Home Blog Page 77

विठ्ठलनामाच्या गजरात रंगली आषाढी दिंडी — श्री. एच. बी. संघवी हायस्कुल खेडगाव नंदीचे येथे उत्साही वारीचे दर्शन

Loading

खेडगाव नंदीचे (ता. पाचोरा) येथील श्री. एच. बी. संघवी हायस्कुल येथे आषाढी एकादशीच्या पावन पर्वानिमित्त दि. 5 जुलै 2025 रोजी पारंपरिक आणि भक्तिमय वातावरणात दिंडी व ग्रंथ दिंडीचे आयोजन करण्यात आले. पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्था संचलित या शाळेने वर्षानुवर्षांची सांस्कृतिक परंपरा जपत विद्यार्थ्यांमध्ये भक्तिभाव रुजवण्यासाठी आणि वारकरी सांप्रदायाची शिकवण आत्मसात करण्यासाठी उपक्रमशीलतेने दिंडीचे आयोजन केले होते. या पवित्र आणि भक्तिभावपूर्ण उपक्रमास ‘विठ्ठल नामाची शाळा भरली…!’ असा भावनिक आणि उत्सवभाव दर्शवणारा अनुभव गावकऱ्यांनी प्रत्यक्ष घेतला. संपूर्ण खेडगाव नंदीचे गाव विठ्ठलनामाच्या गजरात न्हाऊन निघाले होते. टाळ-मृदुंगाच्या तालावर पावले थिरकत होती, तर भजनी मंडळाच्या आवाजात ‘ज्ञानोबा-तुकाराम’ या संतांची शिकवण प्रत्येकाच्या मनामनात घुमत होती. शाळेच्या आवारातून निघालेली ही पालखी दिंडी अत्यंत शिस्तबद्ध रचनेत साकारली होती. विद्यार्थ्यांनी पारंपरिक पोशाखात विठ्ठल-रखुमाईच्या वेशभूषा करून पालखीसमोर नृत्य सादर केले. ‘विठू माऊली तुझी पालखी चालली’ अशा जयघोषात दिंडी शाळेच्या प्रांगणातून गावाभोवती फेरी मारून पुन्हा विद्यालयात विसावली. यामध्ये विठ्ठल-रखुमाईच्या मूर्तीच्या प्रतिमा सजवून पालखीमध्ये प्रतिष्ठापित करण्यात आल्या होत्या. विद्यार्थ्यांनी हातात भगवे झेंडे, टाळ व मृदुंग घेतले होते. प्रत्येकजण विठ्ठलनामात रंगून गेला होता. या दिंडीचे खास वैशिष्ट्य म्हणजे ‘ग्रंथ दिंडी’. विद्यार्थ्यांनी संत तुकाराम, संत ज्ञानेश्वर, संत एकनाथ, संत नामदेव आदी महान संतांच्या अभंग व गाथांचे ग्रंथ हातात घेऊन प्रभात फेरी केल्यासारखे वातावरण निर्माण केले. धर्मग्रंथांना वाचनातून श्रद्धेने सामावून घेणारा हा उपक्रम पालक आणि ग्रामस्थांना खूप भावला. या पालखी व ग्रंथ दिंडीत गावातील विविध भजनी मंडळांनी सहभाग नोंदवला होता. विशेष उल्लेखनीय बाब म्हणजे, दिंडीमध्ये गावातील प्राथमिक शाळेतील विद्यार्थी, शिक्षक व शिक्षिका यांचा देखील उत्स्फूर्त सहभाग होता. या लहानग्यांनीही टाळ मृदुंगाच्या गजरात सामील होऊन मोठ्या भक्तिभावाने दिंडीत भाग घेतला. गावातील भजनी मंडळ देखील विद्यार्थ्यांसोबत संपूर्ण गावभर दिंडीमध्ये सहभागी होत अखंड भजन आणि जयघोषांनी वातावरण भक्तिरसात न्हावून टाकले. गावातील माता-भगिनी, ज्येष्ठ नागरिक, तरुण वर्ग, पालक, शाळेचे माजी विद्यार्थी, ग्रामस्थ आणि आजूबाजूच्या शाळांतील शिक्षक बांधवांनी देखील उत्स्फूर्तपणे यात सहभाग घेतला. शाळेतील मुख्याध्यापक, पर्यवेक्षक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी यांनी मिळून कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी अथक परिश्रम घेतले. दिंडीच्या रस्त्यावर ग्रामस्थांनी रांगोळ्या काढून स्वागत केले. काही ठिकाणी पाण्याचे वाटप, प्रसाद वाटप व फुलांनी आरती करून दिंडीचे स्वागत करण्यात आले. ग्रामीण भागात सांप्रदायिकतेचा समतोल राखत अशा प्रकारच्या सांस्कृतिक आणि धार्मिक उपक्रमातून सामाजिक एकोपा जपला जातो, हे या प्रसंगातून दिसून आले. पालखी दिंडी गावात फिरल्यानंतर शाळेच्या आवारात विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या अभंगगायन, रिंगणनृत्य, पारंपरिक फुगड्या, ओव्या, पोवाडे, कथाकथन व कीर्तनाने उपस्थितांची मने जिंकली. संत तुकारामांच्या अभंगांनी उपस्थितांचे मन गहिवरून गेले. “पंढरीनाथा मज भेटे हा, सुखाचा सागर वाहे रे…” या अभंगाने कार्यक्रमाला अध्यात्मिक उंची गाठून दिली. विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या नाटिकांमधून वारकरी संप्रदायाचे महत्त्व, संतांचा आदर्श आणि भक्तिमार्गाची श्रेष्ठता मांडण्यात आली. यामुळे केवळ धार्मिकता नव्हे तर समाजप्रबोधनाच्या दृष्टीनेही उपक्रम प्रभावी ठरला. शाळेचे मुख्याध्यापक, पर्यवेक्षक व शिक्षकांनी संयोजनाची जबाबदारी सांभाळताना विद्यार्थ्यांमध्ये शिस्त, भक्तीभाव व सामाजिक बांधिलकी रुजवण्यावर भर दिला. शिक्षकांनी विद्यार्थ्यांना संतपरंपरेचे व वारकरी संप्रदायाचे महत्त्व पटवून देत अध्यात्म, सुसंस्कार व समाजसेवेचे मूल्य आत्मसात करायला उद्युक्त केले. दिंडीचा हेतू केवळ उत्सव नव्हता तर विद्यार्थ्यांच्या मनामनात भक्ती, श्रद्धा व एकात्मतेची भावना जागवण्याचा तो एक माध्यम होता. यामुळे खेडगाव नंदीचे या छोट्याशा गावात एक वेगळीच अध्यात्मिक ऊर्जा पसरली होती. या भक्तिमय सोहळ्यामध्ये शाळेच्या व्यवस्थापन समितीपासून सर्व शिक्षकवर्ग, शिक्षकेतर कर्मचारी, पालक, विद्यार्थी, ग्रामस्थ आणि समाजातील प्रत्येक घटकाने आपले योगदान दिले. विशेषतः गावातील भजनी मंडळांनी पारंपरिक अभंगांच्या माध्यमातून वातावरण भारावून टाकले. दिंडीच्या यशामध्ये सर्व घटकांनी केलेले सामूहिक प्रयत्न हे ग्रामीण भागात शिक्षण संस्था व समाज यांच्यातील सुंदर नाते अधोरेखित करणारे होते. यातून विद्यार्थ्यांमध्ये केवळ अध्यापनच नव्हे तर मूल्यशिक्षण, भक्तिभाव, सामाजिक जाणीव आणि संघटनात्मक कौशल्यांची वृद्धी होण्यास मदत झाली. विठ्ठलनामाच्या गजरात रंगलेली दिंडी ही केवळ धार्मिक वा सांस्कृतिक घटना नव्हती, तर ती एक जिवंत अध्यात्मिक अनुभूती होती. विद्यार्थ्यांना वारकरी परंपरेशी जोडत समाजाशी एकरूप करणारा हा उपक्रम भावी पिढीला समृद्ध आणि सुसंस्कारित करण्याचा उत्तम प्रयत्न ठरला. श्री. एच. बी. संघवी हायस्कुल, खेडगाव नंदीचे यांनी ‘शाळा म्हणजे केवळ शिक्षणाचे केंद्र नव्हे तर संस्कारांची शाळा असली पाहिजे’ हे वास्तव या दिंडीद्वारे पुन्हा अधोरेखित केले. शिक्षणाच्या मंदिरात भक्तीचा महोत्सव भरवणाऱ्या या पवित्र उपक्रमातून संपूर्ण गाव एकत्र आले आणि विठ्ठलनामाच्या जयघोषात अध्यात्म, एकात्मता आणि संस्कृती यांचे दर्शन झाले.

