Home Blog Page 113

“पत्रकारिता ही वृत्ती आहे, पोस्ट नव्हे – संघटनेच्या नावावर बिनदिक्कत खेळणाऱ्यांचा खरा चेहरा”

0

Loading

आजकाल स्पेशली पाचोरा शहरात पत्रकारितेच्या नावावर खोटं बोटं प्रस्थापित करत कोणालाही न विचारता त्यांचे स्वखर्चाने समाजासमोर देखावा करण्यासाठी बॅनर लावणे स्वतःला मोठं भासवणाऱ्यांची संख्या वाढतेय. समाजातील एका महत्त्वाच्या चौथ्या स्तंभावर – म्हणजेच पत्रकारितेवर – विश्वास ठेवणाऱ्या लोकांसाठी हे चित्र अतिशय निराशाजनक आहे. लेखणीचा आवाज आता हॉटेलमधल्या बाकांवर नुस्तं ओरडून दाखवणाऱ्यांच्या तोंडात अडकतोय. जुनी रेकॉर्डिंग्ज ऐकवून “बायल्याचं” स्वप्न उराशी बाळगणारे आता फक्त “ब्रेकिंग न्यूज”च्या नावाखाली स्वतःचं पोट भरतात.
ज्या पत्रकार संघटनेचं अस्थीत्व नाही ज्या पत्रकार संघटेनेचे घटना व नियमा नुसार राज्य, विभाग, जिंल्हातर सोडाच परंतु तालुका आणि शहराची कार्यकारीणी नाही अशा हॉटेलच्या टेबलावर जन्म झालेल्या पत्रकार संघटनेत पदं पत्रकार नसलेल्या ना घेण्याची व वाटपाची चढाओढ आज समाजात स्पेशली पाचोऱ्यात प्रतिष्ठेचा भाग बनली आहे, पण त्यामागची खरी जबाबदारी, नैतिकता आणि पात्रता कुठे हरवली आहे हे विचारण्याची वेळ आता आली आहे. एखाद्या व्यक्तीला पत्रकार म्हणवून घेण्यासाठी फक्त आयडी कार्ड, माईक आणि ग्रुप फोटो पुरेसं ठरत नसेल – त्यासाठी आवश्यक आहे ती चोख लेखणी, प्रगल्भ वाचन, सखोल अभ्यास आणि वस्तुनिष्ठ दृष्टीकोन. असे गुण नसलेले पत्रकार कधीही समाजाचा आवाज बनू शकत नाहीत.
पत्रकारिता म्हणजे हॉटेलच्या टेबलावर बसून & पोलीस स्टेशनला चकरा मारून 25% वर  शिकारचा शोध घेणे नव्हे, तर जमिनीवर उतरून वास्तव समजून घेणं. ती खरी पत्रकारीता
आज पाचोर्‍यात वर्षातून तीन चार वेळा कार्यक्रम घेतात पत्रकार असल्याचं भासवतात “पत्रकारांचा विमा काढायचा”, “डोनेशन द्या”, “पत्रकार सुरक्षा निधी” ज्या पुरस्काराचे स्वतःच्या तोंडून नाव घेण्याची लायकी नाही अशा नावाखाली लोकांकडून पैसे गोळा करतात. पण जेव्हा खरंच एखादा पत्रकार आपल्या कर्तव्यात जीव गमावतो, त्याच्या कुटुंबाकडे मदतीचा हात पुढं करायची वेळ येते – तेव्हा फक्त ढंडोरा वाजवतात आम्ही विम्याचा चेक देणार आहोत नंतर हेच मंडळी गायब होतात. एवढेच काय संकलित केलेल्या निधीतून त्या मृत पत्रकाराच्या कुटुंबाला ‘विमा कंपनीचा अधिकृत धनादेश’ द्यायची साधी नैतिकता दाखवली असती, तरी कदाचित त्या दिवंगत पत्रकाराच्या आत्म्याला शांती मिळाली असती.
अशा परिस्थितीत, जेव्हा कोणी स्वतःला पत्रकार म्हणून मिरवतो, तेव्हा त्याच्या लेखणीवर, कर्तृत्वावर आणि सामाजिक संवेदनशीलतेवर प्रश्न विचारणं ही लोकांची जबाबदारी आहे. “कोणतंही मोठं नाव हे विश्वासार्हतेचं प्रतीक नसतं.” आज हे प्रकर्षाने समजून घ्यायची गरज आहे.
समोरासमोर बोलणं हेच खरं पत्रकारितेचं लक्षण
जे खरे पत्रकार असतात, जे एका “बापाचे” असतात – ते नेहमी स्पष्ट, थेट आणि निर्भीड असतात. त्यांच्या बोलण्यात, वागण्यात कोणतीही दुटप्पी भूमिका नसते. ते समोरासमोर मुद्दे मांडतात, संवाद साधतात आणि निर्माण झालेली प्रत्येक गोंधळाची स्थिती मोकळेपणाने स्पष्ट करतात.
पण जे लोक सतत मागे बोलतात, गैरसमज पेरतात, चिखलफेक करतात – तेच खरे कधीच नसतात. ते नेहमी ‘पाठीमागून वार’ करण्याच्या नादात असतात. अशा लोकांवर विश्वास ठेवण्या आधी, त्यांना डोक्यावर उचलण्याआधी, लोकांनी स्वतः विचार करून प्रश्न विचारायला शिकायला हवं.
पत्रकार संघटना म्हणजे लुटारूंचा गट नव्हे किंवा विनोद नव्हे, ती जबाबदारी आहे
पत्रकार संघटना म्हणजे केवळ इव्हेंट घेणं, फोटोचे बॅनर लावणे , पैसे घेऊन पुरस्कारासाठी व्यासपीठावर बोलावणं नव्हे. ती संघटना म्हणजे पत्रकारांच्या हक्कांचं रक्षण करणं, त्यांच्या प्रश्नांवर आवाज उठवणं, आणि एखाद्या पत्रकारावर अन्याय झाला तर त्याच्यासोबत खंबीरपणे उभं राहणं.
पण सध्याच्या तथाकथित पाचोरा येथील पत्रकार संघटनांमध्ये हेच मूळ मूल्य हरवत चाललं आहे. काही व्यक्ती या संघटनांचा वापर फक्त स्वतःचा आर्थिक खिचा भरण्यासाठी किंवा सामाजिक ब्रँड तयार करण्यासाठी करतात. त्यांच्या लेखणीच्या ताकदीपेक्षा बॅनर वर फोटो झळकायचं वेड जास्त असतं. आणि जेव्हा खरे प्रश्न उभे राहतात – पत्रकार भवनाचे ,पत्रकारांच्या मुलांच्या शिक्षणाचे ,पत्रकारांच्या सुरक्षेचे, मोबदल्याचे, किंवा विम्याचे पैसे देण्याची वेळ येते तेव्हा ह्याच मंडळींची “गायब” होणारी भूमिका सर्वांना ज्ञात आहे.
माध्यमांचा वापर नव्हे, दुरुपयोग सुरु आहे
आज सोशल मिडिया, न्यूज पोर्टल्स आणि मोबाईल पत्रकारितेने प्रत्येकाला आवाज दिला आहे. पण काही लोक या तंत्रज्ञानाचा योग्य वापर न करता, त्याचा दुरुपयोग करत आहेत. लोकांची दिशाभूल करणं, खोटी माहिती पसरवणं, आणि व्यक्तिगत आकसातून बातम्या बनवणं – या गोष्टी पत्रकारितेचं शस्त्र नव्हे, तर तिचं अपमान करणं आहे.पाचोरा भडगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार किशोरआप्पा पाटील आणि माझा वाद जेव्हा झाला तेव्हा याच स्थानिक पोटभरु पत्रकारांनी आमदारांचे कार्यालय जणू आपले पोट भरण्याचे कार्यालय समजून तेथे बस्थान माडले होते आणि दिवसभर गैरसमज कसे होतील व वाढतील यासाठी पूर्ण शक्ती खर्च करीत होते
“ब्रेकिंग टाकून पोट भरतो” हा आरोप अनेकांवर लागू होतो – कारण त्यांनी पत्रकारितेला व्यवसाय नव्हे तर धंदा बनवलं आहे. अशी मंडळी कोणत्याही सन्मानाच्या पात्र नाहीत.
पत्रकार होणं म्हणजे स्वतःला “माध्यम” म्हणवून घेणं नव्हे, तर खर्‍या अर्थाने माध्यम बनणं. लोक आणि प्रशासन, शासन यांच्यातील विश्वासाचं पुलं बनणं. पण जेव्हा एखादी व्यक्ती त्याच्या पदाचा, नावाचा, किंवा ओळखीचा वापर फक्त स्वतःच्या स्वार्थासाठी करते – तेव्हा ती फक्त स्वतःला नाही, तर संपूर्ण पत्रकार समाजाला बदनाम करते.
आज आपण जागरूक होण्याची वेळ आली आहे. जे स्वतःच्या नावापुढे तालुका जिल्हा विभाग राज्य अशी पत्रकारितेची मोठी मोठी पदे लावतात इतर सहकाऱ्यांसाठी सोडा पण स्वतःकडे किंवा स्वतःसाठी अधिकृत शासनमान्य अधिस्विकृतीचे कार्ड देखील घेण्याची लायकी नसते मोठ्या पदाच्या ,नावाच्या आड पत्रकारितेचं खोटं नाटक करणाऱ्यांपासून सावध राहण्याची वेळ आहे. कारण लोकशाही टिकवण्यासाठी स्वच्छ पत्रकारिताचं अस्तित्व गरजेचं आहे. आणि ती स्वच्छता हेवेदावे, डावपेच, आणि स्वार्थापेक्षा जास्त महत्त्वाची असते.
म्हणूनच स्नेहलचं हे नम्र आवाहन आहे – कोणताही मोठा चेहरा बघून त्याच्या मागे न लागता, थेट प्रश्न विचारा, समोरासमोर संवाद साधा. जो खरा पत्रकार असेल, तो उत्तर द्यायला कधीच मागेपुढे पाहणार नाही. कारण ज्याचं मन साफ असतं, त्याला पारदर्शकतेची भीती नसते. आणि तोच एका बापाचा असतो- तुर्त एवढेच

