Home Blog Page 141

गो. से. हायस्कूलने राज्य बालनाट्य स्पर्धेत उमटवला ठसा: ‘कास्टलेस इंडिया’ने केली प्रभावी सादरीकरण

0

Loading

पाचोरा: महाराष्ट्र सांस्कृतिक संचालनालयातर्फे आयोजित राज्य बालनाट्य स्पर्धेत गो. से. हायस्कूलने ‘कास्टलेस इंडिया’ या प्रभावी नाट्य सादरीकरणाद्वारे समाजातील जातीयतेवर प्रहार करत राष्ट्रीयत्वाची भावना प्रबळ केली. महेश कौंडिण्य लिखित व दिग्दर्शित या बालनाट्यात

विविध प्रसारमाध्यमांच्या अतिरेकी उपयोगातून जातीयतेच्या विघटनकारक परिणामांना प्रकाश टाकत समाज एकसंघतेचा संदेश देण्यात आला.
   तालुक्यातून पहिल्यांदाच राज्य स्तरावर सादर होण्याचा मान मिळवणाऱ्या या शाळेच्या सादरीकरणाने प्रेक्षकांची मने जिंकली. महापुरुषांच्या योगदानाला एका समाजापुरते मर्यादित ठेवण्याऐवजी त्यांच्या कार्याची व्यापकता

दाखविण्याचा प्रयत्न या नाट्यातून करण्यात आला. मनोरंजनातून उद्‌बोधन देण्याच्या हेतूने सादर झालेल्या या नाट्यप्रयोगाने बालकलावंतांच्या अभिनयातून समाजाला जातीयतेच्या पलीकडे जाऊन राष्ट्रीयत्वाची महत्त्वपूर्ण शिकवण दिली.
    कलाकार व तांत्रिक बाजूचे योगदान
या नाट्यात ललित आंबेकर, गीत महाजन, आयुष निकम, सार्थक चिंचोले, धवल सूर्यवंशी, आर्यन तडवी, कार्तिकी पाटील, दिव्यराज खैरनार, स्तवन भट, नेहा महालपुरे, देवश्री कासार, चेतन सोनवणे, भुवन्य सूर्यवंशी, यज्ञेश चौधरी, देवांश महाजन, सृष्टी वाघ, सृष्टी शिंपी, सायली सोनार, नेहा महालपुरे या

बालकलावंतांनी अभिनय केला.
तांत्रिक बाजूस सुबोध कांतायन यांनी रंगभूषा, रविंद्र जाधव यांनी प्रकाश योजना, सोनाली सूर्यवंशी यांनी वेशभूषा, तर स्मिता सोनवणे यांनी पार्श्वसंगीत यशस्वीपणे सांभाळले.
   शालेय संस्थांचे अभिनंदन व प्रोत्साहन
शाळेच्या या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष माजी आमदार दिलीपभाऊ वाघ, चेअरमन नानासाहेब संजय वाघ, मानद सचिव ॲड. महेशदादा देशमुख, व्हाईस चेअरमन नानासाहेब व्ही.टी. जोशी, शालेय समितीचे चेअरमन खलीलदादा देशमुख, तांत्रिक विभागाचे चेअरमन वासुदेवआण्णा महाजन, मुख्याध्यापक एन.आर. पाटील, उपमुख्याध्यापक आर.एल. पाटील, पर्यवेक्षिका सौ. अंजली गोहिल, पर्यवेक्षक ए.बी. अहिरे, आर.बी. तडवी, तांत्रिक विभाग प्रमुख एस.एन. पाटील, किमान कौशल्य विभाग प्रमुख मनीष बाविस्कर, कार्यालयीन प्रमुख अजय सिनकर यांच्यासह शाळेतील सर्व शिक्षक व तांत्रिक सहकाऱ्यांनी अभिनंदन व कौतुक केले.
   ‘कास्टलेस इंडिया’ या नाट्यातून जातीयतेचे समाजावर होणारे नकारात्मक परिणाम आणि त्याचा

विद्यार्थी मनावर पडणारा प्रभाव यावर भाष्य करण्यात आले. या प्रयोगाने विद्यार्थ्यांमध्ये सकारात्मक विचार व राष्ट्रीयत्वाची भावना जागृत करण्याचे काम केले आहे.
    गो. से. हायस्कूलच्या या नाट्यप्रयोगाने राज्यस्तरीय स्पर्धेत ठसा उमटवून पाचोरा तालुक्याचे नाव उज्ज्वल केले आहे. अशा प्रयोगांमधून नवीन पिढीला प्रेरणा मिळावी आणि समाजात एकात्मतेचा विचार प्रबळ व्हावा, हीच अपेक्षा आहे.

