Home Blog Page 103

” डॉ.सागरदादा गरुड : वैद्यकीय सेवेतून जनतेच्या हृदयात घर करणारे युवकांचे न भूतो न भविष्यति नेतृत्व”

Loading

जळगाव जिल्ह्यातील प्रति पंढरपूर समजले जाणारे शेंदुर्णी हे गाव म्हणजे केवळ धार्मिकच नव्हे तर सामाजिक आणि सेवाभावी क्षेत्रातही अत्यंत प्रतिष्ठित नाव. शेंदुर्णी म्हटले की, त्या गावाच्या इतिहासात आणि वर्तमानात अढळ स्थान मिळवलेल्या गरुड कुटुंबियांची ओळख आपोआपच पुढे येते. या गरुड कुटुंबाने केवळ आपल्या कर्तृत्वाने नव्हे, तर समाजहितासाठी घेतलेल्या ध्येयवादी झपाट्यामुळे संपूर्ण खानदेशात एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. याच घराण्यातील वंदनीय स्व. गजाननराव गरुड यांचे संस्कार, मूल्ये आणि सामाजिक बांधिलकी ही आजही नव्या पिढीला प्रेरणादायी ठरते. याच गरुड परिवारातील सुनीलदादा गरुड, आणि त्यांचे चतुर, संवेदनशील, सेवाभावी विचारसरणीचे सुपुत्र डॉ. सागरदादा गरुड यांच्यावर आज या संपूर्ण परंपरेचा वारसा जपण्याची जबाबदारी आहे, आणि विशेष म्हणजे त्यांनी ती जबाबदारी केवळ यशस्वीपणे पार पाडलीच नाही, तर त्या सेवेला एक वेगळेच व्यापक रूप दिले आहे.ते आपले काका संजयदादा गरुड यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच पाचोरा-भडगाव मतदारसंघासह जळगाव जिल्ह्यात ज्यांना युवकांचा खरा मित्र, गरजूंसाठी धावून जाणारा डॉक्टर, आणि भारतीय जनता पक्षाच्या तडफदार नेतृत्वाचे उदयोन्मुख प्रतीक म्हणून ओळखले जाते ते म्हणजे डॉ. सागर गरुड.
त्यांचा वाढदिवस, जो 30 एप्रीलला म्हणजेच महाराष्ट्र दिनाच्या १ दिवस आधी येतो, तो दिवस एक साक्षात्कारच वाटावा, असा असतो. कारण महाराष्ट्राच्या निर्मितीच्या दिवशी एकदिवस आधी जन्मलेली ही प्रतिभाशाली, संवेदनशील, आणि कर्तव्यनिष्ठ व्यक्ती म्हणजे जनसेवेसाठी जन्मलेला एक खरा योध्दा आहे.
29 मे च्या मध्यरात्रीपासूनच पाचोरा शहरातील विघ्नहर्ता हॉस्पिटल आणि त्यांच्या निवासस्थानासमोर युवकांची उत्साहात गर्दी झाली होती. दोन्ही मतदारसंघातील विविध भागांमधून, अनेक युवक चारचाकी व दुचाकी वाहनांवर मोठ्या जल्लोषात एकत्र येऊन सागरदादांचा वाढदिवस साजरा करत होते. युवकांच्या चेहऱ्यावरचा आत्मीयतेचा प्रकाश, एक आदर्शाची भेट घेण्यासाठी धावून आलेली तरुण मनं, आणि सागरदादांप्रती असलेली निखळ प्रेमभावना पाहून त्या रात्री पाचोरा शहरातील विघ्नहर्ता हॉस्पिटल समोर उत्सवाचे वातावरण निर्माण झाले होते.
या वाढदिवसाची सर्वात लक्षवेधी बाब म्हणजे युवकांनी खास बनवलेला, डॉ. सागरदादा गरुड यांचा मोठा चार बाय तीन फुटाचा फोटो असलेला केक, जो सर्वांचे लक्ष वेधून घेत होता. या केकवर सागरदादांची छायाचित्रित प्रतिमा म्हणजे एक श्रद्धा व आदर्श व्यक्तिमत्वाचे प्रतिक ठरली होती.
भारतीय जनता पक्षाचे संकटमोचक नेते आणि राज्याचे जलसंपदामंत्री गिरीशभाऊ महाजन यांच्या मतदारसंघातील ना.गिरीशभाऊंच्या मार्गदर्शनाखाली सागरदादा यांचे कार्य पाहता, ते केवळ वैद्यकीय व्यावसायिक म्हणून नव्हे तर सामाजिक कार्यकर्ता, राजकीय मार्गदर्शक आणि युवकांचे प्रेरणास्थान म्हणून ठसठशीत ओळख निर्माण करत आहेत. त्यांचे काका संजयदादा गरुड हे लोकप्रिय नेते असून, त्यांच्या छायेतून तयार झालेला डॉ. सागर गरुड हा एक असा नेतृत्वप्रवृत्तीचा तेजस्वी तारा आहे, जो राजकीय आकांक्षा असूनही त्याच्या कर्तव्यातून, वैद्यकीय सेवेतून, आणि सामाजिक कार्यातून आपली स्वतंत्र ओळख निर्माण करत आहे.विघ्नहर्ता मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचे संचालक म्हणून त्यांचे कार्य हे केवळ व्यवसायिक नसून त्यामध्ये सेवा, तळमळ, आणि माणुसकीचा गंध आहे. गरीब, गरजू आणि सत्ताधारी राजकीय मंडळींपासून दूर असलेल्या सामान्य जनतेसाठी ते नेहमी उभे राहिले आहेत. रुग्ण कोणत्याही धर्माचा असो, कोणत्याही पक्षाचा असो, सागरदादांची वैद्यकीय सेवा म्हणजे त्यांच्यासाठी आशेचे दार ठरतो.
कोरोना काळ असो किंवा अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या गावांमध्ये वैद्यकीय शिबिरे, सागरदादांनी कधीही समाजसेवेपासून माघार घेतली नाही. एकीकडे डॉक्टर म्हणून सतत रुग्णांमध्ये राहून त्यांना उपचार देणं, तर दुसरीकडे युवकांच्या प्रश्नांसाठी, बेरोजगारी, व्यसनमुक्ती, आरोग्य जनजागृतीसारख्या उपक्रमांत सक्रीय सहभाग घेणे हे त्यांचे गुणविशेष आहेत.त्यांच्या वाढदिवशी विशेषतः राजकीय, सामाजिक, वैद्यकीय, शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवरांनी, कार्यकर्त्यांनी आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे त्यांच्या उपचारांमुळे पुनर्जन्म मिळालेल्या अनेक रुग्णांनी त्यांना शुभेच्छांचा वर्षाव केला. सोशल मीडियावर सागरदादांना शुभेच्छा देणारे मेसेजेस, रील्स, फोटो कोलाजेस आणि व्हिडीओ क्लिप्सचा अक्षरशः पूर आला होता. त्यांच्या चहत्यांनी पोस्टर्स लावून, विविध सार्वजनिक ठिकाणी अन्नदान उपक्रम राबवून हा दिवस साजरा केला.वाढदिवस म्हणजे केवळ केक कापणे, हार घालणे, फोटोसेशन करणे एवढाच मर्यादित उत्सव नाही, तर तो त्या व्यक्तीच्या कार्याचा जाहीर गौरव असतो. आणि सागरदादा गरुड यांचा वाढदिवस ही केवळ औपचारिकता नव्हे, तर जनतेने त्यांच्या मनापासून केलेली कृतज्ञतेची अभिव्यक्ती आहे. राजकीय स्वार्थाच्या या गढूळ वातावरणात जेव्हा डॉक्टर सागरदादा गरुड सारखी व्यक्तिमत्वं आपल्या कामातूनच आदर्श निर्माण करतात, तेव्हा समाजाला एक सकारात्मक ऊर्जा मिळते. त्यांचे नाव सागर असले तरी त्यांच्या सेवाभावाची व्याप्ती सागराच्या खोलीपेक्षाही अधिक खोल आहे. त्यांची गाठ नुसती शेंदुर्णी किंवा पाचोऱ्यापुरती मर्यादित नाही, तर ती जळगाव जिल्ह्यातील प्रत्येक युवकाच्या हृदयात जाऊन पोहोचली आहे. ते राजकारणात नसूनही, हजारो युवक त्यांना आपला नेता मानतात आणि त्यांचे विचार, त्यांची काम करण्याची पद्धत, त्यांच्या बोलण्यात असलेली आपुलकी हीच त्यांची खरी ताकद आहे.आजच्या वाढदिवशी अनेक ज्येष्ठ डॉक्टरांनी, सामाजिक कार्यकर्त्यांनी, राजकीय नेत्यांनी त्यांच्या या सेवाभावी कामाचे कौतुक केले. एका साध्या कुटुंबातून आलेल्या सागरदादांनी डॉक्टर होणे, आणि मग यशस्वी हॉस्पिटल चालवणे, एवढ्यावर समाधान न मानता गरजूंकरिता मोफत आरोग्य शिबिरे, मोफत ऑपरेशन योजना, आणि सर्वसामान्यांच्या मदतीसाठी सतत उभे राहणे हा त्यांचा वैयक्तिक निर्णय होता, याचा आज समाजाला विशेष अभिमान वाटतो.
त्यांच्या वाढदिवशी “आरोग्य हेच खरे धन” ही उक्ती समाजात प्रत्यक्षात उतरवणाऱ्या सागरदादांना शुभेच्छा देताना अनेक रुग्णांच्या डोळ्यांत कृतज्ञतेचे अश्रू पाहायला मिळाले. कोणत्याही मोठ्या राजकीय नेत्यापेक्षा अधिक प्रेम आणि आपुलकी डॉ. गरुड यांनी रुग्णांच्या मनात मिळवली आहे.आजच्या या वाढदिवसाच्या निमित्ताने ‘झुंज वृत्तपत्र’ आणि ‘ध्येय न्यूज परिवार’ यांच्यावतीने आम्ही डॉ. सागर गरुड यांना हार्दिक शुभेच्छा देतो. त्यांना उदंड आयुष्य लाभो, जनसेवेचे हे व्रत निरंतर चालू राहो आणि वैद्यकीय क्षेत्रातील त्यांचे यश शतगुणित होवो, हीच प्रार्थना!
एकविसाव्या शतकात सेवाभावाने झेप घेणाऱ्या गरुडाप्रमाणे, डॉ. सागर गरुड हे नाव खऱ्या अर्थाने जनतेसाठी गरुड झेप घेणारे व्यक्तिमत्व बनले आहे.

