Home Blog Page 18

खान्देशच्या मातीचा सिंह गर्जला! आंतरराष्ट्रीय कुस्तीमध्ये हितेश पाटील यास सुवर्ण पदक

0

Loading

पाचोरा – बँकॉक, थायलंड येथे इंटरनॅशनल ऑलिम्पिक स्पोर्ट ऑर्गनायझेशन कमिटीच्या मान्यतेने आयोजित इंटरनॅशनल रेसलिंग चॅम्पियनशिप 2026 स्पर्धेत खान्देशच्या मातीत घडलेल्या पैलवानाने आंतरराष्ट्रीय आखाड्यावर भारताचा झेंडा अभिमानाने फडकवला आहे. मलेशिया, थायलंड, श्रीलंका आणि भारत या देशांच्या सहभागाने पार पडलेल्या या प्रतिष्ठेच्या स्पर्धेत भारताच्या संघाने मिशन ओलंपिक गेम्स असोसिएशन इंडिया यांच्या वतीने सहभाग नोंदवला होता. बेळगाव येथे झालेल्या अखिल भारतीय कुस्ती स्पर्धेतून निवड झालेल्या खेळाडूंमधून १२५ किलो वजनगटासाठी जळगाव जिल्ह्याचे सुपुत्र पै. हितेश अनिल पाटील यांची निवड झाली होती. वरिष्ठ गटात भारताचे प्रतिनिधित्व

करत त्यांनी अत्यंत चुरशीच्या अंतिम लढतीत थायलंडच्या बलाढ्य पैलवानावर मात करत सुवर्णपदकावर आपले नाव कोरले आणि संपूर्ण देशाला अभिमानाचा क्षण दिला. ताकद, तांत्रिक कौशल्य, संयम आणि रणनीती यांचा सुरेख मिलाफ दाखवत पै. हितेश पाटील यांनी हा सामना जिंकत भारतासाठी सर्वोच्च सन्मान मिळवून दिला. महाराष्ट्र केसरीसाठी जळगाव जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करणारा हा खेळाडू आज आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर सुवर्णविजेता ठरला असून त्याच्या सातत्यपूर्ण मेहनतीचे हे फलित मानले जात आहे. आशियाई सुवर्णपदक विजेते व मिशन ओलंपिक गेम्स असोसिएशन इंडिया चे सरचिटणीस प्रा. पै. अमोल साठे यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय संघाने या स्पर्धेत सहभाग घेतला होता. त्यांच्या अनुभवसंपन्न मार्गदर्शनामुळे संघाला योग्य तयारी, आत्मविश्वास आणि यशाची दिशा मिळाली. या सुवर्णयशामुळे भारतीय कुस्तीपटूंना आंतरराष्ट्रीय स्तरावर नवे व्यासपीठ उपलब्ध झाले असून संघटनेच्या कार्यपद्धतीचे देशभर कौतुक होत आहे. पाचोरा तालुक्यातील शेतकरी कुटुंबातून आलेले पै. हितेश पाटील हे पाचोरा पंचायत समितीचे माजी सभापती तसेच पाचोरा कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक अनिल धना पाटील (गाळण) यांचे सुपुत्र आहेत. ग्रामीण भागातील कष्ट, शिस्त आणि जिद्द याच संस्कारांतून घडलेला हा मल्ल पाचोरा येथील श्री एम. एम. महाविद्यालयाचा तसेच पत्रकार संदीप महाजन संचलित ध्येय करिअर अकॅडमीचा विद्यार्थी राहिला आहे. शिक्षणाबरोबरच कुस्तीची आवड जोपासत त्यांनी पाचोरा शहरातील जामनेर रोडवरील राम मंदिर परिसरातील महावीर व्यायाम शाळा येथे कुस्तीचे धडे गिरवले. याच आखाड्यात त्यांनी स्वतःला घडवले आणि राज्य, राष्ट्रीय स्तरावर आपली ओळख निर्माण केली. विशेष म्हणजे दोन वर्षे त्यांनी याच महावीर व्यायाम शाळेत कुस्तीचे कोच म्हणूनही जबाबदारी पार पाडत अनेक नवोदित मल्लांना घडवण्याचे कार्य केले आहे. आंतरराष्ट्रीय स्पर्धेतील या सुवर्णपराक्रमानंतर पाचोरा, जळगाव जिल्हा आणि संपूर्ण खान्देश परिसरात आनंदाची लाट उसळली असून कुटुंबीय, मित्रपरिवार, कुस्तीप्रेमी आणि नागरिकांकडून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. ग्रामीण भागातून आंतरराष्ट्रीय सुवर्णपदकापर्यंतचा पै. हितेश पाटील यांचा प्रवास अनेक तरुणांसाठी प्रेरणादायी ठरत असून मेहनत, शिस्त आणि योग्य मार्गदर्शनाच्या जोरावर जागतिक स्तरावर यश मिळवता येते, हा विश्वास अधिक बळकट झाला आहे.

सुमित किशोर आप्पा पाटील ॲक्शन मोडमध्ये : नागरिकांच्या मागणीला तात्काळ प्रतिसाद देत गिरणापंपींग रोड–गोकुळ धाम परिसरात दुसऱ्याच दिवशी स्ट्रीट लाईट बसवून दिलासा