राज्याच्या क्रीडा धोरणाअंतर्गत नगर विकास विभागाच्या क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धांमध्ये पाचोरा नगरपरिषदेचा उत्स्फूर्त सहभाग नोंदवत यश

0

Loading

पाचोरा: राज्याच्या क्रीडा धोरणाअंतर्गत नगर विकास विभागातर्फे आयोजित क्रीडा व सांस्कृतिक महोत्सव-2025 मध्ये पाचोरा नगरपरिषदेने विविध स्पर्धांमध्ये उल्लेखनीय सहभाग नोंदवत शानदार कामगिरी केली आहे. जळगाव

येथे दिनांक 27 डिसेंबर 2024 ते 2 जानेवारी 2025 या कालावधीत झालेल्या या स्पर्धांचे आयोजन नगर विकास शाखा, जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वतीने करण्यात आले होते.
                या स्पर्धांचे उद्दिष्ट नगरपरिषद

कर्मचाऱ्यांमध्ये कामाचा ताण कमी करणे, त्यांचे आरोग्य सुधारण्यासाठी जागरूकता निर्माण करणे, तसेच क्रीडांमुळे टीमवर्क व सांघिक भावना वाढीस लागणे हे होते. याशिवाय कर्मचाऱ्यांमध्ये असलेल्या सुप्त कला-गुणांना वाव देण्याचा प्रयत्नही या उपक्रमातून करण्यात आला.
     या महोत्सवात पाचोरा नगरपरिषदेने विविध क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धांमध्ये

सहभाग घेत आघाडीची कामगिरी बजावली. व्हॉलीबॉल स्पर्धेत पाचोरा संघाने विजेतेपद पटकावले, तर क्रिकेट स्पर्धेत संघ उपविजेता ठरला. वैयक्तिक कामगिरीमध्ये 3 किलोमीटर चालण्याच्या स्पर्धेत विद्युत अभियंता योगेश रेवेकर यांनी प्रथम क्रमांक पटकावून विजेतेपद मिळवले.
   समूह गायन स्पर्धेत दीपक शेजवळ व दीपक खैरे यांनी उपविजेतेपद मिळवले, तर गोळाफेक या प्रकारात चंद्रकांत माळी

यांनी उपविजेतेपद पटकावले. सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये मुख्याधिकारी मंगेश देवरे, संगणक अभियंता मंगेश माने व लिपिक ललित सोनार यांनी वैयक्तिक गीते सादर करत आपल्या कला कौशल्याचा ठसा उमटवला. स्वलिखित कवितावाचनात संदीप जगताप यांनी सहभाग नोंदवून आपल्या काव्यप्रतिभेचे दर्शन घडवले.
    पाचोरा नगरपरिषदेच्या संघटित

कामगिरीमागे मुख्याधिकारी मंगेश देवरे यांचे प्रोत्साहन व मार्गदर्शन ठरले. त्यांनी सर्व विजेत्या स्पर्धकांचे मनःपूर्वक अभिनंदन केले व यापुढेही अधिकाधिक यश मिळवण्यासाठी शुभेच्छा दिल्या.
    राज्याच्या क्रीडा धोरणामुळे नगरपरिषद कर्मचाऱ्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले आहे. या स्पर्धांमुळे कर्मचाऱ्यांचा आत्मविश्वास वाढला असून

त्यांनी क्रीडा व सांस्कृतिक कार्यक्रमांचे स्वागत केले आहे. महोत्सवातील सहभागामुळे कर्मचाऱ्यांच्या आरोग्य व मानसिक ताण कमी होण्यास मदत झाली असून सांघिक कार्यक्षमतेलाही चालना मिळाली आहे.
     स्पर्धा यशस्वीपणे पार पडल्यानंतर अधिकाऱ्यांनी व कर्मचाऱ्यांनी पुढील वर्षीही अशा स्पर्धांचे आयोजन व्यापक

प्रमाणावर करावे, अशी मागणी केली आहे. या कार्यक्रमामुळे कर्मचाऱ्यांमध्ये नव्या ऊर्जा आणि उत्साहाची लहर निर्माण झाली आहे.
     या महोत्सवात विविध नगरपरिषदांनी सहभाग नोंदवला असला तरी पाचोरा नगरपरिषदेने आपल्या कामगिरीतून वेगळेपणा सिद्ध केला. खेळांमधून केवळ आरोग्य सुधारणेच नव्हे, तर कर्मचारी एकमेकांशी सुसंवाद साधण्यातही

यशस्वी ठरले आहेत.
  राज्य सरकारच्या क्रीडा धोरणाअंतर्गत आयोजित या महोत्सवामुळे नगरपरिषदेच्या कर्मचाऱ्यांमध्ये सांस्कृतिक आणि क्रीडा क्षेत्रातील सुप्त कला उजेडात आल्या आहेत. पाचोरा नगरपरिषदेसारख्या संघटनांनी केलेली कामगिरी इतर नगरपरिषदांसाठी प्रेरणादायी ठरली आहे.

   बनावट दस्तावेज आधारे जमीन – खरेदी विक्री प्रकरणी मुख्य सूत्रधार संतोष सोनवणे याला अटक

0

Loading

पाचोरा, ता. २२ ऑक्टोबर २०२४: जळगाव जिल्ह्यातील पाचोरा तालुक्यात जारगाव शिवारात बनावट दस्त तयार करून जमिनीच्या खरेदी-विक्रीत फसवणूक केल्याप्रकरणी मुख्य सूत्रधार संतोष भिला सोनवणे (वय ३७, रा. नांद्रा, ता. पाचोरा) याला पाचोरा पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणात

संगनमताने बनावट आधारकार्ड, सातबारा उतारे आणि इतर दस्तऐवज तयार करून मुळ मालक आणि खरेदीदाराची मोठी फसवणूक करण्यात आली होती.
    फिर्यादी श्री. सतेज सखाराम भारस्कर (वय ५२, सह दुय्यम निबंधक, पाचोरा) यांच्या तक्रारीनुसार पाचोरा पोलीस