पाचोरा येथून सतत प्रत्येक शनिवारी प्रकाशित होणारे & शासकीय मान्यता प्राप्त ( अदाता नोंदणी क्र. 5301000145000179 & अदाता क्र. 53010010490 ) जाहीरात यादीत समावेश साप्ता.झुंज या वृत्तपत्राचा वर्ष 18 अंक क्र. 01 दि. 5 एप्रील 2025
आपणास सस्नेह सादर करीत आहे
Dhyeya News & सा. झुंज संपादक..  संदीप दा. महाजन, पाचोरा जि. जळगाव
(M.A.B.Ed) & Journalism
M0. 73 8510 8510 7588645907 /94222 75807

मुंबईच्या रिअल इस्टेटमध्ये ऐतिहासिक वाढ: निवासी व कार्यालयीन व्यवहारांत विक्रमी नोंद

0

Loading

मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : नाइट फ्रँक इंडियाच्या ताज्या अहवालानुसार, २०२५ च्या पहिल्या तिमाहीत मुंबईने निवासी आणि कार्यालयीन रिअल इस्टेट व्यवहारांमध्ये ऐतिहासिक वाढ नोंदवली आहे. देशातील सर्वात मोठी निवासी बाजारपेठ म्हणून मुंबईने २४,९३० प्रायमरी सदनिकांच्या विक्रीची नोंद करत वार्षिक ५% वाढ दर्शवली. डेव्हलपर्सनीही या गतीचा लाभ घेत २५,७०६ नवीन सदनिका लाँच केल्या, ज्यामध्ये २% वाढ झाली.मुंबईने देशभरातील एकूण निवासी विक्रीत २८% योगदान दिले. सरासरी निवासी किमतीत ६% वाढ झाली असून, प्रति चौरस फूट किंमत ८,३६० रुपयांवर पोहोचली. विक्री न झालेल्या सदनिकांची संख्या १६६,९१५ वरून १६६,४५४ पर्यंत घटली. “क्वॉर्टर्स टू सेल” मेट्रिक ७.७ वरून ७.१ पर्यंत सुधारला, ज्यामुळे बाजारातील स्थिरता आणि ग्राहकांचा विश्वास अधोरेखित झाला.मुंबईतील निवासी विक्रीत प्रीमियम सेगमेंटचा हिस्सा वाढताना दिसतो. २० दशलक्ष ते ५० दशलक्ष रुपयांच्या सदनिकांची मागणी ९% वरून १२% पर्यंत वाढली, तर २०० दशलक्ष ते ५०० दशलक्ष श्रेणीत विक्री तब्बल १०८% वाढली.मुंबईतील कार्यालयीन बाजारपेठेनेही विक्रमी वाढ नोंदवली. २०२५ च्या पहिल्या तिमाहीत कार्यालयीन व्यवहारांचे एकूण क्षेत्रफळ ३.५ दशलक्ष चौरस फूटांवर पोहोचले, ज्यामध्ये वार्षिक २४% वाढ झाली. नवीन कार्यालयीन जागांचा पुरवठा ४३% वाढून ०.५ दशलक्ष चौरस फूट झाला. सरासरी भाडे प्रतिमहिना प्रति चौरस फूट ११८ रुपये नोंदवले गेले.फ्लेक्स ऑफिस स्पेसेसने कार्यालयीन बाजारपेठेत मोठी मजल मारली आहे. २०२४ च्या पहिल्या तिमाहीतील ०.२५ दशलक्ष चौरस फूटांवरून २०२५ मध्ये १.२४ दशलक्ष चौरस फूटांपर्यंत झेप घेत, ३८४% वाढ दर्शवली.नाइट फ्रँक इंडियाचे वरिष्ठ कार्यकारी संचालक गुलाम झिया
म्हणाले, “मुंबईच्या निवासी बाजारपेठेला प्रीमियम घरांसाठी वाढती मागणी, तसेच मुंबई कोस्टल रोड व मेट्रो प्रकल्पांचा मोठा फायदा झाला आहे. या पायाभूत सुविधांमुळे शहराची कनेक्टिव्हिटी सुधारली असून, ग्राहक व डेव्हलपर्स दोघांमध्येही आत्मविश्वास वाढत आहे. तसेच, कार्यालयीन बाजारपेठेत विविध कंपन्यांकडून वाढती मागणी आणि मुंबईच्या दीर्घकालीन विकास क्षमतेवर असलेला विश्वास हा मोठा सकारात्मक संकेत आहे.”मुंबईच्या रिअल इस्टेट क्षेत्रातील ही दमदार कामगिरी पुढील तिमाहीतही कायम राहील, अशी तज्ज्ञांची अपेक्षा आहे.

पत्रकारांना मंत्रालयातून हाकलून सरकारचा हुकूमशाही मास्क फाटला — स्वातंत्र्याच्या गळा दाबण्याचा निर्घृण प्रकार!

0

Loading

मुंबई : राज्य शासनाने मंत्रालयात दुपारी  2-00 च्या आधी पत्रकारांच्या प्रवेशावर घातलेली बंदी केवळ एक साधी प्रशासकीय कारवाई नसून, ती संपूर्ण लोकशाही व्यवस्थेवर, विशेषतः माध्यमांच्या स्वातंत्र्यावर झालेला गंभीर आघात आहे. ही घटना म्हणजे