अंधारात बुडालेला प्रशासनाचा गोंधळ : पुनगावरोड–गिरडरोड परिसरात बंद लाईटमुळे घरफोड्यांना आमंत्रण

Loading

पाचोरा – शहरातील पुनगावरोड–गिरडरोड परिसर हा रेल्वेस्थानकाच्या जवळील अतिशय महत्वाचा वर्दळीचा भाग म्हणून ओळखला जातो. विशेषतः रात्रीच्या वेळी या मार्गावरून मोठ्या प्रमाणात प्रवासी ये-जा करत असतात. रेल्वेने प्रवास करणारे, आपल्या नातेवाइकांना स्टेशनवर सोडणारे किंवा आणणारे, तसेच पहाटे मॉर्निंग वॉकला निघणारे नागरिक या मार्गावरून नेहमीच जात असतात. सध्या लग्नसराईचा कालावधी सुरू असल्यामुळे रात्री अपरात्री रेल्वेने प्रवास करणाऱ्यांची संख्या लक्षणीयरीत्या वाढली आहे. या परिसरात दुकाने किंवा हॉटेल्स नसले तरीही ही रस्त्याची वस्ती काहीशा अंतर्मुख भागात असल्याने इथे सतत नागरिकांची हालचाल सुरू असते. मात्र गेल्या चार दिवसांपासून या सगळ्या भागात सार्वजनिक रस्त्यावरील व लगतच्या कॉलनी मधील लाईट पूर्णपणे बंद आहेत आणि हा अंधार अक्षरशः गुन्हेगारांसाठी वरदान ठरत आहे. परिसरात पसरलेल्या अंधारामुळे केवळ अपघाताचाच नव्हे तर चोरी, घरफोडी, चैन स्नॅचिंग आणि गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यांनाही प्रोत्साहन मिळत आहे. विशेष म्हणजे या परिसरात आधीपासूनच दिवसाढवळ्या घरफोडी झाल्याचा इतिहास आहे नागरिकांनी यासंबंधी पोलिसांकडे तक्रारीही केल्या आहेत. स्थानिकांनी सांगितले की, अगदी उजेडातसुद्धा अलीकडे घरफोडीच्या घटना घडत असताना आता अंधाराचा फायदा घेऊन गुन्हेगार अधिक बिनधास्त होत चालले आहेत. अंधारामुळे नागरिकांना स्वतःच्या घराबाहेर पडणेही धोकादायक वाटत आहे. महिलांनी रात्री तर सोडाच पण संध्याकाळीही या भागातून एकट्याने चालणे टाळले आहे. वृद्ध व्यक्ती, लहान मुले, शाळा-कॉलेजला जाणारे विद्यार्थी आणि पहाटे व्यायामासाठी निघणारे नागरिक या सगळ्यांना अंधारात चालताना अपघाताचा धोका निर्माण झाला आहे. काहींना पाय घसरून पडल्याच्या तक्रारी आहेत, तर काहींना कुत्र्यांचा त्रास वाढला आहे. या भागात दुचाकी किंवा चारचाकी वाहन घेऊन जाणाऱ्यांना रस्त्यावर अडथळे किंवा खड्ड्यांचा अंदाज येत नाही आणि त्यामुळे अपघात घडण्याची शक्यता सातत्याने निर्माण होत आहे. स्थानिक नागरीकांनी याबाबत नगरपालिका व महावितरण कार्यालयात संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, परंतु कुठल्याही यंत्रणेकडून समाधानकारक उत्तर मिळालेले नाही. काही कर्मचारी ‘लाइनमध्ये तांत्रिक बिघाड आहे’, ‘संपर्क सुरू आहे’, ‘दुरुस्ती लवकर होईल’ असे आश्वासक पण कृतीशून्य प्रतिसाद देऊन वेळ मारून नेत आहेत. प्रत्यक्षात दुरुस्तीचा एकही प्रयत्न ठिकाणी होताना दिसत नाही. संपूर्ण रस्ता व कॉलनी रात्री पूर्णपणे काळोखात गडप होतो आणि त्यामुळे नागरिकांच्या सुरक्षेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. विशेष म्हणजे या भागात काही घरांवर आधीच दरोड्यांचे प्रयत्न झाले आहेत, अनेक घरांमध्ये घरफोडी करून हजारो रुपये रोख, सोनं व अन्य किमती वस्तू चोरीस गेल्याच्या घटनांची नोंद स्थानिक पोलिस ठाण्यात झाली आहे. मात्र त्या गुन्ह्यांचा तपास अपूर्ण असून आरोपी अजूनही फरार आहेत. त्यामुळे या परिसरातील नागरिक आधीच असुरक्षिततेच्या सावटाखाली वावरत आहेत. यावर सार्वजनिक प्रकाश व्यवस्था ठप्प झाल्यामुळे जणू प्रशासनाने गुन्हेगारांना आमंत्रणच दिल्यासारखी परिस्थिती झाली आहे. एखाद्या गंभीर प्रकारात घरफोडी झाली किंवा चोरीच्या वेळी घरातील व्यक्तींवर हल्ला झाला तर त्यास जबाबदार कोण? सार्वजनिक सुरक्षेचा हा मुद्दा असताना प्रशासन इतक्या गंभीरतेने दुर्लक्ष कसे करू शकते, असा सवाल नागरिक विचारत आहेत. तसेच हा रस्ता रेल्वे स्थानकाशी जोडला असल्यामुळे दिवसेंदिवस प्रवाशांची संख्या वाढत आहे. स्टेशनवरून बाहेर पडल्यावर प्रवाशांना घर गाठण्यासाठी याच रस्त्याचा उपयोग करावा लागतो. रात्रीच्या ट्रेनने पोहोचलेले प्रवासी, एकटे महिलावर्ग, विद्यार्थिनी यांच्यासाठी या अंधाऱ्या रस्त्यावरून प्रवास करणे म्हणजे थेट धोकादायक मोहिमेप्रमाणे झाले आहे. काही जण मोबाईलची टॉर्च लावून चालतात, तर काहींनी रिक्षा किंवा वाहन बोलावून दारापर्यंत आणण्यास सुरुवात केली आहे. पण सगळ्यांना हा पर्याय उपलब्ध होतोच असे नाही. परिणामी अंधारात चालताना घडणारे अपघात, हातातून वस्तू पडणे, लुटीचा धोका वाढणे असे प्रकार होऊ शकतात नागरिकांच्या सुरक्षेसाठी सार्वजनिक लाईट व्यवस्था ही अत्यावश्यक गोष्ट असताना ती चार दिवसांपासून ठप्प असणे ही बाब अत्यंत गंभीर असून यामागे कुठलेही अधिकृत स्पष्टीकरण देण्यात आलेले नाही. वास्तविक पाहता एखाद्या वस्तीतील लाईट बंद होणे म्हणजे त्या भागातील संपूर्ण सामाजिक जीवनच ठप्प होणे असते. यासाठी यंत्रणांनी तत्काळ कृती करणे गरजेचे असते. परंतु इथे तर चार दिवस उलटून गेले तरीही लाईट सुरू करण्यासाठी एकही यंत्रणा जागेवर दाखल झालेली नाही. नागरिकांच्या सुरक्षेच्या बाबतीत असा हलगर्जीपणा हा केवळ निष्काळजीपणा नसून हत्याराच्या स्वरूपातील दुर्लक्ष ठरते. विज वितरण कंपनी आणि नगरपालिका यंत्रणेचे कर्तव्य आहे की नागरिकांना मूलभूत सुविधा मिळाव्यात. यामध्ये वीज, पाणी, रस्ते, आरोग्य, आणि सुरक्षा या गोष्टी अत्यावश्यक आहेत. पण जर अंधाराचाच अंधार निर्माण केला जात असेल तर खाजगी वितरण कंपनी व नगरपालिका प्रशासनाची व्यवस्था लोकांच्या विश्वासास पात्र कशी ठरेल? विशेष म्हणजे या भागात दिवसा सुद्धा घरफोड्यांचे प्रमाण वाढले असल्याचे उदाहरणांसह स्पष्ट झाले असून यावरून अंधाराचा किती मोठा परिणाम होऊ शकतो, हे सहज लक्षात येते. जर दिवसा चोरी होत असेल तर रात्री अंधारात काय होईल, याची कल्पनाच थरकाप उडवणारी आहे. सोशल मीडियावरही या विषयाला वाचा फुटली असून अनेकांनी प्रशासनाविरोधात संतप्त प्रतिक्रिया दिल्या आहेत. काहींनी तर या अंधारात घरात घुसून चोरी किंवा अत्याचार झाला तर जबाबदार कोण, असा सवाल थेट वीज वितरण कंपनीला व न पा प्रशासनाला विचारला आहे. हे प्रकरण केवळ लाईट बंद आहे एवढ्यावर थांबत नाही, तर ही गोष्ट नागरिकांच्या जिवित व मालमत्तेच्या सुरक्षेशी निगडित आहे. प्रशासनाने या विषयावर संवेदनशीलता दाखवून तात्काळ लाईट पुरवठा सुरळीत करावा, महावितरण व नगरपालिका प्रशासनाने तपासणी करून दोष दूर करावा तोपर्यत पोलिस प्रशासनाने रात्रीची गस्त जाता वाढवून नागरिकांमध्ये विश्वास निर्माण करावा. अन्यथा या अंधारात गुन्हेगारीची मोठी साखळी उभी राहील आणि त्याच्या छायेत संपूर्ण समाज बकाल होईल. त्यामुळे हा विषय प्रशासनाने अत्यंत गांभीर्याने घ्यावा अशी मागणी जनतेकडून होत आहे

हुतात्म्यांच्या रक्तातून साकारलेला महाराष्ट्र : स्वाभिमान, बलिदान आणि वैचारिक जाज्वल्यतेचा प्रेरणास्तंभ – संदीप महाजन