ठाण्यात गु.र.नं. ४७१/२०२४ नुसार भारतीय दंड संहिता कलम ४१८, ४२०, ४६७, ४६८, ४७१, ३४ तसेच भारतीय नोंदणी अधिनियम १९०८ चे कलम ८२ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपींनी जारगाव शिवारातील गट नंबर १३४/२, प्लॉट नंबर ९ क्षेत्रफळ १८० चौ. मीटर या जमिनीचे दस्त क्रमांक ६९५७/२०२४ तयार केला. मुळ मालक

सौ. शीतल सुनीलकुमार पाटील यांच्या नावाने बनावट आधारकार्ड तयार करून मुळ मालकाऐवजी तोतया महिला उभी करून २,८५००० रुपयांना नगराज गोविंदा आहिरे यांना जमीन विकली.
      गुन्ह्यात सहभागी आरोपींमध्ये शीतल सुनीलकुमार पाटील नावाची

तोतया महिला, पुंडलीक काशिनाथ पाटील, अक्षय आधार बडगुजर यांच्यासह ३० ते ३५ वयाचा एक अनोळखी इसम सहभागी असल्याचे आढळून आले. या आरोपींनी बनावट कागदपत्रांचा वापर करून शासनाची व मुळ मालकांची फसवणूक केली.
     गुन्ह्याच्या तपासादरम्यान पोलीस

अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक श्रीमती कविता नेरकर, उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. धनंजय वेरुळे व पोलीस निरीक्षक अशोक पवार यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू होता. गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की आरोपी संतोष भिला सोनवणे पुन्हा अशाच प्रकारचा बनावट दस्त तयार करण्याच्या तयारीत आहे.
        पाचोरा पोलिसांनी जारगाव चौफुली येथे सापळा रचून त्याला ताब्यात

घेतले. सुरुवातीला त्याने चुकीची नावे सांगून पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. मात्र, विश्वासात घेतल्यावर त्याने गुन्ह्याची कबुली दिली.
               आरोपीकडून पोलिसांनी ५ लाख रुपयांची फसवणुकीची रोख रक्कम, बनावट आधारकार्ड, सातबारा उतारे, खरेदी खताच्या नकला व इतर महत्त्वाचे दस्तऐवज जप्त केले आहेत. याप्रकरणी मुख्य सूत्रधार आरोपीने इतर

साथीदारांसोबत मिळून यापूर्वीही अशाच प्रकारचे अनेक बनावट व्यवहार केल्याचा संशय आहे.
      सध्या आरोपी पोलीस कोठडीत असून त्याच्या साथीदारांचा शोध घेण्यासाठी पोलीस पथक काम करत आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक अशोक पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक परशुराम दळवी, प्रकाश चव्हाणके व इतर कर्मचारी करत आहेत.
    नागरिकांना आवाहन करण्यात येते

की जमीन खरेदी-विक्रीचे व्यवहार करताना मुळ कागदपत्रांची व व्यक्तींची पडताळणी करावी. ओळखीच्या व्यक्तींशीच आर्थिक व्यवहार करावेत. कोणताही शंका वाटल्यास जवळच्या पोलीस ठाण्यात तक्रार करावी.
     ही कारवाई पोलीस निरीक्षक अशोक पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक परशुराम दळवी, प्रकाश चव्हाणके, पोहवा ज्ञानेश्वर महाजन, राहुल शिंपी, विश्वास देशमुख, पोकॉ योगेश पाटील, सागर पाटील व जितेश पाटील यांनी केली.
      जारगाव बनावट दस्त प्रकरण

उघडकीस आल्याने नागरिकांनी सतर्क राहून व्यवहार करणे गरजेचे आहे. पाचोरा पोलिसांनी या प्रकरणात महत्त्वाची कारवाई करून मोठ्या घोटाळ्याला आळा घातला आहे.