लोकशाहीच्या चौथ्या स्तंभावर – पत्रकारितेवर – थेट हल्ला आहे, ज्यामुळे राज्यातील पत्रकार संघटनांमध्ये तसेच विविध सामाजिक आणि नागरी संस्थांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली आहे. हाच संताप आता एक लढ्याचे स्वरूप घेऊ पाहत असून, याचा केंद्रबिंदू म्हणजे सरकारची हुकूमशाही वृत्ती आणि पारदर्शकतेचा अभाव. गेल्या काही दिवसांपासून राज्य शासनाच्या निर्णयांनी जनतेमध्ये गोंधळाचे आणि चिंतेचे वातावरण निर्माण केले आहे. अगोदरच केंद्र सरकारच्या स्तरावर देशभरातील जवळपास 98 हजार वृत्तपत्रांची नोंदणी रद्द करण्यात आली होती. या कृतीने अनेक लघु, ग्रामीण, स्थानिक पातळीवरील माध्यमांची गळचेपी झाल्याचं दिसून आलं होतं. त्यानंतर आता राज्य शासनाने थेट मंत्रालयातच पत्रकारांच्या प्रवेशावर बंदी घालून पत्रकारितेच्या मुळावर घाव घालण्याचा प्रकार केला आहे. मंत्रालय हे महाराष्ट्र राज्याच्या प्रशासनाचे सर्वोच्च ठिकाण आहे. इथे जनहिताचे निर्णय घेतले जातात, धोरणे आखली जातात, तसेच जनतेच्या भवितव्याशी संबंधित निर्णयांवर शिक्कामोर्तब केले जाते. या सर्व घडामोडींची माहिती जनतेपर्यंत पोहोचवण्याचे काम माध्यमांच्या माध्यमातून होते. पत्रकार हे शासन व जनतेमधील एक महत्त्वाचा दुवा असतो. त्यामुळे पत्रकारांना मंत्रालयात प्रवेश नाकारण्याचा निर्णय म्हणजे शासनाचे कामकाज गुप्त ठेवण्याचा आणि पारदर्शकतेपासून पळ काढण्याचा स्पष्ट संकेत आहे. या कारवाईमागे केवळ सुरक्षेचे कारण दिले जात असले तरी, प्रत्यक्षात हा निर्णय माध्यमांच्या हालचालींवर नियंत्रण आणण्याचा प्रकार असल्याचे दिसून येते. पत्रकार हे केवळ बातम्या पोहोचवणारे नसून, शासनाला जनतेपुढे जबाबदार धरणारे सशक्त माध्यम आहेत. ते सरकारी निर्णयांची चिकित्सा करतात, प्रश्न विचारतात, आणि प्रशासनाच्या अपयशाकडे बोट दाखवतात. ही भूमिका सरकारला असह्य झाली असावी, असेच सध्याच्या घटनाक्रमावरून वाटते. लोकशाहीत अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि माहितीचा अधिकार हे मूलभूत मूल्य मानले जातात. मात्र, राज्य सरकारने माध्यमांना रोखण्याचा जो पवित्रा घेतला आहे, तो या मुल्यांच्या विरोधात जाणारा आहे. पत्रकारांना मंत्रालयात प्रवेश नाकारल्याने केवळ पत्रकारांचे अधिकारच डावलले गेले नाहीत, तर सामान्य जनतेच्या माहितीच्या अधिकारावरही घाला घातला आहे. यामुळे सरकारची हुकूमशाही प्रवृत्ती चव्हाट्यावर आली आहे. या गंभीर घटनेच्या पार्श्वभूमीवर एक महत्त्वाचा प्रश्न उपस्थित होतो, तो म्हणजे काही विकाऊ पत्रकार संघटनांची भूमिका. मंत्रालय प्रवेशबंदीच्या निर्णयावर खुला विरोध करणे तर दूरच, पण या संघटना याविषयी मौन बाळगून आहेत. त्यांचा हा मौन म्हणजे शासनाच्या अन्यायकारक निर्णयांना अप्रत्यक्ष समर्थनच मानले जात आहे. पत्रकारिता हे जनतेसाठी काम करणारे व्यासपीठ आहे, आणि पत्रकार संघटनांनी सरकारच्या चुकीच्या निर्णयाविरोधात ठामपणे उभं राहणं आवश्यक असतानाही काही संघटनांची निष्क्रियता लज्जास्पद ठरत आहे. या निर्णयाविरोधात केवळ पत्रकार संघटनांनीच नव्हे, तर अनेक सामाजिक कार्यकर्त्यांनी, विचारवंतांनी आणि नागरी संस्थांनी उघडपणे आवाज उठवला आहे. मंत्रालय हे केवळ अधिकाऱ्यांचे किंवा मंत्र्यांचे कार्यालय नसून, हे जनतेच्या हितासाठी काम करणारे केंद्र आहे. अशा ठिकाणी माध्यमांचा वावर रोखणे म्हणजे जनतेच्या प्रश्नांपासून सरकारला जबाबदारीपासून वाचवण्याचा प्रयत्न होतो आहे, हे स्पष्ट आहे. राज्यभरातील पत्रकार संघटनांनी आणि विविध सामाजिक संघटनांनी सरकारकडे ठाम मागणी केली आहे की, मंत्रालयातील पत्रकार प्रवेशबंदीचा निर्णय तात्काळ मागे घेण्यात यावा. अन्यथा राज्यव्यापी तीव्र आंदोलन उभारण्याचा इशारा देण्यात आला आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये पत्रकारांनी आंदोलनाची तयारी सुरू केली असून, प्रसारमाध्यमं ही लोकशाहीतील चौथा स्तंभ मानली जातात. ते जनतेचे प्रश्न मांडतात, सत्ताधाऱ्यांना उत्तरदायी धरतात, आणि खऱ्या अर्थाने समाजासाठी आरसा दाखवण्याचं काम करतात. अशा महत्त्वाच्या घटकाला सरकार जर डावलत असेल, त्यांच्या कामावर निर्बंध आणत असेल, तर ती बाब कोणत्याही लोकशाहीसाठी धोक्याची घंटा आहे. पत्रकारांना मंत्रालयात प्रवेश नाकारणे म्हणजे सरकारकडून स्वतःच्या चुकीला झाकण्याचा, अपयश लपवण्याचा आणि विरोधी आवाज दाबण्याचा प्रयत्न आहे. राज्य सरकारच्या या निर्णयामुळे महाराष्ट्रातील संपूर्ण पत्रकारिता क्षेत्र ढवळून निघाले आहे. संपादक, पत्रकार, कॅमरामन, रिपोर्टर, सर्वच स्तरांवर काम करणाऱ्या माध्यमकर्मीमध्ये अस्वस्थता पसरली आहे. एकीकडे सरकार ‘मीडिया फ्रेंडली’ असल्याचा दावा करते, तर दुसरीकडे अशा प्रकारे थेट प्रवेशावर बंदी घालून आपल्या खऱ्या वृत्तीचा परिचय करून देते. या विरोधाभासाने सरकारच्या नीयतिवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. राज्य सरकारने पत्रकारांच्या मंत्रालयातील प्रवेशावर बंदी घातल्यानंतर अनेकांनी अंदाज व्यक्त केला आहे की, ही फक्त सुरुवात आहे. हळूहळू इतर महत्त्वाच्या ठिकाणीही माध्यमांच्या हालचालींवर बंधनं येऊ शकतात. सरकारच्या कामकाजावर प्रश्न उपस्थित करणाऱ्या पत्रकारांना लक्ष्य केलं जाऊ शकतं. या पार्श्वभूमीवर सर्व पत्रकार संघटनांनी एकत्र येऊन या धोरणात्मक हल्ल्याविरोधात आवाज बुलंद करण्याची गरज आहे. लोकशाही व्यवस्थेमध्ये सरकारपेक्षा मोठं संविधान असतं. आणि पत्रकार हे या संविधानाचे रक्षक असतात. जर सरकार स्वतःच संविधानाने दिलेल्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर घाला घालू लागलं, तर ती घटना केवळ पत्रकारांसाठी नव्हे, तर संपूर्ण समाजासाठी धोकादायक ठरते. मंत्रालयात पत्रकारांना प्रवेश नाकारणं म्हणजे राज्य सरकारने आपल्या हुकूमशाही वृत्तीची कबुली दिल्यासारखं आहे. म्हणूनच, हा निर्णय तातडीने मागे घेणं हे केवळ पत्रकारांच्या हक्कांसाठी नव्हे, तर लोकशाहीच्या भवितव्यासाठी अत्यावश्यक आहे. अन्यथा शासनाला तीव्र जनआंदोलनाचा सामना करावा लागेल, हे निश्चित. आज जर हा अन्याय गप्प बसून स्वीकारला, तर उद्या ही गळचेपी आणखी तीव्र रूप घेईल, आणि आपण सर्वांनी मिळून स्वातंत्र्याच्या मुळावरच घाव घालू. आता वेळ आली आहे, की पत्रकारितेच्या अस्तित्वासाठी, आणि लोकशाहीच्या जपणुकीसाठी निर्णायक लढा दिला जावा.

स्वर्गीय कालिंदीबाई पांडे मतिमंद निवासी विद्यालयात जागतिक ऑटिझम दिन उत्साहात साजरा

0

Loading

पाचोरा – विशेष मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी समर्पित असलेल्या श्री संत गाडगेबाबा शिक्षण संस्था संचलित स्वर्गीय कालिंदीबाई पांडे मतिमंद निवासी विद्यालय, पाचोरा येथे जागतिक ऑटिझम दिन अत्यंत उत्साही वातावरणात आणि सामाजिक जाणीव जागवणाऱ्या उपक्रमांनी साजरा करण्यात आला. या विशेष कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे प्रदीप एम. पांडे होते, तर प्रमुख अतिथी म्हणून संस्थेच्या अध्यक्षा मीनाक्षी पांडे उपस्थित होत्या. दोघांनीही आपल्या मोलाच्या मार्गदर्शनातून उपस्थितांना ऑटिझमबाबत जागरूकता निर्माण करण्याचे महत्त्व पटवून दिले.कार्यक्रमाची सुरुवात सामाजिक कार्यात महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्या हेलन केलर यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली. दृष्टिहीन असूनही त्यांनी आपल्या संघर्षातून संपूर्ण मानवजातीला प्रेरणा दिली. त्यांच्या जीवनचरित्रातूनच विशेष व्यक्तींना योग्य दिशा मिळते, यावर संस्थेचा ठाम विश्वास आहे. पूजनानंतर विद्यार्थ्यांना ऑटिझम म्हणजे नेमकं काय, या स्थितीचे मूलभूत लक्षणे कोणती असतात, यामागची संभाव्य कारणे, त्याचे योग्य व्यवस्थापन कसे करता येईल आणि अशा विद्यार्थ्यांसाठी कोणती शैक्षणिक प्रणाली प्रभावी ठरू शकते, याबाबत सखोल माहिती देण्यात आली. विशेषत: ऑटिझमच्या विविध प्रकारांबद्दल – जसे की हाय फंक्शनिंग ऑटिझम, क्लासिक ऑटिझम, आणि एस्पर्जर सिंड्रोम – याविषयी उदाहरणांसह समजावून सांगण्यात आले. शाळेतील तज्ज्ञ शिक्षिका आणि बालविकास तज्ञ यांनी PPT सादरीकरण, संवाद सत्र, व्हिडिओ प्रेझेंटेशन आणि प्रत्यक्ष उदाहरणांच्या आधारे ही माहिती विद्यार्थ्यांना, पालकांना व शिक्षकांना समजावली.कार्यक्रमात विशेष शिक्षणाच्या पद्धती, जसे की टिच (TEACCH), ABA (Applied Behavior Analysis), आणि सेन्सरी इंटिग्रेशन थेरपी याबाबतही सविस्तर माहिती दिली गेली. ऑटिझम असलेल्या मुलांचे आकलन, भाषा विकास, सामाजिक कौशल्ये आणि आत्मविश्वास वाढवण्यासाठी या पद्धतींचा प्रभावी उपयोग कसा करावा, हे यावेळी उलगडून सांगण्यात आले. या वेळी काही विद्यार्थ्यांच्या पालकांनी आपल्या अनुभवांची मांडणी करताना सांगितले की, योग्य प्रशिक्षण, शाळेतील सकारात्मक वातावरण आणि शिक्षकांचे संवेदनशील मार्गदर्शन यामुळे त्यांच्या मुलांमध्ये आश्चर्यकारक प्रगती घडून आली आहे.कार्यक्रमात एक विशेष संवाद सत्र घेण्यात आले, ज्यात ऑटिझमबद्दल असलेल्या चुकीच्या समजुती, समाजातील वागणुकीतील अडथळे, आणि विशेष मुलांसाठी आवश्यक असलेले सहकार्य यावर चर्चा झाली. यामध्ये उपस्थित शिक्षक, पालक, सामाजिक कार्यकर्ते आणि मानसोपचारतज्ञ यांनी सहभाग घेतला. यावेळी ऑटिझम असलेली मुले केवळ शैक्षणिक नव्हे, तर कलेत, संगीत, गणित, चित्रकला यासारख्या क्षेत्रातही प्रगती करू शकतात, हे स्पष्ट करण्यात आले. काही विद्यार्थ्यांनी कार्यक्रमात स्वतः तयार केलेल्या कलाकृती सादर केल्या, जसे की ऑटिझम जनजागृतीवर आधारित चित्रकला, हस्तकला व स्लोगन पोस्टर. त्यांच्या कल्पकतेला उपस्थितांनी भरभरून दाद दिली.अध्यक्ष स्थान भूषवणारे प्रदीप एम. पांडे यांनी आपल्या भाषणात सांगितले की, ऑटिझम हा आजार नाही तर मेंदूच्या कार्यपद्धतीत होणारा फरक आहे. अशा मुलांना योग्य संधी, मोकळं आणि समजून घेणारं वातावरण मिळाल्यास ते कोणत्याही क्षेत्रात चमक दाखवू शकतात. त्यामुळे आपण समाज म्हणून त्यांना समजून घेणे, त्यांच्यातील गुणांना वाव देणे आणि त्यांच्यासाठी सुलभ व्यवस्था निर्माण करणे ही आपली सामाजिक जबाबदारी आहे. त्यांनी यावेळी शाळेतील शिक्षक, पालक आणि कर्मचार्‍यांचे मनःपूर्वक कौतुक केले की, त्यांनी अशा जाणीवपूर्वक कार्यक्रमासाठी परिश्रम घेतले.प्रमुख अतिथी मीनाक्षी पांडे यांनीही उपस्थितांना संबोधित करताना सांगितले की, विशेष मुले या आपल्या समाजाचा अविभाज्य भाग आहेत. त्यांच्यासाठी केवळ सहवेदना नव्हे, तर योग्य शिक्षण, वैद्यकीय सुविधा, आणि व्यावसायिक प्रशिक्षणही तितकेच आवश्यक आहे. ऑटिझमबाबत समाजात अजूनही जागृतीचा अभाव आहे. त्यामुळे अशा कार्यक्रमांची गरज अधिक तीव्रतेने जाणवते. त्यांनी आपल्या संस्थेच्या माध्यमातून अशा उपक्रमांना नेहमीच प्राधान्य दिले जाईल असेही स्पष्ट केले.या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी एक लघुनाट्य सादर केले, ज्यात ऑटिझम असलेल्या मुलाला समाजातील लोक कसे वेगळं वागवतात, पण योग्य सहकार्य मिळाल्यास तो कसा यशस्वी होऊ शकतो, हे प्रभावीपणे दाखवण्यात आले. यामुळे उपस्थित प्रेक्षक भावुक झाले. काही विद्यार्थ्यांनी ‘मी वेगळा आहे, पण मी कमी नाही’ या विषयावर भाषण करून उपस्थितांची मने जिंकली.कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी शाळेचे सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थ्यांनी मिळून उत्स्फूर्तपणे योगदान दिले. शाळेच्या आवारात ऑटिझम जनजागृतीसाठी फलक, रंगीबेरंगी फुगे, माहितीपत्रके आणि विद्यार्थ्यांच्या कलेने सजवलेले स्टॉल्स लावण्यात आले होते. यामुळे वातावरण अधिक आनंदी आणि समर्पित वाटले.शेवटी आभार प्रदर्शन शाळेच्या मुख्याध्यापकांनी करताना सांगितले की, अशा कार्यक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास निर्माण होतो, शिक्षकांची बांधिलकी वाढते आणि समाजात सकारात्मक संदेश पोहोचतो. त्यांनी उपस्थित पालक, अतिथी, कर्मचारी आणि विद्यार्थ्यांचे मनःपूर्वक आभार मानले.स्वर्गीय कालिंदीबाई पांडे मतिमंद निवासी विद्यालयाच्या वतीने आयोजित करण्यात आलेला जागतिक ऑटिझम दिन कार्यक्रम हा केवळ एक शैक्षणिक उपक्रम नव्हता, तर तो संवेदनशीलतेचा, समजूतदारपणाचा आणि सामाजिक बांधिलकीचा जिवंत पुरावा होता. या कार्यक्रमातून समाजात एक संदेश गेला की, विशेष मुले आपली जबाबदारी आहेत आणि त्यांच्यातील दिव्यतेला स्वीकारून त्यांना सक्षम करणे हे आपले कर्तव्य आहे.