0

Loading

पाचोरा – नगरपालिका शिंदे शिवसेनेचे गटनेते तथा प्रभाग क्रमांक नऊचे नगरसेवक सुमित किशोर आप्पा पाटील हे पाचोरा–भडगाव विधानसभा मतदारसंघात सर्वसामान्यांच्या सतत संपर्कात असणारे, रस्त्यावर उतरून काम करणारे आणि मनमिळाव व्यक्तिमत्त्व म्हणून ओळखले जातात. लोकप्रतिनिधी म्हणून केवळ पदाची जबाबदारी न पार पाडता प्रत्यक्ष कृतीतून नागरिकांच्या समस्या सोडविण्याची त्यांची कार्यशैली पुन्हा एकदा पाचोरा नगरपालिका हद्दीतील गिरणापंपींग रोड व गोकुळ धाम परिसरातील नागरिकांना अनुभवता आली. या परिसरात गेल्या काही काळापासून स्ट्रीट लाईट नसल्यामुळे रात्रीच्या वेळी अंधाराचे साम्राज्य होते. यामुळे महिलांना, ज्येष्ठ नागरिकांना, विद्यार्थ्यांना तसेच वाहनचालकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता. अंधारामुळे अपघातांचा धोका वाढला होता तसेच असामाजिक तत्वांची भीतीही नागरिकांमध्ये निर्माण झाली होती. या पार्श्वभूमीवर परिसरातील नागरिकांनी एकत्र येत तातडीने स्ट्रीट लाईट बसवाव्यात, अशी ठोस मागणी पाचोरा नगरपालिका गटनेते तथा प्रभाग क्रमांक नऊचे नगरसेवक सुमित किशोर आप्पा पाटील आणि सौ. दिपाली किशोर भास्कर पाटील यांच्याकडे केली. नागरिकांच्या या मागणीचे गांभीर्य ओळखत सुमित किशोर आप्पा पाटील यांनी कोणतीही दिरंगाई न करता तात्काळ संबंधित विभागाशी संपर्क साधला आणि प्रशासकीय पातळीवर आवश्यक पाठपुरावा करून कामाला गती दिली. विशेष म्हणजे नागरिकांनी मागणी केल्यानंतर अवघ्या 24 तासाच्या आत स्ट्रीट लाईट बसवण्याचे काम पूर्ण करून देण्यात आले, त्यामुळे परिसरात रात्रीच्या वेळी उजेड पडून नागरिकांनी सुटकेचा नि:श्वास टाकला. या वेळी बोलताना सुमित किशोर आप्पा पाटील यांनी आपली भूमिका स्पष्ट करत सांगितले की, “मी फक्त प्रभाग क्रमांक नऊचा नगरसेवक आणि पाचोरा नगरपालिका सत्ताधारी गटाचा गटनेताच नाही. पाचोरा–भडगाव विधानसभा मतदारसंघाची जबाबदारी जनतेने हॅट्रिक आमदार म्हणून माझे वडील किशोर आप्पा पाटील यांच्यावर विश्वासाने सोपवली आहे, तर पाचोरा नगरपालिकेचे नगराध्यक्षपद आमच्या मातोश्री सुनिताआई यांच्याकडे आहे. त्यामुळे लोकप्रतिनिधी म्हणूनच नव्हे, तर जनतेचा आणि माता–पित्यांचा ऋण म्हणून मला संपूर्ण मतदारसंघातील प्रत्येक व्यक्तीच्या आणि प्रत्येक परिसराच्या विकासासाठी सातत्याने ॲक्शन मोडमध्ये राहणे आवश्यक आहे.” या स्ट्रीट लाईट बसवण्याच्या कामामुळे रस्त्यावर प्रकाश उपलब्ध झाल्याने वाहतूक अधिक सुरक्षित झाली आहे, पादचाऱ्यांना दिलासा मिळाला आहे तसेच महिलांना, ज्येष्ठ नागरिकांना आणि विद्यार्थ्यांना निर्धास्तपणे हालचाल करता येत आहे. सौ. दिपाली किशोर भास्कर पाटील यांनीही नागरिकांच्या सहकार्यामुळेच विकासकामांना गती मिळत असल्याचे सांगत भविष्यातही अशाच प्रकारे नागरिकांच्या समस्या प्राधान्याने सोडविण्याचा निर्धार व्यक्त केला. नादागर सेवकपंपींग रोड व गोकुळ धाम परिसरातील स्ट्रीट लाईट बसवण्याचे काम जरी छोटे वाटत असले, तरी त्याचा थेट परिणाम नागरिकांच्या सुरक्षितता, सुविधा आणि जीवनमानावर होणारा असल्याने “मागणी केली आणि लगेच काम झाले,” अशी भावना नागरिकांमध्ये निर्माण झाली असून लोकप्रतिनिधी आणि जनता यांच्यातील विश्वास अधिक दृढ झाल्याचे चित्र यानिमित्ताने पाहायला मिळत आहे.

जळगावचे दोन भाऊ : पक्षनिष्ठेच्या कसोटीवर राज्यात वरचढ ठरलेले नेतृत्व

0

Loading

जळगाव – जिल्ह्याच्या राजकारणात गेली अनेक वर्षे प्रभाव टाकणारी, पण महापालिका निवडणुकीच्या निमित्ताने थेट राज्याच्या राजकीय केंद्रस्थानी पोहोचलेली दोन नावे म्हणजे भाजपचे संकटमोचक समजले जाणारे आणि शिंदे शिवसेनेचे साधेपणा, स्पष्टवक्तेपणा, कार्यकर्त्यांशी जवळीक आणि थेट हस्तक्षेप करणारा “लोकांचा मंत्री” म्हणून ओळखले जाणारे . राजकीय पक्ष वेगळे असले तरी नेतृत्वाची शैली, पक्षनिष्ठा आणि निवडणुकीच्या रणधुमाळीत दाखवलेली जिद्द यामुळे हे दोघेही भाऊ जळगावपुरते मर्यादित न राहता थेट महाराष्ट्राच्या राजकारणात चमकले आहेत. महापालिका निवडणूक ही केवळ स्थानिक स्वराज्य संस्थेची लढाई नसून ती पक्षांची संघटन क्षमता, नेतृत्वाची ताकद आणि कार्यकर्त्यांची निष्ठा यांची खरी परीक्षा असते आणि जळगाव महापालिका