विघ्नहर्ता हॉस्पिटल, पाचोरा येथे मोफत डायलेसिस सेंटरचे उद्घाटन रविवार ६ जुलै रोजी

Loading

पाचोरा – येथील विघ्नहर्ता मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल व CG Nephrocare & Dialysis Center यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत डायलेसिस सेंटरचे उद्घाटन रविवार दि. ६ जुलै २०२५ रोजी दुपारी ३ वाजता पाचोरा सेंट्रल येथील पहिल्या मजल्यावर आयोजित करण्यात आले आहे. या उपक्रमामुळे पाचोरा आणि परिसरातील मूत्रपिंड विकारांनी त्रस्त रुग्णांसाठी सुसज्ज आणि दर्जेदार उपचार सुविधा उपलब्ध होणार आहे. या उद्घाटन सोहळ्याचे शुभहस्ते आमदार किशोर आप्पा पाटील (पाचोरा-भडगाव) यांच्या हस्ते होणार असून, मा. संजय दादा गरुड यांचे शुभाशीर्वाद लाभणार आहेत. या कार्यक्रमाला मा. दिलीपभाऊ वाघ (माजी आमदार पाचोरा-भडगाव), मा. सौ. वैशालीताई सूर्यवंशी (संचालिका निर्मल सिड्स, पाचोरा) आणि मा. अमोलभाऊ शिंदे (भाजपा पाचोरा-भडगाव) हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. विघ्नहर्ता हॉस्पिटलच्या वतीने सुरू होणारे हे डायलेसिस सेंटर हे पाचोरा तालुक्यातील सर्वाधिक डायलेसिस करणारे व ते सुद्धा मोफत सुविधा असलेले केंद्र ठरणार असून, यामध्ये 24/7 तत्काळ सेवा, अत्याधुनिक यंत्रणा, तज्ज्ञ डॉक्टरांचे मार्गदर्शन व कुशल नर्सिंग स्टाफ उपलब्ध राहणार आहे. उद्घाटनानिमित्त डायलेसिस तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली मोफत तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. यात रुग्णांना किडनी विकार, मधुमेह, रक्तदाब व त्याचा मूत्रपिंडावर होणारा परिणाम, आहार आणि जीवनशैली यासंबंधी मार्गदर्शन करण्यात येणार आहे. CG Nephrocare & Dialysis Center ही देशातील अग्रगण्य संस्था असून त्यांनी अत्याधुनिक सुविधा पाचोरा शहरात उपलब्ध करून दिल्या आहेत. स्थानिक पातळीवर डायलेसिसची सेवा उपलब्ध नसल्यामुळे रुग्णांना आतापर्यंत जळगाव, भुसावळ किंवा औरंगाबाद येथे जावे लागत होते. यामुळे वेळ, पैसा व मानसिक त्रास सहन करावा लागत होता. मात्र, या केंद्रामुळे आता पाचोऱ्यातच मोफत उपचार मिळणार असून, ही सुविधा गरजू रुग्णांसाठी एक वरदान ठरणार आहे. कार्यक्रमाचे ठिकाण पहिला मजला, पाचोरा सेंट्रल, APMC कंपाउंड, जिल्हा – जळगाव असे असून, नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून आरोग्यसेवेच्या या उपक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे. अधिक माहितीसाठी 9529428691 / 9096545920 या क्रमांकावर संपर्क साधावा. वेबसाईट www.cgnephrocare.com द्वारे देखील माहिती उपलब्ध आहे. विघ्नहर्ता हॉस्पिटलच्या या उपक्रमामुळे “आरोग्य हीच खरी सेवा” या तत्त्वाचा प्रत्यय पाचोरावासीयांना मिळणार असून, सर्वसामान्य जनतेसाठी आरोग्यसेवेचा एक नवा अध्याय सुरू होणार आहे.

पाचोरा बस स्थानकात गोळीबार : सीसीटीव्ही बंद, ड्युटीवरील पोलिसांच्या भूमिकेवर संशय; चौकशी व निलंबनाची मागणी

Loading

पाचोरा तालुक्यातील प्रमुख सार्वजनिक व वर्दळीच्या ठिकाणी समाविष्ट असलेल्या पाचोरा एसटी बस स्थानक परिसरात सायंकाळच्या सुमारास घडलेल्या गोळीबाराच्या घटनेमुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे. या घटनेत आकाश मोरे (वय अंदाजे २५) या युवकाचा मृत्यू झाला असून, परिसरात नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. अत्यंत गजबजलेल्या व प्रवासी गर्दीच्या ठिकाणी दिवसा ढवळ्या अशा प्रकारचा हिंसाचार होणे ही गंभीर बाब असून, त्यामुळे पोलीस यंत्रणा व एसटी प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. घटनेच्या पार्श्वभूमीवर बस स्थानक परिसरात याआधीच लाखो रुपये खर्चून बसवण्यात आलेली सीसीटीव्ही यंत्रणा निष्क्रिय असल्याचे पुन्हा एकदा उघड झाले आहे. सदर कॅमेरे अनेक महिन्यांपासून बंद किंवा नादुरुस्त अवस्थेत असल्यामुळे गोळीबाराच्या या गंभीर घटनेचा तपास करताना कोणतेही दृश्य पुरावे उपलब्ध झालेले नाहीत. पोलिसांना केवळ प्रत्यक्षदर्शींच्या जबाबावर अवलंबून राहावे लागत आहे. गोळीबाराच्या घटनेत आकाश मोरे याला गोळ्या लागल्याने तो जागीच कोसळला. परिसरात क्षणार्धातच एकच गोंधळ उडाला. ऑनड्युटी पोलीस वगळता प्रवासी, दुकानदार, वाहनचालक यांनी घटनास्थळावर धाव घेतली. काही वेळ वातावरण पूर्णपणे तणावपूर्ण होते. घटनेची माहिती मिळताच पाचोरा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली व जखमीला तातडीने रुग्णालयात हलवण्यात आले, मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी जाहीर केले. या घटनेनंतर परिसरातील सुरक्षाव्यवस्थेवर तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. अनेक नागरिक, प्रवाशी व स्थानिक व्यापाऱ्यांनी प्रशासनाच्या निष्काळजीपणावर संताप व्यक्त केला असून, प्रवाशांच्या सुरक्षेसाठी बसवलेली यंत्रणा जर वेळेवर चालू ठेवण्यात आली असती, तर किमान गुन्हेगाराच्या ओळखीचे धागेदोरे सापडले असते, असे म्हणणे आले आहे. मात्र सदर कॅमेरे बंद असल्यामुळे पोलिसांना या घटनेबाबत ठोस दृश्य पुरावा मिळू शकलेला नाही. या घटनेबाबत स्पष्टच बोलायचे म्हटले तर आणखी गंभीर बाब म्हणजे पाचोरा बस स्थानकावर शोसाठी व पोलिसांना सेल्फी काढण्यासाठी स्वतंत्र पोलीस चौकी उभारण्यात आली आहे या ठिकाणी कायमस्वरूपी पोलीस तैनात करण्यात येत असल्याची माहिती असून, 20 ते 25 मिटर अंतरावर असलेली स्वतंत्र पोलीस चौकी कार्यरत असतांना गोळीबार घडला कसा तेव्हा ड्युटीवरील पोलीस कर्मचारी काय करत होते त्यांचे मोबा लोकेशन देखील तपासणे गरजेचे आहे बस स्थानकावर नेहमी होणाऱ्या चोऱ्यां प्रमाणे त्यांना या प्रकाराचा सुगावा का लागला नाही, त्यांनी तत्काळ हस्तक्षेप का केला नाही जर ऑन ड्युटी पोलीस बस स्थानकावर हजर असते तर कदाचित एवढा गंभीर प्रकार घडला नसता या प्रश्नांची चर्चा सर्वत्र होत आहे. सदर प्रकरणात पत्रकार संदीप महाजन यांनी पोलिसांच्या कार्यशैलीवर थेट सवाल उपस्थित करत, ड्युटीवरील पोलिसांची जबाबदारी निश्चित करून त्यांच्या कर्तव्यात कसूर झाल्याप्रकरणी चौकशी करून निलंबन करण्यात यावे, अशी तीव्र मागणी केली आहे. या प्रकरणी ऑन ड्युटी असलेल्या संबंधित पोलिसांना वाचवण्याचा प्रयत्न केल्यास संबंधितांवर देखील कारवाई करावी यासाठी लोकशाही मार्गाने आंदोलनाचा पवित्र घेतला जाईल बस स्थानकासारख्या महत्त्वाच्या ठिकाणी सुरक्षा व्यवस्था असूनही जर अशा घटना घडत असतील तर ती केवळ प्रशासनाच्या उदासीनतेमुळे घडत आहेत. पाचोरा बस स्थानकावर दररोज हजारो प्रवासी, महिला, विद्यार्थी, नागरिक व व्यापारी ये-जा करत असतात. अशा ठिकाणी सुरक्षा रक्षकांची उपस्थिती नसणे, सीसीटीव्ही यंत्रणा बंद असणे आणि ड्युटीवरील पोलिसांचा प्रतिसाद वेळेवर न मिळणे ही बाब संपूर्ण प्रशासकीय यंत्रणेच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारी आहे. सीसीटीव्ही फुटेज उपलब्ध नसल्यामुळे तपासाला हवी तशी गती मिळताना दिसत नाही. घटनेच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी पुढील उपाययोजना तातडीने करण्यात याव्यात अशी मागणी केली आहे. यामध्ये बस स्थानक परिसरातील सर्व सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची तत्काळ तपासणी करून ते कार्यान्वित करणे, ड्युटीवरील पोलिसांच्या कार्यपद्धतीची चौकशी करून संबंधित अधिकाऱ्यांवर शिस्तभंग कारवाई करून निलंबन करणे बस स्थानकात विशेष पोलीस बंदोबस्त ठेवणे, आणि एस टी महामंडळाने दररोज गस्त घालणाऱ्या सुरक्षा रक्षकांची नियुक्ती करणे या मागण्या प्रमुख आहेत. सध्या शहरात या घटनेची तीव्र चर्चा असून, सर्वच स्तरातून “आता तरी प्रशासन जागे होईल का?” असा थेट सवाल विचारला जात आहे. प्रवाशांच्या सुरक्षेसाठी उभारलेली यंत्रणा जर वेळेवर कार्यरत राहिली नाही, तर त्याचा उपयोग काय? हा प्रश्न सध्या प्रत्येक सुजाण नागरिकाच्या मनात आहे. पाचोरा बस स्थानकावर घडलेली गोळीबाराची घटना ही केवळ एका युवकाच्या मृत्यूशी संबंधित नाही, तर ती प्रशासनाच्या निष्काळजीपणाचे आणि पोलिसांच्या शिथिल कार्यपद्धतीचे गंभीर उदाहरण ठरली आहे. यावर तातडीने कठोर पावले उचलली नाहीत, तर भविष्यात अशाच घटनांची पुनरावृत्ती होणार हे निश्चित आहे. त्यामुळे जबाबदार अधिकाऱ्यांवर कार्यवाही, बंद असलेल्या यंत्रणांची दुरुस्ती, आणि नागरिकांच्या सुरक्षेला प्राधान्य देणारी ठोस धोरणात्मक पावले उचलणे आता अपरिहार्य झाले आहे.