Loading

सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यांतून निनादणारा आवाज “जय जय महाराष्ट्र माझा, गर्जतो सह्याद्रीचा सिंह” हा केवळ घोष नव्हता, तर त्या असंख्य हुतात्म्यांचा शपथविधी होता, ज्यांनी संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी आपले प्राण अर्पण केले. एक मे महाराष्ट्र दिन म्हणजे एका महान बलिदानाचा स्मृतिदिन. ही तारीख केवळ राज्यनिर्मितीचा दिनांक नसून, ती मराठी अस्मितेच्या संघर्षाची, सांस्कृतिक जाणीवेच्या लढ्याची आणि विचारवंतांच्या क्रांतीशील आवाजाची साक्ष देणारी दिनांक आहे. महाराष्ट्र राज्याची निर्मिती एक मे एकोणिसशे साठ रोजी झाली खरी, पण त्यामागे १०७ हुतात्म्यांचे रक्त सांडले. त्या रक्ताचे थेंब आज मुंबईतील हुतात्मा स्मारकात अमर झाले आहेत. हे स्मारक केवळ दगडांनी बांधलेले नाही, तर ते आपल्या अस्मितेच्या मुळाशी असलेल्या स्वाभिमानाचे प्रतीक आहे. मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र चळवळ ही केवळ भाषिक राज्यनिर्मितीची मागणी नव्हती. ती महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरेचा, सामाजिक मूल्यांचा आणि आर्थिक हक्कांचा संघर्ष होता. मराठी भाषकांसाठी स्वतंत्र राज्याची मागणी करताना अनेकांना आपले प्राण गमवावे लागले. त्या लढ्याला मुंबई केंद्रस्थानी होती – एक अशी मुंबई, जिच्या रचनेत कोळ्यांचे जाळ, गिरणगावातील श्रमिकांचे घाम, साहित्यिकांचे शब्द आणि बंडखोरांचे बाण होते. या चळवळीत हुतात्मा झालेले काही नावे आजही आपल्या स्मरणात आहेत: सिताराम बनाजी पवार, जोसेफ डेव्हिड पेजारकर, चिमणलाल डी. शेठ, रामचंद्र सेवाराम, शंकर खोटे, धर्माजी गंगाराम नागवेकर, निवृत्ती विठोबा मोरे, आत्माराम पानवलकर, बालप्पा कामाठी आणि असे अनेक. या यादीतील सर्व १०७ हुतात्म्यांचे बलिदान हा महाराष्ट्राच्या स्थापनेचा पाया आहे. या चळवळीला वैचारिक अधिष्ठान देणारे दोन महान विचारवंत म्हणजे स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर आणि प्रबोधनकार केशव सीताराम ठाकरे. सावरकरांनी क्रांती, राष्ट्रभक्ती आणि सांस्कृतिक अस्मिता या त्रिसूत्रींवर अधोरेखित केलेल्या विचारधारेतून ‘हिंदुत्व’ आणि ‘स्वराज्य’ या संकल्पनांना सामाजिक भान दिले. त्यांनी मराठी भाषेच्या जतनासाठी आणि देशातील सर्व नागरिकांमध्ये बौद्धिक जागृतीसाठी लेखन आणि व्याख्याने दिली. महाराष्ट्र हा फक्त भौगोलिक नव्हे, तर विचारांचा प्रांत आहे, हे त्यांच्या कार्यातून सिद्ध होते. प्रबोधनकार ठाकरे यांनी जातिव्यवस्था, अंधश्रद्धा आणि सामाजिक विषमतेविरुद्ध आपल्या लेखणीतून रणशिंग फुंकले. त्यांच्या लेखांमध्ये सामाजिक जागृतीचा आणि मराठी अस्मितेचा स्पष्ट स्फोट आढळतो. मुंबई ही मराठी माणसाची आहे, हा ठाम संदेश त्यांनी वेळोवेळी समाजमनात बिंबवला. या लढ्याला आकार देणाऱ्यांमध्ये अनेक झुंजार नेते, समाजसुधारक, कवी, साहित्यिक, कलावंत आणि लोकनेते होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सामाजिक समतेची मशाल पेटवली, आचार्य अत्रे यांनी आपल्या शब्दांनी हृदयाला घुसळून टाकणारे भाषण दिले. सेनापती बापट यांनी प्रत्यक्ष मैदानात उतरून नेतृत्व केले. एस. एम. जोशी, श्रीपाद अमृत डांगे, शाहीर अमर शेख, अण्णाभाऊ साठे यांनी लोकजागृतीचा मशाल उंचावून धरला. या सर्वांनी मिळून चळवळीला चैतन्य दिले. मुंबईत २१ नोव्हेंबर १९५५ रोजी शांततामय मोर्चा काढताना पोलिसांनी गोळीबार केला आणि त्यात अनेक युवक धारातीर्थी पडले. हे सारे युवक विविध सामाजिक पार्श्वभूमीतील होते – कामगार, विद्यार्थी, दुकानदार, साधे नागरिक. हे बलिदान महाराष्ट्राच्या रचनेचे मूळ बनले. या चळवळीत जी नावे अज्ञात राहिली, ती देखील आपल्या स्मृतीत टिकवणे हे आपले कर्तव्य आहे. अनेकांनी आपले नाव न सांगता, कुठल्याही श्रेयाशिवाय रात्रंदिवस प्रचार, जनजागृती आणि सहकार्य केले. त्यांचेही योगदान या भूमीच्या रक्तामध्ये मिसळलेले आहे. आज एक मे महाराष्ट्र दिन साजरा करताना आपण फक्त शासकीय कार्यक्रमांपुरते मर्यादित राहता कामा नये. ही संधी आहे – आपल्या भाषेसाठी, संस्कृतीसाठी, स्वाभिमानासाठी आपण काय करत आहोत हे विचारण्याची. आज महाराष्ट्र औद्योगिक, शैक्षणिक आणि सांस्कृतिक दृष्टीने देशात अग्रणी होती की आहे, हे सुद्धा तपासण्याची वेळ आलेली आहे. सोबतच शेतकरी आत्महत्यांच्या छायेत, उद्योग महाराष्ट्राबाहेर नेले जात आहेत, महाराष्ट्र बेरोजगारीच्या संकटात आणि सामाजिक विषमतेच्या वावटळीत अडकलेला आहे. त्यामुळे संयुक्त महाराष्ट्र चळवळीच्या मूळ उद्दिष्टांचा आपण विचार करायला हवा – केवळ भाषेच्या नावावर राज्य मिळवणे नव्हे, तर त्या राज्याला समतेचे, न्यायाचे आणि प्रगतीचे राज्य बनवणे ही खरी जबाबदारी आहे. १०७ हुतात्म्यांनी आपला प्राण गमावला, हे विसरणे म्हणजे स्वतःच्या इतिहासाला काळोख्या कोठडीत ढकलणे होय. स्वातंत्र्यवीर सावरकर, प्रबोधनकार ठाकरे आणि असंख्य दिग्गजांचा लढा केवळ त्या काळासाठी नव्हता, तो पुढील पिढ्यांना दिशा देणारा आहे. म्हणूनच – हुतात्म्यांच्या रक्तातून साकारलेला महाराष्ट्र ही संकल्पना आजही ताजी आहे. ती जागवली पाहिजे, जपली पाहिजे आणि पुढे नेली पाहिजे. आजच्या काळातील सावधपणा आणि काळजीची गरज अधिकच भासू लागली आहे. महाराष्ट्र आज औद्योगिक, शैक्षणिक, सांस्कृतिक आणि सामाजिकदृष्ट्या भारतात अग्रगण्य आहे. परंतु या प्रगतीच्या आड, मराठी अस्मिता पुन्हा एकदा एका संकटाच्या छायेत सापडत चालली आहे. वेगवेगळ्या राजकीय शक्ती आणि आर्थिक गट केवळ त्यांच्या स्वार्थासाठी महाराष्ट्राची सामाजिक, भाषिक आणि सांस्कृतिक ओळख गालबोटीत टाकण्याचा प्रयत्न करत आहेत. विशेषतः मुंबईसारख्या शहराचे केंद्रस्थान वारंवार डळमळीत करण्याचे प्रयत्न होतात. विशेष म्हणजे आज राजकीय आणि वैयक्तिक स्वार्थापोटी महाराष्ट्राची अस्मिता पुन्हा एकदा गुजरातच्या पायाशी टाकण्याचा अप्रत्यक्ष प्रयत्न काही मंडळी करत आहेत. हे केवळ दुर्दैवीच नव्हे, तर हुतात्म्यांच्या बलिदानाचा अपमान आहे. १०७ हुतात्म्यांचे रक्त ज्यात मिसळले आहे, ती मुंबई आणि महाराष्ट्राची अस्मिता कोणत्याही परिस्थितीत कोणाच्याही राजकीय ताटाखालचं मांजर होऊ देणार नाही, ही प्रत्येक महाराष्ट्र भूमिपुत्राची जबाबदारी आहे. हुतात्म्यांचे स्मरण केवळ एका दिवशी नको, तर प्रत्येक निर्णयात हवे. आज आपल्याला महाराष्ट्र दिन साजरा करताना केवळ शासकीय औपचारिकता नको, तर एक ठोस मूल्यनिष्ठ आकलन हवे. आपण शेतकऱ्यांच्या आत्महत्या, कामगारांचे विस्थापन, बेरोजगारी, भाषिक अनादर आणि सामाजिक विषमता अशा अनेक समस्यांनी ग्रासलेले आहोत. अशा परिस्थितीत आपण मराठी माणूस, मराठी संस्कृती, मराठी अस्मिता या संकल्पनांचा केवळ भावनिक नव्हे, तर क्रियाशील अर्थ शोधायला हवा. आजच्या पिढीने हे बलिदान आणि मूल्यसंस्था विसरल्यास पुन्हा एकदा आपल्याला त्या संपूर्ण लढ्याचा इतिहास नव्याने लिहावा लागेल – पण या वेळेस शक्यतो हुतात्म्यांशिवाय. महाराष्ट्र ही केवळ भूमी नाही, तर ती हुतात्म्यांच्या रक्तातून फुललेली अस्मिता आहे. ती कोणाच्या स्वार्थासाठी तुडवली जाऊ नये, हीच महाराष्ट्र दिनाच्या दिवशी आपण साऱ्यांनी शपथ घेणे गरजेचे आहे.

कर्तृत्वाचा सन्मान आणि नवीन वाटचालीचे स्वागत : किशोर पाटील सरांचा निरोप व अजय अहिरे सरांचे उत्साहाने स्वागत