स्वर्गीय कालिंदीबाई पांडे मतिमंद निवासी विद्यालयात नवकार महामंत्र दिनी दिव्यांग विद्यार्थ्यांचा प्रेरणादायी सहभाग

0

Loading

पाचोरा – अध्यात्म, संस्कार, समाजप्रबोधन आणि विशेष विद्यार्थ्यांचा आत्मसन्मान या सर्वांचे सुरेख समन्वय साधणारा एक प्रेरणादायी आणि भावनिक कार्यक्रम आज संत गाडगेबाबा शिक्षण संस्था संचलित स्वर्गीय कालिंदीबाई पांडे मतिमंद निवासी विद्यालय, पाचोरा येथे पार पडला. विश्व नवकार महामंत्र दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या या विशेष कार्यक्रमाने आदर्श घालून दिला. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान संत गाडगेबाबा शिक्षण संस्थेचे सेक्रेटरी प्रदीप एम. पांडे सर यांनी भूषवले होते. त्यांच्या कुशल नेतृत्वात आणि सामाजिक कार्यात दिलेल्या योगदानामुळेच ही संस्था आज दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी आदर्श ठरत आहे. कार्यक्रमासाठी शाळेच्या माजी मुख्याध्यापिका सौ. मीनाक्षी प्रदीप पांडे या प्रमुख अतिथी म्हणून विशेष उपस्थित होत्या. विद्यार्थ्यांमध्ये प्रेरणा निर्माण करणारे त्यांचे विचार आणि कृतीमधून सतत विद्यार्थ्यांसाठी झगडणारा त्यांचा स्वभाव सर्वांनाच परिचित आहे. कार्यक्रमाची सुरुवात अत्यंत पवित्र आणि भक्तिभावाने करण्यात आली. भगवान महावीर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. दिव्यांग विद्यार्थ्यांच्या हस्तेच हे पूजन होणे हे या कार्यक्रमाचे खास वैशिष्ट्य ठरले. मान्यवरांनी दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाचा शुभारंभ केला. त्यानंतर शाळेतील सर्व दिव्यांग विद्यार्थी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि संस्थेचे पदाधिकारी यांनी एकत्रितपणे विश्वशांती, आत्मशुद्धी आणि समत्व यासाठी सुरेल स्वरात नवकार महामंत्राचे सामूहिक पठण केले. नवकार महामंत्र हा जैन धर्मातील सर्वोच्च, पवित्र आणि शक्तिशाली मंत्र मानला जातो. या मंत्रात कोणत्याही देवाचे नव्हे तर गुणांचे स्तवन आहे. त्यामुळे तो सर्वधर्मसमभाव राखणारा आणि आत्मिक उन्नती घडवणारा मंत्र मानला जातो. विशेष म्हणजे या मंत्रात कर्म, दैव किंवा भौतिक संपत्ती यांचे महत्त्व नाही, तर ज्ञान, संयम, साधना, तप आणि निर्विकल्प शांती यांचा गौरव आहे. याच तत्वज्ञानावर आधारित कार्यक्रमाने प्रत्येक सहभागीच्या अंतर्मनाला स्पर्श केला. या दिवशी शाळेतील सर्व विद्यार्थी अत्यंत आकर्षक पारंपरिक वेशभूषेत सहभागी झाले होते. काही विद्यार्थ्यांनी भगवान महावीरांचे जीवनदर्शन घडवणारे लघुनाट्य सादर केले. त्यांच्या अभिनयातून त्यांनी अहिंसा, क्षमा, संयम आणि आत्मसाक्षात्कार या मूल्यांची उजळणी करून दिली. या सादरीकरणांनी उपस्थित प्रत्येकाचे मन हेलावून टाकले. प्रदीप एम. पांडे सर यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात सांगितले की, “दिव्यांग विद्यार्थ्यांमध्ये असलेल्या सुप्त गुणांना प्रोत्साहन देणे हीच आमची खरी जबाबदारी आहे. नवकार महामंत्राच्या सामूहिक उच्चारातून निर्माण होणाऱ्या सकारात्मक ऊर्जा आणि शांततेचा अनुभव घेताना आज मन भारावून गेले. या कार्यक्रमातून केवळ अध्यात्म नव्हे, तर सामाजिक एकात्मतेचा संदेश दिला गेला.” प्रमुख अतिथी सौ. मीनाक्षी प्रदीप पांडे यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधताना सांगितले की, “आजच्या युगात मानसिक शांती ही सगळ्यात मोठी गरज आहे. नवकार महामंत्र हे केवळ जैन धर्मापुरते मर्यादित नसून ते प्रत्येकासाठी प्रेरणादायी आहे. या मंत्राच्या माध्यमातून आत्मा, विचार, जीवनशैली यामध्ये सकारात्मक परिवर्तन शक्य आहे. अशा प्रकारच्या उपक्रमातून विद्यार्थ्यांच्या मनात आध्यात्मिक जाणीव निर्माण होते, जी त्यांना खंबीरपणे जीवन जगायला शिकवते.” शाळेतील शिक्षकांनीही विद्यार्थ्यांना नवकार महामंत्राचे महत्त्व सोप्या भाषेत समजावून सांगितले. त्यांनी सांगितले की, प्रत्येक दिव्यांग विद्यार्थी हा समाजाचा अनमोल भाग आहे. त्यांच्यात असलेल्या क्षमतेला योग्य दिशा देणं ही आपली जबाबदारी आहे. यासाठी अध्यात्माचा आधार घेतला तर त्यांच्या सर्वांगीण विकासाचा मार्ग सुकर होतो. कार्यक्रमाच्या दुसऱ्या सत्रात विद्यार्थ्यांनी नवकार महामंत्रावर आधारित गाणी, घोषवाक्ये, आणि भाषणे सादर केली. काही विद्यार्थ्यांनी नवकार मंत्राचे अर्थ स्पष्टीकरण देणाऱ्या कविता सादर केल्या. ‘नवकार मंत्र – एक आत्मिक संजीवनी’ या नावाने शाळेच्या दिव्यांग विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या भित्तीचित्र प्रदर्शनाचेही उद्घाटन करण्यात आले. या प्रदर्शनात विद्यार्थ्यांनी मंत्राचे विविध अर्थ छायाचित्रांच्या माध्यमातून मांडले होते. ही कलाकृती पाहताना अनेकांच्या डोळ्यांत आनंदाश्रू आले. या प्रसंगी उपस्थित असलेल्या पालकांच्या भावना देखील अत्यंत भावूक होत्या. एका पालकांनी सांगितले, “आमच्या मुलाला आज इतक्या मोठ्या कार्यक्रमात सहभागी होता आले, त्याने मंत्र पठण केले, हे पाहून आम्हाला आनंदाश्रू अनावर झाले. अशी संधी देणाऱ्या पांडे सर आणि संस्थेचे मनःपूर्वक आभार मानतो.” कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संस्थेचे शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, सेवक, सहाय्यक कर्मचारी यांनी परिश्रम घेतले. स्वच्छता, सजावट, सुरक्षा, विद्यार्थ्यांचे व्यवस्थापन या सर्व आघाड्यांवर त्यांनी जबाबदारीने काम केले. शाळेच्या प्राचार्यांनी सर्वांचे आभार मानत सांगितले की, “दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी अशा कार्यक्रमांचे आयोजन हे त्यांच्या मनोबलासाठी अत्यंत गरजेचे आहे. त्यांना समाजात आत्मविश्वासाने उभे राहण्यासाठी अशा उपक्रमांचा सतत लाभ मिळायला हवा.” कार्यक्रमाच्या सांगता सत्रात सर्वांनी पुन्हा एकदा सामूहिक नवकार मंत्र पठण केले आणि ‘विश्वशांती, करुणा आणि मानवतेचा प्रसार’ या संकल्पासह कार्यक्रमाची सांगता झाली. या कार्यक्रमातून केवळ अध्यात्मिक चेतना नव्हे, तर सामाजिक समरसता, दिव्यांग सक्षमीकरण, आणि शाळेच्या गुणवत्तापूर्ण कार्याचा प्रभावी परिचय मिळाला. स्वर्गीय कालिंदीबाई पांडे मतिमंद निवासी विद्यालयाने अशा उपक्रमातून समाजात एक आदर्श निर्माण केला आहे. दिव्यांग विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर उमटलेले आत्मसंतोषाचे हास्यच या कार्यक्रमाच्या यशस्वीतेचे खरे प्रमाण होते.

