Home Blog Page 91

तोतया पत्रकाराच्या मुखवट्याआडचा सट्टेबाज… प्रतिनिधी की बाजारबाज!

Loading

पाचोरा – तालुक्यात सध्या एक गंभीर आणि अस्वस्थ करणारी बाब समोर येत आहे. ‘स्टॅटेलाईट चॅनलचा प्रतिनिधी’ & राज्य स्तरावरील दैनिकाचा प्रतिनीधी म्हणून ओळख निर्माण करत काही व्यक्ती शासकीय कार्यालयांमध्ये, राजकीय बैठकीत, राजकीय मान्यवरांसमोर, कार्यक्रमांमध्ये, तसेच विविध सामाजिक घडामोडींमध्ये सक्रिय असल्याचे चित्र दिसत आहे. परंतु या व्यक्तींच्या ओळखीबाबत जबाबदार आणि अधिकृत माहिती उपलब्ध नाही. स्थानिक पत्रकारिता क्षेत्रात एक चांगली आणि विश्वासार्ह प्रतिमा निर्माण करणाऱ्या सॅटॅलाइट चॅनल व राज्यस्तरीय दैनिकाच्या नावाचा गैरवापर करून स्वतःला ‘प्रतिनिधी’ म्हणवून घेणाऱ्या या व्यक्तीमुळे खऱ्या पत्रकारांच्या कामावरच संशय निर्माण होण्याची शक्यता आहे. सध्या पाचोरा परिसरात वावरणाऱ्या या ‘तोतया पत्रकारा’ची नावे निश्चित न सांगता, तो कोणत्या अधिकृत सॅटॅलाइट चॅनलशी संबंधित आहे याची कुठलीही प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष पुष्टी न मिळता, तो सर्रासपणे शासकीय कार्यालयांमध्ये प्रतिनिधीच्या

भूमिकेत प्रवेश करत आहे. विशेष म्हणजे त्याने कुठल्याही अधिकृत मान्यता न घेता, ना आयडी कार्ड, ना नियुक्तीपत्र, केवळ चॅनलचे व राज्यस्तरीय दैनिकाच्या नाव सांगून बातम्या गोळा करणे, फोटो काढणे, अधिकाऱ्यांना प्रश्न विचारणे आणि स्वतःचा प्रभाव दाखवण्याचा प्रयत्न सुरू ठेवलेला आहे. अशा प्रकारचे वर्तन केवळ पत्रकारितेच्या नावलौकिकावरच नव्हे, तर जनतेच्या विश्वासावर देखील गदा आणणारे आहे. हे लोक केवळ चॅनलच्या व राज्यस्तरीय दैनिकाच्या नावाचा आधार घेत, घडामोडी कव्हर करत नाहीत, तर अनेकदा शासकीय अधिकाऱ्यांवर प्रभाव टाकण्याचा प्रयत्न करतात. पत्रकारिता हे एक जबाबदारीचे, समाजाशी बांधिलकी ठेवणारे, सत्य आणि वस्तुनिष्ठतेवर आधारलेले क्षेत्र आहे. मात्र असे तोतया लोक जेव्हा बाजारात उघडपणे फिरू लागतात, तेव्हा ते संपूर्ण क्षेत्राला बदनाम करून टाकतात. विशेष बाब म्हणजे, जिल्हा स्तरावरील मूळ सॅटॅलाइट चॅनलच्या प्रतिनिधींनी

व राज्यस्तरीय दैनिकाच्या या प्रकरणाकडे तातडीने आणि गंभीरपणे लक्ष देण्याची गरज आहे. संबंधित चॅनलच्या व्यवस्थापनाने पाचोरा परिसरात त्यांचा अधिकृत प्रतिनिधी कोण आहे, याची स्पष्ट आणि सार्वत्रिक घोषणा करणे आवश्यक आहे. अन्यथा ‘घरबसल्या’ बातम्या व पाकीट पाठवणारा आणि चॅनलच्या नावावर बाजार करणारा हा व्यक्ती भविष्यात चॅनलच्याच नावाला धक्का पोहोचवेल. अशा प्रकारच्या बनावट प्रतिनिधींच्या माध्यमातून स्थानिक राजकारणात, दलालगिरीत, प्रशासकीय फेऱ्यांमध्ये. आणि समाजात चिथावणीखोर वातावरण तयार होण्याची शक्यता असते. त्यामुळे प्रत्येक सॅटॅलाइट चॅनलने व राज्यस्तरीय दैनिकाच्या हे ठरवून द्यायला हवे की कोणत्या बातम्या अधिकृत आहेत,आणि त्या कोण पाठवत आहे. तसेच जर हे तोतया पत्रकार राज्यस्तरीय दैनिकाच्या व खऱ्याच चॅनलचा अधिकृत प्रतिनिधी नाही आणि तरीही त्याच्या पाठवलेल्या बातम्या प्रसिद्ध केल्या जात असतील यावरून हे लक्षात घ्यावे की, या कथित प्रतिनिधीच्या बातम्या कुठून येतात? तो कोठे वास्तव्यास आहे? त्याचे चॅनलशी संबंध काय आहेत? या सर्व गोष्टींची छाननी झाली पाहिजे. अनेक वेळा असे ही निदर्शनास आले आहे की, या कथित पत्रकारांनी शासकीय कर्मचाऱ्यांना ‘कव्हरेज’ देण्याच्या नावाखाली दबाव टाकून लाभ घेतलेले आहेत या पार्श्वभूमीवर, सॅटॅलाइट चॅनलच्या व राज्यस्तरीय दैनिकाच्या अधिकाऱ्यांनी अशा बनावट प्रतिनिधींविषयी ठोस भूमिका घेऊन, अधिकृत प्रतिनिधींची यादी प्रसिद्ध करणे, त्यांच्या आयडी कार्डांची नोंद प्रशासनाकडे पाठवणे, आणि सोशल मीडियावर त्यांचा अधिकृत परिचय देणे ही काळाची गरज आहे. शिवाय अशा तोतया प्रतिनिधींनी पत्रकारितेच्या आडून सट्टेबाजी, दलाली, धमकी, किंवा कोणत्याही प्रकारचे अनैतिक कार्य केल्याचे आढळून आल्यास, चॅनलने व राज्यस्तरीय दैनिकांच्या जबाबदार अधिकाऱ्यांनी पोलिसात तक्रार दाखल करून आपला आळवलेला नाताच संपवावा. पाचोऱ्यासारख्या शहरात, जिथे अनेक युवक पत्रकारितेच्या नावाने सामाजिक बदलासाठी योगदान देत आहेत, तिथे अशा तोतया लोकांमुळे संपूर्ण प्रयत्नांवर पाणी फिरते. त्यामुळे या प्रकारांना वेळीच रोखणं हे समाजासाठी, प्रशासनासाठी आणि खरी पत्रकारिता करणाऱ्यांसाठी आवश्यकच नव्हे तर अपरिहार्य ठरतं. पुन्हा एकदा जिल्हास्तरावरील सर्व सॅटॅलाइट चॅनल प्रतिनिधींनी व राज्यस्तरीय दैनिकाच्या व्यवस्थापन मंडळ सजग होणे, पाचोरा परिसरातील या बनावट पत्रकाराची ओळख पटवून त्याच्याविरोधात ठोस पावले उचलणे, आणि जनतेसह शासकीय यंत्रणेलाही खरे आणि खोटे यामधील फरक समजेल अशी दिशा देणे आवश्यक आहे. कारण खरी पत्रकारिता लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे, आणि तोतया पत्रकार या स्तंभावरचा मोठा धोका! आहे

कृष्णापुरी सिद्धिविनायक हॉस्पिटलचा ८ वर्षांचा यशस्वी प्रवास; ९ व्या वर्षात पदार्पणानिमित्त भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन

Loading

पाचोरा (प्रतिनिधी) –पाचोरा शहरातील आरोग्यसेवेच्या क्षेत्रात आपल्या निस्वार्थ व सातत्यपूर्ण सेवेमुळे वेगळा ठसा उमठवणाऱ्या सिद्धिविनायक हॉस्पिटलने ८ यशस्वी वर्षांची वाटचाल पूर्ण केली असून, येत्या सोमवार, दिनांक २६ मे २०२६ रोजी या हॉस्पिटलचा ९ व्या वर्षात उत्साहपूर्ण प्रवेश होत आहे. या निमित्ताने हॉस्पिटलचे संस्थापक व संचालक डॉ. राहुल प्रभाकर झेरवाल यांच्या संकल्पनेतून एक भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. समाजातील जास्तीत जास्त

