या संस्थेचा नव्या व्यवसाय क्षेत्रातील प्रवेश ही एक स्वागतार्ह बाब ठरते. ग्राहकांचा विश्वास हीच खरी ताकद मानणाऱ्या या फर्मचा ‘स्वाDish Veg’ हा पुढचा पायरी आहे. पाचोरा शहरात उत्तम शाकाहारी जेवणासाठी एक नवे, सुगंधित, स्वच्छ आणि आधुनिक स्थान निर्माण होत आहे. ‘स्वाDish Veg’ हा उपक्रम केवळ एक व्यवसाय नसून, ग्राहकांचे समाधान आणि संस्कृतीशी नाते जपणारा सेवाभावाचा एक प्रयत्न आहे. आपल्या उपस्थितीने या प्रवासात सहभागी व्हा, शुभेच्छा द्या, आणि स्वादाच्या या नव्या प्रवासाचा भाग व्हा – हीच आयोजकांची सादर नम्र विनंती!

सामाजिक, वैद्यकीय क्षेत्रातील ज्येष्ठ व्यक्तिमत्व बाळासाहेब पुजारी यांचे निधन

Loading

पाचोरा – शहरातील ज्येष्ठ समाजसेवक, वैद्यकीय क्षेत्रातील एक नामवंत व्यक्तिमत्व, तसेच धार्मिक आणि सामाजिक संस्थांशी निगडीत असलेले स्व. कै. काकासाहेब बाळासाहेब चिंतामण पुजारी यांचे आज दिनांक 1 जुलै 2025 रोजी पहाटे 5.30 वाजता दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनाने पाचोरा शहरात हळहळ व्यक्त होत असून विविध क्षेत्रांतून शोकसंवेदना व्यक्त करण्यात येत आहेत. कै. काकासाहेब बाळासाहेब पुजारी हे एक सामाजिक जाणिवा असलेले आणि मनापासून लोकांच्या मदतीस धावून जाणारे व्यक्तिमत्व होते. ते यापूर्वी जामनेर रोडवरील मिरॅकल मेडिकलचे संचालक तसेच पाचोरा मेडिकल असोसिएशनचे माजी अध्यक्ष म्हणून कार्यरत होते. मेडीकल व्यवसायासोबत त्यांनी सामाजिक कार्यात देखील आपली ठसा उमटवलेला आहे.
त्यांचे सुपुत्र प्रशांत पुजारी हे देखील पाचोरा शहरात अत्यंत सक्रिय असून, श्री आनंद वृद्धाश्रमाचे माजी अध्यक्ष, पाचोरा मेडिकल असोसिएशनचे माजी अध्यक्ष आणि श्री गुरुदत्त मंदिराचे संचालक (पूर्ती फॅमिली शॉप, भडगाव रोड) म्हणून कार्यरत आहेत. आपल्या वडिलांच्या प्रेरणेने त्यांनी समाजसेवेसाठी नेहमी पुढाकार घेतला आहे.
कै.काकासाहेब बाळासाहेब पुजारी यांनी आपल्या आयुष्यात वैद्यकीय व्यवसायाला केवळ उपजीविकेचे साधन न मानता, तो एक सेवाभाव समजून रुग्णसेवेसाठी स्वतःला वाहून घेतले होते. गरजू रुग्णांना औषधोपचारात मदत करणे, त्यांना योग्य मार्गदर्शन करणे, तसेच वैद्यकीय व्यवसायात पारदर्शकता ठेवून लोकांचा विश्वास मिळवणे, हे त्यांच्या कार्याचे मूळ तत्त्व होते.
ते केवळ मेडिकल क्षेत्रातच नव्हे तर धार्मिक आणि आध्यात्मिक कार्यातही सक्रिय होते. पाचोऱ्यातील श्री गुरुदत्त मंदिर हे पवित्र स्थळ त्यांच्या सहकार्याने अधिक सुसज्ज आणि सुव्यवस्थित करण्यात आले. मंदिर समितीच्या निर्णय प्रक्रियेत त्यांनी नेहमीच सकारात्मक भूमिका घेतली होती. भक्तांच्या सोयीसाठी विविध उपक्रम राबविण्यात त्यांचा मोलाचा वाटा राहिला.
तसेच श्री आनंद वृद्धाश्रम या संस्थेशी त्यांचे कुटुंब गेली अनेक वर्षे निगडीत असून वृद्धांसाठी सेवाभावाने काम करण्याची परंपरा त्यांनी जपली. या वृद्धाश्रमातील वृद्धांना औषध, वैद्यकीय तपासणी, आणि गरजेच्या सेवा पुरवण्यात ते नेहमी पुढे होते.
आज त्यांचे निधन झाल्याने पाचोरा शहराच्या मेडीकल, धार्मिक व सामाजिक वर्तुळात एक मोठी पोकळी निर्माण झाली आहे. अशा समाजाभिमुख व्यक्तीचे आयुष्य हे अनेकांसाठी प्रेरणादायी आहे.त्यांची अंत्ययात्रा उद्या दिनांक 2 जुलै 2025 रोजी बुधवार सकाळी 8.30 वाजता त्यांचे राहते घर, दत्त मंदिर, पुजारी नगर, भडगाव रोड, पाचोरा येथून निघणार आहे.
त्यांच्या निधनाचे वृत्त समजताच विविध संस्थांचे पदाधिकारी, वैद्यकीय व्यवसायातील सहकारी, धार्मिक मंडळी, सामाजिक कार्यकर्ते, व्यापारी वर्ग तसेच सर्वसामान्य नागरिक मोठ्या संख्येने त्यांच्या राहत्या घरी शोक व्यक्त करण्यासाठी दाखल झाले.शहरातील अनेक ज्येष्ठांनी त्यांच्या आठवणी सांगताना भावूक होत ‘बाळासाहेब म्हणजे शांत, संयमी आणि अंतर्बोध असलेली व्यक्ती होती. त्यांनी नेहमीच इतरांचे दुःख समजून घेत, मदतीचा हात पुढे केला. त्यांच्या जाण्याने शहर एक चांगला मार्गदर्शक गमावला आहे,’ असे मत व्यक्त केले.
शोकसंदेशात पाचोरा मेडिकल असोसिएशन, श्री आनंद वृद्धाश्रम, गुरुदत्त मंदिर समिती, पाचोरा व्यापारी असोसिएशन, तसेच शहरातील विविध मंडळांनी आपल्या भावना व्यक्त करत त्यांच्या योगदानाला अभिवादन केले.
पुजारी कुटुंबियांनी आपल्या दुःखावर संयम ठेवत येणाऱ्या सर्व नातेवाईक व हितचिंतकांचे योग्य रीतीने स्वागत केले असून, अंत्यविधीच्या सर्व तयारी शांततेत आणि शिस्तबद्ध रितीने पार पाडण्यात येणार असल्याची माहिती परिवारातर्फे देण्यात आली.त्यांच्या पश्चात एक मुलगा , सुन पाच मुली , जावई नातवंडे असा मोठा परिवार आहे. संपूर्ण कुटुंब आपल्या वडिलांच्या कार्याला पुढे नेत असून, ‘समाजासाठी कार्यरत राहणे हीच खरी श्रद्धांजली’ पुजारी परिवाराची होय