पाचोरा व भडगाव तालुक्याच्या शाळांना प्रथम क्रमांक; आमदार किशोर आप्पा पाटील यांनी केले मनापासून अभिनंदन

0

Loading

जळगाव जिल्ह्यात शिक्षण विभागाच्या पुढाकाराने आणि शासनाच्या प्रेरणेतून यंदा “मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा” या टप्पा क्रमांक-2 अंतर्गत आयोजित जिल्हास्तरीय व्हिडिओ निर्मिती व नवोपक्रम स्पर्धा सन 2024-25 या वर्षी अत्यंत प्रेरणादायी ठरली आहे. या स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ नुकताच जिल्हा नियोजन भवन, जळगाव येथे अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. जिल्ह्याच्या विविध भागांतील शाळांनी स्पर्धेत सहभाग घेतलेला असताना, विशेषतः पाचोरा तालुक्यातील होळ येथील प्राथमिक शाळा आणि भडगाव तालुक्यातील तांदूळवाडी येथील माध्यमिक शाळा यांनी या स्पर्धेत आपली गुणवत्ता आणि नाविन्यपूर्णता सिद्ध करत प्रथम क्रमांक पटकावला. या दोन्ही शाळांचे एक वेगळे वैशिष्ट्य म्हणजे त्या दोघीही शाळा आमदार किशोर आप्पा पाटील साहेब यांच्या मतदारसंघातील असून त्यांनी आपल्या भाषणातून त्यांचा गौरव करत सर्व संबंधितांचे विशेष अभिनंदन केले.
     या समारंभाच्या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेल्या आमदार किशोर आप्पा पाटील यांनी आपल्या भाषणात होळ आणि तांदूळवाडी शाळांनी प्राप्त केलेल्या यशाचे मनापासून कौतुक केले. त्यांनी सांगितले की, ग्रामीण भागातल्या शाळांनी शिक्षणाच्या दर्जामध्ये आणि उपक्रमशीलतेमध्ये घेतलेली झेप ही संपूर्ण जिल्ह्यासाठी अभिमानास्पद बाब आहे. यश मिळविण्यासाठी या शाळांतील मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी आणि पालकवर्ग यांनी दिलेले योगदान अत्यंत महत्त्वाचे असून, त्यांच्यामुळेच या शाळांनी जिल्हास्तरावर आपले वेगळेपण सिद्ध केले. आमदार पाटील यांनी सांगितले की, “शाळांचा शैक्षणिक आणि भौतिक विकास हा केवळ बांधकामांपुरता मर्यादित नसून, त्यामध्ये मूल्यशिक्षण, विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास, नवोपक्रमांची अंमलबजावणी आणि पालक-शाळा समन्वय हे घटकसुद्धा तितकेच महत्त्वाचे आहेत. या दोन्ही शाळांनी ते दाखवून दिले आहे.”
    समारंभात उपस्थित असलेल्या नामदार संजय सावकारे साहेब, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मा. मीनल करणवाल मॅडम, प्राथमिक शिक्षण अधिकारी मा विकासतात्या  पाटील, माजी महापौर सीमाताई भोळे यांच्यासह जिल्हाभरातील विविध शिक्षक, मुख्याध्यापक आणि शिक्षण क्षेत्रातील मान्यवरांनी या दोन्ही शाळांचे अभिनंदन करत त्यांचे काम उदाहरण ठरावे असे प्रतिपादन केले. मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करणवाल मॅडम यांनी आपल्या भाषणात शिक्षण विभागाने केलेल्या प्रयत्नांचे कौतुक करत यापुढे देखील अधिक सुसूत्र व उपक्रमशील कार्य करावे यासाठी दिशा दिली. त्यांनी विशेषत: नवीन C.O मीनल करणवाल मॅडम यांना उद्देशून सांगितले की, “शिक्षण विभाग हे जिल्ह्याचा पाया आहे. त्यामुळे या विभागाकडे विशेष लक्ष देऊन शिक्षणाचा दर्जा सातत्याने वाढविण्यासाठी प्रयत्नशील राहावे.”
     या स्पर्धेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी केलेल्या सादरीकरणाच्या व्हिडिओंमध्ये शाळांची अंतर्गत स्वच्छता, रंगरंगोटी, परिसर सौंदर्यीकरण, डिजिटल साक्षरता, मुलांना दिले जाणारे मूल्यशिक्षण, शालेय उपक्रम, पर्यावरणपूरक उपक्रम, तसेच पालक व ग्रामस्थांच्या सहभागाने झालेल्या सकारात्मक बदलांचे प्रभावी चित्रण करण्यात आले होते. या स्पर्धेचा मुख्य उद्देश केवळ स्पर्धात्मकतेचा नव्हता, तर प्रत्येक शाळेला स्वतःच्या विकासाचा विचार करायला प्रवृत्त करणे हा होता, हेही यावेळी अधोरेखित करण्यात आले.
     होळ येथील प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक आणि त्यांच्या शिक्षकवृंदांनी अत्यंत जिद्द, चिकाटी व नवकल्पनांचा वापर करत शाळेला फक्त स्वच्छ व सुंदरच नव्हे तर एक आदर्श शाळा म्हणून घडवले आहे. त्याचप्रमाणे, तांदूळवाडी येथील माध्यमिक शाळेतील विद्यार्थ्यांनी आणि शिक्षकांनी सर्जनशील व्हिडिओ सादरीकरणाद्वारे नवोपक्रमाच्या बाबतीत आपले वर्चस्व दाखवले. दोन्ही शाळांनी केवळ शासकीय निकष पूर्ण केले नाहीत, तर त्याहीपलीकडे जाऊन समाजात सकारात्मक बदल घडविण्याचा संदेश दिला.
        या समारंभात दोन्ही विजेत्या शाळांच्या शिक्षकांनी आपल्या मनोगतातून सांगितले की, “हे यश संपूर्ण गावाचे आहे. विद्यार्थ्यांनी मेहनत घेतली, पालकांनी सहकार्य केले, ग्रामस्थांनी पाठिंबा दिला आणि शासनाने संधी दिली – या सर्वांनी मिळूनच हे यश शक्य झाले.” विशेष म्हणजे, आमदार किशोर आप्पा पाटील साहेब हे त्यांच्या मतदारसंघातील शिक्षणविषयक उपक्रमांमध्ये नेहमीच सक्रिय भूमिका बजावत असतात. त्यांच्या मार्गदर्शनामुळे अनेक शाळांनी शैक्षणिक सुधारणा केल्या असून, यावेळी विजेत्या शाळांनीही आमदार साहेबांच्या प्रेरणेचा उल्लेख केला.
   जिल्हा पातळीवर आयोजित अशा उपक्रमांमधून विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास वाढतो, शिक्षकांमध्ये नावीन्यतेची जाणीव निर्माण होते आणि संपूर्ण शिक्षण व्यवस्थेत एक सकारात्मक ऊर्जा संचारते. या पार्श्वभूमीवर “माझी शाळा, सुंदर शाळा” स्पर्धा ही केवळ पुरस्कारापुरती मर्यादित न राहता, एक सामाजिक आणि शैक्षणिक चळवळ बनावी यासाठी सर्वच उपस्थितांनी एकत्रितपणे प्रयत्न करण्याचे ठरवले. या सोहळ्यात जिल्ह्यातील शेकडो शिक्षकांनी हजेरी लावून सहभागी शाळांना प्रोत्साहन दिले. समारंभाच्या अखेरीस उपस्थित सर्वांनी एकत्रितपणे शैक्षणिक प्रगतीसाठी एकसंघ राहण्याचे आणि नव्या युगाच्या गरजेनुसार शाळांना अधिक सक्षम बनविण्याचे संकल्प केले.
  या प्रकारच्या उपक्रमांमुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शहरातील विद्यार्थ्यांप्रमाणेच प्रोत्साहन मिळते आणि त्यांची सुप्त क्षमता उलगडण्यास संधी मिळते. शिक्षकांमध्ये देखील चांगले कार्य करण्यासाठी आवश्यक असलेला उत्साह जागृत होतो. म्हणूनच, जिल्हा नियोजन भवनात पार पडलेला हा बक्षीस वितरण सोहळा एक सामान्य कार्यक्रम न राहता, संपूर्ण जिल्ह्याच्या शैक्षणिक विकासाचा एक प्रेरणादायी क्षण ठरला. शिक्षण विभाग, स्थानिक प्रशासन, जनप्रतिनिधी आणि शाळा व्यवस्थापन यांच्यातील समन्वयाची ही जिवंत साखळी भविष्यातही कायम राहील, याची अपेक्षा सर्वांनी व्यक्त केली.
   या कार्यक्रमामुळे जळगाव जिल्ह्याच्या शैक्षणिक नकाशावर एक उजळ आणि सकारात्मक ठसा उमटवणारा नवा अध्याय लिहिला गेला असून, “माझी शाळा, सुंदर शाळा” या अभियानाचा उद्देश प्रत्यक्षात उतरवण्यात येथील शाळांनी केलेली कामगिरी भविष्यातील इतर शाळांसाठी प्रेरणास्थान ठरेल, हे निश्चित. जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून अशाच प्रकारचे उपक्रम राबवले गेले, तर शिक्षणक्षेत्रात एक नवे युग सुरू होईल, असा विश्वास अनेकांनी व्यक्त केला.