नागरिकांनी या शिबिरात सहभागी होऊन रक्तदान करावे, असे आवाहन हॉस्पिटल प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.पाचोऱ्यातील कृष्णापुरी भागात ८ वर्षांपूर्वी सुरू झालेले सिद्धिविनायक हॉस्पिटल आज शहरात व तालुक्यात अत्याधुनिक आरोग्यसेवांचे केंद्र बनले आहे. रुग्णांच्या गरजेनुसार सतत नविन सुविधा व सेवा पुरवण्याचा डॉ. राहुल झेरवाल यांचा सतत प्रयत्न राहिला आहे. सामान्य कुटुंबातील व्यक्ती असो वा गरीब गरजू नागरिक, प्रत्येक रुग्णाच्या वेदना कमी करणे हेच आपले कर्तव्य मानणाऱ्या डॉ. झेरवाल यांचे रुग्णसेवेशी असलेले नाते केवळ व्यवसायिक न राहता पूर्णपणे मानवीय भावनेवर आधारित आहे.या हॉस्पिटलमध्ये अनेक प्रकारच्या अत्यावश्यक व आधुनिक सेवा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. हॉस्पिटलमध्ये डे केअर युनिट, इन-पेशंट डिपार्टमेंट (IPD), बालरोग विभाग, अत्याधुनिक 5 पॅरा कार्डिअ‍ॅक मॉनिटर्स, ईसीजी, एक्स-रे, अल्ट्रासॉनिक नेब्युलायझर यांसारख्या जीवनावश्यक सुविधा रुग्णांच्या सेवेसाठी सदैव तत्पर आहेत. त्यामुळे हॉस्पिटलमध्ये येणाऱ्या रुग्णांना एकाच छताखाली विविध प्रकारच्या तपासण्या व उपचार मिळण्याची सुविधा आहे. कोरोना महामारीच्या काळात बहुतेक हॉस्पिटले कोविड रुग्णांसाठी राखीव ठेवण्यात आली होती. त्यामुळे नॉन कोविड रुग्णांवर उपचार करणं कठीण बनलं होतं. अशा कठीण काळातही सिद्धिविनायक हॉस्पिटलने नॉन कोविड रुग्णांसाठी आपले दरवाजे खुले ठेवले. त्यावेळी अनेक रुग्ण भीतीत असताना डॉ. झेरवाल यांच्या धाडसामुळे आणि वैद्यकीय बांधिलकीमुळे अनेक रुग्णांना दिलासा मिळाला. हॉस्पिटलने कोरोना काळात सामाजिक बांधिलकी जोपासत सेवा देण्याचे कार्य सातत्याने सुरू ठेवले. सिद्धिविनायक हॉस्पिटलच्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने डॉ. राहुल झेरवाल यांच्याशी संवाद साधला असता त्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. “माझ्यासाठी डॉक्टर होणे म्हणजे केवळ पदवी मिळवणे नाही तर ती एक सामाजिक जबाबदारी आहे. रुग्णाच्या वेदनांना आपले समजून त्यांच्या त्रासाचे समाधान शोधणे हेच माझे ध्येय आहे. गोरगरीब व गरजू रुग्णांवर उपचार करताना त्यांचा जीव वाचवता आला, तर त्याहून मोठा आनंद दुसरा नाही,” असे भावनिक उद्गार त्यांनी व्यक्त केले. ते पुढे म्हणाले, “गेल्या ८ वर्षात आम्ही रुग्णांशी केवळ औषधांचेच नव्हे तर विश्वासाचे नाते जोडले आहे. या प्रवासात माझे कुटुंब, हॉस्पिटलमधील कर्मचारी, शहरातील नागरिक, आणि सर्व रुग्ण यांचे मी मनापासून आभार मानतो. ९ व्या वर्षात प्रवेश करत असताना, ही सेवा अधिक व्यापक करण्याचा आमचा संकल्प आहे.” सिद्धिविनायक हॉस्पिटलने ९ व्या वर्षात पदार्पण करताना रक्तदान शिबिराच्या माध्यमातून समाजासाठी एक महत्वाचा सामाजिक संदेश दिला आहे – “रक्तदान हेच जीवनदान”. रक्ताचा तुटवडा हा देशभरातील आरोग्य व्यवस्थेसाठी एक मोठे आव्हान आहे. अपघात, शस्त्रक्रिया, गर्भवती महिला, आणि थॅलेसेमिया, हिमोफिलिया यांसारख्या आजारांनी ग्रस्त रुग्णांना वेळेवर रक्त मिळणे अत्यावश्यक असते.यामुळेच सिद्धिविनायक हॉस्पिटलने २६ मे २०२६ रोजी सकाळी या रक्तदान शिबिराचे आयोजन केले असून, शहरातील तरुणांनी, सामाजिक कार्यकर्त्यांनी, आणि प्रत्येक जबाबदार नागरिकांनी या शिबिरात सहभागी होऊन रक्तदान करावे, असा उदात्त हेतू व्यक्त केला आहे. रक्तदान शिबिराचे ठिकाण: सिद्धिविनायक हॉस्पिटल, कृष्णापुरी, पाचोरा दिनांक: सोमवार, २६ मे २०२६ वेळ: सकाळी १० वाजल्यापासून ८ वर्षांच्या प्रवासात सिद्धिविनायक हॉस्पिटलने पाचोरा व परिसरातील हजारो रुग्णांवर यशस्वी उपचार केले आहेत. सामान्य सर्दीपासून ते गुंतागुंतीच्या शस्त्रक्रियांपर्यंत प्रत्येक रुग्णाला समर्पित सेवा देणारे हे हॉस्पिटल म्हणजे आरोग्यसेवेतील एक विश्वासार्ह नाव बनले आहे. अनेक गरीब कुटुंबांनी डॉ. झेरवाल यांना आपल्या कुटुंबातील सदस्यासारखा मान दिला आहे, कारण त्यांनी केवळ उपचारच केले नाहीत, तर त्यांच्यासोबत माणुसकीचाही एक सेतू तयार केला आहे. ९ व्या वर्षात प्रवेश करत असताना सिद्धिविनायक हॉस्पिटल केवळ सेवा नव्हे, तर सामाजिक बांधिलकीचे भानही जपत आहे. पुढील काळात आणखी अत्याधुनिक सुविधा, नवीन तंत्रज्ञान, आणि अधिक रुग्ण केंद्रित सेवा देण्याचा हॉस्पिटलचा संकल्प आहे.डॉ. राहुल झेरवाल यांनी शेवटी सांगितले की, “आरोग्यसेवेचा मूलमंत्र म्हणजे रुग्णांच्या मनात विश्वास निर्माण करणे. हा विश्वासच आम्हाला पुढे नेतो आणि हीच प्रेरणा आम्हाला अधिक कार्य करण्यास भाग पाडते.”पाचोरा शहरात सिद्धिविनायक हॉस्पिटलचा हा सेवाभावी प्रवास समाजासाठी प्रेरणादायी ठरत असून, अशाच रुग्णसेवेने ते आगामी काळात आरोग्याच्या क्षेत्रात नवे मापदंड निर्माण करतील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

रायगड मोहिमेच्या रूपाने नवचेतना निर्माण करणारे आमदार मंगेशदादा चव्हाण यांचे शिवप्रेम

Loading

पाचोरा – छत्रपती शिवाजी महाराजांचे हिंदवी स्वराज्य हे केवळ ऐतिहासिक वास्तव नव्हे, तर आजच्या पिढीसाठी आदर्श व प्रेरणास्थान आहे. रायगड – शिवरायांची राजधानी – ही केवळ एक किल्ल्याची वास्तू नसून महाराष्ट्राच्या अस्मितेचे प्रतीक आहे. हाच प्रेरणादायी इतिहास विद्यार्थ्यांच्या मनात सजीव करण्यासाठी आमदार मंगेशदादा चव्हाण यांच्या संकल्पनेतून ‘हिंदू साम्राज्य दिन शिवराज्याभिषेक सोहळा २०२५’ या उपक्रमांतर्गत रायगड मोहिमेचे आयोजन

करण्यात आले आहे. विशेष म्हणजे, ही मोहिम यंदा सलग पाचव्या वर्षी साजरी होत असून, ही परंपरा कायम ठेवणारा एकमेव विधायक उपक्रम म्हणून या उपक्रमाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष वेधले गेले आहे. छत्रपती शिवरायांचा रायगड ही एक ऐतिहासिक व श्रद्धास्थानी ठिकाण असल्याची जाणीव मा. गृहमंत्री अमितजी शहा यांनी स्वतः रायगड भेटीवेळी (दि.११ एप्रिल २०२५) व्यक्त केली होती. त्यांनी उपस्थितांना आवाहन केले होते की, प्रत्येक विद्यार्थ्याने आपल्या आयुष्यात एकदा तरी रायगडावर अवश्य जावे. याच विचारसरणीला कृतीरूप देणारा विधायक उपक्रम म्हणजे आमदार मंगेशदादा चव्हाण यांची रायगड मोहीम. या मोहिमेमागील उद्दिष्ट स्पष्ट आहे – विद्यार्थ्यांमध्ये शिवचरित्राची बीजे रोवणे, त्यांना स्वाभिमान, नेतृत्वगुण, राष्ट्रभक्ती आणि स्वराज्याची तत्त्वे शिकवणे. ही केवळ पर्यटन मोहीम नसून, एक प्रेरणादायी शैक्षणिक-अध्यात्मिक प्रवास आहे. सन २०२५ मध्ये आयोजित होत असलेली रायगड मोहीम ही ‘MH-52 RMET’ अर्थात Raigad Mohim Entrance Test च्या माध्यमातून पार पडणार आहे. या परीक्षेच्या माध्यमातून चाळीसगाव तालुक्यातील ११ वी व १२ वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांची निवड करण्यात येणार आहे. अर्ज प्रक्रियेसाठी विद्यार्थ्यांनी QR कोड स्कॅन करून किंवा दिलेल्या लिंकद्वारे दि.२५ मे २०२५ रात्री १२ वाजेपर्यंत ऑनलाईन फॉर्म भरावा लागणार आहे. ही प्रक्रिया पारदर्शक, सोपी व सर्वसमावेशक करण्यात आली आहे. या उपक्रमाची एक विशेष बाब म्हणजे, यातून कोणत्याही जाती, धर्म वा वर्गभेदाशिवाय फक्त गुणवत्तेच्या आधारे विद्यार्थ्यांना रायगड भेटीची संधी मिळते. हेच लोकशाहीचे व शिवशाहीचे खरे मूल्य आहे. शिक्षणक्षेत्रात नवचैतन्य आणणाऱ्या अशा प्रयत्नांची गरज आज आहे. आणि मंगेशदादा चव्हाण हे नाव आज या क्षेत्रात अशा विधायक उपक्रमांचे अध्वर्यू म्हणून उदयास आले आहे. आज जेव्हा अनेक राजकीय नेते निवडणुकीपुरते जनतेच्या समस्या आठवतात, तेव्हा मंगेशदादा चव्हाण हे नाव लोकांच्या मनात वेगळे स्थान निर्माण करते कारण निवडणुकीची गरज असो वा नसो, ते सातत्याने आपल्या मतदारसंघात विकासपर व सांस्कृतिक उपक्रमांचे आयोजन करतात. शिक्षण, आरोग्य, सांस्कृतिक जागर, इतिहासाचे भान आणि तरुणाईला दिशा देणारे कार्यक्रम म्हणजे त्यांच्या कारकीर्दीची खरी ओळख आहे. ‘शिवराज्याभिषेक दिन’ म्हणजे केवळ एका ऐतिहासिक घटनेचा उत्सव नाही, तर तो एका विचारसरणीचा जयघोष आहे – ‘राज्य हे प्रजेसाठी असते’. आणि अशा विचारांचा प्रसार आजच्या पिढीत व्हावा यासाठी आमदार मंगेशदादा चव्हाण सतत प्रयत्नशील आहेत. त्यांच्यातील शिवप्रेम, ऐतिहासिकतेविषयी आदर आणि तरुणाईसाठी झपाटलेली भावना त्यांच्या प्रत्येक उपक्रमातून दिसून येते. पाचव्या वर्षी आयोजित होणाऱ्या या रायगड मोहिमेचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये सहभागी होणाऱ्या विद्यार्थ्यांची वैचारिक, शारीरिक व मानसिक जडणघडण होते. रायगडावर जाऊन शिवाजी महाराजांच्या समाधीसमोर नतमस्तक होणे, रायगडाची रचना पाहणे, तेथील ऐतिहासिक स्थळांबद्दल जाणून घेणे, हे विद्यार्थ्यांसाठी आयुष्यभर पुरणारी शिकवण बनते. या मोहिमेच्या आयोजनामध्ये विद्यार्थ्यांची निवड, त्यांचे प्रवास, निवास, भोजन, गडदर्शन व मार्गदर्शनाची सर्व व्यवस्था अत्यंत शिस्तबद्ध व नियोजनबद्ध पद्धतीने केली जाते. ही सर्व व्यवस्था मोफत असून, कोणत्याही प्रकारचा खर्च पालकांवर टाकण्यात आलेला नाही. ही सामाजिक बांधिलकीची उदाहरणे आज दुर्मीळ झाली आहेत. या उपक्रमासाठी संपर्कासाठी मोबाईल नंबर 9763555544 दिला आहे. या माध्यमातून अधिक माहिती घेऊन इच्छुक विद्यार्थी आपला सहभाग निश्चित करू शकतात. या मोहिमेचे यश हे केवळ एका कार्यक्रमाचे यश नाही, तर एका चळवळीचा आरंभ आहे – इतिहास जागृत करण्याचा, आत्मभान जागवण्याचा आणि शिवशाहीचा विचार नव्या पिढीत रुजवण्याचा. म्हणूनच, अशा विधायक उपक्रमांचे नेतृत्व करणारे आमदार मंगेशदादा चव्हाण यांचे संपूर्ण मतदारसंघात कौतुक केले जात आहे. त्यांच्या कामातून केवळ मतदारसंघ नव्हे तर संपूर्ण राज्य प्रेरणा घेत आहे. त्यांच्या शिवप्रेमाला सलाम करताना एकच भावना मनात येते – राजकारण हे केवळ सत्तेसाठी नव्हे, तर समाज घडवण्यासाठी असावे – हे आमदार मंगेशदादा चव्हाण यांनी कृतीतून दाखवून दिले आहे. अशाच प्रेरणादायी, ऐतिहासिक, सामाजिक, शैक्षणिक आणि राष्ट्रभक्तीची भावना जागवणाऱ्या उपक्रमांची गरज महाराष्ट्राला आहे आणि अशा उपक्रमांची मुहूर्तमेढ रोवणाऱ्या लोकप्रतिनिधींना सलाम. रायगड मोहिमेस यश लाभो आणि या माध्यमातून अनेक तरुण शिवपथावर चालावेत, हीच शिवछत्रपतींच्या चरणी खरी आदरांजली ठरेल.