सायबर फसवणुकीपासून सावध राहा : आधार कार्डचा स्वैर वापर अत्यंत धोकादायक – डॉ. धनंजय देशपांडे

Loading

पाचोरा : “सायबर क्राईम ही भारतासमोर उभी ठाकलेली एक गंभीर आणि वेगाने वाढणारी समस्या असून, नागरिकांच्या बँक खात्यांपासून ते त्यांच्या ओळखीच्या तपशीलांपर्यंत सर्व काही धोक्यात आहे. विशेषतः आधार कार्डाचा स्वैर आणि अज्ञानतावश होत असलेला वापर सायबर फसवणुकीला आमंत्रण देणारा ठरत आहे. त्यामुळे जागरूकता ही काळाची गरज आहे. सायबर फसवणुकीच्या कोणत्याही

प्रकाराला बळी पडल्यास, 1930 या हेल्पलाईन क्रमांकावर अर्ध्या तासाच्या आत संपर्क साधणे हा सर्वात प्रभावी आणि तात्काळ उपचार ठरतो,” असे मार्गदर्शन नामवंत सायबर सुरक्षा तज्ज्ञ डॉ. धनंजय देशपांडे यांनी पाचोऱ्यात केले. रविवार, दिनांक 29 जून रोजी सकाळी 10 वाजता जैन पाठशाळा सभागृह पाचोरा येथे ‘सायबर क्राईम : सावधगिरी आणि प्रतिबंध’ या विषयावर एक जनजागृतीपर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. या उपक्रमाचे आयोजन रोटरी क्लब पाचोरा-भडगाव, जैन पाठशाळा पाचोरा यांच्या संयुक्त विद्यमाने आणि पाचोरा पोलीस ठाण्याच्या सहकार्याने करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रोटरी क्लबचे अध्यक्ष डॉ. पवनसिंग पाटील होते. व्यासपीठावर रोटरी क्लबचे सेक्रेटरी डॉ. शिवाजी शिंदे, जैन पाठशाळेचे अध्यक्ष प्रफुल्ल शेठ संघवी, पोलीस निरीक्षक अशोक पवार, सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय निकम आणि डॉ. मुकेश तेली हे मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन आणि मान्यवरांच्या स्वागताने झाली. रोटरी क्लबचे सेक्रेटरी डॉ. शिवाजी शिंदे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक करत या उपक्रमामागील उद्दिष्ट विशद केले. त्यानंतर पोलीस निरीक्षक अशोक पवार यांनी उपस्थित नागरिकांना सायबर फसवणुकीपासून सावध राहण्याचे आवाहन करताना सांगितले की, “सायबर गुन्हेगारांनी आता अत्याधुनिक साधनांचा वापर करून विविध क्लृप्त्या वापरण्याचा धोका वाढवला आहे. नागरिकांनी कोणत्याही अनोळखी लिंकवर क्लिक करू नये, आधार किंवा बँक तपशील कोणालाही सहजपणे देऊ नये.” कार्यक्रमाचा प्रमुख आकर्षण ठरलेले डॉ. धनंजय देशपांडे यांचे दोन तासांचे सखोल आणि प्रातिनिधिक व्याख्यान हे उपस्थित श्रोत्यांसाठी जागृतीचे एक सशक्त माध्यम ठरले. त्यांनी आपल्या सखोल अभ्यासातून आणि अनुभवातून सायबर गुन्हेगारीचे अनेक पैलू उलगडून दाखवले
डॉ. देशपांडे यांनी श्रोत्यांना सायबर फसवणुकीचे अनेक प्रकार दाखवून दिले. उदाहरणार्थ – अंत्यसंस्कार सेवा पुरवणाऱ्या बनावट ऑनलाइन लिंकद्वारे फसवणूक, डिजिटल अरेस्टच्या नावाखाली पैसे उकळणे, भावनिक व आर्थिक पद्धतीने पालकांची फसवणूक, “चुकून पैसे जमा झाले” म्हणून परत पाठवण्याची विनंती, हनी ट्रॅपच्या माध्यमातून पुरुषांची आर्थिक फसवणूक, एटीएम वापरताना सुरक्षेच्या उपाययोजना न पाळणे, पार्सल वा फॉरेन करन्सीच्या