पाचोरामध्ये ‘लंडन किड्स’ या आंतरराष्ट्रीय संकल्पनेवर आधारित प्रिस्कूलचे भव्य उद्घाटन आमदार किशोर आप्पा यांच्या हस्ते संपन्न

0

Loading

पाचोरा : पाचोरा शहरात जागतिक दर्जाच्या शिक्षणाची नवी वाट उघडणाऱ्या ‘लंडन किड्स’ या आंतरराष्ट्रीय संकल्पनेवर आधारित प्लेग्रुप व प्रिस्कूलच्या भव्य उद्घाटन सोहळ्याचे आयोजन दिनांक ०३ एप्रिल २०२५ रोजी सायंकाळी ५.३० वाजता स्वामी समर्थ केंद्राच्या शेजारी, संघवी कॉलनी, पाचोरा येथे करण्यात आले. या कार्यक्रमास नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून भव्य स्वागत केले.      या शुभप्रसंगी उद्घाटन मा. आप्पासाहेब किशोर धनसिंग पाटील (आमदार पाचोरा-भडगाव) यांच्या शुभहस्ते संपन्न झाले. त्यांच्यासह पाचोऱ्याच्या विविध क्षेत्रातील मान्यवर, शिक्षणप्रेमी नागरिक, पालकवर्ग आणि लहान बालकांची मोठी उपस्थिती होती.                  लंडन किड्स हे युके कॉन्सेप्टवर आधारित एक आंतरराष्ट्रीय दर्जाचे प्रिस्कूल असून त्यात प्ले ग्रुप, नर्सरी, ज्युनियर केजी आणि सीनियर केजी अशा सर्व शैक्षणिक टप्प्यांचा समावेश आहे. मुलांच्या सर्वांगीण विकासावर भर देणाऱ्या या संस्थेमध्ये ऑडियो-व्हिडीओ शिक्षण पद्धती, योगा फिटनेस प्रोग्राम, संगीत व हस्तकला अशा अनेक उपक्रमांच्या माध्यमातून मुलांना स्मार्ट व शार्प बनविण्याचा उद्देश आहे.‘London Kids म्हणजेच Smart Kids’ या ब्रीदवाक्याला साजेशी व्यवस्था या प्रिस्कूलमध्ये करण्यात आली असून, संपूर्ण परिसर सीसीटीव्ही निगराणीत, डॉक्टर ऑन कॉलसह मासिक वैद्यकीय तपासणी, जागतिक स्तरावरील अवॉर्डप्राप्त ब्रँड, प्रत्येक १० विद्यार्थ्यांमागे १ शिक्षक, हवेशीर आणि सुरक्षित जागा, अशा सुविधा येथे उपलब्ध आहेत.हा ब्रँड २७ राज्यांमध्ये विस्तारलेला असून, एकूण १३७५ सेंटर कार्यरत आहेत. २०१९ साली ‘सिलिकॉन इंडिया’तर्फे ‘मोस्ट प्रॉमिसिंग प्रिस्कूल’ आणि ‘मोस्ट पॉप्युलर ब्रँड’ असा प्रतिष्ठेचा जागतिक पुरस्कारही या संस्थेला मिळालेला आहे.कार्यक्रमात संचालक मंडळाचे जितेंद्र बंसिलाल जैन (चेअरमन), नितीन स्वतंत्र जैन (कोषाध्यक्ष), महावीर दिलीप श्रीश्रीमाळ, यश मनोज संघवी, डॉ. प्रितेश पन्नालाल संकलेचा, आदेश विजय संघवी, डॉ. रोहित सतीश बोथरा (सेक्रेटरी), इंजी. कल्पेश नेमीचंद धाडीवाल, इंजी. भुषण अनिल बांठीया, कमलेश केवलचंद सुराणा, रोशन दिलीप पारख, मयुर सुनिल बाफना आदी प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.शाळेच्या प्रिंसिपल सौ. प्रियंका कुमावत यांच्यासह शिक्षकवृंद सौ. चांदनी चेतन ओझा, सौ. मेहेर अनिल नागरानी मॅडम आहे तसेच कु. भावना संजय चोरडिया ह्या योगा व मेडिटेशनसाठी शिक्षिका असणार आहे . तसेच नवकार ग्रुप, पाचोरा, प्रथम राजेंद्र बाफणा, अनुप विजय बरमट आणि सुरेश सुपडू पवार यांचे विशेष सहकार्य लाभले. उद्घाटनानंतर ४ एप्रिल ते ११ एप्रिल दरम्यान सकाळी ९.३० ते ११.३० या वेळेत Free Activity Camp घेण्यात येणार असून, यामध्ये लहान मुलांसाठी विविध मनोरंजक व शैक्षणिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. ‘Enroll Now – Limited Seats’ अशी विशेष घोषणा करून पालकांना नावनोंदणीसाठी आवाहन करण्यात आले आहे.हा कार्यक्रम अत्यंत उत्साहात, उत्सवी वातावरणात, शिस्तबद्ध व कलात्मक पद्धतीने पार पडला. पालकांनी व उपस्थित मान्यवरांनी शाळेच्या सुविधांचे व संकल्पनेचे भरभरून कौतुक केले. London Kids ही संकल्पना पाचोऱ्यातील बालशिक्षण क्षेत्राला नवा आयाम देणारी ठरणार असल्याचा विश्वास अनेकांनी व्यक्त केला. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व सदस्यांचे व स्वयंसेवकांचे विशेष योगदान लाभले. उपस्थित सर्व नागरिकांनी या नवनवीन उपक्रमाचे स्वागत करत संस्थेला शुभेच्छा दिल्या.

गुढे गावातील शासकीय जमिनीवर महानुभाव पंथासाठी दफनभूमी मंजूर; आमदार किशोरआप्पा पाटील यांच्या हस्ते आदेशांचे वितरण