2025 भारत-पाकिस्तान युद्ध : सत्याच्या आरशातले रक्तरंजित प्रतिबिंब

Loading

2025 हे वर्ष इतिहासात एक अत्यंत निर्णायक वळण ठरले. भारत आणि पाकिस्तान या दोन शेजारी देशांमध्ये पुन्हा एकदा युद्धजन्य परिस्थिती उद्भवली. इतिहासातील 1947, 1965, 1971, 1999 नंतरचा हा 2025 मधील संघर्ष चारच दिवस चालला, परंतु त्यात दोन्ही देशांनी अनेक गोष्टी गमावल्या आणि काही गोष्टी मिळवल्या. या लेखात आपण सत्यावर आधारित तटस्थ व विश्लेषणात्मक पद्धतीने या युद्धाच्या पार्श्वभूमीपासून ते परिणामांपर्यंतचा सर्वंकष आढावा घेणार आहोत.
युद्धाची पार्श्वभूमी : चिघळलेली सीमारेषा आणि पुन्हा पेटलेला बारुद
2025 च्या एप्रिल महिन्यात जम्मू-काश्मीरमधील पहलगाम दहशतवादी हल्ला हा या संघर्षाचा मुख्य केंद्रबिंदू ठरला. हे हल्लेखोर पाकिस्तानमधून प्रशिक्षित व समर्थित असल्याचे पुरावे भारत सरकारकडे होते. यावर भारत सरकारने शांतता मार्ग सोडून थेट कारवाईचा निर्णय घेतला.
“ऑपरेशन सिंदूर” हे या कारवाईचे गुप्त नाव होते. या अभियानात भारताने पाकिस्तानातील 14 हवाई व दहशतवादी केंद्रांवर अचूक क्षेपणास्त्र हल्ले केले. हे हल्ले अत्यंत नियोजनबद्ध होते आणि यात नागरी लोकसंख्या कमी त्रस्त होईल याची काळजी घेण्यात आली होती.
भारताने काय मिळवलं? – 1) दहशतवाद्यांना निर्णायक धक्का
भारतीय लष्कराने पाकिस्तानमधील पीओके, बलुचिस्तान आणि पंजाब प्रांतातील दहशतवादी तळांवर केलेले हल्ले हे केवळ सैनिकी विजय नव्हते, तर ते भारताच्या नवीन युद्धनीतीचे प्रातिनिधिक स्वरूप होते. जैश-ए-मोहम्मद, लष्कर-ए-तैयबा, हिजबुल मुजाहिद्दीन यांचे गुप्त केंद्र उद्ध्वस्त झाले.  2)ऑपरेशन सिंदूरमुळे भारताची लष्करी ताकद जगासमोर अधोरेखित
या अभियानात भारताने “स्टेथ” ड्रोन्स, लॉन्ग-रेंज ब्रह्मोस क्षेपणास्त्र, आणि राफेल लढाऊ विमानांचा प्रभावी वापर केला. अमेरिकेतील संरक्षण विश्लेषक टॉम कूपर यांनी या हल्ल्यांनंतर म्हटले, “भारताने युद्धाचे नवे परिमाण तयार केले आहे. हे सैनिकी डावपेच नव्हते, ही होती राजनैतिक इशाऱ्यांची पक्की व्यूहरचना.”               3)जागतिक स्तरावरील प्रतिष्ठा आणि दबदबा
भारताच्या या कारवाईमुळे जगभरात भारताच्या लष्करी व रणनीतिक क्षमतेची दखल घेतली गेली. विशेषतः संयुक्त राष्ट्रसंघ, अमेरिका, फ्रान्स, रशिया यांनी भारताच्या आत्मसंरक्षणाच्या अधिकाराला मान्यता दिली. चीनच्या जाणीवपूर्वक मौनामुळे चीन-पाकिस्तान संबंधांवरही आंतरराष्ट्रीय संशयाची सावली पडली.                                       4) “चले तो चांद तक नही तो रात तक” या खेळण्याप्रमाणे चिनी शस्त्रास्त्रांची उघड झालेली मर्यादा
पाकिस्तानने या युद्धात चीनकडून मिळवलेली J-10C लढाऊ विमाने, HQ-9 क्षेपणास्त्र प्रणाली आणि अन्य यंत्रणा वापरल्या, परंतु त्यांचा उपयोग भारतीय हल्ल्यांपासून बचाव करण्यात कमी पडला. यामुळे चीनच्या शस्त्र निर्यातीवर प्रश्न उपस्थित झाले आणि भारताचे स्वदेशी संरक्षण उत्पादन धोरण अधिक मजबूत वाटू लागले.
भारताचे नुकसान – 1)सैनिक व नागरी प्राणहानी जरी सैनिकी विजय मिळवला, तरी भारताने या युद्धात 5 जवान आणि किमान 21 नागरिक गमावले. जम्मू, पूंछ, कुपवाडा आणि राजौरी या भागांमध्ये पाकिस्तानने केलेल्या गोळीबारात ही हानी झाली.                                               2) काही लढाऊ विमानांची हानी
पाकिस्तानच्या हवाई संरक्षण यंत्रणेने भारताचे एक राफेल विमान आणि एक सुखोई-30 पाडल्याचा दावा केला. हे अद्याप संपूर्णपणे सिद्ध नाही, परंतु भारतानेही संबंधित वैमानिकांच्या मृत्यूची माहिती दिली आहे.                                                3) राजनैतिक दबाव व युद्धविरामाची घाई
अमेरिका, सौदी अरेबिया आणि संयुक्त राष्ट्रसंघाच्या दबावामुळे भारताला 10 मे रोजी युद्धविराम स्वीकारावा लागला. अनेक संरक्षण विश्लेषकांच्या मते, जर भारताने आणखी 2 दिवस मोहीम चालू ठेवली असती, तर पाकिस्तानची संरचना अधिक उद्ध्वस्त झाली असती.                              4)काश्मीरमधील अस्थिरता व मानवी हानी
युद्धामुळे काश्मीरमध्ये लोकांचे जगणे अधिक कठीण झाले. दहशतवादी व लष्करी चकमकी, कर्फ्यू, तुटलेली पूर्ती व्यवस्था आणि संचारबंदी यामुळे नागरिकांचे हाल झाले. मानवी अधिकार संस्थांनी याची नोंद घेतली.
पाकिस्तानने काय गमावले?                   5)हवाई तळांचे मोठे नुकसान
भारताने केलेल्या हल्ल्यांमध्ये पाकिस्तानच्या सियालकोट, मियांवाली, स्कर्दू, बहावलपूर, मुलतान, चकवाला या हवाई तळांवर रनवे, हँगर, अचूक क्षेपणास्त्र यंत्रणा उद्ध्वस्त झाल्या. त्यामुळे पाकिस्तानची हवाई ताकद खिळखिळी झाली.                                             6) दहशतवादी ढाच्यांचा खात्मा
ज्या संघटनांच्या बळावर पाकिस्तान भारतावर दबाव टाकत होता, त्या संघटनांचे गुप्तालयच उद्ध्वस्त झाल्याने पाकिस्तानचा ‘प्रॉक्सी वॉर’चा आधारच गेला. विशेषतः बलुचिस्तानात झालेल्या हल्ल्यांमुळे पाकिस्तानच्या अंतर्गत असंतोषात वाढ झाली.                                             7) चिनी तंत्रज्ञानावर अवलंबनाचे दु:खद प्रत्यंतर
चीनकडून मिळालेल्या अत्याधुनिक शस्त्रास्त्रांची युद्धातील कमी कामगिरी ही पाकिस्तानसाठी मोठा धक्का होती. भारताच्या तंत्रज्ञानाने पाकिस्तानला धडा शिकवला की, उधारची ताकद तात्पुरतीच असते.                                             8) आर्थिक हानी -सर्वात महत्त्वाचे म्हणजे या चार दिवसांच्या युद्धामुळे पाकिस्तानच्या अर्थव्यवस्थेला सुमारे 16-18 अब्ज डॉलर्सचे नुकसान झाले. स्थानिक चलन घसरले, शेअर बाजार कोसळले, आणि तेल-गॅस पुरवठ्यावरही परिणाम झाला. देशांतर्गत आर्थिक अस्थिरतेचे वारे निर्माण झाले.
पाकिस्तानने काय मिळवलं?                                        9) अण्वस्त्र धोरणाची पुन्हा मांडणी
पाकिस्तानने यावेळी अण्वस्त्रांची अप्रत्यक्ष धमकी दिली होती, ज्यामुळे जागतिक स्तरावर युद्ध थांबवण्याची प्रक्रिया गतीने सुरु झाली. पाकिस्तानच्या या मनोवैज्ञानिक रणनीतीने त्याला युद्धात पूर्णपणे नामोहरम होण्यापासून वाचवले.                                  9)जागतिक सहानुभूती-
भारताने केलेल्या प्री-एंप्टिव स्ट्राईक्समुळे पाकिस्तानने स्वतःला पीडित म्हणून सादर केले आणि संयुक्त राष्ट्रसंघात भारताच्या हल्ल्यांची ‘अन्यायकारक’ म्हणून निंदा केली. अनेक इस्लामिक देशांनी पाकिस्तानच्या बाजूने भूमिका घेतली.
युद्धविराम व सामूहिक परिणाम
10 मे 2025 रोजी अमेरिका, सौदी अरेबिया आणि रशियाच्या मध्यस्थीने भारत व पाकिस्तानमध्ये युद्धविराम घोषित करण्यात आला. मात्र, युद्धविरामाच्या तासाभरातच दोन्ही देशांनी एकमेकांवर उल्लंघनाचे आरोप केले.    10) पाणी युद्धाचा प्रारंभ -भारताने इंडस जल करार पुन्हा एकदा तपासण्याचे ठरवले. युद्धाच्या दरम्यान झेलम, चिनाब, सिंध या नद्यांवरील पाण्याच्या प्रवाहाला तात्पुरते थांबवण्यात आले. & सोडले यामुळे पाकिस्तानात पूरजन्य परिस्थिती निर्माण झाली, तसेच पिण्याच्या पाण्याचा टंचाईही जाणवली.                                              मानवी हानी व विस्थापन –
काश्मीरमधील सीमावर्ती गावांमधून हजारो नागरिकांना सुरक्षित स्थळी स्थलांतर करावे लागले. रुग्णालये भरली, शाळा बंद राहिल्या आणि जनजीवन ठप्प झाले.
विजय कोणाचा? हानी कुणाची?
या युद्धात सैनिकी दृष्टिकोनातून भारत विजयी ठरला. पाकिस्तानचे संरक्षण व्यवस्थेचे सत्त्वच हादरले. परंतु मानवी दृष्टिकोनातून विचार केला तर दोन्ही देशांनी आपापल्या जवानांचे, नागरिकांचे प्राण गमावले, अर्थव्यवस्था कोलमडली, आणि शेजारी देशांतील अस्थिरतेत वाढ झाली.
सैनिक जिंकले, सरकारांनी श्रेय घेतले, परंतु काश्मीरमधील आईने आपले मूल गमावले.
ही केवळ रणधुमाळी नव्हती, ही होती दोन अण्वस्त्रधारी देशांमधील शीतयुद्धातील गरम टप्पा. भारताने “ऑपरेशन सिंदूर” द्वारे सैनिकी ताकद सिद्ध केली.
युद्ध संपले, पण अनेक प्रश्न उभे राहिले – शांतीची किंमत किती? युद्धाचा खरा शत्रू कोण? आणि आपण आता कुठे जात आहोत?