जशभाई मगनभाई पटेल महाविद्यालयात “वाचन संकल्प महाराष्ट्राचा” कार्यक्रम संपन्न

0

Loading

मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : “वाचन संकल्प महाराष्ट्राचा” हा  कार्यक्रम दिनांक १ जानेवारी ते १५ जानेवारी २०२५ या कालावधीत संस्कारधाम केळवाणी मंडळ संस्थापित जशभाई मगनभाई पटेल वाणिज्य महाविद्यालयाद्वारे आयोजित केला जात आहे. या कार्यक्रमात ४ जानेवारी २०२५ रोजी “लेखकांशी चर्चा” हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. सदर सत्रासाठी दोन प्रसिद्ध लेखक सॅबी परेरा आणि कवी गुरुदत्त वाकदेकर यांना प्रमुख पाहुणे म्हणून पाचारण करण्यात आले होते.
कार्यक्रमाची प्रस्तावना  महाविद्यालयाच्या ग्रंथपाल डॉ. विद्या हंचिनाळ (आयोजक) यांनी केले. कार्यक्रमाची सुरुवात विद्यापीठ गीताने केली. त्यानंतर प्राचार्य डॉ. प्रकाश डोंगरे यांनी उपस्थितांना प्रोत्साहनपर शब्दांत संबोधित केले. प्रा. चैताली धनू यांनी प्रमुख पाहुण्यांचा परिचय उपस्थितांना करून दिला.
सॅबी परेरा आणि गुरुदत्त वाकदेकर यांनी आजच्या पिढीला आवश्यक असलेले वाचन तसेच त्या वाचनाचे महत्त्व पटवून दिले. तसेच लोप पावत चाललेल्या वाचक वर्गाबाबत खंत व्यक्त केली. पुस्तके विद्यार्थ्यांवर कसे संस्कार घडवू शकतात याची जाणीव करून दिली. कार्यक्रमात गुरुदत्त वाकदेकर आणि रविंद्र पाटील यांनी स्वरचीत मराठी कवितांचे वाचन देखील केले आणि त्यांचे साहित्यिक अनुभव कथन केले.
सदर कार्यक्रमात प्रा. सायली चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली बक्षीस वितरण समारंभाचाही समावेश होता. आंतरवर्गीय पुस्तक समीक्षा स्पर्धा, निबंध लेखन स्पर्धा (विद्यार्थी आणि प्राध्यापकांसाठी), बुकमार्क मेकिंग स्पर्धा यासह शैक्षणिक वर्षात आयोजित केलेल्या विविध ग्रंथालयीन कार्यक्रमांच्या विजेत्यांना पुरस्कार प्रदान करण्यात आले.
सदर कार्यक्रमास जशभाई मगनभाई पटेल वाणिज्य महाविद्यालयाचे वाणिज्य, बीकॉम मॅनेजमेंट स्टडीज, बीकॉम अकाउंटिंग अँड फायनान्स, बीएससी आयटी तथा मराठी वाड्मय मंडळाचे विद्यार्थी; तसेच शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारीदेखील उपस्थित होते. नवीन वर्षाची सुरुवात एका वाचन प्रेरणेने झाल्याने विद्यार्थ्यांमध्येही उत्साहाचे वातावरण होते. साहित्य आणि वाचनाच्या सवयींना चालना देण्यासाठी महाविद्यालयाचे प्रयत्न प्रशंसनीय आहेत आणि विद्यार्थ्यांमध्ये शिकण्याची आवड निर्माण करण्याच्या संस्थेच्या बांधिलकीचा हा पुरावा आहे. उत्साहाने भारलेल्या ह्या कार्यक्रमाचे आभारप्रदर्शन प्रा. प्रणिता कामत यांनी केले. राष्ट्रगीत गाऊन कार्यक्रमाची सांगता झाली.

“वाचन संकल्प महाराष्ट्राचा” ह्या उपक्रमामुळे श्रीमती मणिबेन एम पी शाह कला आणि वाणिज्य स्वायत्त महिला महाविद्यालयात उत्साही वातावरण

0

Loading

मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्यावतीने ‘वाचन संकल्प महाराष्ट्राचा’ हा उपक्रम मुंबई येथील श्रीमती मणिबेन एम पी शाह कला आणि वाणिज्य स्वायत्त महिला महाविद्यालयात दिनांक १ जानेवारी ते १५ जानेवारी २०२५ पर्यंत उत्स्फूर्तपणे राबविण्यात येत आहे. इंग्रजी नूतन वर्षाची सुरूवात ही विद्यार्थिंनीना ग्रंथालयाच्या दिशेने नेणारी आहे, ह्यापेक्षा दुसरा आनंद कोणताही नाही, असे मत महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. अर्चना पत्की यांनी मांडून उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे विशेष आभार व कौतुक केले. महाविद्यालयातील ‘जी ओ शाह ग्रंथालया’च्या ग्रंथापाल अश्विनी प्रभू ह्यांच्या मार्गदर्शनाने २९ डिंसेबर २०२४ रोजी ग्रंथालयातील परिसर शिक्षकेतर कर्मचारी व राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थिंनींच्या मदतीने स्वच्छ करण्यात आला. ३० व ३१ डिसेंबर २०२४ रोजी पुस्तक प्रदर्शन भरवून त्यातील प्रेरणादायी पुस्तकांतून विशेष कार्य करणाऱ्या महंतांची ओळख विद्यार्थिंनीना करून दिली. १ ते ७ जानेवारीपर्यंत महाविद्यालयातील सर्व विभागांच्या सहकार्याने उत्कृष्ट व प्रेरणादायी साहित्य तसेच कथा, कादंबऱ्या, कविता, चरित्र-आत्मचरित्र, प्रवासवर्णन इ. पुस्तकांचे वाचन व त्यावर आधारित गटचर्चा करण्यात आल्या, जेणेकरून विद्यार्थिंनींमध्ये वाचनाची आवड निर्माण व्हावी. पुढील दिवसांमध्ये वाचन कौशल्यावर आधारित कादंबरीचे अभिवाचन, लेखक-वाचक संवाद भेट, पुस्तक परीक्षण स्पर्धा असे उपक्रम रावबिण्यात येणार आहेत.

जय किरण प्रभाजी न्यू इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये ‘खरी कमाई’ फन फेअर उपक्रम उत्साहात संपन्न