Loading

भडगाव – एकाच पाचोरा तालुका सहकारी संस्थेमध्ये ३४ वर्षांची निष्ठेची व समर्पित सेवा देणारे, विद्यार्थ्यांच्या जीवनात शिक्षणाचे दीप उजळवणारे, शिक्षक म्हणून कर्तव्यशीलता आणि मुख्याध्यापक म्हणून नेतृत्वगुण दाखवणारे सौ. सु. गि. पाटील माध्यमिक विद्यालय व सौ. ज. ग. पूर्णपात्री कनिष्ठ महाविद्यालयाचे प्रमुख किशोर साहेबराव पाटील सर यांच्या सेवानिवृत्ती निमित्ताने भव्य निरोप समारंभ आणि त्याचसोबत नवे मुख्याध्यापक अजय बी. अहिरे सर यांच्या स्वागतासाठी एक प्रेरणादायी सोहळा आयोजित करण्यात आला.
.पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मा दिलीपभाऊ वाघ , संस्थेचे चेअरमन नानासाहेब संजय वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित या समारंभात परिसरातील मान्यवर, संस्थेचे पदाधिकारी, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. शाळेच्या प्रांगणात भरलेल्या या सोहळ्याचा प्रारंभ दीपप्रज्वलन व ज्ञानदेवतेच्या वंदनाने झाला. सरस्वती पूजन मान्यवरांच्या शुभहस्ते पार पडले आणि कार्यक्रमाला सुसंस्कृततेची आणि भावनिकतेची जोड मिळाली.
स्वागतगीताचे सुमधुर सादरीकरण श्रीमती पुनम पाटील मॅडम यांनी करून वातावरण भारावून टाकले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शालेय समितीचे चेअरमन आबासो दत्ताजी पवार होते. प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे व्हाईस चेअरमन नानासो व्ही. टी. जोशी, कनिष्ठ महाविद्यालयाचे चेअरमन बाबासो विनयजी जकातदार, उच्च माध्यमिक व्यवसाय विभागाचे चेअरमन नानासो विजयजी देशपांडे, ज्येष्ठ संचालिका श्रीमती ताईसो जयश्री पूर्णपात्री, भोजे शाळेचे स्थानिक चेअरमन दादासो योगेशजी पाटील, संस्था समन्वयक जिभाऊसो एस. डी. पाटील, पिताश्री साहेबराव पाटील, मातोश्री गुलाबराव पाटील, पर्यवेक्षक सि. व्ही. बिऱ्हाडे, शरद महाजन, माजी मुख्याध्यापक दादासो सुधीर पाटील, दादासो अरुण पाटील आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपमुख्याध्यापक आर. बी. पाटील यांनी केले. त्यांनी किशोर पाटील सरांच्या दीर्घ सेवेला नम्र अभिवादन करत त्यांच्या शाळेसाठी दिलेल्या योगदानाचा आढावा घेतला. किशोर पाटील सरांनी केवळ अध्यापनच नाही तर शाळेच्या सर्वांगीण विकासासाठी झटून काम केले. त्यांनी विविध शैक्षणिक उपक्रम, परीक्षा पद्धती, गुणवत्ता सुधारणा, शिक्षक संघटन, विद्यार्थ्यांच्या प्रगती कार्यक्रमात आपले नेतृत्व दर्जेदार पद्धतीने पार पाडले.
सेवानिवृत्तीच्या या प्रसंगी सौ. मनिषा पाटील यांचाही शालेय परिवारातर्फे विशेष सत्कार करण्यात आला. मान्यवरांच्या हस्ते त्यांना सन्मानचिन्ह, शाल आणि श्रीफळ प्रदान करण्यात आले. यावेळी भावस्पर्शी मनोगत व्यक्त करताना पर्यवेक्षिका सौ. छाया बिऱ्हाडे, शिक्षक किरण पाटील आणि गुलाबराव पाटील यांनी किशोर सरांच्या व्यक्तिमत्त्वाची आणि कार्याची उजळणी केली. त्यांची सडेतोड भूमिका, समयसूचक निर्णयक्षमता, मुलांना प्रगतीच्या दिशेने नेताना घेतलेली मेहनत आणि शिक्षक व कर्मचाऱ्यांमध्ये विश्वासाचे नाते, हे त्यांच्या यशस्वी कारकिर्दीचे गूढ असल्याचे प्रतिपादन झाले.
व्हाईस चेअरमन नानासो व्ही. टी. जोशी यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले की, किशोर पाटील सर हे प्रामाणिकतेचे मूर्तिमंत उदाहरण होते. त्यांच्या कार्यशैलीत स्पष्टता, वक्तशीरपणा आणि कार्यतत्परता सदैव जाणवली. त्यांच्या नेतृत्वामुळे संस्थेच्या दोन शैक्षणिक विभागांचा विकास सुस्थितीत झाला आणि त्यांचा दूरदृष्टीचा उपयोग आजही संस्थेच्या धोरणामध्ये जाणवतो.
बाबासो विनयजी जकातदार यांनी देखील आपल्या भाषणातून किशोर सरांच्या कार्यकाळातील आठवणींना उजाळा दिला. त्यांनी सरांच्या संयमी, समंजस व सहकार्यशील स्वभावाचे कौतुक केले. त्यांनी आपल्या कार्यकाळात संस्थेतील प्रत्येक सदस्याला सन्मानाने वागवले, त्यांच्या निर्णयप्रक्रियेतील समावेशकता आणि नवकल्पनांचा आग्रह संस्थेला सतत प्रगतीपथावर नेत होता, असे मत त्यांनी व्यक्त केले.
किशोर पाटील सर यांनी आपल्या सत्काराला उत्तर देताना भावनिक होत अनेक आठवणी शेअर केल्या. “माझ्या ३४ वर्षांच्या सेवायात्रेत अनेक उत्तम सहकारी लाभले. माझ्या आयुष्यात संस्थेचे अध्यक्ष भाऊसो दिलीप भाऊ वाघ, चेअरमन नानासो संजयजी वाघ, व्हाईस चेअरमन नानासो व्ही. टी. जोशी, मानद सचिव दादासो महेशजी देशमुख यांचे व संचालक मंडळाचे पाठबळ व सहकार्य लाभले म्हणूनच मी सर्व जबाबदाऱ्या प्रामाणिकपणे पार पाडू शकलो.” असे सांगताना त्यांनी अश्रुपूरित डोळ्यांनी सर्व सहकाऱ्यांचे आभार मानले.
ते पुढे म्हणाले की, “माझ्या शिक्षकी प्रवासाची सुरुवात कै. आप्पासाहेब ओंकार वाघ, कै. थेपडेसाहेब, कै. बापूसाहेब के. एम. पाटील यांनी विश्वासाने दिलेल्या संधीमुळे झाली आणि आज मी या कार्यकर्तृत्वाचा टप्पा पार करत आहे. हे माझ्यासाठी गौरवाचे आणि भावनिक क्षण आहेत.”
या कार्यक्रमात नवीन मुख्याध्यापक अजय बी. अहिरे यांचाही शालेय परिवारातर्फे जाहीर स्वागत करण्यात आले. त्यांच्या शैक्षणिक आणि प्रशासकीय कारकीर्दीची ओळख करून देत, पुढील वाटचालीसाठी मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या. शाळेच्या नव्या पर्वासाठी त्यांनी नेतृत्व स्वीकारले असून त्यांच्याकडून सर्वांच्या अपेक्षा उंचावल्या आहेत.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन अत्यंत सुबोध आणि प्रभावी शैलीत एन. के. सोनजे व सौ. रचना ठाकूर यांनी केले. त्यांच्या सुसंस्कृत शब्दफुलांनी कार्यक्रमात एकसंधता निर्माण केली. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेतील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, कर्मचारीवर्ग, विद्यार्थ्यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
संपूर्ण समारंभात एकच सूर घुमत होता – “शिक्षक जात नाही, तो विचारात, संस्कारात आणि कार्यात जिवंत राहतो.” किशोर पाटील सरांच्या सेवानिवृत्तीने भलेही एक पर्व संपले असेल, पण त्यांनी दिलेले शिक्षण, संस्कार आणि मूल्ये विद्यार्थ्यांमध्ये आणि संस्थेच्या कार्यपद्धतीत सदैव प्रभावी राहतील. नवीन मुख्याध्यापक अजय अहिरे सरांच्या माध्यमातून ही परंपरा नव्या तेजाने पुढे जाईल, अशी संपूर्ण शालेय कुटुंबाची भावना या समारंभातून व्यक्त झाली.

धरणगावच्या नागरी समस्यांवर शिवसेना आक्रमक: मुख्याधिकाऱ्यांना सविस्तर निवेदन सादर; तातडीने उपाय न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा

Loading

धरणगाव (प्रतिनिधी) – धरणगाव शहरातील नागरिक अनेक समस्यांनी त्रस्त असून, या समस्या प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे अधिक गंभीर होत चालल्याचे चित्र आहे. नागरी सुविधांच्या अभावामुळे जनतेला दररोज अनेक अडचणींचा सामना करावा लागत असून, या पार्श्वभूमीवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या शिष्टमंडळाने नगरपरिषदेचे मुख्याधिकारी झंवर साहेब यांची भेट घेत विविध समस्यांबाबत सविस्तर चर्चा करून निवेदन सादर केले. या निवेदनात शहरातील पायाभूत सुविधा, रस्त्यांची दुरवस्था, पाणीपुरवठा अडचणी, लाईटची गैरसोय, स्मारकांची देखभाल आदी प्रश्नांचा सविस्तर आढावा घेण्यात आला असून, संबंधित विभागांनी तात्काळ उपाययोजना न केल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला आहे.
या शिष्टमंडळात जळगाव लोकसभा सहसंपर्कप्रमुख गुलाबराव वाघ, युवासेना जिल्हाध्यक्ष माजी नगराध्यक्ष निलेश चौधरी, शिवसेना शहरप्रमुख भागवत चौधरी, उपतालुकाप्रमुख राजेंद्र ठाकरे, रणजितसिंग शिखरवार, भीमाभाऊ धनगर, युवासेना शहरप्रमुख लक्ष्मण माळी, शिवसेना उपशहरप्रमुख रमेश चव्हाण आदी पदाधिकारी उपस्थित होते. त्यांनी आपल्या सशक्त आणि संयमित मांडणीद्वारे प्रशासनाच्या निदर्शनास अनेक गंभीर समस्या आणून दिल्या.
शहरातील टिळक तलाव हा ऐतिहासिक व महत्त्वाचा जलस्रोत असून, सध्या तलावात केनी वनस्पतींचा प्रचंड वाढ झाल्याने जलसाठा प्रभावित झाला आहे. या वनस्पतींचा नायनाट करून तलावातील गाळ तातडीने काढण्याची मागणी शिष्टमंडळाने केली. हे केल्यास धरणगावातील पाणी टंचाईवर कायमस्वरूपी उपाय सापडू शकतो, असे प्रतिपादन करण्यात आले.
वाचनसंस्कृती जपणाऱ्या भाटिया गल्लीतील विक्रम ग्रंथालयाजवळ लाईटची सोय नसल्याने विद्यार्थी अंधारात बसून अभ्यास करतात. अशा ठिकाणी लाईटची तातडीने व्यवस्था व्हावी ही रास्त मागणी यावेळी लावून धरली गेली.
मोठा माळीवाडा परिसरातील रामलीला चौकाजवळ पाणीपुरवठ्याचा दाब अत्यंत कमी असल्यामुळे स्थानिक नागरिकांना पिण्याचे पाणी मिळवणे अवघड होत आहे. यावर त्वरित उपाययोजना करून पुरेसा दाब निर्माण करण्याच्या सूचना करण्यात याव्यात, अशी मागणी करण्यात आली.
शहरातील रस्त्यांची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे. सुभाष कोल्ड्रिंक्स व बालाजी स्टोअर्स परिसरातील रस्ते खड्ड्यांनी भरले आहेत. तसेच व्हाईट हाऊसपासून धरणी चौकापर्यंत पाईपलाइन खोदकामानंतर रस्त्यांची डागडुजी न झाल्याने वाहतुकीस अडथळा निर्माण झाला आहे. हे रस्ते तातडीने क्राँक्रीटीकरण करून नागरिकांची गैरसोय टाळावी, असे शिष्टमंडळाने बजावले.
धरणी चौक ते जुने पिंपळे रस्त्याजवळील सार्वजनिक शौचालयाजवळील रस्ताही अत्यंत खराब झाला असून, त्याचेही दुरुस्ती आवश्यक आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक ते टेलीफोन चौक हा संपूर्ण रस्ता दैनंदिन वापराचा असून, त्याच्या खड्डेमय स्वरूपामुळे अपघाताची शक्यता वाढली आहे. तिथे सुद्धा क्राँक्रीटीकरण आवश्यक आहे.
धनगर गल्लीतील अहिल्याबाई होळकर चौक परिसरात पाईपलाइन खोदकाम झाले असून रस्त्याची अवस्था बिकट झाली आहे. तिथे पुन्हा क्राँक्रीटीकरण करण्याची तातडीची गरज आहे. महात्मा फुले स्मारकातील ग्रेनाईट निघाले आहे, तसेच हार अर्पण करण्यासाठी स्टील रेलिंग नसल्यामुळे असुविधा निर्माण होते आहे. हे काम तत्काळ करावे, अशी मागणीही करण्यात आली.
रामलीला चौक ते बालाजी मंदिर या मार्गावरील रस्ताही पाइपलाइन कामामुळे खराब झाला आहे. याशिवाय अक्षय तृतीयेच्या निमित्ताने रामलीला सादरीकरणाच्या ठिकाणी देखील खड्डे पडल्याने सांस्कृतिक कार्यक्रमास अडचण निर्माण होण्याची शक्यता असून तो भाग लवकरात लवकर दुरुस्त करावा.
नेहरू नगरमधील पाण्याच्या टाकीपासून अनिल बडगुजर यांच्या घरापर्यंत नव्याने रस्ता क्राँक्रीटीकरणाची मागणी करण्यात आली. रेल्वेच्या प्लॅटफॉर्म क्रमांक २च्या कडील नगर परिषद हद्दीतील शेवटच्या टोकाला एक नवीन पोल बंद असून, त्याजवळील दुसरा पोल फ्रॅक्चर आहे. या दोन्हीचा तातडीने बंदोबस्त करावा लागेल, अन्यथा रात्रीच्या वेळेस मोठा अपघात होण्याची शक्यता आहे.
स्वामी समर्थ केंद्र ते रेल्वे हद्दीपर्यंतचा रस्ताही अत्यंत खराब झाला आहे. त्याचेही क्राँक्रीटीकरण आवश्यकरित्या करावे. भाटिया प्रोव्हिजनपासून पांडुरंग सुतारे यांच्या किराणा दुकानापर्यंतच्या भागात पाईपलाइन खोदकामानंतर रस्त्यांची अत्यंत खराब अवस्था झाली आहे. ही परिस्थिती कायमची टाळण्यासाठी या संपूर्ण मार्गाचे क्राँक्रीटीकरण करणे आवश्यक आहे.
मशिदअली धरणी नाल्याच्या पुलाजवळून गबा नंदा महाजन चौकापर्यंतच्या भागातही पाईपलाइनचे खोदकाम झाले असून रस्ता उद्ध्वस्त झाला आहे. त्यामुळे या भागातील नागरिकांच्या घरात धूळ आणि चिखलाचे साम्राज्य पसरले आहे. तात्काळ रस्त्याचे सुस्थितीत क्राँक्रीटीकरण करण्यात यावे.
या सर्व मागण्या म्हणजे केवळ राजकीय शिष्टाचार नव्हे, तर सामान्य नागरिकांच्या तळमळीच्या आणि रोजच्या जगण्याशी निगडीत आहेत. प्रशासनाने याबाबत गंभीर दखल घेऊन वेळप्रसंगी तांत्रिक पथक तयार करून कामांना त्वरित सुरुवात केली पाहिजे. अन्यथा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल, असे या शिष्टमंडळाने स्पष्ट शब्दांत सांगितले.
या निवेदनाद्वारे शिवसेनेने केवळ प्रशासनाच्या हलगर्जीपणावर बोट ठेवले नाही, तर समस्येचा सकारात्मक मार्ग सुचवत, उपयुक्त उपाय आणि सविस्तर कार्ययोजना प्रशासनासमोर मांडली आहे. हे निवेदन म्हणजे धरणगावकर जनतेच्या आवाजाचा ठोस दस्तावेज असून, शहराच्या विकासाचा आराखडाच प्रशासनासमोर ठेवण्यात आला आहे.
मुख्याधिकारी झंवर साहेब यांनी शिष्टमंडळाचे निवेदन गांभीर्याने ऐकून घेतले आणि लवकरात लवकर संबंधित विभागांशी समन्वय साधून कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर शिष्टमंडळाने त्यांच्या भावना नोंदवून दिल्या की, जनतेच्या सहनशक्तीला आता मर्यादा आहे. प्रशासनाने यावेळी जर तातडीने पावले उचलली नाहीत, तर होणाऱ्या परिणामांना नगरपरिषद स्वतः जबाबदार राहील.
या बैठकीचा निष्कर्ष असा की, धरणगाव शहराचा सर्वांगीण विकास करायचा असेल तर स्थानिक प्रशासनाला राजकीय इच्छाशक्ती, नागरिकांचा सहभाग आणि कार्यक्षम अंमलबजावणी आवश्यक आहे. शिवसेनेच्या या निवेदनामुळे प्रशासनाच्या झोपेचे पेंग फोडले गेले असून, लवकरच या सर्व मागण्यांवर योग्य कार्यवाही झाल्यास शहराला खऱ्या अर्थाने नवजीवन मिळेल, अशी अपेक्षा धरणगावकर जनतेने व्यक्त केली आहे.
या आंदोलनात्मक निवेदनाद्वारे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने पुन्हा एकदा सिद्ध केले आहे की, जनतेसाठी झगडणारा पक्ष हा रस्त्यावर उतरून संघर्ष करायला सदैव तयार आहे. जनता हीच खरी मालक असून, तिच्या हक्कांसाठी लढणे हेच शिवसेनेचे खरे अधिष्ठान आहे.