0

Loading

भडगाव – तालुक्यातील गुढे या गावातील महानुभाव पंथीय नागरिकांसाठी एक ऐतिहासिक आणि अत्यंत महत्वाचा निर्णय आज सकाळी घेण्यात आला. पाचोरा प्रांत कार्यालयात सकाळी ११ वाजता आयोजित करण्यात आलेल्या एका विशेष कार्यक्रमात गुढे गावातील शासकीय जमिनीवर महानुभाव पंथासाठी दफनभूमी मंजूर करण्यात आली, आणि या संदर्भातील अधिकृत आदेश मा. आमदार किशोरआप्पा पाटील यांच्या हस्ते गावातील संबंधित नागरिकांना प्रदान करण्यात आले.
या निर्णयामुळे अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला आणि गावातील महानुभाव समाजाच्या धार्मिक, सामाजिक भावनांशी निगडीत असलेला प्रश्न आज एकदाचा मार्गी लागला आहे. गावातील महानुभाव समाजाने सातत्याने विविध शासकीय कार्यालये, स्थानिक स्वराज्य संस्था, आणि जनप्रतिनिधी यांच्याकडे आपली दफनभूमीची मागणी मांडली होती. मात्र, विविध कारणांमुळे हा विषय गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित राहिला होता.
आजच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रांताधिकारी भूषण अहिरे उपस्थित होते. यावेळी ग्रामसेवक, तलाठी, मंडळ अधिकारी, आणि महसूल विभागातील संबंधित कनिष्ठ लिपिक सुरेस सोळूंके हजर होते.
प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले आमदार किशोर आप्पा पाटील यांनी आपल्या भाषणात सांगितले की, “गुढे गावातील महानुभाव समाजाने ही मागणी अत्यंत संयम आणि शिस्तबद्ध पद्धतीने सातत्याने केली होती. त्यांच्या भावना मी समजून घेतल्या आणि योग्य प्रशासकीय प्रक्रियेनंतर आज ही दफनभूमी मंजूर करण्यात आली आहे. हे केवळ एक भूमी आरक्षण नसून, समाजाच्या आत्मिक गरजांचा आदर करणारा निर्णय आहे.”
या प्रसंगी गावातील अनेक ज्येष्ठ नागरिक, महिलावर्ग, तरुण कार्यकर्ते आणि सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यांच्या चेहऱ्यावर समाधान आणि कृतज्ञतेची भावना स्पष्ट दिसून येत होती.
गुढे गावातील महानुभाव समाजासाठी दफनभूमी ही केवळ एक धार्मिक आवश्यकता नसून, ती त्यांच्या परंपरांचे जतन करण्यासाठी अत्यावश्यक बाब ठरते. यापूर्वी अनेक वेळा अंत्यसंस्कारासाठी गावाबाहेरील खाजगी शेतजमिनीवर किंवा इतर समाजाच्या जागांवर तात्पुरती परवानगी घ्यावी लागत होती. यामुळे समाजाला केवळ धार्मिक अडचणी नव्हे तर सामाजिक अपमानही सहन करावा लागत होता.
या संदर्भात गावातील अनेक नागरिकांनी वेळोवेळी निवेदने, अर्ज, आणि ग्रामसभांमध्ये ठराव केले होते. त्यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळेच आजचा हा निर्णय शक्य झाला आहे. दफनभूमीसाठी आरक्षित करण्यात आलेली शासकीय या जागेची मोजणी महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत करण्यात आली असून, लवकरच त्याचे सीमांकन व नकाशा तयार करून समाजाच्या ताब्यात देण्यात येणार आहे.
या संदर्भात महसुल कार्यालयानेही तत्परता दाखवली असून, आवश्यक कागदपत्रांची पडताळणी, जागेचे सर्वेक्षण, आणि स्थानिक प्रशासनाच्या मान्यतेनंतर मंजुरीसाठी प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठवण्यात आला होता. त्याला लवकरच मान्यता मिळाल्यामुळे आज अधिकृत आदेश गावकऱ्यांच्या हाती सुपूर्द करण्यात आले.
यावेळी उपस्थित ग्रामस्थांनी “गावात सर्व समाज बांधवांनी परस्पर समन्वयाने या प्रक्रियेस मदत केली. कोणत्याही वादविवादाशिवाय शांततेत ही प्रक्रिया पूर्ण होणे ही गावासाठी गौरवाची बाब आहे.” तसेच त्यांनी आमदार किशोर आप्पा पाटील यांचे विशेष आभार मानले की, “त्यांनी प्रशासनावर योग्य वेळी योग्य दबाव आणून या मागणीला मूर्त स्वरूप दिले.”
कार्यक्रमात महानुभाव पंथाचे स्थानिक प्रतिनिधी यांनीही आपले विचार मांडताना प्रशासनाचे व आमदारांचे आभार मानले. त्यांनी सांगितले की, “दफनभूमी ही आमच्या धार्मिक संस्कृतीचा अत्यंत संवेदनशील भाग आहे. आता आम्हाला योग्य पवित्र जागा मिळाल्यामुळे आमची पुढची पिढीही याच परंपरेनुसार शेवटचा विधी पार पाडू शकेल.”
आमदार किशोरआप्पा पाटील यांनी आपल्या भाषणात पुढे सांगितले, “मी केवळ एका समाजासाठी नव्हे, तर संपूर्ण मतदारसंघातील सर्व घटकांप्रती जबाबदार आहे. जोपर्यंत समाजामध्ये अन्याय, भेदभाव आणि अनावश्यक विलंब होत राहील, तोपर्यंत मी त्याच्या विरोधात आवाज उठवत राहीन. प्रत्येक धर्माला व समाजाला त्यांचे धार्मिक हक्क आणि गरजा पूर्ण करण्याचा अधिकार आहे, आणि त्यासाठी मी नेहमीच कटीबद्ध राहीन.”
कार्यक्रमाचा समारोप करताना प्रांत कार्यालयाचे प्रतिनिधी म्हणून उपस्थित असलेल्या कनिष्ठ लिपिक सुरेस सोळूंके सांगितले की, “संपूर्ण प्रक्रिया नियमानुसार पार पाडली असून, या पुढे देखील समाजाच्या गरजेनुसार आवश्यक त्या सुविधा देण्यासाठी प्रशासन सज्ज आहे.” त्यांनी उपस्थित नागरिकांना पुढील प्रक्रिया, सीमांकन, पावती वाटप, आणि जमिनीचा वापर कसा करावा याबाबत मार्गदर्शन केले.
या ऐतिहासिक निर्णयानंतर गावात उत्साहाचे वातावरण आहे. नागरिकांनी मिठाई वाटून आनंद साजरा केला. अनेकांनी सोशल मिडिया, व्हॉट्सअॅप गटांवरून आपले समाधान व्यक्त केले आणि एकमेकांचे अभिनंदन केले.
गुढे गावात आज नोंद झाला एक ऐतिहासिक दिवस! केवळ एका समाजासाठी जागा मिळाली नाही, तर समतेचे, समानतेचे, आणि सहिष्णुतेचे उदाहरण निर्माण झाले आहे. हा निर्णय फक्त महानुभाव समाजापुरता मर्यादित न राहता, गावातील इतर समाज घटकांनाही प्रेरणा देणारा ठरेल, असे मत अनेकांनी मांडले आहे.
यापुढील टप्प्यात समाजाकडून त्या जागेच्या सुशोभीकरणासाठी, संरक्षक भिंतीसाठी, आणि अंत्यसंस्कारासाठी आवश्यक त्या सुविधा उभारण्यासाठी ग्रामसभा, दानशूर व्यक्ती आणि स्थानिक निधी यांचा वापर करून पुढील योजना आखण्यात येणार आहेत.
आजचा निर्णय प्रशासन, लोकप्रतिनिधी आणि समाज यांच्या सहकार्यातून काय साध्य होऊ शकते, याचे मूर्तिमंत उदाहरण आहे. महानुभाव पंथीय समाजाच्या धर्मभावना, परंपरा आणि आत्मसन्मान यांना दिलेले हे समर्थन आजच्या काळात अत्यंत आवश्यक आणि प्रेरणादायी ठरत आहे.

कोलकाताने केला हैदराबादचा ८० धावांनी पराभव, वरुण आणि वैभवने प्रत्येकी तीन विकेट घेतल्या

0

Loading

मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : कोलकाता नाईट रायडर्सने गुरुवारी आयपीएल २०२५ मध्ये त्यांच्या घरच्या ईडन गार्डन्स स्टेडियमवर सनरायझर्स हैदराबादचा ८० धावांनी पराभव केला. प्रथम फलंदाजी करताना कोलकाताने वेंकटेश अय्यर, अंगकृष रघुवंशी आणि रिंकू सिंग यांच्या खेळीच्या जोरावर २० षटकांत सहा गडी गमावून २०० धावा केल्या. या धावसंख्येसमोर हैदराबादचा स्फोटक फलंदाजी क्रम १६.४ षटकांत १२० धावांवर कोसळला.
एकेकाळी कोलकात्यासाठी १५० धावांचा टप्पाही कठीण वाटत होता, पण शेवटच्या पाच षटकांत ७८ धावा करून संघाने एक मजबूत धावसंख्या गाठली. यामध्ये अय्यरने २९ चेंडूत सात चौकार आणि तीन षटकारांसह ६० धावांची खेळी महत्त्वाची भूमिका बजावली. त्याच्याशिवाय रिंकू सिंगने १७ चेंडूत ३२ धावा केल्या. अंगकृष रघुवंशीने ३२ चेंडूत पाच चौकार आणि दोन षटकारांच्या मदतीने ५० धावा केल्या. 
या हंगामात हैदराबादचा हा सलग तिसरा पराभव आहे. यापूर्वी, ३० मार्च रोजी त्यांना दिल्ली कॅपिटल्सकडून पराभव पत्करावा लागला होता. २७ मार्च रोजी लखनौ सुपर जायंट्सने हैदराबादमध्येच त्यांचा पराभव केला. कोलकाताविरुद्ध संघाला मिळालेला पराभव हा हैदराबादचा आयपीएलमधील सर्वात मोठा पराभव आहे. 
हैदराबादला जिंकण्यासाठी २०१ धावांची आवश्यकता होती आणि त्यांच्या फलंदाजीचा विचार करता हे कठीण वाटत नव्हते. ट्रॅव्हिस हेड आणि अभिषेक शर्मा यांच्याकडून वादळी खेळी अपेक्षित होती. वैभव अरोराच्या पहिल्याच चेंडूवर चौकार मारून हेडने कोलकाताला धक्का दिला पण पुढच्याच चेंडूवर हर्षित राणाने त्याला झेलबाद केले. दुसऱ्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर राणाने अभिषेकलाही तंबूमध्ये पाठवले. त्याला फक्त दोन धावा करता आल्या.
वैभवने इशान किशनच्या खेळीला ब्रेक लावला. त्याला फक्त दोन धावा करता आल्या. नितीश कुमार रेड्डी देखील आपला डाव १९ धावांपेक्षा जास्त पुढे नेऊ शकले नाहीत. कामिंदू मेंडिसला नरिनने बाद करून हैदराबादला पाचवी विकेट मिळवून दिली. अनिकेत वर्मा देखील या सामन्यात काही खास कामगिरी करू शकला नाही. त्याला वरुण चक्रवर्तीने बाद केले. त्याच्या खात्यात सहा धावा आल्या.
हेनरिक क्लासेन एकटाच लढत होता, पण १५ व्या षटकाच्या चौथ्या चेंडूवर वैभवने त्याचा डावही संपवला. उजव्या हाताच्या फलंदाजाने २१ चेंडूत ३३ धावा केल्या ज्यामध्ये दोन चौकार आणि दोन षटकारांचा समावेश होता. १५ चेंडूत १४ धावा काढल्यानंतर कर्णधार पॅट कमिन्स वरुणचा बळी ठरला. त्यानंतर वरुणने सरजीत सिंगला बाद करून हैदराबादचा नववा बळी घेतला. रसेलने हर्षल पटेलला बाद करून हैदराबादचा डाव संपवला. 
कोलकाताकडून वैभव आणि वरुणने प्रत्येकी तीन विकेट्स घेतल्या. रसेलने दोन विकेट घेतल्या. राणा आणि नरेन यांना प्रत्येकी एक यश मिळाले. 
आयपीएल लिलावात २३.७५ कोटी रुपयांना विकला गेलेला अय्यर गेल्या तीन सामन्यांमध्ये फक्त नऊ धावा करू शकला आणि त्याच्यावर इतके पैसे खर्च करण्याबद्दल प्रश्न उपस्थित केले जात होते, परंतु अय्यरने हैदराबादविरुद्ध शानदार फलंदाजी करून त्याला इतके महागडे का मानले जाते हे दाखवून दिले. हैदराबादचा कर्णधार पॅट कमिन्सने टाकलेल्या १९ व्या षटकात अय्यरने तीन चौकार आणि एक षटकार मारत २१ धावा केल्या.
जेव्हा अय्यर फलंदाजी करत असे तेव्हा रिंकू सिंगच्या बॅटमधूनही धावा येत असत. त्याने १७ चेंडूत नाबाद ३२ धावा केल्या, ज्यात चार चौकार आणि एक षटकार होता. गेल्या हंगामापासून रिंकू फॉर्ममध्ये नव्हता. चालू हंगामात गेल्या तीन सामन्यांमधील दोन डावांमध्ये त्याने फक्त २९ धावा केल्या होत्या.
पॅट कमिन्स आणि मोहम्मद शमी यांच्या जोडीने कोलकात्याला सुरुवातीचा धक्का दिला. कमिन्सने त्याच्या पहिल्याच षटकात यष्टिरक्षक-फलंदाज क्विंटन डी कॉक (०१) ला बाद केले. त्यानंतर शमीने नरेनला (०७) बाद केले.
कोलकाताने फक्त १६ धावांत दोन विकेट गमावल्या होत्या. त्यानंतर, कर्णधार अजिंक्य रहाणे (३८) आणि युवा फलंदाज अंगकृष रघुवंशी (५०) यांनी डाव सावरला आणि संघाला १०० धावांच्या जवळ नेले. दोघांनीही ८१ धावांची महत्त्वाची भागीदारी केली. रघुवंशीने ३२ चेंडूत ५० धावा केल्या. त्याच्या खेळीत पाच चौकार आणि दोन षटकारांचा समावेश होता. या दोघांनंतर, अय्यर आणि रिंकूने काम केले आणि कोलकात्याला २०० पर्यंत पोहोचवले.