नावाखाली घातलेले सापळे, घर बंद असल्याने पार्सल परत गेल्याचा बनावट मेसेज आणि त्यातील स्कॅन कोडद्वारे चोरी, सरकारी नोकरीच्या खोट्या जाहिराती आणि वेबसाईट्स. या सर्व प्रकारांमध्ये नागरिकांचे बँक खाते, वैयक्तिक माहिती, मोबाईल अ‍ॅक्सेस आणि आर्थिक व्यवहार पूर्णपणे धोक्यात येऊ शकतात. आधार कार्डाचा वापर सहजतेने आणि तपासणी न करता केल्यामुळे अनेकांना आर्थिक फसवणूक सहन करावी लागत असल्याचे त्यांनी सांगितले.
डॉ. देशपांडे यांनी फसवणुकीपासून वाचण्यासाठी काही महत्त्वाचे आणि व्यवहार्य उपाय सुचवले, त्यात खाजगी कुटुंबासाठी वेगळा मोबाईल नंबर आणि ईमेल आय.डी., आणि आर्थिक व्यवहार/कार्यक्षेत्रासाठी वेगळा वापरणे, सोशल मीडियावर आपल्या पर्यटनाची माहिती, फोटो वा स्टेटस लगेच पोस्ट न करता थांबून विचार करणे, आधार कार्डाचा वापर आवश्यकतेपुरता व कायदेशीर चौकशी झाल्यावरच करणे, मोबाईलवर येणाऱ्या कोणत्याही लिंकवर क्लिक करण्याआधी ती लिंक विश्वसनीय आहे का हे तपासणे, ओळखीचा नसलेला फोन नंबर, QR कोड, किंवा लिंकवर काहीही स्कॅन करण्यापूर्वी काळजी घेणे, गुन्हा झाल्यास अर्ध्या तासाच्या आत 1930 या सायबर हेल्पलाईन नंबरवर संपर्क साधणे हे आहे.
व्याख्यानानंतर सुमारे एक तास खुले प्रश्नोत्तर सत्र घेण्यात आले, ज्यामध्ये श्रोत्यांनी आपले वैयक्तिक प्रश्न विचारले. त्यावर डॉ. देशपांडे यांनी अत्यंत तज्ञपणे, उदाहरणासहित स्पष्टीकरण दिले. अनेकांनी आपल्या मोबाईलचा वापर, बँकिंग अ‍ॅप्सची सुरक्षितता, QR कोड, आणि स्कॅम कॉल याबाबत चिंता व्यक्त केली. यामध्ये अनेक तरुण, महिला व वयोवृद्ध यांचा सहभाग उत्साहपूर्ण होता.
कार्यक्रमाच्या शेवटी डॉ. मुकेश तेली यांनी उपस्थित मान्यवरांचे तसेच श्रोत्यांचे मन:पूर्वक आभार मानले. त्यांनी सांगितले की, डॉ. धनंजय देशपांडे यांचे आजचे सखोल मार्गदर्शन हे नागरिकांमध्ये एक नवा जागरूकतेचा प्रकाश पसरवणारे ठरले आहे. या उपक्रमात रोटरी क्लबचे अध्यक्ष डॉ. पवनसिंग पाटील, सेक्रेटरी डॉ. शिवाजी शिंदे, तसेच सर्व सदस्यांनी परिश्रम घेतले. पाचोरा डॉक्टर्स असोसिएशनच्या सदस्यांचे देखील महत्त्वाचे सहकार्य लाभले. पाचोरा पोलीस ठाण्याचे निरीक्षक अशोक पवार आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय निकम यांनी या उपक्रमात सक्रिय सहभाग घेतला. या कार्यक्रमातून पाचोऱ्यातील नागरिकांना हे स्पष्टपणे उमगले की सायबर फसवणूक ही केवळ एखाद्या शहरापुरती मर्यादित न राहता ती देशभरातील सर्वच स्तरांतील लोकांना आपले लक्ष्य बनवते. त्यामुळे प्रत्येकाने डिजिटल व्यवहार करताना जागरूक राहणे, आपली वैयक्तिक माहिती अज्ञात व्यक्तींना देणे टाळणे, आणि कोणत्याही प्रकारच्या शंका आल्यास तातडीने अधिकृत माध्यमांचा वापर करणे आवश्यक आहे. आजच्या डिजिटल युगात जिथे प्रत्येक गोष्ट मोबाईलवर अवलंबून आहे, तिथे ‘सावध रहा सुरक्षित रहा’ हे ब्रीद वाक्य लक्षात ठेवणे हेच सायबर गुन्ह्यांपासून वाचण्याचे मुख्य अस्त्र आहे.