0

Loading

पाचोरा – दि. 4 जानेवारी 2025, शनिवार रोजी जय किरण प्रभाजी न्यू इंग्लिश मीडियम स्कूल, पाचोरा येथे स्काऊट गाईडच्या माध्यमातून आयोजित ‘खरी कमाई’ (फन फेअर) हा उपक्रम अत्यंत उत्साहात आणि यशस्वीपणे संपन्न झाला. या उपक्रमामागील उद्देश विद्यार्थ्यांना स्वयंरोजगाराचे महत्त्व समजावून देणे आणि त्यांना व्यवसायाच्या प्राथमिक संकल्पना समजून घेण्याचा अनुभव देणे हा होता.
कार्यक्रमाचे उद्घाटन शाळेच्या उपाध्यक्ष गिरीषजी कुलकर्णी यांच्या हस्ते झाले. शाळेचे कमिटी चेअरमन लालचंदजी केसवानी, पार्थ गिरीष कुलकर्णी, श्रेयांस रितेश ललवाणी, पराग मोर, तसेच इतर मान्यवरांनी कार्यक्रमाला उपस्थिती लावून विद्यार्थ्यांना प्रोत्साहन दिले. या उपक्रमाचे अध्यक्षपद पार्थ गिरीष कुलकर्णी यांनी भूषवले.
    फन फेअर उपक्रमात स्काऊट गाईडच्या 15 संघांनी सहभाग नोंदवला. मोर संघ, सिंह संघ, वाघ संघ, बिबट्या संघ, कोल्हा संघ, कोब्रा संघ, जिराफ संघ, झेब्रा संघ, चांदणी संघ, चाफा संघ, पारिजात संघ, निशिगंधा संघ, मोगरा संघ, कमळ संघ आणि गुलाब संघ यांनी वेगवेगळ्या प्रकारच्या खाद्यपदार्थांचे स्टॉल लावले होते.
     प्रत्येक स्टॉलवर पाणीपुरी, वडापाव, भजे, भेळ, सोयाबीन बिर्याणी, व्हेज बिर्याणी, आईस्क्रीम, नमकीन अशा चविष्ट पदार्थांची विक्री करण्यात आली. विद्यार्थ्यांनी हे पदार्थ स्वतः तयार केले होते. त्यांनी विक्रीदर ठरवण्यापासून ग्राहकांशी व्यवहार करण्यापर्यंत सर्व जबाबदाऱ्या स्वतःच्या खांद्यावर घेतल्या.
     या उपक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना मागणी आणि पुरवठा याचा समतोल कसा साधायचा, ग्राहकांशी कसे संवाद साधायचे, आणि उत्पन्नाचा हिशोब कसा ठेवायचा याचे प्रत्यक्ष शिक्षण मिळाले. तसेच व्यवसायिक कौशल्ये आणि व्यवहारज्ञान विकसित करण्यात या उपक्रमाचा मोलाचा वाटा राहिला.
    विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी पालकांनी या उपक्रमात उत्साहाने सहभाग घेतला. मान्यवर पाहुण्यांनी प्रत्येक स्टॉलला भेट दिली आणि विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या पदार्थांची माहिती घेतली. त्यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक करत त्यांच्या मेहनतीला दाद दिली.
      स्काऊट मास्तर निवृत्ती तांदळे यांनी प्रत्येक संघनायकाचा परिचय मान्यवरांना करून दिला आणि त्यांचे कार्य समजावून सांगितले. शाळेच्या मुख्याध्यापिका पुष्पलता पाटील आणि सीईओ अतुल चित्ते यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. या उपक्रमाच्या यशस्वितेसाठी शाळेच्या शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे सहकार्य लाभले.
    कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पर्यवेक्षक किरण बोरसे यांनी केले, तर आभार प्रदर्शन पर्यवेक्षक वाल्मीक शिंदे यांनी केले.
     ‘खरी कमाई’ फन फेअर हा उपक्रम विद्यार्थ्यांना केवळ उद्योजकता शिकवणारा नव्हे, तर जीवन कौशल्ये, सहकार्य, आणि आत्मविश्वास वाढवणारा ठरला. या उपक्रमाच्या यशस्वी आयोजनाने जय किरण प्रभाजी न्यू इंग्लिश मीडियम स्कूलने विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी घेतलेल्या पुढाकाराचे अनोखे उदाहरण निर्माण केले आहे.
    हा उपक्रम शाळेतील शिक्षक, व्यवस्थापन, पालक, आणि विद्यार्थ्यांमध्ये नवीन उपक्रमांसाठी प्रेरणा निर्माण करणारा ठरला आहे. भविष्यात अशा प्रकारचे अनेक उपक्रम घेतले जातील, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली.

आरंभ मराठी चॅनेलतर्फे डॉ. स्वप्निल पाटील यांना ‘खान्देश रत्न पुरस्कार २०२५’ने गौरव

0

Loading

जळगाव: खान्देशातील कर्तृत्ववान व्यक्तिमत्त्वांचा सन्मान करण्याच्या उद्देशाने आरंभ मराठी चॅनेलने ‘खान्देश रत्न पुरस्कार २०२५’ या भव्यदिव्य सन्मान सोहळ्याचे आयोजन केले. हा कार्यक्रम रविवार, दिनांक ५ जानेवारी २०२५ रोजी थाटामाटात संपन्न झाला. शिक्षण, कला, क्रीडा, सामाजिक कार्य, पत्रकारिता, व्यवसाय, वैद्यकीय आणि आरोग्यसेवा अशा विविध क्षेत्रांतील

मान्यवरांचा या सोहळ्यात गौरव करण्यात आला.
आरोग्यसेवेतील विशेष योगदान – डॉ. स्वप्निल प्रल्हादराव पाटील
या सोहळ्याचा मुख्य आकर्षण ठरले पाचोरा येथील सिद्धिविनायक मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचे संचालक डॉ. स्वप्निल प्रल्हादराव पाटील. वैद्यकीय क्षेत्रातील त्यांच्या उल्लेखनीय योगदानाबद्दल त्यांना ‘खान्देश रत्न पुरस्कार २०२५’ने गौरवण्यात आले.
          डॉ. स्वप्निल पाटील हे एमबीबीएस व एमडी मेडिसिनमध्ये गोल्ड मेडलिस्ट आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली

सिद्धिविनायक मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलने पाचोरा-भडगाव परिसरातील गंभीर रुग्णांसाठी नवसंजीवनी ठरवली आहे. अत्याधुनिक सुविधांनी युक्त असलेल्या या रुग्णालयात आयसीयू, एनआयसीयू, किडनी डायलिसिस, सिटीस्कॅन, टू डी इको, पॅथॉलॉजी लॅब, आणि रुग्णवाहिका यांसारख्या सुविधा उपलब्ध आहेत.
कोरोना काळातील अभूतपूर्व कार्य
कोरोना महामारीच्या काळात डॉ. स्वप्निल पाटील आणि त्यांच्या टीमने अहोरात्र

सेवा देत शेकडो रुग्णांचे प्राण वाचवले. त्यांनी स्वतः कोरोनावर मात करून पुन्हा रुग्णसेवेसाठी झोकून दिले. त्यांच्या सेवाभावामुळे ते ‘कोरोना योद्धा’ म्हणून प्रसिद्ध झाले.
या सोहळ्याला मराठी सिनेमा आणि टेलिव्हिजन क्षेत्रातील लोकप्रिय अभिनेत्री अनिता दाते-केळकर (‘माझ्या नवऱ्याची बायको’, ‘नवा गडी नवं राज्य’ फेम) प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होत्या. त्यांच्या हस्ते डॉ. स्वप्निल पाटील आणि डॉ. ग्रिष्मा पाटील यांना सन्मानित करण्यात आले.
कार्यक्रमाला आमदार सुरेश मामा भोळे, खान्देशातील विविध क्षेत्रांतील

मान्यवर, प्रतिष्ठित नागरिक आणि समाजसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
डॉ. स्वप्निल पाटील यांचा जीवनप्रवास – प्रेरणादायी आहे
डॉ. स्वप्निल पाटील यांचे शालेय शिक्षण गो. से. हायस्कूल, पाचोरा येथे झाले. त्यांनी वैद्यकीय शिक्षण मुंबईच्या लोकमान्य टिळक म्युनिसिपल मेडिकल कॉलेज व सायन हॉस्पिटल येथे पूर्ण केले. एमडी मेडिसिनमध्ये गोल्ड मेडल मिळवणाऱ्या डॉ. पाटील यांचा प्रवास उत्कृष्ट कामगिरीने भरलेला आहे.
पुण्यातील सह्याद्री हॉस्पिटलमध्ये त्यांनी कार्डिओलॉजी

फेलोशिप पूर्ण केली. त्यांनी रॉयल कॉलेज ऑफ फिजिशियन, यूकेकडून डायबेटिस आणि रिनल मॅनेजमेंटमध्ये पोस्ट ग्रॅज्युएशन डिप्लोमा प्राप्त केला. त्यांचे संशोधन आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रकाशित झाले असून वैद्यकीय क्षेत्रातील त्यांचे योगदान खूप मोठे आहे.
सिद्धिविनायक हॉस्पिटल – एक आरोग्य मंदिर
२०१९ मध्ये स्थापन झालेल्या या रुग्णालयाने अल्पावधीतच परिसरातील लोकांचा विश्वासजिंकला आहे. महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजना आणि पंतप्रधान जनआरोग्य योजनेच्या माध्यमातून गरजू रुग्णांना मोफत उपचार सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत.
‘खान्देश रत्न पुरस्कार २०२५’ सोहळ्याने खान्देशातील कर्तृत्ववान व्यक्तींच्या योगदानाला मान्यता देत समाजातील विविध क्षेत्रांतील प्रेरणादायी

व्यक्तिमत्त्वांना प्रोत्साहन दिले. कार्यक्रमाची सांगता उपस्थित मान्यवरांच्या उत्साहवर्धक भाषणाने झाली.
डॉ. स्वप्निल पाटील यांच्या सिद्धिविनायक हॉस्पिटलने रुग्णसेवेत नवा मापदंड उभा केला असून, त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा देत खान्देशच्या या प्रेरणादायी व्यक्तिमत्त्वांचे मानचिन्ह ठरले आहेत.

गुर्जर बोलीभाषा साहित्य संमेलन व पुस्तक विमोचन समारंभ मोठ्या उत्साहात मोठे वाघोदे येथे संपन्न