पाचोऱ्यातील पत्रकारांचा स्वाभिमानी लढा : बोगस पत्रकारांचा भांडाफोड आणि खरी पत्रकारिता टिकवण्यासाठीचा संघर्ष

0

Loading

पत्रकारिता म्हणजे लोकशाहीचा चौथा स्तंभ. समाजात होणाऱ्या चांगल्या-वाईट घडामोडी जनतेसमोर मांडण्याचं, प्रशासन आणि जनतेमधील संवाद कायम ठेवण्याचं, अन्यायाविरोधात आवाज उठवण्याचं आणि लोकांच्या प्रश्नांना वाचा फोडण्याचं हे एक महत्त्वाचं माध्यम आहे. मात्र, दुर्दैवाने आजच्या काळात या पवित्र क्षेत्रात काही बोगस प्रवृत्ती घुसून केवळ आपल्या स्वार्थासाठी पत्रकारितेचा वापर करत आहेत. विशेषतः पाचोरा शहरात गेल्या काही वर्षांत अशा प्रवृत्तींचं प्रमाण झपाट्याने वाढले असून, यामुळे खरी पत्रकारिता आणि खऱ्या पत्रकारांचे अस्तित्वच धोक्यात आले आहे. म्हणूनच आज हा लढा कुणा एका व्यक्तीसाठी नाही, तर पाचोऱ्यातील संपूर्ण पत्रकार समाजाच्या स्वाभिमानासाठी आणि अस्तित्वासाठी उभारण्यात आला आहे. पाचोरा परिसरात अनेक ठिकाणी काही मंडळी पत्रकारांच्या नावाचा गैरवापर करून विविध प्रकारचे व्यवहार, धंदे आणि हप्तेखोरी चालवत आहेत. पोर्टल सुरू करून केवळ चार बातम्या टाकून, त्यावर पत्रकार ओळखपत्र काढून अनेक जण स्वतःला ‘पत्रकार’ म्हणवून घेतात. त्यानंतर हे लोक स्वतःचे अस्तित्व निर्माण करण्यासाठी खोट्या बातम्यांचा सुळसुळाट करतात, दबाव टाकतात, आणि आर्थिक फायदे मिळवण्याचा प्रयत्न करतात. ही प्रवृत्ती पाचोरा शहराच्या माध्यमविश्वासाठी धोकादायक बनली आहे. या प्रवृत्तीच्या विरोधात अनेक स्वाभिमानी पत्रकार आता आवाज उठवत आहेत. हे कोणत्याही वैयक्तिक स्वार्थासाठी नाही. हा संघर्ष त्या प्रत्येक पाचोऱ्यातील पत्रकारासाठी आहे, ज्यांनी वर्षानुवर्ष मेहनत, सचोटी आणि निष्ठेने पत्रकारिता केली आहे. हे लोक कोणत्याही सणासुदीच्या काळात, निवडणुकीच्या वेळेस भोंदू पत्रकारांनी केलेल्या अडथळ्यांमुळे दुय्यम ठरत आहेत.
विशेषतः पाचोऱ्यात निवडणुकीच्या काळात आणि दिवाळीच्या सणात एकाच पोर्टलचे पाच – पाच, सहा – सहा पत्रकार निर्माण होतात. त्याचवेळी एकाच संघटनेचे पंधरा ते पंचवीस पदाधिकारी अचानक पुढे येतात. या सर्वांची योजना स्पष्ट असते – राजकीय नेत्यांकडून, अधिकाऱ्यांकडून, व्यावसायिकांकडून विविध मार्गांनी पाकीटे गोळा करणं. अनेक वेळा हे लोक शासकीय पत्रकार परिषदांमध्ये पुढे झळकतात, आणि खरी मेहनती पत्रकार मंडळी मागे राहतात. पाचोरा शहरात अनेकजण यामुळे नाराज असून, खऱ्या पत्रकारांचे मनोबल खच्ची होत आहे.पाचोऱ्यात आज अशी स्थिती आहे की वर्षानुवर्ष काम करणाऱ्या पत्रकारांना देखील या बोगस पत्रकारांबरोबर एकाच रांगेत मोजलं जातं.आता तर खाटांच्या? लॉज स्पेशली हायवे लगत असलेल्या व्यवसायाकडे जाणारे जोडप्याचे व वाहनांचे फोटो काढून त्या जोडप्याला ब्लॅकमेलिंग करून पैसे उकळण्याचे धंदे सुरू केले आहे ही केवळ शरमेची बाब नाही, तर संपूर्ण पत्रकारितेच्या क्षेत्राला गालबोट लावणारी घटना आहे. याला आता पूर्णविराम देण्याची वेळ आली आहे.
पाचोऱ्यात वाढलेल्या बोगस पत्रकार संघटनांच्या संख्येमुळे परिस्थिती आणखी बिकट झाली आहे. कोणतीही नोंदणी नसलेल्या, केवळ ओळखीवर आधारलेल्या संघटना ‘पत्रकार संघटना’ म्हणून उभ्या राहत आहेत. अशा संघटनांमध्ये राज्या पासून ते तालुकाध्यक्ष, जिल्हाध्यक्ष, महिला आघाडी, युवा आघाडी अशी पदं वाटली जातात, आणि त्या आडून सुरु होतो खरा धंदा – हप्तेखोरी, ब्लॅकमेलिंग, आणि शासकीय कार्यालयांवर दबाव निर्माण करणं
या सर्व प्रकारांना आता पाचोऱ्यातूनच खडसावून उत्तर देण्याची गरज आहे. पाचोऱ्यातील प्रामाणिक पत्रकारांनी एकत्र येऊन या भोंदू पत्रकारांचे आणि त्यांच्या बनावट संघटनांचे बुरखे फाडले पाहिजेत. बातम्यांच्या माध्यमातून, पत्रकार संघटनांच्या एकत्रित कृतीद्वारे, आणि जनतेसमोर खरा चेहरा उघड करून हा लढा यशस्वी करावा लागेल.
म्हणूनच मी पाचोऱ्यातील सर्व सजग, निर्भीड आणि न्यायप्रिय पत्रकार बांधवांना आवाहन करतो – हा लढा वैयक्तिक नसून आपल्या सर्वांच्या अस्तित्वासाठी आहे. बोगस पत्रकारांच्या प्रवृत्तीला पाचोऱ्यातूनच ब्रेक देण्याची ही वेळ आहे. खरी पत्रकारिता वाचवण्यासाठी, खऱ्या पत्रकारांचा सन्मान टिकवण्यासाठी आणि समाजापर्यंत योग्य माहिती पोहोचवण्यासाठी आपण सर्वांनी एकत्र येणं गरजेचं आहे.
जर आपण आजही गप्प राहिलो, तर उद्या पाचोऱ्यात खरी पत्रकारिता हरवेल, आणि उरतील केवळ बोगस हक्कांच्या नावाखाली उभे असलेले नकली पत्रकार. म्हणूनच आता वेळ आली आहे खरी पत्रकारिता वाचवण्याची, आणि खऱ्या पत्रकारांसाठी जागा निर्माण करण्याची.अवैध व्यवसाय व धंदेवाल्यांना देखील विनंती आमचा तुमचा काही एक संबंध नाही स्वाभिमानी पत्रकार तुमच्या कधी संपर्कातही आले नाही किंवा तुमच्या पैशांची गरज देखील नाही आपले काय आणि कोणते व्यवसाय कसे कुणाच्या आशीर्वादाने करायची तो तुमचा वैयक्तिक भाग आहे व त्यासाठी तुमचे वैयक्तिक परिश्रम आहेत मात्र तुम्ही देखील अशा चुकीच्या प्रवृत्तीला पत्रकारितेच्या नावावर खतपाणी घालू नका आजपर्यंत पाचोर्‍यात असे घडले नाही व ही प्रथादेखील तुम्ही पाडू नका एवढीच विनंती

ताज्या बातम्या

error: Content is protected !!