दि पाचोरा पिपल्स बॅक निवडणुकीत एक जागा वगळता सर्व जागांवर बिनविरोध निवड; अतुल संघवी पॅनलचे वर्चस्व स्पष्ट

0

Loading

पाचोरा तालुक्यातील प्रतिष्ठेच्या समजल्या जाणाऱ्या दि पाचोरा पिपल्स बॅक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर 09 जागांसाठी 10 उमेदवार रिंगणात उतरले असून, या एका जागेसाठी निवडणूक होणार आहे तर उर्वरित सर्व जागांवर बिनविरोध निवड झाली आहे. या संपूर्ण निवडणूक प्रक्रियेत अतुल सुभाषचंद संघवी यांच्या नेतृत्वाखाली उभे राहिलेल्या पॅनलचा प्रभाव ठळकपणे जाणवला. सहकार क्षेत्रातील प्रभावशाली चेहरा असलेल्या संघवी यांच्या संघटन क्षमतेचा पुन्हा एकदा प्रत्यय यानिमित्ताने आला. या निवडणुकीत पॅनलतर्फे अतुल संघवी यांच्या नेतृत्वाखाली पुढील उमेदवार उभे होते – प्रशांत श्रीकिसन अग्रवाल, स्वप्निल सुधारकर पाटील, देवेंद्र रमनलाल कोटेचा, अनंतराव बाबुराव पाटील, राहुल अशोक संघवी, नरेंद्र उत्तमराव पाटील, पुखराज इंदरचंद डांगी आणि अविनाश वसंतराव कुडे. या पॅनलविरुद्ध निलेश विनायक मराठे यांनी एकटेच अर्ज भरल्याने एकाच जागेसाठी निवडणूक होणार असून उर्वरित 9 जागांसाठी ही निवडणूक बिनविरोध झाली आहे. विशेष म्हणजे ओबीसी, महिला, शाखा, एनटी व अनुसूचित जाती-जमाती राखीव जागांवर बिनविरोध निवड झालेली आहे. ओबीसी जागेवर भागवत एकनाथ महालपुर, शाखा जागेवर पवन राजमल अग्रवाल, महिला जागांवर सौ. संगिता शरद पाटे व सौ. संध्या प्रकाश पाटील, एनटी प्रवर्गातून विकास ज्ञानेश्वर वाघ आणि अनुसूचित जाती-जमाती प्रवर्गातून अविनाश मुकुंदराव भालेराव यांची बिनविरोध निवड झाली.
ही निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी स्थानिक राजकीय नेतृत्वाने मोठे प्रयत्न केले. यामध्ये राज्याचे माजी मंत्री व भाजपचे नेते ना. गिरीषभाऊ महाजन, आमदार किशोरआप्पा पाटील आणि माजी आमदार दिलीपभाऊ वाघ यांनी पुढाकार घेतला. विशेष बाब म्हणजे, आजच्या दिवशी विधानसभेचे पावसाळी अधिवेशन सुरु झाले आणि हे त्या दिवशी विधानसभागृहाचे तालीका अध्यक्षांचे जबाबदारीचे काम पाहत होते. मात्र तरीही त्यांनी विधानसभा सोडून थेट ए आर कार्यालयात ठाण मांडून निवडणूक बिनविरोध करण्यासाठी परिश्रम घेतले आणि प्रत्यक्ष माघारी प्रक्रियेत सहभाग घेतला. यावरून स्थानिक बँकेचे हित लक्षात घेऊन निवडणुकी बाबतची गांभीर्याची पातळी आणि इच्छाशक्ती स्पष्ट होते.
पॅनलविरुद्ध निलेश मराठे यांनी एकमेव अर्ज भरला होता. अखेरच्या क्षणापर्यंतही बिनविरोध निवडणुकीसाठी त्यांची माघार व्हावी यासाठी प्रयत्न सुरु होते. मात्र बॅंकेचे अंतर्गत धोरण आणि मराठे बंधूंच्या आंतरिक मतभेदांमुळे माघार घेणे शक्य झाले नाही. त्यामुळे सर्वसाधारण एकच जागा अपवाद ठरली.