विधानसभा मतदारसंघ फेरबदल प्रक्रिया : एक सखोल विश्लेषण

Loading

सध्या आजी माजी भावी उमेदवारांना विधानसभा मतदार संघ फेरबदलाची वेद लागली आहे अर्थात त्यावर आता चर्चा होऊ लागली आहे म्हणूनच लोकशाही व्यवस्थेतील निवडणूक प्रक्रिया ही केवळ मतदानापुरती मर्यादित नसते, तर तिच्या मूळ गाभ्यात असतो “प्रतिनिधित्वाचा समतोल”. म्हणजेच प्रत्येक मतदारसंघात नागरिकांना समान प्रतिनिधित्व मिळावे, ही कल्पना तितकीच महत्त्वाची असते जितकी मतदानाची. भारतासारख्या लोकशाही राष्ट्रात, जिथे लोकसंख्या दर दहा वर्षांनी कोट्यवधीने वाढते, तिथे मतदारसंघांची

रचना एकाच पद्धतीने कायम ठेवणे अन्यायकारक ठरते. यासाठीच ‘फेररचना’ किंवा ‘निर्धारण’ ही प्रक्रिया अस्तित्वात आली आहे.
फेरबदल म्हणजे लोकसभा व विधानसभेतील मतदारसंघांच्या सीमा, संख्यात्मक रचना आणि आरक्षण श्रेणी यामध्ये जनगणनेनुसार केले जाणारे बदल. या प्रक्रियेमुळे प्रत्येक मतदारसंघात जवळजवळ समान लोकसंख्या राहील, असा प्रयत्न केला जातो. ही प्रक्रिया केवळ सीमा बदलण्यापुरती मर्यादित नसून त्यात एखाद्या मतदारसंघाचे विलोपन, नवीन मतदारसंघाची निर्मिती, तसेच अनुसूचित जाती-जमातींसाठी राखीव जागांच्या फेरनिश्चितीचाही समावेश असतो.
भारतीय संविधानाच्या कलम 82 आणि कलम 170 नुसार अनुक्रमे लोकसभा आणि विधानसभेतील मतदारसंघांच्या रचनेत

फेरबदल करण्याची तरतूद आहे. यासाठी संसद प्रत्येक दशकाच्या जनगणनेनंतर “निर्धारण अधिनियम” पारित करते. या अधिनियमाच्या आधारे निर्धारण आयोग (Delimitation Commission) नेमण्यात येतो. एकदा आयोग नेमला गेला की तो एक स्वायत्त संस्था म्हणून कार्य करतो आणि त्याचे निर्णय न्यायालयात आव्हान न देता येणारे असतात.
सिद्धांततः प्रत्येक १० वर्षांनी, म्हणजे प्रत्येक जनगणनेनंतर, फेरबदल होणे अपेक्षित आहे. परंतु प्रत्यक्षात काही राजकीय व धोरणात्मक कारणांमुळे हे फेरबदल संधीत स्वरूपात झाले आहेत. उदाहरणार्थ :
1976 मध्ये 42 वी घटनादुरुस्तीने, 1971 नंतरची जनगणना ग्राह्य न धरता 2001 पर्यंत फेरबदल स्थगित करण्यात आला.
84 वी घटनादुरुस्ती (2001) आणि 87 वी घटनादुरुस्ती (2003) नंतर फेरबदलाची मुदत 2026 पर्यंत वाढवण्यात आली.
त्यामुळे सध्या अस्तित्वात असलेली मतदारसंघ रचना ही 1971 च्या जनगणनेवर आधारित आहे, जरी त्यामध्ये काही लहानसहान बदल 2002 नंतर करण्यात आले असले, तरी मोठा फेरबदल 2026 नंतर होणार आहे असे सांगितले जात असले तरी शेवटी सत्ताधाऱ्यांचे निर्णय महत्त्वाचे असतात
निर्धारण व्या आयोग ही एक स्वतंत्र संस्था असते, आणि त्यात खालील प्रमुख सदस्य असतात :
अध्यक्ष – सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश
सदस्य – निवडणूक आयोगाचे प्रतिनिधी
राज्यांचे प्रतिनिधी – संबंधित राज्यांतील निवृत्त वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी
हा आयोग पूर्णपणे स्वायत्त असतो (असे लोकशाहीत म्हटले आहे ) आणि त्याच्या शिफारशी संसद किंवा राज्य विधिमंडळ बदलू शकत नाहीत. एकदा आयोगाने आपला अहवाल सादर केल्यावर, तो राजपत्रात प्रकाशित केला जातो आणि त्यानंतर त्याची अंमलबजावणी सुरू होते.                  १)जनगणना अहवालाचा अभ्यास : सर्व जिल्ह्यांची आणि तालुक्यांची लोकसंख्या तपासली जाते.                                       २)मसुदा अहवाल तयार करणे : प्राथमिक सीमा निश्चित केली जातात.                                       ३) सार्वजनिक सुनावणी : जनते कडून सूचना हरकती मागवण्यातयेतात.                                      ४)अंतिम अहवाल : सर्व बाजू लक्षात घेऊन अंतिम सीमारेषा ठरवल्या जातात                     ५) राजपत्रात अधिसूचना : अंतिम अहवाल प्रकाशित होतो आणि कायदेशीर अंमलबजावणी सुरू होते.
लोकसंख्येतील असमतोल : काही भागांत लोकसंख्या झपाट्याने वाढते, काही ठिकाणी ती स्थिर राहते. परिणामी एका मतदारसंघात ३ लाख मतदार, तर दुसऱ्यात १० लाख मतदार अशी स्थिती होते.
शहरीकरण : शहरांमध्ये स्थलांतर झाल्याने मतदारसंघांचे स्वरूप बदलते.
राजकीय समतोल राखणे : सर्व राज्यांना आणि सामाजिक घटकांना योग्य प्रतिनिधित्व मिळावे यासाठीही फेरबदल आवश्यक असतो.
राजकीय समीकरणांमध्ये बदल : नवीन मतदारसंघ तयार होणे किंवा जुने विलोपित होणे म्हणजे पक्षांच्या बालेकिल्ल्यांवर परिणाम होतो.
आरक्षणाचे पुनर्वाटप : अनुसूचित जाती-जमातींच्या लोकसंख्येनुसार आरक्षणाची पुन्हा मांडणी होते.
मतदारांची ओळख बदलणे : अनेक वेळा मतदार एका मतदारसंघातून दुसऱ्यात जातात, ज्यामुळे स्थानिक प्रश्नांवर फोकस बदलतो.
2031 च्या जनगणनेनंतर जेव्हा 2026 नंतर फेरबदल केला जाईल, तेव्हा खालील बदल घडण्याची शक्यता आहे :
उत्तर भारतातील राज्यांना अधिक प्रतिनिधित्व मिळू शकते, कारण तिथे लोकसंख्येचा वाढीचा दर अधिक आहे.
दक्षिण भारतातील राज्यांना फटका बसू शकतो, कारण त्यांनी कुटुंबनियोजन यशस्वीपणे अंमलात आणल्यामुळे तिथली लोकसंख्या स्थिर आहे.
यामुळे राजकीय संघर्ष वाढण्याची शक्यता असून, एक नवा राष्ट्रीय समतोल निर्माण करण्याची गरज भासेल.
मतदारसंघ फेरबदल ही केवळ तांत्रिक प्रक्रिया नसून ती भारतातील लोकशाहीचे भवितव्य ठरवणारी अत्यंत संवेदनशील बाब आहे. त्यात केवळ आकडे नाहीत, तर प्रत्येक नागरिकाचा आवाज, त्याचे प्रतिनिधित्व आणि भविष्यातील नेतृत्व सामावलेले आहे. म्हणूनच ही प्रक्रिया पारदर्शक, न्याय्य आणि सर्वसमावेशक असणे अत्यावश्यक आहे. 2026 नंतरचा फेरबदल हा केवळ मतदारसंघांचा नव्हे, तर भारताच्या लोकशाहीचा नवा अध्याय ठरणार आहे. अर्थात तोपर्यंत लोकशाही व लोकशाहीचे चौघही खांब अस्तित्वात असले तर ?                                              Sandip D Mahajan                                            M.A. (Politics),                                    B.Ed. (Marathi & History)