0

Loading

रावेर – गुर्जर बोलीभाषेच्या संवर्धनासाठी सातत्याने कार्यरत असलेल्या चक्रधर शिक्षण प्रसारक मंडळ, मोठे वाघोदे बु., आणि गुर्जर बोलीभाषा साहित्य संवर्धन केंद्र, ऐनपूर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित “गुर्जर बोलीभाषा साहित्य संमेलन व पुस्तक विमोचन समारंभ” मोठ्या उत्साहात मोठे वाघोदे येथे पार पडला.
     गुर्जर बोलीभाषेचा सांस्कृतिक वारसा जपण्याचा संकल्प
गुर्जर बोलीभाषा ही पश्चिम भारतातील विशिष्ट सांस्कृतिक परंपरांचे प्रतीक आहे. तिच्या जतन आणि संवर्धनासाठी स्थापन करण्यात आलेल्या “गुर्जर बोलीभाषा साहित्य संवर्धन केंद्रा”च्या माध्यमातून यापूर्वीही अनेक उपक्रम राबवण्यात आले आहेत. या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश गुर्जर बोलीभाषेतील साहित्यिक, लोकगीते, कथा आणि सांस्कृतिक परंपरांना जागतिक स्तरावर पोहोचवणे हा होता.
      या प्रसंगी “गुर्जर बोली: साहित्य आणि लोकगाणी” या दुसऱ्या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. या पुस्तकात गुर्जर बोलीभाषेतील लोकसाहित्याचे विविध पैलू उलगडून दाखवण्यात आले आहेत.
       कार्यक्रमाचा भव्य उद्घाटन समारंभ
कार्यक्रमाचे उद्घाटन कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगावचे कुलसचिव डॉ. विनोद पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. त्यांनी आपल्या भाषणात बोलीभाषा ही केवळ संवादाचे माध्यम नसून ती एका समाजाची संस्कृती, परंपरा आणि जीवनशैली यांचे प्रतिबिंब असते, असे प्रतिपादन केले.
      साहित्यिक व मान्यवरांचा गौरव
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कृषितज्ञ वसंतराव लक्ष्मण महाजन होते. प्रमुख अतिथी म्हणून वेदसाई हॉस्पिटल, सावदा येथील बालरोगतज्ञ डॉ. विलास जगन्नाथ पाटील उपस्थित होते. त्यांनी बोलीभाषेतील साहित्य हा युवा पिढीपर्यंत पोहोचवण्यासाठी अशा उपक्रमांची आवश्यकता असल्याचे सांगितले.
     महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जे. बी. अंजने यांनी केंद्रामार्फत संकलीत साहित्याबद्दल माहिती देताना गुर्जर बोलीभाषेच्या लोप पावत असलेल्या काही खास वैशिष्ट्यांवर प्रकाश टाकला.
    साहित्य सादरीकरणासाठी आलेल्या प्रमुख साहित्यिकांमध्ये श्रीकांत रमेश पाटील (रांजणी), सुरेखा मनीष पाटील (रावेर), व्यंगचित्रकार शरद श्रावण महाजन (एरंडोल), शिक्षिका विमल वेडू पाटील (ऐनपूर), रजनी किशोर पाटील (नवीन निंबोल), रिता विजय चौधरी (बलवाडी), आणि सविता अरुण महाजन (कल्याण) यांचा समावेश होता. त्यांनी आपल्या सादरीकरणातून गुर्जर बोलीभाषेचे साहित्य किती समृद्ध आहे, हे स्पष्ट केले.
      या कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन करण्यासाठी चक्रधर शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष पी. टी. महाजन, उपाध्यक्ष श्रावण सिताराम महाजन, चेअरमन डी. के. महाजन, व्हॉ. चेअरमन विजयकुमार बाजीराव पाटील, सचिव किशोर जगन्नाथ पाटील, सहसचिव पी. एल. महाजन, तसेच ऐनपूर परिसर शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष भागवत विश्वनाथ पाटील आणि सचिव संजय वामन पाटील यांनी मोलाचे योगदान दिले.
     कार्यक्रमाचे प्रास्ताविक डी. के. महाजन यांनी केले, सूत्रसंचालन पवन चौधरी यांनी केले, तर आभार प्रदर्शन उपशिक्षक वैभव चौधरी यांनी मानले.
   या कार्यक्रमामुळे गुर्जर बोलीभाषेचे महत्त्व अधोरेखित झाले असून, भविष्यात या भाषेतील कथा, कविता, लोकगीते आणि इतर साहित्याचे संकलन आणि प्रकाशन करण्याच्या दिशेने पुढील पावले उचलण्यात येतील. यासाठी स्थानिक संस्थाचालक आणि शिक्षण मंडळांनी एकत्रितपणे काम करण्याचा निर्धार व्यक्त केला.
    कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी प्रकाश विद्यालय व ज्यु. कॉलेज, मोठे वाघोदेचे मुख्याध्यापक व्ही. एस. महाजन, पर्यवेक्षक आर. पी. बडगुजर, आणि सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले.
    गुर्जर बोलीभाषा ही समाजाच्या सांस्कृतिक वैभवाचे प्रतीक आहे. या बोलीभाषेच्या संवर्धनासाठी अशा प्रकारच्या उपक्रमांचे आयोजन ही काळाची गरज आहे. या कार्यक्रमामुळे स्थानिक बोलीभाषेतील साहित्याला जागतिक स्तरावर ओळख मिळवून देण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
     या साहित्य संमेलनाने जळगाव जिल्ह्यातील गुर्जर भाषिक अल्पसंख्यांकांमध्ये नवीन ऊर्जा निर्माण केली असून, या भाषेच्या संवर्धनासाठी सर्वांनी एकत्रित येण्याचा संकल्प केला आहे.