कर्तृत्ववान सेवाभावी कुस्तीपटू काकासाहेब पाटील यांचा निरोप समारंभ उत्साहात संपन्न होणार

Loading

बांबरुड- ता. पाचोरा महादेवाचे बांबरुड येथील कुस्ती क्षेत्रातील नामवंत खेळाडू, समाजहितासाठी कायम कार्यरत असलेले, तसेच बजाज ऑटो कंपनी छत्रपती संभाजीनगर येथे क्वालिटी कंट्रोलर

इन्स्पेक्टर पदावर तब्बल ३५ वर्षे प्रामाणिक सेवा .बजावलेले काकासाहेब कृष्णराव पाटील यांचा निरोप समारंभ रविवार, १३ जुलै २०२५ रोजी सकाळी १० वाजता बांबरूड महादेवाच्या ग्रामस्थ सभागृहात संपन्न होणार आहे.
काकासाहेब पाटील यांनी आपल्या सेवाकाळात केवळ नोकरीत निष्ठेने लावत बांबरुड गावाच्या सर्वांगीण विकासासाठी

शासन दरबारी सातत्याने पाठपुरावा करत अनेक योजना, विकास कामे आणि क्रीडांगण सुधारणा साध्य केल्या. कुस्तीप्रेमी आणि सामाजिक भान असलेल्या काकासाहेबांनी गावातील युवकांना प्रेरणा देण्याचे काम केले आहे.
या गौरव समारंभाच्या निमित्ताने गावातील ग्रामस्थ, हितचिंतक, नातेवाईक व मित्रमंडळींनी एकत्र येत भव्य स्वरूपात हा कार्यक्रम साजरा करण्याचे ठरवले आहे. पद्माई सिमेंट प्रॉडक्टस् आणि महादेवाचे बांबरुड येथील ग्रामस्थ यांच्यातर्फे आयोजन करण्यात आले आहे. कार्यक्रमाचे विशेष आकर्षण म्हणजे या समारंभाला राजकीय व . प्रशासकीय क्षेत्रातील नामवंत मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून आमदार पाचोरा-भडगाव विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधी आप्पासाहेब किशोर पाटील, माजी आमदार भाऊसाहेब दिलीप वाघ आणि जळगाव येथील आरटीओ विभागातील इन्स्पेक्टर दादासाहेब हेमंत शिवाजी पाटील हे उपस्थित राहून काकासाहेबांच्या कार्याचा गौरव करणार आहेत.
या कार्यक्रमात काकासाहेबांच्या सेवेचा आढावा, स्मृतिचिन्ह व गौरवपत्र प्रदान, पाहुण्यांची मनोगते आणि शेवटी काकासाहेबांचे भावनिक उत्तर भाषण होणार आहे. तदनंतरच स्नेहींचा सत्कार स्वीकारला जाणार आहे कार्यक्रम समाप्तीनंतर उपस्थित सर्व मान्यवर, ग्रामस्थ आणि आमंत्रितांसाठी स्नेहभोजनाची सुंदर व्यवस्था करण्यात आलेली आहे.
या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी धर्मा महादू पाटील, भाऊराव केशव पाटील बबन सहादू पाटील, प्रकाश चंद्रभान पाटील, भालचंद्र तुळशीराम पाटील भाऊसाहेब कृष्णराव पाटील,ज्ञानेश्वर विनायक पाटील,सुनिल पाटील, भटू पाटील (स्नेह
पत्रिकेच्या माध्यमातून संपूर्ण गावाला आवाहन करण्यात आले असून, हा कार्यक्रम कर्तृत्वाचा, सेवाभावाचा आणि गावाच्या एकतेचा प्रतीक ठरणार आहे. कार्यक्रमानंतर काकासाहेबांच्या सेवानिवृत्तीनिमित्त गावकऱ्यांच्या वतीने सन्मानपत्र, पुष्पगुच्छ आणि भावस्पर्शी गौरवपर उद्गार दिले जाणार आहेत.
बांबरुड ग्रामस्थांच्या वतीने स्पष्ट करण्यात आले की, ही केवळ सेवा निवृत्ती नाही तर संपूर्ण पिढीला प्रेरणा देणाऱ्या व्यक्तिमत्त्वाचा गौरव आहे. त्यामुळे प्रत्येक बांबरुडकर आणि हितचिंतकाने उपस्थित राहून काकासाहेबांच्या योगदानाला सामूहिक मान्यता द्यावी, अशी विनम्र विनंती आयोजकांनी केली आहे.

कर्तव्यनिष्ठेचा गौरव सोहळा: डीवायएसपी धनंजय येरुळे यांचा सेवानिवृत्ती समारंभ उत्साहात संपन्न

Loading

पाचोरा – पोलिस उपविभागाचे अधिकारी धनंजय येरुळे यांनी आपल्या ३५ वर्षांच्या प्रदीर्घ व कर्तव्यपरायण सेवेची यशस्वी सांगता करत दिनांक ३० जून रोजी आपल्या सेवेतून निवृत्ती घेतली. त्यांच्या सेवानिवृत्ती निमित्त दिनांक १ जुलै रोजी भडगाव रोडवरील आशीर्वाद हॉलमध्ये आयोजित करण्यात आलेला सेवानिवृत्ती समारंभ हा