निवडणुकीत ही परीक्षा अधिक कठीण ठरली. अंतर्गत नाराजी, बाह्य विरोधकांची आक्रमक टीका, सतत बदलणारी राजकीय समीकरणे आणि सत्तासंघर्ष यामुळे वातावरण तापलेले असताना गेल्या दोन महिन्यांपासून गिरीषभाऊ महाजन आणि गुलाबराव पाटील हे दोघेही भाऊ अंतर्गत व बाह्य विरोधकांच्या टीकेच्या तोंडी होते; कुणी संघटनात्मक निर्णयांवर बोट ठेवले, कुणी उमेदवार निवडीवर प्रश्न उपस्थित केले, तर कुणी थेट नेतृत्वक्षमतेवरच शंका घेतली, मात्र निकालांनीच अखेर सत्य स्पष्ट केले. भाजपमध्ये गिरीषभाऊ महाजन यांची ओळख संकटमोचक अशीच असून पक्ष अडचणीत असो, संघटन विस्कळीत झालेले असो किंवा कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम असो, तेथे ते सक्रिय होतात असा कार्यकर्त्यांचा अनुभव आहे; जळगाव महापालिका निवडणुकीतही उमेदवारांची मांडणी, बूथनिहाय रणनीती, नाराज गटांना सांभाळणे आणि आवश्यक तेव्हा कठोर निर्णय घेणे या सगळ्या बाबींमध्ये त्यांनी विलंब न करता निर्णयक्षमता दाखवली आणि काही निर्णयांमुळे जवळच्या कार्यकर्त्यांवर अन्याय झाल्याची भावना निर्माण होऊन नाराजी वाढली तरी पक्षहिताला प्राधान्य देत त्यांनी टीकेचा स्वीकार केला कारण त्यांच्या दृष्टीने व्यक्तीपेक्षा पक्ष मोठा होता. दुसरीकडे शिंदे शिवसेनेचे गुलाबराव पाटील हे थेट संपर्क ठेवणारे, साध्या भाषेत बोलणारे आणि कामाच्या बाबतीत आक्रमकपणे हस्तक्षेप करणारे मंत्री म्हणून ओळखले जातात; “लोकांचा मंत्री” ही उपाधी त्यांना सहज मिळालेली नसून प्रशासकीय अडथळे असोत किंवा कार्यकर्त्यांच्या तक्रारी, ते थेट अधिकाऱ्यांशी संवाद साधून काम मार्गी लावतात अशी त्यांची प्रतिमा आहे आणि महापालिका निवडणुकीत त्यांनी पक्षासाठी अहोरात्र परिश्रम घेत संघटन मजबूत केले, कार्यकर्त्यांना आत्मविश्वास दिला व विरोधकांच्या हल्ल्यांना प्रत्युत्तर दिले. या संपूर्ण प्रक्रियेत दोघांनीही वेळप्रसंगी कठोर निर्णय घेतले; उमेदवारी नाकारली जाणे, गटनेतृत्व बाजूला सारले जाणे, काही जुने कार्यकर्ते नाराज होणे अशा घटना घडल्या आणि टीकाकारांनी याच मुद्द्यांवरून दोघांनाही लक्ष्य केले, तरी “पक्ष हीच पहिली निष्ठा” हे तत्व त्यांनी जपले.भाजपचे सहा व शिंदे शिवसेनेचे सहा असे एकूण बारा नगरसेवक आधीच बिनविरोध झाले होते निवडणुकीच्या रणधुमाळीत असे वाटत होते की भाजप व शिंदे शिवसेनेला निवडक जागा मिळतील मात्र निकालांच्या दिवशी चित्र बदलले आणि दिल्लीपासून ते महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळापर्यंत तसेच थेट गल्लीतील कार्यकर्त्यांपर्यंत एकच चर्चा सुरू झाली की जळगाव महापालिकेच्या विजयामागे हे दोघेही भाऊ केंद्रबिंदू ठरले; पक्ष वेगळे असले तरी जळगाव जिल्ह्यातील राजकारणात दोघांनीही युती करून आपापल्या पक्षाला वरचढ स्थान मिळवून दिले, ही वस्तुस्थिती नाकारता येत नाही. या विजयाने स्पष्ट केले की फक्त घोषणाबाजी किंवा प्रचार पुरेसा नसून जमिनीवर काम करणारे कार्यकर्ते, बूथपर्यंत पोहोचलेली यंत्रणा आणि संकटात निर्णय घेणारे नेतृत्व आवश्यक असते आणि हेच दोघांनी दाखवून दिल्यामुळे ते आज राज्याच्या राजकारणात प्रभावी चेहरे म्हणून चर्चेत आहेत. “जळगावचे दोन भाऊ” ही संज्ञा केवळ प्रादेशिक अभिमानापुरती न राहता पक्षासाठी स्वतःला झोकून देणे, टीकेला सामोरे जाणे, आवश्यक तेव्हा कठोर भूमिका घेणे आणि निकालानंतर शांतपणे पुढील कामकाजाला लागणे या नेतृत्वशैलीचे प्रतीक बनली आहे; त्यामुळेच महापालिका निवडणुकीचा हा विजय अंतिम टप्पा नसून पुढील राजकीय लढतींची नांदी ठरतो आणि जळगाव जिल्ह्याचे नाव राज्याच्या राजकारणात ठळकपणे पुढे येते.

आज दि.17/01/2026 चे सर्व राशीचे भविष्य व शुभ अंक व रंग

0

Loading

मेष-आज कामात ठामपणा दिसेल. घेतलेले निर्णय योग्य दिशेने नेणारे ठरतील. आर्थिक बाबतीत खर्चावर नियंत्रण ठेवा. कुटुंबातील सहकार्य मनोबल वाढवेल.
शुभ अंक : 3 | शुभ रंग : तांबडा

वृषभ-दिवस संयमाचा आणि स्थैर्याचा आहे. नियोजित कामे वेळेत पूर्ण होतील. आर्थिक व्यवहार सुरक्षित राहतील. आरोग्याकडे थोडे अधिक लक्ष द्या.
शुभ अंक : 6 | शुभ रंग : हिरवा

मिथुन-संवाद कौशल्यामुळे अडचणी कमी होतील. नवीन माहिती उपयोगी ठरेल. कामात गती येईल. मानसिक समाधान मिळेल.
शुभ अंक : 5 | शुभ रंग : पिवळा

कर्क-भावनिक संतुलन राखणे आवश्यक आहे. घरगुती प्रश्न समजूतदारपणे सुटतील. आर्थिक स्थिती सुधारण्याकडे वाटचाल होईल. संयम लाभदायक ठरेल.
शुभ अंक : 2 | शुभ रंग : पांढरा

सिंह-आत्मविश्वासामुळे नेतृत्वाची संधी मिळू शकते. जबाबदाऱ्या यशस्वीरीत्या पार पडतील. वाद टाळल्यास मान वाढेल. वरिष्ठांचा पाठिंबा लाभेल.
शुभ अंक : 1 | शुभ रंग : सोनेरी

कन्या-कामातील बारकावे आज निर्णायक ठरतील. थोडा ताण जाणवू शकतो. खर्चाचे योग्य नियोजन आवश्यक आहे. आरोग्यासाठी विश्रांती घ्या.
शुभ अंक : 4 | शुभ रंग : निळा

तुला-नातेसंबंधात समतोल राखावा लागेल. सहकार्यामुळे रखडलेली कामे पूर्ण होतील. आर्थिक निर्णय सावधपणे घ्या. दिवस समाधानकारक राहील.
शुभ अंक : 7 | शुभ रंग : गुलाबी