आयपीएल २०२५ – दिल्लीने मोहिमेचा शेवट केला विजयाने

Loading

मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : समीर रिझवीच्या नाबाद अर्धशतकाच्या जोरावर दिल्ली कॅपिटल्सने पंजाब किंग्जचा सहा विकेट्सने पराभव केला. शनिवारी जयपूरमध्ये खेळल्या गेलेल्या या सामन्यात, श्रेयस अय्यरच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर पंजाबने २० षटकांत सहा गडी गमावून २०६ धावा केल्या. प्रत्युत्तरात, दिल्लीने १९.३ षटकांत चार गडी गमावून २०८ धावा केल्या आणि सामना जिंकला. पंजाबकडून हरप्रीत ब्रारने दोन तर मार्को जानसेन आणि प्रवीण दुबेने प्रत्येकी एक विकेट घेतली.
दिल्लीने या विजयाने चालू हंगामातील आपल्या मोहिमेचा शेवट केला. त्याच वेळी, पंजाबच्या टॉप-२ मध्ये राहण्याच्या आशांना धक्का बसला आहे. सध्या, संघ १३ सामन्यांपैकी आठ सामने जिंकून १७ गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहे. आता, त्यांचा सामना २६ मे (सोमवार) रोजी मुंबई इंडियन्सशी होईल. दिल्ली पाचव्या स्थानावर आहे. गुजरात टायटन्स १८ गुणांसह अव्वल स्थानावर आहे, तर आरसीबी आणि मुंबई अनुक्रमे १७ आणि १६ गुणांसह तिसऱ्या आणि चौथ्या स्थानावर आहेत.
केएल राहुल आणि फाफ डु प्लेसिसच्या

खेळीमुळे दिल्लीने लक्ष्याचा पाठलाग करताना चांगली सुरुवात केली. पहिल्या विकेटसाठी दोघांमध्ये ५५ धावांची भागीदारी झाली, जी मार्को जॅन्सेनने मोडली. त्याने केएल राहुलला शशांक सिंगकडून झेलबाद केले. तो २१ चेंडूत सहा चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने ३५ धावा काढल्यानंतर बाद झाला तर हरप्रीत ब्रारने डु प्लेसिसला तंबूचा रस्ता दाखवला. तो २३ धावा काढून परतला. यानंतर, सेदिकुल्लाह अटल देखील २२ धावा करून बाद झाला. करुण नायरला समीर रिझवी यांनी पाठिंबा दिला. दोघांनीही ३० चेंडूत ६२ धावा जोडल्या. तथापि, नायर त्याचे अर्धशतक पूर्ण करण्यापूर्वीच बाद झाला. त्याने ४४ धावा केल्या. यानंतर, ट्रिस्टन स्टब्स आणि समीर रिझवी यांनी संघाला विजयाकडे नेले. या दोघांनी ५३ धावांची नाबाद भागीदारी करून दिल्लीला पंजाबवर मात करण्यास मदत केली. रिझवी ५८ आणि स्टब्स १८ धावांवर नाबाद राहिले.
त्याआधी, अय्यरने ३४ चेंडूत ५३ धावा केल्या तर स्टोइनिसने त्याच्या स्फोटक खेळीत चार षटकार आणि तीन चौकार ठोकून पंजाबला २०० धावांचा टप्पा ओलांडून दिला. दिल्लीला पहिला विजय सुरुवातीलाच मिळाला जेव्हा प्रियांश आर्य (सहा) ने मुस्तफिजूर रहमानच्या एका शॉर्ट चेंडूवर यष्टीरक्षक ट्रिस्टन स्टब्सला झेल दिला. चेंडू हवेत वर गेला आणि स्टब्सने काही पावले मागे धावत झेल घेतला. जोश इंग्लिशने मुकेश कुमारच्या गोलंदाजीवर दोन चौकार मारून सुरुवात केली तर प्रभसिमरन सिंगने मुस्तफिजूरच्या गोलंदाजीवर चौकार मारला. त्यानंतर इंग्लिसने डावखुरा वेगवान गोलंदाजाला डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगवरून षटकार मारला. प्रभसिमरनने मोहित शर्माला दोन चौकार मारले. पॉवरप्लेच्या शेवटच्या षटकात, इंग्लिसने विराज निगमच्या गोलंदाजीवर एक षटकार आणि एक चौकार ठोकला पण नंतर एका गुगलीने त्याला फसवले आणि स्टब्सने कुशल यष्टिरक्षण करून त्याला तंबूमध्ये परत पाठवले.
यानंतर, पंजाबचा कर्णधार अय्यर खेळपट्टीवर आला आणि त्याने चौकार मारून खाते उघडले. दरम्यान, प्रभसिमरनने कुलदीप यादवच्या पहिल्याच चेंडूवर षटकार मारला आणि नंतर निगमलाही सोडले नाही. तथापि, निगमने नवव्या षटकात त्याचा डाव संपवला. तरीही, अय्यरने खंबीर राहून डीप मिडविकेटवर कुलदीपच्या चेंडूवर षटकार मारला आणि स्लॉग स्वीप केला. निगमने एक किफायतशीर दहावं षटक टाकलं. पंजाबने दहा षटकांत तीन गडी गमावून ९७ धावा केल्या होत्या. मुस्तफिजूरच्या चेंडूवर शशांक सिंगला स्टब्सने झेलबाद केले. तथापि, मुकेशने पुढच्या षटकात २५ धावा दिल्या ज्यामध्ये दोन षटकार, दोन चौकार आणि तीन अतिरिक्त धावा समाविष्ट होत्या. मोहितने अय्यरला झेलबाद केल्यानंतर कुलदीपने त्याला तंबूमध्ये पाठवले. मोहितने यापूर्वी स्टोइनिसचा झेल सोडला होता ज्याने त्याच्या षटकात २२ धावा दिल्या होत्या.

शेतरस्त्यांच्या हक्काला कायदेशीर मान्यता; महसूल विभागाचा ऐतिहासिक निर्णय शेतकऱ्यांच्या पाठीशी

Oplus_16777216

Loading

पाचोरा – महाराष्ट्रातील लाखो शेतकऱ्यांसाठी शासनाकडून मोठा दिलासा देणारा ऐतिहासिक निर्णय नुकताच घेण्यात आला असून, महसूल व वन विभागाने तब्बल 60 वर्षांनंतर शेतरस्त्यांच्या बाबतीत अत्यंत महत्त्वाचा आणि क्रांतिकारी निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे केवळ शेतीचा विकासच होणार नाही, तर अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेले शेत रस्त्यांचे