अत्यंत उत्साहात, सुसज्ज आणि भावनांनी भारावलेला असा संपन्न झाला. या समारंभात जिल्हाभरातून पोलीस, महसूल, नगरपालिका, कृषी, राजकीय आणि विविध सामाजिक क्षेत्रातील मान्यवर तसेच कुटुंबीय, नातेवाईक, मित्रपरिवार मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. या समारंभाची सुरुवात एका अनोख्या आणि भव्य मिरवणुकीने झाली. गिरड रोडवरील डीवायएसपी कार्यालयापासून सजवलेल्या खुल्या जीपमध्ये धनंजय येरुळे आणि त्यांच्या पत्नी सौ. राजश्री येरुळे यांची मिरवणूक काढण्यात आली. ही मिरवणूक गिरड चौफुली, बाजार समिती, पोलीस लाईन, राजे संभाजी चौक, इंदिरा नगर मार्गे आशीर्वाद हॉलमध्ये पोहोचली. पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी दोर ओढत देशभक्तिपर घोषणा देत या मिरवणुकीला अभूतपूर्व स्वरूप दिले. मिरवणुकीदरम्यान देशप्रेम जागवणारे घोष, फुलांची उधळण आणि आनंदोत्सवाचे वातावरण पाहायला मिळाले. कार्यक्रमस्थळी पोहोचल्यावर येरुळे दांपत्याचे नातेवाईकांकडून औक्षण करण्यात आले आणि फटाक्यांच्या गजरात, फुलांच्या वर्षावात मंचावर सन्मानाने आणण्यात आले. या सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी प्रांत अधिकारी डॉ. भूषण अहिरे होते. मंचावर मान्यवरांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम अधिक भारदस्त झाला. व्यासपीठावर प्रांत अधिकारी विनय गोसावी, तहसीलदार विजय बनसोडे, नगरपालिका प्रशासक मंगेश देवरे, शंकर अप्पा येरुळे, चंद्रकांत द्वासे, उमाकांत येरुळे, चंद्रकांत येरुळे, मानीक निला, मन्मथ आप्पा फास्के, डॉ. विजयकुमार द्वासे, मल्लिकार्जुन गिरवलकर, अशोक तोंडारे, अतुल फास्के, आदित्यराज येरुळे, सौ. अपूर्वा फास्के, निवृत्त जिल्हा प्लॅनिंग अधिकारी प्रतापराव पाटील, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख दीपकसिंग राजपूत, माजी जि.प. सदस्य भुरा आप्पा पाटील, नानासाहेब देशमुख (भडगाव), राजाराम सोनार, डॉ. सागर गरुड, डी.डी. पाटील, सौ. हिरा गिरवलकर, सौ. योजना पाटील, सचिन सोमवंशी, राजधर पांढरे, शिवव्याख्याते सुनील पाटील, शेख रसूल उस्मान, पत्रकार संदीप महाजन, प्रा. सी. एन. चौधरी, अनिल येवले, राजू खैरनार, शांताराम चौधरी, पोलीस निरीक्षक अशोक पवार, सचिन सानप आदी मान्यवर उपस्थित होते. या समारंभात अनेकांनी आपले मनोगत व्यक्त करत येरुळे यांच्या कर्तृत्वाचा गौरव केला. चंद्रकांत द्वासे, डॉ. विजयकुमार द्वासे, आदित्यराज येरुळे, सौ. अपूर्वा फास्के, सचिन सोमवंशी, राजधर पांढरे, निवृत्त प्राचार्य सुनील पाटील, पोलीस कॉन्स्टेबल राहुल सोनवणे, स्थानिक गुन्हे शाखेचे लक्ष्मण पाटील, ईश्वर पाटील, शेख रसूल उस्मान, पत्रकार संदीप महाजन, सुनील पाटील, राहुल सोनवणे आदींनी येरुळे यांच्याबद्दलच्या आपल्या भावना मांडत त्यांना भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी येरुळे यांच्या सुपुत्र आदित्यराज येरुळे व कन्या सौ. अपूर्वा फास्के यांनी आपल्या वडिलांच्या सेवेचा मागोवा घेत एक अनोखा आणि भावनिक सादरीकरण केले. महाराष्ट्र राज्याच्या नकाशात वडिलांनी सेवा बजावलेल्या ठिकाणांचा कल्पक उल्लेख करत ‘सद्रक्षणाय खलनिग्रहणाय’ या पोलीस खात्याच्या घोषवाक्यास अनुसरून त्यांची कार्यकिर्द उभी केली. याशिवाय वैष्णवी दातीर हिने धनंजय येरुळे यांचे सुंदर स्केच तयार करून त्यांना भेट दिले. या सर्व सादरीकरणांनी उपस्थितांचे मन भरून आले. विशेष आकर्षण ठरली ती एक हृदयस्पर्शी व्हिडीओ क्लिप, जी येरुळे दांपत्याच्या कर्तृत्वमय प्रवासावर आधारित होती. अपूर्वा फास्के आणि आदित्यराज येरुळे यांनी ती व्हिडीओ तयार करून उपस्थितांसमोर दाखवली. या व्हिडीओने उपस्थितांना भावनाविवश केले. या सोहळ्याला उत्तर देताना धनंजय येरुळे यांनी आपल्या सेवाजिवनाचा आढावा घेतला. उपनिरीक्षक पदापासून सुरुवात करून डीवायएसपी पदापर्यंतचा प्रवास त्यांनी सुस्पष्ट आणि मार्मिक शब्दांत मांडला. त्यांनी आपल्या नोकरीदरम्यान तपासलेल्या महत्त्वपूर्ण गुन्ह्यांचा, कडक निर्णयांचा, आणि तडफदार कामगिरीचा उल्लेख करून अनेक आठवणींना उजाळा दिला. त्यांनी आपल्या सहकाऱ्यांविषयी कृतज्ञता व्यक्त करत त्यांच्या सहकार्यामुळेच आपण यशस्वी सेवा करू शकलो असे नमूद केले. या सोहळ्याचे प्रास्ताविक पोलीस निरीक्षक अशोक पवार यांनी केले. प्रा. सी. एन. चौधरी व प्रा. शिवाजी शिंदे यांनी सुरेख सूत्रसंचालन केले. समारोपाप्रसंगी आदित्यराज येरुळे यांनी आपल्या भावनांना वाट मोकळी करून उपस्थितांप्रती आभार व्यक्त केले. राष्ट्रगीताने या समारंभाची सांगता झाली. या संपूर्ण सोहळ्याच्या यशस्वी आयोजनासाठी पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले. उत्साही मिरवणूक, शिस्तबद्ध कार्यक्रम, सन्मानाचे वातावरण, आणि भावनांनी भरलेली सादरीकरणे यांनी येरुळे यांच्या सेवानिवृत्ती समारंभाला संस्मरणीय बनवले. धनंजय येरुळे यांनी आपल्या सेवाजिवनात नेहमीच नियमप्रियता, कर्तव्यनिष्ठा, धैर्य, आणि माणुसकी या मूल्यांना जपले. त्यांच्या सेवानिवृत्तीने पोलीस दलातील एक अभ्यासू, शिस्तप्रिय, व कर्मठ अधिकारी निवृत्त झाला आहे, पण त्यांच्या कार्याची प्रेरणा अनेक पोलीस अधिकारी व नवतरुणांसाठी मार्गदर्शक ठरणार आहे.