वृश्चिक-धैर्य आणि एकाग्रता वाढलेली राहील. जुने प्रश्न मार्गी लागतील. आर्थिक लाभाची शक्यता आहे. गोपनीय बाबी जपून ठेवा.
शुभ अंक : 9 | शुभ रंग : मरून

धनु -नवीन संधींकडे लक्ष द्या. शिक्षण व प्रवासासाठी अनुकूल दिवस आहे. खर्चावर नियंत्रण ठेवा. सकारात्मक दृष्टिकोन लाभदायक ठरेल.
शुभ अंक : 8 | शुभ रंग : जांभळा

मकर-कर्तव्यदक्षतेमुळे प्रगती साधता येईल. कामात स्थैर्य राहील. आर्थिक स्थिती मजबूत राहण्याची शक्यता आहे. कुटुंबातील जबाबदाऱ्या नीट पार पडतील.
शुभ अंक : 10 | शुभ रंग : करडा

कुंभ-नवीन कल्पनांना प्रतिसाद मिळेल. सामाजिक संपर्क वाढतील. अचानक खर्च संभवतो. संयम आणि स्पष्टता ठेवा.
शुभ अंक : 11 | शुभ रंग : आकाशी

मीन-मन शांत ठेवण्याचा प्रयत्न करा. सर्जनशील कामात समाधान मिळेल. आर्थिक व्यवहार स्पष्ट ठेवा. दिवस साधारण पण सकारात्मक राहील.
शुभ अंक : 12 | शुभ रंग : समुद्री हिरवा

वाचकांनी वरील भविष्यवाणीचा अर्थ अचूक भविष्यवाणी म्हणून लावता केवळ आत्मपरीक्षण आणि सकारात्मक प्रेरणा म्हणून घ्यावा.

निसर्गाच्या सान्निध्यात ग्रामीण पर्यटनाचा नवा अध्याय : ‘श्री चिंतामणी कृषी पर्यटन केंद्र’चा भव्य शुभारंभ

0

Loading

पाचोरा – निसर्गाच्या कुशीत, मातीच्या सुगंधात आणि ग्रामीण संस्कृतीच्या आत्मीयतेत रमण्याची संधी देणारा एक नवा अनुभव पाचोरा तालुक्यात साकार होत असून ग्रामीण जीवनशैलीचा प्रत्यक्ष अनुभव, पारंपरिक चवीचे भोजन, शांत व प्रसन्न वातावरण आणि कुटुंबीय व मित्रांसोबत आनंदाचे अविस्मरणीय क्षण अनुभवण्यासाठी ‘श्री चिंतामणी कृषी पर्यटन केंद्र’ या नव्या उपक्रमाचा भव्य शुभारंभ सोहळा आयोजित करण्यात आला आहे. ग्रामीण महाराष्ट्राची खरी ओळख जपणारे हे कृषी पर्यटन केंद्र केवळ पर्यटन स्थळ न राहता शहरातील धकाधकीच्या जीवनातून काही काळ दूर जाऊन निसर्गाशी नाते जोडण्याचे प्रभावी माध्यम ठरणार आहे. येथे शेतीचा प्रत्यक्ष अनुभव, शिवार फेरी, ग्रामीण खेळ, जनावरांशी जवळून संवाद, तसेच पारंपरिक वातावरणात विरंगुळा घालवण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली असून लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांसाठी आनंद देणाऱ्या विविध उपक्रमांची विशेष आखणी करण्यात आली आहे. या कृषी पर्यटन केंद्रात स्विमिंग पूल, स्पेशल म्युझिकल रेन डान्स, घोडेस्वारी, घोडागाडी व बैलगाडीची शिवार फेरी, ट्रॅक्टर ट्रेन अशा आकर्षक सुविधा असून लहान मुलांसाठी स्वतंत्र खेळण्याची जागा, मुलांसाठी व मोठ्यांसाठी स्वतंत्र बोटिंगची व्यवस्था करण्यात आली आहे. यासोबतच एडव्हेंचर प्रकारातील दोरीवरील खेळ, निसर्गरम्य परिसरात पिकनिक स्पॉट, कॅम्पिंगची सुविधा उपलब्ध असल्याने येथे येणाऱ्यांना एक वेगळाच आनंददायी अनुभव मिळणार आहे. शाळा व महाविद्यालयांच्या सहली, निसर्ग भ्रमंती, वाढदिवस समारंभ, गेट-टुगेदर, कौटुंबिक मेळावे तसेच विविध सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी हे कृषी पर्यटन केंद्र अत्यंत उपयुक्त ठरणार असून प्रशस्त वाहनतळाची सुविधा असल्याने कुटुंबासह किंवा मोठ्या समूहाने येणाऱ्यांसाठीही कोणतीही अडचण राहणार नाही. निसर्गाच्या सान्निध्यात वेळ घालवत ग्रामीण जीवनाचा खरा आनंद घेण्यासाठी हे केंद्र एक आदर्श ठिकाण ठरणार आहे. ‘श्री चिंतामणी कृषी पर्यटन केंद्र’चा भव्य शुभारंभ सोहळा दिनांक 22 जानेवारी 2026 रोजी सकाळी 11.00 वाजता आयोजित करण्यात आला असून या मंगल प्रसंगी आपली उपस्थिती लाभावी, अशी आयोजकांची मनापासून इच्छा आहे. आपली उपस्थिती म्हणजेच या नव्या उपक्रमाला मिळणारे खरे बळ व प्रेरणा ठरेल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे. हे कृषी पर्यटन केंद्र वाडी शेवाळे-शिंदाड रोड, शिंदाड, ता. पाचोरा, जिल्हा जळगाव येथे असून अधिक माहितीसाठी 9423162365 या क्रमांकावर संपर्क साधता येणार आहे. निसर्ग, शेती आणि ग्रामीण संस्कृतीचा संगम अनुभवण्यासाठी कुटुंबासह ‘श्री चिंतामणी कृषी पर्यटन केंद्रा’ला नक्की भेट द्यावी, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