वादही कायमचे मिटणार आहेत. शासनाच्या नव्या निर्णयानुसार, आता शेतरस्त्यांची किमान रुंदी तीन मीटर असणे अनिवार्य करण्यात आले आहे आणि यास कायदेशीर आधार देत 7/12 उताऱ्यावर ‘इतर हक्कां’मध्ये त्याची नोंद करणे बंधनकारक करण्यात आले आहे. हा निर्णय घेतल्यामुळे शेतीच्या वापरासाठी अत्यावश्यक असलेल्या ट्रॅक्टर, रोटावेटर, थ्रेशर, हार्वेस्टर यांसारख्या अवजड यंत्रसामग्रीसाठी सुलभ मार्ग उपलब्ध होणार असून, शेतकऱ्यांना शेतात जाण्यास व उत्पन्न वाढवण्यास मदत होणार आहे. विशेष म्हणजे, शेतरस्त्यांचे वाद हे महाराष्ट्रातील ग्रामीण भागात शेतीशी संबंधित सर्वाधिक सामान्य व गंभीर वादांपैकी एक मानले जात होते. अनेक वेळा शेजाऱ्यांमधील मतभेद, अडथळे, किंवा पूर्वीची शेतवाटीची चुकीची रचना यामुळे शेतकरी आपल्याच जमिनीपर्यंत पोहोचू शकत नव्हते. यामुळे अनेकांना शेतीपासून दूर जावे लागत होते किंवा न्यायालयीन प्रक्रियेत वर्षानुवर्षे वेळ आणि पैसा खर्च करावा लागत होता. राज्य शासनाच्या आदेशानुसार, शेतरस्त्यांच्या प्रत्येक अर्जाचा निर्णय आता 90 दिवसांच्या आत देणे अनिवार्य करण्यात आले आहे. यामुळे न्याय प्रक्रिया वेगवान होणार असून शेतकऱ्यांना त्यांचा हक्क लवकर मिळणार आहे. यासाठी तहसीलदार, मंडळ अधिकारी आणि तलाठी यांच्या संयुक्त समितीमार्फत स्थळ पाहणी करून शेतरस्त्याची आवश्यकता, उपलब्ध मार्ग, भौगोलिक परिस्थिती आणि शेजारच्या जमिनीधारकांचे हक्क यांचा सखोल अभ्यास केला जाणार आहे. या अहवालाच्या आधारे अंतिम निर्णय दिला जाणार असून तो संबंधित 7/12 उताऱ्यावर ‘इतर हक्कां’मध्ये नोंदवून कायदेशीर बनवण्यात येणार आहे. या नव्या निर्णयामागे केवळ प्रशासकीय दृष्टीकोन नव्हे, तर शेतकऱ्यांच्या दीर्घकालीन संघर्षाची आणि शेतशिवारातील जमिनींच्या व्यवस्थापनाची जाणीव आहे. अनेक वेळा असे आढळले आहे की, कोणत्याही शेताला जाणारा एकमेव रस्ता ही विशिष्ट भूधारकाच्या जमिनीतून जातो. परंतु त्या भूधारकाने जर तो रस्ता बंद केला, अडथळा निर्माण केला किंवा कायदेशीर मान्यता नसल्यामुळे इतरांनी तो रस्ता वापरण्यावर आक्षेप घेतला, तर शेतीवर प्रतिकूल परिणाम होत असे. आता हा निर्णय त्या अडचणींना आळा घालेल. या प्रक्रियेमध्ये एक बाब महत्त्वाची ठरते ती म्हणजे, अस्तित्वात असलेले नैसर्गिक मार्ग, जुन्या पायवाटा, सार्वजनिक वापरात असलेले वाहतुकीचे मार्ग आणि इतर पारंपरिक वहिवाट यांचे परीक्षण करणे. स्थानिक भूमिती, नद्या, ओढे, उतार व डोंगर यांचा अभ्यास करून तो रस्ता वास्तवात शक्य आहे की नाही, याची निश्चिती केली जाणार आहे. तसेच शेजारील भूधारकांच्या हक्कांचा विचार करणे, त्यांचे आक्षेप ऐकून घेणे आणि गरज असल्यास मार्गात फेरबदल करणे हे प्रशासनाचे कर्तव्य ठरणार आहे. यामुळे शेतकऱ्यांना केवळ त्यांच्या जमिनीपर्यंत पोहोचण्याचा मार्गच मिळणार नाही, तर भविष्यातील वाद टाळून सामाजिक सौहार्द टिकवण्यासही हातभार लागेल. याशिवाय, जेव्हा एखादा शेतकरी आपली जमीन विक्रीस काढतो, तेव्हा ती जमीन खरेदी करणाऱ्या व्यक्तीसाठी 7/12 वर नोंद असलेला शेतरस्ता हा एक सकारात्मक आणि आवश्यक घटक ठरतो. अनेक वेळा शेतजमीन असूनही रस्ता नसल्यानं खरेदीदार मागे हटत असे. आता हा अडथळा दूर होणार आहे. या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने घेतलेला निर्णय फक्त कायदेशीर बाब नाही, तर तो ग्रामीण शेती अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने एक मोठं पाऊल आहे. शासनाने फक्त आदेश काढून जबाबदारी संपवली नाही, तर या आदेशाच्या अंमलबजावणीसाठी वेळेची चौकट, जबाबदार अधिकाऱ्यांची नेमणूक, आणि कार्यपद्धती याही ठोसपणे स्पष्ट केल्या आहेत. शासनाने स्पष्टपणे सांगितले आहे की, हे आदेश 60 वर्षांपासून प्रलंबित असलेल्या समस्यांवर उपाय शोधण्यासाठी दिले असून, त्याची काटेकोर अंमलबजावणी झाली पाहिजे. अशा प्रकारे शेतरस्त्यांचा कायदेशीर हक्क शेतकऱ्यांना प्राप्त झाला तर ग्रामीण भागातील अनेक वाद मिटून शेतकऱ्यांच्या शेतीचा आणि उत्पन्नाचा मार्ग मोकळा होईल. आता प्रत्येक तहसील कार्यालय, महसूल मंडळ, आणि संबंधित जमिनीचा नोंदणी कार्यालय यांना हा आदेश काटेकोरपणे पाळावा लागणार आहे. या आदेशाच्या अंमलबजावणीमुळे भविष्यात शेत जमीन आणि त्यावरील रस्त्याच्या अधिकाराबाबत कुणालाही शंका राहणार नाही. या निर्णयाचे परिणाम लवकरच सर्वत्र दिसून येतील. शेतकऱ्यांच्या मागण्या वर्षानुवर्षे प्रलंबित होत्या, त्या आता या धोरणामुळे मार्गी लागणार आहेत. त्यामुळे केवळ एक आदेश नव्हे, तर महाराष्ट्र सरकारकडून घेतलेला हा निर्णय शेतकरी कल्याणाच्या दिशेने ऐतिहासिक टप्पा मानला जाईल. शेवटी, शेतकऱ्यांच्या हक्कासाठी घेतलेल्या अशा निर्णयामुळेच शेतकरी राज्याचा केंद्रबिंदू ठरेल, आणि ग्रामीण विकासाचा पाया अधिक मजबूत होईल. हा आदेश शेतकऱ्यांसाठी एक नवा अध्याय ठरावा इतका दूरगामी ठरणार आहे. शासनाच्या या पावलामुळे केवळ रस्ते नव्हे, तर शेतकऱ्यांच्या आशा आणि आकांक्षांनाही दिशा मिळणार आहे.

महेंद्रभाई – हितेशभाई यांचेद्वारे मातृगया श्राद्ध : सिद्धपूरच्या पवित्र भूमीतून मातृऋणाची परिपूर्णता

Loading

पाचोरा – भारतभूमी ही श्रद्धा, संस्कृती आणि सनातन परंपरांचा खजिना आहे. जन्मापासून मृत्यूपर्यंत माणसाचे जीवन विविध कर्मकांडांनी जोडलेले असते. त्यात ‘श्राद्धविधी’ या विधीला विशेष महत्त्व आहे. अनेकांनी ‘गया’ म्हणजेच बिहारमधील प्रसिद्ध पितृश्राद्ध तीर्थ ऐकले असेल. मात्र, आईसाठी म्हणजेच मातृश्राद्धासाठी जे स्थान अखंड भारतात सर्वश्रेष्ठ आणि एकमेव मानले जाते, ते म्हणजे गुजरातमधील सिद्धपूर. याच स्थळाला