छत्रीखाली विश्वासाचे छत्र: मराठे निलेश विनायक यांची सडेतोड उमेदवारी

Loading

पाचोरा – दि. पाचोरा पिपल्स को-ऑप बँक लि. पाचोरा ही बँक गेली अनेक दशके पाचोऱ्यासह संपूर्ण तालुक्याच्या आर्थिक घडामोडींमध्ये आपले महत्त्वपूर्ण योगदान देत आहे. सहकारी बँकिंगच्या माध्यमातून ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळ देणाऱ्या या संस्थेच्या पंचवार्षिक निवडणुकीकडे संपूर्ण सभासद वर्गाचे लक्ष लागलेले आहे. या निवडणुकीत मराठे निलेश विनायक हे सर्वसाधारण मतदार संघातून उमेदवारी करीत असून त्यांनी अत्यंत स्पष्ट, ठाम आणि ज्वलंत मुद्यांच्या आधारे ही उमेदवारी सादर केली आहे. मराठे निलेश विनायक यांनी त्यांच्या उमेदवारीची घोषणा करताच, अनेक सर्वसामान्य सभासदांमध्ये आशेचा किरण निर्माण झाला आहे. त्यांनी आपल्या जाहीर विनंती पत्रकात निवडणुकीच्या निमित्ताने कोणत्या मुद्यांसाठी ही लढाई आहे, हे परखडपणे आणि निर्भीडपणे मांडले आहे. त्यांनी सांगितले आहे की, ही निवडणूक केवळ संचालकपदासाठीची लढाई नसून ही संघर्षाची निवडणूक आहे – विशिष्ट मक्तेदारीविरुद्ध लोकशाहीचा लढा आहे, आणि ही निवडणूक म्हणजे सभासदांच्या न्यायहक्कासाठीचा यज्ञ आहे. त्यांच्या उमेदवारीमागील प्रमुख उद्दिष्टे ही सभासदांच्या हितासाठी आणि बँकेच्या कायदेशीर, पारदर्शक आणि प्रामाणिक कारभारासाठीच केंद्रित आहेत. त्यांनी स्पष्ट शब्दांत मांडले आहे की – “मी केवळ संचालक होण्यासाठी उभा नाही आहे. मी सभासदांचा खरा प्रतिनिधी बनून त्यांच्या प्रश्नांना न्याय मिळवून देण्यासाठी उभा आहे.” त्यांनी जाहीरनामा प्रसिद्ध करताना जो मुद्देसूद आढावा मांडला आहे, तो पाहता त्यांच्या या लढाईमध्ये वैयक्तिक महत्वाकांक्षा नसून, बँकेतील दीर्घकालीन अकार्यक्षमता, स्वार्थी कारभार, काही विशिष्ट लोकांची हुकूमशाही वृत्ती आणि सर्वसामान्य सभासदांच्या हक्कांचे सातत्याने होणारे उल्लंघन – याविरुद्धचा संघर्ष आहे. बँकेच्या पारदर्शक आणि स्वच्छ कारभारासाठी : बँकेच्या आर्थिक व्यवहारांमध्ये पारदर्शकता असणे गरजेचे आहे. संचालक मंडळाने घेतलेले निर्णय हे सर्व सभासदांच्या भल्यासाठी असावेत, कोणत्याही प्रकारचा भेदभाव किंवा स्वार्थ त्यामध्ये नको, ही त्यांची भूमिका स्पष्ट आहे. एकाधिकारशाही संपवण्यासाठी : सध्याच्या व्यवस्थेत काही विशिष्ट लोकांनी बँकेच्या निर्णयप्रक्रियेवर अघोषित मक्तेदारी निर्माण केली आहे. सभासदांचा आवाज, प्रश्न आणि सहभाग दुर्लक्षित केला जातो. हे वातावरण बदलणे, हीच त्यांची लढाई. गरजू आणि प्रामाणिक सभासदांच्या हक्कांसाठी : बँक ही सर्वसामान्य सभासदांची आहे. प्रामाणिक व्यवसाय करणाऱ्या, कष्टकरी वर्गासाठी बँक मदतीचा हात बनावी, हे त्यांचे प्रमुख उद्दिष्ट आहे. लोकशाही मार्गाने मतदानाचा हक्क मिळवून देणारा लढा : बँकेने ५१/- रुपये भागधारक सभासदांचा मतदानाचा हक्क बेकायदेशीरपणे काढून घेतला हा हक्क पुन्हा मिळवण्यासाठी त्यांनी केलेला लढा आहे हीच त्यांची लोकशाहीतील श्रद्धा आणि जिद्द दर्शवते. कर्जवाटप प्रक्रियेतील सुसूत्रता : कोणतेही कर्ज हे केवळ ‘ओळखी’च्या आधारावर न देता, सर्व संचालकांच्या संमतीने आणि कायदेशीर प्रक्रियेनुसार दिले जावे, ही मागणी त्यांनी पुढे केली आहे. सभासदांची बाजू घेणारा खंबीर आवाज : “बदाम काजू खाऊन मान डोलवणारे नव्हे, तर सभासदांच्या हक्कासाठी न्यायालयापर्यंतही लढणारा आवाज व्हायचं आहे” – हे त्यांचे विधान त्यांच्या ठाम भूमिकेचा पुरावा आहे. बेकायदेशीर खर्च वसुली थांबवण्याचा निर्धार : विविध नावांनी होणारे अनावश्यक खर्च, दडपशाहीने वसुली, सभासदांची मुस्कटदाबी – हे सारे थांबवण्याचा आणि कारभारात शिस्त व शुद्धता आणण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे. मराठे निलेश विनायक यांच्या या भूमिकेमुळे बँकेतील नवा बदल, नवसंस्कार आणि नवदृष्टीकोन निर्माण होईल, अशी अपेक्षा मोठ्या संख्येने सभासद व्यक्त करत आहेत. त्यांनी जाहीर केले आहे की, “सभासदांनी दिलेला एक मत म्हणजे केवळ विजयी करणारा आकडा नव्हे, तर बदल घडवणारी क्रांती आहे.” सभासदांच्या हक्कांच्या संरक्षणासाठी, पारदर्शी कारभारासाठी आणि संस्थेच्या मूळ उद्देशांना नवसंजीवनी देण्यासाठी ते सज्ज आहेत. या निवडणुकीसाठी त्यांचे प्रातिनिधिक चिन्ह आहे ‘छत्री’ – ही छत्री म्हणजे विश्वासाचे आणि न्यायाचे प्रतीक आहे. त्यांनी विनंती केली आहे की, “दि. १३ जुलै २०२५, रविवार रोजी सकाळी ८ ते सायं. ४ या वेळेत मतदान करून छत्री या चिन्हासमोर फुलीचा शिक्का मारून मला विजयी करावे.” त्यांची ही विनंती कळकळीची आणि सभासदाभिमुख आहे. यामध्ये अभिमान, कृतज्ञता आणि बांधिलकीचे भाव दडले आहेत. त्यांनी आपला क्रमांक – अ.क्र. ८, आणि संपूर्ण नाव – मराठे निलेश विनायक (सर्वसामान्य प्रतिनिधी), स्पष्टपणे दिले आहे. निवडणूक माहिती – मतदान दिनांक : दि. १३/०७/२०२५ रविवार, वेळ : सकाळी ८ ते सायं. ४ वा., उमेदवार क्रमांक : ८, प्रतिनिधी प्रकार : सर्वसामान्य, निवडणूक चिन्ह : छत्री. सभासद बांधवांनो, आपल्या मताचे सामर्थ्य हे केवळ आकड्यात नाही, तर सत्य, न्याय आणि समानतेसाठी असलेल्या जिद्दीत असते. आपण प्रत्येकाने हा निर्णय डोळसपणे, विचारपूर्वक आणि सत्याचा पाठपुरावा करणाऱ्याच्या बाजूने दिल्यास ही निवडणूक नवा इतिहास घडवू शकते. “आपला एक मत म्हणजे बँकेच्या कारभारात नवा सूर, नवा प्रकाश आणि नव्या आशेचा उदय” – हे लक्षात ठेवून मराठे निलेश विनायक यांना आपल्या बहुमोल मताने विजयी करा, हीच कळकळीची विनंती.

“डॉ. कादंबरी : स्वप्नपूर्तीची पहिली पायरी, स्वातंत्र्याच्या मुळांशी जोडलेली सेवा!”