याच पार्श्वभूमीवर आमदार किशोरआप्पा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली व पॅनलचे प्रमुख अतुलभाऊ संघवी यांच्या प्रमुख उपस्थितीत पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली. या परिषदेमध्ये बिनविरोध निवड झालेल्या सर्व उमेदवारांची अधिकृत घोषणा करण्यात आली. सर्वप्रथम ज्या उमेदवारांनी निस्वार्थपणे आपले अर्ज मागे घेतले आणि सहकार क्षेत्राच्या शांततेसाठी योगदान दिले, त्यांचे आभार मानण्यात आले. त्यानंतर अतुलभाऊ संघवी यांच्या नेतृत्वातील पॅनलमधील सर्व उमेदवारांना विजयी करण्याचा निर्धार पॅनल समर्थकांनी केला.
या बिनविरोध निवडीमुळे निवडणूक खर्च, तणाव, राजकीय दडपण यापासून संस्थेला आणि उमेदवारांना दिलासा मिळाला आहे. सहकार चळवळीत एकसंघपणे काम करण्याचा संदेश या प्रक्रियेतून देण्यात आला. राजकीय व सामाजिक स्तरावर मतभेद असूनही, सहकार क्षेत्रासाठी सर्वांनी एकत्र येत निर्णय घेणे ही आजच्या काळात दुर्मीळ बाब मानली जाते.
अतुल संघवी यांचे पॅनल म्हणजे स्थानिक सहकार क्षेत्रातील अनुभवी, अभ्यासू, आणि कार्यक्षम नेतृत्वाचे प्रतीक मानले जाते. या पॅनलने पूर्वी अनेक वेळा बँकेच्या विविध योजना आणि कार्यांमध्ये पारदर्शकता, कार्यक्षमता आणि ग्राहकाभिमुख धोरण राबवले आहे. त्यामुळेच स्थानिक सभासदांमध्ये या पॅनलविषयी विश्वासाची भावना निर्माण झाली आहे. राजकीय स्तरावर सत्ताधाऱ्यांपासून स्थानिक सामाजिक कार्यकर्त्यांपर्यंत अनेकांनी ही निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी सहकार्य केल्याचे दिसून आले. यामध्ये विशेषतः किशोरआप्पा पाटील यांचे योगदान उल्लेखनीय राहिले. त्यांनी केवळ समन्वयकाची भूमिका बजावली नाही, तर प्रत्येक उमेदवाराशी वैयक्तिक संवाद साधून परस्पर सहमती साधली. त्याचबरोबर गिरीषभाऊ महाजन आणि दिलीपभाऊ वाघ यांचे मार्गदर्शन महत्त्वाचे ठरले. बिनविरोध निवड झाल्यानंतर निवडून आलेल्या सर्व उमेदवारांचे समर्थकांनी जल्लोषात स्वागत केले. जय किरण प्रभाजी पतसंस्थेच्या मुख्य कार्यालयात माजी पदाधिकारी, कर्मचारी व सभासदांनी उपस्थित राहून निवड झालेल्या सदस्यांचे अभिनंदन केले.
एवढया मोठ्या प्रमाणावर बिनविरोध निवड ही केवळ एक औपचारिक प्रक्रिया नसून ती एका समंजसपणाची आणि सहकार चळवळीतील एकात्मतेची साक्ष आहे. मतभेद असले तरी ते संवादातून सोडवले गेले पाहिजेत, हे या निवडणुकीने सिद्ध करून दाखवले आहे. संपूर्ण निवडणूक प्रक्रियेत शांतता, संयम, आणि सहकार्य यांचे उत्तम उदाहरण पाहायला मिळाले. संस्थेच्या भविष्यातील वाटचालीसाठी हे एक सकारात्मक पाऊल ठरेल, अशी अपेक्षा सर्वत्र व्यक्त होत आहे.
येत्या काही दिवसांत निवडून आलेल्या संचालकांची अधिकृत बैठक होऊन अध्यक्ष, उपाध्यक्ष यांची निवड होणार आहे. या निवडणुकीत अतुल संघवी पॅनलने दाखवलेले नेतृत्व व व्यवस्थापन कौशल्य भविष्यात संस्थेच्या प्रगतीत निश्चितच उपयोगी ठरेल, असा विश्वास सभासद व्यक्त करत आहेत.