‘मातृगया’ या नावानेही ओळखले जाते. गुजरात राज्यातील पाटण जिल्ह्यात वसलेले हे सिद्धपूर धार्मिक, पौराणिक आणि भावनिक दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. येथे मातृश्राद्ध म्हणजेच मातृ आत्म्याच्या शांतीसाठी विशेष विधी पार पाडली जाते. हा अनुभव केवळ श्रद्धेचा नसून, अंतःकरणातून व्यक्त होणाऱ्या कृतज्ञतेचा असतो. सिद्धपूरचे पौराणिक महत्त्व अद्वितीय आहे. त्रिदेवांपैकी ब्रह्मदेवाचे एकमेव प्राचीन मंदिर येथेच होते, जे आजही त्या युगाची ऐतिहासिक साक्ष देते. येथील बिंदू सरोवर ब्रह्मदेवाच्या अश्रूंमधून निर्माण झाल्याचे मानले जाते. म्हणूनच हे तीर्थक्षेत्र विशेष मानले गेले आहे. सिद्धपूर हे असे स्थान आहे जिथे तप, श्राद्ध, स्नान आणि आत्मशांती एकत्रित अनुभवता येतात. येथे केवळ विधी होत नाही, तर अंतःकरणातून कृतज्ञता व्यक्त केली जाते. गया येथे पितृश्राद्ध केले जाते, हे सर्वश्रुत आहे. परंतु मातृश्राद्ध फक्त सिद्धपूर येथे केल्यासच त्याचे संपूर्ण फल मिळते, अशी दृढ श्रद्धा आहे. आपण नेहमीच वडिलांच्या ऋणाची आठवण ठेवतो, परंतु आईचे ऋण – जन्मदात्री म्हणून – हे खूप खोल आणि भावनिक असते. अशा मातेसाठी, तिच्या आत्म्याच्या शांतीसाठी केली जाणारी विधी म्हणजे सिद्धपूरचे मातृगया श्राद्ध होय. स्कंद पुराण आणि वायू पुराणात या स्थळाचा स्पष्ट उल्लेख ‘मातृगया’ म्हणून करण्यात आला आहे. सिद्धपूर येथे श्राद्ध विधीसाठी एक विशिष्ट पद्धत आहे. ही विधी संपूर्णपणे शास्त्रोक्त, विधिपूर्वक आणि संपूर्ण श्रद्धेने फक्त दिंडोरी प्रणीत श्री स्वामी समर्थ केंद्राच्या मार्गदर्शनाखाली व प.पू. गुरुमाऊलींच्या आशीर्वादाने, प.पू. चंद्रकांतदादांच्या मार्गदर्शनात पार पाडली जाते. येथे पं. महेंद्रभाई आणि हितेशभाई पंड्या (मो. 9825561729, 9825504407) हे गेली तीस वर्षे अत्यंत श्रद्धेने आणि अनुभवाने मार्गदर्शन करणारे पंडित म्हणून कार्यरत आहेत. पालनपूर रेल्वे स्टेशनपासून केवळ 35 किलोमीटर अंतरावर असलेल्या बिंदू सरोवराजवळ ही संपूर्ण विधी पार पडते. विशेष बाब म्हणजे, फक्त ₹500 च्या नाममात्र शुल्कामध्ये खालील विधी अत्यंत भावनिकतेने आणि श्रद्धेने पार पाडल्या जातात: 1. त्रिपिंडी श्राद्ध 2. मातृगया पिंडदान 3. स्नान आणि तर्पण 4. भोजन. या सर्व विधींसाठी सुमारे 6 तासांचा कालावधी लागतो. विशेषतः, महेंद्रभाई आणि हितेशभाई पंड्या यांच्याकडे या विधीच्या दरम्यान कोणताही शॉर्टकट अथवा व्यावसायिक दृष्टिकोन आढळत नाही. प्रत्येक विधी अत्यंत भावनात्मक, संपूर्ण श्रद्धेने आणि शास्त्रोक्त मंत्रोच्चारांसह पार पाडली जाते. यापूर्वी मी त्र्यंबकेश्वर येथे शिखरे गुरुजींकडे नारायण नागबली विधीचा अनुभव घेतलेला होता. तेव्हाही स्वामी समर्थ केंद्राच्या प्रयत्नांमुळे ती विधी पारदर्शकतेने व समाधानकारकपणे पूर्ण झाली होती. येथेही त्याच पातळीचा आणि अधिक श्रद्धेचा अनुभव आला. विशेषतः बिंदू सरोवराच्या परिसरात फिरताना, जेव्हा इतर ठिकाणी चाललेल्या विधी पाहिल्या, तेव्हा भाविकांशी बोलून असे लक्षात आले की सिद्धपूरमधील अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणावर आर्थिक शोषण होते आणि अत्यंत कमी वेळात विधी पार पाडली जातात. त्याच्या तुलनेत स्वामी समर्थ केंद्राच्या विधीत कुठेही फसवणूक अथवा आर्थिक शोषण नव्हते. ही केवळ धार्मिक विधी नव्हती, तर ती अंतःकरणातील कृतज्ञता आणि भावनेची अभिव्यक्ती होती. आपल्या आईने आपल्या आयुष्यात जे काही केले, त्याच्या ऋणाचे हे एक अध्यात्मिक उत्तर होते. सिद्धपूरचा हा अनुभव केवळ एक विधी न राहता, तो आयुष्यभर लक्षात राहणारा होतो. स्वामी समर्थ केंद्रामार्फत पार पडणाऱ्या या विधी कोणत्याही प्रकारच्या व्यावसायिकतेपासून मुक्त असतात, हेच यांचे वैशिष्ट्य आहे. आजच्या काळात, जिथे श्रद्धेलाही व्यवसायाचे रूप दिले गेले आहे, तेथे अशा केंद्रामार्फत पार पडणाऱ्या विधीच खरे अध्यात्म दाखवतात. शेवटी एक भावनिक विचार – “वडिलांचे ऋण गया येथे फेडता येते, पण आईच्या ऋणाचे पूर्ण प्रायश्चित्त केवळ सिद्धपूरमध्येच शक्य आहे.” प्रत्येकाने आयुष्यात किमान एकदा तरी सिद्धपूरमध्ये मातृश्राद्ध करणे आवश्यक आहे. ही केवळ धार्मिक बाब नसून, मानवी संस्कृतीतील ऋणपरंपरेचा सन्मान करण्याचा एक नम्र प्रयत्न आहे. स्वामी समर्थ केंद्राच्या प.पू. गुरुमाऊलींच्या आशीर्वादाने आणि चंद्रकांतदादांच्या मार्गदर्शनात पं. महेंद्रभाई, हितेशभाई पंड्या यांचेद्वारे पार पडणारा हा अध्यात्मिक उपक्रम केवळ एक कर्मकांड न राहता, मातृत्वाच्या ऋणाची भावनिक परिपूर्ती होतो. ही विधी आपल्या जीवनात मातेकडून मिळालेल्या त्याग, ममता आणि प्रेमाची आठवण करून देणारा एक पवित्र क्षण असतो. आई आपल्याला जन्म देते, वाढवते, कधीही न थकता आपल्यासाठी जगते. तिच्या या अमर्याद प्रेमाचे ऋण आपण अशा श्रद्धाविधीद्वारेच थोड्याफार प्रमाणात फेडू शकतो. सिद्धपूरचे मातृगया श्राद्ध हे त्या अमूल्य ऋणाची भावनिक व अध्यात्मिक व्याख्या आहे. येथे जेव्हा आपण आपल्या आईच्या आत्म्यासाठी पिंड अर्पण करतो, तेव्हा केवळ मंत्रच नाही तर आपल्या अंतःकरणातील अश्रूही त्या जलात मिसळतात. हा उपक्रम मनाला स्पर्श करणारा, आत्म्याला हलवणारा आणि श्रद्धेने भरलेला अनुभव असतो. अशा पवित्र भूमीत, पवित्र उद्देशाने, पवित्र मनाने पार पडलेली ही विधी प्रत्येकाने आयुष्यात किमान एकदा तरी अनुभवलीच पाहिजे, कारण “आईसारखी दुसरी कोणतीही देवी नाही.” सिद्धपूरच्या बिंदू सरोवरावरून परतणारा प्रत्येक भाविक केवळ समाधान घेऊनच परतत नाही, तर तो आपल्या जीवनात आईच्या अस्तित्वाची नव्याने जाणीव घेऊन परततो… आणि त्याच्या ओठांवर फक्त एकच वाक्य असते — “मातृदेवो भव”… ✒️ – संदीप दा महाजन, पाचोरा – 7385108510

पाडळसा आरोग्य केंद्राच्या वतीने डेंग्यू जनजागृती व मान्सूनपूर्व सर्वेक्षण मोहीम राबविण्यात

Loading

पाडळसा (ता. यावल) – येथे दिनांक २४ मे २०२५ रोजी पाडळसा प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वतीने डेंग्यूसारख्या तापरोगांविषयी जनजागृती तसेच मान्सूनपूर्व आरोग्य सर्वेक्षण मोहीम मोठ्या प्रमाणात हाती घेण्यात आली. यामागील प्रमुख उद्देश गावकऱ्यांमध्ये आरोग्य जागरूकता वाढवणे, संभाव्य तापरोगांचे प्रतिबंधात्मक उपाय सुचवणे, आणि येत्या पावसाळ्यात जलजन्य व डासजन्य रोगांचा