Loading

आजचा दिवस म्हणजे “डॉक्टर डे” — एक असाच दिवस जो समाजासाठी झटणाऱ्या, रात्रंदिवस न थकता सेवा देणाऱ्या वैद्यकीय क्षेत्रातील प्रत्येक व्यक्तीला अभिमानाने वंदन करण्याचा. परंतु यंदाचा डॉक्टर डे आमच्या कुटुंबासाठी केवळ एक सण नाही, तर पिढ्यानपिढ्या चालत आलेल्या कर्तव्यभावनेच्या परंपरेला नवा श्वास देणारा, नवे स्वप्न साकारलेला दिवस आहे.
कारण आज मी पहिल्यांदा माझ्या कन्येला – डॉ. कादंबरी ला “डॉक्टर डे” च्या शुभेच्छा देतो आहे… तीही तिच्या डॉक्टर होण्याच्या पहिल्याच वर्षी. दोन महिन्यांपूर्वीच तिने फिजिओथेरपी पदवी प्राप्त केली. तिच्या यशाचे क्षण आम्हा सर्वांना आनंदाश्रू देणारे होते, पण आज डॉक्टर डे निमित्ताने ती ‘आपली लेक डॉक्टर झाली आहे’ हे शब्द उच्चारताना ज्या भावना मनात उसळतात, त्या शब्दांत व्यक्त करणे फार कठीण आहे.
“हाती घेतला ज्ञानदीप, हृदयात सेवा भाव,
फिजिओथेरपीतून मिळवली आयुष्याची वाटचाल नव्याने.
डॉ. कादंबरीच्या पदवीला वंदन,”
स्वातंत्र्यसैनिकांच्या घरात जन्मलेली ती आज आरोग्यसेवेची शपथ घेते अभिमानाने…
डॉ. कादंबरी केवळ एका वैद्यकीय पदवीधारक मुलीचं नाव नाही, तर ती आमच्या पिढ्यांची शान आहे. तिच्या आजोबांनी ह्या देशासाठी लढा दिला — स्वातंत्र्यसैनिक म्हणून त्यांनी जीवन झिजवलं. आज त्याच घरातील एक कन्या आरोग्याच्या क्षेत्रात प्रवेश करून समाजसेवेच्या वाटेवर निघाली आहे. हा फक्त आमच्या कुटुंबाचा नव्हे, तर आमच्या मूळ स्वातंत्र्यप्रेरणेचाही सन्मान आहे.
तिने घेतलेली फिजिओथेरपी ही पदवी ही केवळ शिक्षण नव्हे, तर रुग्णांच्या वेदनांवर प्रेमाने, स्पर्शाने आणि समजून घेण्याने उपचार करण्याची एक नाजूक पण अत्यंत गरजेची दिशा आहे. डॉक्टर म्हणजे औषधांचा उपयोग करणारा व्यक्ती इतकंच मर्यादित स्वरूप न राहता, ती आता माणसांच्या हालचालींमध्ये आशा फुंकणारी एक जाणती ‘हेलिंग आर्टिस्ट’ झाली आहे.
ती आता पदव्युत्तर शिक्षण घेण्याच्या तयारीत आहे. शिक्षणाची ही वाट अर्थातच सोपी नाही. पण ती तिच्या यशाच्या पहिल्या टप्प्यावर न थांबता अजून पुढे जाण्याचा संकल्प करत आहे, हे आम्हाला अधिक आनंददायी वाटतंय. तिचं हे ध्येय, तिचा चिकाटीचा स्वभाव आणि तिचा आतला सेवाभाव पाहता तिचा प्रवास नक्कीच यशस्वी होईल याची खात्री आहे.
तिच्या निकालाच्या दिवशी तिने तिच्या आजोबांचा फोटो हळूच बघितला होता… डोळ्यात पाणी होतं, पण चेहऱ्यावर अभिमान. कारण ती ज्या वाटेवर चालली आहे ती वाट त्याच मातीची आहे — समाजासाठी काही करून दाखवण्याची!
“जगाच्या आरोग्याला हात घालणारी ती,
पण हृदयात आजोबांच्या लढ्याची ज्वाळा.
ज्ञानाने पावलं टाकणारी, सेवेची दिशा घेणारी,
फिजिओथेरपीच्या पायऱ्यांवरून स्वातंत्र्याची शिकवण घेणारी…”
आज माझ्या लेकीला पहिल्यांदाच डॉक्टर डे च्या शुभेच्छा देताना, मला आठवतं तिचं ते लहान वय… हातात डॉक्टर सेट घेऊन रुग्ण ‘उपचार’ करणारी ती चिमुकली, आज खऱ्या अर्थाने डॉ. कादंबरी झाली आहे. तिच्या हातात आता उपचाराची ताकद आहे आणि हृदयात सेवाभावाचं तेज आहे.
ती डॉक्टर झाली हे केवळ तिचं यश नाही, तर माझंही यश आहे — एक बाप म्हणून, एक मार्गदर्शक म्हणून, आणि एक विश्वास ठेवणारा म्हणून. तिच्या आईने दिलेला आधार, तिला प्रोत्साहन देणाऱ्या शिक्षकांची मोलाची साथ, आणि तिनं स्वतःने घेतलेली मेहनत हे सगळं आठवतं आणि डोळ्यांत पाणी येतं.
तिचा पुढील प्रवास समाजासाठी अत्यंत मोलाचा असणार आहे. शरीराने अपंग, वेदनांनी ग्रासलेले रुग्ण, अपघातानंतर हालचाली गमावलेली माणसं, आणि वृद्धत्वाने हतबल झालेले जीव — यांना ती पुन्हा चालायला शिकवेल, पुन्हा आशेने जगायला शिकवेल. ही तिची नवी भूमिका आहे — अत्यंत महत्वाची, संवेदनशील आणि माणुसकीने भरलेली.
ती डॉक्टर आहे — पण औषध नाही, तर स्पर्श, स्नेह, आणि सेवा तिचं बळ आहे.
“नव्या पिढीचं नवं स्वप्न, पण मूळ तीच जळते मशाल,
सेवेच्या व्रताला दिले वंशाचे मोलाचं भान.
डॉ. कादंबरी — तुझा प्रवास असो यशोशिखरांकडे,
तू झळको सेवा-सन्मानात, स्वातंत्र्याच्या वारशासह!”
आजचा डॉक्टर डे आमच्यासाठी खास आहे कारण आम्ही केवळ डॉक्टरांना शुभेच्छा देत नाही, तर आपल्या घरातील ‘नवीन डॉक्टर’ ला, डॉ. कादंबरी ला अभिमानाने वंदन करत आहोत. तिच्या शिक्षणाच्या पुढच्या टप्प्याला आमच्याकडून शुभेच्छा आणि तिच्या हृदयातील सेवाभावाला आमचं प्रेम आणि आशीर्वाद.
स्वातंत्र्यसैनिकांच्या घराण्यात जन्मलेली, कुटुंबाच्या कष्टांवर उभी राहिलेली, आणि समाजाच्या आरोग्याच्या वाटेवर सेवा करणारी ही कन्या — तिचा आजचा दिवस, तिचं यश, हे सर्व आपल्या संस्कृतीच्या आणि कुटुंबाच्या सन्मानाचं प्रतीक आहे.
डॉ. कादंबरी, तुला डॉक्टर डे च्या मनःपूर्वक शुभेच्छा!
तू झळकशील ज्ञान, सेवा आणि संस्कारांनी उजळलेल्या वाटेवर…
एक अभिमानी वडील, आपल्या कन्येच्या डॉक्टर होण्याच्या प्रवासाच्या क्षणांना हृदयातून अनुभवत..

स्वादिष्ट शाकाहारी भोजनाचा नवा ठेवा – ‘स्वाDish Veg’ चे भव्य उद्घाटन सोहळा ३ जुलै रोजी

Loading

पाचोरा – शहराच्या खाद्यसंस्कृतीत एक नवा आणि अनोखा अध्याय जोडणारा उपक्रम ‘स्वाDish Veg’ शाकाहारी रेस्टॉरंटच्या माध्यमातून सुरु होत आहे. बनोटीवाला कुटुंबियांच्या पुढाकारातून भडगाव रोडवरील बनोटीवाला फार्म हाऊस येथे नव्याने उभारण्यात आलेल्या या शाकाहारी भोजनगृहाचे उद्घाटन येत्या गुरुवार, दिनांक ३ जुलै २०२५ रोजी सायंकाळी ५ ते १० या वेळेत एका धार्मिक आणि स्नेहमिलनाच्या सोहळ्यात संपन्न होणार आहे. या खास प्रसंगी भाविक वातावरणात ‘श्री सत्यनारायण महापूजा’ आयोजित करण्यात आली आहे. पारंपरिक धार्मिक विधी, भक्तिपूर्वक पूजन आणि प्रसाद वितरणाद्वारे या नव्या उपक्रमाची शुभ सुरुवात करण्यात येणार आहे. या मंगल प्रसंगी उपस्थित राहून शुभाशीर्वाद द्यावेत, असा सादर आग्रह आयोजकांनी केला आहे. भडगाव रोड वरील बनोटीवाला फार्म हाऊस लागत पाचोरा शहराच्या मध्यवर्ती भागात असूनही निसर्गाच्या सान्निध्यात, प्रशस्त व सुशोभित परिसरात उभारलेले हे रेस्टॉरंट हे केवळ एक भोजनगृह नसून एक अनुभव केंद्र असेल. इथे स्वच्छता, पारंपरिक चव, आधुनिकतेचा स्पर्श, आणि ग्राहकसेवा या चारही गोष्टींचे अनोखे मिश्रण अनुभवायला मिळणार आहे. ‘स्वाDish Veg’ मध्ये उत्तम प्रतीचे विविध प्रकारचे शाकाहारी पदार्थ मिळणार असून, पारंपरिक महाराष्ट्रीयन थाळीपासून ते पंजाबी, साउथ इंडियन, चायनीज व इतर लोकप्रिय शाकाहारी खाद्यपदार्थांची रेलचेल असेल. स्वादात नव्हेच, तर आरोग्यदृष्ट्याही उत्कृष्ट अशा भोजनाची खात्री येथे दिली जाणार आहे.
‘स्वाDish Veg’ ही केवळ व्यवसायिक संकल्पना नसून बनोटीवाला कुटुंबाची अनेक वर्षांची स्वप्नपूर्ती आहे. पारंपरिक आदरातिथ्य, शुद्धता आणि संस्कृती या मूल्यांच्या अधिष्ठानावर उभे असलेले हे रेस्टॉरंट आजच्या ग्राहकांच्या अपेक्षा पूर्ण करत नव्या पिढीला स्वादाचा नवा अनुभव देण्याच्या उद्देशाने उभारले आहे. ‘स्वाDish’ या नावात ‘स्वाद’ आणि ‘डिश’ या दोन महत्त्वपूर्ण कल्पनांचा संगम आहे – ज्यामध्ये पारंपरिक चव आणि आधुनिक रुचिपरिपूर्णपणा यांचा मेळ साधला गेला आहे.
या उद्घाटनाच्या निमित्ताने आयोजकांनी ‘श्री सत्यनारायण महापूजा’ आयोजित करून एक आध्यात्मिक आणि मंगल वातावरण तयार केले आहे. दैनंदिन धकाधकीच्या जीवनात शांतता, समाधान आणि सकारात्मक ऊर्जा मिळवण्यासाठी अशा पूजांचे महत्त्व मोठे आहे. या पूजेसाठी पंचामृत, नैवेद्य, फलाहार आणि आरतीचा समावेश असणार आहे. भक्तिपूर्ण गजरात आणि मंत्रोच्चारांमध्ये एकत्र येऊन नव्या प्रवासाची सुरूवात करणं हे केवळ धार्मिक विधी नव्हे तर एक सामाजिक ऐक्याचं प्रतीकदेखील ठरेल.
या प्रसंगी आपल्या उपस्थितीने कार्यक्रमाची शोभा वाढवावी, आयोजकांना आपल्या शुभेच्छांचा उत्स्फूर्त पाठिंबा द्यावा, आणि एकत्र येऊन नव्या रेस्टॉरंटच्या यशासाठी प्रार्थना करावी, अशी विनंती करण्यात आली आहे. समाजातील विविध क्षेत्रातील मान्यवर, कुटुंबमित्र, व्यावसायिक, पत्रकार, आणि सामाजिक संस्था या सोहळ्यास उपस्थित राहणार असून, एक प्रेरणादायी आणि मनःपूर्वक आठवण बनणार आहे.या नव्या उपक्रमामागे असलेली संकल्पना, कल्पकता आणि मेहनत ही कांतीलालशेठ, जीवनभाऊ, मनोजभाऊ, प्रवेश, मितेश, पूर्वश श्रीश्रीमाळ या बनोटीवाला कुटुंबियांची आहे. सामाजिक प्रतिष्ठा, व्यावसायिक अनुभव आणि सद्भावना यांचे मूर्तिमंत प्रतीक असलेले हे कुटुंब गेली अनेक दशके ‘बनोटीवाला ज्वेलर्स’च्या माध्यमातून पाचोरकरांच्या मनात घर करून आहे. आता ‘स्वाDish Veg’ या नावाने ते अन्नसंस्कृतीच्या क्षेत्रात एक नवा अध्याय लिहिणार आहेत. ‘बनोटीवाला ज्वेलर्स’ ही गांधी रोड, पाचोरा येथील एक सुप्रसिद्ध आणि विश्वासार्ह संस्था असून, गेली अनेक वर्षे दर्जेदार दागिने आणि विश्वासार्ह सेवा देणाऱ्या या संस्थेचा नव्या व्यवसाय क्षेत्रातील प्रवेश ही एक स्वागतार्ह बाब ठरते. ग्राहकांचा विश्वास हीच खरी ताकद मानणाऱ्या या फर्मचा ‘स्वाDish Veg’ हा पुढचा पायरी आहे. पाचोरा शहरात उत्तम शाकाहारी जेवणासाठी एक नवे, सुगंधित, स्वच्छ आणि आधुनिक स्थान निर्माण होत आहे. ‘स्वाDish Veg’ हा उपक्रम केवळ एक व्यवसाय नसून, ग्राहकांचे समाधान आणि संस्कृतीशी नाते जपणारा सेवाभावाचा एक प्रयत्न आहे. आपल्या उपस्थितीने या प्रवासात सहभागी व्हा, शुभेच्छा द्या, आणि स्वादाच्या या नव्या प्रवासाचा भाग व्हा – हीच आयोजकांची सादर नम्र विनंती!