न्यायाच्या दारी समाजसेवेची नवी वाटचाल — सतीश पाटील यांची विधी सेवा समितीत ‘पी.एल.व्ही.’ म्हणून गौरवशाली नियुक्ती

0

Loading

रावेर  — महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण अंतर्गत विविध योजनांच्या माध्यमातून समाजातील शेवटच्या घटकांपर्यंत कायद्याची जाणीव पोहोचविण्याचे महत्त्वाचे कार्य सातत्याने सुरू आहे. या उपक्रमांचा प्रभावी अंमलबजावणी करणाऱ्या रावेर तालुका विधी सेवा समितीच्या कार्याचा विस्तार होत असताना समाजसेवेसाठी निस्वार्थपणे कार्य करणाऱ्या व्यक्तींची निवड समितीमार्फत केली जात असून, त्याचाच एक भाग म्हणून निंबोल (ता. रावेर) येथील सतीश श्रीराम पाटील उर्फ भाऊ यांची ‘पी.एल.व्ही.’ म्हणजेच प्यारा लीगल वॉलेंटियर म्हणून सन्मानपूर्वक नियुक्ती करण्यात आली आहे. या समितीचे अध्यक्ष दिवाणी न्यायाधीश तथा न्यायिक दंडाधिकारी रावेर असून सचिव पदावर तालुका कायदेशीर सेवा प्राधिकरण रावेरचे अधिकारी कार्यरत आहेत. समितीत वकील संघाचे सदस्य, पोलीस स्टेशन रावेर, रेल्वे स्टेशन, बस स्थानक, पोस्ट ऑफिस येथील अधिकारी सदस्य म्हणून समाविष्ट असून, विविध कायदेविषयक उपक्रम या समितीद्वारे राबवले जातात. या उपक्रमांत नालसा अंतर्गत ‘न्याय जागृत नागरिक अभियान’, ‘ग्रासरूट इन्फॉर्मेशन ट्रान्सपरन्सी इनिशिएटिव्ह’, शाळा व महाविद्यालयांमध्ये पॉक्सो कायद्याविषयी जनजागृती, दुर्गम व आदिवासी भागांतील कायदेविषयी शिबिरे, महिलांवरील घरगुती हिंसाचारविषयी जनजागृती आणि सुरक्षितता सत्र, बालकामगारांविरोधात विशेष मोहिमा, वंचित पार्श्वभूमीतील महिला व त्यांच्या कुटुंबातील कैद्यांसाठी समुपदेशन कार्यक्रम, तसेच गरीब व गरजू लोकांसाठी मोफत कायदेविषयक सेवा देण्याचे महत्त्वाचे कार्य या समितीद्वारे होत आहे. याशिवाय राष्ट्रीय लोक अदालतीच्या माध्यमातून विविध प्रलंबित प्रकरणांत सलोख्याने वाद मिटवण्याचे कार्यही या समितीमार्फत प्रभावीपणे पार पडते. २०१८ पासून केरहाळे बु. येथील सौ. वर्षा प्रवीण पाटील या ‘पी.एल.व्ही.’ म्हणून कार्यरत असून त्यांच्या कार्यशैलीचे सर्वत्र कौतुक होत आहे. याच धर्तीवर निंबोल येथील सतीश पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे. समाजसेवेतील त्यांचे सातत्यपूर्ण योगदान, विविध सामाजिक उपक्रमांमधील सक्रिय सहभाग, गरीब व वंचितांसाठी राबवलेले उपक्रम, महिलांसाठी केलेले कार्य, युवकांमध्ये कायद्याविषयी जागरूकता निर्माण करण्याचा प्रयत्न, आरोग्य, शिक्षण, व्यसनमुक्ती, पर्यावरण अशा विविध क्षेत्रातील त्यांचा सहभाग या सर्वांचा गौरव करत विधी सेवा समिती रावेर न्यायालयाने त्यांना या प्रतिष्ठित पदावर नियुक्त केले आहे. यासंदर्भात सतीश पाटील यांनी आपल्या भावना व्यक्त करताना ही नियुक्ती केवळ सन्मान नसून ती सामाजिक जबाबदारी आहे असे स्पष्ट केले. त्यांनी पुढे सांगितले की, यापुढे परिसरातील गोरगरीब, पीडित व गरजू लोकांना कायदेशीर सेवा व सल्ला देण्यासाठी आपले प्रयत्न अधिक जोमाने सुरू राहतील. न्यायव्यवस्थेच्या दारी शेवटच्या माणसापर्यंत सेवा पोहचवण्याचा आपला संकल्प आहे. याप्रसंगी तालुक्यातील विविध मान्यवर, सामाजिक कार्यकर्ते, वकिल मंडळी, पोलीस अधिकारी व ग्रामस्थांनी सतीश पाटील यांचे अभिनंदन करत त्यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या. समाजहितासाठी कार्य करत असताना अशा सन्माननीय व्यासपीठावर काम करण्याची संधी मिळाल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले असून आपण सर्वांच्या सहकार्याने आणि आशीर्वादाने हे कार्य सातत्याने करत राहणार असल्याचे त्यांनी नम्रपणे सांगितले.

आज दि 30/06/2025 सोमवार चे सर्व राशीचे भविष्य व शुभ अंक व रंग

0

Loading

मेष (Aries)
आज तुमचा आत्मविश्वास वाढेल. महत्त्वाचे निर्णय घ्यायला योग्य वेळ आहे. आर्थिक बाबतीत थोडी सावधगिरी आवश्यक. कौटुंबिक सौहार्द राहील. प्रवास यशस्वी ठरेल.
शुभ अंक: 3
शुभ रंग: तांबडा

वृषभ (Taurus)
कामात नवीन संधी मिळतील. मन प्रसन्न राहील पण खर्चावर नियंत्रण ठेवा. प्रिय व्यक्तीकडून आनंददायक बातमी मिळू शकते. आरोग्याकडे दुर्लक्ष नको.
शुभ अंक: 6
शुभ रंग: हिरवा

मिथुन (Gemini)
मनातील गोंधळ दूर होईल. संवादातून समस्या सुटतील. दैनंदिन कामांमध्ये अडथळे येतील पण संयम ठेवा. भाग्य साथ देईल.
शुभ अंक: 5
शुभ रंग: पिवळा

कर्क (Cancer)
आज एखादी गुंतवणूक फायदेशीर ठरेल. नात्यांमध्ये मोकळेपणा ठेवा. कामाच्या ठिकाणी थोडा तणाव जाणवेल. मानसिक स्थैर्य आवश्यक.
शुभ अंक: 2
शुभ रंग: पांढरा

सिंह (Leo)
आज तुमची कार्यक्षमता वाढेल. सामाजिक सन्मान मिळू शकतो. वरिष्ठांचे सहकार्य लाभेल. जोडीदाराशी मतभेद टाळावेत.
शुभ अंक: 1
शुभ रंग: केशरी