गुन्हेगारीविरुद्ध कठोर तपासाचा धगधगता दीप: हवालदार रमेश कुमावत यांना महासंचालक पदकाने गौरव

Loading

पाचोरा – कठोर शिस्त, प्रामाणिक कर्तव्यभावना आणि न्यायासाठी अविरत संघर्ष यांचा त्रिवेणी संगम म्हणजेच पाचोरा पोलिस स्टेशनमध्ये कार्यरत असलेले ज्येष्ठ आणि कुशल पोलिस हवालदार रमेश शंकर कुमावत. वरखेडी, तालुका पाचोरा, जिल्हा जळगाव येथील रहिवासी असलेले हवालदार कुमावत यांनी गेल्या २९ वर्षांत पोलिस दलात आपल्या तपासकौशल्याने, निडर वृत्तीने आणि अतुलनीय धाडसाने अनेक गुन्हे उघडकीस आणून न्याय व्यवस्थेवर जनतेचा विश्वास दृढ केला आहे. त्यांच्या या असामान्य योगदानाची दखल घेऊन महाराष्ट्र पोलिस महासंचालक कार्यालयाकडून त्यांना राज्यातील एक अत्युच्च मानाचा आणि गौरवाचा समजला जाणारा ‘महासंचालक पदक’ जाहीर करण्यात आला आहे. येत्या १ मे २०२५ रोजी मान्यवरांच्या हस्ते या पदकाचा अधिकृत प्रदान सोहळा पार पडणार आहे.
तपास म्हणजे केवळ गुन्हेगाराला अटक नव्हे, तर न्यायाच्या प्रत्येक थराला न्याय देणे हवालदार रमेश कुमावत यांनी गेल्या तीन दशकांहून अधिक काळ जळगाव जिल्ह्यातील विविध पोलिस ठाण्यांवर काम करताना अनेक गुन्ह्यांचा खोलवर तपास करत आरोपींना शिक्षा मिळवून देण्यात यश संपादन केले आहे. विशेष म्हणजे त्यांनी हाताळलेली प्रकरणे ही अत्यंत गुंतागुंतीची, सामाजिकदृष्ट्या संवेदनशील आणि कायद्याच्या कक्षा तपासणारी होती. त्यांच्या तपासातील कौशल्य, तत्परता, पुराव्यांची अचूक मांडणी आणि न्यायालयीन कामकाजासाठी आवश्यक असलेल्या प्रत्येक गोष्टीची शिस्तबद्ध तयारी यामुळे त्यांच्या तपासाची चर्चा जिल्हा व राज्य पातळीवरच नव्हे तर राष्ट्रीय स्तरावर झाली आहे.चोपडा-अडावद खून प्रकरण: न्यायासाठी उभारलेला ठाम लढा
चोपडा-अडावद परिसरात घडलेल्या एका गंभीर खून प्रकरणात, भारतीय दंड विधानाच्या कलम ३०२ अंतर्गत दाखल गुन्ह्याचा तपास हवालदार रमेश कुमावत यांनी आपल्या अनुभवसंपन्न दृष्टीकोनातून केला. घटनास्थळावरील सूक्ष्म निरीक्षण, साक्षीदारांचे मनोवैज्ञानिक पातळीवरून घेतलेले जबाब, आरोपींच्या हालचालींचा बारकाईने घेतलेला मागोवा, यामुळे या गुन्ह्यातील आरोपीला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली. या तपासप्रक्रियेची दखल पुणे सीआयडी विभागानेही घेतली व त्यांचा अहवाल प्रशंसनीय ठरला. गुन्हा उघडकीस आणण्याचा वेग, पुराव्यांची साखळी सिद्ध करणे आणि न्यायालयीन प्रणालीसमोर भक्कम सादरीकरण – या सर्व बाबींमध्ये रमेश कुमावत यांनी उच्च दर्जाची कार्यक्षमता दाखवली.
सरकारी वकिलाच्या खुनाचा खटला: कायद्याच्या सन्मानासाठीचा निर्धार
जामनेर पोलिस स्टेशन अंतर्गत एका अत्यंत धक्कादायक घटनेत सरकारी वकिलाचा निर्घृण खून करण्यात आला होता. या गुन्ह्यात भारतीय दंड विधानाच्या कलम ३०२, ३४ आणि २०१ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणात हवालदार कुमावत यांनी जेवढा धैर्याने आणि दक्षतेने तपास केला, तेवढाच कायदेशीर प्रक्रियेचा आदर राखून पुराव्यांची अचूक मांडणी केली. त्यांच्यामुळे या प्रकरणातही आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली. विशेष म्हणजे या खटल्याचा निकाल आणि तपास इतका प्रभावी ठरला की दिल्ली येथील राष्ट्रीय संशोधन फौजदारी न्याय विभाग (National Institute of Criminology and Forensic Science) ने तो एलएलएम (न्यायाधीश) अभ्यासक्रमाच्या अंतिम वर्षात अभ्यासासाठी समाविष्ट केला आहे. या घटनेमुळे रमेश कुमावत यांचे नाव देशपातळीवर पोहोचले आणि त्यांच्याप्रती न्यायव्यवस्थेचा विश्वास अधिक दृढ झाला.नर्स खून प्रकरण: नेपाळपर्यंत पाठलाग करून आरोपीला न्यायाच्या पिंजऱ्यात खऱ्या अर्थाने तपास म्हणजे गुन्हेगाराला कुठल्याही परिस्थितीत शोधून काढणे आणि त्याला न्यायासमोर उभे करणे. एका नर्सच्या खुनाच्या प्रकरणात आरोपी नेपाळमध्ये पलायन करत असताना रमेश कुमावत यांनी आपली जागरूकता, गुप्तचर यंत्रणेचा वापर आणि स्थानिक अधिकाऱ्यांशी समन्वय साधत, संबंधित आरोपीला अटक करून महत्त्वाचे पुरावे सादर करत, जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात यश मिळवले. हे प्रकरण त्यांची आंतरराज्यीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरील तपास कौशल्य दाखवणारे ठरले. पाचोरा, जामनेर, भडगाव, चोपडा, एरंडोल आदी विविध पोलिस स्टेशनांत खून, दरोडे, अत्याचार, लूट, फसवणूक यांसारख्या गुन्ह्यांमध्ये त्यांनी अनेक वेळा प्रभावीपणे तपास करत दोषारोप सिद्ध केले आहेत. अनेक प्रकरणांमध्ये ते ‘कन्व्हिक्शन’ मिळवण्यासाठी आवश्यक असलेली सर्व कागदपत्रे, साक्षीदार व तांत्रिक पुरावे संकलित करण्यात आघाडीवर राहिले आहेत. त्यांच्या कामाचा ठसा असा आहे की, जिल्ह्यातील अनेक वरिष्ठ पोलीस अधिकारी व न्यायालयीन वकिलांकडून त्यांचा सल्ला घेतला जातो.व्यक्तिमत्त्व आणि कार्यशैली: संयम, चौकसपणा आणि निःस्वार्थ समर्पण हवालदार रमेश कुमावत यांचे व्यक्तिमत्त्व अत्यंत साधे, परंतु तपास करताना चौकस, डिटेल्सकडे लक्ष देणारे, आणि सत्याचा शोध घेण्याची अपार तळमळ असलेले आहे. कोणत्याही दबावाला बळी न पडता, कायदा व न्याय व्यवस्थेवर विश्वास ठेवून ते नेहमीच पीडितांसाठी लढताना दिसले आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली काम केलेल्या जवान व सहकाऱ्यांना नेहमीच प्रेरणा मिळाली आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांचा विश्वास, सहकाऱ्यांचा सन्मान आणि जनतेचा आशीर्वाद – हे त्यांचे खरी संपत्ती आहे.
हवालदार रमेश शंकर कुमावत यांना ‘महासंचालक पदक’ जाहीर झाल्यानंतर पाचोरा पोलिस स्टेशनसह संपूर्ण जळगाव जिल्ह्यातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. पोलिस अधीक्षक कार्यालय, विविध पोलिस स्टेशन, माजी वरिष्ठ अधिकारी, विविध सामाजिक संघटना आणि सामान्य नागरिकांकडून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत असून अनेकांनी सामाजिक माध्यमांद्वारे शुभेच्छा व्यक्त केल्या आहेत. त्यांचा हा सन्मान म्हणजे जळगाव जिल्ह्याच्या पोलीस दलाची मान उंचावणारा ऐतिहासिक क्षण ठरला आहे.
हवालदार रमेश कुमावत यांचा कार्यप्रवास हा एक सामाजिक न्यायासाठी झिजलेला प्रवास आहे. त्यांच्या २९ वर्षांच्या सेवेतील प्रत्येक खटला, प्रत्येक तपास, आणि प्रत्येक निकाल हा कायद्याच्या विजयाचा, आणि मानवी हक्कांच्या रक्षणाचा एक भाग होता. महासंचालक पदक हे फक्त त्यांचे वैयक्तिक यश नाही, तर न्याय, प्रामाणिकपणा आणि जबाबदारी यांचे प्रतीक आहे. अशा निष्ठावान अधिकाऱ्यांनी आजच्या पिढीतील पोलिस कर्मचाऱ्यांना कार्यसंस्कृती आणि सामाजिक जबाबदारी यांचे भान देण्याचे काम केले आहे.
त्यांच्या पुढील वाटचालीसाठी पाचोरा पोलिस स्टेशन आणि जिल्हा पोलिस दलाकडून शुभेच्छा दिल्या जात असून, त्यांनी कार्याच्या या उंच शिखरावरून आणखी नवे आदर्श निर्माण करावेत, हीच प्रामाणिक अपेक्षा आहे. त्यांच्या कर्तृत्वाचे हे सुवर्णपदक काळाच्या इतिहासात कायम तेजस्वी ठरणार आहे.