मीरा-भाईंदर प्रभाग 9 मध्ये काँग्रेसच्या ॲड सना खलील देशमुख यांचा दणदणीत विजय

0

Loading

पाचोरा – येथील सामाजिक कार्यकर्ते, लासगाव येथील मूळ रहिवासी आणि पाचोरा श्री गो से हायस्कूल शालेय समितीचे चेअरमन खालीलदादा देशमुख तसेच जिल्हा परिषद उर्दू हायस्कूलच्या सेवानिवृत्त मुख्याध्यापिका रेहाना देशमुख यांची कन्या ॲड सना खलील देशमुख यांनी मीरा-भाईंदर महापालिका प्रभाग क्रमांक 9 मधून भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या नगरसेविका म्हणून निवडणूक लढवत एकूण 57 टक्के मते मिळवून दणदणीत विजय मिळवला आहे. या प्रभागातील उर्वरित 43 टक्के मते इतर तीन उमेदवारांमध्ये विभागली गेली असून स्पष्ट बहुमतासह मिळालेल्या या विजयामुळे काँग्रेस पक्षाला या प्रभागात महत्त्वाचे बळ मिळाले आहे. ॲड सना खलील देशमुख यांचा हा विजय केवळ निवडणूक जिंकण्यापुरता मर्यादित नसून त्यांच्या गेल्या आठ ते नऊ वर्षांच्या सातत्यपूर्ण सामाजिक कार्याची ही ठोस पावती मानली जात आहे. निवडणूकपूर्व काळातच त्यांनी महिलांसाठी विविध रोजगाराभिमुख उपक्रम राबवत आर्थिक स्वावलंबनावर भर दिला होता. महिलांसाठी प्रशिक्षण, स्वयंरोजगाराच्या संधी, बचत गटांचे मार्गदर्शन तसेच कायदेशीर सल्ला व मदतीचे उपक्रम त्यांनी प्रत्यक्षात आणले होते. या कामामुळे महिलांमध्ये त्यांच्याविषयी विश्वास निर्माण झाला आणि त्यांच्या कार्याची ओळख घराघरात पोहोचली. सामाजिक आंदोलनांमध्येही ॲड सना देशमुख यांनी नेहमीच सक्रिय आणि ठाम भूमिका घेतली आहे. नागरी समस्या, महिला हक्क, शिक्षण, आरोग्य, स्वच्छता आणि मूलभूत सुविधांसाठी त्यांनी सातत्याने आवाज उठवला. सामान्य नागरिकांच्या प्रश्नांसाठी रस्त्यावर उतरून संघर्ष करण्याची त्यांची तयारी आणि प्रशासनाशी प्रभावी संवाद साधण्याची क्षमता यामुळे त्या परिसरात त्यांचे नाव लौकिकास आले. त्यामुळेच या निवडणुकीत मतदारांनी त्यांच्यावर मोठ्या विश्वासाने शिक्कामोर्तब केले. विशेष बाब म्हणजे ॲड सना खलील देशमुख या पाचोरा येथील श्री गो से हायस्कूलच्या विद्यार्थिनी होत्या. शालेय जीवनापासूनच शैक्षणिक प्रगतीसोबतच सांस्कृतिक क्षेत्रातही त्यांनी आपली छाप पाडली होती. वकृत्व, नृत्य आणि नेतृत्वगुण या तिन्ही बाबतीत त्या पुढे असल्याचे शिक्षक आणि सहपाठी नेहमीच सांगत. शालेय कार्यक्रमांमध्ये मंचावर आत्मविश्वासाने मांडणी करणे, संघटनात्मक जबाबदाऱ्या स्वीकारणे आणि सहकार्याची भावना जोपासणे हे गुण त्यांच्या व्यक्तिमत्त्वात लहानपणापासूनच दृढ झाले. कौटुंबिक पार्श्वभूमीही त्यांच्या जडणघडणीत महत्त्वाची ठरली आहे. सामाजिक कार्य, शिक्षण आणि शिस्त यांचे संस्कार घरातूनच त्यांना लाभले. वडील खालीलदादा देशमुख यांचे सामाजिक कार्य आणि आई रेहाना देशमुख यांचा शिक्षण क्षेत्रातील प्रदीर्घ अनुभव यांचा प्रभाव त्यांच्या विचारांवर स्पष्टपणे दिसून येतो. याच संस्कारांच्या बळावर त्यांनी कायद्याचे शिक्षण घेत सामाजिक न्यायासाठी काम करण्याचा मार्ग स्वीकारला. मीरा-भाईंदर महापालिकेच्या प्रभाग क्रमांक 9 मधील या विजयामुळे पाचोरा आणि लासगाव परिसरातही आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. आपल्या गावाशी नाते जपणारी, सामाजिक बांधिलकी टिकवणारी आणि महिलांसाठी प्रेरणादायी ठरणारी व्यक्ती काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून स्थानिक स्वराज्य संस्थेत पोहोचल्याने अनेकांना अभिमान वाटत आहे. पुढील काळात प्रभागातील विकासकामे, महिलांचे प्रश्न, युवकांसाठी संधी आणि पारदर्शक प्रशासन यासाठी ॲड सना खलील देशमुख प्रभावी भूमिका बजावतील अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत आहे.

आज दि.16/01/2026 चे सर्व राशीचे भविष्य व शुभ अंक व रंग

0

Loading

मेष-आज कामात स्पष्टता राहील. नियोजनबद्ध पावले उचलल्यास यश मिळेल. आर्थिक बाबतीत संयम ठेवणे आवश्यक आहे. कुटुंबाकडून योग्य सहकार्य मिळेल.
शुभ अंक : 3 | शुभ रंग : तांबडा

वृषभ-दिवस स्थिर आणि विश्वास देणारा आहे. रखडलेली कामे पूर्ण होतील. खर्चावर नियंत्रण ठेवले तर फायदा होईल. आरोग्य सुधारण्याची चिन्हे आहेत.
शुभ अंक : 6 | शुभ रंग : हिरवा

मिथुन-संवादातून अनेक प्रश्न सुटतील. नवीन ओळखी लाभदायक ठरतील. कामात थोडा बदल जाणवेल. मानसिक ताजेतवानेपणा मिळेल.
शुभ अंक : 5 | शुभ रंग : पिवळा

कर्क-भावनिक संतुलन राखणे गरजेचे आहे. घरगुती प्रश्नांवर तोडगा निघेल. आर्थिक स्थिती हळूहळू सुधारेल. संयमाने वागल्यास लाभ होईल.
शुभ अंक : 2 | शुभ रंग : पांढरा