सामाजिक, वैद्यकीय क्षेत्रातील ज्येष्ठ व्यक्तिमत्व बाळासाहेब पुजारी यांचे निधन

Loading

पाचोरा – शहरातील ज्येष्ठ समाजसेवक, वैद्यकीय क्षेत्रातील एक नामवंत व्यक्तिमत्व, तसेच धार्मिक आणि सामाजिक संस्थांशी निगडीत असलेले स्व. कै. काकासाहेब बाळासाहेब चिंतामण पुजारी यांचे आज दिनांक 1 जुलै 2025 रोजी पहाटे 5.30 वाजता दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनाने पाचोरा शहरात हळहळ व्यक्त होत असून विविध क्षेत्रांतून शोकसंवेदना व्यक्त करण्यात येत आहेत. कै. काकासाहेब बाळासाहेब पुजारी हे एक सामाजिक जाणिवा असलेले आणि मनापासून लोकांच्या मदतीस धावून जाणारे व्यक्तिमत्व होते. ते यापूर्वी जामनेर रोडवरील मिरॅकल मेडिकलचे संचालक तसेच पाचोरा मेडिकल असोसिएशनचे माजी अध्यक्ष म्हणून कार्यरत होते. मेडीकल व्यवसायासोबत त्यांनी सामाजिक कार्यात देखील आपली ठसा उमटवलेला आहे.
त्यांचे सुपुत्र प्रशांत पुजारी हे देखील पाचोरा शहरात अत्यंत सक्रिय असून, श्री आनंद वृद्धाश्रमाचे माजी अध्यक्ष, पाचोरा मेडिकल असोसिएशनचे माजी अध्यक्ष आणि श्री गुरुदत्त मंदिराचे संचालक (पूर्ती फॅमिली शॉप, भडगाव रोड) म्हणून कार्यरत आहेत. आपल्या वडिलांच्या प्रेरणेने त्यांनी समाजसेवेसाठी नेहमी पुढाकार घेतला आहे.
कै.काकासाहेब बाळासाहेब पुजारी यांनी आपल्या आयुष्यात वैद्यकीय व्यवसायाला केवळ उपजीविकेचे साधन न मानता, तो एक सेवाभाव समजून रुग्णसेवेसाठी स्वतःला वाहून घेतले होते. गरजू रुग्णांना औषधोपचारात मदत करणे, त्यांना योग्य मार्गदर्शन करणे, तसेच वैद्यकीय व्यवसायात पारदर्शकता ठेवून लोकांचा विश्वास मिळवणे, हे त्यांच्या कार्याचे मूळ तत्त्व होते.
ते केवळ मेडिकल क्षेत्रातच नव्हे तर धार्मिक आणि आध्यात्मिक कार्यातही सक्रिय होते. पाचोऱ्यातील श्री गुरुदत्त मंदिर हे पवित्र स्थळ त्यांच्या सहकार्याने अधिक सुसज्ज आणि सुव्यवस्थित करण्यात आले. मंदिर समितीच्या निर्णय प्रक्रियेत त्यांनी नेहमीच सकारात्मक भूमिका घेतली होती. भक्तांच्या सोयीसाठी विविध उपक्रम राबविण्यात त्यांचा मोलाचा वाटा राहिला.
तसेच श्री आनंद वृद्धाश्रम या संस्थेशी त्यांचे कुटुंब गेली अनेक वर्षे निगडीत असून वृद्धांसाठी सेवाभावाने काम करण्याची परंपरा त्यांनी जपली. या वृद्धाश्रमातील वृद्धांना औषध, वैद्यकीय तपासणी, आणि गरजेच्या सेवा पुरवण्यात ते नेहमी पुढे होते.
आज त्यांचे निधन झाल्याने पाचोरा शहराच्या मेडीकल, धार्मिक व सामाजिक वर्तुळात एक मोठी पोकळी निर्माण झाली आहे. अशा समाजाभिमुख व्यक्तीचे आयुष्य हे अनेकांसाठी प्रेरणादायी आहे.त्यांची अंत्ययात्रा उद्या दिनांक 2 जुलै 2025 रोजी बुधवार सकाळी 8.30 वाजता त्यांचे राहते घर, दत्त मंदिर, पुजारी नगर, भडगाव रोड, पाचोरा येथून निघणार आहे.
त्यांच्या निधनाचे वृत्त समजताच विविध संस्थांचे पदाधिकारी, वैद्यकीय व्यवसायातील सहकारी, धार्मिक मंडळी, सामाजिक कार्यकर्ते, व्यापारी वर्ग तसेच सर्वसामान्य नागरिक मोठ्या संख्येने त्यांच्या राहत्या घरी शोक व्यक्त करण्यासाठी दाखल झाले.शहरातील अनेक ज्येष्ठांनी त्यांच्या आठवणी सांगताना भावूक होत ‘बाळासाहेब म्हणजे शांत, संयमी आणि अंतर्बोध असलेली व्यक्ती होती. त्यांनी नेहमीच इतरांचे दुःख समजून घेत, मदतीचा हात पुढे केला. त्यांच्या जाण्याने शहर एक चांगला मार्गदर्शक गमावला आहे,’ असे मत व्यक्त केले.
शोकसंदेशात पाचोरा मेडिकल असोसिएशन, श्री आनंद वृद्धाश्रम, गुरुदत्त मंदिर समिती, पाचोरा व्यापारी असोसिएशन, तसेच शहरातील विविध मंडळांनी आपल्या भावना व्यक्त करत त्यांच्या योगदानाला अभिवादन केले.
पुजारी कुटुंबियांनी आपल्या दुःखावर संयम ठेवत येणाऱ्या सर्व नातेवाईक व हितचिंतकांचे योग्य रीतीने स्वागत केले असून, अंत्यविधीच्या सर्व तयारी शांततेत आणि शिस्तबद्ध रितीने पार पाडण्यात येणार असल्याची माहिती परिवारातर्फे देण्यात आली.त्यांच्या पश्चात एक मुलगा , सुन पाच मुली , जावई नातवंडे असा मोठा परिवार आहे. संपूर्ण कुटुंब आपल्या वडिलांच्या कार्याला पुढे नेत असून, ‘समाजासाठी कार्यरत राहणे हीच खरी श्रद्धांजली’ पुजारी परिवाराची होय