तपासात ‘सिंघम’ ठरलेले सचिन कदम यांना सर्वोत्तम तपास पदकाने गौरव – महाराष्ट्र पोलीस महासंचालकांचे राज्यस्तरीय सन्मान

Loading

पाचोरा – महाराष्ट्र पोलीस दलात आपल्या निष्ठा, प्रामाणिकपणा, धाडस, आणि प्रखर तपास कौशल्यामुळे एक वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या श्री. सचिन कदम या कर्तव्यदक्ष अधिकारी यांना “बेस्ट इन्व्हेस्टीगेशन अवॉर्ड 2024” हा राज्यस्तरीय मानाचा पुरस्कार मिळणार असल्याचे नुकतेच जाहीर झाले आहे. महाराष्ट्र पोलीस महासंचालक पदक हा प्रतिष्ठेचा गौरव दिनांक १ मे २०२५ रोजी महाराष्ट्र राज्याच्या पोलीस महासंचालक माननीय रश्मी शुक्ला मॅडम यांच्या हस्ते प्रदान केला जाणार आहे.
या सन्मानामागे असलेली कहाणी म्हणजे एका पोलीस अधिकाऱ्याच्या कठोर तपासाची, तडफदार निर्णयक्षमतेची आणि न्यायासाठी लढणाऱ्या मनोवृत्तीची प्रेरणादायी वाटचाल.
कोरोनाच्या भीषण काळात पाचोरा येथे प्रशिक्षणार्थी पोलीस उपअधीक्षक म्हणून केवळ एका महिन्याच्या कालावधीत त्यांनी केलेली कामगिरी चकित करणारी होती. या अल्प कार्यकाळातच त्यांनी अनेक गंभीर गुन्ह्यांचा तपास करत गुन्हेगारांना अटक केली. विशेष म्हणजे ट्रिपल सीट, कागदपत्र नसलेल्या आणि लायसन्सविना चालवणाऱ्या दुचाकीस्वारांवर त्यांनी मोठ्या प्रमाणावर दंडात्मक कारवाई करत शासनाच्या महसूलात लाखोंचा दंडात्मक निधी जमा केला.
या कालावधीत ‘सिंघम’ अशी ओळख पाचोरा शहरवासीयांनी त्यांना दिली होती. केवळ अपघाती कारवाया नव्हे, तर टपऱ्यांवरील गुटख्याचा व्यवहार, विनापरवाना विक्रीसारखे अवैध व्यवसाय, स्थानिक गुन्हेगारीची मुळे यांच्यावर त्यांनी धडाकेबाज कारवाई करत एक आदर्श निर्माण केला होता.
त्यांची पुढील कारकीर्द उपविभागीय पोलीस अधिकारी म्हणून जळगाव आणि बुलढाणा या जिल्ह्यांत झाली. या दोन्ही ठिकाणी त्यांनी गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यांचा तपास करत अनेक प्रकरणे न्यायाच्या मार्गावर आणली. ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर घडणाऱ्या अत्याचार, खून, आणि बलात्काराच्या घटनांचा अत्यंत बारकाईने आणि कायदेशीर शिस्तीने तपास करून अनेक आरोपींना न्यायालयात दोषी ठरवले.
आज ते नागपूर येथे अप्पर पोलीस अधीक्षक – लाचलुचपत प्रतिबंधक विभागात कार्यरत असून, भ्रष्टाचार आणि अन्यायाविरुद्धचा त्यांचा लढा सुरूच आहे. त्यांनी आतापर्यंत अनेक हिट लिस्टवरील गुन्हेगारांचा अचूक तपास करत त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली आहे.
अकोला जिल्ह्यातील गुडधी गावात १२ वर्षीय अनुसूचित जातीच्या मुलावर अनैसर्गिक अत्याचार झाल्याचा एक गंभीर गुन्हा २०२० मध्ये घडला होता. आरोपी ओम अजाबराव धोटे याने पब्जी गेम खेळण्याच्या बहाण्याने मुलाला फसवून त्याच्यावर पाशवी अत्याचार केला होता. हे संपूर्ण प्रकरण सिव्हील लाईन पोलीस स्टेशन, अकोला येथे दाखल झाले होते.
या गुन्ह्याचा तपास तत्कालीन उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. सचिन कदम यांनी प्रचंड निष्ठेने केला. त्यांनी कलम ३७७ भादंवि, ४ (२) पोक्सो, आणि अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंध कायदा याअंतर्गत तपास पूर्ण करून दोषारोपपत्र न्यायालयात दाखल केले.
या खटल्यामध्ये ५ साक्षीदारांची सखोल साक्ष घेतली गेली आणि सरकार पक्षाने मांडलेले युक्तिवाद यावरून आरोपी दोषी सिद्ध झाला. दि. ३१ मार्च २०२३ रोजी विशेष जिल्हा व सत्र न्यायाधीश-१ शयना पाटील यांनी आरोपीला दुहेरी जन्मठेप, २० वर्षे सक्त मजुरी व २० हजारांचा दंड ठोठावला.
तपासाचे कौशल्य, दस्तऐवज सादरीकरण आणि न्यायालयातील समर्पक साक्ष-पुरावे यामुळे हा गुन्हा सिद्ध झाला. या निकालात सचिन कदम यांच्या प्रामाणिक तपासाची सर्वत्र स्तुती झाली.
सचिन कदम यांची कारकीर्द म्हणजे नव्या पिढीच्या पोलीस अधिकाऱ्यांसाठी प्रेरणास्थान आहे. त्यांनी प्रादेशिक, ग्रामीण, शहरी अशा विविध विभागांत तपास केला असून कुठेही गुन्हेगारीला अभय दिलेले नाही. ते नेहमी कायद्याच्या चौकटीत राहून, अत्यंत अचूक व निष्पक्ष निर्णय घेत असतात.
त्यांच्या कार्यशैलीत स्पष्टता, तत्परता, आणि कायद्याबद्दलची आस्था दिसून येते. एखाद्या गुन्ह्यात आरोपीचा समाजिक दर्जा, राजकीय दबाव किंवा आर्थिक सामर्थ्य कधीही त्यांच्या तपासात आड येत नाही. त्यामुळेच अनेक वेळा त्यांच्या हातून तपासलेले खटले अंतिम न्यायालयात यशस्वी ठरले आहेत.
पाचोरा शहरातील नागरिक आजही त्यांच्या कार्यकाळाचे स्मरण करताना “खरा पोलीस अधिकारी म्हणजे सचिन कदम” असे अभिमानाने सांगतात. त्यांचे काम केवळ दहशत निर्माण करणे नाही तर लोकांच्या मनात विश्वास निर्माण करणे हेच उद्दिष्ट ठेऊन
नागपूर येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागात कार्यरत असताना त्यांनी अनेक सरकारी यंत्रणांतील भ्रष्ट अधिकाऱ्यांवर पाळत ठेवून रंगेहात पकडण्याचे यश संपादन केले. विशेष म्हणजे त्यांनी चालवलेल्या कारवाईंमध्ये अनेक मोठ्या आर्थिक घोटाळ्यांचा उलगडा झाला आणि दोषींना तुरुंगात पाठवले गेले.
तपास प्रक्रिया ही केवळ गुन्हेगार शोधणे नाही तर त्याच्या मागे असलेली यंत्रणा, आर्थिक साखळी, आणि भविष्यात होणारे धोके ओळखणे ही त्यांची व्याप्ती आहे. हीच कार्यशैली त्यांना इतर अधिकाऱ्यांपासून वेगळी करते.
राज्य शासनाकडून ‘बेस्ट इन्व्हेस्टीगेशन अवॉर्ड’ हा गौरव ज्या अधिकाऱ्याच्या तपास कौशल्याला मिळतो, त्या गुणवंत अधिकाऱ्यांपैकी सचिन कदम हे एक आहेत. पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांच्या हस्ते हा पदक समारंभ दिनांक १ मे २०२५ रोजी होणार असून, त्याच्या निमित्ताने पुन्हा एकदा सत्य, न्याय आणि निष्पक्षतेच्या मार्गाने चालणाऱ्या तपास यंत्रणेला प्रोत्साहन मिळणार आहे.
या सन्मानासोबतच सचिन कदम यांचे नाव पोलीस दलाच्या इतिहासात उज्ज्वल तपास अधिकारी म्हणून कोरले जाणार आहे. त्यांच्या कार्यामुळे महाराष्ट्र पोलीस दलाचा गौरव वाढला असून हे पदक केवळ वैयक्तिक नव्हे तर संपूर्ण पोलीस यंत्रणेच्या सन्मानाचे प्रतीक ठरणार आहे.

कर्तृत्वाच्या अमृताक्षरांची साक्ष: नानासाहेब व्ही टी जोशी यांच्या जीवनगौरवाचा दीपोत्सव