सिंह-आत्मविश्वास वाढलेला राहील. जबाबदाऱ्या योग्यरीत्या पार पाडाल. वादविवाद टाळल्यास प्रतिष्ठा वाढेल. वरिष्ठांचा पाठिंबा मिळेल.
शुभ अंक : 1 | शुभ रंग : सोनेरी

कन्या-कामातील बारकावे महत्त्वाचे ठरतील. ताण असला तरी परिणाम समाधानकारक मिळतील. खर्चाचे नियोजन आवश्यक आहे. आरोग्याची काळजी घ्या.
शुभ अंक : 4 | शुभ रंग : निळा

तुला-नातेसंबंधात समतोल राखण्याचा प्रयत्न करा. सहकार्यामुळे कामे मार्गी लागतील. आर्थिक निर्णय विचारपूर्वक घ्या. दिवस सकारात्मक ठरेल.
शुभ अंक : 7 | शुभ रंग : गुलाबी

वृश्चिक-धैर्य आणि एकाग्रता वाढेल. जुने प्रश्न सुटण्याची शक्यता आहे. आर्थिक लाभ होऊ शकतो. गोपनीय बाबी जपून ठेवा.
शुभ अंक : 9 | शुभ रंग : मरून

धनु -नवीन संधी समोर येतील. शिक्षण व प्रवासासाठी अनुकूल दिवस आहे. खर्चावर लक्ष ठेवा. सकारात्मक दृष्टिकोन ठेवल्यास यश मिळेल.
शुभ अंक : 8 | शुभ रंग : जांभळा

मकर-कर्तव्यदक्षतेचा योग्य फायदा मिळेल. कामात स्थैर्य व प्रगती दिसेल. आर्थिक स्थिती मजबूत राहील. कुटुंबातील जबाबदाऱ्या नीट पार पडतील.
शुभ अंक : 10 | शुभ रंग : करडा

कुंभ-नवीन कल्पनांना मान्यता मिळेल. सामाजिक संपर्क वाढतील. अचानक खर्च संभवतो. संयम आणि स्पष्टता ठेवा.
शुभ अंक : 11 | शुभ रंग : आकाशी

मीन-मन अधिक संवेदनशील राहील. सर्जनशील कामात समाधान मिळेल. आर्थिक व्यवहार पारदर्शक ठेवा. विश्रांती घेणे उपयुक्त ठरेल.
शुभ अंक : 12 | शुभ रंग : समुद्री हिरवा

वाचकांनी वरील भविष्यवाणीचा अर्थ अचूक भविष्यवाणी म्हणून लावता केवळ आत्मपरीक्षण आणि सकारात्मक प्रेरणा म्हणून घ्यावा.

शेतकरी अनुदानासाठी पाचोऱ्यात निर्णायक संघर्ष; सातवी मागणी प्रलंबित, अंधारातही एकटा शेतकरी आमरण उपोषणावर ठाम

0

Loading

पाचोरा – तालुक्यात सन २०१९ पासून सुरू असलेल्या शेतकरी अनुदान व अतिवृष्टी नुकसानभरपाई वितरणातील कथित गैरप्रकारांमुळे पुन्हा एकदा तीव्र असंतोष उसळला असून, शेतकरी न्यायासाठी सुरू असलेला लढा आता निर्णायक वळणावर पोहोचला आहे. शेतकरी अनुदानातील गोंधळ, अपारदर्शकता आणि जबाबदारीच्या अभावाविरोधात नाचणखेडा येथील शेतकरी गुलाब प्रताप पाटील यांनी सुरू केलेल्या आमरण उपोषणामुळे महसूल प्रशासनात मोठी हालचाल झाली असली, तरी आजही सातवी आणि अत्यंत महत्त्वपूर्ण मागणी प्रलंबित असल्याने संघर्ष कायम आहे. विशेष म्हणजे दिवसा आंदोलनावर चर्चा होत असताना रात्री अंधारातही एक शेतकरी सर्व शेतकऱ्यांची मागणी पूर्ण होईपर्यंत आमरण उपोषणाला बसलेला आहे, ही बाब या आंदोलनाची तीव्रता अधोरेखित करणारी ठरली आहे. तालुक्यात सन २०१९ पासून अतिवृष्टी, नैसर्गिक आपत्ती, पीक नुकसान, घरे व मालमत्तेच्या नुकसानीबाबत देण्यात येणाऱ्या अनुदानाच्या वितरणात सातत्याने गंभीर तक्रारी समोर येत असून काही प्रकरणांमध्ये अधिकृत सरकारी यादीत नाव असलेल्या पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर रक्कम जमा न होता ती इतर व्यक्तींच्या खात्यावर वर्ग झाल्याचे गंभीर प्रकार उघडकीस आले आहेत. या प्रकरणांमध्ये गुन्हे दाखल होऊन चार्जशीट सादर झालेली असतानाही, २०२५ मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे पाचोरा शहर व तालुक्यात मोठ्या प्रमाणावर नुकसान होऊनही अनेक पात्र शेतकरी व नागरिकांना अद्याप नुकसानभरपाई मिळालेली नाही, त्यामुळे शेतकरी वर्गात तीव्र नाराजी आहे. या पार्श्वभूमीवर गुलाब प्रताप पाटील यांनी प्रांत अधिकारी, पाचोरा यांच्याकडे सविस्तर निवेदन सादर करून संपूर्ण प्रकरणाची स्वतंत्र, निष्पक्ष व पारदर्शक चौकशी करण्याची मागणी केली असून शेजारील जामनेर व चाळीसगाव तालुक्यांमध्ये अतिवृष्टी पंचनामे स्वतंत्रपणे करून नुकसानभरपाई देण्यात आली असताना पाचोरा तालुक्यात ही प्रक्रिया प्रभावीपणे का राबविण्यात आली नाही, याचे ठोस उत्तर अद्याप मिळालेले नसल्याचा आरोप करण्यात आला आहे. या आंदोलनात शेतकरी आंदोलक संदीप दामोदर महाजन यांनी सहभाग घेतला असून आंदोलन कोणत्याही राजकीय पक्ष किंवा संघटनेचे नसून केवळ शेतकऱ्यांच्या हक्कांसाठी असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. प्रत्यक्ष उपोषणात सहभागी न होता उपोषणस्थळी शेजारी स्वतंत्र तंबू उभारून सकाळी ११ ते सायंकाळी ५ या वेळेत उपस्थित राहून माहिती लाक्षणिक आंदोलन व प्रशासकीय पाठपुरावा करण्याची भूमिका त्यांनी जाहीर केली आहे. आमरण उपोषण व लाक्षणिक आंदोलनाच्या दबावामुळे महसूल प्रशासनाने शेतकऱ्यांच्या ७ मागण्यांपैकी ६ मागण्या मान्य केल्या असून सन २०१९ ते आजपर्यंत अनुदानासाठी पात्र असलेल्या सर्व शेतकऱ्यांची गावनिहाय व वर्षनिहाय यादी पीडीएफ स्वरूपात उपलब्ध करून देण्याची तयारी प्रशासनाने दर्शविली आहे तसेच पाचोरा शेतकरी अनुदान घोटाळा प्रकरणी महसूल विभागाची मुक्ताईनगर प्रांताधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती गठीत करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र अनुदानाची प्रत्यक्ष रक्कम शेवटच्या पात्र शेतकऱ्याच्या खात्यावर जमा होईपर्यंत उपोषण सुरूच राहणार असल्याचे गुलाब प्रताप पाटील व संदीप महाजन यांनी स्पष्ट केले आहे. दरम्यान आंदोलन सुरू असताना नगरपालिका प्रशासनाचा सार्वजनिक फोकस पूर्णतः बंद अवस्थेत असल्याचे चित्र दिसून आले तरी सुद्धा शेतकरी मात्र अंधारात बसून न्यायासाठी लढा देत आहेत, ही बाब प्रशासनाच्या संवेदनशीलतेवर गंभीर प्रश्न उपस्थित करणारी ठरली आहे. प्रशासनाने दिलेली आश्वासने प्रत्यक्षात कितपत अंमलात येतात, दोषींवर कठोर कारवाई होते का आणि शेतकऱ्यांना वेळेत न्याय मिळतो का, याकडे आता संपूर्ण पाचोरा तालुक्याचे लक्ष लागले असून आंदोलक आता हा लढा शेवटपर्यंत नेण्याचा निर्धार व्यक्त करत आहेत.