सायबर फसवणुकीपासून सावध राहा : आधार कार्डचा स्वैर वापर अत्यंत धोकादायक – डॉ. धनंजय देशपांडे

Loading

पाचोरा : “सायबर क्राईम ही भारतासमोर उभी ठाकलेली एक गंभीर आणि वेगाने वाढणारी समस्या असून, नागरिकांच्या बँक खात्यांपासून ते त्यांच्या ओळखीच्या तपशीलांपर्यंत सर्व काही धोक्यात आहे. विशेषतः आधार कार्डाचा स्वैर आणि अज्ञानतावश होत असलेला वापर सायबर फसवणुकीला आमंत्रण देणारा ठरत आहे. त्यामुळे जागरूकता ही काळाची गरज आहे. सायबर फसवणुकीच्या कोणत्याही

प्रकाराला बळी पडल्यास, 1930 या हेल्पलाईन क्रमांकावर अर्ध्या तासाच्या आत संपर्क साधणे हा सर्वात प्रभावी आणि तात्काळ उपचार ठरतो,” असे मार्गदर्शन नामवंत सायबर सुरक्षा तज्ज्ञ डॉ. धनंजय देशपांडे यांनी पाचोऱ्यात केले. रविवार, दिनांक 29 जून रोजी सकाळी 10 वाजता जैन पाठशाळा सभागृह पाचोरा येथे ‘सायबर क्राईम : सावधगिरी आणि प्रतिबंध’ या विषयावर एक जनजागृतीपर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. या उपक्रमाचे आयोजन रोटरी क्लब पाचोरा-भडगाव, जैन पाठशाळा पाचोरा यांच्या संयुक्त विद्यमाने आणि पाचोरा पोलीस ठाण्याच्या सहकार्याने करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रोटरी क्लबचे अध्यक्ष डॉ. पवनसिंग पाटील होते. व्यासपीठावर रोटरी क्लबचे सेक्रेटरी डॉ. शिवाजी शिंदे, जैन पाठशाळेचे अध्यक्ष प्रफुल्ल शेठ संघवी, पोलीस निरीक्षक अशोक पवार, सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय निकम आणि डॉ. मुकेश तेली हे मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन आणि मान्यवरांच्या स्वागताने झाली. रोटरी क्लबचे सेक्रेटरी डॉ. शिवाजी शिंदे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक करत या उपक्रमामागील उद्दिष्ट विशद केले. त्यानंतर पोलीस निरीक्षक अशोक पवार यांनी उपस्थित नागरिकांना सायबर फसवणुकीपासून सावध राहण्याचे आवाहन करताना सांगितले की, “सायबर गुन्हेगारांनी आता अत्याधुनिक साधनांचा वापर करून विविध क्लृप्त्या वापरण्याचा धोका वाढवला आहे. नागरिकांनी कोणत्याही अनोळखी लिंकवर क्लिक करू नये, आधार किंवा बँक तपशील कोणालाही सहजपणे देऊ नये.” कार्यक्रमाचा प्रमुख आकर्षण ठरलेले डॉ. धनंजय देशपांडे यांचे दोन तासांचे सखोल आणि प्रातिनिधिक व्याख्यान हे उपस्थित श्रोत्यांसाठी जागृतीचे एक सशक्त माध्यम ठरले. त्यांनी आपल्या सखोल अभ्यासातून आणि अनुभवातून सायबर गुन्हेगारीचे अनेक पैलू उलगडून दाखवले
डॉ. देशपांडे यांनी श्रोत्यांना सायबर फसवणुकीचे अनेक प्रकार दाखवून दिले. उदाहरणार्थ – अंत्यसंस्कार सेवा पुरवणाऱ्या बनावट ऑनलाइन लिंकद्वारे फसवणूक, डिजिटल अरेस्टच्या नावाखाली पैसे उकळणे, भावनिक व आर्थिक पद्धतीने पालकांची फसवणूक, “चुकून पैसे जमा झाले” म्हणून परत पाठवण्याची विनंती, हनी ट्रॅपच्या माध्यमातून पुरुषांची आर्थिक फसवणूक, एटीएम वापरताना सुरक्षेच्या उपाययोजना न पाळणे, पार्सल वा फॉरेन करन्सीच्या नावाखाली घातलेले सापळे, घर बंद असल्याने पार्सल परत गेल्याचा बनावट मेसेज आणि त्यातील स्कॅन कोडद्वारे चोरी, सरकारी नोकरीच्या खोट्या जाहिराती आणि वेबसाईट्स. या सर्व प्रकारांमध्ये नागरिकांचे बँक खाते, वैयक्तिक माहिती, मोबाईल अ‍ॅक्सेस आणि आर्थिक व्यवहार पूर्णपणे धोक्यात येऊ शकतात. आधार कार्डाचा वापर सहजतेने आणि तपासणी न करता केल्यामुळे अनेकांना आर्थिक फसवणूक सहन करावी लागत असल्याचे त्यांनी सांगितले.
डॉ. देशपांडे यांनी फसवणुकीपासून वाचण्यासाठी काही महत्त्वाचे आणि व्यवहार्य उपाय सुचवले, त्यात खाजगी कुटुंबासाठी वेगळा मोबाईल नंबर आणि ईमेल आय.डी., आणि आर्थिक व्यवहार/कार्यक्षेत्रासाठी वेगळा वापरणे, सोशल मीडियावर आपल्या पर्यटनाची माहिती, फोटो वा स्टेटस लगेच पोस्ट न करता थांबून विचार करणे, आधार कार्डाचा वापर आवश्यकतेपुरता व कायदेशीर चौकशी झाल्यावरच करणे, मोबाईलवर येणाऱ्या कोणत्याही लिंकवर क्लिक करण्याआधी ती लिंक विश्वसनीय आहे का हे तपासणे, ओळखीचा नसलेला फोन नंबर, QR कोड, किंवा लिंकवर काहीही स्कॅन करण्यापूर्वी काळजी घेणे, गुन्हा झाल्यास अर्ध्या तासाच्या आत 1930 या सायबर हेल्पलाईन नंबरवर संपर्क साधणे हे आहे.
व्याख्यानानंतर सुमारे एक तास खुले प्रश्नोत्तर सत्र घेण्यात आले, ज्यामध्ये श्रोत्यांनी आपले वैयक्तिक प्रश्न विचारले. त्यावर डॉ. देशपांडे यांनी अत्यंत तज्ञपणे, उदाहरणासहित स्पष्टीकरण दिले. अनेकांनी आपल्या मोबाईलचा वापर, बँकिंग अ‍ॅप्सची सुरक्षितता, QR कोड, आणि स्कॅम कॉल याबाबत चिंता व्यक्त केली. यामध्ये अनेक तरुण, महिला व वयोवृद्ध यांचा सहभाग उत्साहपूर्ण होता.
कार्यक्रमाच्या शेवटी डॉ. मुकेश तेली यांनी उपस्थित मान्यवरांचे तसेच श्रोत्यांचे मन:पूर्वक आभार मानले. त्यांनी सांगितले की, डॉ. धनंजय देशपांडे यांचे आजचे सखोल मार्गदर्शन हे नागरिकांमध्ये एक नवा जागरूकतेचा प्रकाश पसरवणारे ठरले आहे. या उपक्रमात रोटरी क्लबचे अध्यक्ष डॉ. पवनसिंग पाटील, सेक्रेटरी डॉ. शिवाजी शिंदे, तसेच सर्व सदस्यांनी परिश्रम घेतले. पाचोरा डॉक्टर्स असोसिएशनच्या सदस्यांचे देखील महत्त्वाचे सहकार्य लाभले. पाचोरा पोलीस ठाण्याचे निरीक्षक अशोक पवार आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय निकम यांनी या उपक्रमात सक्रिय सहभाग घेतला. या कार्यक्रमातून पाचोऱ्यातील नागरिकांना हे स्पष्टपणे उमगले की सायबर फसवणूक ही केवळ एखाद्या शहरापुरती मर्यादित न राहता ती देशभरातील सर्वच स्तरांतील लोकांना आपले लक्ष्य बनवते. त्यामुळे प्रत्येकाने डिजिटल व्यवहार करताना जागरूक राहणे, आपली वैयक्तिक माहिती अज्ञात व्यक्तींना देणे टाळणे, आणि कोणत्याही प्रकारच्या शंका आल्यास तातडीने अधिकृत माध्यमांचा वापर करणे आवश्यक आहे. आजच्या डिजिटल युगात जिथे प्रत्येक गोष्ट मोबाईलवर अवलंबून आहे, तिथे ‘सावध रहा सुरक्षित रहा’ हे ब्रीद वाक्य लक्षात ठेवणे हेच सायबर गुन्ह्यांपासून वाचण्याचे मुख्य अस्त्र आहे.

ताज्या बातम्या

error: Content is protected !!