कन्या (Virgo)
कौतुकास पात्र व्हाल. आर्थिकदृष्ट्या फायदा होईल. घरगुती वातावरण आनंददायक. आरोग्य चांगले राहील पण वेळेचे व्यवस्थापन आवश्यक.
शुभ अंक: 9
शुभ रंग: फिकट निळा

तुळ (Libra)
महत्त्वाचे निर्णय थोडा विचार करून घ्या. नवे करार लाभदायक ठरतील. प्रेमसंबंध गोड होतील. खर्चाच्या बाबतीत सावध राहा.
शुभ अंक: 7
शुभ रंग: गुलाबी

वृश्चिक (Scorpio)
स्वप्नपूर्तीचा दिवस. मनोकामना पूर्ण होईल. ऑफिसमधील जबाबदाऱ्या वाढतील. जुनी चिंता दूर होईल.
शुभ अंक: 4
शुभ रंग: जांभळा धनु (Sagittarius)
धैर्याने निर्णय घ्या. जुनी अपूर्ण कामे पूर्ण होतील. सामाजिक क्षेत्रात यश मिळेल. मित्रपरिवारातून चांगला सल्ला मिळेल.
शुभ अंक: 8
शुभ रंग: सोनेरी

मकर (Capricorn)
कामात गती येईल. वरिष्ठांकडून स्तुती मिळेल. मानसिक स्थैर्य टिकवण्यासाठी ध्यान फायदेशीर ठरेल. वडीलधाऱ्यांचे आशीर्वाद लाभतील.
शुभ अंक: 6
शुभ रंग: राखाडी

कुंभ (Aquarius)
आर्थिक बाबतीत लाभदायक वेळ. जुने येणे वसूल होईल. आत्मविश्वास वाढेल. कुटुंबीयांसोबत वेळ घालवण्याची संधी मिळेल.
शुभ अंक: 2
शुभ रंग: निळा

मीन (Pisces)
स्वतःवर विश्वास ठेवा. संधी दारात उभी आहे. मनातील भीती दूर करा. घरातील वातावरण आनंदी राहील.
शुभ अंक: 9
शुभ रंग: क्रिम

आज पाचोरा में श्रीजगन्नाथ रथयात्रा महोत्सव : ISKCON द्वारा भव्य आयोजन, ५६ भोग और महाआरती से भक्तिमय माहौल