प्रादुर्भाव रोखणे हा होता.गेल्या काही दिवसांपासून हवामानात अचानक बदल झाल्याने आणि उष्णता व आर्द्रता यामध्ये वाढ झाल्याने डासांची उत्पत्ती आणि तापरोगांच्या वाढीचा धोका मोठ्या प्रमाणात निर्माण झाला आहे. याच पार्श्वभूमीवर जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सचिन भायेकर, तसेच जिल्हा हिवताप नियंत्रण अधिकारी डॉ. प्रमोद यशवंतराव सोनवणे यांनी तातडीचे निर्देश देत आरोग्य पथकांना सज्ज राहण्यास सांगितले. त्यांच्या आदेशानुसार तालुका आरोग्य अधिकारी डॉ. राजू तडवी आणि प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. प्राजक्ता चव्हाण व डॉ. मोबशीर सैय्यद यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण पाडळसा व परिसरातील १८ गावांमध्ये एकसंध आरोग्य तपासणी मोहिम राबविण्यात आली.या व्यापक मोहिमेसाठी आरोग्य निरीक्षक, हिवताप निरीक्षक, आरोग्य सेवक, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, आणि आशा स्वयंसेविका यांचे स्वतंत्र पथक तयार करण्यात आले. यामध्ये प्रामुख्याने तापरोग व कंटेनर सर्वेक्षण, डासोत्पत्ती होणाऱ्या जागांचा शोध, दूषित पाण्याचे स्रोत, तसेच पाण्याच्या पुरवठ्यातील गळती, नळ व पाईपलाइन तपासणी, परिसर स्वच्छतेचा आढावा, आणि गावांमध्ये साचलेल्या सांडपाण्यामुळे उद्भवणाऱ्या समस्या यांचा समावेश होता. तापरोग प्रतिबंधासाठी केलेल्या या मोहिमेमध्ये गावातील प्रत्येक घरात जाऊन संबंधित नागरिकांची विचारपूस करण्यात आली. घरामध्ये पाणी साठवले जात असलेल्या भांड्यांची तपासणी करण्यात आली आणि त्यामध्ये डास अंडी घालू शकतात का, याचे निरीक्षण करण्यात आले. पाण्याचे कंटेनर, बादल्या, ड्रम, कुंड्या यांची नियमित स्वच्छता व झाकण लावण्याची माहिती देऊन लोकांमध्ये जनजागृती करण्यात आली.आरोग्य पथकाने गावातील पिण्याच्या पाण्याचे स्त्रोत शोधून त्यांची स्थिती तपासली. कुठे पाईपलाईनमध्ये गळती आहे का, कुठे नळांना तोटी नाही, कुठे वॉल्वमध्ये त्रुटी आहेत, हे सर्व प्रत्यक्ष पाहून ग्रामपंचायतींच्या माध्यमातून संबंधित दोष दूर करण्याचे निर्देश देण्यात आले. गावांमध्ये साचलेल्या पाण्यामुळे होणाऱ्या डासजन्य रोगांना आळा घालण्यासाठी, गटारी व नाल्यांची साफसफाई, उकिरड्यांचे व्यवस्थापन, तसेच शेण-कचरा उचलण्याची मोहीम राबवली गेली.डेंग्यू व हिवताप प्रतिबंधक उपाय म्हणून गावांमध्ये ‘कोरडा दिवस’ पाळण्याबाबत दवंडी देऊन जनजागृती करण्यात आली. ‘कोरडा दिवस’ म्हणजे आठवड्यातून एक दिवस सर्व नागरिकांनी आपल्या घरातील व परिसरातील साठवलेले पाणी पूर्णतः रिकामे करणे आणि त्या जागा कोरड्या ठेवणे, जेणेकरून डासांना अंडी घालण्यासाठी जागाच मिळणार नाही. या सर्व उपक्रमामध्ये पाडळसा गावाबरोबरच परिसरातील इतर १८ गावांचा समावेश करण्यात आला. प्रत्येक गावात आरोग्य कर्मचाऱ्यांचे स्वतंत्र पथक नेमण्यात आले. या सर्वेक्षण मोहिमेत तालुका हिवताप पर्यवेक्षक विजय नेमाडे, आरोग्य निरीक्षक विजय देशमुख, हितेंद्र पाटील, स्वप्नील भालेराव, प्रयोगशाळा तंत्रज्ञ अधिकारी नीरज राणे यांच्या देखरेखीखाली सर्व कामकाज पार पाडण्यात आले.आरोग्य सेवक नितीन पाटील, सतीश पवार, गिरीश जावळे, भरत धांडे, दिनेश बच्छरे, अनिकेत बोरसे यांनी घरोघरी जाऊन तापरोग सर्वेक्षण केले. आशा सेविका प्रगती पाटील, शारदा पाटील, पुष्पा पाटील यांच्यासह सर्व आशा गटप्रवर्तकांनी महिलांमध्ये आरोग्यविषयक जनजागृती घडवून आणली. प्रत्येक घरात सुसंवाद साधून नागरिकांना त्यांच्या घरातील स्वच्छतेचे महत्त्व पटवून देण्यात आले.या मोहिमेदरम्यान गावकऱ्यांना काही ठिकाणी डासांची उत्पत्ती होणाऱ्या ठिकाणांची माहिती नव्हती. आरोग्य कर्मचाऱ्यांनी त्यांना त्या ठिकाणी होणारे धोके समजावून सांगितले. उदाहरणार्थ, घराबाहेरील झाडाच्या कुंड्या, जुनी खेळणी, रिकाम्या बाटल्या, नारळाच्या करवंट्या या सर्व ठिकाणी पाणी साचून राहिल्यास डासांची उत्पत्ती होते, हे सांगून त्या वस्तू काढून टाकण्याची सूचना करण्यात आली.याशिवाय, दूषित पाण्यामुळे उद्भवणाऱ्या जलजन्य रोगांचा म्हणजेच गॅस्ट्रोएन्टेरिटिस, टायफॉईड, हिपॅटायटीस आदी रोगांचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी, पिण्याच्या पाण्याचे उकळून वापरणे, टाकीत ब्लीचिंग टाकणे, आणि पाणी शुद्धीकरणाचे महत्त्व पटवून देण्यात आले. अनेक ठिकाणी क्लोरीन टॅब्लेट्स वितरित करण्यात आल्या. तालुका आरोग्य अधिकारी डॉ. राजू तडवी आणि डॉ. प्राजक्ता चव्हाण यांनी या सर्व मोहीमेची नियमित पाहणी केली. त्यांनी गावपातळीवर ग्रामपंचायत सदस्यांसोबत बैठक घेऊन स्थानिक पातळीवर स्वच्छता मोहीम चालवण्याचे आवाहन केले. ग्रामपंचायतींना पत्रकाद्वारे सूचना देऊन पाण्याच्या गळतीचे तातडीने निराकरण, नळांना तोटी बसविणे, परिसरात ब्लीचिंग फवारणी करणे, अशा उपाययोजना त्वरीत हाती घेण्यास सांगण्यात आले.या सर्व मोहिमेमुळे पाडळसा व त्यासमोरील गावांमध्ये नागरिकांमध्ये आरोग्याबद्दलची जाणीव वाढली आहे. अनेक ठिकाणी नागरिकांनी स्वतः पुढाकार घेऊन आपल्या परिसराची स्वच्छता ठेवण्यास सुरुवात केली आहे. महिला व युवकांमध्ये देखील आरोग्य विषयक सकारात्मक बदल दिसून येत आहे. एकंदरीतच, पावसाळ्यापूर्वीचा हा उपाययोजना कार्यक्रम खरोखरच प्रशंसनीय असून डेंग्यू व जलजन्य रोगांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात आटोक्यात येण्यास निश्चितच मदत होणार आहे. जिल्हा व तालुका आरोग्य यंत्रणांचा तातडीने आणि प्रभावी प्रतिसाद, तसेच प्राथमिक आरोग्य केंद्र पाडळसा अंतर्गत संपूर्ण पथकाची एकसंध व निष्ठावान कार्यशैली यामुळे ही मोहीम यशस्वी झाली. जनतेने देखील या मोहिमेला भरभरून प्रतिसाद दिला असून पुढील काळातही असे उपक्रम सातत्याने राबविणे गरजेचे असल्याचे मत स्थानिक ग्रामस्थांनी व्यक्त केले. डॉ. सचिन भायेकर, डॉ. प्रमोद सोनवणे, डॉ. राजू तडवी, डॉ. प्राजक्ता चव्हाण, आणि संपूर्ण आरोग्य कर्मचारीवर्गाचे स्थानिक प्रशासन आणि जनतेने विशेष कौतुक केले आहे. अशा प्रयत्नांतूनच ‘स्वस्थ गाव – सशक्त गाव’ ही संकल्पना प्रत्यक्षात साकार होईल, याकडेच ही मोहीम निश्चितपणे वाटचाल करत आहे.

महेंद्रभाई – हितेशभाई द्वारा मातृगया श्राद्ध: सिद्धपुर की पवित्र भूमि से मातृऋण की पूर्णता

Loading

पाचोरा -भारत भुमी श्रद्धा, संस्कृति और सनातन परंपराओं का खजाना है। जन्म से मृत्यु तक मानव जीवन अनेक कर्मकांडों से जुड़ा हुआ होता है। उसमें ‘श्राद्ध विधि’ का विशेष महत्व है। कई लोगों ने गया यानी बिहार के प्रसिद्ध पितृश्राद्ध तीर्थ के बारे में सुना होगा। लेकिन माता के लिए, यानी मातृश्राद्ध के लिए भारतवर्ष में जो स्थान सर्वोत्तम और एकमात्र माना जाता है, वह है गुजरात का सिद्धपुर। इस स्थान को ‘मातृगया’ के नाम से भी जाना जाता है। गुजरात राज्य के पाटण जिले में स्थित

सिद्धपुर धार्मिक, पौराणिक और भावनात्मक दृष्टि से अत्यंत महत्वपूर्ण माना जाता है। यहां मातृश्राद्ध अर्थात् मां की आत्मा की शांति के लिए विशेष विधि की जाती है। यह अनुभव केवल श्रद्धा का नहीं, बल्कि हृदय की कृतज्ञता का होता है। सिद्धपुर का पौराणिक महत्व अद्वितीय है। त्रिदेवों में से ब्रह्मदेव का एकमात्र प्राचीन मंदिर यहीं पर था, जो आज भी उस काल की ऐतिहासिक साक्ष देता है। यहां का बिंदु सरोवर भी ब्रह्माजी के आंसुओं से उत्पन्न हुआ ऐसा माना जाता है। इसीलिए यह तीर्थक्षेत्र विशिष्ट माना गया है। सिद्धपुर वह स्थान है जहाँ तप, श्राद्ध, स्नान और आत्मशांति एक साथ होते हैं। जहाँ केवल विधि नहीं, बल्कि हृदय से कृतज्ञता व्यक्त की जाती है। गया में पितृश्राद्ध होता है, यह हम सभी ने सुना है। लेकिन माता का श्राद्ध अर्थात् मातृश्राद्ध केवल सिद्धपुर में करने से ही उसका पूर्ण फल मिलता है, ऐसी दृढ़ श्रद्धा है। हम अक्सर पिता के ऋण की स्मृति करते हैं, परंतु मां का ऋण, जो जन्मदात्री के रूप में होता है, वह बहुत ही गहरा और भावनात्मक होता है। ऐसी माता के लिए, उनकी आत्मा की शांति हेतु की जाने वाली विधि ही है सिद्धपुर की मातृगया श्राद्ध। स्कंद पुराण और वायु पुराण में इस स्थान का उल्लेख ‘मातृगया’ के रूप में स्पष्ट रूप से किया गया है। सिद्धपुर में श्राद्ध विधि करने की एक विशेष विधि है। यह विधि पूर्णतः विधिपूर्वक, शास्त्रोक्त और सम्पूर्ण तरीके से केवल दिंडोरी प्रणीत श्री स्वामी समर्थ केंद्र द्वारा और प.पू. गुरुमाऊली के आशीर्वाद से, प.पू. चंद्रकांतदादा के मार्गदर्शन में संपन्न होती है। यहाँ पं. महेंद्र भाई और हितेशभाई पंड्या (मो. 9825561729, 9825504407) पिछले तीस वर्षों से अनुभवी और श्रद्धा से मार्गदर्शन करने वाले पंडित हैं। पालनपुर रेलवे स्टेशन से मात्र 35 किलोमीटर की दूरी पर स्थित बिंदु सरोवर के पास यह संपूर्ण विधि की जाती है। विशेष बात यह है कि केवल ₹500 की नाममात्र राशि में नीचे दी गई विधियाँ अत्यंत भावनापूर्वक संपन्न की जाती हैं: 1. त्रिपिंडी श्राद्ध 2. मातृगया पिंडदान 3. स्नान और तर्पण 4. भोजन इन सभी विधियों में लगभग 6 घंटे का समय लगता है। विशेष रूप से, महेंद्रभाई और हितेशभाई पंड्या के यहां इस विधि को करते समय कोई भी शॉर्टकट या व्यवसायिक प्रवृत्ति नहीं होती। प्रत्येक विधि अत्यंत भावुकता, पूर्ण श्रद्धा और शास्त्रोक्त मंत्रोच्चार के साथ संपन्न होती है। इससे पहले मैंने त्र्यंबकेश्वर में शिखरे गुरुजी के पास नारायण नागबली विधि का अनुभव लिया था। तब भी स्वामी समर्थ केंद्र के प्रयास से वह विधि अत्यंत पारदर्शी और संतोषजनक रूप से पूर्ण हुई। यहां भी वही संतोष और और अधिक श्रद्धा का अनुभव हुआ। विशेष रूप से बिंदु सरोवर के आसपास घूमते समय जब अन्य स्थानों पर चल रही विधियों का निरीक्षण किया, तब श्रद्धालुओं से अधिक जानकारी प्राप्त करने पर यह ज्ञात हुआ कि सिद्धपुर के कई स्थानों पर भारी आर्थिक लूट और बहुत कम समय में विधि पूरी करने की प्रवृत्ति दिखाई देती है। उसकी तुलना में स्वामी समर्थ केंद्र द्वारा की गई विधि में कहीं कोई छल-कपट या आर्थिक शोषण नहीं था। यह केवल एक धार्मिक विधि नहीं थी, बल्कि यह हृदय, कृतज्ञता और भावना की अभिव्यक्ति थी। हमारी मां हमारे लिए जो कुछ करती है, उस ऋण का यह एक आध्यात्मिक उत्तर होता है। सिद्धपुर का यह अनुभव केवल एक विधि भर नहीं रहता, बल्कि वह जीवनभर स्मरण में रहता है। स्वामी समर्थ केंद्र द्वारा संपन्न होने वाली यह विधियाँ किसी भी प्रकार की व्यावसायिकता से मुक्त होती हैं, यही उसकी विशेषता है। आज के युग में, जहां श्रद्धा को भी व्यापार बना दिया गया है, वहाँ ऐसे केंद्रों के माध्यम से संपन्न होने वाली विधियाँ ही सच्ची आध्यात्मिकता का परिचय देती हैं। अंत में एक भावनात्मक विचार: “पिता का ऋण गया में चुकाया जा सकता है, लेकिन मां के ऋण का पूर्ण प्रायश्चित्त केवल सिद्धपुर में ही संभव है।” हर किसी को कम से कम एक बार सिद्धपुर में मातृश्राद्ध करना चाहिए। यह केवल धार्मिक नहीं, बल्कि मानव संस्कृति की ऋण परंपरा का आदर करने का एक विनम्र प्रयास है। स्वामी समर्थ केंद्र द्वारा प.पू. गुरुमाऊली के आशीर्वाद और चंद्रकांतदादा के मार्गदर्शन में पं. महेंद्र भाई, हितेश भाई पंड्या द्वारा संपन्न यह आध्यात्मिक उपक्रम केवल एक कर्मकांड नहीं, बल्कि मातृत्व के ऋण की भावनात्मक प्रतिपूर्ति है। यह विधि हमारे जीवन में मां द्वारा किए गए त्याग, ममता और प्रेम की स्मृति दिलाने वाला एक पवित्र क्षण है। मां हमें जन्म देती है, बड़ा करती है, कभी थके बिना हमारे लिए जीती है। उसके इस अनंत प्रेम का ऋण हम केवल ऐसे श्रद्धा विधियों द्वारा ही थोड़ा-बहुत चुका सकते हैं। सिद्धपुर की मातृगया श्राद्ध उस अनमोल ऋण की भावनात्मक और आध्यात्मिक व्याख्या है। यहाँ जब हम अपनी मां की आत्मा के लिए पिंड अर्पण करते हैं, तब केवल मंत्र नहीं गूंजते, बल्कि हमारे अंतर्मन के आँसू भी उस जल में घुल जाते हैं। यह उपक्रम मन को छूने वाला, आत्मा को झकझोरने वाला और श्रद्धा से परिपूर्ण अनुभव देने वाला है। ऐसी पवित्र भूमि पर, पवित्र उद्देश्य से, पवित्र मन से की गई यह विधि हर किसी ने जीवन में कम से कम एक बार अनुभव करनी चाहिए, क्योंकि “मां जैसी कोई और देवी नहीं।” सिद्धपुर के बिंदु सरोवर से लौटने वाला हर श्रद्धालु केवल संतोष ही नहीं लेकर लौटता, बल्कि वह अपने जीवन में मां के अस्तित्व की फिर से गहरी अनुभूति करता है… और तभी उसके होंठों पर बस एक ही वाक्य होता है — “मातृदेवो भव” -संदीप दा महाजन, पाचोरा – 7385108510