पाचोरा पोलीस स्टेशनवर महाराष्ट्र पोलीस स्थापना दिन साजरा, विद्यार्थी – विद्यार्थीनींना मार्गदर्शन

0

Loading

पाचोरा: आज पाचोरा पोलीस स्टेशनवर महाराष्ट्र पोलीस स्थापना दिन (रेझिंग डे) सप्ताहानिमित्त एक विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या

कार्यक्रमात पाचोरा येथील तावरेबाई कन्या शाळेच्या विद्यार्थी – विद्यार्थीनींना पोलीस प्रशासनाच्या विविध अंगांबद्दल सखोल माहिती देण्यात आली.
        सदर कार्यक्रमात शाळेतील विद्यार्थ्यांना पोलीस कार्याचे महत्त्व, सायबर क्राईम, डायल 112, सी टीम, वाहतुकीचे नियम, पोलीस व नागरिक यांच्यातील समन्वय, पोलीस काका व पोलीस दीदी याबद्दल माहिती देण्यात आली. विद्यार्थ्यांना पोलीस

स्टेशनमध्ये होणाऱ्या विविध कार्यविभागाची माहितीही दिली गेली.
    कार्यक्रमात पोलीस उपनिरीक्षक श्री. योगेश गणगे यांनी पोलीस स्टेशनमध्ये चालणाऱ्या कामकाजाची माहिती दिली. त्यानंतर, पोलीस निरीक्षक श्री. अशोक पवार यांनी विद्यार्थ्यांना महाराष्ट्र पोलीस स्थापना दिवसाचे महत्त्व आणि पोलीस क्षेत्रातील प्रमुख बाबींबद्दल मार्गदर्शन केले. त्यात सायबर क्राईम, डायल 112 चा वापर, सी टीमचे कार्य, वाहतुकीचे नियम आणि नागरिकांच्या सुरक्षेसाठी पोलीस काकांचा व पोलीस दीदींचा

महत्त्वपूर्ण रोल याबद्दल विद्यार्थ्यांना सांगितले.
    या कार्यक्रमाला तावरेबाई कन्या शाळेचे अंदाजे 40 ते 50 विद्यार्थी – विद्यार्थीनींना  तसेच शिक्षक जितेंद्र काळेसर , संजय निकुंभ उपस्थित होते. कार्यक्रमाने विद्यार्थ्यांमध्ये पोलीस प्रशासनाविषयी जाणीव जागरूकता निर्माण केली.
     कार्यक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना सुरक्षेच्या महत्त्वाबद्दल सांगितले गेले.विद्यार्थी – विद्यार्थीनींना सुरक्षित राहण्यासाठी पोलीस प्रशासनाच्या कामकाजाबद्दल योग्य माहिती

मिळाल्याने त्यांच्या मनात पोलीस कार्याबद्दल सकारात्मक दृष्टिकोन निर्माण झाला.
    हा कार्यक्रम विद्यार्थी – विद्यार्थीनींना एक प्रेरणादायक आणि शैक्षणिक अनुभव ठरला. पोलीस प्रशासन आणि नागरिकांच्या समन्वयाचे महत्त्व विद्यार्थ्यांना समजावून सांगितल्यामुळे, त्यांना त्यांच्यासोबतच समाजाची सुरक्षितता कशी सुनिश्चित केली जाऊ शकते याचे ज्ञान मिळाले.
             या कार्यक्रमामुळे विद्यार्थी – विद्यार्थीनींना पोलीस आणि प्रशासनासोबत काम करण्याची, तसेच समाजातील एक जबाबदार नागरिक म्हणून कर्तव्य पार करण्याची प्रेरणा मिळाली.

मराठी पत्रकार दिनानिमित्त पाचोऱ्यात उबाठा शिवसेने तर्फे पत्रकारांचा सन्मान सोहळा आयोजित

0

Loading

पाचोरा : पत्रकारिता ही समाजहितासाठी आणि राष्ट्रहितासाठी झटणारी प्रमुख संस्था आहे. ती लोकशाहीचा चौथा स्तंभ असून समाजातील विविध प्रश्न मांडण्यासोबतच सत्याला वाचा फोडणारे महत्त्वाचे साधन ठरते. पत्रकारितेच्या या महत्त्वपूर्ण भूमिकेची दखल घेत पाचोरा उबाठा शिवसेनेतर्फे 6 जानेवारी 2025 रोजी मराठी पत्रकार दिन साजरा करण्यासाठी विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
        हा सन्मान सोहळा पाचोऱ्यातील मध्यवर्ती शिवसेना कार्यालय, छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे होणार असून या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी सौ. वैशालीताई सुर्यवंशी यांची प्रमुख उपस्थिती असेल. कार्यक्रमाची सुरुवात सकाळी 9:30 वाजता होईल. या वेळी समाजहितासाठी कार्यरत असलेल्या पत्रकार बांधवांचा सन्मान करण्यात येणार असून त्यांना त्यांच्या योगदानाबद्दल गौरवण्यात येईल.
      कार्यक्रमादरम्यान पत्रकारितेच्या माध्यमातून जनहितासाठी केलेल्या कार्याची चर्चा होणार असून पत्रकारांच्या समस्या, त्यांची भूमिका आणि त्यांना भेडसावणाऱ्या आव्हानांवरही चर्चा होईल. हा कार्यक्रम समाजातील प्रत्येक घटकाने अनुभवण्यासाठी एक सुवर्णसंधी ठरणार आहे.
तरी पाचोरा व परिसरातील सर्व पत्रकार बांधव तसेच नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून मराठी पत्रकार दिन साजरा करण्यासाठी योगदान द्यावे, असे आवाहन पाचोरा उबाठा शिवसेनेतर्फे करण्यात आले आहे.                                          ठिकाण: मध्यवर्ती शिवसेना कार्यालय, छत्रपती शिवाजी महाराज चौक, पाचोरा
तारीख: 6 जानेवारी 2025 (सोमवार)
वेळ: सकाळी 9:30 वाजता
    हा कार्यक्रम पत्रकारांच्या कार्याला मान्यता देणारा आणि समाजहितासाठी त्यांना प्रेरणा देणारा ठरेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.


ताज्या बातम्या

error: Content is protected !!