आज दि.15/01/2026 चे सर्व राशीचे भविष्य व शुभ अंक व रंग

0

Loading

मेष-आज कामात सातत्य ठेवल्यास चांगले परिणाम मिळतील. घेतलेले निर्णय दीर्घकाळ उपयोगी ठरू शकतात. आर्थिक बाबतीत सावध राहणे आवश्यक आहे. कुटुंबातील वातावरण समाधानकारक राहील.
शुभ अंक : 3 | शुभ रंग : तांबडा

वृषभ-दिवस स्थिर आणि संयमाचा आहे. नियोजनबद्ध प्रयत्नांना यश मिळेल. अनावश्यक खर्च टाळल्यास बचत वाढेल. आरोग्याकडे लक्ष द्या.
शुभ अंक : 6 | शुभ रंग : हिरवा

मिथुन-संवादातून मार्ग निघेल. नवीन ओळखी उपयुक्त ठरतील. कामात बदल स्वीकारावे लागतील. मानसिक उत्साह वाढलेला जाणवेल.
शुभ अंक : 5 | शुभ रंग : पिवळा

कर्क-भावनिक निर्णय टाळावेत. कुटुंबातील सहकार्य मिळेल. आर्थिक स्थिती हळूहळू सुधारेल. संयम आणि समजूतदारपणा ठेवा.
शुभ अंक : 2 | शुभ रंग : पांढरा

सिंह-आत्मविश्वासामुळे कामे मार्गी लागतील. जबाबदाऱ्या वाढल्या तरी यश मिळेल. वादविवाद टाळल्यास मान-सन्मान वाढेल. वरिष्ठांचे सहकार्य मिळेल.
शुभ अंक : 1 | शुभ रंग : सोनेरी

कन्या-कामातील बारकावे महत्त्वाचे ठरतील. ताण जाणवू शकतो पण परिणाम समाधानकारक असतील. खर्चाचे योग्य नियोजन आवश्यक आहे. आरोग्यासाठी विश्रांती घ्या.
शुभ अंक : 4 | शुभ रंग : निळा

तुला-नातेसंबंधात समतोल राखावा लागेल. सहकार्यामुळे अडलेली कामे पूर्ण होतील. आर्थिक निर्णय सावधपणे घ्या. दिवस सकारात्मक राहील.
शुभ अंक : 7 | शुभ रंग : गुलाबी

वृश्चिक-धैर्याने घेतलेले निर्णय फायदेशीर ठरतील. जुने प्रश्न मार्गी लागण्याची शक्यता आहे. आर्थिक लाभ संभवतो. गोपनीयता राखणे आवश्यक आहे.
शुभ अंक : 9 | शुभ रंग : मरून

धनु-नवीन संधींकडे लक्ष द्या. शिक्षण व प्रवासासाठी दिवस अनुकूल आहे. खर्चावर नियंत्रण ठेवा. सकारात्मक विचार लाभदायक ठरतील.
शुभ अंक : 8 | शुभ रंग : जांभळा

मकर-कर्तव्यदक्षतेमुळे प्रगती दिसेल. कामात स्थैर्य राहील. आर्थिक स्थिती मजबूत राहण्याची शक्यता आहे. कुटुंबातील जबाबदाऱ्या नीट पार पडतील.
शुभ अंक : 10 | शुभ रंग : करडा

कुंभ-नवीन कल्पनांना वाव मिळेल. सामाजिक संपर्क वाढतील. अचानक खर्च होऊ शकतो. संयम आणि स्पष्टता ठेवा.
शुभ अंक : 11 | शुभ रंग : आकाशी

मीन-मन शांत ठेवण्याचा प्रयत्न करा. सर्जनशील कामात समाधान मिळेल. आर्थिक व्यवहार स्पष्ट ठेवा. दिवस साधारण स्वरूपाचा राहील.
शुभ अंक : 12 | शुभ रंग : समुद्री हिरवा

वाचकांनी वरील भविष्यवाणीचा अर्थ अचूक भविष्यवाणी म्हणून लावता केवळ आत्मपरीक्षण आणि सकारात्मक प्रेरणा म्हणून घ्यावा.