हॉटेल पद्मालया : शुद्ध शाकाहारी जेवणाची नवी ओळख, वावडदामध्ये भव्य शुभारंभ

Loading

पाचोरा – रोडवरील बिलखेडा-वावडदा परिसरात येणाऱ्या नागरिकांसाठी आणि प्रवाशांसाठी एक आनंददायी बातमी आहे. अन्न हे पूर्णब्रह्म मानणाऱ्या संस्कृतीत शुद्ध शाकाहारी भोजनाचा आनंद घ्यायची एक नवी जागा आता आपल्या सेवेत सज्ज झाली आहे. शुक्रवार, दिनांक २३ मे २०२५ पासून हॉटेल पद्मालया या नावाने एक उत्कृष्ट शाकाहारी हॉटेल आपल्या सेवेतील एक नवा अध्याय सुरू करत आहे. सौ. हेमांगी शालिग्राम मालकर (प्रोप्रायटर्स, हॉटेल पद्मालया वावडदा), संकेत शालिग्राम मालकर (प्रोप्रा. हॉटेल प्रधान, वडगाव), शालिग्राम ओंकार मालकर (प्रोप्रा. हॉटेल प्रधान, वावडदा) आणि खुशबू शालिग्राम मालकर या सर्वांचे सामूहिक प्रयत्न आणि परिश्रमातून साकार झालेलं हे हॉटेल म्हणजे

सेवा, स्वाद आणि सौंदर्य यांचे त्रिसूत्री तत्त्व एकत्रित करणारा प्रकल्प आहे.
हॉटेल पद्मालयाचा उद्घाटन समारंभ शुक्रवार, २३ मे रोजी संध्याकाळी ५ वाजता होणार असून, सर्व स्नेही, हितचिंतक, ग्रामस्थ, राजकीय, सामाजिक, व्यापारी आणि पत्रकार बांधवांना सस्नेह आमंत्रित करण्यात आले आहे. कार्यक्रमाची वेळ ‘संध्याकाळी ५ ते आपल्या आगमनापर्यंत’ असे ठेवण्यात आलेली आहे, ज्यामुळे कोणत्याही व्यक्तीला वेळेच्या अडचणीमुळे या आनंदसोहळ्यापासून वंचित राहावं लागणार नाही
बिलखेडा-वावडदा परिसरातील पाचोरा रोड हा एक महत्त्वाचा मार्ग असून, रोज अनेक प्रवासी आणि स्थानिक नागरिक याच मार्गावरून ये-जा करतात. मात्र या भागात दर्जेदार, स्वच्छ आणि शुद्ध शाकाहारी जेवणाची सोय नव्हती. हीच गरज ओळखून हॉटेल पद्मालयाची संकल्पना साकारण्यात आली. या ठिकाणी येणाऱ्या प्रत्येक ग्राहकाला घरगुती चव, पारंपरिक पदार्थ, उत्तम सेवा आणि प्रसन्न वातावरण मिळावे, यासाठी मालकर कुटुंबाने संपूर्ण मनापासून हा उपक्रम साकारला आहे.
हॉटेल पद्मालयामध्ये सर्व वयोगटासाठी स्वादिष्ट शुद्ध शाकाहारी भोजनाची उत्तम सोय आहे. उत्तम आसनव्यवस्था, भरपूर नैसर्गिक प्रकाश आणि स्वच्छता यांचा अनुभव येथे प्रत्येक पाहुण्याला मिळणार आहे. संपूर्ण कुटुंबासाठी एकत्र बसून जेवण करता येईल अशा व्यवस्था करण्यात आल्या असून, लहान मुलांपासून ते वयोवृद्ध पर्यंत सर्वांचे स्वागत अत्यंत आदरपूर्वक आणि आपुलकीने केले जाणार आहे.
हॉटेल पद्मालयाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे येथे खासगी समारंभ, वाढदिवस, गेट-टुगेदर, नामकरण, स्नेहमेळावे आणि लहान मोठ्या पार्टींसाठी स्वतंत्र हॉल व निसर्गरम्य गार्डनची उत्तम सुविधा करण्यात आलेली आहे. हा परिसर उत्सवप्रिय कुटुंबांसाठी आणि कार्यक्रम आयोजित करणाऱ्या मंडळांसाठी एक आदर्श ठिकाण ठरणार आहे. स्वच्छ व हवेशीर परिसर, खास मेन्यू, सुशिक्षित व सभ्य कर्मचारीवर्ग आणि घरगुती चव यांचा आनंद येथे घेता येणार आहे.
हॉटेल पद्मालया हे केवळ एक व्यवसायिक उपक्रम नाही, तर हा एक सामाजिक बांधिलकीने प्रेरित असलेला सेवाभाव आहे. सौ. हेमांगी शालिग्राम मालकर यांच्या संयमी आणि व्यवस्थापनक्षम दृष्टिकोनातून या हॉटेलचे नियोजन झाले आहे. त्यांना संकेत शालिग्राम मालकर आणि शालिग्राम ओंकार मालकर या कुटुंबातील तरुण नेतृत्वाने साथ दिली. विशेष म्हणजे या तिघांनी हॉटेल प्रधानच्या यशस्वी अनुभवावर आधारित हॉटेल पद्मालया साकारले असून, त्यात नवकल्पना आणि आधुनिक गरजांची पूर्तता यांचे उत्तम संतुलन राखले आहे.
हॉटेल पद्मालया या मंगल कार्यानिमित्ताने मालकर परिवाराने समाजातील सर्व स्तरातील लोकांना निमंत्रण दिले असून, ‘आपली उपस्थिती हीच आमच्यासाठी सर्वात मोठा शुभाशिर्वाद’ असे आवाहन केले आहे. निमंत्रण पत्रिकेतील शब्दांमध्ये आपुलकी, साधेपणा आणि सामाजिक जाणीव स्पष्टपणे दिसते. पाचोरा, भडगाव, वडगाव, बिलखेडा, वावडदा या परिसरातील प्रत्येक नागरिक, राजकीय-सामाजिक कार्यकर्ते, व्यापारी वर्ग, पत्रकार, महिला मंडळे, तरुण मंडळे, शिक्षक आणि प्रशासकीय अधिकारी यांना निमंत्रण देण्यात आले आहे.
हॉटेल पद्मालया हे भविष्यातील सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक उपक्रमांचेही केंद्र ठरणार आहे. येथे अनेक समाजोपयोगी कार्यक्रम, आरोग्यविषयक चर्चासत्रे, युवकांसाठी मार्गदर्शन शिबिरे इत्यादी उपक्रम घेण्याचा मानस मालकर परिवाराने व्यक्त केला आहे. व्यवसायाबरोबरच समाजहिताची जाण ठेवणारा हा दृष्टिकोन खरंच स्तुत्य आहे.
हॉटेल पद्मालया ही फक्त भोजनालय नाही, ती एक अनुभवांची जागा आहे. येथे आलेला प्रत्येक ग्राहक केवळ अन्नाने नव्हे तर सेवाभावानेही तृप्त होईल, हा विश्वास सौ. हेमांगी शालिग्राम मालकर आणि त्यांच्या कुटुंबाला आहे. स्वच्छता, दर्जा, पारंपरिक चव, आधुनिक सोयीसुविधा, नैसर्गिक वातावरण आणि आत्मियता यांचा मिलाफ म्हणजेच हॉटेल पद्मालया.
जिल्ह्यातील नागरिकांनी आणि पंचक्रोशीतून येणाऱ्या पाहुण्यांनी हॉटेल पद्मालया या नव्याने साकारलेल्या संस्थेच्या शुभारंभास उपस्थित राहून सौ. हेमांगी शालिग्राम मालकर व त्यांच्या कुटुंबाच्या उपक्रमास शुभाशीर्वाद द्यावेत, अशी साद मालकर कुटूंबियांच्या वतीने करण्यात आली आहे.

ताज्या बातम्या

error: Content is protected !!