0

Loading

पाचोरा, २९ जून २०२५ (प्रतिनिधि) : पाचोरा में आज दिनभर ‘हरे कृष्ण’ के गगनभेदी जयघोष से वातावरण भक्तिमय होने जा रहा है। अन्तरराष्ट्रीय कृष्णभावनामृत संघ (ISKCON) की पाचोरा शाखा द्वारा आज श्रीजगन्नाथ रथयात्रा महोत्सव का भव्य आयोजन किया गया है, जिसमें शहर के श्रद्धालु, भक्तजन और ISKCON परिवार के सदस्य उत्साह से भाग लेने के लिए तैयार हैं। यह कार्यक्रम संस्थापकाचार्य कृष्णकृपामूर्ति श्री श्रीमद ए.सी. भक्तिवेदांत स्वामी प्रभुपाद की प्रेरणा से पारंपरिक और भक्तिपूर्ण ढंग से मनाया जा रहा है। आज रविवार, २९ जून २०२५ को दोपहर ४ बजे रथयात्रा का शुभारंभ होगा और पूरा पाचोरा शहर भक्ति की रसधारा में डूबा नजर आएगा। दोपहर में मंदिर परिसर से रथयात्रा का शुभारंभ होगा, जिसकी तैयारियां कल ही पूरी कर ली गई हैं। सुंदर पुष्प सज्जा, पारंपरिक रंगोली, रंगीन पताकाएं और धार्मिक सजावट से ISKCON मंदिर का परिसर सजाया गया है। भगवान श्रीजगन्नाथ, बलराम और सुभद्रा देवी की मूर्तियों का विशेष पूजन कर उन्हें रथ पर विराजमान किया जाएगा और ‘हरे कृष्ण’ की ध्वनि के बीच रथयात्रा प्रारंभ होगी। रथ को मंदिर परिसर में घुमाया जाएगा और श्रद्धालु इसे खींचने का पुण्य लाभ लेंगे। पुरुष, महिलाएं, बच्चे और युवा भारी संख्या में उपस्थित रहेंगे तथा शहर की विभिन्न मंडलियों और भक्त परिवारों ने अपनी सेवा के लिए कमर कस ली है। रथयात्रा के उपरांत शाम ७ बजे मंदिर परिसर में एक भव्य और आध्यात्मिक कार्यक्रम आयोजित किया गया है। इस कार्यक्रम में श्रद्धालुओं के लिए विशेष आयोजन किया गया है। ५६ भोग अर्पण समारोह : परंपरा अनुसार भगवान श्रीजगन्नाथ को ५६ प्रकार के विविध व्यंजन अर्पित किए जाएंगे। इनमें मोदक, पूरनपोली, खीर, चावल-सब्जी, मिठाई, हलवा, शीरा, उपवास के पदार्थ आदि शामिल हैं, जिन्हें भक्तों ने प्रेम और भक्ति से स्वयं तैयार किया है। महाप्रसाद वितरण : सभी श्रद्धालुओं के लिए प्रसाद की सुंदर व्यवस्था की गई है और आयोजकों ने श्रद्धालुओं से अनुरोध किया है कि वे संयम और भक्ति से इसका लाभ लें। श्रृंगार दर्शन : विशेष श्रृंगार में भगवान श्रीजगन्नाथ, बलराम और सुभद्रा देवी के दिव्य दर्शन सभी श्रद्धालुओं के लिए खुले रहेंगे। फूलों की सजावट, दिव्य रोशनी और मंत्रोच्चार के साथ यह दर्शन अत्यंत आध्यात्मिक अनुभव प्रदान करेगा। सांस्कृतिक कार्यक्रम : ISKCON के युवा भक्तों द्वारा भजन, नृत्य, कृष्णलीला और गोविंदा नाट्य प्रस्तुत किए जाएंगे, जिनके माध्यम से भगवान श्रीकृष्ण के जीवन प्रसंग जीवंत रूप में श्रद्धालुओं के समक्ष आएंगे। महाआरती : रात्रि में महाआरती का आयोजन होगा। दीपमालाओं की रोशनी, शंखध्वनि, मृदंग और ताल की गूंज में प्रभु चरणों में आरती अर्पित की जाएगी, जो श्रद्धालुओं के हृदय में चिरस्थायी प्रभाव छोड़ेगी। मंदिर परिसर में उपस्थित श्रद्धालुओं के लिए पीने के पानी की सुविधा, शौचालय, महिलाओं के लिए अलग व्यवस्था, प्रसाद वितरण की सुसंगठित पद्धति और यातायात व्यवस्था की गई है। आयोजकों ने श्रद्धालुओं से आग्रह किया है कि वे भीड़ में संयम रखें, सेवा भाव से सहभागी बनें और कार्यक्रम का आनंद लें। इस वर्ष रथयात्रा का उत्सव और अधिक भव्य रूप में आयोजित किया गया है, जिससे पाचोरा तथा आस-पास के गांवों से भी बड़ी संख्या में श्रद्धालु शामिल होने की संभावना है। इसी कारण ISKCON के कार्यकर्ताओं ने श्रद्धालुओं के स्वागत हेतु सेवा टोली तैनात की है। इस कार्यक्रम से संबंधित अधिक जानकारी एवं सहभाग हेतु इच्छुक श्रद्धालु निम्नलिखित संपर्क सूत्रों पर संपर्क कर सकते हैं : 94222 92337, 90288 12305। स्थान : श्रीजगन्नाथ मंदिर (ISKCON), वरखेडी रोड, पाचोरा। श्रीजगन्नाथ रथयात्रा केवल धार्मिक उत्सव नहीं बल्कि भक्ति, सेवा, समर्पण और सामाजिक एकात्मता का महान आयोजन है। जगन्नाथ का अर्थ है ‘सभी का नाथ’। रथ को खींचना यानी अहंकार का त्याग कर प्रभु के मार्ग पर चलने का संकल्प। ISKCON संस्था द्वारा यह यात्रा पूरे विश्व में भक्ति का प्रतीक मानी जाती है। संस्थापकाचार्य श्री श्रीमद ए.सी. भक्तिवेदांत स्वामी प्रभुपाद ने दुनिया भर में ISKCON केंद्रों की स्थापना कर भगवद्गीता, भागवत पुराण और हरे कृष्ण महामंत्र का प्रचार-प्रसार किया। उनकी प्रेरणा से आज पाचोरा में भी हजारों भक्त इस आध्यात्मिक मार्ग से जुड़ते जा रहे हैं। आज सुबह ९:३० बजे से ही मंदिर परिसर में भक्तों का आगमन शुरू हो गया है। कुछ भक्त रंगोली बना रहे हैं, कुछ फूलों की सजावट में लगे हैं, तो कुछ मृदंग, ताल और कीर्तन की मधुर ध्वनि में वातावरण को गुंजायमान कर रहे हैं। छोटे बच्चे राधा-कृष्ण की पोशाक में सजकर रथयात्रा की शोभा बढ़ा रहे हैं, महिलाएं टाल-डिंडी के साथ उपस्थित हैं, और युवा वर्ग नृत्य प्रस्तुतियों की तैयारी में हैं। कुछ भक्तों ने कहा कि यह यात्रा केवल परंपरा नहीं, आत्मिक आनंद की अनुभूति है। अनेक श्रद्धालुओं ने उपवास रखकर सेवा, स्वच्छता और अन्नदान में सहभाग लिया है। कुछ वरिष्ठ नागरिकों ने रथ की सजावट में योगदान दिया है। आज का पूरा दिन ISKCON पाचोरा मंदिर परिसर में भक्ति रस से सराबोर रहेगा। रथयात्रा से लेकर महाआरती तक हर क्षण भक्ति, सेवा और प्रभु चरणों में समर्पण का प्रतीक बनेगा। पाचोरा शहर के नागरिकों और समस्त श्रद्धालुओं से विनम्र अनुरोध है कि वे इस दिव्य उत्सव में अवश्य सहभागी बनें और ‘हरे कृष्ण’ महामंत्र के साथ अपने जीवन में आध्यात्मिक जागरूकता लाएं। हरे कृष्ण हरे कृष्ण कृष्ण कृष्ण हरे हरे हरे राम हरे राम राम राम हरे हरे

ताज्या बातम्या

error: Content is protected !!