पाचोरा अनुदान प्रकरणांवर उद्या आंदोलन ठाम : शेतकऱ्यांची संपूर्ण रक्कम मिळेपर्यंत माघार नाही, तहसील कार्यालयाचा अधिकृत खुलासा जाहीर

0

Loading

पाचोरा -अनुदानासंदर्भात उद्या दिनांक 15 जानेवारी 2025 गुरुवारी सकाळी 11.30 वाजता प्रांताधिकारी कार्यालयासमोर गुलाबसिंग पाटील यांचे आमरण उपोषण तर संदीप महाजन यांचे शेतकरी बांधवांसोबत लाक्षणिक उपोषण होणार असल्याची ठाम भूमिका जाहीर झालेली असताना, या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पाचोरा तहसील कार्यालयाने आज पत्रकार संदीप महाजन यांना एक सविस्तर व अधिकृत पत्र पाठवून सन 2019 पासून आजपर्यंतच्या शेतकरी अनुदान प्रकरणांबाबत आपली भूमिका स्पष्ट केली आहे. या पत्रामध्ये पाचोरा तालुक्यात अतिवृष्टी, नैसर्गिक आपत्ती, नुकसानभरपाई तसेच विविध शासकीय योजनांतर्गत देण्यात आलेल्या अनुदानासंदर्भात प्राप्त झालेल्या तक्रारी, चुकीच्या खात्यावर वर्ग झालेल्या रकमा, त्यावर करण्यात आलेली प्रशासकीय व कायदेशीर कार्यवाही तसेच सद्यस्थिती यांचा तपशील देण्यात आला असून, सदर पत्राची जशीच्या तशी प्रिंट प्रत बातमीसोबत जोडण्यात आली आहे. तहसीलदार तथा कार्यकारी दंडाधिकारी कार्यालयाकडून पाठवण्यात आलेल्या या पत्रानुसार, सन 2019 पासून आजपर्यंत प्राप्त झालेल्या तक्रारींची दखल घेऊन त्या वेळोवेळी संबंधित गावांच्या ग्राम महसूल अधिकारी यांच्याकडे तपासणीसाठी पाठवण्यात आल्या व उपलब्ध अधिकृत अभिलेखांच्या आधारे अनेक प्रकरणांचे निराकरण करण्यात आले असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. तपासणीदरम्यान काही प्रकरणांमध्ये शेतकऱ्यांचे अनुदान चुकीच्या खात्यावर वर्ग झाल्याचे निदर्शनास आले असून, अशा एकूण 598 इसमांच्या खात्यावर 2 कोटी 7 लाख 50 हजार 597 रुपये इतकी रक्कम चुकीच्या पद्धतीने जमा झाल्याची नोंद कार्यालयीन स्तरावर असल्याचे पत्रात नमूद आहे. या गंभीर स्वरूपाच्या प्रकरणाची दखल घेऊन पाचोरा पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून हे प्रकरण सध्या न्यायप्रविष्ठ असल्याचेही तहसील कार्यालयाने स्पष्ट केले आहे. तसेच चुकीच्या खात्यावर जमा झालेल्या रकमेपैकी शासनाकडे वसुलीची कार्यवाही करत 46 इसमांकडून 17 लाख 62 हजार 26 रुपये इतकी रक्कम शासनाकडे जमा करण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे. अनुदानाच्या अफरातफरीप्रकरणी पाचोरा पोलीस स्टेशन येथे एफ.आय.आर. क्र. 428/2025 दाखल असून या गुन्ह्याचा तपास आर्थिक गुन्हे शाखा, जळगाव यांच्याकडून करण्यात येऊन संबंधित प्रकरणात मा. न्यायालयात चार्जशीट सादर करण्यात आलेली आहे, त्यामुळे या संपूर्ण प्रकरणात कायदेशीर प्रक्रिया सुरू असल्याचेही पत्रातून स्पष्ट होते. दरम्यान, आंदोलनकर्त्यांच्या भूमिकेनुसार केवळ खुलासे व आकडेवारी पुरेशी नसून, सन 2019 पासून आजपर्यंत शेतकऱ्यांना मंजूर झालेली एकूण रक्कम, प्रत्यक्ष अदा करण्यात आलेली रक्कम, अद्याप अदा न झालेल्या रकमा, तसेच ज्यांना अद्याप अनुदान मिळालेले नाही अशा शेतकऱ्यांची नावे व त्यामागील कारणांसह संपूर्ण माहिती पीडीएफ स्वरूपात जाहीर करण्यात यावी, अशी ठाम मागणी करण्यात आली आहे. तसेच 2019 पासून आजपर्यंत कोणताही

शेतकरी अनुदानापासून वंचित राहू नये, गुन्हा दाखल असो, कोर्टकचेरी सुरू असो, वसुलीची प्रक्रिया असो किंवा कोणत्याही प्रकारचे प्रशासकीय बोजे असोत, या प्रक्रियांशी शेतकऱ्यांचा थेट संबंध नसून यादीतील शेवटच्या घटकापर्यंत प्रत्येक पात्र शेतकऱ्याला संपूर्ण अनुदानाची रक्कम मिळालीच पाहिजे, अशी ठाम भूमिका आंदोलनकर्त्यांनी जाहीर केली आहे. तहसील कार्यालयाच्या पत्रामध्ये माहे ऑक्टोबर 2024 मधील नैसर्गिक आपत्तीमध्ये शेतीपिकांचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांचाही उल्लेख करण्यात आला असून, 41 हजार 408 नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना एकूण 57 कोटी 19 लाख 19 हजार 535 रुपये इतक्या रकमेचे अनुदान मंजूर करून त्यांची यादी ई-पंचनामा पोर्टलवर अपलोड करण्यात आल्याचे नमूद आहे. ग्राम महसूल अधिकारी यांच्या अहवालानुसार आधार, बँक तपशील व संमतीपत्र प्राप्त असलेला कोणताही पात्र शेतकरी ई-पंचनामा पोर्टलवर अपलोड होण्यापासून प्रलंबित नसल्याचेही तहसील कार्यालयाने स्पष्ट केले आहे. एकीकडे तहसील प्रशासनाने अनुदान प्रकरणांतील कार्यवाही नियमांनुसार झाल्याचा दावा केला असताना, दुसरीकडे शेतकऱ्यांना प्रत्यक्ष रक्कम मिळेपर्यंत आंदोलन मागे न घेण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला असून, उद्या होणाऱ्या आमरण व लाक्षणिक उपोषणानंतर प्रशासन व आंदोलनकर्ते यांच्यातील पुढील घडामोडींकडे पाचोरा तालुक्यासह संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

ताज्या बातम्या

error: Content is protected !!