0

Loading

पाचोरा ( सौ. शितल सं महाजन ) एक यशस्वी जीवन म्हणजे केवळ पदे, प्रतिष्ठा किंवा पुरस्कार नव्हे, तर समाजासाठी झिजलेल्या प्रत्येक क्षणाची गोष्ट असते. शिक्षण, सहकार, सामाजिक विकास आणि ग्रामीण परिवर्तनाच्या चळवळीचा आत्मा ठरलेले, पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्थेचे व्हाईस चेअरमन तसेच उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे सिनेट सदस्य नानासाहेब व्ही. टी. जोशी यांच्या कार्यकर्तृत्वाचा अमृत महोत्सव आणि नागरी गौरव सोहळा रविवार, दिनांक २७ एप्रिल रोजी पाचोरा शहरात उत्साह, कृतज्ञता आणि सन्मानाच्या सुवर्णशृंखलेत गुंफत साजरा करण्यात आला. या ऐतिहासिक सोहळ्याचे आयोजन पीटीसी शिक्षण संस्था, एम. एम. महाविद्यालय आणि नानासाहेब व्ही. टी. जोशी अमृत महोत्सव समिती यांच्या संयुक्त विद्यमाने श्री एम. एम. महाविद्यालयाच्या विशाल प्रांगणात अत्यंत भव्य स्वरूपात करण्यात आले होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र विधानसभेचे माजी अध्यक्ष आणि लोकशाही मूल्यांचे भक्कम पुरस्कर्ते अरुणभाई गुजराथी हे होते. प्रमुख अतिथी म्हणून उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे विद्यमान कुलगुरू डॉ. विजय माहेश्वरी, नाशिक पदवीधर मतदारसंघाचे लोकाभिमुख आमदार सत्यजित तांबे, पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष व माजी आमदार दिलीपभाऊ वाघ, विद्यापीठाचे सेवानिवृत्त कुलगुरू डॉ. के. बी. पाटील, संस्थेचे चेअरमन नानासाहेब संजय वाघ, शेंदुर्णी शिक्षण संस्थेचे ज्येष्ठ पदाधिकारी संजयदादा गरुड, सिनेट सदस्य दिलीप पाटील, प्र-कुलगुरू एस. टी. इंगळे, कुलसचिव विनोद पाटील, विद्यापीठ लेखाधिकारी रवींद्र पाटील, महाराष्ट्र राज्य विश्वकोश निर्मिती मंडळाचे प्रमुख डॉ. शामकांत देवरे, व्यवस्थापन परिषदेचे सदस्य अमोल पाटील, संस्थेचे मानद सचिव तसेच छत्रपती संभाजीनगर उच्च न्यायालयातील ज्येष्ठ विधिज्ञ अ‍ॅड. महेशदादा देशमुख, संचालक सतीश चौधरी, खलील देशमुख, प्राचार्य डॉ. शिरीष पाटील, उपप्राचार्य डॉ. वासुदेव वले, प्रा. डॉ. जे. व्ही. पाटील, भावेश जोशी, चेतन जोशी आदी विविध क्षेत्रातील नामवंत मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात झाली ती सरस्वती पूजनाने तदनंतर पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्थेचे दिवंगत शैक्षणिक आणि सहकारी चळवळीतील शिल्पकारांच्या प्रतिमांना पुष्पांजली वाहण्यात आली. या पूजन विधीनंतर एक हृदयस्पर्शी क्षण साकारला गेला, जेव्हा काश्मीरमधील पहलगाम येथे अतिरेक्यांच्या गोळीबारात शहीद झालेल्या भारतीय पर्यटकांच्या स्मृतीस सामूहिक श्रद्धांजली वाहण्यात आली. देशभक्तीने ओथंबलेल्या या क्षणी संपूर्ण सभागृह निशब्द होत एकात्मतेची शपथ घेत उभे राहिले.
यानंतर कार्यक्रमात सर्व उपस्थितांच्या नजरा खिळल्या त्या एका अत्यंत भावनिक सोहळ्यावर—नानासाहेब व्ही. टी. जोशी व त्यांच्या पत्नी सौ. कांचन जोशी यांचे ७५ दिव्य दिव्यांनी पारंपरिक औक्षण करण्यात आले. या औक्षणाने सभागृहात एक आध्यात्मिक व भावनिक लहरी पसरल्या. शाल, श्रीफळ, विशेष सन्मानचिन्ह, ड्रेस, साडी आणि गौरवपत्र देत जोशी दांपत्याचा नागरी सत्कार करण्यात आला. हा सत्कार केवळ एका व्यक्तीचा नव्हता, तर त्यांच्या संपूर्ण कार्यप्रवासातील शिस्त, निष्ठा आणि समर्पणाचा जयघोष होता.
कार्यक्रमाचा आणखी एक विशेष आणि ऐतिहासिक क्षण ठरला तो आमदार सत्यजित तांबे यांच्या हस्ते ‘ज्ञानामृत’ या गौरव ग्रंथाचे प्रकाशन. या ग्रंथात नानासाहेब जोशी यांच्या जीवनयात्रेतील अनेक टप्प्यांचा अभ्यासपूर्वक आलेख, विविध साक्षात्कार व मुलाखतींचे संकलन करण्यात आले असून शिक्षण, सहकार, आर्थिक विकास, सामाजिक परिवर्तन या सर्व क्षेत्रांमधील त्यांचा पावलोपावली असलेला प्रभाव शब्दबद्ध करण्यात आला आहे.
उत्तर महाराष्ट्राचे कुलगुरू डॉ. विजय माहेश्वरी यांनी आपल्या भाषणात नानासाहेब व्ही टी जोशी यांच्या कार्यकर्तृत्वाचे अचूक विश्लेषण करत स्पष्ट केले की, त्यांच्या नेतृत्वातून केवळ एक संस्था नव्हे, तर एक विचारधारा उभी राहिली आहे. नाशिकचे आमदार सत्यजित तांबे यांनी आपल्या मनोगतात सामाजिक बांधिलकी, सहकारातील सचोटी, आणि ग्रामीण भागातील प्रामाणिक शिक्षणविकास यासाठी जोशी यांनी जो झगडा दिला, त्याचे शब्दशः गौरव करत त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
माझी कुलगुरू डॉ. के. बी. पाटील यांनी आपल्या भाषणात नानासाहेब व्हि टी जोशी यांना ‘कर्तृत्वाचा दीपस्तंभ’ अशी उपमा देत त्यांची दूरदृष्टी, निर्भयता व नेतृत्वगुण यांचे तोंडभरून कौतुक केले. अध्यक्षीय भाषणात अरुणभाई गुजराथी यांनी ‘अशा कार्यकर्त्यांच्या अस्तित्वामुळेच देशातील लोकशाही बळकट होते’ असे नमूद करत, नानासाहेब जोशी यांचे जीवन म्हणजे जिद्द, धैर्य, नम्रता आणि आत्मविकासाचा प्रेरणादायी प्रवास आहे, असे ठामपणे सांगितले.
या गौरव सोहळ्यात नानासाहेब व्ही टी जोशी यांनी आपल्या भाषणात अत्यंत भावनांनी ओतप्रोत अशी कृतज्ञतेची भाषा वापरली. त्यांनी सांगितले की, हा सन्मान केवळ एक पुरस्कार नव्हे, तर एक जबाबदारी आहे. उर्वरित आयुष्य समाजाच्या सेवेतील नवा अध्याय असेल, असे ठामपणे नमूद करत त्यांनी आपल्या जीवनातील सर्व सहकारी, शिक्षकवर्ग, विद्यार्थी, आणि आप्तेष्टांचे नाव घेऊन आभार मानले.
कार्यक्रमात चित्रकला शिक्षक आर. वाय. पाटील यांनी पेन्सिलच्या साहाय्याने रेखाटलेले नानासाहेब जोशी यांचे अत्यंत जिवंत आणि हुबेहूब चित्र उपस्थितांना भेट म्हणून अर्पण केले. यासोबतच विजय सोनजे आणि उमेश माळी या पत्रकारांनी नानासाहेब जोशी यांच्या विविध कार्यांची वृत्तपत्रातील कात्रणे संकलित करून तयार केलेला दस्तावेज भेट दिला, जो त्यांच्या कार्याचा लेखाजोखा ठरतो.
कार्यक्रमाला पीटीसी शिक्षण संस्थेतील सर्व शिक्षक, कर्मचारी, विद्यार्थ्यांचे पालक, संस्थेचे पदाधिकारी आणि जोशी परिवाराचे स्नेही मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रत्येकाचे उत्स्फूर्त योगदान, प्रेम, आदर आणि सहकार्य हेच या कार्यक्रमाच्या यशस्वीतेचे खरे गमक ठरले.
प्रास्ताविकात पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष तथा मा. आमदार दिलीपभाऊ वाघ यांनी नानासाहेब जोशी यांच्या संस्थात्मक कार्याची साद्यंत माहिती देत, त्यांनी दिलेल्या दिशा, मार्गदर्शन आणि सहकार्याचे भावनिक स्मरण केले. सूत्रसंचालन  प्रा. सी. एन. चौधरी व महेश कौंडीण्य यांनी प्रभावी शैलीत करत उपस्थितांच्या मनात एक भावनिक लय निर्माण केली. आभारप्रदर्शन करताना उपप्राचार्य डॉ. वासुदेव वले यांनी प्रत्येक मान्यवर, पाहुणे, शिक्षक, कर्मचारी, पत्रकार बंधू व सर्व सहभागींचे मनःपूर्वक आभार मानले.
कार्यक्रमाचा समारोप राष्ट्रगीताने झाला. भारतमातेसमोर सर्व उपस्थित उभे राहून आदर व्यक्त करत ‘वंदे मातरम्’च्या घोषात हा कार्यक्रम इतिहासाच्या पानात अजरामर झाला. पीटीसी शिक्षण संस्थेच्या सर्व शिक्षक व कर्मचाऱ्यांनी या सोहळ्याच्या यशस्वी आयोजनासाठी विशेष परिश्रम घेतले. त्यांच्या सामूहिक प्रयत्नामुळे हा सोहळा केवळ एक कार्यक्रम न राहता, एका महान व्यक्तिमत्वाच्या प्रेरणादायी जीवनाचा साक्षात्कार ठरला.
या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने नानासाहेब व्ही टी जोशी यांच्या जीवनातील प्रत्येक टप्पा नव्या पिढीला प्रेरणा देणारा ठरतो आहे. त्यांच्या कार्याचे प्रतिबिंब म्हणजे मूल्याधिष्ठित समाजनिर्मितीची प्रक्रिया आहे. आजच्या तरुण पिढीने त्यांचे जीवन आदर्श मानून सामाजिक बांधिलकी, शैक्षणिक मूल्ये आणि सहकारी विचारसरणी यांचे संगोपन करावे, हीच या भव्य सोहळ्याची खरी सार्थता ठरते. त्यांच्या जीवनाचा आदर्श उजळत राहो, हीच प्रार्थना आणि त्यांचे कार्य अशाच प्रकारे अमृतासारखे सतत प्रवाहित राहो, हीच या गौरव सोहळ्याची प्रेरणादायी समाप्ती ठरली.

“हाय अलर्टच्या अफवांना नागरिकांनी बळी पडू नये : झुंज वृतपत्र व ध्येय न्युजचे आवाहन

0

Loading

पाचोरा – सध्या सोशल मीडियावर “२९ मे ते २ जून दरम्यान तापमान ४५ ते ५५ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचेल” असा एक अलर्ट मोठ्या प्रमाणावर फिरत आहे. या संदेशात, नागरिकांनी सकाळी १० ते दुपारी ३ वाजेपर्यंत मोकळ्या जागी बाहेर न जाण्याचा सल्ला देण्यात आला असून, मोबाईल फटण्याचा धोका, वाहनांमध्ये वस्तू ठेवण्यावर निर्बंध यासह विविध सूचना दिल्या आहेत.
तथापि, भारतीय हवामान विभाग (IMD) आणि राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण (NDMA) यांच्याकडून यासंबंधी कोणताही अधिकृत हाय अलर्ट जारी करण्यात आलेला नाही.
IMD च्या माहितीनुसार, काही भागात तापमान ४५ अंश सेल्सिअसच्या आसपास पोहोचण्याची शक्यता असून, यासाठी सामान्य सतर्कतेचे पालन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे, मात्र ५० ते ५५ अंश सेल्सिअस तापमानाचा कोणताही अधिकृत अंदाज किंवा धोक्याचा इशारा अद्याप जारी झालेला नाही.
मोबाईल फोन फटण्याचा धोका, नागरिक सुरक्षा महासंचालनालय नावाने जारी सूचना अशा बाबी देखील सत्यावर आधारित नाहीत. भारतात “नागरिक सुरक्षा महासंचालनालय” नावाचा कोणताही स्वतंत्र सरकारी विभाग अस्तित्वात नाही. या प्रकारचे मेसेज मुख्यतः अफवा पसरवण्याचा प्रयत्न असल्याचे स्पष्ट झाले आहे. एवढे निश्चित हवामान विभागाने काही काळजी घेणे आवश्यक सांगीतले आहे, जसे की भरपूर पाणी पिणे, थेट सूर्यप्रकाश टाळणे, घरात वायुवीजन राखणे आणि गरज नसल्यास दुपारी बाहेर न जाणे. हे वेळोवेळी ऋतुनुसार काळजी घेणे आवश्यक असते पण यासाठी भीती पसरवण्याची गरज नाही.
तसेच, कारमध्ये ज्वलनशील वस्तू उष्णतेत ठेवू नयेत, टायरमध्ये गरजेपेक्षा अधिक हवा भरू नये अशा सामान्य खबरदाऱ्या उन्हाळ्यात नेहमीच घ्याव्यात, असे तज्ञांनी सुचवले आहे. मात्र, कोणतीही गॅस स्फोटाची भीती किंवा मोबाइल आपोआप फुटण्याचा विशेष इशारा अधिकृत यंत्रणांनी दिलेला नाही. सर्व नागरिकांनी सोशल मीडियावर येणाऱ्या कोणत्याही अशा संदेशाची शहानिशा करावी आणि फक्त अधिकृत शासकीय यंत्रणांकडून प्राप्त होणाऱ्या सूचनांवर विश्वास ठेवावा सध्याच्या सोशल मीडियावर फिरणारा “हाय अलर्ट” संदेश फेक आहे. तापमान वाढ होत असले तरी भीती निर्माण करणाऱ्या अफवांवर विश्वास न ठेवता, योग्य काळजी घेऊन सुरक्षित राहावे एवढेच झुंज वृतपत्र व ध्येय न्युजचे आवाहन आहे

ताज्या बातम्या

error: Content is protected !!